कोरोना व्हायरस विरोधात चाबूक हातात घेण्याची वेळ

कोरोना विरोधात चाबूक हातात घेण्याची वेळ

कोरोना व्हायरस विरोधात चाबूक हातात घेण्याची वेळ आता आलीये.

मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोना साथीच्या नियोजनाविषयी व उपाययोजनांविषयी डॉ. अमोल अन्नदाते यांचे दै. लोकमत मधील खुले मा. मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांच्यापर्यंत पोहचण्यासाठी कृपया ते पत्र जास्तीत जास्त शेअर करा.

प्रती,
माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि
आरोग्यमंत्री राजेश टोपे,

कोरोना विरोधात चाबूक हातात घेण्याची वेळ ती हीच!

राज्यातील कोरोना व्हायरस बाधितांची व मृतांची संख्या वाढत असताना आता २६/११ च्या हल्ल्या प्रमाणे ही स्थिती आहे. त्यासाठी आपण दोघे प्रयत्नशील आहातच. पण तरीही कोरोनाला सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील आम्ही अनेक वर्षे शिकत, वैद्यकीय अभ्यासक्रमात वाचत आलेल्या गोष्टी ग्रास रूटला तशा राबवलेल्या दिसत नाहीत. त्यामुळे या गोष्टी आपल्या पर्यंत पोहोचवून त्यावर एका दिवसाचा ही विलंब न होता अमलबजावणी झाली तरच आपण येत्या दोन आठवड्यात या साथीच्या तिसऱ्या स्टेजला रोखू शकतो. नंतर जर ग्रामीण भागात ही साथ पसरली तर मोठा अनर्थ होऊ शकतो. तसेच या वेळी आंतरराष्ट्रीय पातळीवर कोरोना व्हायरस विरोधात लढण्यासाठी चीन, कोरिया, सिंगापूर मॉडेल चा अभ्यास करून यातील प्रत्येकाच्या चांगल्या उपायांची गोळाबेरीज महाराष्ट्रात होताना दिसत नाही.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

सध्या केस ट्रेसिंग, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, आयसोलेशन व क्वारंटाइन या चार शब्दांभोवती सगळी यंत्रणा प्रत्येक मिनिटा गणिक हलली पाहिजे. पण असे कुठे ही होताना दिसत नाही. आयसोलेशन कक्षांची संख्या अजून ही खूप कमी आहे. तालुका पातळीवरून रुग्ण सापडल्यास तो नेमका कसा व कोणी जिल्ह्याच्या ठिकाणी घेऊन जायचा याचे कुठले ही नियोजन अजून दिसत नाही. कुठल्या ही वयक्तिक सुरक्षेच्या साधना शिवाय रुग्ण नेणाऱ्या ड्रायव्हरलाच लागण झाल्याची उदाहरण समोर आहे. संशयित रुग्णाला प्रवास करत नेणेही मोठे जोखमीचे ठरणार आहे. म्हणून प्रत्येक तालुक्याला एक आयसोलेशन कक्ष तातडीने उभा करावा लागणार आहे. आयसोलेश साठी १०० खाटा तयार आहेत या गोष्टींना काही अर्थ नाही. फक्त आयसोलेशन कक्ष असे कुठल्या ही कक्षाला पाटी लावून तो तयार होणार नाही. हा कक्ष कसा असला पाहिजे व यातील ७ महत्वाची मार्गदर्शक तत्वे कुठली याचा अभ्यास होऊन त्या होत आहेत की नाही याचे व्हिडीओ प्रुफ मुख्य सचिव, मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री यांनी रोज तपासले तरच यंत्रणा हलेल. ग्रामीण भागात रुग्ण स्वतः उपजिल्हा रुग्णालयात कोरोना पॉजिटिव्ह व रुग्णाशी संपर्क आल्याचे सांगून ही त्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्याची चिठ्ठी देऊन पाठवले जात आहे. अजूनही परदेशी प्रवाशांचे वर्गीकरण व स्क्रिनिंग बाबत गोंधळ सुरूच आहे. अशाने परदेशातून येणाऱ्या इंडेक्स केसेस कशा रोखल्या जाणार. तसेच यांच्या बॅग्स चे निर्जंतुकीकरणही अजूनही विमानतळावर होत नाही. औरंगाबाद ला एका रशियन प्राध्यापिका कोरोना पॉजिटिव्ह असल्याचे समजून ही तिने दिवसभर परीक्षा घेतलेल्या विद्यार्थ्यांना काही तास एकत्र ठेवून, त्यातील तीन चार जणांचे स्वॅब घेऊन या विद्यार्थ्यांना सोडून देण्यात आले. अशी अनेक अनागोंदीचे प्रकार रोज घडत आहेत.मुळात होम क्वारंटाइन हा शब्द आपला सर्वांचा मोठा घात करणार आहे हे समजून घेतले पाहिजे. हातावर शिक्के मारून लोक स्वतःच्या घरी स्वयंप्रेरणेने एका खोलीत १४ दिवस राहतील हे अशक्य आहे. म्हणून आताच्या घडीला क्वारंटाइन साठी मुंबईत ओसाड व रिकामी असलेली सर्व कामगार हॉस्पिटल, सर्व शासकीय गेस्ट हाउस, ग्रामीण भागातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, गरज असल्यास खाजगी दवाखाने व अगदी या पुढे जाऊन मुंबईतील ७२००० रिकामे फ्लॅट, या पलीकडे जाऊन इतर भागातील हॉटेल्स अशी एक क्वारंटाइन साठी मोठी व्यवस्था आपण निर्माण केली व अति सूक्ष्म नियोजन करून प्रत्येक केसच्या संपर्कात आलेल्यांना १४ दिवस क्वारंटाइन केले तरच या घडीला केसेस व मृतांची संख्या कमी होईल. हे आपल्याला फार काळ नाही तर फक्त पुढील दोनच आठवडे करायचे आहे. मुख्यमंत्री येतात तेव्हा रात्रीतून रस्ते आणी हेलीपॅड तयार होतात मग या सुविधा यंत्रणेने मनावर घेतले तर या कुठल्या ही विलंबा शिवाय का उभ्या राहू शकत नाहीत. यात कुठे ही चीनने १० दिवसात ४५०० खाटांचे रुग्णालय बांधले तसे करायचे नाही तर शासनाच्याच तयार वास्तूंमध्ये नियोजन करून त्या कार्यरत करायच्या आहेत.

पण आदरणीय मुख्यमंत्री साहेब, कोरोना व्हायरस विरोधात चाबूक हातात घेण्याची वेळ आली आहे , केरळ या राज्याने प्रत्येक पॉजिटिव्ह रुग्णाच्या दर तासाच्या प्रवासाचे मॅपींग केले व सर्व संपर्कात आलेल्यांची पूर्ण माहिती मिळवली. हीच तत्परता आपल्याकडे आणावी लागणार आहे. होम क्वारंटाइन सध्या तरी अपयशी होताना दिसत असले तरी ते करयचे असल्यास फक्त हातावर शिक्के मारून त्यांना घरी सोडून हे साध्य होणार नाही. त्यांना यंत्रणेने घरी सोडून त्यांच्यावर जीपीएस द्वारे निगराणी ठेवण्यासाठी गृह विभागाची यंत्रणा कामाला लावावी लागेल. यासाठी सिंगापूर मॉडेलचा अभ्यास करून त्याची पूर्ण नक्कल केली तरी यश येईल. २८ फेब्रुवारी रोजी लॅन्सॅटने लक्षणांनंतर जितक्या लवकर आयसोलेश व तातडीने संपर्कात आलेल्यांचे क्वारंटाइन तितके प्रभावी साथ नियंत्रण हे इतर देशांच्या अनुभवा वरून सांगितले आहे. दक्षिण कोरियाने जास्तीत संशयितांच्या तपासण्या व युध्द पातळीवर आदर्श व्यवस्थेत आयसोलेशन, क्वारंटाइनकवर ( होम क्वारंटाइन नाही ) हे प्रारूप राबवले व साथ नियंत्रित करून मृत्यू दर ०.२ टक्के इतका कमी ठेवला.

आताच्या घडीला ही साथ पसरण्याचे A,B,C,D चेन समजली तर सगळ्या उपाय योजनांचे नियोजन सोपे जाईल पण हे आपण दोघां पर्यंत कदाचित पोचतच नाही आहे. म्हणून प्राधान्य कशाला द्यावे या विषयी सर्व यंत्रणेचा गोंधळ उडालेला आहे. आपण जाहीर केलेले कोरोना साथीचे ४५ कोटी अजून पोहोचलेलेच नाही. त्याचा खर्च कसा करायचा याचे कुठले ही सूक्ष्म नियोजन जिल्हा पातळीवर झालेले नाही. उपजिल्हा रुग्णालयांना दीड दोन लाखांपर्यंत हवी ती खरेदी करा असे संदेश केवळ पोहोचले आहेत . यात त्याच त्या सर्वसामन्यांच्या सूचनांचे बोर्ड लावण्यात हा निधी वाया जाण्याची दाट शक्यता आहे. केस ट्रेसिंग व कॉन्टॅक्ट ट्रेसिंग कसे करायचे याचे प्रशिक्षण अजून नाही, आशा सेविका, हेल्थ वर्कर्सला आपली काय भूमिका असेल या बाबत काहीही माहिती नाही. सरकारी रुग्णालयात डॉक्टरांना रुग्ण तपासताना वापरायचे पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट पोहोचण्याची अजून लक्षणे दिसत नाहीत.

लोकसंख्येच्या प्रमाणात व सर्वाधिक केसेस असून ही आपल्या राज्याची टेस्टिंग क्षमता खूप कमी आहे. तसेच टेस्टिंग साठी परदेश प्रवास व कोविड पॉजिटिव्ह शी संपर्क एवढा मर्यादित निकष ठेऊन आता चालणार नाही व तो विस्तारीत करावा लागणार आहे. टेस्टिंग सेन्टर्स वाढवणे हे केंद्राच्या अखत्यारीत असले तरी सर्वाधिक केसेस असल्याचे कारण सांगत केंद्राला टेस्टिंग सेन्टर्स साठी सतत तगादा करून एका आठवडा थांबणे ही या घडीला संकटात भर घालणारे ठरणार आहे. पॉजिटिव्ह रुग्ण व गंभीर रुग्णांसाठी उद्या वेन्टीलेटर्स चा ही मोठा तुटवडा जाणवणार आहे. तसेच सध्या दाखल असलेल्या पॉजिटिव्ह रुग्णांवर इतर देशात नेमके काय उपचार केले जात आहेत ही माहिती घेऊन त्या प्रमाणे उपचारात कुठलेही अपग्रेडेशन दिसत नाही. क्लोरोक्वीन, जिंक, हाय डोस विटामिन सी सारखे उपचार परदेशात यशस्वी होताना दिसत आहेत व आपल्या पेक्षा मोठ्या संकटात असून ही ते उत्तम पुरावे व उपचाराच्या आधारा साठी डेटा जगाला देताना दिसत आहेत. आपल्या यंत्रणेला मात्र याचे कुठले ही सोयरसुतक नाही.

पॉजिटिव्ह शी संपर्क एवढा मर्यादित निकष ठेऊन आता चालणार नाही व तो विस्तारीत करावा लागणार आहे. टेस्टिंग सेन्टर्स वाढवणे हे केंद्राच्या अखत्यारीत असले तरी सर्वाधिक केसेस असल्याचे कारण सांगत केंद्राला टेस्टिंग सेन्टर्स साठी सतत तगादा करून एका आठवडा थांबणे ही या घडीला संकटात भर घालणारे ठरणार आहे. पॉजिटिव्ह रुग्ण व गंभीर रुग्णांसाठी उद्या वेन्टीलेटर्स चा ही मोठा तुटवडा जाणवणार आहे. तसेच सध्या दाखल असलेल्या पॉजिटिव्ह रुग्णांवर इतर देशात नेमके काय उपचार केले जात आहेत ही माहिती घेऊन त्या प्रमाणे उपचारात कुठलेही अपग्रेडेशन दिसत नाही. क्लोरोक्वीन, जिंक, हाय डोस विटामिन सी सारखे उपचार परदेशात यशस्वी होताना दिसत आहेत व आपल्या पेक्षा मोठ्या संकटात असून ही ते उत्तम पुरावे व उपचाराच्या आधारा साठी डेटा जगाला देताना दिसत आहेत. आपल्या यंत्रणेला मात्र याचे कुठले ही सोयरसुतक नाही.

निवडणुकीच्या प्रचारात जसे घरो घरी जाऊन प्रचार होतो त्या पद्धतीने केसेस शोधणे व सरकार स्थापने साठी गतीने हालचाली होतात तशाच आयसोलेशन व क्वारंटाइन ची सोय उभारणे या क्षणाला गरजेचे आहे. आपण प्रयत्न करतच आहात व छत्रपती शिवाजींचे मावळे म्हणत आपण सगळ्यांचे मनोबल ही वाढवले. पण आदरणीय मुख्यमंत्री, शिवाजी महाराजांप्रमाणे आता मावळ्यांना वाचवण्यासाठी आपणच तलवार उपसून कोरोना व्हायरस विरोधात, या युद्धात उतरून सूक्ष्म नियोजन करण्याची ही वेळ आहे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता