कोरोना प्रतिबंध आणि शासन

कोरोना प्रतिबंध आणि शासन

कोरोना प्रतिबंध आणि शासन कोरोना संदर्भात स्वच्छतेच्या मुलभूत नियमांचा आता पुरेसा प्रचार झाला आहे. शासन आता जितक्या आक्रमकपणे आणि विचारपूर्वक साथ नियंत्रणाचे, प्रतिबंधाचे काम करील तेवढे नुकसान कमी होईल. ‘घाबरू नका’ असे सांगताना शासनाकडून ठोस कृती होणे गरजेचे आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.

देशभरातील व राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने आता पुढील काही काळ न घाबरता सतर्क मात्र राहावे लागणार आहे. कोरोना टाळण्यासाठी स्वच्छतेच्या मुलभूत नियमांचा आता पुरेसा प्रचार झाला आहे, पण या उपायांच्या प्रचारापलीकडे आता शासनालाही महत्वाची भूमिका बजावावी लागणार आहे. आता पर्यंत परदेशातील ज्या देशांनी कोरोनाचा सामना केला त्यात सिंगापूर आणि दक्षिण कोरिया या दोन्ही देशातील कोरोनाच्या उपायांचे प्रारूप हे सध्या आदर्श व अभ्यासण्याजोगे आहे. खरेतर आपण ही तयारी चीन मधून इतर देशांत साथ पसरली तेव्हाच करायला हवी होती. कोरिया आणि सिंगापूर या देशांनी पहिला रूग्ण निश्चित होण्याअगोदरच प्रत्येक शहरात स्क्रीनिंग व निदान करण्यासाठी मुबलक प्रमाणात डायग्नोस्टीक किट्स उपलब्ध करून दिल्या. एवढेच नव्हे तर ट्रॅवल थ्रू म्हणजे गाड्या थांबतात तिथेही तुम्हाला तातडीने करोनाची चाचणी करण्याची सोय होती.

कोरोना प्रतिबंध आणि शासन- आपली सार्वजनिक आरोग्य व्यवस्था आधीच गाळात असताना एवढी मोठी अपेक्षा केली जाऊ शकत नाही. पण सध्या असलेली कोरोना तपासणी केंद्रे आणि आयसोलेशन वॉर्ड्स कमी पडण्याची दाट शक्यता आहे. सध्या मुंबई शहरासाठी कस्तुरबा रूग्णालयातील ५८ खाटा व इतर ३० खाटाही खूपच कमी आहेत. राज्यात ३९ ठिकाणी असलेले आयसोलेशन कक्ष ही अपुरे आहे व संख्या वाढवण्याची गरज आहे, कारण कोरोना बाधितांची संख्या अचानक वाढू शकते. आयसोलेशन वॉर्ड नेमका कसा असला पाहिजे याचा शास्त्रशुद्ध अभ्यासही गरजेचा आहे. अगदीच प्रत्येक वॉर्ड वातानुकुलीत असण्याच्या आदर्श व्यवस्थेची अपेक्षा आधीच मोडकळीला आलेल्या आणि अनेक आजारांचा ताण असलेल्या आरोग्य व्यवस्थेकडून करता येणार नाही. पण किमान दोन बेड मधील १ मीटरचे अंतर , दोन बेड मध्ये पार्टीशन नाही तर किमान स्क्रीनने त्यांचे विलगीकरण, प्रत्येक रुग्णाला तपासताना डॉक्टर व पॅरामेडिकल स्टाफसाठी वेगळे प्रतिबंधक साहित्य, रुग्णाचा केसपेपर वॉर्डच्या बाहेर ठेवणे या प्राथमिक मार्गदर्शक तत्वांचा अवलंब होणे आवश्यक आहे. तसेच या आयसोलेशन वॉर्ड मध्ये कार्यरत असणाऱ्यांचे या विषयी प्रशिक्षणही गरजेचे आहे. ज्यांचे निदान निश्चित झाले आहे त्यांच्यासाठी आयसोलेशन व ज्यांचा अशा रुग्णांशी संपर्क आलाय पण अजून काही त्रास नाही व निदानही निश्चित नाही अशांसाठी विलगीकरणाचाही (क्वारनटाइन) गांभीर्याने विचार करावा लागणार आहे. आयसोलेशन व क्वारानटाइन या दोन्हीसाठी एकच वॉर्डच नव्हे तर एकच रुग्णालय वापरणेही घातक ठरू शकते. ‘होम क्वारनटाइन’ म्हणजे संपर्क असलेल्यांनी घरीच थांबा हे सांगितले जात असले तरी यावर कोणाचेही नियंत्रण नाही. म्हणून साथ पसरण्याआधीच विलगीकरणासाठी वेगळी समांतर यंत्रणा निर्माण करता येते का याचा विचार होणे गरजेचे आहे. आयसोलेशन किती दिवसांसाठी आवश्यक आहे यावरही तज्ज्ञांचे मत घेऊन शासनाने निर्णय घ्यायला हवा. परदेशातील अभ्यासानुसार कोरोनाचे रुग्ण श्वासाद्वारे ३० दिवसांपर्यंत आणी सरासरी २० दिवसांपर्यंत विषाणू सोडत होते. सध्या आयसोलेशन १४ दिवसांचे आहे ते २० दिवसांचे तरी करायला हवे. हे सगळे आता साथीच्या सुरुवातीच्या पातळीवरच गरजेचे व शक्यही आहे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

कोरोना प्रतिबंध आणि शासन -किती रूग्ण सापडेस्तोवर नेमक्या कुठल्या उपाय योजनांना प्राधान्य व भर द्यायचा या विषयी शासन सध्या गोंधळून गेलेले दिसते आहे. दक्षिण कोरियाने ‘स्क्रीन, टेस्ट, ट्रीट आणि आयसोलेट’ या चार गोष्टींवर एक महिना पूर्ण भर दिला व देशातील आधीच सज्ज असलेल्या आरोग्य यंत्रणेने एका दिवसात २५,००० तपासण्या आणि किमान ६ व कमाल २४ तासात टेस्टचा रिपोर्ट हा नियम पाळला. आज महाराष्ट्रात केवळ तीन ठिकाणीच तपासणीची सोय आहे, उद्या ग्रामीण भागात ही साथ पसरली तर तेथील डॉक्टरांनी या रुग्णाला आयसोलेशनसाठी नेमके कुठे पाठवायचे याची निट माहिती कोणालाही नाही. तालुका पातळीवर जिथे उपजिल्हा रुग्णालय आहे तिथे आयसोलेशन वॉर्ड व किमान प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी रक्त तपासणी करून निदान निश्चित करण्याची सोय करण्याची हीच वेळ आहे. साथ पसरली तर सगळ्यात मोठी समस्या ही असेल की सर्दी , खोकला , ताप असलेल्या प्रत्येक रुग्णाला मला कोरोना झालाय का हे तपासून पाहण्याचा आग्रह होणार आहे. यासाठी सर्वसामान्यांनी ही गोष्ट समजून घ्यावी की सर्दी खोकला म्हणजे प्रत्येकवेळी कोरोना असेल असे नव्हे. कोरोना मध्ये सर्दी हे मुख्य लक्षण नसून कोरडा खोकला , ताप आणि श्वास घेण्यास त्रास ही मुख्य लक्षणे आहेत. ज्यांचा कोरोनाबाधित रुग्णाशी थेट संपर्क आला आहे आणि ज्यांनी कोरोनाची साथ असलेल्या देशात १ जानेवारी नंतर प्रवास केला आहे त्यांनाच चाचणीची गरज आहे. कोणाची चाचणी करायची हे ठरवण्यासाठी तालुकानिहाय लक्षणांचे स्क्रीनिंग केंद्र उभारणे गरजेचे ठरू शकते. सध्या कोरोना रुग्ण सापडलेल्या भागात आम्ही बळजबरीने लोकांना आयसोलेट किमवा क्वारनटाइन करू असे विधान आरोग्य मंत्री किंवा अन्य कुठल्याही मंत्र्यांनी करणे लोकांमध्ये अजून घबराट पसरवणारे ठरेल. चीनमध्ये अशा बळजबरीमुळे भयभीत होऊन लोक पुढे आले नाहीत व त्याचा साथीचे नियंत्रण करण्यावर अनिष्ट परिणाम झाला. त्यापेक्षा, ‘त्रास होत असल्यास व कोरोनाग्रस्तांशी संपर्क आला असल्यास तुम्ही बिनदिक्कत पुढे या, आम्ही तुमची काळजी घेऊ’ हे वारंवार सौम्यपणे शासनाने सांगावे. नागरिकांनीही आयसोलेशनला मुळीच घाबरू नये, कारण शासन हे आपल्या व इतरांच्या भल्यासाठीच करते आहे. या आजारावर उपचार नाही अशी सरसकट विधाने केली जात आहेत. हा आजार व्हायरल असल्याने तो इतर व्हायरल आजारांसारखा आपोआप वेळेत बरा होणारा आहे. ज्या केसेस गंभीर होतील त्यांच्या उपचारांसाठीची मार्गदर्शक तत्वे आहेत व त्यासाठी काही औषधे यशस्वीरित्या वापरली गेली आहेत. औषध नाही असा टाहो फोडण्यापेक्षा, बाधा झालेल्यांच्या रक्ताचे नमुने घेऊन, इनविट्रो क्लिनिकल ट्रायल ( रुग्णांवर नव्हे! ) का सुरु करत नाहीत? सध्या मास्कचाही मोठ्या प्रमाणात वापर होतो आहे, परंतु अशा स्थितीत मास्क हा धो धो पावसातील छोट्या छत्रीसारखा कुचकामी आहे. मास्क हा निरोगी व्यक्तीला इतरांनाकडून संसर्ग होऊ नये या साठी नसून आजारी व्यक्तीकडून तो इतरांना होऊ नये यासाठी असतो. मास्कची जागा खरे तर ‘हात धुण्याने’ घ्यायला हवी. त्यासाठी सार्वजनिक ठिकाणी पाणी व लिक्विड साबण उपलब्ध करणे व लोकांना हात धुण्याची पद्धत शिकवण्याची गरज आहे.

या साथीची निष्पत्ती नेमकी काय असेल हा प्रश्न सर्वांनाच सतावत आहे. सुरुवातीच्या काळात बऱ्याच लोकांना संसर्ग होऊन आणि कदाचित थोडी हानी होऊन कोरोना विरोधात हळूहळू सामुहिक प्रतिकारशक्ती विकसित होईल. शासन जितक्या आक्रमकपणे आणि विचारपूर्वक साथ नियंत्रणाचे, प्रतिबंधाचे काम करील तेवढे नुकसान कमी होईल. त्यामुळे, ‘घाबरू नका’ असे सांगताना सोबत शासनाकडून ठोस कृती होणेही गरजेचे आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.

सदरील माहिती आपण महाराष्ट्र टाइम्स मध्येही वाचू शकता.


हिरकणी ‘अमृता सुदामे’ नावाची!

हिरकणी

ही हिरकणी आपल्या बाळांपर्यंत पोहोचण्या आधीच वाहून गेली !

सध्या राज्यात किचन ओटा किंवा बेसिन धूत असताना, बारीक कीटक ड्रेनेज मध्ये वाहून जातात त्याप्रमाणे माणसे वाहून जात आहेत. नुकत्याच पुण्यात आलेल्या पुरात, धायरी पुलावरून घरी जात असलेली ‘अमृता सुदामे’ ही वाहून गेली. एक मैत्रिणीकडून तिचा सगळा वैयक्तिक तपशील कळाला तेव्हा ‘या व्यवस्थेत बदल घडवण्यासाठी आपण काय करतोय?’ या हतबलतेने अमृताच्या चीतेत आपण जिवंत जळतोय अशा वेदना झाल्या!

एका डायग्नोस्टिक सेंटरवर रीसेप्शनीस्ट म्हणून काम करणारी ‘अमृता’ ही तरुणी रात्रभर घरी पोचत नाही. आणि रात्री पासून बेपत्ता असलेल्या अमृताचा शोध शेवटी ससूनच्या शवागारात संपतो! त्या शोधासोबतच उन्मळून पडतो, एका अख्ख्या कुटुंबाचा आधारवड!! आपल्यासाठी ‘पुरात एका तरुणीचा मृत्यू’ एवढ्या बातमीवर विषय संपतो. ती कोणा मंत्र्याची–सत्ताधाऱ्यांची किंवा हाय-प्रोफाइल समाजातील कुणाचे मुल बाळ नातलग नसल्याने, तिच्या मृत्यूची मोठी बातमी होत नाही आणि ती कोण होती यावर रकाने लिहून येत नाहीत. कोण होती ही ‘अमृता’ ??

इयत्ता आठवी आणि शिशू वर्गातील दोन मुलींचं एकल पालकत्व निभावत काबाड कष्ट करत जीवनसंघर्ष चालू ठेवणारी एक माता… २ वर्षापूर्वी वडिलांचा मृत्यू झाल्यावर कँन्सरग्रस्त आईची जबाबदारी पेलणारी एक लेक. परिस्थितीसमोर हात न टेकता उलट तिच्याशी दोन हात करून आलेला दिवस समर्थपणे झेलणारी एक रणंगिनी…! जाऊ नको, रात्री इथेच थांब असे सांगूनही, “मी गेले नाही तर माझ्या मुलींकडे या भयाण रात्री कोण पाहणार ” असे म्हणत, पाण्यातच दुचाकीने घरी निघालेली ‘आधुनिक हिरकणी’! कामावरून धो धो पावसात बाहेर निघेलेली आणि पापांनी दुथडी भरून वाहणाऱ्या नाल्यांच्या प्रवाहात लेकरांसाठी घरी निघालेल्या अमृताचे हेच वाक्य शेवटचे वाक्य ठरले!

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

अशी ही परिस्थितीशी झुंज देणारी अमृता त्या रात्री व्यवस्थेशी संघर्ष करू शकली नाही आणि शेवटी या व्यवस्थेने तिचा जीव घेऊनच तिचा संघर्ष संपवला.

Its High Time We Talk

‘एका महिलेचा पुरात वाहून मृत्यू’ या बातमी मागे उघडे पडलेले एक कुटुंब आणि एवढी करूण कहाणी असू शकते याची जाणीव ही न ठेवता वर्तमानपत्रांची पाने आपण उलटत असतो, सोशल मिडिया खाली खाली स्क्रोल करत जातो.

हिची संघर्षगाथा ऐकून आमच्या मित्राने आजच्या युगाची हिरकणी गेली अशी प्रतिक्रिया नोंदवली. शिवाजी महाराजांच्या काळात आपल्या बाळासाठी गड चढून गेलेल्या हिरकणीची कथा आपल्याला माहित आहे. ‘माझी मुले घरी एकटी आहेत मला घरी जावेच लागेल’ या ओढीने घरी निघालेली ही हिरकणी मात्र आपल्या बछड्यांपर्यंत पोहोचूच शकली नाही! आज शिवरायांच्या नावाने यात्रा, राजकारण करणाऱ्यांना या घटनेची लाज वाटली पाहिजे. अनेक वर्षे शिवछत्रपतींचे दाखले देणाऱ्यापर्यंत कदाचित अमृताची ही गोष्ट पोहोचणार ही नाही, कारण सध्या प्रचार सुरु आहे ना! कोण जिंकणार, कोण हरणार , कुठल्या मतदार संघात मराठा किती, दलित, माळी, धनगर, मुस्लीम मतदान किती …? त्यावरून कुठल्या जातीचा उमेदवार द्यायचा याच्यातून सत्ताधरी, विरोधकांना वेळ कुठे आहे. काही वर्षांपूर्वी पुण्यातील एका इंजिनिअर मित्राने सांगितले कि, पुण्यात ड्रेनेजसाठी जे खड्डे आणी त्यावर जाळी दिसते त्यात अनेक ठिकाणे फक्त खड्डे आणी त्यावर जाळी आहे .खाली त्यांना जोडणारी पाईपलाईन अस्तित्वातच नाही. आपण नागरिक म्हणून हे खड्डे कधी उघडून बघितले आहेत का ? पुण्यात अनेक नाले बुजवून त्यावर इमारती उभ्या राहिल्या आहेत. यात घरे विकत घेणाऱ्याला ही आपण अशा अनेकांचे जीव धोक्यात घालून उभे राहिलेल्या इमारतीत राहणार आहोत हे माहित नसते. स्थापत्य अभियंते , बांधकाम व्यवसायिक, राज्यकर्ते यांच्या संगनमताने अशा विकासाचे आपण सगळे भागीदार आहोत. पण तो विकास ‘अमृता’ सारख्यांच्या थडग्यांवर उभा आहे … फरक इतकाच आहे … हे थडगे आज अमृताचे आहे … उद्या तुमच्या आमच्या पैकी कोणाचे असेल सांगता येत नाही … कारण संधाकाळ पर्यंत कुठलीही सूचना नसताना भर शहरात अचानक घुसलेले पाणी वाहून नेताना कोणात ही भेद करत नाही ….!

डॉ. अमोल अन्नदाते | reachme@amolannadate.com

डॉ. केतन खुर्जेकर असे जायला नको होते!

डॉ. केतन खुर्जेकर

काल रात्री ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ वर डॉ. केतन खुर्जेकर, पुण्यातील व महाराष्ट्रातील प्रसिद्ध स्पाईन सर्जन यांचं अपघातामध्ये दुखद निधन झालं. त्यांच्या जाण्याच्या काही तासात त्यांचा वाढदिवस उजाडणार होता. खरतर अशा घटनेवर व्यक्त होतांना अश्रू तर आटतातच आणि शब्दही पांगळे होतात. डॉ. केतन हे पुण्याच्या प्रसिद्ध संचेती हॉस्पिटल च्या अस्थीरोग विभागाचे प्रमुख होते व मणक्यांच्या शस्रक्रियेत पारंगत होते. त्या पलीकडे ते कोणाचे तरी पुत्र, पती, वडील होते. मानेच्या व पाठीच्या मणक्यांच्या जन्मजात व्याधी (deformities) सरळ करण्यात त्यांचा विशेष हातखंड होता. ही शस्रक्रिया करत असतांना एखाद्या हार्मोनियम वर संगीतकाराची बोटे सहज रेंगाळावी आणि त्यातून साक्षात दैवी गांधार रूप सहज बाहेर पडाव तसच ऑपरेशन थियटर मध्ये डॉ. केतन यांची बोटे मणक्यांवर फिरायची आणि जादू केल्याप्रमाणे ऑपरेशन थियटर मधून वेगळ्याच मणक्याचा रुग्ण बाहेर यायचा. आशा अनेक रुग्णांना डॉ. केतन यांनी शब्दशः ताठ मानेने आणि ताठ कण्याने जगण्याचे वरदान दिले. साक्षात देवानेच दिलेल्या मणक्याच्या व्याधीही डॉ. केतन अविरत दोन हात करत राहिले. पण त्यांचा मृत्यु अशा प्रकारे होऊ शकतो यावर विश्वासच बसत नाही आणि ‘नियतीचा न्याय’ या शब्दांवरून विश्वास उडून जातो. मुंबईत होणाऱ्या मणक्यांच्या शस्रक्रीयेच्या Conference वरून परतत असतांना डॉ. केतन यांचा वैयक्तिक ड्रायवर नसल्याने त्यांनी OLA कॅब घेतली. आपल्या दोन साथीदारांसह OLA कॅब ने प्रवास करण पसंद केलं. रस्त्यात गाडीचं टायर पंक्चर झाल्याने ड्रायवर ने गाडी रस्त्याच्या कडेला घेतली. नेहमी प्रमाणे मदतीला धावून जाणारे डॉ. केतनही driver च्या मदतीला गाडीतून खाली उतरले. मागून येणाऱ्या भरधाव luxury बस ने या दोघांना काळाने स्वतःच्या पोटात ओढून घेतले!! आता हे सगळ ऐकल्यावर स्वतःच्या गाडीने प्रवास करा, स्वतःचा ड्रायवर वापरा, एक्स्प्रेस वे वर मध्ये थांबू नका, थांबले तरी गाडीतून खाली उतरू नका, एक्स्प्रेस वे वर रात्री प्रवास करू नका या सूचनांना तसा काहीच अर्थ वाटत नाही. कारण डॉ. केतन ज्याप्रमाणे मणक्यांचे भवितव्य बदलून टाकायचे तस काळाने केलेल हे ऑपरेशन बदलणे आपल्या कोणाच्याच हातात नाही.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

डॉ. केतन यांच्या जाण्यामुळे त्याच्या कुटुंबाचे क्षणार्धात सगळेच हरपून गेले पण त्यासोबत या राज्याचे आणि देशाचे न भरून येणारे नुकसान झाले. खरतर एक निष्णात डॉक्टर काळाच्या पडद्या आड जातो तेव्हा केवढ मोठी पोकळी निर्माण होते, हे रोज अनेक रुग्ण बरे करणाऱ्या डॉक्टरलाच आणी गंभीर आजारातुन बऱ्या झालेल्या रुग्णालाच समजू शकते. एखादा व्यक्ती डॉक्टर म्हणून नियती जेव्हा जन्माला घालते, तेव्हा त्याच्या खांद्यावर खूप मोठी जबाबदारी देऊन पाठवत असते. जे असाधारण कौशल्य डॉ. केतन यांच्या हाती होते. त्यावरून डॉ. केतन यांच्या वरही अजून खूप काही करण्याच अनेकांच आयुष्य बदलून टाकण्याची किमया साधण्याची जबाबदारी होती. वयाच्या, यशाच्या, पैश्याच्या एका टप्प्यानंतर डॉक्टर हा या पलीकडे जाऊन फक्त काम करण्यासाठी, त्याच्या कौशल्यासाठी जगत असतो. ते कौशल्यच त्याच्या जगण्याचे साध्य आणि साधन असते. डॉ केतनच्या जाण्याने एक दैवी साध्य आणि साधनच संपले. गेलेल्या डॉक्टरला तोफांची सलामी किंवा कुठलाही शासकीय इतमामाचा प्रोटोकॉल नसतो. पण डॉ. केतन खुर्जेकर तुम्ही बरे केलेले हजारो मणके आज तुमच्यासाठी अश्रू ढाळत आहेत, सलामी देत आहेत, मानवंदना देत आहेत …!

– डॉ. अमोल अन्नदाते
– reachme@amolannadate.com

स्क्रीन टाईम – लहान मुलांसाठीचे नवे कोकेन

स्क्रीन टाईम म्हणजे कोकेन

कुठल्या हि घरात गेलो कि अगदी सहा महिन्यांपासून ते पाच वर्षा पर्यंतची मुले शांततेत मोबाईल स्क्रीनशी एकरूप झालेली आपल्याला दिसून येतात. घरातच नव्हे तर हॉटेल मध्ये आई – बाबा शांततेत जेवण करत आहेत आणी दुसर्या टेबल वर लहान भाऊ – बहीण फोनवर एखादे कार्टून बघत आहेत हि हे नेहमीच आपल्या नजरेला पडते . स्क्रीन टाईम म्हणजे दिवस भरात लहान मुले किती तास स्क्रीन समोर असतात हा आज प्रत्येक घरातील एक कळीचा मुद्दा झाला आहे. अशा गोष्टींचे दुस्प्रीनाम मुंगीच्या पावलाने , अगदी नकळत होत असले तरी काही वर्षात उत्क्रांतीत माणसाची शेपूट गायब झाल्या सारखे मानसिकतेत, मेंदूच्या रचनेत, कार्यात हमखास दिसून येतील. नव्हे यातील बरेच अप्रत्यक्ष दुष्परिणाम आता आम्हा बालरोगतज्ञांना दिसायला सुरुवात झाली आहे.

Read English Translation of this article on Screen Time

स्क्रीन टाईम
स्क्रीन टाईमचे धोके

स्क्रीन टाईम विषयी औरंगाबाद येथील बालरोगतज्ञ डॉ. अभय जैन यांनी एक आपल्या कडे येणार्या रुग्णांचा शास्त्रीय अभ्यास केला. त्यात प्रामुख्याने काही गोष्टी आढळून आल्या. अगदी सहा महिन्यापासूनच स्क्रीनची सवय मुलांना लावण्यास सुरुवात होते. सहा महिन्यानंतर बाळाला वरचे अन्न सुरु केले जाते. आईच्या दुधाकडून वरच्या अन्नाकडे वळताना प्रत्येक बाळ थोडे फार त्रास देतेच . पण त्यावर तोडगा म्हणून व बाळ नीट खात नाही म्हणून सगळ्यात आधी आई मोबाईलचा वापर करते. इथेच आई आणी बाळ दोघे हि स्क्रीनच्या जाळ्यात अडकतात . या अभ्यासात असे हि दिसून आले कि शिकलेले पालकांच्या मुलांमध्ये याचे प्रमाण जास्त आहे. अर्थात स्मार्ट फोनच्या बाबतीत आता शहरी – ग्रामीण असा काही भेदभाव राहिलेला नाही व ग्रामीण भागात हि मोबाईल ला चीटकलेली मुले हे दर्शणीय दिसतेच. पण अशिक्षित पालकांमध्ये , गृहिणी असलेल्या ग्रामीण भागातील आईच्या मुलांमध्ये हे प्रमाणा पेक्षा जरा कमी आहे. तसेच स्क्रीन टाईमचे प्रमाण टी. व्ही. पेक्षा मोबाईल चा वाटा जास्त असल्याचे हि या अभ्यासात दिसून आले.

आमचा मुलगा रात्री लवकर झोपत नाही. रात्री १ , २ वाजले तरी तो खेळतच असतो. आमची मुलगी खूप जास्त चिडचिड करते , खूप हट्टीपणा करते. एका गोष्टी वर लक्ष केंद्रित करत नाही. अशा समस्या घेऊन जेव्हा पालक आम्हा बालरोगतज्ञांकडे येतात तेव्हा कुठले हि मोठे आजाराचे निदान करण्या आधी आम्ही त्यांना साधा प्रश्न विचारतो. तो किती वेळ टीव्ही किव्हा मोबाईल समोर असतो. या प्रश्नातच सगळ्या समस्यांचे निदान होते. ‘झोपेचे कर्ज’ हि संकल्पना आपल्या अजून नीट पचनीच पडलेली नाही. मोठ्या व्यक्तींमध्ये हे कामाच्या व्यापामुळे असते. तसे आता लहान मुले स्क्रीन टाईम मुळे ‘झोपेचे कर्ज’ घेऊनच कुमार वयात प्रवेश करत आहेत . त्यामुळे आरोग्याच्या व अनेक मानसिक समस्या निर्माण होत आहेत. याचाच समबंध पुढे कुमार वयीन मुला मुलींमधील नैराश्याच्या वाढत्या प्रमाणाशी आहे. या सर्व कडीला सांधणारा मोबाईल व स्क्रीन टाईम हा महत्वाचा दुवा आहे. 
स्क्रीन टाईमचा थेट संबंध हा लहान वयापासून सुरु होणार्या लठ्ठपणाशी व लहान वयातील खाण्या पिण्याच्या सवयीशी आहे. लहानपणी आई जेव्हा बाळाला भरवते तेव्हा त्याच्या मागे फिरत , गप्पा मारत , गाणे म्हणत भरवण्याची जुनी पारंपारिक पद्धत होती. त्याही आधीची पद्धत म्हणजे खाल्ले नाही तर आईचे धपाटे खात खाण्याची पद्धत तर कधीच इतिहासजमा झाली . आता कामात व्यस्त असलेली आई किव्हा स्वतःला हि मोबाईल पाहण्याची इच्छा असलेली आई बाळासमोर मोबाईल फोन धरला कि तो कार्टून बघत पटापट खाण संपवतो. खाण म्हणण्या पेक्षा तो फक्त ते गिळत असतो. त्यामुळे त्याच्या साठी खाण्याची चव , जेवणाचा रंग, भाजीचा सुवास हे बाळासाठी उत्तेजना नसते तर मोबाईल वरील रंग ,कार्टून मधील पत्र हेच बघत ते खात असते. त्यातच सगळ्या संवेदना मोबाईल स्क्रीन वर केंद्रित झाल्या मुळे पोट भरलेले कळत नाही व पोट भरले तरी मुल खातच राहते. त्याशिवाय स्क्रीन समोर जास्त वेळ बसून राहिल्याने बाहेर खेळ आणी अंगमेहनत होत नाही आणी मुले लठ्ठ होत जातात. वयापेक्षा मोठी आणी लठ्ठ दिसणारी अनेक मुले मॉल मध्ये फास्ट फूड चेन वर रांगा लावलेली तुम्हाला दिसतील पुढे नैसर्गिक अन्नाची चवच विकसित न झालेली हि स्क्रीन समोरची मुले फास्ट फूड वरच आपल्या उदरभरणाचा आनंद शोधण्याचा प्रयत्न करतात.

जागतिक आरोग्य सघटनेने प्रथमच या वर्षी स्क्रीन टाईमचे धोके ओळखून त्यासाठीची मार्गदर्शक तत्वे जारी केली. त्या प्रमाणे २ वर्षा पर्यंत लहान मुलांमध्ये स्क्रीन टाईम शून्य असावा . २ वर्ष ते पाच वर्षा पर्यंत तो १ तासापेक्षा जास्त नसावा . तसेच २ वर्षा नंतरचा पूर्ण स्क्रीनटाईम हा घरातील मोठ्या व्यक्ती किव्हा पालकांसोबत असावा जेणे करून मुल काय बघत आहेत याची आपल्याला माहिती मिळेल. आमचा एक वर्षाच मुल स्वतः स्क्रीन लॉक उघडत , स्क्रीन स्वाईप करून स्वतः युट्युब लावत हे बर्याचदा पालक कौतुकाने इतरांना व कधी डॉक्टरांनाहि सांगतात. खरतर मुळीच कौतुक करायची नाही तर सवय लागत चालल्याची चाहूल आहे. तसेच मोबाईल वरून आम्ही त्याला ए, बी. सी,डी किव्हा इतर बालगीते शिकवतो असे भाबडे समर्थनही बर्याचदा पालक करतात . सतत व रोज मोबाईल स्क्रीन बघून हळूहळू त्याचे रुपांतर अॅडीक्षण म्हणजे सुटायला अवघड जाणर्या सवयीत होते. जितकी लवकर हि सवय लागते तितकी ती तोडायला अवघड. दारू, सिगरेट किव्हा कोकेन घेतल्यावर मेंदूत जे रासायनिक बदल होतात तेच हळूहळू मोबाईल स्क्रीन दिल्यावर लहान मुलांच्या मेंदूत होतात. म्हणून आपण मोबाईल स्क्रीन हातात देतोय म्हणजे लहान मुलाच्या हातात मद्याची बाटली देतोय आणी स्क्रीन टाईम म्हणजे कोकेनच आहे लक्षात घ्यायला हवे.

सदरील लेख लोकप्रभाच्या आरोग्यविशेष अंकात २८ जून २०१९ रोजी प्रकाशित झालेला आहे Lokprabha

सक्तीने नको, मना पासून गोड बोला

Lokmat Article Amol Annadate


Dr. Amol Annadate Articles in Lokmat on Sankranti

वैद्यकीय क्षेत्रात गोड बोलण्याला खूप महत्व आहे. बर्याचदा रुग्ण, त्यांचे नातेवाईक वैतागलेले असतात. असे म्हणतात कि डॉक्टरच्या बोलण्याने अर्धा आजार बरा होतो. पण त्याच वेळी डॉक्टर ही नातेवाईकांमध्ये त्याला समजून घेणारा गोड बोलणारा कोणीतरी शोधत असतो. पण काहीही झाले तरी गोड आणी गुड बोलण्याने आपले आरोग्य चांगले राहते.

तिळगुळ घेऊन गोड बोलण्याचा कोणी आग्रह केला कि एखादा रोख ठोक व्यक्ती विचारतो मी तुझ्याशी कधी कडू बोललो ? .कुठून बुद्धी सुचली आणी  याला गोड बोलण्याचा आग्रह केला अशी परिस्थिती होते. पण समोरचा आपला बिचारा निरागसपणे आठवून बघत असेल कि खरच मी याच्याशी कधी कडू बोललो. पण आपल्याला ही शक्यता लक्षात येत नाही. गुड आणि गोड न बोलण्याचे बर्याच वेळा हेच कारण असते कि इतरां बद्दल आपल्या मनात बरेच भ्रम असतात. आज काही तरी कारण असताना किव्हा ज्याला आपण प्रोफेशनल असा हल्ली गोंडस शब्द वापरतो, अशा कारणांनी आपल्याला सक्तीने गोड बोलावेच लागते . मी पहिल्यांदा विमान प्रवास केला तेव्हा हवाई सुंदरी कडे सहज बघितले तरी ती उगीचच हसायची , काही मागीतले कि खूपच हसून गोड बोलायची. शेवटी न राहवून मी तिला विचारले कि आपली ओळख आहे का ? ती नाही म्हंटली. मग तिला विचारले तू एवढे गोड का बोलते आहेस माझ्याशी. ती उत्तरली सर त्याचेच आम्हाला पैसे मिळतात . ते माझे कामच आहे. असे सगळ्यांनाच गोड बोलण्याचे शासकीय अनुदान मिळाले असते तर किती बरे झाले असते ना?  पण काही कारण नसताना , एखाद्या कडे कुठलाही स्वार्थ नसताना गोड बोलण्यात खरे आव्हान असते. आज मात्र गोड बोलण्याची परिस्थिती काय आहे याची गम्मत कवी अशोक नायगावकर त्यांच्या कार्यक्रमात सांगत असतात . नायगावकर सांगतात तिळगुळ देताना म्हणे एका ठिकाणी मारामारी झाली … गोड बोलायला कोणाला शिकवता ? अशी आजची गोड बोलण्याविषयी परिस्थिती आहे.

                       वैद्यकीय क्षेत्रात गोड बोलण्याला खूप महत्व आहे. बर्याचदा रुग्ण, त्यांचे नातेवाईक वैतागलेले असतात. असे म्हणतात कि डॉक्टरच्या बोलण्याने अर्धा आजार बरा होतो. पण त्याच वेळी डॉक्टर ही नातेवाईकांमध्ये त्याला समजून घेणारा गोड बोलणारा कोणीतरी शोधत असतो. मला प्रॅक्टिस सुरु करताना एका ज्येष्ठ डॉक्टरने सांगितले – तुला काही आले नाही तरी चालेल पण तुला गोड बोलता आले पाहिजे . पण एकाच महिन्यात एका रुग्णाने सांगितले सर तुम्ही नवीन प्रॅक्टिस सुरु केली आहे – माझा अनुभव सांगतो, गोड बोलणारा डॉक्टर म्हणजे फसवणारा. मला नेमके काय करावे ते कळेना . पण काहीही झाले तरी गोड आणी गुड बोलण्याने आपले आरोग्य चांगले राहते. एवढा एक स्वार्थी हेतू ही गोड बोलण्यास पुरेसा आहे. पण चला तब्येतीचे जाऊ द्या गोड बोलण्याने आपल्याला बरे वाटते. गोड बोलण्या साठी एवढे कारण ही पुरेसे नाही का ?

This was one of the Dr. Amol Annadate Articles published in Lokmat. For more articles you can browse the Articles Tab.

amolaannadate@gmail.com

www.amolannadate.com

देवेन्द्र्जी फडणवीस यांची भेट

देवेन्द्र्जी फडणवीस यांची भेट
देवेन्द्र्जी फडणवीस यांची भेट

मराठवाड्यात तीव्र दुष्काळ आहे. हॉस्पिटल मध्ये येणारा रुग्ण हवालदिल झाला आहे. किती ही गंभीर रुग्ण असला तरी त्याच्या कडे उपचारासाठी पैसेच नसतात. या रुग्णांना वाऱ्यावर सोडून चालणार नाही. या दृष्टीने दुष्काळी मराठवाड्याच्या आरोग्य व्यवस्थेसाठी लोकसत्तेचे ज्येष्ठ पत्रकार संदीप आचार्यडॉ. अमोल अन्नदाते मिळून काय करता येईल याची योजना बनवतो आहे. त्यासाठी काल महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेन्द्र्जी फडणवीस यांची भेट घेऊन योजना सादर केली. यात शासना कडून काही घेण्यापेक्षा शासनाला मदत करण्याची भावना आहे. ही वेळ टीका करण्यापेक्षा शासनाला साथ देऊन दुष्काळी मराठवाड्याला मदतीचा हात देण्याची वेळ आहे.

There is a severe drought in Marathwada. The patient coming to the hospital is helpless. Although a serious patient, he does not have any money for treatment. We must pay attention to these patients. For this cause, senior journalist Sandeep Acharya from Lokasatta and Dr Amol Annadate are planning a programme for the health of drought-prone Marathwada.

Yesterday, We both met and presented the scheme to the Honorable Chief Minister of Maharashtra, Mr Devendraji Fadnavis. It has the feeling of helping the government rather than taking anything from the government. It is time to extend the help to Marathwada with the help of the government, instead of criticizing this time.