संसर्ग, साथींवर पावसाळ्याचा काय परिणाम होतो?

संसर्ग, साथींवर पावसाळ्याचा काय परिणाम होतो

संसर्ग, साथींवर पावसाळ्याचा काय परिणाम होतो? “उन्हाळ्यात वाढलेल्या तापमानामुळे कोरोना संसर्ग कमी होईल, असे बोलले जात होते; पण तसे काही झाले नाही व साथ उन्हाळ्यात वाढलीच. आता अनेकांच्या मनात प्रश्न आहे की,पावसाळ्याचा कोरोनावर काही परिणाम होतो का? कुठल्याही विषाणूच्या प्रसारावर सहसा तीन गोष्टींचा परिणाम असतो. हवामानातील बदल, मानवाचे वर्तन तसेच आणि विषाणूमध्ये होणारे जनुकीय बदल व संक्रमण.आयआयटी मुंबईमधील एका प्रयोगात दिसून आले की, पावसाळ्यातील दमट हवामान कोरोनासाठी पोषक असून संसर्ग वाढवणारे ठरू शकते.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

संसर्ग, साथींवर पावसाळ्याचा काय परिणाम होतो? हे ठामपणे सांगण्यास व सिद्ध करण्यास हा एक अभ्यास पुरेसा नाही. यासाठी एक ते दोन वर्षे कोरोना विषाणू संक्रमित होतो का व त्यांनतर प्रत्येक ऋतूमध्ये त्याचे वर्तन कसे असेल या अभ्यासानंतरच हे ठामपणे सांगता येईल. पण सर्दी-खोकला, आरएसव्ही हे सर्व विषाणू पावसाळ्यात जास्त प्रमाणात पसरतात. हे गृहीत धरून पावसाळ्यात जास्त सतर्क राहण्याची गरज नक्कीच आहे. पावसाळ्यामध्ये मानव वर्तणुकीवर असे काही परिणाम होतात, ज्यामुळे संसर्गसाखळी तोडण्यास मदतही होऊ शकते. ते म्हणजे इतर ऋतूंपेक्षा पावसाळ्यात लोक जास्त घरात राहतात. बाहेर पडत नाहीत. यामुळे गर्दीचे प्रमाणही कमी होते. त्यामुळे इतरांशी कमी संपर्क येऊन संसर्गाचे प्रमाण कमी होण्याचा फायदा होऊ शकतो.पावसाळ्यातील एक गोष्ट मात्र कोरोनाची गुंतागुंत वाढवते. पावसाळ्यात हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया, लेप्टोस्पायरोसिस हे आजारही वाढतात. त्यामुळे तापाचे रुग्ण पावसाळ्यात जास्त असतात. या इतर आजारांच्या वाढलेल्या प्रमाणामुळे तापाचा रुग्ण कोरोनाचा की इतर आजारांचा, हे निदान करताना गोंधळ उडतो. म्हणून या काळात आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवून, छतावर किंवा घराभोवती पाणी तुंबू न देता डासांना अटकाव करायला हवा. म्हणजे इतर आजार कमी होतील. यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताणही कमी होईल.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.

सार्वजनिक फवारणी आणि निर्जंतुकीकरण कक्ष निरुपयोगी

सार्वजनिक फवारणी आणि निर्जंतुकीकरण कक्ष निरुपयोगी

सार्वजनिक फवारणी आणि निर्जंतुकीकरण कक्ष निरुपयोगी सध्या राज्यात अनेक सार्वजनिक ठिकाणी सोडीयम हायपोक्लोराईटची फवारणी तसेच अशी फवारणी सुरु असलेले चेम्बर्स बनवून त्यातून माणसांनी जायचे असे प्रकार सुरु आहेत. अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर फवारणी करून कोरोनाला अटकाव करणे अवघड तर आहेच याशिवाय त्याचे दुष्परिणाम ही आहेत. कोरोना हवेतून दूरवर पसरत नाही. तो ८ मीटर हवेत उडून नंतर खाली बसतो. म्हणून हवेत फवारणीचा उपयोग नाही. सार्वजनिक आरोग्यात उपाय योजना करताना परिणामकारकता – खर्च – दुष्परिणाम हे त्रैराशिक मांडावे लागते.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

कोरोना ची कॅरीअर व्यक्तीने नेमके कुठे हात लावले हे माहित नसताना अख्खे गाव , विभाग फवारणी करणे उपयोगाचे तर नाहीच पण याने आर्थिक निधी चा अपव्यय ही होतो आहे. फवारणी करायचीच असेल तर फक्त ज्या बिल्डींग मध्ये रुग्ण सापडला किंव एखादा छोटा भाग जिथे खूप रुग्ण सापडले असे हॉट स्पॉट मध्ये त्या मानाने याचा थोडा फार उपयोग तरी होईल.सार्वजनिक फवारणी आणि निर्जंतुकीकरण कक्ष निरुपयोगीवयक्तिक पातळीवर घर स्वच्छ करण्यासाठी ग्लव्ज, गॉगल, मास्क घालून  घरात सोडियम हायपोक्लोराईटने स्वच्छता करण्यास हरकत नाही.सार्वजनिक फवारणी आणि निर्जंतुकीकरण कक्ष निरुपयोगी तसेच ज्या रुग्णालयात रुग्ण सापडला तिथे ही फवारणी करण्यास हरकत नाही. सार्वजनिक रीत्या फवारणी केल्याने डोळे , त्वचा, नाकात चुरचुरणे , घसा खवखवणे / दुखणे , खोकला असे दुष्परिणाम होऊ शकतात .  निर्जंतुकीकरण कक्ष बनवून त्यातून माणस जात आहेत , त्याबद्दल ही असेच आहे. संसर्गाचा सगळ्यात मोठा धोका हा कोरोना बाधित व्यक्ती शी संपर्क येऊन त्याच्या खोकण्या, शिकण्यातून  आहे. तसेच त्याने हात लावला त्याच ठिकाणी हात लावण्यातून आहे. फक्त निर्जंततूकीकरण कक्षातून जाऊन हा धोका कसा टळेल. काहींनी चक्क हँड सॅनीटायझरची ही या कक्षातून पूर्ण अंगावर फवारणीची सोय केली आहे. या सर्व गोष्टींचे कक्षातून जाणाऱ्या व्यक्तीवर दुष्परिणाम आहेत. जागतिक आरोग्य संघटना व सीडीसी ने ही अशा कक्षांना मान्यता दिलेली नाही. तमिळ नाडू राज्याच्या आरोग्य विभागाने शासनाचा परिपत्रक काढून असे कक्ष बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता