व्हॉल्व असलेला मास्क वापरू नका

व्हॉल्व असलेला मास्क वापरू नका

व्हॉल्व असलेला मास्क वापरू नका सध्या अनेक जण बाहेरच्या बाजूने व्हॉल्व असलेले मास्क वापरत आहेत. बऱ्याच जणांना हाच सर्वोत्तम मास्क असल्याचा ही गैरसमज झाला आहे. या मास्कचे नीट निरीक्षण केल्यावर एक गोष्ट लक्षात येईल कि श्वास आत घेताना हा व्हॉल्व बंद होतो व श्वास बाहेर सोडताना व्हॉल्व आपोआप उघडतो. त्यामुळे या मास्कच्या व्हॉल्व मधून कोरोना तसेच इतर विषाणू सहज बाहेर जाऊ शकतात. या मास्क मुळे मास्क घालणाऱ्या व्यक्तीला कदाचित संसर्ग मिळेल पण समोरच्या बाधित व्यक्तीला ही व्हॉल्व असलेल्या मास्कचा धोका माहित नसेल व तो हा मास्क वापरत असेल तर अशा कोरोना संसर्गित व्यक्ती पासून इतरांचे संरक्षण होणार नाही. मास्क वापरण्याचा हेतू फक्त स्वतःचेच संसर्ग नाही तर माझ मास्क तुला आणि तुझा मास्क मला संसर्ग देईल असे हे प्रतिबंधाच्या सहजीवनाचे तत्त्व आहे त्यामुळे हे मास्क कोणीही वापरू नये. तसेच शासनाने ही या मास्क वर बंदी घालावी. इतर कुठला ही नाकाच्या वरच्या टोका पासून हनुवटी च्या खाल पर्यंत व दोन्ही बाजूने तोंड व नाक पूर्ण झाकणारा व्हॉल्व नसलेला मास्कचा वापर करण्यास हरकत नाही.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

व्हॉल्व नसलेला मास्क वापरल्यास श्वास घेण्यास काही त्रास होईल का ?

व्हॉल्व असलेला मास्क वापरू नका मुळात व्हॉल्व असलेले मास्क हे जिथे जागा पूर्ण बंद आहे व हवेचा दाब कमी आहे अशा जागेत काम करणाऱ्यांसाठी बनवले गेले होते. खाणी मध्ये व खोदकामात , बोगद्यात काम करणाऱ्या कर्मचार्यांचा श्वास गुदमरू नये व त्यांच्या शरीरात C02 हा प्राणवायू साठून त्यांचा जीव गुदमरू नये  यासाठी ही मास्क मध्ये व्हॉल्वची योजना. कारण अशा खोलवर व पूर्ण बंद असलेल्या जागेत ऑक्सिजनचे प्रमाण कमी असते. बाहेर मोकळ्या वातावरणात किंवा ऑफिस मध्ये वातावरण पूर्ण बंद नसते व ऋण तापमानात ऑक्सिजनची पातळी पुरेशी असते. म्हणून तिथे व्हॉल्व नसलेले मास्क वापरले तरी श्वास घेण्यास त्रास होण्याची / जीव गुदमरण्याची भीती नाही. पण मात्र व्हॉल्व मधून कोरोना संसर्ग इतरांना होण्याची शक्यता आहे. म्हणून मास्क श्वास घेण्यास त्रास होण्याची भीती बाजूला ठेवून व्हॉल्व नसलेले मास्कच वापरावे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.

धार्मिक स्थळी जाताना जरा जपून!

धार्मिक स्थळी जाताना जरा जपून!

धार्मिक स्थळी जाताना जरा जपून! “लॉकडाऊन ५ मध्ये सर्वधर्मीय धार्मिक तीर्थस्थळ आणि प्रार्थनास्थळ खुली केली असली तरी काही निर्णय जनतेने स्वत: घ्यायला हवे. केंद्र सरकारने धार्मिक स्थळ व प्रार्थनास्थळ खुली करताना ६५ वर्षांवरील, १० वर्षांखालील, गर्भवती स्त्रिया, सर्व वयोगटात मधुमेह, हृदयरोग, उच्च रक्तदाब, किडनीचे आजार, कॅन्सर व असे मोठे आजार असलेल्यांनी धार्मिक स्थळी जाऊ नये असे निर्देश दिले आहेत. केंद्र सरकारने एवढ्यांनाच सतर्क केले असले तरी लक्षणविरहीत (कुठले ही लक्षण नसलेले) कोरोनाबाधितांची संख्या पाहता आजार असो व नसो तसेच सर्वच वयोगटाच्या व्यक्तींनी धार्मिकस्थळी व प्रार्थनास्थळांना जाणे कोरोना संसर्गाची जोखीम वाढवणारा महत्त्वाचा घटक ठरू शकतो. कोरोनाच नव्हे इतर जंतुसंसर्ग पसरण्यासाठी गर्दीमुळे तीर्थस्थळे व धार्मिकस्थळे मोठे कारण ठरले आहे व कोरोनाच्या बाबतीतही हे खरे ठरू शकते.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

राज्यात व देशात दरवर्षी गावोगावी भरणाऱ्या ग्रामदैवताच्या पूजेनिमित्त भरणाºया जत्रा या ही स्थानिक पातळीवर नागरिकांनी एकत्रित निर्णय घेऊन रद्द केलेल्या चांगल्या. अशा जत्रा झाल्या तरी सध्या तरी तिथे जाणे टाळावे. पुजारी किंवा त्या स्थळाची जबाबदारी असणाऱ्यांनी मास्क, फेस शिल्ड वापरावे व मुख्य देव्हारा व दर्शनच्या जागेत किमान ८ फूट अंतर ठेवावे. धार्मिक स्थळाची जबाबदारी असणाºयांना ताप, सर्दी, खोकला झाल्यास त्यांनी १४ ते २० दिवस मंदिरात इतरांच्या संपर्कात येऊ नये.
धार्मिक स्थळी जाताना जरा जपून!अशा ठिकाणी गर्दी खूप असल्याने सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे शक्य नसे तरी हे नियम पाळण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा व दर्शन रांगेत ६ फुटांचे गोल आखून घ्यावे व त्यातच दर्शनासाठी आलेल्यांनी उभे राहावे. मंदिरात येताना प्रत्येकाला मास्क अनिवार्य असावा व त्याशिवाय कोणाला ही बाहेर सोडू नये. मंदिराबाहेर हात धुण्यासाठी बेसिन व लिक्विड सोप शक्यतो अ‍ॅटोमेटेड (आपोआप सोप हातावर पडेल असे सेन्सर असलेले) सोय असावी. तीर्थक्षेत्र यांच्याशी एक मोठे अर्थकारण निगडित असले व हा सगळ्यांच्याच भावनेचा प्रश्न असला तरी साथ रोखण्याच्या दृष्टीने वर्षभर तरी धार्मिक स्थळी न जाता घरच्या घरीच पूजा अर्चा केलेली योग्य ठरेल.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

मास्क घालताना चुका टाळा

मास्क घालताना चुका टाळा

मास्क घालताना चुका टाळा सध्या सर्वांना मास्क घालण्यास सांगितले आहे. पण अनेकांना मास्क कसा घालावा हे अजून माहित नाही. मास्क घालताना व काढताना दोरीला धरूनच वापरावा. तो मास्कच्या तोंड झाकण्याच्या भागावर हात लावून वापरू नये. घालताना नाकाच्या शेंड्याच्या वर पर्यंत म्हणजे नाक सुरु होते तिथे वर पर्यंत यायला हवा. खाली हनुवटी पूर्ण झाकली जाऊन खालचा भाग पूर्ण ह्नुवटीच्या मागे जायला हवा.मास्क घालताना चुका टाळा कानाच्या मागे दोऱ्या लावताना किंवा बांधताना इतक्या घट्ट लावाव्या की चेहऱ्या वर दोन्ही बाजूला मास्क येईल तिथे फार मोकळी जागा सुटायला नको. मास्क काढत असताना परत मधल्या भागाला हात न लावता काढावा. एकदा मास्क काढल्यावर तो थोडा वेळ इतरत्र घरात ठेवला, परत वापरला – असे करू नये. घरात वापरलेला मास्क काढून ठेवल्यावर सगळ्यात मोठा धोका, लहान मुलांनी त्याला हात लावण्याचा आहे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

मास्क लावताना पुढील चुका टाळा –

  • मास्क घालताना चुका टाळा मास्क नाकाखाली म्हणजे नाकपुड्या उघड्या राहतील असे लावू नका
  • .  मास्क हनुवटीच्या वर ठेवू नका. मास्क लावल्यावर हनुवटी दिसता कामा नये
  • मास्क लावताना सैल लावल्यामुळे दोन्ही बाजूंना तो मोकळा , हवेची ये जा होऊ शकेल असा लावू नका.
  • नाकाच्या शेंड्यावर किंवा त्याच्या थोडेसे वर ठेवू नका. जितका शक्य होईल तितका शेंड्याच्या वर म्हणजे नाक सुरु होते तिथपर्यंत घ्या.
  • चष्मा नको असल्यावर जसे डोक्यावर ठेवतात तसा मास्क थोडा वेळ नको आहे म्हणून खाली ओढून मानेच्या पुढे लटकू दिला आणी नंतर परत घातला , असे करू नका .

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता