एकदा कोरोनातून बरे झाले, तरी पुढे काळजी घ्यावीच का ?

एकदा कोरोनातून बरे झाले, तरी पुढे काळजी घ्यावीच का

एकदा  कोरोनातून बरे झाले, तरी पुढे काळजी घ्यावीच का ?सध्या कोरोना संसर्गातून अनेक जण बरे होत आहेत. यापैकी अनेकांचा गैरसमज आहे की मला कोरोना होऊन गेला आहे , आता मला काही काळजी घेण्याचे कारण नाही. पण तुम्ही कोरोना मधून बरे झालेले असाल तरी तुम्हाला सोशल डीस्टन्सिंग, मास्क, हात धुणे, सॅनीटायजरचा वापर तसेच कोरोना होण्या अगोदर घेत होतो तशीच सर्व काळजी घेणे चालू ठेवावे लागणार आहे . याची कारण पुढील प्रमाणे आहेत –

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

  • जरी तुम्ही कोरोना संसर्गातून बरे झाले तरी तुम्हाला परत कोरोणाचा जो संसर्ग होऊ शकतो, त्यातून तुम्हाला फारसा धोका नाही कारण काही प्रमाणात तुमच्या शरीरात आधीच्या संसर्गामुळे प्रतिकारशक्ती निर्माण झाली आहे. पण असे असले तरी तुम्ही त्या संसर्गाचे वाहक ठरून इतरांना आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुमच्या कुटुंबाला संसर्गित करू शकता.
  • जरी तुमच्या शरीरात प्रतिकारशक्ती निर्माण झाली असली  तरी तुम्हाला परत काहीही लक्षणे येणारच नाहीत असे नाही. तुम्हाला गंभीर स्वरूपाचा जीवघेणा कोरोना परत होणार नसला तरी तो सौम्य किंवा मध्यम स्वरूपाचा नक्कीच आसू शकतो. म्हणजे आठवडा भर ताप, सर्दी, खोकला, थकवा असे होऊ शकते. जरी जीवाला धोका नसला तरी याने कामाचे तास बुडतील, परत १४ दिवस अलगीकरण असा अनावश्यक त्रास होईल. जर काळजी घेणे सुरु ठेवले तर हा त्रास टळू शकेल.
  • एकदा  कोरोनातून बरे झाले, तरी पुढे काळजी घ्यावीच का ? जरी एकदा कोरोना होऊन गेला तरी तो नेमक्या कुठल्या स्ट्रेन मुळे झाला हे माहित नसते. सध्या कोविड १९ च्या एक्स आणि वाय अशा दोन स्ट्रेन देशात आहेत. या राज्यांतर्गत वेगळ्या आहेत कि अगदी राज्यातच जिल्ह्य अंतर्गत आहेत कि अगदी एकाच तालुक्यात ही दोन स्ट्रेनचा संसर्ग सुरु आहे हे अजून नीटसे माहित नाही. पण देश व राज्य अंतर्गत प्रवास सुरु झाल्याने त्या इकडून तिकडे वाहून गेल्याच असणार. जर आधी एका स्ट्रेन चा कोरोना होऊन गेला तर दुसऱ्या स्ट्रेनचा नंतर होऊ शकतो . या नवीन स्ट्रेनचा संसर्ग फ्रेश / नवा  असल्याने त्याचा नक्कीच जीवाला धोका असू शकतो. म्हणजे एका स्ट्रेनने झालेला संसर्ग हा त्या स्ट्रेन साठीच पुढच्या वेळी प्रतिकारशक्ती देईल, दुसऱ्या स्ट्रेन साठी नाही.
  •       या सर्व कारणांमुळे कोरोना संसर्गातून बरे झालेल्यांनी काळजी घेणे सुरु ठेवावे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.