आपल्याला काय हवे? धनशक्ती की लोकनीती…? – डाॅ. अमोल अन्नदाते

Dr Amol Annadate Artical

दै. दिव्य मराठी रसिक पुरवणी

आपल्याला काय हवे? धनशक्ती की लोकनीती…?

डाॅ. अमोल अन्नदाते

सुप्रीम कोर्टाने इलेक्टोरल बॉंडच्या मुद्द्यावर स्टेट बँक ऑफ इंडियाला फटकारले आणि त्याबाबतचा सगळा तपशील जाहीर करण्यास सांगितले. रोजच्या जगण्याच्या संघर्षात व्यस्त असलेल्या सर्वसामान्य माणसाला इलेक्टोरल बॉंड म्हणजे काय ? आणि त्याचा आपल्या आयुष्याशी काय संबंध आहे हे ही कळायला मार्ग नाही. एखादी कॉर्पोरेट कंपनी कुठल्या ही पक्षाला हवा तितका निधी दान करू शकते व याचा तपशील तो पक्ष व दाता यांच्यातच गुप्त राहील असे या बॉंडचे स्वरूप आहे. उगाच एखाद्या पक्षा बद्दल अचानक उमाळा आला म्हणून कोणी कोट्यवधी रुपये एखाद्या पक्षाला दान करणार नाही. त्यामुळे परस्परहितासाठी केलेली एक मोठी देवाण घेवाण अशा दानामागे असते हे उघड गुपित आहे. खरे तर आपल्याकडे मते मागणारा पक्ष सत्ताधारी असेल, तर लोकशाहीच्या तत्वाला धरुन त्याने आपल्या हिताचे, कल्याणकारी राज्य चालवले आहे का आणि तो पक्ष विरोधातील असेल तर आपल्यासारख्या सामान्य नागरिकांसाठी त्याने आजवर काय काम केले आहे यावर मतदानाचा निर्णय होणे अपेक्षित असते. ही इतकी साधी प्रक्रिया आहे. मग यात पैशाचा व्यवहार येतोय कुठे ? पण साध्या वाटणारी ही प्रक्रिया आज पूर्ण पणे पैशाच्या देवान घेवाणी मुळे गुंतागुंतीची झाली आहे. मग ती पैशाची देवान घेवाण धनाढ्य कंपन्या व सरकार मध्ये असो कि मतदार व उमेदवार व त्यांच्या मागे असलेल्या पक्षा मध्ये असो. कोणाला निवडायचे हे निकषच आपण बदलले आहेत .


आज एखाद्याकडे धनसंचय झाला कि त्याला राजकारणाचे डोहाळे लागतात. याचे कारण आज राजकतीय प्रक्रियाच अर्थ केंद्रित झाली आहे व कार्यकर्त्यांपासून मतदारांपर्यंत प्रत्येकाला त्यांच्यावर मनसोक्त पैसे उधळणारा नेता हवा आहे. महाराष्ट्रात असे बरेच बाहुबली नेते आहेत ज्यांची नावे अनेक आर्थिक गैर व्यवहारात गोवले गेले आहे. यातील अनेकांचा सहभाग अगदी उघड आहे व सर्व सामान्य व्यक्तींना त्याची इथंभूत माहिती आहे. पण मतदारांच्या व्यक्तिगत गरजा पूर्ण करणारे व आपल्या मतदारसंघातील जनतेवर मनसोक्त खर्च करणारे हे नेते लोकांच्या गळ्यातील ताईत आहेत व त्या त्या भागात अजिंक्य आहेत. त्यांचे सगळे गैरव्यवहार , गैरवर्तन लोक माफ करायला तयार आहेत. भ्रष्टाचारातून अमाप पैसा जमवा व त्यातील थोडा जनतेवर खर्च करा या राजकारणाच्या मॉडेल ला लोकमान्यता मिळणे हे आजच्या लोकशाहीचे सर्वात मोठे दुर्दैव आहे. ज्या पैशातून राजकीय व सत्ताधारी थातूर मातुर व्यक्तिगत लाभ आपल्याला देतात ते आपल्याच ताटातील सकस आहार काढून घेऊन त्या जागी काकडी , गाजर परत वाढण्यासारखे आहे हे वास्तव सर्व सामन्यांच्या गळी उतरवणे आवश्यक आहे.


अनेक वर्ष परकीयांनी राज्य केल्या मुळे भारतीयांच्या जनुकात राजा व त्राता शोधणे खोलवर भिनले आहे. लोकशाहीत राजा नसतो व नेता ही नसतो काही वर्षे नेमलेला लोकशाहीचा विश्वस्त असतो व त्याच्यात व सर्वसामान्य लोकांमध्ये फारसा फरक नसतो हे लोकशाहीचे सत्व आहे हा विचार अजून ही रुजलेला नाही. म्हणून सर्वसामान्य मतदार नेत्यां मध्ये राजाचा अंश शोधतात. नेत्यांचे ताफे, अंग रक्षक , उंची कपडे , प्रासाद तुल्य निवास , त्यांच्या मुलांची भव्य लग्न सोहळे हे सर्व सामन्यांचे कौतुकाचे विषय ठरतात नव्हे ते आता राजकारणात यशस्वितेचे क्वालीफीकेशन व मुख्य मापदंड ठरत आहेत. शांत मनाने सद्सद्विवेकबुद्धीने विचार केल्यास या सर्वांचा व कल्याणकारी राज्य चालवण्याचा संबंध काय ? यामुळे सर्वात मोठे नुकसान असे होते कि काही चांगले करण्याची इच्छाअसणारे किंवा राजकारणाचा पोत बदलण्याची मनीषा असणार्यांना केवळ आर्थिक ताकद नाही म्हणून या व्यवस्थेत येण्याची संधीच नाही. या व्यवस्थेला कोणी भेदू शकत नाही असे एक जाळेच विणले गेले आहे. आधी काही ही करून श्रीमंत व्हा व मग अधिक श्रीमंत होण्यासाठी राजकारणात येऊन काहीही करा व अधिक श्रीमंत व्हा यात लोकांचे राज्य तर लुप्त होतेच आहे . शिवाय सर्व समान्य माणूस स्वतः कधीच सत्तास्थानी न जाण्याची योजना स्वतःच बनवून स्वतः विणलेल्या जाळ्यात सर्व समान्य मतदारच अडकला आहे. राजा का बेटा ही राजा क्यू बनेगा ? हा प्रश्न विचारण्याची नैतिकता आपण गमावून बसल्याची जाणीव सर्व समान्य मतदारांना या निर्माण झालेल्या घातचक्रातून जितकी लवकर होईल तितकी वेगाने लोकशाहीच्या पुनुरुजीवनाची प्रक्रिया सुरु होईल .


विशिष्ट लाभ मिळावा म्हणून सरकार , राजकीय पक्ष यांच्यात वरच्या पातळीवर व्यवहार आणि मते मिळावी म्हणून उमेदवार आणि मतदार यांच्यात खालच्या पातळीवरचा व्यवहार या दोन्ही व्यवस्था लोकशाही व निवडणूक प्रक्रीये भोवती अनैतिकतेचे दोन दोर आवळणारे आहे. निवडणुकीच्या दोन दिवस आधी एका मताला किती पैसे वाटले जाणार आहेत हा दर फुटतो. तुल्यबळ उमेदवार किती अर्थशक्ती पणाला लावतात यावर शेअर मार्केट प्रमाणे हा दर निवडणूक संपे पर्यंत पुढे मागे होतो. काही शे रुपयात मत विकून आपण आपले हक्क , अधिकार , मुलांचे भवितव्य , विकासाच्या संधी सर्व विकतो याची जाणीव मतदानासाठी पैसे घेणाऱ्यांना नसते. आश्चर्य म्हणजे सुखवस्तू , सुशिक्षित मतदार ही आमचे मतदानाचे आले नाहीत म्हणून विचारणा करतात हे लाजिरवाणे आहे. असे असल्यावर ईलोक्टोरॉल बॉंड सारख्या विषयावर तुम्ही कुठल्या तोंडाने व नैतिकतेने जाब विचारणार आहात . निवडणूक खर्च , राजकारणा भोवती भरमसाठ खर्च व गुंतवणुकीवर परतावा ( रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट ) हे गणित नाहीसे होत नाही तो पर्यंत विकासाच्या मूळ मुद्द्यांवर निवडणुका लढल्या जाणार नाहीत व राजकारण ढवळून निघणार नाही. प्रत्येक राष्ट्राच्या इतिहासात अशी एक निर्णायक वेळ येते जेव्हा देश एका चौरसत्यावर उभा असतो आणि तिथले नागरिक काय ठरवतात त्यावर भविष्य घडते बिघडते. राजकारण अर्थशक्ती मुक्त करण्याचा व निवडणुकित पैसा ,उमेदवाराची आर्थिक कुवत हे मुद्दे गौण ठरवण्याचा रस्ताच देशाला सशक्त लोकशाही कडे नेईल. त्यासाठी राजकीय पक्ष म्हणजे खरेदी विक्री संघ अन् निवडणूक म्हणजे बाजार समिती नव्हे, हे आधी प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे.

डॉ. अमोल अन्नदाते

dramolaannadate@gmail.com

www.amolannadate.com

9421516551

उगीचच मल्टी व्हिटामीनच्या गोळ्या घेऊ नका

उगीचच मल्टी व्हिटामीनच्या गोळ्या घेऊ नका

उगीचच मल्टी व्हिटामीनच्या गोळ्या घेऊ नका सध्या कोरोनाच्या भीती पोटी अनेक जन रोज मल्टी व्हिटामीनच्या गोळ्या घेत आहेत. औषध दुकानांवर या गोळ्यांचा खप प्रचंड वाढला आहे. व्हिटामीन  डी व शाकाहारी लोकांना व्हिटामीन   बी १२ , फोलिक अॅसिड सोडले तर इतर सर्व व्हिटामीन   हे मुबलक प्रमाणात फळे , भाज्या, खाद्य पदार्थांमध्ये असतात. त्यामुळे तुम्ही स्वस्थ असाल व तुमचा आहार चांगला असेल तर तुम्हाला मल्टीव्हिटामीनच्या गोळ्यांची गरज नाही. सध्या अशा मल्टी व्हिटामीन   गोळ्या जाहिराती ही वाढल्या आहेत. एक मोठा हिंदी चित्रपट स्टार जिंसिंग सह मल्टीव्हिटामीन च्या महागड्या  गोळीची जाहिरात करतो जी वारंवार दाखवली जाते आहे. काही जाहिरीतींमध्ये आता कोरोनाचे संदर्भ दिले जात आहेत. अशा जाहिरातींना कोणीही भुलू नये.बरेच जन व्हिटामीन   सीच्या गोळ्यांचे ही सेवन करत आहेत. तुम्ही रोज अर्धे  लिंबू पाण्यात पिळून घेतले तरी तुम्हाला पुरेसे व्हिटामीन सी मिळते. तसेच चांगला आहार असणार्यांच्या शरीरात व्हिटामीन सी चा साठा चांगला असतो म्हणून रोजच लिंबू पाण्यात घ्यायला हवे असाही काही नियम नाही. आपण आपल्या नियमित आहारात अधू मधून लिंबू पिळून घेतोच. तेवढे ही पुरेसे ठरेल. तसेच प्रोटीन सप्लीमेंट्स घेण्याची ही गरज नाही.

मल्टीविटामिन गोळ्या सल्ल्याशिवाय घेतल्याने विटामिन ए सारख्या काही विटामिन्सचा ओवर डोस ही होऊ शकतो. त्यामुळे इतर वेळीही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच वितामिनच्या गोळ्या घ्याव्या. या शिवाय स्पिरुलीना , प्रतिकारशक्ती वाढवणारे हर्बल औषधे या ही कोरोना टाळण्यासाठी घेण्याची गरज नाही.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

        उगीचच मल्टी व्हिटामीनच्या गोळ्या घेऊ नका व्हिटामीन डी मात्र सगळ्यांना घेण्याची गरज असते. हे  सोडून दुसरी घेण्याची गरज पडू शकते अशी गोष्ट म्हणजे लोह म्हणजे आयर्न. डॉक्टरांच्या परवानगीने फक्त पुढील काही जणांना काही सप्लीमेंट्सची गरज पडू शकते.  –

  • लहान मुले –आयर्न , कॅल्शियम
  • गरोदर माता – फोलिक अॅसिड , आयर्न , कॅल्शियम
  • गुटका , तंबाखू खाणारे – फोलिक अॅसिड
  • शाकाहारी – व्हिटामीन   बी १२
  • मद्यपान करणारे – फोलिक अॅसिड, व्हिटामीन   बी ६, ए , थायमिन
  • मधुमेह , किडनीचे आजार आणी कॅन्सर – यांना डॉक्टरच्या सल्ल्यानुसार

म्हणजेच आजार असले तरी सर्वच नव्हे तर प्रत्येक आजारा प्रमाणे नेमक्या स्प्लीमेंट्सची आवश्यकता असते. म्हणूनच नियमित आहार घेणार्यांनी कुठले ही स्प्लीमेंट्स घेण्याची गरज नाही. आजार असणार्यांनी आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने नेमकी औषधे घ्यावी. 

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

फक्त गरम किंवा कोमट पाणी हे कोरोना वर उपचार नव्हे!

फक्त गरम किंवा कोमट पाणी हे कोरोना वर उपचार नव्हे!

फक्त गरम किंवा कोमट पाणी हे कोरोना वर उपचार नव्हे! नुकताच कोरोना सदृश लक्षणे व मधुमेह हा कोरोनाची शक्यता वाढवणारा घटक असलेल्या एका रुग्णाचा संपर्क झाला. शासनाच्या फिवर क्लिनिकला जाऊन तपासणीचा सल्ला देऊनही अशा वेळी फक्त शक्य तितके गरम पाणी प्या असा सल्ला वाचल्याने एवढेच करून मी ठीक होईल अशा या रुग्णाच्या हट्टामुळे जवळचे नातेवाईक ही वैतागले. कोमट / गरम पाण्यासह अनेक उपचारांबद्दल समाज माध्यमांवर सल्ले दिले जात आहेत. कुठल्या ही ताप, खोकला, सर्दीच्या रुग्णाने शासनाच्या जवळच्या फिवर क्लिनिक किंवा शासकीय रुग्णालयात जाऊन दाखवावे. तसेच संशयित व कोरोना बाधित लक्षण विरहीत तसेच लक्षणांसह असलेल्या रुग्णाचे नेमके काय उपचार करायचे हे मार्गदर्शक तत्वांप्रमाणे अॅलोपॅथीचे उपचार ठरलेले आहेत . गरम पाणी, आयुर्वेद, होमिओपथी हे प्रतिबंधासाठी ठीक आहेत व त्यासाठी जरूर वापरावे  तसेच उपचार म्हणून ही सोबत घेण्यास हरकत नाही. आयुष चे काय उपचार अॅलोपॅथी सोबत घ्यायचे आहेत हे ठरवण्यासाठी शासनाने एक कृती गट ही स्थापन केला हे व तो लवकरच या विषयी निर्णय घेईल . पण हे इतर व आयुष  उपचार सुरु करायचे म्हणजे अॅलोपॅथीचे उपचार बंद करायचे असे नाही. तसेच डॉक्टरांच्या माहिती शिवाय समाजमाध्यमांवर सांगितले जाणारे घरगुती उपचार अॅलोपॅथीचे उपचार बंद करून घेऊ  नये. फक्त घरगुती उपचार  घेत घरी बसने  खूपच धोका दायक ठरू शकते .

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

      फक्त गरम किंवा कोमट पाणी हे कोरोना वर उपचार नव्हे! हे सर्व कोरोनावर अॅलोपॅथी मध्ये उपचारच नाहीत या गैरसमजा पोटी होते आहे. उपचार नाहीत असे म्हणण्यापेक्षा हा व्हायरल आजार असल्याने इतर कुठल्याही व्हायरल आजरा प्रमाणे वेळेप्रमाणे आपोआप बरा होणारा आजार आहे. पण आजार बरा होत असताना शरीराला,  फुफ्फुस व इतर आजारांना  इजा होऊ नये म्हणून रुग्णाचे निरीक्षण आवश्यक असते. तसेच कोरोनावर उपचार ही आहेत व काहीं उपचारांवर संशोधन सुरु आहे . बरीच औषधे ही काही प्रमाणात विषाणूची संख्या कमी करतात व ती वापरली जात आहेत. तसेच संसर्गा नंतर शरीराला इजा होण्याची चिन्हे दिसत असली तर ती इजा कमी करणारी किंवा रोखणारी औषधे ही दिली जात आहेत. काही रुग्णांना केवळ ऑक्सिजन कमी पडते व तेवढे काही दिवस दिले तरी ते बरे होतात. म्हणूनच उपचार नाहीत या भ्रमात केवळ घरगुती उपाय करत कोणीही घरी थांबू नये.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

कोरोना रोखण्यासाठी मौखिक आरोग्य

कोरोना रोखण्यासाठी मौखिक आरोग्य

कोरोना रोखण्यासाठी मौखिक आरोग्य कोरोनाचा संसर्ग होण्यासाठी आपले नाक व तोंड हा मुख्य मार्ग आहे. जर आपले मौखिक आरोग्य चांगले असेल तर आपल्याला कोरोनाचा धोका कमी संभवू शकतो. त्यामुळे कोरोन साथीच्या काळात मौखिक आरोग्य चांगले ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी पुढील काही महत्वाच्या गोष्टी

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

  1. कोरोना रोखण्यासाठी मौखिक आरोग्य घरातील सर्व व्यक्तींचे टूथब्रशेस एकाच ठिकाणी ठेवले जातात परंतु कोरोनाच्या वातावरणात ब्रश प्रत्येकाचे वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात यावे. रोज टूथब्रश बॉक्स किंवा प्लास्टिक बॅग ठेवावा लहान मुलांच्या ब्रश ची विशेष काळजी घेण्यात यावी.
  2. सर्व सदस्यांसाठी एकच टूथपेस्ट वापरली जाते, त्याऐवजी शक्य झाल्यास वेगवेगळ्या स्मॉल साइज टूथपेस्ट वापराव्यात.
  3. दात कोरण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या टूथ पिक्स पेपर मध्ये गुंडाळून कचऱ्याच्या डब्यात टाकाव्यात,  बऱ्याचदा उघड्यावर टाकण्यात येतात.
  4. घरातील प्रत्येकासाठी डेंटल फ्लॉसच्या  वेगळ्या बॉक्सेस चा वापर करण्यात यावा व पेपरमध्ये गुंडाळून कचऱ्याच्या डब्यात टाकावे.
  5. घरातील एखाद्या व्यक्तीला सर्दी-खोकला झाला असल्यास त्यांनी वेगळ्या  बेसिनचा वापर करावा. 
  6. जीभ स्वच्छ करण्याचे टंग क्लीनर , इंटर डेंटल ब्रश  वापरल्यावर गरम पाण्यात बुडवून ठेवावे व नंतर  बंद कंटेनरमध्ये  ठेवावे
  7. कोरोना रोखण्यासाठी मौखिक आरोग्य दंततज्ञ डॉ. अनघा राजवाडे यांच्या वृद्धांनी काढता येणारी कवळी  रात्री झोपताना कवळी बॉक्समध्ये पाण्यात काढून ठेवताना रोज dentures cleaning tablet वापरावी ( इतर वेळी आठवड्यातून एकदा वापरली जाते ) कवळी स्वच्छ करण्यासाठीचा ब्रश  पण रोज वेगळ्या डब्यात ठेवावा. लहान मुलांनी काढलेल्या कवळीला हात लावू नये  याची काळजी घ्यावी.घरातील सर्वजण वापरत असलेल्या कॉमन बेसिन जवळ कवळी  ठेवू नये. स्वतंत्र कप्पा करावा.
  8. दंत तज्ञांकडे उगीचच जाऊ नये. जर तातडीचे उपचार गरजेचे असतील तरच जावे. फोन वर सल्ला घेऊन पुढे ढकलण्या सारखी प्रोसीजर असेल तर पुढे ढकलावी.
  9. रूट कॅनाल उपचार किव्हा इम्प्लांट टाकण्याची प्रोसिजर सुरु असेल  अश्या रुग्णांनी विशेष स्वच्छता ठेवावी, किडलेल्या दाता मध्ये अन्न अडकून राहू नये म्हणून प्रत्येक जेवणानंतर ब्रश करणे गरजेचे आहे
  10. सकाळी उठल्यावर व रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करणे अनिवार्य आहे.
  11. सुजलेल्या हिरड्या व तापमानाची संवेदना वाढली असेल तर घरा बाहेर पडून मेडिकल वरचे  महागडे mouthwash, mouth rinse  वापरण्यापेक्षा मीठ + हळद यांचे कोमट मिश्रण वापरून खळखळून गुळण्या करणे आवश्यक आहे. कोरोना  संसर्ग रोखण्यासाठी साध्या पाण्याने  दिवसातून एकदाच नव्हे तर प्रत्येक जेवणानंतर चूळ व गुळण्या करणे आवश्यक आहे.
  12.  लहान मुलांना रात्रीच्या वेळी वापरायची काढता येतील अशी आपलायन्स  दिली जातात त्यांची विषय स्वच्छतेच्या दृष्टीने काळजी घ्यायला हवी.

    सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

ऑफिसची रचना आणि काम करण्याची पद्धत बदलावी लागणार

आफिसची रचना आणि काम करण्याची पद्धत बदलावी लागणार

ऑफिसची रचना आणि काम करण्याची पद्धत बदलावी लागणार आता कोरोना सोबत जगायला शिकताना आपल्याला अनेक गोष्टींची पुनर्रचना करावी लागणार आहे. यात ऑफिसची बसण्याची रचना कर्मचाऱ्यांची काम करण्याची पद्धत कदाचित बदलावी लागेल. यात पुढील बदल गरजेचे ठरतील

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

  • सिक्स फीट ऑफिस ही नवी संकल्पना आणावी लागणार ज्यात रचना अशी केलेली असेल कि दोन काम करणाऱ्यांमध्ये ६ फुटाचे अंतर राहील.
  • ऑफिस १० ते ५ या वेळेतच हा हट्ट सोडून गर्दी टाळण्यासाठी कर्मचार्यांना सकाळ, दुपार , संध्याकाळ अशा तिन्ही शिफ्ट मध्ये बोलवावे.
  • ऑफिसची रचना आणि काम करण्याची पद्धत बदलावी लागणार ऑफिस मध्ये सेन्ट्रल एसी न वापरता वैयक्तिक वेगळे एसी वापरावे. दर महिन्याला ते स्वच्छ करावे. हॉस्पिटल व आयसीयू ची स्वच्छतेचे व इन्फेक्शन कंट्रोलचे एक धोरण असते व त्याचा एक प्रमुख नेमून दर महिन्याला या विषयी बैठक होते. हे ऑफिस मध्ये ही सुरु करा.
  • ऑफिसच्या बाहेर आत येताना दारावर हात धुण्यासाठी बेसिन, पायाने ऑपरेट होईल असे पातळ साबण देणारे स्टँड ठेवावे.  
  • मुख्य दार हे हात न लावता अपोआप उघडणारे असावे किंवा ते ऑफिसच्या वेळेत उघडेच ठेवावे . अंतर्गत रचनेत दारे कमी असावे किंवा केबिन्स ची दारे उघडी ठेवावी.
  • मुंबई , पुणे सोडून इतर ठिकाणी जागा उपलब्ध असेल तिथे ऑफिस हवेशीर असावे. 
  • प्रत्येक बसण्याच्या जागी खुर्च्या समोर न ठेवता उजव्या , डाव्या बाजूला ठेवावे.
  • लिफ्ट मध्ये व डेस्क समोर कुठे उभे राहायचे हे लाल रंगाने वर्तुळ मार्क करावे.
  • ऑफिस मध्ये अंतर्गत एका दिशेने चालण्याचे , आत आणि बाहेर जाण्याच्या रांगा निश्चित कराव्या म्हणजे माणसे समोरासमोर येणार नाहीत.
  • रोज कामावर आल्यावर आपले वर्क स्टेशन म्हणजे आपला लॅपटॉप, कम्प्युटर , कि बोर्ड, इंटरकॉम हे सॅनीटायजर वाइप्स ने स्वच्छ करून घ्या.
  • साधा सर्दी खोकला असणाऱ्यांना शक्य असल्यास  वर्क फ्रॉम होमची सोय किंवा वेगळ्या विभागात बसून काम करण्याची पद्धत सुरु करावी लागेल म्हणजे इतरांचा त्यांच्याशी संपर्क येणार नाही.
  • जेवणाच्या सुट्टीची वेळ एकाच वेळी ठेवण्याऐवजी ती ही विभागून द्यावी लागेल.
  • ज्या ऑफिस मध्ये जास्त लोकांचा संपर्क येथे , उदाहरणार्थ बँक तिथे बाहेरून येणारे  आणि सेवा देणाऱ्यांना काचेने पूर्ण वेगळे करून दोघांना मल्टिप्लेक्स थेटरच्या तिकीट काऊन्टर  प्रमाणे माईक वर संवादाची सोय करावी.
  • बैठका घेताना सर्वांनी पुढे येऊन बसण्यापेक्षा सगळ्यांच्या खुर्च्या या भिंतीला टेकून म्हणजे शक्य तितक्या लांब ठेवाव्या
  • ऑफिस मध्ये कर्मचाऱ्यांच्या हाताचा संपर्क कमीत कमी यावा म्हणून हजेरी साठी फोनमधून कोड स्कॅन करणे , सेन्सर्स चा वापर करणे. तसेच ऑफिस मध्ये आणलेले अनावश्यक सामान बाहेरच ठेवाव
  • सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

आरोग्य सेतू अॅप डेटाचोरीच्या भीतीशिवाय वापरा

आरोग्य सेतू अॅप डेटाचोरीच्या भीतीशिवाय वापरा

आरोग्य सेतू अॅप डेटाचोरीच्या भीतीशिवाय वापरा आरोग्य सेतू हे भारत सरकारने तयार केलेले मोबाईल अॅप हे केसेस च्या संपर्कात आलेल्या किंवा येणाऱ्यांना ओळखण्यासाठी चांगले साधन आहे. पण या  अॅप मधून आपल्या बद्दलची माहिती चोरी होईल या भीती पोटी अनेकांना हे अॅप वापरणे बंद केले. अगदी खेड्या पाड्यातील वृद्ध लोक ही म्हणतात कि यातून माझी माहिती चोरी होईल. एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी कि या क्षणाला आपल्या सरकार समोर आणि देशा समोर सगळ्यात महत्वाचे आव्हान हे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग हे असून यासाठी हे अॅप तांत्रिक साधन म्हणून काम करते आहे. सर्व सामान्य  आपला डेटा चोरी होईल या भीती पेक्षा  आपल्या फोन मध्ये हे अॅप असेल आणि ब्लूटूथ चालू असेल तर कोरोना बाधित रुग्णाशी आपला संपर्क येण्याच्या शक्यतेची माहिती हे अॅप आपल्याला देते.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

तसेच डेटा चोरीची भीती मनात राहू नये म्हणून नुकतेच केंद्र  सरकारने एक काही नियम व आदेश जारी केले आहेत.

  • आरोग्य सेतू अॅप डेटाचोरीच्या भीतीशिवाय वापरा या अॅप मधील माहिती जास्तीत जास्त १८० दिवसांसाठीच संग्रहित राहणार आहे व त्यानंतर ती नंतर काढून टाकली जाणार आहे
  • जर आपली माहिती काढून टाकावी असे आपल्याला वाट असेल तर आपण या अॅप वर तशी विनंती पाठवू शकता. यानंतर ३० दिवसात आपली सगळी माहिती काढून टाकली जाईल.
  • या अॅप मधील माहिती काटेकोरपणे  फक्त शासनाचे आरोग्य धोरण ठरवण्यासाठी व कोरोना संबंधित उपाय योजनेसाठीच वापरली जाणार आहे
  • संशोधकांना हा डेटा हवा असल्यास तो नावा बद्दल पूर्ण गुप्तता पाळूनच देण्यात येईल.

सगळा देश कोरोनाशी लढत असताना अशा वेळी सरकार वर विश्वास ठेवून आपल्याला काही त्रास असल्यास ही माहिती या अॅप मध्ये आपण देण्याचे सहकार्य करणे आवश्यक आहे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

फोनवरून डॉक्टरांचा सल्ला घेताना…

फोनवरून डॉक्टरांचा सल्ला घेताना...

फोनवरून डॉक्टरांचा सल्ला घेताना “‘कोविड-१९’ची साथ आणि लॉकडाऊन व साथीमुळे अनेक जण डॉक्टरांचा फोनवरून सल्ला घेत आहेत. पण टेलिकन्सल्टेशन हा प्रकार अजून नवा असल्याने डॉक्टर व रुग्ण या दोहोंना त्याची शिस्त नाही. ती लावून घेण्यासाठी काही नियम समजावून घ्यायला हवेत…

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

१.फोनवरून डॉक्टरांचा सल्ला घेताना फोन किंवा आॅनलाईन कन्सल्टेशनसाठी कुठल्याही अ‍ॅपचा वापर करण्याची गरज नाही. फार्मा कंपन्या काही अ‍ॅप्स स्पॉन्सर करून डॉक्टरांना वापरण्यासाठी देत आहेत. असे अ‍ॅप्स डॉक्टरांनी मुळीच वापरू नये. कारण यामुळे आपल्या रुग्णांचा डेटा, विश्वसनीय माहिती फार्मा कंपन्यांकडे जाऊ शकते. थेट डॉक्टर व रुग्णांनी त्यांचे नंबर वापरावे व व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून कन्सलटेशन करावे.

२. कुठल्या जाहिरातीला भुलून किंवा गुगलवर डॉक्टर शोधू नये. गुगलवर डॉक्टरांची माहिती देणारे काही जस्ट डायल, प्रॅक्टोसारखे नेटवर्क डॉक्टरांकडून पैसे घेऊन कोणाचे नाव आधी दाखवायचे हे ठरवतात. म्हणून आपले नियमित डॉक्टरच टेलिकन्सल्टेशनसाठी चांगले राहतील.

३. कन्सल्टेशनची वेळ आणि ते किती अवधीचे असेल, हे आधी निश्चित करून घ्यावे. त्याला लागणारे पैसे व ते कसे भरावे, हे आधी विचारून घ्यावे. फीची देवाण-घेवाण ही थेट डॉक्टर आणि रुग्णामध्येच व्हावी. कोणत्याही थर्ड पार्टीमार्फत नको.

४. आपल्या तक्रारी, आधीचा वैद्यकीय इतिहास, नुकतेच काढलेले रिपोटर््स हे आधीच डॉक्टरांना पाठवून ठेवावे.

५. आॅनलाईन कन्सल्टेशनमध्ये डॉक्टरांशी फक्त आजार व वैद्यकीय तक्रारींबद्दल चर्चा करा. फार अनौपचारिक गप्पा मारू नका. शक्यतो एका कन्सल्टेशनमध्ये एकाच व्यक्तीबद्दल बोला.६. प्रत्यक्ष शारीरीक तपासणी शक्य नसल्याने आपल्या तक्रारी नेमकेपणाने सांगा.

७. फोनवरून डॉक्टरांचा सल्ला घेतानाकन्सल्टेशन झाल्यावर डॉक्टरांच्या सहीच्या प्रिस्क्रिप्शनची मागणी करा. त्यावर हे प्रिस्क्रिप्शन फोनद्वारे दिले गेले आहे, याची डॉक्टर नोंद करतील.८. कन्सल्टेशन संपल्यावर उपचार सुरु असताना काही शंका असल्यास प्रत्येक वेळी डॉक्टरला फोन करू नका. मेसेज करा म्हणजे सवड मिळाल्यावर डॉक्टर त्याला प्रतिसाद देतील.

९. मधुमेह, रक्तदाब, थायरॉईडसारखे दीर्घकालीन आजार असणाऱ्या रुग्णांसाठी कन्सल्टेशनचा हा मार्ग चांगला आहे. पण ‘फोनवर उपचार शक्य नाही, तब्येत जास्त वाटते आहे आणि येऊन भेटावेच लागेल,’ असे डॉक्टर सांगत असल्यास फोन कन्सल्टेशनचा हट्ट धरु नका. डॉक्टरांना भेटायला जा.

१०. फोन कन्सल्टेशन ही साथीच्या काळातील तात्पुरती सोय आहे. डॉक्टरांची प्रत्यक्ष भेट व तपासणीची जागा फोन कन्सल्टेशन कधीही घेऊ शकत नाही, हे ध्यानात ठेवावे. साथीच्या काळात उगीचच रुग्णालयाशी संबंध येऊ नये म्हणून फोन कन्सल्टेशनचा मार्ग चांगला आहे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

सरकारीऐवजी खासगी रुग्णालयात करा लसीकरण

सरकारीऐवजी खासगी रुग्णालयात करा लसीकरण

सरकारीऐवजी खासगी रुग्णालयात करा लसीकरण सध्या सरकारी रुग्णालयात पहिल्या ५ वर्षांपर्यंतच्या मोफत लसीकरणासाठी जाणे अवघड झाले आहे. एक तर यातील काही शासकीय हॉस्पिटल्स ही कोविड हॉस्पिटल्स आहेत. तर बऱ्याच ठिकाणी कोरोना संशयित तपासले जातात.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

सरकारीऐवजी खासगी रुग्णालयात करा लसीकरण याशिवाय सरकारी आरोग्य यंत्रणा प्रचंड तणावा खाली आहेत. त्यामुळे शक्यतो नियमित लसीकरण सध्या पुढील तीन ते चार खाजगी रुग्णालयात घ्यायला हरकत नाही. ज्या लसी सरकारी रुग्णालयात मोफत मिळतात त्या खाजगी रुग्णालयात अत्यंत स्वस्त आहेत. गोवर , बीसीजी , एमएमआर स्वस्त आहेतच पण पेन्टा म्हणजे ट्रिपल , मेंदूज्वर , कावीळ ही लस रु  ३९५ /- एवढ्या किमतीची आहे. याचे दीड , अडीच, साडेतीन व अठरा महिने असे चारच डोस असतात. खाजगी प्रॅक्टीस करणाऱ्या बालरोगतज्ञांनी यासाठी पुढील काही महिने तरी केवळ लसीची मूळ किंमतच आकारावी. त्यावर आपले कन्सल्टेशन चार्जेस व इंजेक्शन देण्याचे चार्जेस घेऊ नये. याने सरकारी रुग्णालयातील कामाचा ताण तर कमी होईलच शिवाय सरकारी रुग्णालयात जाऊन सर्दी , खोकला व कोरना संसर्ग होण्याचा धोका काही अंशी कमी होईल. यात अजून एक मधला मार्ग काढला जाऊ शकतो. सरकारी रुग्णालयात असलेल्या लसीचा स्टॉक सरकारी रूग्णालयाने बालरोगतज्ञांकडे द्यावा. त्या लसी बालरोगतज्ञांनी टोचून द्याव्या. या मोफत लसी खाजगी रुग्णालयात मिळत आहेत या जन जागृतीसाठी आशा सेविकांची मदत घेता येईल. याने लसीकरणाचे प्रमाणही वाढेल.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

इन्फ्रारेड थर्मामीटर कसे वापरावे ?

इन्फ्रारेड थर्मामीटर कसे वापरावे?

इन्फ्रारेड थर्मामीटर कसे वापरावे? सध्या अनेक ऑफिस, घरांमध्ये इन्फ्रारेड थर्मामीटर वापरले जाते आहे. अनेक ऑफिस मध्ये केवळ सोपस्कार म्हणून लांबून हे थर्मामीटर शरीरावर कुठे ही मारले जाते. त्यामुळे या थरमॉमीटरचा योग्य वापर करण्यास शिकले पाहिजे. तसेच इतर पद्धतीने ताप कसा मोजायचा हे ही कळले पाहिजे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

    इन्फ्रारेड थर्मामीटर कसे वापरावे ? इन्फ्रारेड थर्मामीटर वापरण्याचा एक फायदा असा आहे की यामुळे ताप असलेल्या व्यक्तीचा आणि थर्मामीटरचा संपर्क येत नाही. पण याचा तोटा हा आहे कि सार्वजनिक ठिकाणी याचा वापर करताना सोशल डीस्टन्सिंगचा फज्जा उडतो. अर्थात याला ही उपाय आहे. हे थर्मामीटर कसे वापरावे हे जाणून घेऊ –

  • इन्फ्रारेड थर्मामीटर कसे वापरावे ? आधी थर्मामीटर खाली अंगठा ठेवण्यासाठीचे बटन हलक्याने दाबून सुरु करावे. हे थर्मामीटर जोरात दाबून सुरु करण्याची गरज नाही व अगदी हलक्याने हाताळायचे असते.
  • आधी फॅरनहाईट की सेल्सियस याचे सेटिंग निश्चित करून घ्यावे
  • शक्यतो फॅरनहाईटचीच सेटिंग वापरावी. आपल्या देशातील डॉक्टर फॅरनहाईट मध्ये शरीराच्या तापमानाला सरावलेले आहेत. यामुळे तुमच्या डॉक्टरला तापमान लगेच कळेल.
  • तापमान घेतना इन्फ्रारेड थर्मामीटर हे कपाळाच्या मध्यभागी किमान ३ ते कमाल १५ सेंटीमीटर लांब पकडावे . कपाळ सोडून शरीराच्या इतर भागावर या थर्मामीटरने तापमान मोजू नये
  • तापमान घेताना अगदी बाहेर उन्हात किंवा उन्हातून आल्या आल्या किंवा ऑफिस मध्ये एसी / सेन्ट्रल एसी चालू असताना घेऊ नये. तापमान हा नॉर्मल रूमच्या तापमानाला घ्यावे .
  • तापमान घेताना कपाळावर घाम किंवा नुकतीच अंघोळ केली असल्यास किंवा चेहरा धुतला असल्यास तो पुसून वाळू द्या व त्यानंतर १० मिनिटांनी तापमान घ्या.
  • हे थर्मामीटर बऱ्यापैकी नेमकेपणाने तापमान मोजू शकत असले तरी खऱ्या तापमानात ०.१ डिग्रीचा फरक असू शकतात असे थर्मामीटर बनवणाऱ्या कंपन्या सांगतात. वास्तवात हा फेरफार १ डिग्री पर्यंत ही होऊ शकतो. तरी ही घरी सुरुवातीच्या तापमान चाचणी साठी हे थर्मामीटर वापरण्यास हरकत नाही.
  • तापमान जास्त आल्यास परत एकदा तापमान तपासावे.
  • तापमान १०२ च्या पुढे दाखवत असल्यास घरातील इतर नॉर्मल व्यक्तींचे तपासून पाहावे. ते नॉर्मल आल्यास हा मशीनचा बिघाड नसून दाखवलेले तापमान योग आहे असे समजावे.
  • इन्फ्रारेड थर्मामीटर कसे वापरावे ? सार्वजनिक ठिकाणी / ऑफिस मध्ये तापमान घेतना सोशल डीस्टन्सिंग पाळले जाण्यासाठी एकमेकांच्या समोर उभे राहणे पेक्षा एका रांगेत एकमेकांच्या बाजूला विरुद्ध दिशेने तोंड करून उभे राहावे. याने तापमान ही योग्य मोजता येईल व समोरासमोर संपर्क ही येणार नाही. जास्त लोकांची रोज तपासणी करावी लागत असल्यास फक्त हातच बाहेर येईल असे चेंबर तयार करता येतील.
  • तापमान मोजताना थ थर्मामीटरचा बाजूला करताना प्रकाशाचा झोत  डोळ्यात जाणार नाही याची काळजी घ्यावी कारण इन्फ्रारेड प्रकाशामुळे डोळ्यांना इजा होऊ शकते.
  • घरामध्ये हे थर्मामीटर उंचीवर किंवा कपाटात ठेवावे म्हणजे ते लहान मुलांच्या हाती लागणार नाही असे ठेवावे कारण लहान मुले यासोबत खेळतात थर्मामीटर चालू करून इन्फ्रारेड  प्रकाश एकमेकांच्या डोळ्यात / स्वतः च्या डोळ्यात टाकू शकतात. त्यामुळे मुलांच्या डोळ्याला इजा होऊ शकते.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

कोरोनावर उपचार

कोरोनावर उपचार

कोरोनावर उपचार”कोरोना हा ‘व्हायरल’ म्हणजे विषाणूजन्य आजार आहे. जगातील कुठल्याही ‘व्हायरल’ आजारावरचे  पहिले व सगळ्यांत मोठे औषध म्हणजे वेळ.  हा आपोआप बरा होणारा आजार असला, तरी  तो बरा होताना शरीरातील अवयवांना इजा होते. पण कोरोनामुळे नेमके काय नुकसान होते  यावर संशोधन व अभ्यास सुरू आहे.  पण मग सध्या कोरोनावर कोणते उपचार सुरू आहेत? कोणती औषधे त्यावर प्रभावी ठरताहेत? प्रतिकारशक्ती वाढवणारी औषधे कोणती? संशोधन सध्या कुठल्या पातळीवर आहे आणि  भारतातली आजची स्थिती काय?

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

कोरोनावर उपचार कोरोना हा एक असाध्य आजार आहे आणि यासाठी उपचारच नाहीत असा एक गैरसमज सगळीकडे पसरला आहे. उपचारांच्या संदर्भात एक गोष्ट समजून घ्यायला हवी की, कोरोना हा सर्दी-खोकल्यासारखा व्हायरल म्हणजे विषाणूजन्य आजार आहे. मात्न तो सर्दी-खोकल्यापेक्षा तीव्र आणि जास्त हानिकारक आहे. कोरोना व सर्दी-खोकलाच नव्हे तर जगातील इतर कुठला ही व्हायरल यावर पहिले व सगळ्यात मोठे औषध असते ते म्हणजे वेळ. अर्थात हा आपोआप बरा होणारा आजार आहे. पण तो बरा होत असताना त्यामुळे शरीरातील अवयवांना इजा होते व त्यातून शारीरिक, मानसिक पातळीवर या आजारामुळे हानी होते. कोरोनामुळे नेमके कुठल्या पातळीवर नुकसान होते यावर ही निरीक्षण व संशोधनातून अभ्यास सुरू आहे. कोरोनामुळे होणारे मृत्यू व शारीरिक हानीचे व्यवच्छेदक लक्षण आहे शरीरातील लाल पेशींची ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता कमी करणे. म्हणून शरीरात ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते. यामुळे रक्त व रक्तवाहिन्यांना इजा होऊन फुफ्फुस्साच्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्त प्रवाहाचा वेग मंदावतो व रक्ताच्या गुठळ्या तयार होतात. कोरोनावर विविध पातळ्यांवर सध्या सुरू असलेले उपचार

अ. व्हायरसची संख्या कमी करणारी औषधे

ब. शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपचार

क. शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढवणे

ड. गुंतागुंत व शरीराला होणारी इजा टाळणे

इ. लक्षणांवर उपचार

अ. व्हायरसची संख्या कमी करणारी औषधे

1. रेमडेसिवीर :– हे औषध कोरोना सोडून कशासाठी वापरले जात होते – इबोला संशोधन सध्या कुठल्या पातळीवर – नुकतेच अमेरिकेतील एका संशोधनात रेमडेसिवीर हे औषध दिलेले रुग्ण औषध न दिलेल्या इतर रुग्णांपेक्षा अधिक वेगाने बरे झाले. कॅनडामध्ये झालेल्या दुसर्‍या संशोधनात हे औषध शरीरात कोरोनाची वाढ होण्यापासून रोखत असल्याचे आढळून आले. शिकागो विद्यापीठात 125 कोरोना रु ग्णांना हे औषध देण्यात आले. त्यापैकी 123 रु ग्णांमध्ये चांगले परिणाम दिसून आले. तरीही या औषधाबद्दल निश्चितपणे सांगण्यासाठी अजून संशोधनाची गरज आहे.भारतातील स्थिती- भारताने फेब्रुवारी महिन्यात गिलियाड या कंपनीला पेटंटसाठी मंजुरी दिली आहे. पण हे औषध अजून भारतात उपलब्ध नाही.

2. लोपिनावीर / रेटीनोवीर :- कोरोना सोडून कशासाठी वापरले जात होते – एचआयव्ही संशोधन सध्या कुठल्या पातळीवर – ऑक्सफर्ड विद्यापीठात ट्रायल्स सुरू आहेत; पण अजून अंतिम निष्कर्ष हाती नाहीत. चीनमधील जीन यीन-टान रुग्णालयात 199 रुग्णांना हे औषध देण्यात आल्यावर लक्षणांमध्ये सुधारणा दिसून आली. मेड या र्जनलमधील संशोधनात मात्न या औषधांचा फारसा फायदा न झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला.भारतातील स्थिती- औषध उपलब्ध आहे, देशात काही ठिकाणी वापरलेही जाते आहे. पण भारतात अजून पेटंटसाठी कोणालाही मंजुरी नाही.

3. फावीपीरावीर :- कशासाठी वापरले जाते – फ्लू – जास्त प्रमाणातील सर्दी, खोकला संशोधन सध्या कुठल्या पातळीवर – चीनमध्ये 340 रुग्णांवर झालेल्या अभ्यासात विषाणूचा शरीरात गुणाकार रोखण्यास व पसरण्याचे प्रमाण कमी करण्यास हे औषध प्रभावी ठरले.भारतात स्थिती – सध्या जपानमध्ये या औषधाची निर्मिती होते. भारतीय कंपन्या याच्या निर्मितीसाठी परवानगीच्या प्रतीक्षेत आहेत.

4. वॅलप्रोइक अँसिड (सोडियम वॅलप्रोएट) :– कशासाठी वापरले जाते? – झटके संशोधन – जनुकीय तंत्नज्ञान व जैव तंत्नज्ञानाच्या आंतरराष्ट्रीय केंद्राने एका पत्नाद्वारे या औषधाचे क्लिनिकल ट्रायल सुरू करण्याची मागणी करून हे औषध प्रभावी ठरू शकण्याची शक्यता वर्तवली आहे. पण अजून भारतात याचे कोरोनासाठी ट्रायल्स सुरू झालेले नाहीत.भारतात स्थिती – हे औषध भारतात मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे व स्वस्तही आहे; पण अजून वापर किंवा संशोधन सुरू झालेले आही. भारतात स्थिती – आयसीएमआरने हे औषध प्रतिबंधात्मक म्हणून आरोग्य क्षेत्नात काम करणारे व कोरोनाशी थेट संपर्क येणारे सर्व कर्मचारी यांना देण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबईतील धारावी व इतर हॉटस्पॉट्समध्ये हे सर्व जनतेला प्रतिबंध म्हणून देण्यात आले आहे. पण अजून संशोधनात याची सर्व लोकसंख्येला प्रतिबंध करण्यासाठी देण्याची उपयुक्तता सिद्ध झालेली नाही. भारतात हे औषध मोठय़ा प्रमाणावर वापरले जात आहे. म्हणून या औषधावर संशोधन करण्याची आपल्याला चांगली संधी आहे. पण अजून अभ्यास सुरू झालेले नाहीत.

6. अँझिथ्रोमायसीन :- वापरले जाते- सर्दी, खोकला, न्युमोनिया, श्वसनाचा खालच्या व वरच्या बाजूचा जंतुसंसर्ग संशोधन – फ्रान्समधील एका अभ्यासात अँझिथ्रोमायसीन तसेच काही रुग्णांमध्ये या सोबत हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनचा वापर केल्यास उपचारांना चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. पण संशोधनातील रुग्णसंख्या खूपच कमी असल्याने यावर अजून संशोधन आवश्यक आहे. भारतात स्थिती- हे औषध काही प्रमाणात वापरले जात असले तरी अजून संशोधन सुरू झालेले नाही. कॅनडामधून अँझिथ्रोमायसीन व हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन यांचा एकत्रित वापर करून जगभरातून रु ग्णालय एका मोठय़ा संशोधनात्मक अभ्यासात सहभागी होणार आहेत. पण भारतातून एकाही रुग्णालयाने यात अजून सहभाग नोंदवलेला नाही. आपल्या देशाने यात सहभागी व्हायला हवे कारण यामुळे निश्चित निष्कर्ष हाती येतील.

5. हायड्रॉइक्सिक्लोरोक्वीन :– कशासाठी वापरले जाते- मलेरिया, संधिवात संशोधन – ब्रिटिश मेडिकल र्जनलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात या औषधाचा मृत्यूच्या प्रमाणावर काहीही परिणाम झालेला नाही. काही अभ्यासात मात्न हे औषध दिल्याने 70 टक्के रुग्णांमध्ये विषाणू संख्या शरीरात बर्‍यापैकी कमी झाल्याचे दिसून आले. फ्रान्समधील 30 रुग्णांवर केलेल्या अभ्यासात या औषधाचा वापर फायदेशीर असल्याचे दिसून आले. पण 30 ही रुग्णसंख्या खूप कमी असल्याने हे औषध फायदेशीर ठरेल हे निश्चितपणे सांगता येणार नाही. हृदय अचानक बंद पडणे व हृदयाचे ठोके अनियंत्रित होणे हे या औषधाचे दोन प्राणघातक दुष्परिणाम आहेत. पण 14 ते 60 या वयोगटात हृदयरोग नसल्यास हे औषध सुरक्षित आहे. भारतातस्थिती – आयसीएमआरने हे औषध प्रतिबंधात्मक म्हणून आरोग्य क्षेत्नात काम करणारे व कोरोनाशी थेट संपर्क येणारे सर्व कर्मचारी यांना देण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबईतील धारावी व इतर हॉटस्पॉट्समध्ये हे सर्व जनतेला प्रतिबंध म्हणून देण्यात आले आहे. पण अजून संशोधनात याची सर्व लोकसंख्येला प्रतिबंध करण्यासाठी देण्याची उपयुक्तता सिद्ध झालेली नाही. भारतात हे औषध मोठय़ा प्रमाणावर वापरले जात आहे. म्हणून या औषधावर संशोधन करण्याची आपल्याला चांगली संधी आहे. पण अजून अभ्यास सुरू झालेले नाहीत.

7. आयवरमेकटीन :–कशासाठी वापरले जाते- जंत, खरु ज संशोधन – या औषधावरचे सर्व संशोधन शरीराच्या बाहेर व शरीरातून पेशी बाहेर काढून झाले आहे. अशा संशोधनात 24 तासात विषाणू संख्या कमी व 48 तासात पूर्ण नाहीशी झाल्याचे दिसून आले आहे. जीवित व्यक्तीवर संशोधन अजून सुरू आहे व कुठलेही निष्कर्ष अजून हाती आलेले नाहीत. भारतात स्थिती- अजून या औषधाचा वापर व संशोधन सुरू झालेले नाही.

. शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपचार

  • इंटरफेरोन बिटा :- कशात वापरले जाते – या आधी सार्स व कोरोनाच्या इतर जातकुळीतील विषाणूमुळे होणारा र्मस संशोधन- जागतिक आरोग्य संघटनेने या औषधाला उपचारामध्ये महत्त्वाचे स्थान दिले असून, लोपिनावीर, रेटीनोवीर व इंटरफेरोन बिटा अशा तिन्हींचा एकत्रित वापर करून काय परिणाम होतो यावर ट्रायल्स सुरू आहेत. आधी सार्सच्या अनुभवावरून हे औषध चांगले काम करू शकेल, असा अंदाज आहे. इंटरफेरोन बिटा शरीरात काय करते- इंटरफेरोन बिटा हे शरीरात विषाणू संसर्ग झाल्यावर नैसर्गिक प्रतिकारशक्तीची यंत्नणा कार्यरत करण्यासाठी व ती चालवण्यासाठी महत्त्वाचे काम करणारे प्रोटीन आहे. एरवी इतर विषाणू संसर्गात हे नैसर्गिकरीत्या निर्माण होते. पण कोरोनामध्ये हे निर्माण होण्याचे प्रमाण कमी असल्याने फुफ्फुसांना इजा होते. भारतात स्थिती – भारतात हे औषध उपलब्ध असले तरी ते खूप महागडे आहे व जास्त प्रमाणात उपलब्ध नाही. काही ठिकाणी वापरले जाते आहे.

2. प्लाज्मा थेरपी :– कोरोनाच्या बर्‍या झालेल्या रु ग्णांच्या शरीरात कोरोना विरोधात प्रतिकारशक्ती निर्माण झालेली असते. ही अँण्टिबॉडीजच्या माध्यमातून प्लाज्मामध्ये असते. बर्‍या झालेल्या रुग्णाच्या रक्तातून प्लाज्मा वेगळा करता येतो. यासाठी थोड्या प्रमाणात रक्तदान करावे लागते. हा प्लाज्मा कोरोनाग्रस्त रुग्णाला दिल्यास त्याच्यात ही प्रतिकारशक्ती निर्माण होऊ शकते. चीन व अमेरिकेत यावर काही प्रमाणात प्रयोग झाला; पण अजून खूप कमी लोकांना हा दिला गेल्याने याची निश्चित उपयुक्तता सांगता येणे कठीण आहे. कोरोनावर उपचार आयसीएमआरने या उपचाराला क्लिनिकल ट्रायल म्हणजे प्रयोगासाठी परवानगी दिली आहे. महाराष्ट्रात प्लाज्मा थेरपी दिलेला पहिला रुग्ण अजूनही अत्यवस्थ आहे.

. शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढवणे

1. ओझोन थेरपी :- लाल ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता कमी झाल्याने ऑक्सिजन देऊनही उपयोग होत नसल्यास ओझोन द्यावे असे काही संशोधकांचे म्हणणे आहे. यावर र्जमनीमध्ये काही प्रयोग सुरू आहेत व संशोधन केले जात आहे. भारतात अजून याचा वापर सुरू झालेला नाही.

. गुंतागुंत शरीराला होणारी इजा टाळणे

1. स्टीरॉइड – व्हेण्टिलेटरवर टाकण्याची वेळ आलेल्या रुग्णांना व फुफ्फुसांना इजा होत असलेल्या काही रु ग्णांना स्टीरॉइड्स देऊन उपचार केले जात आहेत. यावर संशोधन सुरू आहे व अंतिम निष्कर्ष आले नसले तरी परदेशातील डॉक्टरांना  याचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. व्हेण्टिलेटरवरील रु ग्ण वाचवण्यास यामुळे मदत होते आहे.

2. टोकलीझूमॅब – कोरोनामध्ये सार्स ही जीवघेणी स्थिती निर्माण होते तेव्हा शरीरात सायटोकाइन या पेशींची वाढ होते. याला सायटोकाइनचे वादळ असे म्हटले जाते. त्यासाठी टोकलीझूमॅब हे औषध वापरले जाते. सध्या या औषधाचे परदेशात ट्रायल्स सुरू आहेत. भारतातही हे औषध वापरले जाते आहे.

इ. लक्षणांवर उपचार – यासाठी पॅरासिटॅमॉल व सर्दी-खोकल्याची इतर साधी औषधे वापरली जातात.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता