नियमित बीसीजी सोडून घाई नको

नियमित बीसीजी सोडून घाई नको

नियमित बीसीजी सोडून घाई नको ज्या देशांमध्ये सार्वत्रिक बी.सी.जी लसीकरण अनेक वर्षांपासून केले गेले त्या देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव इतर देशांच्या मानाने कमी प्रमाणात झाला असे एक निरीक्षण आहे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

नियमित बीसीजी सोडून घाई नको बीसीजी शरीरातील इनेट इम्युनिटी म्हणजे प्रतिकारशक्ती बळकट करते व कोरोना टाळण्यास व झाला तरी शरीराला त्या विरुद्ध लढण्यास सक्षम बनवते  असा एक कयास आहे. त्यातूनच आरोग्य क्षेत्रात काम करणारे व कोरोनाचा थेट संपर्क आलेल्यांना बीसीजी लस द्यावी का असा एक विचार जगभरात पुढे आला. पण लॅन्सेट या वैद्यकीय मासिकात ३० एप्रिल रोजी कोरोना टाळण्यासाठी आरोग्य कर्मचारी व इतरांना बीसीजी देण्याविषयी सतर्कतेचा इशारा दिला. तसेच या बद्दल अजून पुरेसा संशोधनात्मक पुरावा नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे. हे जाणून घेणे महत्वाचे यासाठी आहे कि माध्यमांमध्ये बीसीजी मुळे कोरोना टाळण्यास मदत होऊ शकण्याची शक्यता वर्तवणाऱ्या बातमी आल्या असल्याने अनेक जन आम्ही ही लस परत घ्यावी का ? असे प्रश्न डॉक्टरांना विचारत आहेत. याचे उत्तर ‘नाही’ असेच आहे. नियमित बीसीजी सोडून घाई नको लहान मुलांना ही जन्माच्या वेळी लस दिलेलीच असते. त्यांना ही लस परत ज्ञाची गरज नाही. कोरोना टाळण्यासाठी जर बीसीजीने  काही फायदा व्हायचा असेलच तर तो जन्माच्या वेळी आपण सगळ्यांनी घेतलेल्या बीसीजीनेच होईल.  १९७८ पासून देशात सार्वत्रिक बीसीजी लसीकरण सुरु झाले. म्हणून त्या आधी जन्म झालेल्यांनी बीसीजी घेण्याची घाई करू नये. मात्र सध्या जन्मानंतर लहान मुलांना नियमित बीसीजी लसीकरण मात्र सुरु ठेवावे. सिद्ध झालेले नसताना उगीचच बीसीजी घेतल्याने त्याचा उपयोग होणार नाहीच व तुटवडा निर्माण होऊन नियमित लसीकरणासाठी बीसीजी उपलब्ध होणार नाही.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

मानसिक तणावावर नियंत्रण ठेवा

मानसिक तणावावर नियंत्रण ठेवा

मानसिक तणावावर नियंत्रण ठेवा गेल्या दोन दिवसात कोरोनामुळे दोन आत्महत्या झाल्या. यातील एक कोरोना बाधित व्यक्तीची होती तर दुसरी कुठली ही कोरोनाची लक्षणे नसलेली व्यक्ती होती. हे विचार व पाउल काही विचार प्रक्रियेमुळे उचलले जाते.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

मानसिक तणावावर नियंत्रण ठेवा काही लक्षणे नसताना आता आपले व जगाचे काय होणार ही मनात दाटून आलेली भीती व निराशा. लक्षणे नसताना मृत्यूची भीती वाटणे व आपला कोरोनाने मृत्यू होण्यापेक्षा आपणच स्वतःला संपवण्याची निराशे पोटी इच्छा दाटून येणे. या सोबत आधी पासून असलेले नैराश्य, घरात पूर्वी कोणी आत्महत्या केली असल्यास व आधी त्या व्यक्तीनेच आत्महत्येचा अयशस्वी प्रयत्न केला असल्यास जोखीम जास्त असते. सगळ्यात आधी असे नैराश्येचे कुठले ही विचार मनात येत असल्यास मानसोपचारतज्ञांचा त्वरित सल्ला घ्या. कोरोना बाधित व्यक्तीने हे लक्षात घ्यावे की कोरोनाची बाधा व कोरोनाची  लक्षणे या वेगळ्या गोष्टी आहेत. कोरोना झाल्यावर ८५ टक्के शक्यता आहे कि तुम्हाला अगदी सौम्य व थोडी फार लक्षणे येतील. तसेच उर्वरित १५ टक्के मध्ये बहुतांश लोक बरे होत आहेत. तसेच आपली मानसिकता व प्रतिकारशक्तीचा थेट संबंध असतो. याला सायको- न्युरो – इम्युनो एक्सीस असे म्हणतात. हा कमकुवत झाला तर कोरोनाच नव्हे तर कुठल्याही आजारा विरोधात लढण्यास शरीर सक्षमता गमावून बसते. म्हणून कोरोनाची बाधा झाली तरी खचून न जाने हा उपचाराचाच भाग आहे असे समजावे. हे कळत असते पण वळत नसते अशी ती स्थिती असते. यासाठी पहिली पायरी आहे आपल्याला जे वाटते आहे ते आपल्या जवळच्या नातेवाईकाला भावना मन मोकळे पणाने बोलून दाखवणे. अशा वेळी नातेवाईकांची भूमिका महत्वाची ठरते. रुग्णाला आयसोलेट करायचे म्हणजे त्याच्याशी तुम्ही संवाद ठेवू शकता. त्याच्याशी फोन वर बोलत राहू शकता. गरज वाटल्यास लगेचच समुपदेशक किंवा मानसोपचारतज्ञांची मदत घेण्याचा निर्णय नातेवाईकांनी घ्यायला हवा.

मानसिक तणावावर नियंत्रण ठेवा काही लक्षणे नसताना आता आपले व जगाचे काय होणार ही मनात दाटून आलेली भीती व निराशा. लक्षणे नसताना मृत्यूची भीती वाटणे व आपला कोरोनाने मृत्यू होण्यापेक्षा आपणच स्वतःला संपवण्याची निराशे पोटी इच्छा दाटून येणे. या सोबत आधी पासून असलेले नैराश्य, घरात पूर्वी कोणी आत्महत्या केली असल्यास व आधी त्या व्यक्तीनेच आत्महत्येचा अयशस्वी प्रयत्न केला असल्यास जोखीम जास्त असते. सगळ्यात आधी असे नैराश्येचे कुठले ही विचार मनात येत असल्यास मानसोपचारतज्ञांचा त्वरित सल्ला घ्या. कोरोना बाधित व्यक्तीने हे लक्षात घ्यावे की कोरोनाची बाधा व कोरोनाची  लक्षणे या वेगळ्या गोष्टी आहेत. कोरोना झाल्यावर ८५ टक्के शक्यता आहे कि तुम्हाला अगदी सौम्य व थोडी फार लक्षणे येतील. तसेच उर्वरित १५ टक्के मध्ये बहुतांश लोक बरे होत आहेत. तसेच आपली मानसिकता व प्रतिकारशक्तीचा थेट संबंध असतो. याला सायको- न्युरो – इम्युनो एक्सीस असे म्हणतात. हा कमकुवत झाला तर कोरोनाच नव्हे तर कुठल्याही आजारा विरोधात लढण्यास शरीर सक्षमता गमावून बसते. म्हणून कोरोनाची बाधा झाली तरी खचून न जाने हा उपचाराचाच भाग आहे असे समजावे. हे कळत असते पण वळत नसते अशी ती स्थिती असते. यासाठी पहिली पायरी आहे आपल्याला जे वाटते आहे ते आपल्या जवळच्या नातेवाईकाला भावना मन मोकळे पणाने बोलून दाखवणे. अशा वेळी नातेवाईकांची भूमिका महत्वाची ठरते. रुग्णाला आयसोलेट करायचे म्हणजे त्याच्याशी तुम्ही संवाद ठेवू शकता. त्याच्याशी फोन वर बोलत राहू शकता. गरज वाटल्यास लगेचच समुपदेशक किंवा मानसोपचारतज्ञांची मदत घेण्याचा निर्णय नातेवाईकांनी घ्यायला हवा.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

COVID -19 प्रतिकारशक्ती कशी वाढवावी

COVID-19 प्रतिकारशक्ती कशी वाढवावी

COVID -19 प्रतिकारशक्ती कशी वाढवावी? कारण कोरोना व्हायरस शी लढताना आपले सगळ्यात मोठे हत्यार असणार आहे आपली प्रतिकारशक्ती. त्यातच ६० वर्षावरील ज्येष्ठ आणि मधुमेह असणाऱ्यांनी प्रतिकारशक्ती वाढवण्याची विशेष काळजी घ्यायला हवी. COVID -19 प्रतिकारशक्ती कशी वाढवावी? यासाठी काही टिप्स

१. आपली झोप ही प्रतिकारशक्ती साठी महत्वाची असते. म्हणून रोज ७ ते ८ तास शांत झोप खूप महत्वाची आहे.
२. आहारामध्ये विटामिन सी युक्त सिट्रस फळे म्हणजे लिंबू , मोसंबी, संत्रे, आवळा, टमाटे यांचा समावेश करा.
३. प्रथिने युक्त आहार प्रतिकारशक्ती साठी गरजेचा असतो. त्यामुळे नाष्ट्या मध्ये मोड आलेले कडधान्य, जेवणात डाळी, सोयाबीन, नाचणीची भाकरी याचा समावेश करावा.
४. सूर्यप्रकाशातून मिळणारे ‘ड’ जीवनसत्व प्रतिकारशक्ती वाढवते. घरात राहयचे असले तरी सकाळी घराच्या छतावर थोडा वेळ ध्यान केल्यास ‘ड’ जीवन सत्व मिळेल व ताणतणाव कमी होईल .

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

५. रोजच्या आहारात एखाद फळ आणि भाज्या असायला हव्या.
६. आपल्या आतड्यातील बॅक्टेरिया खूप महत्वाचे असतात. यासाठी आहारात दही, ताकाचा समावेश करा. पण दही, ताक रात्रीच्या जेवणात नको.
७. चहा मध्ये अद्रक आणि जेवणात अधून मधून लसुनाचा वापर करा.
८. जास्त ताण घेतल्याने प्रतिकारशक्ती वर त्याचा दुष्परिणाम होतो. त्यामुळे भीतीच्या छायेत राहू नका.
९. व्यायाम, योग, प्राणायाम किंवा चालण्याचा व्यायाम रोज अर्धा तास तरी करा.
१०. शरीरातील पाण्याची पातळी प्रतिकारशक्तीसाठी महत्वाची आहे त्यामुळे रोज तहान लागल्यावर आणि किमान ६ ते ८ ग्लास पाणी प्यायला हव.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

कोरोनाच्या साथीचे पुढे काय? What Next?

कोरोनाच्या साथीचे पुढे काय ?

कोरोनाच्या साथीचे पुढे काय ? नवी साथ येते तेव्हा समाजामध्ये त्या नवीन विषाणू विरोधात प्रतिकारशक्ती अजून तयार झालेली नसते. त्यामुळे नव्या साथीमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये जास्त लोकांना संसर्ग होण्याची शक्यता असते.

तसेच तीन महिन्यांमध्ये काही प्रमाणामध्ये ही साथ जीवघेणी ठरू शकते. पण तरीही याचा मृत्युदर हा सध्या इतर देशांमध्ये तीन टक्केपेक्षा जास्त नाही. एक ते दोन महिन्यांमध्ये या व्हायरसच्या विरोधात समाजामध्ये एक सामुहिक प्रतिकारशक्ती निर्माण होऊ लागते. याला वैद्यकीय भाषेत ‘हर्ड इम्युनिटी’ असे म्हणतात. तसेच कुठलाही व्हायरस जसा आहे त्या रूपात फार काळ राहत नाही. व्हायरस हा बहुरुप्या सारखा असतो. त्याचे रूप तो सतत बदलत असतो. याला वैद्यकीय भाषेत अँटीजनीक ड्रीफ्ट आणि शिफ्ट असे म्हटले जाते. तो संक्रमित झाला की त्याची संसर्ग करण्याची क्षमता व त्याच्यामुळे मृत्यू होण्याची तीव्रता कमी होते म्हणून तीन महिने हा व्हायरस संक्रमित होई पर्यंत हा टाळण्यासाठीचे नियम पाळणे गरजेचे आहे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

कोरोनाच्या साथीचे पुढे काय ? एका ठिकाणी जास्त लोकांनी गर्दी न करणे, सार्वजनिक कार्यक्रम टाळणे, काम नसताना प्रवास न करणे मौजमजेसाठी किंवा कार्यक्रम किंवा राजकीय कार्यक्रम टाळणे हे व्हायरस मध्ये बदल होईपर्यंत पुढे एक ते दोन महिन्यात गरजेचे आहेत.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.