Amol Annadate is well known Author and Speaker. Here you can find Amol Annadate articles published in Times of India, Indian Express, The Hindu, Lokmat, Hindustan Times, Sakaal, Danik Divya Marathi and Samana. Explore his articles. He has authored three best seller books namely Its High Time We Talk, वैदयकीय बोधकथा and कधीतरी हे बोलायलाच हवे!
You can also read his writings on social Media and Blogs. Dr. Amol Annadate’s Popular writings involved Health Policy in India, Issues in Public Health, Spreading Awareness about Social Health, Mass Vaccination in India, Severe Accute Malnutrition in India and Maharashtra, SocioEconomic Well Being, Political Will for Health etc. Dr. Annadate regularly writes about the Health Updates, small health tips
तुम्ही मला ऐकू शकता का? मला माहित नाही. माझ नाव … जाऊ द्या ..आता नावाच काय ……? मी काल जी.टी. हॉस्पिटल मधून स्टाफ नर्स म्हणून माझी ड्युटी संपवून निघाले. ७.५० ची डोंबिवली फास्ट पकडायची म्हणून मी व माझ्या दोन मैत्रिणी झपझप चालत स्टेशन कडे निघालो. तेवढ्यात काय झाले कळले नाही. एका खोल खड्ड्यात पडल्या सारखे वाटले. काय झाले हे कळण्याआधी आम्ही तिघी एका वेगळ्याच विश्वात ढकलल्या गेलो. नंतर कळले कि, ते कुटुंब, मुलं, घर, रुग्णालय, रुग्ण सगळ आता मागे सुटलं आहे.
शेवटची ओव्हर नीट देता आली. रात्री १२ नंबर वॉर्डमधल्या ७ नंबर बेड वरच्या पेशंटच्या बिपीची गोळीचा रात्री ३ वाजता डोस आहे. त्याचा बिपी दुपारी जास्त होता, म्हणून सरांनी रात्री अर्धी गोळी जास्त द्यायला सांगितली. हे ओव्हर मध्ये तीन चार वेळा सांगितलं एवढ समाधान आहे. यांच्या साठी मटकी भिजवली होती. आज मिसळ कर म्हणाले होते … ते मात्र राहून गेलं. मुलासाठी स्टेशन वरून जाताना फोल्डर घेऊन ये म्हंटला होता. तेही राहीलच! अजून एक खूप मोठी गोष्ट राहिली. अंधेरी, एलफिन्स्टन, सावित्री नदीवरचा महाड जवळचा असे पूल कोसळत होते तेव्हा मी कधी यावर विचार केला नाही. फक्त बातम्या वाचल्या. या पुलांचे म्हणे ऑडिट झाले होते. कोण होते हे ऑडिट करणारे? याचा शोध घेऊन वर काही करता येण्यासारखे आहे का? हे पाहायला हवे!
या दोघीही आहेतच कि सोबत! अजून दोन जन ही कोणी तरी दिसतायत सोबत. अजून एक बातमी वाचली होती सावित्री नदीचा पूल कोसळल्यावर कि त्यात काही कारकुनांना म्हणे कोकण भवनला ट्रान्स्फर केले. नंतर सगळ मॅनेज आणि पूर्ववत झालं. मागे अंधेरी कामगार रूग्णालयातली माझी नर्स मैत्रीण सांगत होती, तिथे ही आगीत ७ रुग्ण भस्मसात झाले. भेटतीलच म्हणाव तेही! त्यातही म्हणे काही झाल नाही. मी तेव्हा शांत राहिले. मला वाटल, आपला काय संबंध !! थोड्या वेळात कळेल पुढचा जन्म. तेव्हा मात्र शांत राहायचं नाही. बरीच सेवा केलीय रुग्णांची. डायरेक्ट देवाची भेट झाली, चांगली जागा मिळाली तर बघते ना त्याच्याशी ही बोलून याचं काय करता येईल ते! जाऊ द्या… तुम्ही टेंशन घेऊ नका.. तुमचं चालू द्या …!!
गेला महिना आपला देश एका वेगळ्याच राष्ट्रीय मानसिकतेतून जात होता. पुलवामा हल्ल्यानंतर ते विंग कमांडर अभिनंदनची अटक व सुटका पर्यंत देशातील नागरिक अनेक मानसिक आंदोलने अनुभवत आहेत. यात पाकिस्तान बद्दल राग, द्वेष, बदल्याची तीव्र भावना. आपल्या देशा बद्दल किंवा कुटुंबांबद्दल हल्ले, युद्ध सदृश परिस्थितीतून भीती, चिंता, काळजी, मृतांबद्दल दु:ख अशा अनेक भावनांचा समावेश आहे. बालाकोट वरील भारतीय वायुदलाच्या हल्ल्यानंतर ‘हाऊज द जोश’ सारखे वाक्य समाज माध्यमांवर सतत गाजत होते. शत्रूला हरवल्याच्या तीव्र आनंदा पासून ते देशभक्तीचे साजरीकरण अशा सकारात्मक व पुढे काय या अनिश्चितता, भीती अशा नकारात्मक भावनांचे हेलकावे लंबकाच्या आंदोलनाप्रमाणे दोन विरुद्ध भावनेवर देश आंदोलणे घेत होता .
युद्ध सदृश परिस्थितीतून भीती, चिंता, काळजी, मृतांबद्दल दु:ख अशा अनेक भावनांचा समावेश आहे.
या सगळ्या भावना उत्स्प्फुर्त असल्या तरी आज समाज माध्यमांमुळे अधिक प्रमाणात व्यक्त व झपाट्याने पसरणाऱ्या आहेत. पण या सर्व भावनांचा आपल्या तब्येतीशी आपल्या प्रत्येकाच्या मानसिक परिस्थितीशी सहज न जाणवणारा पण निश्चित कुठे तरी, कुठल्या तरी स्वरुपात बाहेर येणारा मानसिक परिणाम आहे. या सर्व भावना देशभक्तीशी जोडून आपण त्याचे समर्थन करत असलो तरी शरीरात उठणाऱ्या प्रत्येक भावनिक तरंगांना शरीर व त्याची फीसीयॉलॉजी काही तरी प्रतिसाद देतच असते. मानसशास्त्राच्या भाषेत याला ‘मास हिस्टेरिया’ किंवा ‘मास मेनिया’ म्हणत असले तरी राष्ट्रीय सुरक्षिततेच्या मुद्द्यांवर असे अनिश्चिततेचा भावनावेग तीव्र होतो तेव्हा तेव्हा देशाच्या नागरिकाला त्याची मानसिक आजारांच्या, असंतुलनाच्या रुपात किंमत मोजावी लागली आहे. अंतरराष्ट्रीय पातळीवर अशा घडामोडी झाल्या तेव्हा त्याचा मानसिकतेवर होणारा नजीकचा व दुरागामी परिणामांचा अभ्यास झाला आहे. जसे आधी युद्ध जमिनीवर लढली जायची, पुढे ती फक्त सैन्यांमध्ये लढली जाऊ लागली, नंतर सायबर हल्ले, विषाणू–जीवाणूंच्या रूपाने बायो टेररीझम अशी स्वरूपे बदलत गेली. पण त्याचा एक भाग हा असा मानसिक युद्ध ही असू शकतो हे यावेळी सामाजिक माध्यमांवरच्या व जनते मधील भावनिक स्फोटाच्या रूपाने पुढे आला आहे.
अमेरिकेत ९/११ घडले तेव्हा त्या नंतर तीव्र नैराश्य, असुरीक्षितते मुळे लोकसंख्येचा स्फोट अशा रुपात पुढे आला. भारताचा स्वातंत्र्य लढा हा त्या वेळी मानसशास्त्रात कुठले ही मोठे संशोधन झालेले नसताना स्वातंत्र्य लढ्यात कुठल्या ही नकारात्मक भावनांचा भार पिढी पुढे घेऊन जाणार नाही, अशा स्वरुपात नियोजनबद्ध रित्या संपवला. ब्रिटेनचेच राज्य असलेले ऑस्ट्रेलिया सारखे देश ही स्वतंत्र झाले पण त्यांच्या पारतंत्र्यातील भावनांमुळे आजही त्यांच्या तिसर्या पिढीत नैराश्याच्या तीव्र भावना व हा आजार आहे. जणू यामुळे त्यांच्यात जनुकीय बदलच झाले. म्हणूनच त्या देशात आजही ड्रग अॅडीक्शनचे प्रमाण खूप जास्त आहे. सध्या आपल्या देशात ही व त्यातच गेल्या महिना भरात अशा भावनिक लाटा येत आहेत. आपल्याला प्रत्येकाला आपल्या देशाबद्दल प्रेम आहे व तो व्यक्त करण्याचा अधिकार आहे. इतरांसारखा तो मला ही आहे. पण कुठल्याही भावनावेगाला योग्य रूप मिळाले नाही तर त्याचे दमन न होता ती उर्जा कुठल्यान कुठल्या स्वरुपात बाहेर पडणार. उदाहरणार्थ शत्रूला हरवल्याच्या तीव्र आनंद व हा आनंद परत परत अनुभवण्याची मानसिकता, व्यक्त करण्याचे प्रकार या मुळे उन्माद होतो व रस्त्यावरील भांडणांचे, रागाचे, रस्त्यावर छोट्या मोठ्या कारणांवरून खुनांचे प्रकार वाढतात. सतत बदल्याच्या भावने पोटी नैराश्य येऊ शकते. राग, चिंता, बदल्याची भावना या सर्व गोष्टींचा आज ह्र्दयरोग, उच्च रक्तदाब, मधूमेह अशा आजारांशी संबंध सिध्द झाला आहे. अगदी पाठदुखी सारख्या आजारांचा भावनिक संबंध सिध्द झाला आहे.
मग याचा अर्थ मी देशभक्ती व्यक्तच करायची नाही का? असे मुळीच नाही. पण अशा तीव्र भावना व्यक्त करताना किंवा अनुभवताना गरज असते रॅशनल थिंकिंग किंवा तारतम्य व विवेकी वैचारिक प्रक्रियेची. म्हणजेच शत्रू राष्ट्र किंवा देशा बद्दल माझ्या या भावना कितीही तीव्र असल्या तरी त्याच्या वर निर्णय घेणारी, त्याचे सतत विवेचन करणारी या गोष्टीला वाहिलेली स्वतंत्र यंत्रणा माझ्या देशात आहे व ती सक्षम आहे . त्यावर मी स्वतः कुठला ही निर्णय घेऊ शकत नाही. या उलट आपल्या नकारत्मक भावनांच्या प्रदर्शनामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका वगैरे खूपच पुढच्या गोष्टी आहेत. आधी आपल्या मानसिकतेला धोका व इतर राष्ट्राचा आपल्याला नकारात्मक भावनांच्या खाईत लोटण्याचा हेतू साध्य होऊ शकतो हे समजून घ्यावे. म्हणून या भावना जरूर असाव्या पण भावनावेगात वाहवत न जाणे हा आपल्या राष्ट्राच्या, राष्ट्रीय सुरक्षेच्या कर्तव्याचा भाग समजावा. म्हणूनच ‘हाऊज द जोश’ ला उत्तर “हाय बट ईन माय हॅन्ड्स सर” हे उत्तर जास्त समर्पक ठरेल.
सदरील लेख २ मार्च, २०१९ रोजी लोकमत च्या मुंबई आवृत्तीत प्रकाशित झाला आहे. लोकमत वृत्तपत्रात हा लेख वाचण्यासाठी क्लिक करा.
वैद्यकीय क्षेत्रात गोड बोलण्याला खूप महत्व आहे. बर्याचदा रुग्ण, त्यांचे नातेवाईक वैतागलेले असतात. असे म्हणतात कि डॉक्टरच्या बोलण्याने अर्धा आजार बरा होतो. पण त्याच वेळी डॉक्टर ही नातेवाईकांमध्ये त्याला समजून घेणारा गोड बोलणारा कोणीतरी शोधत असतो. पण काहीही झाले तरी गोड आणी गुड बोलण्याने आपले आरोग्य चांगले राहते.
तिळगुळ घेऊन गोड बोलण्याचा कोणी आग्रह केला कि एखादा रोख ठोक व्यक्ती विचारतो मी तुझ्याशी कधी कडू बोललो ? .कुठून बुद्धी सुचली आणी याला गोड बोलण्याचा आग्रह केला अशी परिस्थिती होते. पण समोरचा आपला बिचारा निरागसपणे आठवून बघत असेल कि खरच मी याच्याशी कधी कडू बोललो. पण आपल्याला ही शक्यता लक्षात येत नाही. गुड आणि गोड न बोलण्याचे बर्याच वेळा हेच कारण असते कि इतरां बद्दल आपल्या मनात बरेच भ्रम असतात. आज काही तरी कारण असताना किव्हा ज्याला आपण प्रोफेशनल असा हल्ली गोंडस शब्द वापरतो, अशा कारणांनी आपल्याला सक्तीने गोड बोलावेच लागते . मी पहिल्यांदा विमान प्रवास केला तेव्हा हवाई सुंदरी कडे सहज बघितले तरी ती उगीचच हसायची , काही मागीतले कि खूपच हसून गोड बोलायची. शेवटी न राहवून मी तिला विचारले कि आपली ओळख आहे का ? ती नाही म्हंटली. मग तिला विचारले तू एवढे गोड का बोलते आहेस माझ्याशी. ती उत्तरली सर त्याचेच आम्हाला पैसे मिळतात . ते माझे कामच आहे. असे सगळ्यांनाच गोड बोलण्याचे शासकीय अनुदान मिळाले असते तर किती बरे झाले असते ना? पण काही कारण नसताना , एखाद्या कडे कुठलाही स्वार्थ नसताना गोड बोलण्यात खरे आव्हान असते. आज मात्र गोड बोलण्याची परिस्थिती काय आहे याची गम्मत कवी अशोक नायगावकर त्यांच्या कार्यक्रमात सांगत असतात . नायगावकर सांगतात तिळगुळ देताना म्हणे एका ठिकाणी मारामारी झाली … गोड बोलायला कोणाला शिकवता ? अशी आजची गोड बोलण्याविषयी परिस्थिती आहे.
वैद्यकीय क्षेत्रात गोड बोलण्याला खूप महत्व आहे. बर्याचदा रुग्ण, त्यांचे नातेवाईक वैतागलेले असतात. असे म्हणतात कि डॉक्टरच्या बोलण्याने अर्धा आजार बरा होतो. पण त्याच वेळी डॉक्टर ही नातेवाईकांमध्ये त्याला समजून घेणारा गोड बोलणारा कोणीतरी शोधत असतो. मला प्रॅक्टिस सुरु करताना एका ज्येष्ठ डॉक्टरने सांगितले – तुला काही आले नाही तरी चालेल पण तुला गोड बोलता आले पाहिजे . पण एकाच महिन्यात एका रुग्णाने सांगितले सर तुम्ही नवीन प्रॅक्टिस सुरु केली आहे – माझा अनुभव सांगतो, गोड बोलणारा डॉक्टर म्हणजे फसवणारा. मला नेमके काय करावे ते कळेना . पण काहीही झाले तरी गोड आणी गुड बोलण्याने आपले आरोग्य चांगले राहते. एवढा एक स्वार्थी हेतू ही गोड बोलण्यास पुरेसा आहे. पण चला तब्येतीचे जाऊ द्या गोड बोलण्याने आपल्याला बरे वाटते. गोड बोलण्या साठी एवढे कारण ही पुरेसे नाही का ?
This was one of the Dr. Amol Annadate Articles published in Lokmat. For more articles you can browse the Articles Tab.
नुकताच आरोग्य खात्याचा अतिरिक्त भार सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे देण्यात आला. खरेतर आरोग्य खात्या सारख्या महत्वाच्या खात्याला अतिरक्त दर्जा देऊन या खात्याला किती कमी लेखले जाते हे पुन्हा सिध्द झाले. आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण हे दोन खाते वेगळे झाल्या पासून राज्याला स्वतंत्र आरोग्य मंत्री नसल्याची ही पहिलीच वेळ आहे. केवळ रिक्त मंत्रिपदच नव्हे . गेल्या अनेक महिन्यांपासून आरोग्य संचालकांची दोन पदे ही रिक्त आहेत. आयोध्या , पंढरपूर दौऱ्यातून वेळ काढून किमान या खात्याचा अतिरिक्त भर कोणा कडे तरी द्यायाला पक्षाला वेळ मिळाला हे ही मराठी माणसाचे नशीबच म्हणायचे .
गेल्या चार वर्षात ही शिवसेनेकडे असलेल्या आरोग्य मंत्री साहेबानी काहीच भरीव काम झालेले दिसले नाही. नुकत्याच जाहीर झालेल्या नॅशनल हेल्थ अकाऊनट्सच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्र हे देशातील आरोग्यावर सगळ्यात कमी म्हणजे सकल उत्पन्नाच्या केवळ ०.७ टक्के खर्च करणारे राज्य ठरले आहे. राष्ट्रीय उत्पन्नाच्या २.५ टक्के खर्चाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी राज्याने हा खर्च ८ टक्क्यांपर्यंत करणे आवश्यक आहे. एका मंत्र्याकडे अनेक खाती असणे हे नित्याचेच आहे. पण आज महाराष्ट्रातील आरोग्याची स्थिती पाहता नक्कीच भरघोस निधी खेचून आणणारा आणि २४ तास पूर्णवेळ झोकून देऊन काम करणारा आरोग्य मंत्री आणि दोन पूर्णवेळ संचालकांची आरोग्य खात्याला गरज आहे. खरतर एवढ्या कामाचा भार असलेला , एवढ्या राबवता येण्या सारख्या कल्याणकारी सामाजिक योजना असणारे हे खाते आहे. याचा आवाका एवढा आहे कि एखादा नवीन आरोग्य मंत्री ६ महिने पूर्ण वेळ दिला तरी हे खाते व यातील योजना समजून घेण्यासच लावील . डॉ. दीपक सावंत यांची टर्म संपली व दुसर्यांदा त्यांची वर्णी लागली नाही तेव्हाच हे स्पष्ट होते कि त्यांना मंत्रीपद सोडावे लागणार. तरीही याचे कुठलेही पूर्व नियोजन न करता ऐन वेळेवर एकनाथ शिंदेंना हे खाते देण्यात आले. मुळात हे खात ७० च्या दशकात नगर विकास खात्या पासून आणी पुढे ९५ नंतर वैद्यकीय शिक्षणा पासून वेगळे करण्याचा हेतूच हा होता ही या खात्याला अधिक महत्व मिळावे. पण या खात्याचे अतिरिक्त भार इतर महत्वाची खाती असलेल्या मंत्र्यांकडेच द्यायचा असेल तर मग ही आरोग्य मंत्री हा वेगळ करण्यात अर्थच काय ?
आज राज्यातील आरोग्याची स्थिती चिंताजनक आहे. राज्यातील १८१६ प्राथमिक आरोग्य केंद्रे , ४०० हून अधिक ग्रामीण रुग्णालये , ७६ उपजिल्हा रुग्णालय व २३ सिव्हील हॉस्पिटल्स कुठल्याही नियोजना शिवाय कोलमडून पडली आहेत. या ठिकाणी १५,२९४ डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. या अनेक रुग्णालयात उपकरणे आहेत तर डॉक्टर नाही आणी डॉक्टर आहेत तर उपकरणे नाहीत अशी स्थिती आहे. राज्यातील विशेषज्ञ डॉक्टरांची ४६६ पदे रिक्त आहेत. सगळ्या शासकीय आरोग्य यंत्रणे मध्ये औषधांचा तीव्र तुटवडा आहे. शासकीय आरोग्य यंत्रणेत आज औषधांचा जवळपास शून्य साठा आहे. औषधांच्या तुटवड्या मुळे एका बाळंत झालेल्या स्त्रीने जुलै महिन्यात रुग्णालयाच्या शौचालयातच गळफास घेऊन आत्महत्या केली. तरीही औषध खरेदीचा गांभीर्याने विचार करायला सरकार कडे वेळ नाही. आता तर स्वतंत्र मंत्री व दोन संचालक नेमायला ही त्यांना फुरसत नाही. हाफकिन महामांडळाकडे दिलेली औषध खरेदी पूर्णतः फसली आहे. गेल्या वर्षात आरोग्य खात्याच्या निधी मध्ये शासनाने १६८५ कोटींची कपात केली. मिळालेला निधी पैकी ३६ टक्के निधी मार्च २०१८ पर्यंत पडून होता. जो वापरला गेला तो ही कुठल्याही नियोजन व दूरगामी परिणामांचा विचार न करता खर्च केला जातो.
गेल्या तीन वर्षात राज्यात ८० हजार बालकांचा कुपोषणामुळे बळी गेला आहे. याच्या मूळ कारणावर काम करून उपाय योजना करण्यापेक्षा वाटपासाठी शासनाने ३२ कोटींची रेडीमेड खाण्याच्या पॅकेट्सची खरेदी करून विषय संपवला . ऑगस्ट २०१८ पर्यंत गेल्या तीन वर्षात ४९१ मतांचा मृत्यू झाला आहे. समस्यांची आणी मृत्यूंच्या आकडेवारींची जंत्री न संपणारी आहे. पण ती ऐकतोय कोण ? लाखांच्या सभा भरवून धर्म, मराठी अस्मिता, ढाण्या वाघ अशी भाषणे ऐकवली कि मते मिळतात . आरोग्य क्षेत्राचे प्रश्न सोडवून कुठे मते मिळणार आहेत ? ही राजकीय पक्षांना कळणारी गणिते आम्हा सर्व सामन्यांना कळत नाहीत. आरोग्य मंत्री आणि आरोग्य मंत्रालय ही राज्यावर अनेक वर्षांसाठी आपली अमिट छाप सोडण्याचे खाते आहे. ते रिकामे आणी सगळ्यात दुर्लक्षित ठेऊन मात्र महाराष्ट्रात वेगळीच परंपरा निर्माण होते आहे.
सदरील लेख २१ जानेवारी, २०१९ च्या संपादकीयमध्ये, लोकमतच्या मुंबई आवृत्तीत प्रकाशित झाला आहे. लोकमत वृत्तपत्रात हा लेख वाचण्यासाठी क्लिक करा.
मराठवाड्यात तीव्र दुष्काळ आहे. हॉस्पिटल मध्ये येणारा रुग्ण हवालदिल झाला आहे. किती ही गंभीर रुग्ण असला तरी त्याच्या कडे उपचारासाठी पैसेच नसतात. या रुग्णांना वाऱ्यावर सोडून चालणार नाही. या दृष्टीने दुष्काळी मराठवाड्याच्या आरोग्य व्यवस्थेसाठी लोकसत्तेचे ज्येष्ठ पत्रकार संदीप आचार्य व डॉ. अमोल अन्नदाते मिळून काय करता येईल याची योजना बनवतो आहे. त्यासाठी काल महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेन्द्र्जी फडणवीस यांची भेट घेऊन योजना सादर केली. यात शासना कडून काही घेण्यापेक्षा शासनाला मदत करण्याची भावना आहे. ही वेळ टीका करण्यापेक्षा शासनाला साथ देऊन दुष्काळी मराठवाड्याला मदतीचा हात देण्याची वेळ आहे.
There is a severe drought in Marathwada. The patient coming to the hospital is helpless. Although a serious patient, he does not have any money for treatment. We must pay attention to these patients. For this cause, senior journalist Sandeep Acharya from Lokasatta and Dr Amol Annadate are planning a programme for the health of drought-prone Marathwada.
Yesterday, We both met and presented the scheme to the Honorable Chief Minister of Maharashtra, Mr Devendraji Fadnavis. It has the feeling of helping the government rather than taking anything from the government. It is time to extend the help to Marathwada with the help of the government, instead of criticizing this time.