कोरोनाचा नवा ओमिक्रॉन व्हेरिअंट दारात उभा… आता?

Corona's new Omicron variant standing in the doorway ... nowCorona's new Omicron variant standing in the doorway ... now

२६ नोव्हेंबर रोजी जागतिक आरोग्य संघटनेने ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या संक्रमित प्रजातीला ‘व्हेरिअंट ऑफ कन्सर्न’ म्हणजे नोंद घेण्याजोगी प्रजाती म्हणून जाहीर केले आहे. दक्षिण आफ्रिका व युरोपसह नऊ  देशांमध्ये सध्या या नव्या प्रजातीमुळे नव्याने कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळण्यास सुरुवात झाली आहे. भारतात पहिली लाट ओसरल्यावर कोरोना संपल्याचा उत्सव सुरु होता, तेव्हा डेल्टाचे रुग्ण अमेरिका, इंग्लंड, युरोपमध्ये आढळण्यास सुरुवात झाली व त्यावेळच्या गाफीलतेतून मार्च महिन्यात भारतात दुसरी लाट आली.  आता भारतात काळजी वाऱ्यावर सोडून दिलेली असताना  हा ओमिक्रॉन व्हेरिअंट आला आहे.

कोरोनामध्ये अशी संक्रमणे अपेक्षित असली, तरी ओमिक्रॉनच्या संक्रमणामध्ये काहीसा वेगळेपणा आहे. अल्फा व डेल्टा ही भावंडं निर्माण झाली तेव्हा कोरोना विषाणूमध्ये दोन ते तीन ठिकाणी जनुकीय बदल झाले होते. पण ओमिक्रॉन मध्ये तब्बल ३० ठिकाणी अशी म्युटेशन्स झाली आहेत. त्यामुळे हे संक्रमण आधीपेक्षा जनुकीयदृष्ट्या जास्त घातक आहे. अशा संक्रमणामुळे एक तर विषाणू जास्त लोकांना संक्रमित करण्यास सक्षम होतो आणि लसवंत व्यक्तिलाही संसर्गित करू शकतो. अर्थात, असे होईलच, असेही नाही. कारण संक्रमण घातक ठरेल की, विषाणूला माघार घ्यावी लागेल, हे मानव समूह म्हणून त्याला कसा प्रतिसाद देतो व सार्वजनिक आरोग्याची त्या विरोधात धोरणे कशी असतात, यावरून ठरते.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

अर्धवट लोकसंख्येला कोरोना संसर्गामुळे मिळालेली अर्धवट प्रतिकारशक्ती व अजून सर्व लोकसंख्येचे न झालेले लसीकरण अशा सामूहिक प्रतिकारशक्तीची ‘ ना घर का, ना घाट का’ स्थिती ओमिक्रॉनच्या आक्रमणासाठी एक आदर्श स्थिती आहे. आज देशात केवळ ३१ टक्के लोकांचे पूर्ण लसीकरण झाले आहे. २६ टक्के लोकांनी एक डोस घेतला असून, दुसरा डोस घेणे बाकी आहे. दुसरा डोस न घेतलेल्यांपैकी १०० दशलक्ष भारतीयांनी दुसऱ्या डोसची वेळ येऊनही हा डोस घेतलेला नाही. दुसऱ्या डोसची वाट पाहणारे व तारीख उलटूनही न घेणारे हे दोन गट भारताला ओमिक्रॉनच्या तोंडी  देऊ शकतात. अजून लसीकरणच न झालेले ४३ टक्के भारतीय हे तर ओमिक्रॉनसाठी सर्वात सोपे सावज!

संक्रमण कुठलेही व कितीही घातक असो पूर्ण लसीकृत देश हेच त्याला उत्तर असणार आहे. म्हणून लसीकरणाची गती अजून वाढवणे, मुदत उलटून गेलेल्यांना शोधून तो देणे व पहिला डोस झालेल्यांना त्याच तारखेला डोस देणे, यासाठी तीन पातळ्यांवर काम करणारे आरोग्य सेवकांचे गट व स्वतंत्र कृती आराखडे तयार करणे गरजेचे आहे. याशिवाय दुसरा डोस घेऊन सहा महिने होऊन गेलेल्यांना तिसरा बुस्टर डोस देण्याच्या निर्णयालाही काहीसा उशीर होतो आहे. जगात ३६ देशांमध्ये तिसरा डोस देण्यास सुरुवात झाली आहे. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर ६०पेक्षा जास्त वय असलेले, इतर आजार असलेले व पहिल्या फळीत काम करणारे आरोग्यसेवक या तीन गटांना बुस्टर डोसचा निर्णय सरकारने लवकरात लवकर घ्यावा. ओमिक्रॉनचे अस्तित्व असलेल्या सर्व देशातून भारतात येणाऱ्या लोकांना १४ दिवस ठराविक ठिकाणी (गृह नाही) विलगीकरण, तपासणी अनिवार्य करणे गरजेचे आहे.  कोरोना रुग्णांचे जनुकीय वर्गीकरण वाढवून त्यात ओमिक्रॉन आढळतो का, याची सतत चाचपणी आवश्यक आहे. एवढे नुकसान झाले तरीही, मास्क, हात, धुणे व शारीरिक अंतर  या तीन मूलभूत गोष्टी जीवनशैलीचा भाग बनवण्यास आपण तयार नाही. ओमिक्रॉन अजून किती घातक ठरेल, हे काळच ठरवेल. पण त्यादृष्टीने आरोग्य सुविधांची तत्परता, बंद केलेले कोविड सेंटर्स कधीही सुरु करता येतील, अशी तयारी व औषधांचा पुरेसा साठा या बाबींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. दुसरी लाट येण्याआधीची गाफीलता व दुसऱ्या लाटेदरम्यान झालेल्या चुका टाळून ओमिक्रॉनचा मुकाबला करावा लागेल.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.

डॉ. अमोल अन्नदाते

लहान मुलांना लस देणे का गरजेचे आहे?

लहान मुलांना लस देणे का गरजेचे आहे?

अमेरिका, जपान, सिंगापूरसह इतर २० देशांनी काही महिन्यांपूर्वीच लहान मुलांसाठीच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात केली आहे. यात प्रामुख्याने १२ वर्षांपुढील कुमारवयीन मुलांचा समावेश असला तरी या देशांमध्ये २ वर्षांच्या पुढच्या मुलांचे लसीकरण लवकरच सुरू होणार आहे. फायजरसारख्या  लसींच्या इतर देशांतील लहान मुलांवरील क्लिनिकल ट्रायल्स पूर्ण झाल्या असल्या तरी  भारतात या ट्रायल्स अजूनही सुरू आहेत. भारतातील पालक लहान मुलांसाठी कोरोना लस कधी उपलब्ध होईल या प्रतीक्षेत आहेत. ही प्रतीक्षा साहजिक असली तरी सहज करता येतील व उपलब्ध आहेत त्या गोष्टी लहान मुलांसाठी करायच्या राहून गेल्या आहेत. जी लस उपलब्ध आहे ती फक्त शास्त्रीय प्रयोग पूर्ण झालेले नाहीत म्हणून लहान मुलांना देता येत नाही. अशा लसीला ‘ऑर्फन व्हॅक्सिन’ किंवा ‘अनाथ लस’ असे म्हणतात. भारतात उपलब्ध असलेल्या कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन आणि स्पुतनिक या तिन्ही लसी अशाच लहान मुलांसाठी अनाथ ठरत आहेत.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

सध्या जगभरात उपलब्ध असलेल्या कोरोना लसीच्या लहान मुलांमधील शास्त्रीय प्रयोगांचा आढावा घ्यायचा झाल्यास फायजर, मॉडर्ना व सायनोफार्म या तीन लसींचे १२ ते १८ वर्षे वयोगटात प्रयोग यशस्वी झाले असून, त्यांची लहान मुलांमधील परिणामकारकता व सुरक्षितता ही मोठ्या व्यक्तींमध्ये आहे तेवढीच असल्याचे सिद्ध झाले आहे. इस्रायलमध्ये तर फायजर लसीचे प्रयोग हे ६ महिने ते १८ वर्षे या वयोगटात सुरू आहेत. म्हणूनच २० देशांत १२ वर्षांच्या पुढे लसीकरण मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. फायजरचे लहान मुलांसाठी ६ महिने वयाच्या पुढे प्रयोग शेवटच्या टप्प्यात आहेत व लवकरच पूर्ण होणार असल्याने तीही लस सर्वच लहान मुलांसाठी वापरता येईल, असे सांगितले जाते आहे.

भारतात सध्या ३ वर्षे ते १८ वर्षे वयोगटासाठी कोव्हॅक्सिन या लसीच्या वापराच्या प्रयोगाच्या तिसऱ्या टप्प्यातील दुसरा भाग नागपूर येथे सुरू आहे. यात मुलांना दुसरा डोस देऊन एक महिना झाला आहे. या प्रयोगाचे अधिकृत निकाल अजून जाहीर झाले नसले तरी या प्रयोगात सहभागी डॉक्टरांनी सांगितलेल्या माहिती प्रमाणे अजून कुठल्याही मुलावर कुठलेही दुष्परिणाम आढळून आलेले नाहीत. तसेच पहिल्या डोसनंतर शरीरात निर्माण होणाऱ्या अँटीबॉडीजची पातळी समाधानकारक आढळून आली आहे. हा अभ्यास पूर्ण होऊन त्याचे अंतिम निष्कर्ष जाहीर होण्यास तीन ते चार महिने व ते प्रकाशित होण्यास आणखी तीन महिने लागण्याची शक्यता आहे. 
कोविशिल्डच्या लहान मुलांमधील ट्रायल्स इंग्लंडमध्ये सुरू करण्यात आल्या होत्या; पण काही कारणास्तव त्या थांबविण्यात आल्या. स्पुतनिक या लसीच्या लहान मुलांसाठीच्या ट्रायल्स अजून कुठेही सुरू झालेल्या नाहीत.
– म्हणजे सध्या फक्त कोव्हॅक्सिनकडूनच लहान मुलांच्या लसीकरणाच्या दृष्टीने अपेक्षा आहेत. पण, या लसीचे उत्पादन खूप कमी आहे व ते अजून मोठ्या व्यक्तींनाच पुरेनासे झाले आहे. 

हान मुलांमध्ये कोरोनाचा आजार खूप सौम्य आहे म्हणून लसीकरणाची घाई करण्याची गरज नाही, असा केंद्र सरकारचा होरा आहे. लहान मुलांमध्ये आजार सौम्य असला तरी १५ वर्षांपुढील मुलांमध्ये काही प्रमाणात गुंतागुंत आढळून आली आहे. तसेच इतर सर्व वयोगटातील लहान मुलांमध्ये कोरोना होऊन गेल्यावर चार ते सहा आठवड्यांनी एमआयएससी ही जीवघेणी गुंतागुंत दिसून येत आहे. मुलांमध्ये कोरोना व त्यानंतर गुंतागुंतीत मृत्युदर कमी असला तरी तो शून्य नाही. तसेच लहान मुले  लक्षणविरहित व सौम्य असल्याने घरातील इतर ज्येष्ठांसाठी संसर्गाचा सर्वांत मोठे स्रोत (सुपर स्प्रेडर) ठरतात. 

हर्ड इम्युनिटी (समूह / कळप प्रतिकारशक्ती)साठी देशातील ७० ते ८० टक्के लोकसंख्येचे लसीकरण व्हावे लागते. देशात ० ते १४ या वयोगटात ३५.३ % व १८ वर्षांपर्यंतच्या वयोगटात ४१ % लोकसंख्या आहे. या ४१ % लोकसंख्येच्या लसीकरणासाठी घाई न करता हर्ड इम्युनिटीचे उद्दिष्ट साध्य होणे अशक्य आहे. 
‘सर्व जण सुरक्षित नाहीत, तोपर्यंत कोणीच सुरक्षित नाही’ हे कोरोना लसीकरणाचे मुख्य सूत्र आहे. या ‘सर्व जण’चा महत्त्वाचा घटक असलेल्या लहान मुलांचे लसीकरण सुरू करण्याबाबतच्या हालचालींचा अत्यंत संथ वेग कोरोनाविरोधात सुरक्षेच्या दृष्टीने घातक आहे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.

तिसरा टप्पा सुरू : मेरा नंबर कब आयेगा?

कुठली लस चांगली याचे उत्तर  “जी उपलब्ध आहे ती”  एवढे सोपे आहे.  म्हणून  “कुठली घ्यावी”  यापेक्षा  “लस घ्यावी”  हेच महत्त्वाचे !

तिसरा टप्पा सुरू : मेरा नंबर कब आयेगा? कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा राज्यात सुरू झाला असून, पहिल्या व दुसऱ्या टप्प्याच्या अनुभवांवरून हा टप्पा जास्तीत जास्त यशस्वी करण्यासाठी सर्वसामान्य व शासन, प्रशासन अशा सर्व पातळ्यांवर काही सुधारणा आवश्यक आहेत. साठीच्या पुढे व इतर आजारांसह पंचेचाळीशीच्या पुढे असलेल्यांचे लसीकरण आता सुरू झाले असले, तरी पहिल्या फळीतील आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश असलेला टप्पा अजून अपूर्ण आहे. राज्यात पहिल्या टप्प्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या संख्येपैकी केवळ ५० टक्के लसीकरण झाले आहे. दुसरा डोस अनेकांनी घेतलेला नाही. दुष्परिणामांची भीती व लस घेऊनही कोरोनाची लागण होते या दोन गैरसमजांमुळे लसीकरणाचे प्रमाण कमी आहे. लसीकरणानंतर नैसर्गिक कारणांमुळे झालेले मृत्यू व दुष्परिणामांचे संबंधही लसीशी जोडण्यात आल्याने काही आरोग्य कर्मचाऱ्यांनीही लसीकडे पाठ फिरवली. लस पूर्णपणे सुरक्षित आहे व एक दिवसासाठी अंगदुखी, थोडा ताप, थकवा हे तुरळक परिणाम सोडता लसीचे कुठलेही मोठे दुष्परिणाम नाहीत. या लसीमुळे जीवघेण्या दुष्परिणामांची कुठलीही शक्यता मनात न आणता सर्वांनी लसीकरण करणे गरजेचे आहे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

लसीकरणासाठी जाताना प्रत्येकाने आणखी एकाला लसीकरणासाठी प्रेरित करणे, त्याला सोबत घेऊन जाणे, त्याच्या मनात शंका असतील तर त्या दूर करणे हा सध्या देशसेवा करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. पहिल्या टप्प्यात पहिला डोस घेतल्यावर दुसरा डोस घेण्यास काहीजण उत्सुक नव्हते. दोन डोस शिवाय पूर्ण प्रतिकारशक्ती येणे शक्य नाही. दुसरा डोस न घेणे म्हणजे पहिला डोस वाया घालवण्यासारखे आहे. पहिल्या व दुसऱ्या डोसची तारीख चुकवून ती उद्यावर ढकललेल्यांचे लसीकरण इच्छा असूनही चालढकल केल्यामुळे राहून गेले असे पहिल्या टप्प्यातले निरीक्षण आहे.  आपल्याला ठरवून दिलेल्या दिवशी लस घेणे हे  सगळ्यात मोठे आणि महत्त्वाचे प्राधान्य आहे असे ठरवून सकाळच्या सत्रातच लस घेण्याचा निश्चय करावा. एखाद्या साथीच्या रोगावर मात करायची असते तेव्हा कमी वेळात जास्त लोकसंख्येचे लसीकरण होणे आवश्यक असते. सध्या देशातील केवळ ०.६ टक्के जनतेचे लसीकरण झाले आहे. लसीकरणाचा वेग संथ आहे. रविवार व सार्वजनिक सुट्ट्यांना लसीकरण बंद ठेवून चालणार नाही. शासनाकडून लसीकरणाचा वेग वाढवण्याच्या हालचाली तेव्हाच होतील जेव्हा लसीकरण केंद्रावर मागणी वाढेल. म्हणून आपल्याला ठरवून दिलेली तारीख न चुकविणे गरजेचे आहे. 


पहिल्या टप्प्यातील बॅक लॉग पाहता प्रत्येक टप्प्यावर असाच लस न घेणाऱ्यांचा बॅक लॉग राहिला तर  लसीच्या माध्यमातून हर्ड इम्युनिटी म्हणजे कळप/सामूहिक प्रतिकारशक्तीच्या मुख्य हेतूपासून आपण वंचित राहू व सर्व मुसळ केरात जाईल. म्हणूनच प्रत्येकाने आरोग्य साक्षरता दाखवत साथ रोखण्यासाठीची  इच्छाशक्ती सिद्ध करण्याची ही वेळ आहे. लस घेऊनही कोरोनाची लागण झाल्याच्या बातम्यांनी विचलित होण्याची गरज नाही. लस ही आजारासाठी कवच कुंडले आहेत, पण तो काही अमरत्व देणारा अमृत कलश नाही. म्हणून इतर प्रतिबंधक उपायांचे महत्त्व याने कमी होत नाही. लस घेतल्यावर कोरोनासंसर्ग होण्याचे प्रमाण खूप कमी आहे. झाला तरी तो गंभीर स्वरूपाचा नसेल. म्हणजेच लसीचे मुख्य ध्येय हे मृत्यू टाळणे हे आहे हे समजून घ्यावे. 
कुठली लस चांगली याचे उत्तर “जी उपलब्ध आहे ती” एवढे सोपे आहे. दोन्ही लसी शासनाने सखोल वैज्ञानिक चिकित्सेअंति उपलब्ध केल्या आहेत म्हणून “कुठली घ्यावी” यापेक्षा “लस घ्यावी” हेच सध्या प्राधान्य असले पाहिजे. 
शासनाने लसीकरण धोरणात  काही बदल केला तर लसीची परिणामकारकता वाढवता येऊ शकते. सध्या दोन डोसमधील अंतर चार आठवडे ठेवण्यात आले आहे. त्यामुळे ५६ टक्के प्रतिकारशक्ती मिळणार आहे. हे अंतर जर ८ ते १२ आठवड्यांपर्यंत वाढवले तर लसीची परिणामकारकता ८० टक्केपर्यंत वाढू शकते. तसे निर्देश जागतिक आरोग्य संघटनेनेही दिले आहेत.  म्हणून पहिला डोस घेणाऱ्यांना चार आठवड्यांनी दुसरा डोस देण्यापेक्षा तो इतर लस न मिळालेल्यांना पहिला डोस म्हणून देता येईल (या धोरण सुधारण्यासाठी सूचना आहेत, पण सर्वसामान्यांनी ठरवून दिलेल्या दिवशी म्हणजे चार आठवड्यांच्या अंतरानेच दुसरा डोस घ्यायचा आहे) 
दुसरा डोस लांबविण्याचा शासकीय पातळीवर फायदा असा होईल की पहिल्या डोस नंतरही काही प्रमाणात प्रतिकारशक्ती निर्माण होतेच व जास्तीत जास्त जनतेला कमी वेळात पहिला डोस मिळाला तर संसर्गाचे प्रमाण, मृत्युदर व दुसऱ्या लाटेची शक्यता अशा अनेक गोष्टी कमी होतील.  दुसरा डोस लांबल्याने प्रतिकारशक्तीही जास्त प्रमाणात निर्माण होईल. 
दुसरा डोस लांबवून पल्स पोलिओच्या धर्तीवर जास्तीत जास्त लोकांना कमी वेळात पहिला डोस देण्याचा विक्रम प्रस्थापित करणे हा हर्ड इम्युनिटीसाठीचा राजमार्ग ठरू शकतो. यासाठी निश्चित काळ निर्धारित करून देशात उपलब्ध असलेले ८ लाख डॉक्टर व २० ते २५ लाख आरोग्य कर्मचारी सरकारच्या एका हाकेवर हे शिवधनुष्य नक्कीच पेलून धरतील. 


तिसरा टप्पा सुरू : मेरा नंबर कब आयेगा? फ्रान्समध्ये आधी कोरोनाचा संसर्ग झालेल्यांना एकच डोस देण्याचा निर्णय घेतला आहे. कारण आधी संसर्ग झाल्याने त्यांच्यासाठी पहिला डोस हा काही प्रमाणात दुसऱ्या बुस्टर डोससारखा काम करण्याची वैज्ञानिक शक्यता आहे. याचाही हेतू जास्तीत जास्त लोकांना पहिला डोस कमी वेळात देण्याचाच आहे. 
लसीकरण धोरण राबविताना  आरोग्य यंत्रणा कमकुवत असलेल्या, कमी मनुष्यबळ असलेल्या ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे.  ग्रामीण भागातील  जनता कोविन ॲपवर नोंदणी व प्रवास करून गावातून तालुक्याच्या ठिकाणी रुग्णालयात येईल ही अपेक्षा ठेवणे व्यर्थ आहे. अगदी गंभीर आजारासाठीही तालुक्याच्या ठिकाणी जाण्याची  आर्थिक व मानसिक क्षमता नसलेल्या ‘नाही रे’ वर्गाला लसीकरण मोहिमेत कसे सामावून घेता येईल याचे सूक्ष्म नियोजन अजून आरोग्य खात्याकडे नाही. समाजाच्या या स्तरासाठी लसीकरण गाव-खेड्यात न्यावे लागणार आहे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.

‘कोरोना’साठी वेगळा आरोग्य विमा घ्यावा का?

‘कोरोना’साठी वेगळा आरोग्य विमा घ्यावा का?

‘कोरोना’साठी वेगळा आरोग्य विमा घ्यावा का? कोरोना’साठी जर आपल्याला खासगी रुग्णालयात उपचार घ्यायचे असतील व शासनाने जरी या उपचाराच्या खर्चावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला असला, तरी खासगी रुग्णालयातील काही रुग्णांचा खर्च ५ लाखांपर्यंत ही गेला आहे. याचे कारणही तसेच आहे. जर कोरोनाचा रुग्ण अत्यवस्थ झाला व त्याला महागड्या औषधांची गरज पडली, तर हा खर्च शासनाने ठरवलेल्या दरात समाविष्ट नाही व रुग्णालयाला वेगळे पैसे आकारावे लागतातच. शिवाय, जर व्हेंटिलेटरची गरज पडली तर खर्च वाढतोच. म्हणून यासाठी काही विमा कंपन्यांनी वेगळा कोरोनासाठी विमा सुरू केला आहे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

‘कोरोना’साठी वेगळा आरोग्य विमा घ्यावा का? हा विमा घेताना पुढील गोष्टी लक्षात घ्याव्या.जर आपला आधी काढलेला आरोग्य विमा असेल व याचे प्रीमियम आपण नियमित भरत असाल, तर वेगळ्या कोरोना आरोग्य विम्याची गरज नाही.आरोग्य विमा असल्यास तो प्रत्येक व्यक्तीला किमान ५ लाखांची सुरक्षा देणारा असावा किंवा नसल्यास तो वाढवून घ्यावा. जर आरोग्य विमा नसेल तर वेगळा कोरोना विमा घ्यावा. कोरोना झाल्यास किंवा घरात इतर कोरोनाची जोखीम वाढवणारे आजार असलेली व्यक्ती असल्यास त्यासाठी उपचाराचे आर्थिक नियोजन करून ठेवावे. काही खर्च कमी करून कधीही वापरता येतील, अशी पैशांची तजवीज असावी. कोरोना विमा वार्षिक रुपये १५० पासून ते ५००० पर्यंत उपलब्ध आहे. व यात २५,००० पासून ते ५ लाखांपर्यंत विमा सुरक्षा आहे. यात काही सरसकट पूर्ण ठरवलेली विम्याची रक्कम देण्यात येते, काही विम्यामध्ये भरती होण्याची गरज व खर्चाप्रमाणे देण्यात येते. काही विमा हा तुम्ही काही विशिष्ट दुसऱ्या व तिसºया पातळीची शहरे किंवा ग्रामीण भागात राहात असाल त्यांच्या साठीच आहेत व काही विम्यामध्ये अतिदक्षता विभागात दाखल झाल्यास किंवा व्हेंटिलेटरच गरज पडल्यास विम्याची रक्कम मिळत नाही. म्हणून विमा घेताना या गोष्टींचा खुलासा करून घ्यावा.प्रत्येक विम्याला लागू होण्यास विमा काढल्यापासून १४-१६ दिवसांचा अवधी आहे.बºयाच विम्यामध्ये संपर्क आल्यावर क्वारंटाइन व्हावे लागले तर आजारी पडल्यावर मिळणार त्याच्या ५०% रक्कम दिली जाते. शक्यतो क्वारंटाइनमध्ये ही विमा सुरक्षा देणाºया पॉलिसीची निवड करावी.शक्यतो ज्या विमा कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशो म्हणजे म्हणजे क्लेम अंतर्गत पैसे देण्याचे प्रमाण जास्त आहे त्या कंपनीचा विमा घ्यावा. ही सर्व विमा कंपन्यांची माहिती कफऊअक उपलब्ध करून देते.प्रत्येक विम्याचा काळ फक्त१ वर्ष असतो याची नोंद घ्यावी.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.

‘कोरोना’चा रुग्ण कधीपर्यंत इतरांना संसर्गित करू शकतो!

‘कोरोना’चा रुग्ण कधीपर्यंत इतरांना संसर्गित करू शकतो!

‘कोरोना’चा रुग्ण कधीपर्यंत इतरांना संसर्गित करू शकतो! सध्या अनेक रुग्ण ७ दिवसांनी सौम्य लक्षणे असल्यास घरी पाठवले जात असले आणि घरी अलगीकरणात ( आयसोलेशन ) राहायला सांगितले जात असले तरी नेमके कधी पर्यंत अलगीकरणात राहायचे हे मात्र अनेकांना नीट माहित नाही. हे किती दिवस कोरोणाचा बरा झालेला रुग्ण इतरांना संसर्ग करू शकतो यावर ठरेल. याचे उत्तर प्रत्येक देशा गणिक आणि व्यक्ती गणिक बदलू शकते. पण याचे शास्त्रीय उत्तर आहे जो पर्यंत व्यक्ती ची लक्षणे पूर्ण जात नाहीत आणि जो पर्यंत टेस्ट कोरोना निगेटिव्ह येत नाही तो पर्यंत कोरोनाचा रुग्ण इतरांना संसर्गित करू शकतो.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

    ‘कोरोना’चा रुग्ण कधीपर्यंत इतरांना संसर्गित करू शकतो! सिंगापूर मधील एका अभ्यासात असे दिसून आले की बाधित झाल्यावर व पॉझीटीव असला तरी तो ११ दिवसच इतरांना संसर्गित करतो. पण या अभ्यासाच्या निष्कर्षावर अवलंबून राहता येत नाही. कारण चीन मध्ये एका अभ्यासात रुग्ण बरा झाला व निगेटिव्ह असला  तरी ३० दिवसांपर्यंत इतरांना संसर्गित करू शकतो असे दिसून आले. आपल्या देशा साठी याच्या मधला आकडा सध्या संशोधन होई पर्यंत ग्राह्य धरला जाऊ शकतो. म्हणून रुग्णालयातून  ७ दिवस झाल्यावर टेस्ट करणार नसाल तर घरी १४ दिवस असे एकूण २१ दिवस आयसोलेशन मध्ये राहिल्यास चांगले. यात चौदाव्या दिवशी जर टेस्ट केली व ती निगेटिव्ह असेल व कुठली ही लक्षणे नसतील तर १४ दिवसा नंतर आयसोलेशन संपवण्यास हरकत नाही. पण चौदाव्या दिवशी टेस्ट निगेटिव्ह असून लक्षणे गेली नसतील तर मात्र आयसोलेशन लक्षणे संपे पर्यंत चालू ठेवावे.  हे आयसोलेशन स्वतः साठी महत्वाचे आहेच पण आपल्या कुटुंबाला व संपर्कात येणाऱ्या इतरांना संसर्ग होऊ नये म्हणून ही महत्वाचे आहे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

एकदा कोरोना झाल्यावर परत संपर्क आल्यास कोरोना होऊ शकतो का?

एकदा कोरोना झाल्यावर परत संपर्क आल्यास कोरोना होऊ शकतो का?

एकदा कोरोना झाल्यावर परत संपर्क आल्यास कोरोना होऊ शकतो का? परदेशात काही कोरना रुग्णांना परत संपर्क आल्यावर कोरोनाचा संसर्ग झाला. पण हे प्रमाण खूप कमी होते. एकदा कोरोना झाल्यावर परत संपर्क आल्यास काय? याचे उत्तर संशोधक प्रयोग करून शोधत आहेत.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

बॉस्टन येथे ९ माकडांवर केलेल्या एका प्रयोगात सहभागी झालेल्या माकडांचा बरे झल्यावर ३५ दिवसांनी परत कोरोना विषाणूशी संपर्क आला. पण या नंतर या आधी एकदा संसर्ग झालेल्या या माकडांना दुसऱ्यांदा संपर्क आल्यावर काहींना अत्यंत सौम्य व काहींना कुठलीही लक्षणे दिसली नाहीत. त्यांच्या शरीरातील प्रतिकारशक्ती दर्शवणारे घटक म्हणजेच अँटीबॉडिज या मानव बरे झाल्यावर निर्माण होतात तेवढ्याच पातळीच्या होत्या. यावरून परत कोरोना झाल्यास शरीरात आधी इतकाच प्रतिकारशक्तीचा प्रतिसाद मिळू शकतो असे दिसून येते. पण या अभ्यासाच्या मर्यादा या आहेत, की हे प्राण्यांवरील संशोधन आहे. एकदा कोरोना झाल्यावर परत संपर्क आल्यास कोरोना होऊ शकतो का? तसेच ही शरीरातील प्रतिकारशक्ती किती काळ टिकून राहते हे समजण्यासाठी अजून वाट पाहावी लागेल. तसेच मानवामध्ये काय होते हे सांगण्यास याचा आधार घेतला जाऊ शकतो पण मानवात काय घडते हे साथ पुढे सरकेल तसे स्पष्ट होईल. तसेच दुसऱ्यांदा संसर्ग झाल्यास तो तीव्र नसेल असे मानले तरी एकदा कोरोना झालेल्या रुग्णाला सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, हात धुणे हे सर्व प्रतिबंधाचे नियम पाळायचेच आहेत. पण मात्र गोवर, कांजण्या या आजारांसारखे एकदा संसर्ग झाला की तो संसार्गच तुम्हाला आयुष्यभर कायमची प्रतिकारशक्ती बहाल करेल हे सांगता येणार नाही.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

कोरोना तपासणीसाठी नवे निकष

कोरोना तपासणीसाठी नवे निकष

कोरोना तपासणीसाठी नवे निकष नुकतेच आयसीएमआर या कोरोनाविषयी तपासणी व उपचाराचे  वैद्यकीय धोरणात्मक निर्णय घेणाऱ्या संस्थेने कोणाची कोरोना तपासणी करायला हवी याचे नवे निकष जाहीर केले आहेत. ते पुढील प्रमाणे आहेत. पुढील व्यक्तींची आता कोरोना तपासणी करावी असे आयसीएमआरचे निर्देश आहेत –

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

पुढील निर्देशात श्वसनमार्ग संसर्ग नुकतीच आलेली लक्षणे याचा अर्थ १००.४ डिग्री फॅरनहाईट पेक्षा जास्त ताप आणि खोकला असा आहे

  • गेल्या १४ दिवसात अंतरराष्ट्रीय प्रवास झाला असून अशा व्यक्तीला श्वसनमार्ग संसर्ग नुकतीच आलेली लक्षणे असल्यास
  • निदान निश्चित झालेल्या केस च्या संपर्कात आलेल्या कुठल्या ही व्यक्ती ला श्वसनमार्ग संसर्ग नुकतीच आलेली लक्षणे असल्यास
  • कंटेनमेंट भागात व कोरोना संदर्भात कार्यरत असलेले सर्व कुठल्या ही व्यक्ती ला श्वसनमार्ग संसर्ग नुकतीच आलेली लक्षणे असल्यास
  • सारी म्हणजे ताप, खोकला , श्वास घेण्यास त्रास
  • कोरोना तपासणीसाठी नवे निकष निदान निश्चित झालेल्या केसच्या थेट संपर्कात आलेली लक्षण विरहीत  आलेली आणि जोखीम वाढवणारे घटक ( ६० पेक्षा जास्त वय, ६० च्या खाली वय व इतर मोठे आजार ) असल्यास त्यांची संपर्क आल्या पासून पाचव्या ते चवदाव्या दिवसा पर्यंत तपासणी करणे
  • हॉटस्पॉट व कन्टेनमेंट झोन मध्ये कुठल्या ही व्यक्ती ला श्वसनमार्ग संसर्ग नुकतीच आलेली लक्षणे असल्यास
  • रुग्णालयात दाखल असलेल्या कुठल्या ही रुग्णाला  श्वसनमार्ग संसर्ग नुकतीच आलेली लक्षणे असल्यास
  • स्थलांतरितांमध्ये कुठल्या ही व्यक्ती ला श्वसनमार्ग संसर्ग नुकतीच आलेली लक्षणे असल्यास
  • कुठलीही प्रोसिजर किंवा शस्त्रक्रिया करत असताना वरील कुठल्या ही निकषांमध्ये रुग्ण बसत असल्यास तपासणी करून प्रोसिजर करावी.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

जेष्ठांसाठी लसीकरण

जेष्ठांसाठी लसीकरण

जेष्ठांसाठी लसीकरण आपल्याला आजवर लहान मुलांसाठी लसीकरण माहित आहे. पण लसीकरण हे ज्येष्ठांसाठी ही असते याबद्दल कोणाला माहिती नसते. त्यातच कोरोना सारख्या साथीमध्ये या लसीकरणाला वेगळे महत्व आहे. पुढील लसी ६० वर्षा पुढील व ६० वर्षा खाली मधुमेह, किडनीचे आजार, कॅन्सरचे रुग्ण व  आधी कॅन्सरची औषधे घेतलेले ६० वर्षा खालील ज्येष्ठ आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन लसी घेऊ शकतात .

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

या लसी पुढील प्रमाणे आहेत

  • दर वर्षी फ्लू म्हणजे सर्दी, खोकल्याची लस
  • न्यूमोकोकल लस – दोन प्रकारच्या, एकदाच – एक डोस
  • टायफॉईड – एक डोस
  • कावीळ बी – आधी घेतला नसल्यास तीन डोस – पहिला, त्यानंतर १ व सहा महिन्यांनी
  • कावीळ ए – २ डोस
  • टीटॅनस व डीपथीरीया- टीडी दर १० वर्षातून एकदा

या लसी घेण्याचे फायदे –

  • जेष्ठांसाठी लसीकरण वया मुळे कमी झालेल्या प्रतिकारशक्ती मुळे हे जंतुसंसर्ग टळतील
  • हे आजार कमी झाल्यामुळे कोरोना मुळे तणावाखाली असलेल्या आरोग्य व्यवस्थे वरचा ताण कमी होईल
  • कोरोना झाला तर न्युमोकोकल लसीमुळे त्यासोबत होणार्या बॅक्टेरियल जंतूसंसर्गाची शक्यता कमी होईल
  • कुठल्या ही आजारा नंतर प्रतिकारशक्ती कमी होते व आजार नंतर काही दिवस कोरोनाच नव्हे तर इतर सर्व व्हायरल आजारांची शक्यता वाढते. लसींमुळे आजार कमी झाल्या मुळे कोरोनच नव्हे तर इतर व्हायरल आजारांची जोखीम वाढवणारे घटक कमी होतील
  • आजारी रुग्णाला तपासताना व कोरोनाचे निदान करताना लस घेतली असल्याने ‘हे आजार नाही’ हा निष्कर्ष काढणे सोपे जाईल.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

कोरोना रोखण्यासाठी मौखिक आरोग्य

कोरोना रोखण्यासाठी मौखिक आरोग्य

कोरोना रोखण्यासाठी मौखिक आरोग्य कोरोनाचा संसर्ग होण्यासाठी आपले नाक व तोंड हा मुख्य मार्ग आहे. जर आपले मौखिक आरोग्य चांगले असेल तर आपल्याला कोरोनाचा धोका कमी संभवू शकतो. त्यामुळे कोरोन साथीच्या काळात मौखिक आरोग्य चांगले ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी पुढील काही महत्वाच्या गोष्टी

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

  1. कोरोना रोखण्यासाठी मौखिक आरोग्य घरातील सर्व व्यक्तींचे टूथब्रशेस एकाच ठिकाणी ठेवले जातात परंतु कोरोनाच्या वातावरणात ब्रश प्रत्येकाचे वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात यावे. रोज टूथब्रश बॉक्स किंवा प्लास्टिक बॅग ठेवावा लहान मुलांच्या ब्रश ची विशेष काळजी घेण्यात यावी.
  2. सर्व सदस्यांसाठी एकच टूथपेस्ट वापरली जाते, त्याऐवजी शक्य झाल्यास वेगवेगळ्या स्मॉल साइज टूथपेस्ट वापराव्यात.
  3. दात कोरण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या टूथ पिक्स पेपर मध्ये गुंडाळून कचऱ्याच्या डब्यात टाकाव्यात,  बऱ्याचदा उघड्यावर टाकण्यात येतात.
  4. घरातील प्रत्येकासाठी डेंटल फ्लॉसच्या  वेगळ्या बॉक्सेस चा वापर करण्यात यावा व पेपरमध्ये गुंडाळून कचऱ्याच्या डब्यात टाकावे.
  5. घरातील एखाद्या व्यक्तीला सर्दी-खोकला झाला असल्यास त्यांनी वेगळ्या  बेसिनचा वापर करावा. 
  6. जीभ स्वच्छ करण्याचे टंग क्लीनर , इंटर डेंटल ब्रश  वापरल्यावर गरम पाण्यात बुडवून ठेवावे व नंतर  बंद कंटेनरमध्ये  ठेवावे
  7. कोरोना रोखण्यासाठी मौखिक आरोग्य दंततज्ञ डॉ. अनघा राजवाडे यांच्या वृद्धांनी काढता येणारी कवळी  रात्री झोपताना कवळी बॉक्समध्ये पाण्यात काढून ठेवताना रोज dentures cleaning tablet वापरावी ( इतर वेळी आठवड्यातून एकदा वापरली जाते ) कवळी स्वच्छ करण्यासाठीचा ब्रश  पण रोज वेगळ्या डब्यात ठेवावा. लहान मुलांनी काढलेल्या कवळीला हात लावू नये  याची काळजी घ्यावी.घरातील सर्वजण वापरत असलेल्या कॉमन बेसिन जवळ कवळी  ठेवू नये. स्वतंत्र कप्पा करावा.
  8. दंत तज्ञांकडे उगीचच जाऊ नये. जर तातडीचे उपचार गरजेचे असतील तरच जावे. फोन वर सल्ला घेऊन पुढे ढकलण्या सारखी प्रोसीजर असेल तर पुढे ढकलावी.
  9. रूट कॅनाल उपचार किव्हा इम्प्लांट टाकण्याची प्रोसिजर सुरु असेल  अश्या रुग्णांनी विशेष स्वच्छता ठेवावी, किडलेल्या दाता मध्ये अन्न अडकून राहू नये म्हणून प्रत्येक जेवणानंतर ब्रश करणे गरजेचे आहे
  10. सकाळी उठल्यावर व रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करणे अनिवार्य आहे.
  11. सुजलेल्या हिरड्या व तापमानाची संवेदना वाढली असेल तर घरा बाहेर पडून मेडिकल वरचे  महागडे mouthwash, mouth rinse  वापरण्यापेक्षा मीठ + हळद यांचे कोमट मिश्रण वापरून खळखळून गुळण्या करणे आवश्यक आहे. कोरोना  संसर्ग रोखण्यासाठी साध्या पाण्याने  दिवसातून एकदाच नव्हे तर प्रत्येक जेवणानंतर चूळ व गुळण्या करणे आवश्यक आहे.
  12.  लहान मुलांना रात्रीच्या वेळी वापरायची काढता येतील अशी आपलायन्स  दिली जातात त्यांची विषय स्वच्छतेच्या दृष्टीने काळजी घ्यायला हवी.

    सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

ग्रीन, ऑरेंज झोनमध्ये असणाऱ्यांनो, सतर्क रहा!

ग्रीन, ऑरेंज झोनमध्ये असणाऱ्यांनो, सतर्क रहा!

ग्रीन, ऑरेंज झोनमध्ये असणाऱ्यांनो, सतर्क रहा! सध्या राज्यातील काही भाग हा ऑरेंज व ग्रीन झोन आला असला तरी या भागासाठी आता कोरोनाचा धोका १०० % टळला असे अनेकांना वाटते आहे. या विषयी आपला भाग अमुक अमुक झोन मध्ये आल्या बद्दल शुभेच्छा, अभिनंदनाच्या  इमेजेस ही समाज माध्यमांवर काही जणांनी प्रसारित केल्या. पण ऑरेंज म्हणजे गेल्या १४ दिवसात १५ केसेस पेक्षा कमी केसेस अढळल्या नाहीत आणी ग्रीन झोन म्हणजे गेल्या २८ दिवसात एक ही रुग्ण अढळला नाही एवढाच आहे. रुग्ण संख्या कमी असल्याने स्थानिक उद्योगांना चालना मिळावी म्हणून काही गोष्टींना परवानगी दिली आहे. पण याचा अर्थ इतर भागातून आत्यावश्यक वस्तूंच्या वाहतुकीतून आपला कोरोना बाधिताशी संपर्क येणारच नाही म्हणून साजरीकरण करू नये व नियम धुडकावून लावू नये. या दोन्ही झोन मधील लोकांनी पुढील गोष्टी पाळाव्या –

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

  • ग्रीन, ऑरेंज झोनमध्ये असणाऱ्यांनो, सतर्क रहा! ज्या गोष्टी तालुक्याच्या ठिकाणी मिळतात, नित्य सेवा, खरेदी तिथेच कराव्या, गरज नसताना जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊ नये.
  • परवानगी असली तरी अनावश्यक प्रवास टाळावा.
  • कुठल्याही झोन मध्ये दुचाकीवर एकाच व्यक्तीला परवानगी आहे या सूक्ष्म गोष्टीचा विसर पडू देऊ नये.
  • परवानगी असली तरी गरज नसलेल्या गोष्टी, कपडे, चैनीच्या गोष्टी उगीचच ई कॉमर्सच्या माध्यमातून मागवू नये.
  • कुरिअर व पोस्ट सेवा ही सर्व झोन मध्ये सुरु झाल्या असल्या तरी उगीचच या सेवेचा लाभ घेऊ नये. अत्यावश्यक गोष्टींसाठीच याचा वापर करावा. कागदपत्रे उगीचच पोस्टाने पाठवू नये. त्यासाठी इ- मेलचाच वापर करावा.
  •  ग्रीन, ऑरेंज झोनमध्ये असणाऱ्यांनो, सतर्क रहा! सोशल डीस्टन्सिंगच्या नियमाची सर्वात जास्त तुडवणूक मद्य विक्री करणाऱ्या दुकानांवर होण्याची शक्यता आहे व अचानक या दुकानां भोवती मोठी गर्दी उसळते आहे. या साठी मद्य विक्रेत्यांनी स्वतःला शिस्त लावून सोशल डीस्टन्सिंग व दुकानांभोवती लोक एकमेकांपासून लांब उभे राहतील याची काळजी घ्यावी .
  •  कुठल्या ही झोन मध्ये असले तरी ताप, सर्दी, खोकल्याच्या व्यक्तीने घरा बाहेर निघायचे नाही आहे व स्वतःला कटाक्षाने इतरांपासून १४ दिवस लांब ठेव्याचे आहे.
  • डॉ. अमोल अन्नदाते

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता