‘कोरोना’साठी वेगळा आरोग्य विमा घ्यावा का?

‘कोरोना’साठी वेगळा आरोग्य विमा घ्यावा का?

‘कोरोना’साठी वेगळा आरोग्य विमा घ्यावा का? कोरोना’साठी जर आपल्याला खासगी रुग्णालयात उपचार घ्यायचे असतील व शासनाने जरी या उपचाराच्या खर्चावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला असला, तरी खासगी रुग्णालयातील काही रुग्णांचा खर्च ५ लाखांपर्यंत ही गेला आहे. याचे कारणही तसेच आहे. जर कोरोनाचा रुग्ण अत्यवस्थ झाला व त्याला महागड्या औषधांची गरज पडली, तर हा खर्च शासनाने ठरवलेल्या दरात समाविष्ट नाही व रुग्णालयाला वेगळे पैसे आकारावे लागतातच. शिवाय, जर व्हेंटिलेटरची गरज पडली तर खर्च वाढतोच. म्हणून यासाठी काही विमा कंपन्यांनी वेगळा कोरोनासाठी विमा सुरू केला आहे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

‘कोरोना’साठी वेगळा आरोग्य विमा घ्यावा का? हा विमा घेताना पुढील गोष्टी लक्षात घ्याव्या.जर आपला आधी काढलेला आरोग्य विमा असेल व याचे प्रीमियम आपण नियमित भरत असाल, तर वेगळ्या कोरोना आरोग्य विम्याची गरज नाही.आरोग्य विमा असल्यास तो प्रत्येक व्यक्तीला किमान ५ लाखांची सुरक्षा देणारा असावा किंवा नसल्यास तो वाढवून घ्यावा. जर आरोग्य विमा नसेल तर वेगळा कोरोना विमा घ्यावा. कोरोना झाल्यास किंवा घरात इतर कोरोनाची जोखीम वाढवणारे आजार असलेली व्यक्ती असल्यास त्यासाठी उपचाराचे आर्थिक नियोजन करून ठेवावे. काही खर्च कमी करून कधीही वापरता येतील, अशी पैशांची तजवीज असावी. कोरोना विमा वार्षिक रुपये १५० पासून ते ५००० पर्यंत उपलब्ध आहे. व यात २५,००० पासून ते ५ लाखांपर्यंत विमा सुरक्षा आहे. यात काही सरसकट पूर्ण ठरवलेली विम्याची रक्कम देण्यात येते, काही विम्यामध्ये भरती होण्याची गरज व खर्चाप्रमाणे देण्यात येते. काही विमा हा तुम्ही काही विशिष्ट दुसऱ्या व तिसºया पातळीची शहरे किंवा ग्रामीण भागात राहात असाल त्यांच्या साठीच आहेत व काही विम्यामध्ये अतिदक्षता विभागात दाखल झाल्यास किंवा व्हेंटिलेटरच गरज पडल्यास विम्याची रक्कम मिळत नाही. म्हणून विमा घेताना या गोष्टींचा खुलासा करून घ्यावा.प्रत्येक विम्याला लागू होण्यास विमा काढल्यापासून १४-१६ दिवसांचा अवधी आहे.बºयाच विम्यामध्ये संपर्क आल्यावर क्वारंटाइन व्हावे लागले तर आजारी पडल्यावर मिळणार त्याच्या ५०% रक्कम दिली जाते. शक्यतो क्वारंटाइनमध्ये ही विमा सुरक्षा देणाºया पॉलिसीची निवड करावी.शक्यतो ज्या विमा कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशो म्हणजे म्हणजे क्लेम अंतर्गत पैसे देण्याचे प्रमाण जास्त आहे त्या कंपनीचा विमा घ्यावा. ही सर्व विमा कंपन्यांची माहिती कफऊअक उपलब्ध करून देते.प्रत्येक विम्याचा काळ फक्त१ वर्ष असतो याची नोंद घ्यावी.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.

अनेकजण वापरात असलेल्या नेबुलायझरपासून सावधान

अनेकजण वापरात असलेल्या नेबुलायझरपासून सावधान

अनेकजण वापरात असलेल्या नेबुलायझरपासून सावधान आपल्याकडे वर्षानुवर्षे सर्दी खोकल्यासाठी रुग्णालयात किंवा घरी नेबुलायझरने  वाफ घेणे सुरु आहे. खर तर दमा व अलर्जी सोडून इतर नियमित येणाऱ्या ताप, सर्दी, खोकल्याला अशा नेबुलायझर मधून वाफ घेण्याची गरज नसते. यातून बाळाच्या पालकांना फक्त खोकल्यासाठी काही तरी करत असल्याचे मानसिक समाधान मिळत असते.आता तर दम्याच्या रुग्णांना ही फक्त इन्हेलर म्हणजे मीटर्ड डोस इन्हेलरचाच वापर करावा व त्यांच्यासाठी ही नेबुलायझरची गरज नाही असे आतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्वे सांगतात.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

अनेकजण वापरात असलेल्या नेबुलायझरपासून सावधान सध्या कोरोना साथीच्या काळात तर हॉस्पिटल / क्लिनिकच्या वेटिंग रूममध्ये कोपऱ्यात असलेल्या एकाच नेबुलायझर मधून अनेक मुलांना नेब्यूलायजेशन देणे हे घातक ठरू शकते. अनेकजण वापरात असलेल्या नेबुलायझरपासून सावधान या निमित्ताने वैद्यकीय क्षेत्रातून साध्या सर्दी खोकल्यासाठी नेबुलायझर ही परंपराच हद्दपार करावी. जर दमा , अॅलर्जी नेबुलायझर वापरण्याची वेळ येतच असेल तर आपल्या बाळासाठी नवा आणि वेगळा नेबुलायझर वापरावा. नेबुलायझरचा सर्वात मोठा धोका म्हणजे जर कोरोना बाधित रुग्ण इतरांसमोर नेब्यूलायजेशन  घेत असेल तर यातून उडणारे श्वासाचे कण हे अधिक दूरवर उडून इतरांना ही संसर्ग करू शकतात. तसेच निश्चित निदान झालेल्या रुग्णाला नेबुलायझर चा वापर करावा लागलाच तर तो बंद खोली मध्येच करावा व नंतर ही जागा सोडियम हायपोक्लोराईट ने निर्जंतुक करून घ्यावी. घरात दोन मुले असतील तर त्यांचे ही नेबुलायझर एकमेकांना वापरू नये. दम्याचे रुग्ण असतील तर इन्हेलर ही प्रत्येकाने ज्याचे त्याचे वापरावे. नेबुलायझर प्रमाणे इन्हेलर मधून श्वासाचे कण बाहेर उडत नाहीत.  या बाबतीत एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे उपयोगी असलेल्या इन्हेलर बद्दल पालकांना याची सवय लागेल का म्हणून शंका असते. पण फार से उपयोगाचे नसलेले नेबुलायझर मात्र त्यांना हवेहवेसे असते. कोरोनाच्या निमित्ताने हे सर्व गैरसमज दूर झाले पाहिजे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

ग्रीन, ऑरेंज झोनमध्ये असणाऱ्यांनो, सतर्क रहा!

ग्रीन, ऑरेंज झोनमध्ये असणाऱ्यांनो, सतर्क रहा!

ग्रीन, ऑरेंज झोनमध्ये असणाऱ्यांनो, सतर्क रहा! सध्या राज्यातील काही भाग हा ऑरेंज व ग्रीन झोन आला असला तरी या भागासाठी आता कोरोनाचा धोका १०० % टळला असे अनेकांना वाटते आहे. या विषयी आपला भाग अमुक अमुक झोन मध्ये आल्या बद्दल शुभेच्छा, अभिनंदनाच्या  इमेजेस ही समाज माध्यमांवर काही जणांनी प्रसारित केल्या. पण ऑरेंज म्हणजे गेल्या १४ दिवसात १५ केसेस पेक्षा कमी केसेस अढळल्या नाहीत आणी ग्रीन झोन म्हणजे गेल्या २८ दिवसात एक ही रुग्ण अढळला नाही एवढाच आहे. रुग्ण संख्या कमी असल्याने स्थानिक उद्योगांना चालना मिळावी म्हणून काही गोष्टींना परवानगी दिली आहे. पण याचा अर्थ इतर भागातून आत्यावश्यक वस्तूंच्या वाहतुकीतून आपला कोरोना बाधिताशी संपर्क येणारच नाही म्हणून साजरीकरण करू नये व नियम धुडकावून लावू नये. या दोन्ही झोन मधील लोकांनी पुढील गोष्टी पाळाव्या –

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

  • ग्रीन, ऑरेंज झोनमध्ये असणाऱ्यांनो, सतर्क रहा! ज्या गोष्टी तालुक्याच्या ठिकाणी मिळतात, नित्य सेवा, खरेदी तिथेच कराव्या, गरज नसताना जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊ नये.
  • परवानगी असली तरी अनावश्यक प्रवास टाळावा.
  • कुठल्याही झोन मध्ये दुचाकीवर एकाच व्यक्तीला परवानगी आहे या सूक्ष्म गोष्टीचा विसर पडू देऊ नये.
  • परवानगी असली तरी गरज नसलेल्या गोष्टी, कपडे, चैनीच्या गोष्टी उगीचच ई कॉमर्सच्या माध्यमातून मागवू नये.
  • कुरिअर व पोस्ट सेवा ही सर्व झोन मध्ये सुरु झाल्या असल्या तरी उगीचच या सेवेचा लाभ घेऊ नये. अत्यावश्यक गोष्टींसाठीच याचा वापर करावा. कागदपत्रे उगीचच पोस्टाने पाठवू नये. त्यासाठी इ- मेलचाच वापर करावा.
  •  ग्रीन, ऑरेंज झोनमध्ये असणाऱ्यांनो, सतर्क रहा! सोशल डीस्टन्सिंगच्या नियमाची सर्वात जास्त तुडवणूक मद्य विक्री करणाऱ्या दुकानांवर होण्याची शक्यता आहे व अचानक या दुकानां भोवती मोठी गर्दी उसळते आहे. या साठी मद्य विक्रेत्यांनी स्वतःला शिस्त लावून सोशल डीस्टन्सिंग व दुकानांभोवती लोक एकमेकांपासून लांब उभे राहतील याची काळजी घ्यावी .
  •  कुठल्या ही झोन मध्ये असले तरी ताप, सर्दी, खोकल्याच्या व्यक्तीने घरा बाहेर निघायचे नाही आहे व स्वतःला कटाक्षाने इतरांपासून १४ दिवस लांब ठेव्याचे आहे.
  • डॉ. अमोल अन्नदाते

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

पवित्र रमजान ‘कोविड’ मुक्त ठेवण्यासाठी

पवित्र रमजान 'कोविड' मुक्त ठेवण्यासाठी

पवित्र रमजान ‘कोविड’ मुक्त ठेवण्यासाठी नुकताच रमजान चा पवित्र महिना सुरु झाल्याने रोजे ही सुरु झाले आहेत. यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या दृष्टीने रमजान मध्ये काय बदल करावे व काळजी घ्यावी याचे निर्देश दिले आहेत. देशभरातून मौलवी व डॉक्टरांनी याला मान्यता दिली आहे .

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

  • कोरोना चे निदान झालेले, निदान होऊन बरे झालेले व निश्चित निदान झालेल्या केस च्या संपर्कात  येऊन सध्या होम क्वारनटाइनचा सला दिलेल्यांनी रमजान चा रोजा ठेवू नये.
  • साठ वर्षा पेक्षा जास्त वय असलेल्यांनी तसेच ६० पेक्षा कमी वय असले तरी मधुमेह, ह्रदयरोग, कॅन्सरचा त्रास असलेल्यांनी शक्यतो रोजा टाळावा.
  • ६० वर्षा खालील काही त्रास नसणाऱ्यानी रोजा ठेवण्यास हरकत नाही.

पवित्र रमजान ‘कोविड’ मुक्त ठेवण्यासाठी पवित्र कुरानमध्ये ही आजारी व्यक्तींना रोजा करण्यातून सूट देण्यात आली आहे. या संकेतां शिवाय अजून काही गोष्टी रमजान दरम्यान  पाळण्यास हरकत नाही. मधुमेह नियंत्रित असणारे काही जण या काळात रोजा ठेवतात. अशांनी  रक्तातील साखर  ७० च्या खाली व ३०० च्या वर जाणार नाही याची काळजी घ्यावी. स्वस्थ व्यक्तींनी रोजा करत असताना खोकला, ताप, सर्दी असल्यास लगेचच रोजा बंद करून डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. या वर्षी रमजान दरम्यान प्रार्थना, नमाज घरीच कराव्या व सणा दरम्यान एकमेकांच्या घरी जाणे व एकत्रित इफ्तारचे कार्यक्रम  टाळावे.पवित्र रमजान ‘कोविड’ मुक्त ठेवण्यासाठी रमजान दरम्यान रोजा पाळता आला नाही. तरी पवित्र कुरानमध्ये कफारा ही तरतूद सांगितली आहे. कफारा म्हणजे पैसे किंवा जेवणाचे दान. कोरोना साथी साठी आवश्यक दान करून आपण रोजा न करता कफाराचे पालन करु शकता.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

व्यायामाने आणा श्वसनसंस्थेला बळकटी

व्यायामाने श्वसनसंस्थेला आणा बळकटी

व्यायामाने आणा श्वसनसंस्थेला बळकटी सध्या दमा, श्वसनाचे आजार, अॅलर्जी असे आजार असणारे जरा ही श्वास वाढला किंवा नाक चोंदल तर कोरोनाच्या भीतीने घाबरून जातात. तसेच अनेकांना भीती मुळे अस्वस्थ वाटते, झोप येत नाही. या श्वास घेण्याच्या व्यायामामुळे कोरोना टळेल असा दावा करता येणार नाही. पण या श्वास घेण्याच्या पद्धती मुळे फुफुसांना ऑक्सिजन हे नेहमी च्या श्वास घेण्याच्या पद्धती पेक्षा कित्येक पटीने जास्त मिळेल व म्हणून प्रतिकारशक्ती वाढल्याने कोरोना चा धोका नक्कीच कमी होईल. तसेच दमा, अॅलर्जी सारख्या आजारांमध्ये फुफुसांची क्षमता वाढवण्यास मदत होईल. ही पद्धत पुढील प्रमाणे आहे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

व्यायामाने आणा श्वसनसंस्थेला बळकटी या पद्धतीत श्वास आत घेताना पोट फुगले पाहिजे ( छाती नाही ) आणि श्वास बाहेर सोडताना पोट आत गेले पाहिजे. श्वास आत घेण्याचे नंतर श्वास रोखून धरण्याचे व नंतर श्वास बाहेर सोडण्याची अशी एक सायकल पूर्ण होते. याचे प्रमाण १ : ४ : २ अशी असायला हवे . म्हणजे ५ सेकंद श्वास आत घेतला तर  पुढील २० सेकंद स्वस रोखून धरायचा आणि नंतर १० सेकंद श्वास बाहेर सोडायचा . हा श्वासाचा व्यायाम रोज १० मिनिटे केल्यास त्याचा उत्तम लाभ मिळेल. यामुळे भीती, ताण तणाव ही कमी होईल.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

मानसिक तणावावर नियंत्रण ठेवा

मानसिक तणावावर नियंत्रण ठेवा

मानसिक तणावावर नियंत्रण ठेवा गेल्या दोन दिवसात कोरोनामुळे दोन आत्महत्या झाल्या. यातील एक कोरोना बाधित व्यक्तीची होती तर दुसरी कुठली ही कोरोनाची लक्षणे नसलेली व्यक्ती होती. हे विचार व पाउल काही विचार प्रक्रियेमुळे उचलले जाते.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

मानसिक तणावावर नियंत्रण ठेवा काही लक्षणे नसताना आता आपले व जगाचे काय होणार ही मनात दाटून आलेली भीती व निराशा. लक्षणे नसताना मृत्यूची भीती वाटणे व आपला कोरोनाने मृत्यू होण्यापेक्षा आपणच स्वतःला संपवण्याची निराशे पोटी इच्छा दाटून येणे. या सोबत आधी पासून असलेले नैराश्य, घरात पूर्वी कोणी आत्महत्या केली असल्यास व आधी त्या व्यक्तीनेच आत्महत्येचा अयशस्वी प्रयत्न केला असल्यास जोखीम जास्त असते. सगळ्यात आधी असे नैराश्येचे कुठले ही विचार मनात येत असल्यास मानसोपचारतज्ञांचा त्वरित सल्ला घ्या. कोरोना बाधित व्यक्तीने हे लक्षात घ्यावे की कोरोनाची बाधा व कोरोनाची  लक्षणे या वेगळ्या गोष्टी आहेत. कोरोना झाल्यावर ८५ टक्के शक्यता आहे कि तुम्हाला अगदी सौम्य व थोडी फार लक्षणे येतील. तसेच उर्वरित १५ टक्के मध्ये बहुतांश लोक बरे होत आहेत. तसेच आपली मानसिकता व प्रतिकारशक्तीचा थेट संबंध असतो. याला सायको- न्युरो – इम्युनो एक्सीस असे म्हणतात. हा कमकुवत झाला तर कोरोनाच नव्हे तर कुठल्याही आजारा विरोधात लढण्यास शरीर सक्षमता गमावून बसते. म्हणून कोरोनाची बाधा झाली तरी खचून न जाने हा उपचाराचाच भाग आहे असे समजावे. हे कळत असते पण वळत नसते अशी ती स्थिती असते. यासाठी पहिली पायरी आहे आपल्याला जे वाटते आहे ते आपल्या जवळच्या नातेवाईकाला भावना मन मोकळे पणाने बोलून दाखवणे. अशा वेळी नातेवाईकांची भूमिका महत्वाची ठरते. रुग्णाला आयसोलेट करायचे म्हणजे त्याच्याशी तुम्ही संवाद ठेवू शकता. त्याच्याशी फोन वर बोलत राहू शकता. गरज वाटल्यास लगेचच समुपदेशक किंवा मानसोपचारतज्ञांची मदत घेण्याचा निर्णय नातेवाईकांनी घ्यायला हवा.

मानसिक तणावावर नियंत्रण ठेवा काही लक्षणे नसताना आता आपले व जगाचे काय होणार ही मनात दाटून आलेली भीती व निराशा. लक्षणे नसताना मृत्यूची भीती वाटणे व आपला कोरोनाने मृत्यू होण्यापेक्षा आपणच स्वतःला संपवण्याची निराशे पोटी इच्छा दाटून येणे. या सोबत आधी पासून असलेले नैराश्य, घरात पूर्वी कोणी आत्महत्या केली असल्यास व आधी त्या व्यक्तीनेच आत्महत्येचा अयशस्वी प्रयत्न केला असल्यास जोखीम जास्त असते. सगळ्यात आधी असे नैराश्येचे कुठले ही विचार मनात येत असल्यास मानसोपचारतज्ञांचा त्वरित सल्ला घ्या. कोरोना बाधित व्यक्तीने हे लक्षात घ्यावे की कोरोनाची बाधा व कोरोनाची  लक्षणे या वेगळ्या गोष्टी आहेत. कोरोना झाल्यावर ८५ टक्के शक्यता आहे कि तुम्हाला अगदी सौम्य व थोडी फार लक्षणे येतील. तसेच उर्वरित १५ टक्के मध्ये बहुतांश लोक बरे होत आहेत. तसेच आपली मानसिकता व प्रतिकारशक्तीचा थेट संबंध असतो. याला सायको- न्युरो – इम्युनो एक्सीस असे म्हणतात. हा कमकुवत झाला तर कोरोनाच नव्हे तर कुठल्याही आजारा विरोधात लढण्यास शरीर सक्षमता गमावून बसते. म्हणून कोरोनाची बाधा झाली तरी खचून न जाने हा उपचाराचाच भाग आहे असे समजावे. हे कळत असते पण वळत नसते अशी ती स्थिती असते. यासाठी पहिली पायरी आहे आपल्याला जे वाटते आहे ते आपल्या जवळच्या नातेवाईकाला भावना मन मोकळे पणाने बोलून दाखवणे. अशा वेळी नातेवाईकांची भूमिका महत्वाची ठरते. रुग्णाला आयसोलेट करायचे म्हणजे त्याच्याशी तुम्ही संवाद ठेवू शकता. त्याच्याशी फोन वर बोलत राहू शकता. गरज वाटल्यास लगेचच समुपदेशक किंवा मानसोपचारतज्ञांची मदत घेण्याचा निर्णय नातेवाईकांनी घ्यायला हवा.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

वैद्यकीय धोरणशून्यता

वैद्यकीय धोरणशून्यता

वैद्यकीय धोरणशून्यता सध्या कुठल्या ही खाजगी रुग्णालयात कोरोना बाधित रुग्ण सापडला तर लगेचच रुग्णालय सील केले जाते व रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स , स्टाफला क्वारनटाइन केले जाते. यामुळे फक्त मुंबईत १७०० मोठ्या रुग्णालयांच्या खाटा आज बंद आहेत. आधीच राज्यात डॉक्टर व पॅरामेडिकल स्टाफचा तीव्र तुटवडा आहे. राज्याच्या आरोग्य खात्यात डॉक्टरांच्या १७००० जागा रिक्त आहेत.  राज्यात १०० डॉक्टर व वैद्यकीय स्टाफ ला कोरोनाची लागण झाली आहे. खाजगी नव्हे तर वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय सेवेतील अनेक डॉक्टर क्वारनटाइन मध्ये जात आहेत. धोरणशून्यते मुळे कोरोना विरुध्द या लढ्यात  सैनिकांची पहिली फळी आपण निष्क्रिय करत आहोत.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

     वैद्यकीय धोरणशून्यता हे सर्व टाळण्यासाठी धोरण व कार्यपद्धती मध्ये काही मुलभूत बदल तातडीने करण्याची गरज आहे. साथ आटोक्यात येई पर्यंत सर्वात आधी तापाचे रुग्ण आणि ताप नसलेले रुग्ण अशी रुग्ण तपासताना विभागणी आपल्याला करावी लागणार आहे. शासनाने यासाठी फिवर क्लिनिक शहरामध्ये विभागवार आणि प्रत्येक तालुक्यात एक असे सुरु करण्याची तातडीने गरज आहे. हे केले असे बोलले जाते आहे पण कुठे ही कार्यरत झालेले दिसत नाहीत. यामुळे ताप, सर्दी, खोकला म्हणजे कोरोनाची शक्यता असलेले रुग्ण या बाह्यरुग्ण विभागात जाऊ शकतात. मोठ्या खाजगी रुग्णालयांना ही रुग्णालयाच्या आवारात इतरत्र तापाचे रुग्ण वेगळे तपासण्याची व्यवस्था करावी लागणार आहे. प्रत्येक खाजगी व शासकीय रुग्णालयात जो पर्यंत प्रवेशद्वारा जवळ तापाच्या रुग्णांचे वेगळे स्क्रीनिंग करून त्यातून कोरोना संशयीतांसाठी वेगळी व्यवस्था उभारली गेली  नाही तर हॉस्पिटल हे संसर्गाचा मोठा स्त्रोत ठरू शकतात. हे करण्या ऐवजी थेट हॉस्पिटलच सील करण्याचा विवेकशून्य सोपा मार्ग आपण स्वीकारत आहोत. ताप, खोकल्याचे सर्व रुग्ण शासकीय रुग्णालयात पाठवा असे सांगितले जात असले तरी यातील बरेच रुग्ण नाकारले जात असल्याने परत खाजगी रुग्णालयातच येत आहेत. तसेच ७० टक्के आरोग्य सेवा खाजगी क्षेत्र देत असताना अचानक सर्व रुग्ण शासकीय रुग्णालयात जाणे शक्य नाही. सवयी प्रमाणे रुग्ण आधी आपल्या ठरलेल्या खाजगी डॉक्टरचाच सल्ला आधी घेतात. यातून एखादा रुग्ण कोरोना बाधित अढळला तर लगेचच अख्खे हॉस्पिटल १४ दिवस सील करण्याची गरज नाही. सोडियम हायपोक्लोराईट ने फ्युमीगेशन  करून एका दिवसात तत्काळ हे रुग्णालय सुरु केले जाऊ शकते.वैद्यकीय धोरणशून्यता या पुढे जाऊन अति नील किरणांचा प्रकाश झोत पूर्ण रुग्णालयात फिरवला तरी काही तासात निर्जंतुक होऊन रुग्णालय सेवा देण्यास तयार होऊ शकते. साथ कमी झाली तरी प्रत्येक शहरात आणि प्रत्येक रुग्णालयात  कोरोनाचे रुग्ण आढळणारच आहेत. मग या प्रत्येक रुग्णालयाला आपण कुठल्या ही धोरणा शिवाय सील करत गेलो तर इतर आजाराच्या रुग्णांनी जायचे कुठे. निर्जंतुकीकरणातून काही तासात या भागातील कोरोनाची संसर्ग करण्याची क्षमता नष्ट होईल.

                  राज्य सरकारने डॉक्टरांच्या वयक्तिक सुरेक्षेचे कवच म्हणजे पीपीई च्या अनउपलब्धतेचा प्रश्न सोडवण्यासाठी वेगळी पळवाट शोधून काढली आहे. फक्त कोरोना रुग्णांची काळजी घेत असलेल्या डॉक्टर व पॅरामेडिकल स्टाफ लाच पीपीईची गरज आहे असे राज्य सरकारचे म्हणणे आहे. पण असे असेल तर कोरोना बाधित रुग्ण सापडलेल्या रुग्णालयातील डॉक्टर, स्टाफ कोरोना पाँझीटीव येत आहेत त्याचे काय? सध्या कोरोनाचे रुग्ण इतके झपाट्याने वाढते आहे कि कुठला रुग्ण कोरोना बाधित असेल हे काहीच सांगता येत नाही. रुग्ण येतो तेव्हा तो कोरोनाचा आहे हे त्याच्या कपाळावर ( भाळी ) लिहिलेले नसते. तपासलेला रुग्ण चार पाच दिवसांनंतर कोरोना बाधित असल्याचे समजते आणि मग त्याला तपासलेले सर्व डॉक्टर, स्टाफ क्वारनटाइन केले जातात आणि हॉस्पिटल सील केले जाते. जर प्रत्येक रुग्ण तपासताना पीपीई वापरले तर ही वेळ येणार नाही कारण सुरेक्षेच्या कवचामुळे डॉक्टर, स्टाफ ला संसर्गाचा धोका राहणार नाही आणि डॉक्टर, स्टाफ ला क्वारनटाइन करण्याची गरज ही राहणार नाही. अनेक देशांमध्येच हेच धोरण राबवले जाते आहे. असे असताना आपल्याकडे ही धोरणशून्यता का? या शिवाय कोरोनाची बाधा असलेल्या ३० टक्के रुग्णांना कुठलेही लक्षण दिसून येत नाहीत. सुरक्षेशिवाय रुग्ण तपासताना या मुळे अनेक डॉक्टरांना बाधा झाल्याची उदाहरणे आहेत. या शिवाय डॉक्टरांनी सुरक्षेची साधने वापरली नाही म्हणून मला कोरोना झाला असे न्याय वैद्यक खटले दाखल करण्याची धमकी काही ठिकाणी रुग्ण डॉक्टरांना देत आहेत. हा प्रश्न फक्त डॉक्टरचा वयक्तिक संसर्गापासून सुरक्षेचा नाही तर यामुळे डॉक्टर हे संसर्गाचे  सगळ्यात मोठे स्रोत ठरू शकतात म्हणून हा प्रश्न सर्वांचा आहे. यासाठी राज्य सरकारने फक्त कोरोना कक्षातच पीपीई हे धोरण लवकरच बदलले नाही तर मोठा घात होणार आहे. यात डॉक्टरच नाही तर रुग्णालयाशी निगडीत इतर सर्व स्टाफ येतो. वैद्यकीय क्षेत्रात तीन पातळ्यांवर काम करणार्यांना किती जाडीचे व नेमके कुठले पीपीई वापरले पाहिजे याची मार्गदर्शक तत्वे उपलब्ध आहेत. राज्यात पहिला रुग्ण सापडून एक महिना व देशात दोन महिने उलटून गेले तरी आम्ही आरोग्य क्षेत्रातील पहिल्या फळीला अजून पीपीई देऊ शकलो नाही. एक वेळ खाजगी रुग्णालयांचा प्रश्न बाजूला ठेवला तरी शासकीय रुग्णालये व वैद्यकीय महाविद्यालयांचा प्रश्न जास्त गंभीर आहे. ज्या उपजिल्हा रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रावर ४० ते ५० जणांचा स्टाफ आहे तिथे १५ – २० साधे मास्क पाठवले जात आहेत. रोज जाहीर होणाऱ्या हजारो कोटींचा निधी हा तातडीने प्राधान्यक्रम ठरवून पीपीई खरेदी साठी वळवणे गरजेचे आहे. रुग्णांचे स्वॅब जिथे घेतले जात आहेत तिथे कलेक्शन चेम्बर्स तातडीने उभारणे गरजेचे आहे. परदेशात तर स्वॅब घेताना डॉक्टरचा धोका कमी करण्यासाठी नेगाटीव प्रेशर असणारे व रुग्णाचा जराही संबंध येऊ न देणारे चेम्बर्स बनवले आहेत. केरळ मध्ये सगळे सँपल्स याच पद्धतीनेच घेतले जात आहेत. प्रेशर चेम्बर नसले तरी किमान साधे रुग्ण व डॉक्टर मध्ये भिंत निर्माण करणारे चेम्बर्स सर्व स्वॅब घेणाऱ्या सेन्टर्स वर राज्यात तातडीने उभारणे गरजेचा आहे. सुरक्षिततेची काळजी घेतल्यास काम करणार्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास, हिम्मत वाढेल आणी झोकून देऊन काम करण्यास नैतिक बळ मिळेल.

             वैद्यकीय धोरणशून्यता खाजगी डॉक्टर पीपीई विकत घेण्यास तयार आहेत पण त्या उपलब्धच नाहीत. सुरुवातीला पीपीईच्या खाजगी विक्रेत्यांना पीपीई शासन सोडून कोणाला ही विकू नये असे निर्देश देण्यात आले होते जे नंतर शिथिल करण्यात आले. तसेच सरकार ने ठरवलेले पीपीईचे दर आणी खाजगी विक्रेत्यांचे दर यात तफावत असल्याने ही पीपीईच्या खरेदीस उशीर होतो आहे. आयसीएमआरने हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन आरोग्य क्षेत्रात रुग्णांशी थेट संबंध येणार्यांना देण्याचे निर्देश दिले आहेत. पण मागच्या आठवड्यात खाजगी सोडाच पण शासकीय सेवेतील वैद्यकीय कर्मचार्यांसाठी हे औषध उपलब्ध नव्हते. अशात भारताने अमेरिकेला या औषधाचा साठा पाठवल्याची बातमी आली. अशा गोष्टींमुळे स्वतःचा प्राण पणाला लावून काम करणाऱ्या वैद्यकीय क्षेत्राचे नैतिक खच्चीकरण होते. युद्ध जिंकण्यासाठी सर्वात  महत्वाचे असते सैनिकांना बळ देणे . वैद्यकीय सैनिक आज लढण्यास तयार आहेत, लढत आहेत. गरज आहे त्यांना युद्ध जिंकण्यासाठी पुरेसे हत्यार देण्याची.हॉस्पिटल्स सील करण – चुकीचे धोरण

सदरील माहिती आपण  महाराष्ट्र टाईम्स मध्येही वाचू शकता

कोरोना टाळण्यासाठी टी झोन मध्ये हात लावणे टाळा

टी झोन मध्ये हात लावणे टाळा

कोरोना टाळण्यासाठी टी झोन मध्ये हात लावणे टाळा कोरोना टाळण्यासाठी हात धुणे जितके महत्वाचे आहे तितकेच गरज नसताना चेहऱ्याला हात न लावणे महत्वाचे आहे. चेहऱ्याला, केसांना हात लावणे ही आपल्याला अजाणतेपणाने लागली सवय आहे. वागणुकीचे शास्त्र असे सांगते कि ज्या प्राण्यांपासून आपली उत्क्रांती झाली तेव्हा पासून ही सवय मानवाला चीटकलेली आहे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

कोरोना टाळण्यासाठी टी झोन मध्ये हात लावणे टाळा चेहऱ्याला हात लावणे, केसांमधून हात फिरवणे हे तणावापासून मुक्ती देणारी कृती असते. अनेकांना नखे खाणे किंवा वारंवार नाकाच्या शेंड्याला हात लावणे अशा सवयी ही लागलेल्या असतात. मुलींना केस वारंवार निट करण्याची सवय लागलेली असते. सरासरी प्रत्येक जन एका तासात १५ ते २४ वेळा चेहऱ्याला हात लावतो. पण कोरोना टाळण्यासाठी ही सवय आपल्याला मोडावी लागणार आहे. याचे कारण हात धुतले तरी हात धुतल्यावर आपला हात कोरोना बाधित जागेला लागला व तोच हात आपण चेहऱ्या वरून फिरवला तर आपल्याला कोरोनाची बाधा होऊ शकते. चेहऱ्याच्या ज्या भागांना हात लावायचा नाही त्याला टी झोन असे म्हणतात. यात दोन्ही डोळे, नाक आणि तोंड येते. हे टी झोन महत्वाचे असले तरी पूर्ण चेहऱ्यालाच हात लावणे टाळावे. तसेच केसांना ही उगीच हात लावणे टाळावे. घरात प्रत्येकाचा कंगवा ही वेगळा असावा. ही सवय मोडण्यासाठी आम्ही  डॉक्टरांनी एक शक्कल लढवली आहे.  हाताच्या कोपराला घट्ट चीगटपट्टी रोमन लेटर II म्हणजे  लिहितात तशा घट्ट चीगट पट्ट्या उभ्या आणि दोन आडव्या लावायच्या. यामुळे ठरवल तरी हात चेहऱ्या पर्यंत जाऊ शकत नाही. डॉक्टरच नाही तर पोलीस व फिल्ड वर वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांनी हे करायला हव. वारंवार चेहऱ्याला हात लावणे टाळण्यासाठी आता काही अॅप्स ही आले आहेत. तुमचा हात चेहऱ्याला जवळ गेला कि हे अॅप्स तुम्हाला एक विशिष्ट आवाजाने सिग्नल देतात.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

कोरोना विषयी सर्वसाधारण गैरसमज

Corona-about-common-misconception

कोरोना विषयी सर्वसाधारण गैरसमज कोरोना माशांमुळे पसरतो – मध्यंतरी अमिताभ बच्चन यांनी विष्टेतून व माशांमुळे कोरोना पसरतो असे विधान केले होते. विष्टेत कोरोना आढळू शकतो पण तो या द्वारे पसरू शकतो हे अजून सिध्द झालेले नाही. तसेच माशांमुळे कोरोना पसरतो याला अजून शास्त्रीय आधार नाही. माशी इतरत्र कुठे कोरोना बाधित जागेवर बसेल व ती आपल्या त्वचेवर बसून त्यातून कोरोना होईल हे शक्य नाही. म्हणून कोरोना हा माशांमुळे पसरत नाही. इतर आजारांसाठी माशी वाहक ठरू शकते . म्हणून मात्र स्वच्छता ठेवणे व माशांचा रादुर्भाव रोखणे फायदेशीर असते.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

कोरोना डासांमुळे पसरतो – कोरोना शरीरात जाण्याचा मुख्य स्त्रोत हा कोरोना बाधित व्यक्ती कडून व काना तोंडातून श्वसन मार्गात जाण्याचाच आहे. डेंग्यू , मलेरिया प्रमाणे तो डासांच्या माध्यमातून पसरत नाही.टाळ्या वाजवल्याने हातावरचा कोरोना नाहीसा होतो – हात वाजवल्यावर १ ते १० khz इतकी कमी फ्रिक्वेन्सी निर्माण होते. विषाणू , बॅक्टेरीओया नष्ट करण्यासाठी ३० khz च्या पुढे फ्रिक्वेन्सी आवश्यक असते . म्हणून टाळ्या वाजवल्याने हातावरचा कोरोना नष्ट होणे शक्य नाही.घरगुती उपायांनी कोरोना पासून संरक्षण मिळेल – कुठले ही घरगुती औषध , नाकात तेल टाकणे , गरम पाणी पिणे याने कोरोना टाळणे शक्य नाही.

उपवास केल्याने कोरोना होणार नाही – उपवास केल्याने उलट शरीराची प्रतिकारशक्ती कमी होईल. म्हणून या काळात कोणीही उपवास करू नये. चांगला आहार घ्यावा.

कोरोना विषयी सर्वसाधारण गैरसमज भारतातील उष्ण हवामाना मुळे आपल्याला कोरोना होणार नाही. – ५६ डिग्री च्या पुढे पाणी उकळल्याने  कोरोना नष्ट होतो पण बाहेरचे तापमान जास्त आहे किंवा उष्ण हवामान आहे म्हणून कोरोना नष्ट होईल असे नाही. भारतीयांची प्रतिकारशक्ती चांगली असल्याने भारतीयांना कोरोना होणार नाही – परदेशात राहणाऱ्या भारतीयांना ही कोरोना ची बाधा झाली आहे. भारतीय वेगळे आहेत व त्यांना कोरोना होणार नाही किंवा कमी प्रमाणात होईल असे मानण्यास सध्या काही शास्त्रीय अडह्र नाही .

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

मास्क घालताना चुका टाळा

मास्क घालताना चुका टाळा

मास्क घालताना चुका टाळा सध्या सर्वांना मास्क घालण्यास सांगितले आहे. पण अनेकांना मास्क कसा घालावा हे अजून माहित नाही. मास्क घालताना व काढताना दोरीला धरूनच वापरावा. तो मास्कच्या तोंड झाकण्याच्या भागावर हात लावून वापरू नये. घालताना नाकाच्या शेंड्याच्या वर पर्यंत म्हणजे नाक सुरु होते तिथे वर पर्यंत यायला हवा. खाली हनुवटी पूर्ण झाकली जाऊन खालचा भाग पूर्ण ह्नुवटीच्या मागे जायला हवा.मास्क घालताना चुका टाळा कानाच्या मागे दोऱ्या लावताना किंवा बांधताना इतक्या घट्ट लावाव्या की चेहऱ्या वर दोन्ही बाजूला मास्क येईल तिथे फार मोकळी जागा सुटायला नको. मास्क काढत असताना परत मधल्या भागाला हात न लावता काढावा. एकदा मास्क काढल्यावर तो थोडा वेळ इतरत्र घरात ठेवला, परत वापरला – असे करू नये. घरात वापरलेला मास्क काढून ठेवल्यावर सगळ्यात मोठा धोका, लहान मुलांनी त्याला हात लावण्याचा आहे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

मास्क लावताना पुढील चुका टाळा –

  • मास्क घालताना चुका टाळा मास्क नाकाखाली म्हणजे नाकपुड्या उघड्या राहतील असे लावू नका
  • .  मास्क हनुवटीच्या वर ठेवू नका. मास्क लावल्यावर हनुवटी दिसता कामा नये
  • मास्क लावताना सैल लावल्यामुळे दोन्ही बाजूंना तो मोकळा , हवेची ये जा होऊ शकेल असा लावू नका.
  • नाकाच्या शेंड्यावर किंवा त्याच्या थोडेसे वर ठेवू नका. जितका शक्य होईल तितका शेंड्याच्या वर म्हणजे नाक सुरु होते तिथपर्यंत घ्या.
  • चष्मा नको असल्यावर जसे डोक्यावर ठेवतात तसा मास्क थोडा वेळ नको आहे म्हणून खाली ओढून मानेच्या पुढे लटकू दिला आणी नंतर परत घातला , असे करू नका .

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता