एन ९५, व्हॉल्वचा मास्कबाबत गोंधळ नको

एन ९५, व्हॉल्वचा मास्कबाबत गोंधळ नको

 एन ९५, व्हॉल्वचा मास्कबाबत गोंधळ नको नुकतच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने व्हॉल्व असलेला एन ९५ मास्क व इतर व्हॉल्व असलेल्या मास्क वर बंदी घातली व वापरू नये असे निर्देश दिले आहेत. पण या बद्दल वार्तांकन करताना व याचा अर्थ लावताना अनेकांनी एन ९५ मास्क वर बंदी किंवा एन ९५ मास्क निरुपयोगी असा लावला. पण बंदी व वापर बंद करायला हवा तो व्हॉल्व असलेल्या कुठल्या ही मास्कचा एन ९५ मास्कचा नव्हे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

एन ९५ व मास्कचे प्रकार व कुठला योग्य –

  • एन ९५, व्हॉल्वचा मास्कबाबत गोंधळ नको एन ९५ चा अर्थ आहे ९५ % श्वास कण फिल्टर करणारा मास्क. यात व्हॉल्व असलेला आणि नसलेला असे दोन मुख्य प्रकार असतात. पण व्हॉल्व असलेल्या मास्क मधून श्वास कण बाहेर पडू शकतात म्हणून व्हॉल्व नसलेला मास्क वापरायला हवा. या व्यक्तिरिक्त आकार आणि कुठल्या देशातील मास्क आहे यावरून ही एन ९५ मास्कचे काही प्रकार समजून घ्यायला हवे.
  • भारतीय बनावटीचा – मास्क वर तुम्ही नीट निरीक्षण केल्यास त्यावर छोट्या अक्षरात NIOSH असे लिहिलेले असते. अर्थात हा नॅशनल इंन्स्टीट्युट ऑफ ऑक्यूपेशनल हेल्थ अँड सेफ्टी ने प्रमाणित केलाला भारतीय बनावतीचा मास्क. व्हॉल्व नसलेला व NIOSH N95 असा लिहिलेला मास्क वापरण्यास योग्य N95 मास्क समजावा.
  • चीनी बनावटीचा – ज्या मास्क वर K N95 लिहिलेला आहे तो चीनी बनावतीचा आहे व तो चीनी व्यक्तींना समोर ठेवून बनवला गेला असल्याने भारतीयांनी वापरण्यास योग्य नाही. तसेच त्याचा दर्जा ही भारतीय मास्क एवढा चांगला नाही.
  • कोरियन मास्क – कोरिया ने कॉपरचा मास्क बनवला आहे जो धुता येण्या सारखा व धुवून रोज वापरता येईल असा एकमेव N95 मास्क आहे. पण हा मास्क फार महाग आहे ( किंमत – ५०० रुपये प्रती मास्क ) . तसेच हा मास्क अजून मुबलक प्रमाणत उपलब्ध नाही. या मास्कचा एकच दोष आहे कि त्याला नाकावर फीट होतो तिथे क्लिप दिली नसल्याने तो नाकावरून खाली सटकतो. ही सुधारणा केल्यास व परवडत असल्यास क्लिप असलेला कोरियन मास्क बाजारात आल्यावर वापरण्यास हरकत नाही.

आकारावरून एन ९५ मास्कचे प्रकार –

  • पहिल्या प्रकारात कानात अडकवण्याचा एन ९५ मास्क आहे पण हा सतत कानावर अडकवल्याने कानाच्या मागे अडकवण्याचे इलॅस्टिक काचते.
    दुसरा आकार आह ज्याला डक ( बदका सारखा ) मास्क असे नाव पडले आहे . हा मास्क लावताना काना मागे लावावा लागत नाही व इलॅस्टिक मागे डोक्याला अडकते म्हणून ते काचत नाही व जास्त वेळ ठेवण्यास त्रास होत नाही. म्हणून हा एन ९५ मास्क वापरण्यास जास्त योग्य आहे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.

लसीचे काय ?

लसीचे काय ? ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या लसीचे सकारात्मक अहवाल हाती आल्याने लसी विषयी सर्वांच्याच आशा उंचावल्या आहेत पण या यशाचे संशोधनात्मक दृष्टीने विश्लेषण करायला हवे.
आदर्श लस म्हणजे काय ?
ज्या लसीचे कमीत कमी डोस घ्यावे लागतात, शेवटच्या डोस सहा महिने तरी प्रतिकारशक्ती टिकून राहते आणि कमीत कमी दुष्परिणाम होतात.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

लस चाचणीच्या चार फेज कुठल्या असतात ?
फेज १ – २० – ८० मानवांवर चाचण्या
फेज २ – काही शे म्हणजे १००० पर्यंत लोकांपर्यंत मानवांवर चाचणी
फेज ३ –  काही हजार लोकांवर चाचण्या
फेज ४ – लस बाजारात आल्यावर येणारे रिपोर्ट

ऑक्सफर्ड लसीचे यश किती ?
सध्या लँन्सेट मध्ये प्रकाशित झालेला ऑक्सफर्ड लसीचा  अहवाल हा फेज १ व २ चे आहेत व यात दोन डोस नंतर ५६ दिवसांना प्रतिकारशक्ती चांगली निर्माण होते असे दिसून आले आहे. यात प्रतिपिंड – अँटीबॉडी सहित टी सेल ही दीर्घ काळ टिकणारी प्रतिकारशक्ती आढळून येणे सकारत्मक आहे. पण ही प्रतिकारशक्ती किती काळ टिकून राहते याचे अंतिम निष्कर्ष हाती येण्यास किमान ६ महिने तरी वाट पहावी लागणार आहे

भारतासाठी या लसीचे महत्व काय ?
लसीचे काय ? कुठल्या ही परदेशी लसीच्या यशाने हुरळून जाण्या आधी  भारतीयांनी जरा धीराने घ्यावे. कारण भारतातील कोरोनाची स्ट्रेन आणि परदेशांत लसी साठीच्या कोरोनाच्या स्ट्रेन वेगळ्या असू शकतात. हीच गोष्ट फ्लू लसीच्या बाबतीत ही घडते. तसेच आपली भारतीयांची प्रतिकारशक्ती परदेशी लसीच्या चाचण्यात परदेशी व्यक्तींवर केलेल्या प्रयोगात जसा प्रतिसाद मिळतो तसाच प्रतिसाद मिळेल हे निश्चितपणे सांगता येत नाही. म्हणून कुठल्या ही परदेशी लसीचे भारतीयांवर प्रयोग यशस्वी झाल्या शिवाय या परदेशी लसीवर पूर्ण विश्वास ठेवता येणार नाही

भारतीय लसीचे काय ?
भारतात सध्या ७ कंपन्या लसीवर काम करत आहेत. ऑगस्टच्या पहिल्या महिन्यात फेज १ मानवी चाचण्या सुरु होणार आहेत.

लस आली तरी पुढे काय ?
लस आली व सर्वांनी ती घेतली तरी काही काळ तरी सोशल डीस्टन्सिंग , मास्क व हात धुण्याचे महत्व अबाधित राहणार आहे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.

प्लाझ्मा दान कोण करू शकत ?

प्लाझ्मा दान कोण करू शकत ?

प्लाझ्मा थेरपी म्हणजे नेमके काय ? कोरोना मधून बरे झालेल्या रुग्णांच्या प्लाझ्मा  या रक्तातील भागात कोरोना विरोधात प्रतिकारशक्ती दर्शवणारे अँटीबॉडीज – प्रतिपिंडे असतात. ही प्रतिपिंडे म्हणजे कोरोना विरोधात लढण्यास शरीराने रक्तात तयार केलेले सैनिकच असतात. कोरोना बाधित रुग्णाला कोरोना तून बरे झालेल्या व्यक्तीच्या शरीरातून प्लाझ्मा  मधून हे आयते सैनिक देणे म्हणजे प्लाझ्मा  थेरपी.

सध्या प्लाझ्मा  देण्याचे नियम काय ?

  • एखाद्याने रुग्णाच्या प्रेमा पोटी इच्छा व्यक्त केल्यास ( कंपॅशनेट बेसिस )
  • संशोधन प्रकल्पाचा भाग म्हणून
  • शासकीय रुग्णालयात

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

हा प्लाझ्मा  वेगळा कसा केला जातो ?
या प्रक्रियेला अफेरेसीस असे म्हणतात. या प्रक्रियेत अफेरेसीस करण्याचे मशीन उपलब्ध असलेल्या रक्त पेढीत रक्तातून – लाल पेशी , प्लेटलेट व प्लाझ्मा  वेगळा केला जातो.

प्लाझ्मा  दान कोण करू शकते –

  • प्लाझ्मा दान कोण करू शकत ? रुग्ण व दात्याचे एबीओ व आर एच रक्त गट सारखाच असावा.
  • रुग्ण पूर्ण बरा होऊन पहिले सारखे दिसले तेव्हा असून २८ दिवस झालेले असावे.
  • रक्तातील आय जी जी म्हणजे दीर्घकाळ टिकून राहणारी प्रतिकारशक्ती दर्शवणारे  अँटीबॉडीज – प्रतिपिंडांचे प्रमाण १: १६० असायला हवे.
  • कोरोना झाला होता याचे निदान आर टी पीसीआर या तपासणी ने निचित झालेले असावे.
  • दात्याच्या  एचआयव्ही, कावीळ बी, कावीळ सी व वीडीआर एल म्हणजेच सिफिलीस या टेस्ट निगेटिव्ह असाव्या.
  • शक्यतो पुरुष व अजून गरोदर न झालेल्या व सध्या गरोदर नसलेल्या स्त्रियांनीच प्लाझ्मा  दान करावे. कारण नंतर शरीरात काही प्रतिपिंडे निर्माण होऊ शकतात जी त्रास दायक ठरू शकतात.
  • दात्याला दान करताना ताप नसावा.
  • श्वास घेण्यास त्रास नसावा व ऑक्सिजनची पातळी नॉर्मल असावी.
  • आर टी पीसीआर निगेटिव्ह असल्याचे बघून रुग्ण पूर्ण बरा झाला आहे याची खातरजमाकरून घ्यावी.

एकदा प्लाझ्मा  दान केल्यावर परत किती दिवसांनी दुसर्यांदा करता येते –
एका वेळेला २०० ते ६०० एमएल प्लाझ्मा  दान करता येते. एकदा दान केल्यावर २ महिन्यांनी दुसऱ्यांदा दान करता येते.

कोरोनातून बरे झालेले कुठे प्लाझ्मा  दान करू शकतात –
प्लाझ्मा दान कोण करू शकत ? दिल्लीच्या धर्तीवर अजून खास प्लाझ्मा  डोनेशन बँक महाराष्ट्रात सुरु झालेली नाही. तसेच याची निश्चित माहिती नाही. पण अशा इच्छुकांनी दान करण्यासाठी जिल्हावार जागा ठरवून त्याची यादी शासनाने जाहीर करावी. सध्या १७ वैद्यकीय महाविद्यालयात याचा प्रयोग सुरु आहे. पण कुठल्या भागात नेमके कुठे जाऊन दान करायचे याची माहिती अजून उपलब्ध नाही.

प्लाझ्मा  कोणाला गरजेचे आहे ?
प्लाझ्मा  लाक्षाणविरहित , सौम्य व मध्यम स्वरूपाच्या कोरोना रुग्णाला गरजेचा नाही. फक्त गंभीर रुग्णालाच प्लाझ्मा  गरजेचा आहे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.

पुढची पातळी गाठण्याआधी

पुढची पातळी गाठण्याआधी

पुढची पातळी गाठण्याआधी देशातील सर्वाधिक मृत्यू व रुग्ण (३० टक्के) हे महाराष्ट्रात असल्याने; तसेच मृत्यूदर ४.५ टक्क्यांवर गेल्याने, आता मृत्यूचा आकडा कमी करण्यासाठी वेगळा, आक्रमक कृती आराखडा आखणे गरजेचे आहे. सरकार कितीही नाकारत असले, तरी राज्यात काही ठिकाणी समूह संसर्ग सुरू झाला आहे; त्यामुळे आधीचा संसर्ग रोखण्याबरोबर मृत्यूचा आकडा कमी करण्यास प्राधान्य द्यावे लागणार आहे. मृत्यू रोखण्यासाठी रुग्णांचे निरीक्षण, निगराणी, उपचारांत रणनीती आणि किमान समान कार्यक्रमाचा अभाव दिसतो आहे.

आजवर झालेल्या मृत्यूंपैकी ७० टक्के रुग्णांमध्ये इतर कुठला तरी आजार होता. त्याने उपचारांत गुंतागुंत झाली. या दुसऱ्या आजाराला ‘को-मॉर्बिडिटी’ असे म्हणतात. सर्वप्रथम करोनबरोबर इतर आजार असलेल्यांचे श्रेणीबद्ध तक्ते बनवून, जोखमीची कमी, मध्यम व तीव्र पातळी ठरवून, वर्गवारी करावी लागेल. सध्या सगळी आरोग्ययंत्रणा करोनाच्या कामात व्यग्र असल्यास आशा सेविका व परावैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या मदतीने, किमान हॉटस्पॉटमध्ये तरी करोनाची जोखीम वाढविणाऱ्या प्रमुख आजारांची तालुकानिहाय उपचार केंद्र सुरू करावी लागतील. काही प्रमाणात उच्च रक्तदाब, मधुमेह या आजारांसाठी हे ऑनलाइन पद्धतीनेही शक्य आहे. जर या दीर्घकालीन आजारांवर नियंत्रण मिळवले, तर करोनाचा अर्धा लढा इथेच जिंकता येईल; कारण आरोग्य यंत्रणेची बरीच शक्ती या अनियंत्रित आजारांच्या रुग्णांना वाचवण्यात खर्च होते. ती काही अंशी वाचली, तर इतर सर्व रुग्णांच्या निरीक्षणावर लक्ष केंद्रित करता येईल.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

पुढची पातळी गाठण्याआधी रुग्णांच्या सर्वेक्षणावर लक्ष ठेवता न आल्याने, बरेच रुग्ण रुग्णालयात उशिरा दाखल होत आहेत व यातील बऱ्याच जणांना ‘सायलेंट हायपॉक्सिया’ किंवा ‘हॅपी हायपॉक्सिया’ असल्याचे समजते आहे. म्हणजे, या रुग्णांना इतर काही लक्षणे नसतात; मात्र त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी घातक प्रमाणात घटलेली असते. हे टाळण्यासाठी घरीच विलगीकरण, दाखल असलेले सौम्य, मध्यम रुग्ण व होम क्वारंटाइनमध्ये असलेल्या करोना रुग्णाच्या थेट संपर्कात आलेल्या व्यक्ती या सर्वांची दिवसातून दोनदा सहा मिनिटांची चालण्याची चाचणी करणे अनिवार्य हवे. त्याचे यंत्रणेच्या माध्यमातून सर्वेक्षण झाले, तर बरेच जीव वाचू शकतात. यासाठी कुठल्याही डॉक्टर किंवा आरोग्य यंत्रणेचीही गरज नाही. ऑक्सिजन पातळी खालावण्याच्या आधी, चालण्याच्या चाचणीत हे रुग्ण लक्षात आल्यास त्यांना स्टिरॉइड व इतर औषधे देऊन, करोनाचा फुफ्फुसावरील परिणाम रोखण्यात यश येते आहे; परंतु बहुतेक वेळा रुग्ण ही वेळ निघून गेल्यावर व आजार वाढलेला असतो तेव्हा येतात. मग रुग्णाला वाचवणे अवघड होते.

करोनाचे मृत्यू कमी करण्यासाठी दाखल व डिस्चार्ज देण्याच्या निर्देशांचा आढावा घेऊन, त्यात बदल करणे आवश्यक आहे. राज्यात एक मोठा संभ्रम निर्माण झाला आहे, केंद्रीय आरोग्य खाते म्हणते, की रुग्णाला दाखल करण्यासाठी व घरी पाठवण्यासाठी लक्षणे सुरू झाली तो दिवस ग्राह्य धरावा. राज्यात मात्र बऱ्याच ठिकाणी चाचणी पॉझिटिव्ह आली तो दिवस ग्राह्य धरतात. चाचणीचा स्वॅब देण्यास व अहवाल येण्यात दोन ते तीन दिवस जातात आणि इथून पुढे दिवस मोजून निर्देश पाळले जातात. करोना रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण लक्षणे सुरू झाल्यापासून आठ ते १४ दिवस आहे; पण या दाखल करण्याच्या निकषावरून गोंधळ होत असल्याने, नेमके हे लक्ष ठेवण्याचे महत्त्वाचे दिवसच रुग्ण रुग्णालयात नसतात. यासाठी राज्याची दोन भागांत विभागणी करता येईल. रुग्ण जास्त झाल्याने ताण आलेली आरोग्य यंत्रणा म्हणजे प्रमुख महानगरे व दुसरा भाग अजून रुग्णसंख्या आटोक्यात असणारा उर्वरित राज्याचा भाग. रुग्णसंख्या जास्त आहे, तिथे सुरुवातीला दिवसातून दोनदा घरी ऑनलाइन सर्वेक्षण (जे सध्या होत नाही) व गरज भासल्यास दाखल करणे आणि चौदाव्या दिवशी सुटी. रुग्ण कमी, तिथे मात्र आरोग्य यंत्रणेवर ताण नसल्याने, चाचणी पॉझिटिव्ह आल्यापासून दाखल व बरे असल्यास लक्षणांपासून दहाव्या दिवशी सुटी. या सुधारणा केल्याने सध्या अनेक ठिकाणी चांगले रुग्ण दाखल व गंभीर रुग्ण आयसीयूच्या खाटा अनुपलब्ध असल्याने जागेच्या शोधात, हे चित्र बदलेल. रुग्णालयात जागा मिळण्यासाठी, रुग्णांना रुग्णवाहिकेतून फिरावे लागणार नाही.

          पुढची पातळी गाठण्याआधीसंसर्ग असूनही चाचणी निगेटिव्ह आल्याने दाखल न करणे / उशिरा दाखल करणे, यामुळेही मृत्यूदर वाढतो. एकाच घरात दोन-तीन जणांच्या मृत्यूच्या घटनाही घडतात. चाचणी निगेटिव्ह असली व डॉक्टरांना तरीही शंका वाटत असेल, तर संसर्गित व्यक्तीचा थेट संपर्क आलेल्यास करोना असल्याचे गृहित धरून, तातडीने उपचार करायला हवेत. उपचारांबाबत सरकारचे निर्देश योग्य असले, तरी ते सर्वत्र पाळले जात नाहीत. त्यातही, काहींनी स्थानिक पातळीवर सोयीने त्यात बदलही केल्याचे दिसते. यामुळे, एका चमूद्वारे सर्व रुग्णालयात उपचारांचा प्रोटोकॉल पाळला जात आहे किंवा नाही, याची वेळोवेळी थेट रुग्णालयात भेटी देऊन व केसपेपर तपासून चाचपणी होणे गरजेचे आहे. रेमडेसिव्हिर व टोकलिझूमॅब या औषधांमध्ये जीव वाचवण्याची क्षमता आहे; पण त्यांच्या तीव्र तुटवड्यामुळे प्रचंड काळा बाजार व साठेबाजी सुरू आहे. रेमडेसिव्हिरचा स्टॉक आला, की त्यातील मोठा भाग कॉर्पोरेट रुग्णालयांकडे जातो. शासकीय रुग्णालयातील गरीब रुग्णांच्या नशिबी हे औषध येतच नाही. रेमडेसिव्हिरचे पाच हजार रुपयांचे इंजेक्शन ४५ हजार रुपयांपर्यंत विकले जाते. सरकारने या औषधांचा साठा स्वतःच्या ताब्यात घेऊन, त्यांचे गरजेप्रमाणे केंद्रीय वितरण करावे, म्हणजे अतिदक्षता विभागातील गंभीर रुग्णांना ते मिळून, मृत्यूदर कमी होण्यास मदत होईल.

प्लाझ्मा थेरपीसाठी राज्याने १६ कोटी रुपये खर्चून, ‘प्रोजेक्ट प्लाटिना’ जाहीर केला आहे व हे फक्त ५०० रुग्णांसाठी केले जाणार आहे. बऱ्याच रक्तपेढ्यांमध्ये प्लाझ्मा वेगळा करण्याची सोय आहे. त्यांच्याकडील यंत्रणा वापरून, हा मोठा अनावश्यक खर्च वाचू शकतो व पाचशेऐवजी अनेकांना याचा लाभ दिला जाऊ शकतो. दिल्लीच्या धर्तीवर, मुंबई व प्रमुख बाधित महानगरांमध्ये करोनातून बरे झालेल्यांसाठी कमी खर्चात प्लाझ्मा डोनेशन बँक स्थापन करून, याचा उपचारांत मोठ्या प्रमाणात समावेश करायला हवा. रक्तातील हिमोग्लोबिन कमी असणाऱ्यांना, बऱ्या झालेल्या करोनाबाधित व्यक्तीचे रक्त देऊन, लाल पेशी व प्लाझ्मा दोन्ही एकत्रित देण्याचा विचार व्हायला हवा. याच्याही क्लिनिकल ट्रायल सुरू व्हायला हव्या. वेगळ्या प्लझ्मा थेरपीची मग गरजच उरणार नाही.
करोना बाधितांचे आकडे दिवसेंदिवस वाढत असताना, संसर्गाची या पुढची पातळी गाठण्याआधी मृत्यूदर आटोक्यात आणण्यासाठी, आता आकाश-पाताळ एक करायला हवे आणि यात क्षणाचाही विलंब होऊ नये.

सदरील माहिती आपण  महाराष्ट्र टाईम्स मध्येही वाचू शकता

घोरताना झोपेत श्वास गुदमरणे धोक्याचे

घोरताना झोपेत श्वास गुदमरणे धोक्याचे

घोरताना झोपेत श्वास गुदमरणे धोक्याचे घोरण्यामुळे झोपेत श्वास गुदमरण्याचा त्रास असणाऱ्यांमध्ये कोरोनाचा मृत्यू दर जास्त आहे. याचे साधे कारण म्हणजे कोरोना मध्ये श्वसन यंत्रणेवर परिणाम होऊन ऑक्सिजनची पातळी कमी होते व घोरताना श्वास गुदमरण्याचा त्रास असल्यास ऑक्सिजनची पातळी कमी होण्यात अजून एका कारणाची भर पडते. त्यामुळे कोरोना नसला तरी स्लीप एपनियाचे उपचार करायला हवेच. म्हणजे कोरोनामुळे मृत्युच्या प्रमाणात काही प्रमाणत घट होईल.

प्रत्येक घोरणे म्हणजे स्लीप एपनिया नव्हे
३० ते ४० % भारतीयांना घोरण्याची सवय असते. पण घोरणाऱ्या प्रत्येकाला स्लीप एपनियाचा त्रास नसतो. पण घोरणे हे स्लीप एपनियाचे व्यवच्छेदक लक्षण आहे. म्हणून घोरण्याचा त्रास असणाऱ्या सर्वांनी आपल्याला स्लीप एपनिया आहे की नाही याची खातरजमा करून घ्यावी.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

स्लीप एपनिया ची लक्षणे काय –

  • झोपताना घोरणे
  • रात्री शांत झोप न होणे दिवसा झोप येणे.
  • श्वास गुदमरून झोप मोडणे व जाग येणे.
  • सकाळी तोंड व घसा कोरडा पडलेला असणे.
  • सकाळी उठल्यावर डोके दुखणे.
  • दिवसा कामात लक्ष न लागणे.
  • मूड बदलत राहणे , नैराश्य , चिडचिड
  • घोरताना श्वास अडकत किंवा थांबत असल्याचे इतरांना जाणवणे.

स्लीप एपनिया ची कारणे –
-लठ्ठपणा , जास्त वेळ बैठी काम , व्यायामाचा अभाव , मनोरंजनाची बैठी साधन, हालचाल कमी करणाऱ्या भौतिक सुखसोयी हे याचे मूळ कारण आहे.
– या व्यक्तीं मध्ये लठ्ठपणा सोबतच घशाच्या आतील स्नायू झोपल्यावर शिथिल होतात व त्यामुळे  जीभ , पडजीभ मागे पडते  , श्वसन मार्गाच्या वरच्या स्नायू शिथिल झाल्याने एकमेकांच्या जवळ येऊन श्वसन मार्ग रुंद होतो व श्वास गुदमरतो.
– नाकाचे हाड वाढलेले किंवा मधला पडदा वाकलेला असणे.
– लहान मुलांमध्ये टॉन्सील वाढलेले असणे.

निदान –
घोरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला झोपेत श्वास गुदमरून ऑक्सिजन कमी होते आहे का हे बघण्यासाठी झोपेचा काही उपकरणांच्या सहाय्याने अभ्यास केला जातो. याला स्लीप स्टडी असे म्हणतात.

उपचार –
-जीवनशैली बदल – वजन कमी करणे , व्यायाम करणे.
– मद्यपान , धुम्रपान सोडणे.
– थंड वातावरणात झोपू नये.
– झोपतना पाठीवर न झोपता एका अंगावर झोपणे.
– एक घरी वापरता येण्यासारखे मशीन वापरून श्वसन मार्ग झोपताना मोठा ठेवणे.
– शस्त्रक्रिया करून श्वसन मार्गातील आतील स्नायू कमी करणे.

कोरोना साठी स्लीप एपनियाचे उपचार महत्वाचे –
घोरताना झोपेत श्वास गुदमरणे धोक्याचे स्लीप एपनियाचा व्यक्ती च्या पूर्ण तब्येतीवर फरक पडतो व कोरोनाची लागण झाली तर ऑक्सिजनचे प्रमाण कमी होणारे एक मोठे कारण स्लीप एपनियाच्या उपचाराने कमी होते व मृत्यू दर कमी होतो.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.

कुणीही रॅपीड अँटीजीन टेस्ट वापरणे चुकीचे

कुणीही रॅपीड अँटीजीन टेस्ट वापरणे चुकीचे

कुणीही  रॅपीड अँटीजीन टेस्ट वापरणे चुकीचे काही शहरांत व्यापाऱ्यांना दुकान उघडण्याआधी रॅपीड अँटीजीन टेस्ट सक्तीची केली आहे. या चुकीचे अनुकरण इतर शहरात आणि रहीवाशांकडून होण्याची शक्यता आहे. खाजगी लॅब मध्ये रॅपीड अँटीजीन टेस्टला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे लक्षणे नसलेल्यांनी स्वतः ची रॅपीड अँटीजीन टेस्ट करणे चुकीचे आहे. ही चाचणी सध्या लक्षणे आलेल्यांसाठी राखून ठेवायला हवी या टेस्ट बद्दल पुढील गोष्टी समजून घ्याव्या.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

१.         ही टेस्ट पॉझीटीव्ह आली तर रुग्ण कोरोना बाधित असल्याची दाट शक्यता आहे पण निगेटिव्ह आली तर मात्र आरटी पीसीआर करून निगेटिव्ह असल्याची खात्री करावी लागते.
२.         तुम्ही आज रॅपीड अँटीजीन टेस्ट करून निगेटिव्ह आहात म्हणजे उद्या तुम्ही व इतरांनी प्रतिबंधाच्या मुलभूत उपाय न वापरल्यास बाहीत होऊ शकता.
३.         तुम्ही व्यापारी असाल किंवा कुठल्या ही व्यवसायात असाल तर तुम्ही रोज दुकान उघडण्या आधी रॅपीड अँटीजीन टेस्ट करून बाधित नसल्याची खात्री करू शकत नाही.
४.         लक्षणे नसताना टेस्ट करून लक्षणे असलेल्या व टेस्टची गरज असलेल्यांना टेस्ट पासून वंचित ठेवत आहात.

रॅपीड अँटीजीन टेस्ट कोणी करावी –
–         आरटी पीसीआर ने निश्चित निदान झालेल्या रुग्नाच्या कुटुंबातील सर्व सदस्य ज्यांचा रुग्णाशी थेट संबंध आला आहे.
–         कामाच्या ठिकाणी अशा व्यक्ती ज्यांचा ३० मिनिटांपेक्षा जास्त थेट संबंध आला आहे.
–         ५० वर्षा पुढील व्यक्ती , गरोदर स्त्रिया , इतर दीर्घकालीन आजार असलेल्या  (को मॉर्बिड) व्यक्ती ज्यांना ताप , सर्दी , खोकला ही फ्लू सदृश लक्षणे दिसत आहेत.
–         कंटेनमेंट झोन मधील कुठल्या ही वयाच्या कुठल्या ही व्यक्तीला  ताप , सर्दी , खोकलाही फ्लू सदृश लक्षणे आहेत.

दुकानदार, व्यापारी यांची स्क्रीनिंग करायचीच असेल तर कुठली टेस्ट वापरावी –
–     कुणीही रॅपीड अँटीजीन टेस्ट वापरणे चुकीचे स्क्रीनिंग साठी रॅपीड अँटीबॉडी टेस्ट वापरण्यास हरकत नाही, यात जे आय जी एम पॉझीटीव्ह आले आहेत त्यांना नुकताच संसर्ग झाला आहे असे समजून त्यांनी पुढील १४ दिवस घरी व लक्षणे असल्यास रुग्णालयात / स्थानिक महानगरपालिकेच्या नियमा प्रमाणे दाखल व्हावे. आय जी जी असल्यास त्यांनी मास्क व सोशल डीस्टन्सिंग पाळत काम करावे.

 काही लाक्षणविरहीत पॉझीटीव्ह सापडले मग हे यश नाही का ?
औरंगाबाद प्रयोगात या टेस्ट चा वापर करून काही लाक्षणविरहीत पॉझीटीव्ह सापडले हा फायदा असला तरी सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीकोनातून याचे महत्व तेव्हाच असेल जेव्हा व्यापारी या एका गटाचा नव्हे तर एकाच वेळी सर्व शहराचे स्क्रीनिंग होईल. मर्यादित टेस्ट हाती असताना पूर्ण लोकसंख्येसाठी टेस्टचे रेशनिंग करणे आवश्यक असते.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.

घरात थांबा, उगीच बेड आडवू नका

घरात थांबा, उगीच बेड आडवू नका

घरात थांबा, उगीच बेड आडवू नका सध्या जनतेकडून दोन मोठ्या चुका होत आहेत ज्या टाळल्या पाहिजे

रिपोर्ट येई पर्यंत बाहेर फिरणे व कामावर जाणे
आर टी पीसीआर चा रिपोर्ट येण्यास दोन व काही ठिकाणी चार दिवस लागत आहेत. काही ठिकाणी रॅपीड अँटीजीन टेस्ट सुरु झाली आहे व ती निगेटिव्ह आली तर आर टी पीसीआर टेस्ट केली जाते व तुम्ही निगेटिव्ह असल्याचे निश्चित होण्यास थोडा अवधी लागतो. बर्याच ठिकाणी रुग्णाची तब्येत चांगली असेल तर रीपोर्ट येई पर्यंत रुग्णाला दाखल केले जात नाहीत. अशा वेळी आपण निगेटिव्ह आहोत असे गृहीत धरून काही जन घरा बाहेर पडणे , आपली कामे करत राहणे असे करत आहेत. पण यामुळे इतरांना संसर्ग होण्याची दाट शक्यता आहे. म्हणूनच रिपोर्ट येई पर्यंत घराबाहेर न पडता घरीच वेगळ्या खोलीत घरातील सदस्यांपासून लांब राहणे गरजेचे आहे . रिपोर्ट येई पर्यंत आपण पॉजिटीव्ह आहोत असे गृहीत धरावे व पुढील गोष्टी कराव्या –

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

  • संबंधित आरोग्य अधिकार्यांना संपर्क करून आपल्याला दाखल होण्याची गरज आहे का याची चाचपणी करावी.
  • होम आयसोलेशनचा सल्ला दिला असल्यास  रोज दोन वेळा स्वतःचे ऑक्सिजन , श्वासाची गती तपासावी.
  • रोज दोन वेळा ६ मिनिट वॉक टेस्ट करावी.
  • रिपोर्ट निगेटिव्ह आला पण डॉक्टरांना लक्षणांना वरून तरी ही कोरोनाच वाटत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्या प्रमाणे घरातच थांबावे . आरोग्य अधिकारी व डॉक्टर दुसऱ्या टेस्ट विषयी निर्णय घेतील.

उगीचच बेड आडवून ठेऊ नका –

घरात थांबा, उगीच बेड आडवू नका बरेच रुग्ण तब्येत चांगली असताना व निर्देशा प्रमाणे सुट्टीची तारिक असली तरी रुग्णालयात दाखल राहात आहेत. यात इन्श्युरन्स असलेले व १४ दिवसांपेक्षा जास्त दिवस दाखल राहणारे श्रीमंत रुग्ण ही आहेत. पण अनेक गंभीर रुग्णांना बेड मिळत नसताना अशा प्रकारे बेड अडवून गरज नसताना दाखल राहणे योग्य नाही. तसेच तब्येत चांगली असताना उगीचच दाखल राहून रुग्णालयातून इतर संसर्गाचा धोका ही असतोच . म्हणून सुट्टी कधी घ्यायची ही गोष्ट इंश्युरंस आहे का ? नातेवाईक व रुग्णाची काळजी यावर ठरवण्यापेक्षा डॉक्टरांना ठरवू द्या

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.

दमा, उपचार व प्रतिबंधात्मक काळजी

दमा, उपचार व प्रतिबंधात्मक काळजी

दमा, उपचार व प्रतिबंधात्मक काळजी दमा हा दीर्घकालीन आजार असल्याने त्याचे उपचार सतत सुरू ठेवावे लागतात. आकुंचन पावलेला श्वसनमार्ग पूर्ववत होण्यासाठी, म्हणजे प्रसरण पावण्यासाठी पंपाद्वारे उपचार करण्यात येतात. हे उपचार दोन प्रकारचे असतात –
१) तातडीने श्‍वसन मार्ग प्रसरण पावण्यासाठी 
२) श्‍वसनमार्ग अंकुचित होऊ नये या साठी नियमित घेण्याचा पंप 
पंप घेतल्याने याची सवय लागेल या गैरसमजामुळे अनेक पालक हे टाळतात व त्यामुळे आजार बळावत जातो. मात्र, हे दोन प्रकारचे पंप हाच दम्यासाठी मुख्य उपचार असतो. यात श्वास वाढल्यावर ३ ते ५ दिवस घ्यायचा व नियमित घ्यायचा पंप कुठला, हे डॉक्टरांकडून समजून पंपावर लिहून घ्यावे. कारण बरेच रुग्ण वापरताना नेमके उलटे करतात.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

याशिवाय दमा नियंत्रणात ठेवण्यासाठी पुढील काळजी घ्यावी 

  • थंड पदार्थ, कोल्ड ड्रिंक्स, आइस्क्रीम, चिकट-गोड पदार्थ, क्रीम बिस्कीट या गोष्टी पूर्ण टाळाव्या. 
  • आंबट, शिळे, फार तिखट व दाक्षिणात्य पदार्थ टाळावेत. 
  • दह्यापेक्षा पातळ ताक देण्यास हरकत नाही. 
  • सर्दी/दमा वाढलेला असताना डोक्यावरून अंघोळ टाळावी. खांद्याच्या खाली अंघोळ करावी व डोके ओल्या कपड्याने पुसून घ्यावे. 
  • गार हवेत व समुद्रकिनाऱ्यासारखे वारे घोंगावते अशी ठिकाणे टाळावीत. 
  • प्रवासात खिडकी उघडी ठेवून बसू नये, रेल्वेमध्ये पंख्याखाली बसू नये, कारण वाऱ्याच्या झोताने दमा वाढतो. 
  • अशा मुलांचा घरात व बाहेर प्राण्यांशी संपर्क टाळावा. 

घरात घ्यायची काळजी 

  • डास विरोधी अगरबत्ती/इलेक्ट्रिक लिक्विड रेपेलंटऐवजी मच्छरदाणी वापरावी. 
  • घरात कोणीही धुम्रपान करू नये. 
  • हिवाळ्यात बरेच दिवस ठेवलेले वुलन कपडे आधी दोन दिवस उन्हात ठेवावेत व मगच वापरायला घ्यावेत. 
  • घर स्वच्छ करत असताना झाडू नये, ओल्या कपड्याने थेट पुसावे. 
  • बेडशीट व उशीचे कव्हर नियमित बदलावे व धुतलेले वापरावे. 
  • शक्यतो पांघरण्यासाठी वुलन चादरी वापरू नये. 
  • अंथरूण किंवा इतर गोष्टी घराऐवजी बाहेर मोकळ्या हवेत झटकाव्यात. 
  • घरात झुरळ असू नये याची काळजी घ्यावी. 
  • संध्याकाळच्या वेळेला दार, खिडक्या बंद ठेवाव्यात. 

इतर काळजी  

  • त्रास नसला तरी दर ४ महिन्यांनी डॉक्टरला दाखवावे. 
  • दर वर्षी फ्लूची लस घ्यावी 
  • दमा डायरी लिहावी व कुठल्या गोष्टीने त्रास झाला याची नोंद ठेवून डॉक्टरांना दाखवावी. 

दमा बरा होतो का

  • दमा, उपचार व प्रतिबंधात्मक काळजी नेहमी उपचार घेतल्यास दमा नियंत्रणात नक्कीच राहू शकतो. 
  • लक्षणे १ वर्षाच्या आत सुरू झाल्यास ९० टक्के मुले बरी होतात. 
  • ३ वर्षात लक्षणे सुरू झाल्यास ८० टक्के मुले बरी होतात व ३ वर्षानंतर सुरू झाल्यास ७० टक्के मुले बरी होतात. उर्वरित ३० टक्क्यांमध्ये फुफ्फुसाची क्षमता कशी आहे, यावर कुमारवयापर्यंत बरी होणार की पुढे प्रौढपणी ही दम्याचे रुग्ण असतील हे ठरते. 

सदरील माहिती आपण सकाळ मध्येही वाचू शकता.

कोरोनानंतरचा थकवा

कोरोनानंतरचा थकवा

कोरोनानंतरचा थकवा सध्या कोरोना मधून बरे झालेल्या अनेक जणांना लक्षणां नंतर १४ दिवस संपल्यावर पुढे अजून १५ दिवस ते २ महिन्यांपर्यंत बराच त्रास जाणवतो . बरे झाले तरी कामाचे तास बुडत असल्याने व या थकव्या मुळे माणूस मानसिक दृष्ट्या ही खचून जात असल्याने या कडे लक्ष देण्याची गरज आहे.

कोरोनातून बरे झाल्यावर जाणवणारे त्रास  –

  • दिवस तीव्र स्वरूपाचा थकवा, अंगदुखी, स्नायू दुखणे, पाठदुखी असा.
  • थोडे चालल्यावर किंवा कष्टाचे काम केल्यावर श्वास घेण्यास त्रास होणे.
  • नैराश्य येणे , मानसिक थकवा येणे.
  • वजन कमी होणे व स्नायू कमी होणे. एक दिवस पूर्ण झोपून राहिले कि  १ ते १.५ % स्नायू कमी होतात. ज्यांना १० ते १४ दिवस पडून राहावे लागले त्यांचे २५ % स्नायू कमी होऊ शकतात.
  • बुद्धी क्षमतेच्या कामात रस न येणे किंवा अवघड जाणे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

कारणे –
कुठल्या ही व्हायरल आजारा नंतर काही दिवस असा थकवा येतोच पण कोरोना मध्ये बऱ्याचदा उपचारात दिली जाणरे औषधे त्यातच स्टीरॉईड दिले जाते. स्टीरॉईड बंद केल्यावर शरीराचे संप्रेरकांचे संतुलन काही प्रमाणात बिघडते व ते पूर्ववत होण्यास २ ते ४ आठवडे लागतात . पण जीव वाचवण्यासाठी व उपचार म्हणून ही औषधे देणे ही गरजेचे आस्ते.

कोरोना नंतरच्या परिणामावर उपचार –

  • कोरोनानंतरचा थकवा रोज दिवसातून दोन वेळा १ ग्लास नारळ पाणी प्यावे.
  • विटामिन सी ५०० मिलीग्राम ची एक गोळी थकवा असल्यास चालू ठेवावी.
  • कोरोना होण्या आधी विटामिन डी घेतलेले नसेल तर ६०,००० IU दर आठवड्याला एकदा ८ आठवडे
  • रोज उच्च प्रथिने युक्त आहार घ्यावा.
  • सतत पडून राहण्यापेक्षा थोडा वेळ उठून घरात फिरावे , घरातील छोटी मोठी कामे करण्याचा प्रयत्न करावे.
  • रोज हळूहळू ब्रेक घेत १० मिनिटे.
  • फिजियोथेरपिस्टचा ( व्याय्यामाचे डॉक्टर ) सल्ला घेऊन श्वासाचे व्याव्याम करावे. यासाठी वेगळे साहित्य मिळते . उदाहरणार्थ फुकून एका नळीतील बॉल हवेत तरंगत ठेवणे.
  • रोज १० मिनिटे दीर्घ श्वसनाचा व्यायाम करणे.
  • स्नायू दुखत असताना अंगाला तेलाने मसाज करू नये पण झोपताना हाताला व पायाला तिळाचे तेल फक्त लावायला हरकत नाही.
  • रोज झोपताना दोन मुठ खडे मीठ कोमट पाण्यात टाकून घोट्या पर्यंत पाय या पाण्यात १५ मिनिटे बुडवून ठेवावे.
  • जास्त दुखत असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने पॅरासीटॅमॉलची गोळी काही दिवस घेण्यास हरकत नाही.
  • मानसिक थकव्या साठी रोज ५ मिनटे ध्यान करावे व आपण यातून बरे झालो याबद्दल आभार व्यक्त करून मन कृतज्ञ स्थितीत राहावे . मानसिक स्थिती साठी हा एक उपचार आहे 

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.

सीरोसर्व्हिलन्स म्हणजे काय?

सीरोसर्व्हिलन्स म्हणजे काय?

सीरोसर्व्हिलन्स म्हणजे काय? सध्या मुंबईसह राज्याच्या अनेक भागात सीरोसर्व्हीलंसचे काम केंद्र शासनातर्फे सुरू आहे. एखाद्या भागात किती लोकसंख्येला आता संसर्ग झाला आहे हे तपासणे म्हणजे सीरोसर्व्हीलंस होय.

हे कसे केले जाते ?
यासाठी बाधित झालेले तसेच न झालेले जनतेतून सहजगत्या कुठला ही व्यक्तींचा समूह निवडला जातो व त्यांच्या शरीरात संसर्ग होऊन गेला आहे हे व प्रतिकारशक्तीचे घटक – अँटिबॉडीचे प्रमाण तपासण्यात येते. त्यामुळे एखाद्या गावात किंवा शहरात किती लोक आता बाधित होऊन गेले आहेत याचा अंदाज येतो. तसेच या अँटिबॉडीचे प्रमाण जास्त आहे की कमी, हेही मोजले जाते.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

याचा उपयोग काय होतो?
सीरोसर्व्हिलन्स म्हणजे काय? तीन गोष्टी यावरून समजतात किती टक्के जनता बाधित झाली आहे यावर प्रतिबंधाचे धोरण ठरवता येते.
सर्व समाजाची एकत्रित व बहुतांश लोकसंख्या संसर्गित झाल्याने निर्माण होणारी हर्ड इम्युनिटी म्हणजे सर्वांना सामूहिक प्रतिकारशक्ती बहाल करणारी कळप प्रतिकारशक्ती निर्माण होते आहे कि नाही हे लक्षात येते.
अँटिबॉडीचे प्रमाण किती निर्माण झाले आहे व किती काळ टिकते हे मोजून, एकदा संसर्ग झाल्यावर परत किती काळ संसर्ग होण्याची शक्यता हे लक्षात येते अर्थात पहिला संसर्ग किती काळ पुढच्या संसर्गापासून नैसर्गिक प्रतिकारशक्ती बहाल करतो हे लक्षात येते.
यावरून लस परिणामकारक राहील की नाही हे ही कळते. सीरोसर्व्हीलंसचे निष्कर्ष काय ?
लक्षणविरहीत संसर्ग झालेल्यांमध्ये अँटिबॉडीचे प्रमाण फारसे नाही व ते एक महिन्यापर्यंतच टिकते आहे व सौम्य व मध्यम लक्षणे असलेल्यांमध्ये ही अँटिबॉडीचे प्रमाण असले तरी ते तीन महिन्यात कमी होते आहे.

याचा परिणाम काय होऊ शकतो?
सीरोसर्व्हीलंस सुरु असल्याने याचे अंतिम निष्कर्ष काढणे चुकीचे ठरेल. पण आतापर्यंतच्या मर्यादित निकालांवरून पहिल्या कोरोना संसगार्तून मिळणारी प्रतिकारशक्ती आयुष्यभर टिकेलच असे खात्रीशीर रित्या सांगता येत नाही. म्हणून संसर्गित झालेले व न झालेले असे दोन्ही गटांना प्रतिबंधाचे सर्व उपाय चालू ठेवणे गरजेचे आहे. अजून
६ महिने ते वर्षभर सीरोसर्व्हीलंसनंतर चित्र अजून स्पष्ट होईल.

सीरोसर्व्हीलंसला सहकार्य करा
काही भागांमध्ये कशासाठी रक्त घेत आहेत, रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर आम्हाला कुठे घेऊन जातील, अलगीकरण / विलगीकरण करतील अशा गैरसमज व भीतीमुळे नागरिकांना सहकार्य केले नाही व रक्ताचे नमुने देण्यास नकार दिला. पण ही रक्ताची तपासणी तुमच्या आताच्या संसर्गाच्या निदानासाठी नव्हे तर होऊन गेलेल्या संसर्गासाठी आहे. तसेच या चाचणीचा आधार घेऊन कोणालाही बळजबरीने रुग्णालयात दाखल केले जात नाही. म्हणून सर्वांनी शासकीय कर्मचारी येतील तेव्हा सहकार्य करावे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.