बेंबीचा फुगा – अंबीलीकल हर्निया

बेंबीचा फुगा – अंबीलीकल हर्निया साधारतः जन्मानंतर आठव्या ते नवव्या दिवशी नाळ पडते. पण काही बाळांमध्ये बेंबीच्या जागा फुगवटा तयार होतो व त्याचा आकार कमी जास्त होतो. बाळ रडताना , हसताना, खोकताना, शी – सु करताना व कुठल्याही कारणाने पोटातील दाब वाढल्यास ही सूज वाढते. इतर वेळी ती कमी ही होते. या फुगवट्यात येणाऱ्या आतड्यांचा भाग हा हाताने खाली ढकलता येतो. या फुगवट्याला अंबीलीकल हर्निया म्हंटले जाते.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

बेंबीचा फुगा – अंबीलीकल हर्निया जन्मतः बेंबी भोवतीचे स्नायू कमकुवत असल्याने हा हर्निया निर्माण होतो.बाळ जस जसे मोठे होते तसे पोटांच्या स्नायूंची ताकत वाढल्यास हा हर्निया अपोआप कमी होतो. या फुगवट्याला उपचारांची गरज नसते. सहसा हर्निया हा ६ महिन्यापूर्वी येतो व बहुतांश वेळा १ वर्षापर्यंत अपोआप नाहीसा होतो. काही अंबीलीकल हर्निया ५ वर्षापर्यंत नाहीसे होतात.

चुकीच्या उपचारांमुळे अपाय होण्याची शक्यता

बेंबीचा फुगा – अंबीलीकल हर्निया याला गैरसमजा पोटी फुगवटा कपडा किंवा चिकट पट्टीने बांधणे, त्यावर नाणे लावून बांधणे, पट्टा बांधणे असे चुकीचे व गरज नसलेले उपाय केले जातात. याची गरज नसते , फायदा ही होत नाही व त्याने अनावश्यक गुंतागुंत ही निर्माण होते.

उपचारांची / शस्त्रक्रियेची गरज कधी पडते –

  • ५ वर्षा पर्यंत सूज न गेल्यास
  • या ह्र्नियात आतडी अडकल्यास

आतडी या फुगवट्यात अडकल्याच्या पुढील लक्षणांवरून कळते

  •  आधी फुगट्यातील ज्या आतड्या मागे जायच्या त्या आता  जात नाहीत.
  •     फुगवता कडक होतो
  •     फुगवट्याची जागा लाल , निळी, काळी पडते
  •      बाळ सतत रडते व काही खात / पीत नाही
  •     फणफणून ताप येतो

ही लक्षणे अढळल्यास तातडीने बालरोगतज्ञांचा सल्ला घ्यावा.

सदरील माहिती आपण सकाळ मध्येही वाचू शकता

एन-९५ मास्क निर्जंतुक करून कसे वापरणार?

एन-९५ मास्क निर्जंतुक करून कसे वापरणार?

एन-९५ मास्क निर्जंतुक करून कसे वापरणार? सध्या रुग्णालयांसह सगळी कडे एन ९५ मास्क चा तुटवडा आहे. पण जर तुमच्या कडे ५ एन ९५ मास्क असतील तर तुम्ही घरच्या घरी निर्जंतुकीकरण करून एका व्यक्ती साठी वारंवार वापरू शकता. अनेक डॉक्टर ही अशा प्रकारे मास्क वापरत आहेत. हे पुढील प्रमाणे करता येईल-

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

  •  एन-९५ मास्क निर्जंतुक करून कसे वापरणार? ५ मास्क ला १ ते ५ असे नंबर द्यावे.
  •  गॅलरी मध्ये / मोकळ्या हवेत  ४ कागदी पिशव्या दोरीला लटकवून ठेवा व त्यांना १ ते ४ नंबर द्या.
  • शक्यतो जिथे या पिशव्या लटकवलेल्या असतील तिथे फार धूळ नसेल असे बघा.
  • पहिल्या दिवशी मास्क वापरून झाल्यावर तो १ नंबरच्या पिशवीत टाका , दुसऱ्या दिवशी नवीन मास्क वापरा व वापरून झाल्यावर  २ नंबर च्या पिशवीत टाका  अशा प्रकारे चौथा दिवस येईल तेव्हा  पाचवा मास्क वापरा व तो वापरून झाल्यावर १ नंबर च्या पिशवीत टाका व १ नंबरच्या पिशवीतील मास्क वापरा .
  • याचा अर्थ एक मास्क घातलेला असेल व चार सदैव पिशवीत असतील.
  • मोकळ्या वाऱ्यात मास्क ७२ तासात निर्जंतुक होतो यासाठी त्याला दिवस ( एक दिवस अधिक ) वापरण्या आधी मिळतो आहे.
  • या मास्कचा सूर्य प्रकाशाशी संबंध येऊ देऊ नका. कारण सूर्य प्रकाशात एन ९५ मास्क ची उपयुक्तता नष्ट होते.

 एन-९५ मास्क निर्जंतुक करून कसे वापरणार? जर मास्क एकच असेल तरी तो घरी निर्जंतुक करता येतो पण याची प्रक्रिया जरा किचकट व करायला अवघड आहे. यासाठी स्वयंपाक घरातील ओव्हनचा वापर केला जाऊ शकतो. ओव्हन मध्ये इतर कुठे ही मेटल शी मास्कचा संपर्क न येता , लाकडी क्लिपच्या सहाय्याने ती लटकवून ठेवावी. ओव्हन बंद करून ७० डीग्री तापमानावर ३० मिनिटे ओव्हन चालू ठेवावे. एवढा वेळ व तापमान एन ९५ मास्क ला निर्जंतुक करण्यास पुरेसा आहे. यासाठी प्लास्टिकची क्लिप वापरू नये.

( निर्जंतुकीकरणाच्या या दोन्ही पद्धती फक्त एन ९५ मास्क साठीच आहेत व कापडी, सर्जिकल व इतर मास्क साठी नाहीत याची नोंद घ्यावी )

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

लहान मुलांसाठी विटॅमिन डी उपयोगी

लहान मुलांसाठी विटॅमिन डी उपयोगी

लहान मुलांसाठी विटॅमिन डी उपयोगी मोठ्या व्यक्तीं प्रमाणेच लहान मुलांना अगदी जन्मापासून विटॅमिन डी ची गरज असते. हाडांसोबतच प्रतिकारशक्ती व त्यातच श्वसनाच्या जंतू संसर्गा विरोधात विटॅमिन डी चे अनन्य साधारण महत्व आहे. दमा असलेल्या मुलांमध्ये ही विटॅमिन डी ची पातळी नॉर्मल राहणे गरजेचे असते. 

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

लहान मुलांसाठी विटॅमिन डी उपयोगी आईच्या दुधात इतर सर्व घटक असतात पण विटॅमिन डी मध्ये मात्र ते कमी पडते. तसेच सकाळी १० ते ४ अर्धा तास मुलांना उन्हात ठेवणे ही व्यवहारिक नाही. त्यामुळे सर्व वयोगटातील लहान मुलांना विटॅमिन डी ची गरज असते. याला अपवाद असू शकतात असे नवजात बालक ज्यांना रोज उन्हात अंघोळ घातली जाते. जन्मा नंतर पहिल्या महिन्यात बाळाला तेलाने मसाज करून उघड्यावर सूर्यप्रकाशात अंघोळ घातली आणि १० मिनटे सूर्य प्रकाश मिळू दिला तर मात्र त्यांना विटॅमिन डी चे औषध देण्याची गरज पडणार नाही असे लहान मुलांचे संप्रेरक तज्ञ डॉ. तुषार गोडबोले सांगतात. पण पहिला महिन्यात सूर्यप्रकाश मिळत नसल्यास मात्र जन्मापासूनच विटॅमिन डी चे औषध ४०० IU रोज एक वेळा पहिले वर्ष द्यावे.  या नंतर रोज ४०० ते ६०० IU प्रती दिन देणे अपेक्षित आहे. पण रोज औषद देण्याचे कोणाला ही शक्य होत नाही व लक्षात ही राहात नाही. या साठी एक वर्षा नंतर ६०,००० IU आठवड्यातून एकदा ६ आठवडे व नंतर दर ऋतू बदलला म्हणजे प्रत्येक वेळी ऋतू बदलला की विटामिन डी एकदा द्यायला हवे. ढोबळपणे दर तीन महिन्यातून एकदा ६०,००० IU असा हा डोस येतो. याशिवाय मुलांचे उन्हात खेळण्याला प्राधान्य दिले गेले पाहिजे.लहान मुलांसाठी विटॅमिन डी उपयोगी शाळांमध्ये खेळण्याचे तास हे सकाळी १० ते दुपारी ४ च्या दरम्यान ठेवण्यात यावे. एरवी कुठल्या ही गोष्टी साठी रक्त घेतले जात असेल तेव्हा मुलांच्या रक्तातील विटामिन डी चे प्रमाण तपासून पाहावे. पण आवर्जून हे तपासण्यासाठी रक्त घेऊ नये. हे प्रमाण ५० ng / ml च्या वर असल्यास पुरेसे समजावे. त्या खाली असल्यास पूर्ण उपचारासाठी वया प्रमाणे डोस द्यावा लागतो. त्यासाठी आपल्या बालरोगतज्ञांचा सल्ला घ्यावा.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

विटॅमिन डी घेण्यास हरकत नाही

विटॅमिन डी घेण्यास हरकत नाही

विटॅमिन डी घेण्यास हरकत नाही विटॅमिन डी म्हणजेच ड जीवनसत्व हे प्रतिकारशक्ती साठी खूप महत्वाचे असते. विटॅमिन  डी घेतल्यावर कोरोना होणारच नाही असे म्हणता येणार नाही. पण मात्र कोरोनाचा संसर्ग झाला तर विटॅमिन  डी ची पातळी शरीरात नॉर्मल असल्यास कोरोनाशी लढण्यास त्या व्यक्तीचे शरीर अधिक सक्षम असेल. तसेच कोरोना मधील मृत्यू साठी कारण ठरत असलेली ‘एआरडीएस’ म्हणजे फुफ्फुससाला इजा होऊन ती निकामी होण्याचे प्रमाण ही विटॅमिन  डी शरीरात नॉर्मल असल्यास कमी प्रमाणात होऊ शकते. किंवा ते झाले तरी बरे होण्यास विटॅमिन  डी ची मदत होऊ शकते. याशिवाय सायटोकाईन या कुठल्याही जंतुसंसर्गात थोड्या प्रमाणात स्त्रवणाऱ्या एका घटकाचे  कोरोनाच्या गंभीर होणाऱ्या रुग्णांमध्ये मात्र  शरीरात वादळ येते.याला सायटोकाईन स्टॉर्म असेच म्हणतात. हे थोपवण्यात ही विटॅमिन  डी उपयोगी पडते.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

    विटॅमिन डी घेण्यास हरकत नाही विटॅमिन  डी हे आपल्याला अन्नातून फारसे मिळत नाही. याचा महत्वाचा स्त्रोत असतो सूर्य प्रकाश. पण सूर्यप्रकाशातून विटॅमिन  डी पुरेशा प्रमाणात मिळवण्यासाठी रोज सकाळी १० ते दुपारी ४ च्या दरम्यान कधीही अर्धा तास कमीत कमी ( अर्ध्या बाहीचा पातळ शर्ट व अर्धी चड्डी ) कपडे घालून उन्हात थांबून आपल्या त्वचेचा जास्तीत संपर्क सूर्य प्रकाशाशी येऊ दला पाहिजे. पण आजच्या युगात हे कोणाला ही शक्य नाही. म्हणून देशातील ८० टक्के लोकांमध्ये विटॅमिन  डी ची कमतरता आहे. खर तर या कमतरतेमुळे हाडांच्या ही अनेक समस्या निर्माण होतात. म्हणून कोरोनाच्या साथी आधी विटॅमिन  डी कमतरतेची दुर्लक्षित साथ अनेक दशकांपासून आपल्या देशात सुरु आहे. कोरोनाच्या निमित्ताने सगळ्यांनी विटॅमिन  डी घेऊन ही विटॅमिन  डी कमतरतेची  साथ संपवता येईल. यासाठी ६०,००० IU विटामीन डी दर आठवड्याला ८ आठवडे १२ वर्षा पुढील सर्वांनी घेण्यास हरकत नाही. या नंतर दर महिन्याला एकदा ६०,००० IU घ्यावे. विटॅमिन डी घेण्यास हरकत नाही विटॅमिन  डी घेताना रिकाम्या पोटी घेऊ नये. जेवणानंतर घ्यावे कारण ते चरबीत विरघळणारे विटॅमिन  असल्याने जेवणा सोबत शरीरात चांगल्या प्रकारे शोषून घेतले जाते. शक्य झाल्यास दर वाढदिवसाला आपल्या रक्तातील विटॅमिन  डी ची पातळी तपासून पहावी. तिचे प्रमाण पुढील प्रमाणे असते

अपेक्षित नॉर्मल पातळी – ५० – ६० नॅनो ग्रॅम प्रती मिलीलीटर ( ng / ml )

पातळी कमी / अपुरी  असणे – २० – ३० ng/ml तीव्र कमतरता – २० ng / ml पेक्षा कमी

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

अनेकजण वापरात असलेल्या नेबुलायझरपासून सावधान

अनेकजण वापरात असलेल्या नेबुलायझरपासून सावधान

अनेकजण वापरात असलेल्या नेबुलायझरपासून सावधान आपल्याकडे वर्षानुवर्षे सर्दी खोकल्यासाठी रुग्णालयात किंवा घरी नेबुलायझरने  वाफ घेणे सुरु आहे. खर तर दमा व अलर्जी सोडून इतर नियमित येणाऱ्या ताप, सर्दी, खोकल्याला अशा नेबुलायझर मधून वाफ घेण्याची गरज नसते. यातून बाळाच्या पालकांना फक्त खोकल्यासाठी काही तरी करत असल्याचे मानसिक समाधान मिळत असते.आता तर दम्याच्या रुग्णांना ही फक्त इन्हेलर म्हणजे मीटर्ड डोस इन्हेलरचाच वापर करावा व त्यांच्यासाठी ही नेबुलायझरची गरज नाही असे आतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्वे सांगतात.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

अनेकजण वापरात असलेल्या नेबुलायझरपासून सावधान सध्या कोरोना साथीच्या काळात तर हॉस्पिटल / क्लिनिकच्या वेटिंग रूममध्ये कोपऱ्यात असलेल्या एकाच नेबुलायझर मधून अनेक मुलांना नेब्यूलायजेशन देणे हे घातक ठरू शकते. अनेकजण वापरात असलेल्या नेबुलायझरपासून सावधान या निमित्ताने वैद्यकीय क्षेत्रातून साध्या सर्दी खोकल्यासाठी नेबुलायझर ही परंपराच हद्दपार करावी. जर दमा , अॅलर्जी नेबुलायझर वापरण्याची वेळ येतच असेल तर आपल्या बाळासाठी नवा आणि वेगळा नेबुलायझर वापरावा. नेबुलायझरचा सर्वात मोठा धोका म्हणजे जर कोरोना बाधित रुग्ण इतरांसमोर नेब्यूलायजेशन  घेत असेल तर यातून उडणारे श्वासाचे कण हे अधिक दूरवर उडून इतरांना ही संसर्ग करू शकतात. तसेच निश्चित निदान झालेल्या रुग्णाला नेबुलायझर चा वापर करावा लागलाच तर तो बंद खोली मध्येच करावा व नंतर ही जागा सोडियम हायपोक्लोराईट ने निर्जंतुक करून घ्यावी. घरात दोन मुले असतील तर त्यांचे ही नेबुलायझर एकमेकांना वापरू नये. दम्याचे रुग्ण असतील तर इन्हेलर ही प्रत्येकाने ज्याचे त्याचे वापरावे. नेबुलायझर प्रमाणे इन्हेलर मधून श्वासाचे कण बाहेर उडत नाहीत.  या बाबतीत एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे उपयोगी असलेल्या इन्हेलर बद्दल पालकांना याची सवय लागेल का म्हणून शंका असते. पण फार से उपयोगाचे नसलेले नेबुलायझर मात्र त्यांना हवेहवेसे असते. कोरोनाच्या निमित्ताने हे सर्व गैरसमज दूर झाले पाहिजे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

चाचणीचे निकष बदला

चाचणीचे निकष बदला महाराष्ट्रात करोना चाचण्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे, यापलीकडे जात तपासणीचा गुणात्मक दर्जा कसा सुधारता येईल आणि तपासणीचे निकष सीमित असल्याने आपण निदान करण्यात कमी पडतो आहोत का, हे पाहायला हवे. याचे कारण उशिरा निदानामुळे मृत्यूचे प्रमाण खूप आहे. आमची तपासणी जास्त म्हणून केस जास्त, या युक्तिवादापेक्षा आपण कुठे सुधारणा करू शकतो, हे जाणून घेणे योग्य ठरेल.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

चाचणीचे निकष बदला सध्या मुंबई ही देशाची करोना राजधानी आहे; म्हणून मुंबईत करोना कसा रोखला जाईल, ही लिटमस टेस्ट असेल. करोनाचे ६९ टक्के रुग्ण लक्षणहीन असतात. तेच ‘सुपर स्प्रेडर’ म्हणजे, जास्त लोकांना व झपाट्याने संसर्ग देणारे ठरत आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या चाळणीत तपासणीचे निकष बदलले असल्याने हे रुग्ण निसटून जात आहेत. मुंबईमध्ये संपर्कात आलेल्या प्रत्येकाची चाचणी न करता, ज्यांच्यामध्ये लक्षणे दिसतात, त्यांचीच तपासणी होत आहे. यामुळे संपर्कात आलेल्यांचे विलगीकरण की होम क्वारंटाइन, हा निर्णय घेण्याचा पायाच खिळखिळा झाला आहे. होम क्वारंटाइन हा प्रकार दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये अपयशी ठरूनही, संपर्कात आलेल्या सर्वांना न तपासण्याची जोखीम का घेतली जाते? राज्यात वेगळाच प्रश्न आहे. तपासणीसाठी ‘सारी’ म्हणजे ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास हा निकष शासकीय यंत्रणेत पाळला जातो आहे. आता करोनाचे रुग्ण या मर्यादित लक्षणांसह येत नाहीत. इतर विविध लक्षणे आढळणारे रुग्ण रुग्ण तपासणीसाठी शासकीय यंत्रणेत पाठवले, तर संशयिताच्या व्याख्येत बसत नाहीत, म्हणून सरकारी करोना तपासणी केंद्रात त्यांची तपासणी नाकारली जाते. त्या रुग्णांची प्रकृती गंभीर झाल्यानंतरच्या तपासणीत ते पॉझिटिव्ह आढळतात. यामुळेच संशयितांची तपासणी अधिक व्यापक करणे आवश्यक आहे. केसचे निदान हुकणे या घडीला अजिबात परवडणारे नाही. तपासणी व्यापक केल्यास ‘उशिरा निदान’ या मृत्यूच्या प्रमुख कारणाला अटकाव करता येईल.
संशयित ही व्याख्या कशी बदलते, हे काही उदाहरणांवरून स्पष्ट होईल. महाडचे डॉ. हिंमतराव बावस्कर यांनी पहिला रुग्ण पाहिला. त्याला अनियंत्रित जुलाबांचा त्रास होता व बऱ्याच उशिरा श्वसनाचा त्रास झाला. या रुग्णाचा पुढे मृत्यू झाला. उपचाराला प्रतिसाद न देणारे अनियंत्रित जुलाब, हे नेहमीपेक्षा वेगळे लक्षण दिसल्याने, त्यांना तो रुग्ण करोना संशयित असल्याचे जाणवले. रुग्णाच्या पतीला फक्त भूक लागत नव्हती. पत्नीचा मृत्यू झाल्यावर तपासणी केली असता तोही करोनाग्रस्त आढळला. खारघरचे डॉ. एस. व्ही. कुलकर्णी यांच्या मते, ज्येष्ठ नागरिकांमधील थकवा येणे आणि सतत झोपेत राहणे, या दोन लक्षणांचे रुग्ण पुढे करोनाग्रस्त आढळू शकतात. संशयित रुग्ण ठरवताना, नातेवाइकांच्या मताला महत्त्व देणे आवश्यक आहे. नेहमी आजारी पडल्यास आपला नातेवाइक कसा असतो, कसा प्रतिसाद देतो, हे घरात माहीत असते. ‘आधी सर्दी-खोकला असताना इतका आजारी वाटायचा नाही आणि दोन दिवसांत झपाट्याने कोसळणारी तब्येत,’ हे नातेवाइकांचे मत तपासणी करण्यास पुरेसे आहे.

चाचणीचे निकष बदला कान-नाक-घसा तज्ज्ञांकडे घ्राणशक्ती कमी झाल्याचे, करोनाचे पहिले लक्षण घेऊन रुग्ण येत आहेत. अर्धांगवायू व मेंदूशी संबंधित लक्षणे करोनामध्ये दिसत आहेत. हा नवा आजार आहे. ‘सारी’ हे सर्वाधिक आढळणारे लक्षण असले, तरी अशा एकाच पॅटर्नमध्ये करोना येणार नाही, हे सरकारने समजून घ्यायला हवे. ‘हाय क्लिनिकल सस्पिशन,’ म्हणजे ‘लक्षणांवरून संशय गडद होणे,’ हे डॉक्टरांचे मत तपासणी करताना ग्राह्य धरावे, असे शासनाला ठरवावे लागेल. करोना निदान झालेले रुग्ण पहिल्या दिवसापासून नेमकी कुठली लक्षणे घेऊन आले आहेत, याची माहिती संकलित करून, ती डॉक्टरांना उपलब्ध करून दिल्यास, करोना कसा वागतो आहे, या ज्ञानात भर पडून, त्याचे निदान लवकर होईल. एका अॅपद्वारे ही माहिती संकलित करून, डॉक्टरांना त्यांच्याकडील करोनारुग्ण कसा आला, हेही सांगण्याची सोय करता येईल.
तपासणी किती वेळा केली आहे, याबरोबर तपासणी कशी केली जाते आहे, यावर सध्या कुठलेही नियंत्रण नाही; म्हणून सुरुवातीला करोनामुक्त आलेले रुग्ण, नंतर मृत्युशय्येवर असताना करोनायुक्त आढळतात किंवा लक्षातही येत नाहीत. तपासणी करताना नाकातून द्राव घेतल्यास तो युक्त येण्याचे प्रमाण ६३ टक्के आहे, तर घशातून घेतल्यास ३२ टक्के आहे. निदानाची शक्यता वाढविण्यासाठी हे दोन्ही द्राव घेणे आवश्यक असल्याचे आयसीएमआरचे निर्देश आहेत; पण बऱ्याच ठिकाणी फक्त घशातून द्रावनमुना घेतला जातो आहे. हा ग्राउंड रिपोर्ट शासनापर्यंत पोहोचत नाही; त्यामुळे रुग्णांचा खरा आकडा समोर येत नाही. याचे कारण नाकातून स्वॅब घेताना, शिंक येण्याची शक्यता जास्त असते; म्हणून तो घेणाऱ्याला धोका वाढवतो. तुलनेने, घशातून स्वॅब घेणे सोपे आहे. स्वॅब घेणारे सुरक्षित राहावेत, यासाठी काचेच्या चेम्बरमधून स्वॅब घेण्याची सोय करण्यात यावी, अशी मागणी पहिल्या फळीतील आरोग्य कर्मचाऱ्यांनी वारंवार केली आहे. अजूनही ती शासनापर्यंत पोहोचलेली नाही. सध्या अनेक खासगी ठिकाणी तपासणी सुरू आहे. यात कुठल्याही नव्या व्यक्तीला जाहिरात देऊन स्वॅब घेण्यासाठी नेमले जाते आहे, म्हणून याची सुसूत्रता अधूनमधून तपासून पाहणे गरजेचे आहे. स्वॅब घेतल्यावर त्याची वाहतूक थंड डब्यातून होते का आणि तपासणी केंद्रात त्यांची तपासणी चार तासांत होते की नाही, याची दक्षता खासगी निदान केंद्रांनी घेणे गरजेचे आहे. तपासणी करतानाच्या प्रात्यक्षिकाचे केवळ चित्रण पाठवून भागणार नाही, तर त्याचे वारंवार प्रात्यक्षिक (मॉक) करून, तपासणीत काटेकोरपणा आणावा लागेल.

चाचणीचे निकष बदला शासकीय पातळीवर स्वॅब घेताना, रिपोर्ट येईपर्यंत सर्व संशयितांना एकाच कक्षात ठेवले जाते. त्यानंतर युक्त व मुक्त वेगळे केले जातात; पण तपासणी अहवाल येईपर्यंत, या दोन्हींचा संपर्क येऊन, या समूहातील करोना नसणाऱ्यांना संसर्गाचा धोका आपण वाढवत असल्याचे सूक्ष्म निरीक्षण लक्षात येत नाही. सर्वांचे तपासणी अहवाल एकाचवेळी येत असल्याने, निगेटिव्ह रुग्ण घरी जातात. निश्चित संपर्कामुळे ते पुढे लक्षणविरहीत करोना पसरवणारे ठरू शकतात; म्हणूनच तपासणी अहवाल येईपर्यंत या सर्वांचे आठ ते दहा तास विलगीकरण काटेकोरपणे, शक्यतो वेगळ्या खोल्यांमध्ये व संपर्कविरहीत असायला हवे. मुंबई आणि पुणे ही मोठी शहरे सोडून इतरत्र जागेचा प्रश्न फार कळीचा नाही. तेथे वेगळ्या खोल्या वापरल्या जाऊ शकतात. प्रत्येक पायरीवर तपासणी आणि केसचा शोध परिपूर्ण कसा करता येईल, यावर भर देणे गरजेचे आहे. या काही गोष्टी पाळल्यास करोनाविरोधातील लढ्यास त्या अतिशय उपयुक्त ठरतील.

सदरील माहिती आपण  महाराष्ट्र टाईम्स मध्येही वाचू शकता

नियमित बीसीजी सोडून घाई नको

नियमित बीसीजी सोडून घाई नको

नियमित बीसीजी सोडून घाई नको ज्या देशांमध्ये सार्वत्रिक बी.सी.जी लसीकरण अनेक वर्षांपासून केले गेले त्या देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव इतर देशांच्या मानाने कमी प्रमाणात झाला असे एक निरीक्षण आहे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

नियमित बीसीजी सोडून घाई नको बीसीजी शरीरातील इनेट इम्युनिटी म्हणजे प्रतिकारशक्ती बळकट करते व कोरोना टाळण्यास व झाला तरी शरीराला त्या विरुद्ध लढण्यास सक्षम बनवते  असा एक कयास आहे. त्यातूनच आरोग्य क्षेत्रात काम करणारे व कोरोनाचा थेट संपर्क आलेल्यांना बीसीजी लस द्यावी का असा एक विचार जगभरात पुढे आला. पण लॅन्सेट या वैद्यकीय मासिकात ३० एप्रिल रोजी कोरोना टाळण्यासाठी आरोग्य कर्मचारी व इतरांना बीसीजी देण्याविषयी सतर्कतेचा इशारा दिला. तसेच या बद्दल अजून पुरेसा संशोधनात्मक पुरावा नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे. हे जाणून घेणे महत्वाचे यासाठी आहे कि माध्यमांमध्ये बीसीजी मुळे कोरोना टाळण्यास मदत होऊ शकण्याची शक्यता वर्तवणाऱ्या बातमी आल्या असल्याने अनेक जन आम्ही ही लस परत घ्यावी का ? असे प्रश्न डॉक्टरांना विचारत आहेत. याचे उत्तर ‘नाही’ असेच आहे. नियमित बीसीजी सोडून घाई नको लहान मुलांना ही जन्माच्या वेळी लस दिलेलीच असते. त्यांना ही लस परत ज्ञाची गरज नाही. कोरोना टाळण्यासाठी जर बीसीजीने  काही फायदा व्हायचा असेलच तर तो जन्माच्या वेळी आपण सगळ्यांनी घेतलेल्या बीसीजीनेच होईल.  १९७८ पासून देशात सार्वत्रिक बीसीजी लसीकरण सुरु झाले. म्हणून त्या आधी जन्म झालेल्यांनी बीसीजी घेण्याची घाई करू नये. मात्र सध्या जन्मानंतर लहान मुलांना नियमित बीसीजी लसीकरण मात्र सुरु ठेवावे. सिद्ध झालेले नसताना उगीचच बीसीजी घेतल्याने त्याचा उपयोग होणार नाहीच व तुटवडा निर्माण होऊन नियमित लसीकरणासाठी बीसीजी उपलब्ध होणार नाही.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

कुठले हँड सॅनिटायझर सर्वोत्तम

कुठले हँड सॅनिटायझर सर्वोत्तम

कुठले हँड सॅनिटायझर सर्वोत्तम सध्या अनेक कंपन्यांचे हँड सॅनीटायझर उपलब्ध आहेत. तसेच जाहिरातीतून ९९.९ % हातावरील विषाणू व जीवाणू नष्ट करत असल्याचे दावे हे केले जात आहेत. पण इतक्या अचूकतेने असे दावे करणे चुकीचे आहे व कुठले ही सॅनिटायझर ९९ % विषाणू, जीवाणू नष्ट करेल हे खात्रीशीर रित्या सांगता येणार नाही. यासाठी साबणाने हात धुणे याला पर्याय नाही व हँड सॅनिटायझर ही केवळ एक लग्झरीआहे. सांगण्याचे तात्पर्य साबणाने हात धुण्याची जागा हँड सॅनिटायझर र घेऊ शकत नाही. पण पाण्याची उपलब्धता व बाहेर गेल्यावर हात धुण्याची सोय नसल्यास हँड सॅनिटायझर चांगला पर्याय ठरतो. बाजारात उपलब्ध असलेल्या पैकी चांगला हँड सॅनिटायझर कुठला हे आपल्याला ओळखता आले पाहिजे .

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

       कुठले हँड सॅनिटायझर सर्वोत्तम अल्कोहोल हा हँड सॅनिटायझरचा मुख्य घटक असतो. पण कुठले व किती टक्के अल्कोहोल वापरेल आहे त्यावरून हँड सॅनिटायझरची उपयुक्तता सिध्द होते. साधारण तीन ते चार प्रकारचे व टक्केवारी मध्ये अल्कोहोल वापरेल जाते. प्रोपेनेलॉल, डी नेचर्ड अल्कोहोल, इथिल अल्कोहोल, आयसो प्रोपील अल्कोहोल हे ते चार प्रकारचे अल्कोहोल असतात. त्यांची परीणामकारकता वरील नावे लिहिली आहेत  क्रमाने जास्त ते कमी अशी असते. यात ७५ % प्रोपेनेलॉल असलेले सर्वाधिक परिणामकारक असते. हे कोरोना साठीच नव्हे तर इतर सर्व विषाणू – जीवाणूला हा क्रम लागू पडतो. ज्या हँड सॅनिटायझर मध्ये प्रोपेनेलॉल सोबत मेसेट्रोनियम इथिल सल्फेट असते त्याची परिणाम कारकता सर्वाधिक वेळ म्हणजे ३ ते ५ तास टिकून राहते. सर्वात परिणामकारक हँड सॅनिटायझर वापरला तरी त्याचा परिणाम ४ ते ६ तासच राहतो. सध्या उपलब्ध असलेल्या जेल आणि पातळ हँड सॅनिटायझर पैकी पातळ हँड सॅनिटायझर जास्त परिणामकारक असतो कारण तो हातांच्या सूक्ष्म भेगां पर्यंत पोहोचू शकतो. जेलच्या स्वरूपातला मात्र त्वचेच्या खोलवर पोहोचू शकत नाही व वरच्या भागावरच थर बनून राहतो. अनेकांना जास्त हँड सॅनिटायझरच्या वापरामुळे जास्त झोप येणे / गुंगल्या सारखे वाटणे हा त्रास होतो आहे. त्यातच डॉक्टरांना सध्या हँड सॅनिटायझर जास्त प्रमाणात वापरावे लागते. त्यासाठी हातावर हँड सॅनिटायझरचा घेताना एका बाजूला म्हणजे सॅनिटायझर समोर चेहरा येणार नाही असे बघाव.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

हात ऐवजी कोपराचा आणि करंगळीचा वापर करा

हात ऐवजी कोपराचा आणि करंगळीचा वापर करा

हात ऐवजी कोपराचा आणि करंगळीचा वापर करा मऊ लागले म्हणून कोपराने खणणे किंवा कोपरा पासून नमस्कार करणे म्हणी आपण नेहमी ऐकत आलो आहोत. पण कोरोनामुळे मात्र आता आपल्याला कोपराचा वापर अनिवार्य झाला आहे. जिथे जिथे शक्य आहे तिथे कोपराचा वापर करणे सुरु करावे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

हात ऐवजी कोपराचा आणि करंगळीचा वापर करा हात हे कोरोना आपल्या शरीरात प्रवेश करण्याचे मुख्य वाहन आहे. कोरोना फक्त कोरोना ग्रस्त व्यक्तीच्या संपर्कानेच येतो असे नाही. अनेक वस्तूंवर कोरोना तीन दिवसांपर्यंत राहतो. पुढील तीन दिवसात कोरोना ग्रस्त माणसाच्या संपर्कात आलेल्या वस्तूने ही हा पसरू शकतो. पण याला आपला हात लागला नाही तर धोका नाही. म्हणून दार उघडणे, लाईट चालू / बंद करणे, लिफ्ट चे बटन दाबणे, नळ चालू करण्यासाठी त्यातच शौचालयाचा नळ चालू / बंद करण्यासाठी , खुर्ची सरकवणे, टेबला वरील एखादी गोष्ट सरकवणे, फ्रीज उघडणे / बंद करणे  यासाठी  कोपराचा वापर केला जाऊ शकतो. याशिवाय दिवसभर निरीक्षण करून जिथे जथे कोपराचा वापर करणे शक्य आहे तिथे करणे सुरु करावे. घरी आल्यावर किंवा दिवसातून तीन चार वेळा वाइप्स वर हँड सॅनीटायझर टाकून, त्याने कोपरा स्वच्छ करून घ्यावा. कोपरा प्रमाणेच करंगळी आणि त्यातच जो हात आपण सहसा वापरत नाही त्या करंगळीचा वापर करायला शिकव. आपल्या नॉन – डॉमिनंट ( जो जास्त वापरात येत नाही असा ) हाताची करंगळी आणी चेहऱ्याचा सगळ्यात कमी संपर्क येतो. त्यामुळे दार दांड्याला पूर्ण हात लावून ओढ्ण्यापेक्षा जास्त वापरत नसलेल्या  करंगळीने ओढा. तसेच फोन ची बटनेची बटने दाबण्यासाठी  किंवा कोपराने चालू बंद करणे शक्य नाही अशी उंची वरची बटने या करंगळी ने दाबा. याने कुठे हात लागला तरी त्याचा चेहऱ्याशी संपर्क येणार नाही. वापरात नसलेल्या हाताची करंगळी वापरल्याने अजून एक फायदा होईल. याने तुमचा वापरात असलेल्या हाताच्या बाजूचा मेंदू सक्रिय होईल व याचे मानसिक पातळीवर फायदे असतात.  अर्थात कुठून ही आल्यावर आणि हात लागल्यावर हात मात्र पूर्ण धुवावे. हात ऐवजी कोपराचा आणि करंगळीचा वापर करा आपल्या नॉन – डॉमिनंट ( जो जास्त वापरात येत नाही असा ) हाताची करंगळी आणी चेहऱ्याचा सगळ्यात कमी संपर्क येतो. त्यामुळे दार दांड्याला पूर्ण हात लावून ओढ्ण्यापेक्षा जास्त वापरत नसलेल्या  करंगळीने ओढा. तसेच फोन ची बटनेची बटने दाबण्यासाठी  किंवा कोपराने चालू बंद करणे शक्य नाही अशी उंची वरची बटने या करंगळी ने दाबा. याने कुठे हात लागला तरी त्याचा चेहऱ्याशी संपर्क येणार नाही. वापरात नसलेल्या हाताची करंगळी वापरल्याने अजून एक फायदा होईल. याने तुमचा वापरात असलेल्या हाताच्या बाजूचा मेंदू सक्रिय होईल व याचे मानसिक पातळीवर फायदे असतात.  अर्थात कुठून ही आल्यावर आणि हात लागल्यावर हात मात्र पूर्ण धुवावे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

कोरोनामध्ये मुलांचे भावनिक व्यवस्थापन

कोरोनामध्ये मुलांचे भावनिक व्यवस्थापन

कोरोनामध्ये मुलांचे भावनिक व्यवस्थापन कोरोना संकट काळात लहान मुलांच्या मानसिकतेसंबंधी पुढील काळजी घ्यावी –

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

  • कोरोनामध्ये मुलांचे भावनिक व्यवस्थापन या काळात आपली ही चिडचिड, मुलांना रागवणे स्वाभाविक आहे कारण मुले घरात फार काळ घरात राहिली कि बरेच उपदव्याप करतात . अशा वेळी त्यांना घरात बिनधास्त खेळू द्यावे. फक्त त्यांच्या सुरक्षिततेला धोका नसेल अशी काळजी घ्यावी व तेव्हाच रागवावे.
  • चुकून. मुलांना जास्त रागवण्यात आल्यास त्यांना लगेच जवळ घ्यावे व त्यांना तुम्ही का रागावले हे सांगून तीच गोष्ट परत शांतेत समजून सांगावी.
  • मुलांना सकारात्मक गोष्टी सांगाव्या व गोष्टींमध्ये कोरोनाचे संदर्भ टाळावे. रात्री झोपताना मुलांना झोप येत नसल्यास कोरोनाच्या नावाने घाबरवू नये.
  • मुलांना गोष्टी सांगायला लावून, चित्र काढायला लावून त्यांच्या मनात लपून राहिलेल्या भावना बाहेर येऊ द्या .
  •  मुलांच्या सगळ्या जबाबदाऱ्या एकाच पालकावर टाकण्याऐवजी त्या दोघांमध्ये वाटून घ्या.
  • मुलाला भीती वाटत  असल्यास त्यांना जवळ घ्या व त्यांची भीती कमी करा.
  •  जर आपल्या सोसायटीत कोरोनाचा एक ही रुग्ण नसल्यास व कोणाच्या ही घरात सर्दी खोकल्याचा त्रास नसल्यास काही घरातील मुलांनी एकत्र येऊन खेळण्यास हरकत नाही.
  • या काळात मुलांना घरातील कामे, भांडी घासणे, सामान आणून देणे यात सहभागी करून घ्याव.

कोरोनामध्ये मुलांचे भावनिक व्यवस्थापन या निमित्ताने आपण कुटुंब म्हणून जवळ आलो आहोत व मुलांच्या संपर्कात आलो आहोत तर विविध वयात मुलांच्या भावनिक गरजा काय असतात ते ही जाणून घेणे गरजेचे आहे

  • 0 – ५ वर्ष
  • मिठी मारणे व जवळ घेणे.
  • हसणे व त्यांच्या सोबत खेळणे.
  • प्रेम आणि काळजी
  • डोळ्यात बघणे व त्यांच्या लक्ष देणे कडे  
  • ६ – ९ वर्ष
  • त्यांच्याशी बोलणे व त्यांचे म्हणणे लक्ष देऊन ऐकणे
  • त्यांच्या खेळत सहभागी होऊन आपण मजा घेतोय हे दाखवणे
  • त्यांच्या प्रश्नांना उत्तरे
  • त्यांच्या खेळत किंवा उपक्रमात सक्रीय सहभाग
  • १० – १२ वर्ष
  • आधार व मार्गदर्शन
  • प्रेरणा व त्यांच्या मतांना होकार
  • नियमांसाठी कारणे सांगावी लागतात
  • जबाबदारी देणे  आणी त्यांची मते न रागावता स्वीकारणे
  • १३ – १८ वर्ष
  • चर्चा व शांतेत वाद विवाद
  • दिशा देणे व
  • कडक नियम न सांगता सर्वमान्य मार्गदर्शक तत्व सांगणे
  • मान देणे व मत मांडण्याचे स्वातंत्र्य देणे  

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता