माती, खडू खाण्याचा आजार

माती, खडू खाण्याचा आजार

माती, खडू खाण्याचा आजार लहान मुलांना माती किंवा इतर गोष्टी खाण्याची सवय असते. यात खडू, पाटीची पेन्सिल, पेपर, साबण, प्लॅस्टर, भिंत चाटणे, क्ले, कोळसा, राख, पेंट, खेळणी चाटणे अशा अनेक गोष्टींचा समावेश असतो. थोड्याफार प्रमाणात कळत नसल्याने दुसऱ्या वर्षापर्यंत या गोष्टी नॉर्मल असतात, पण दुसऱ्या वर्षानंतर सतत एक महिना अशी माती व इतर वस्तू खाण्याची लक्षणे दिसत असल्यास त्याला ‘पायका’ असे म्हटले जाते व उपचाराची गरज असते. 

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

वय 
मुलांमुलींमध्ये २ वर्षांपासून ते १८ वर्षांपर्यंत हा आजार कधीही दिसू शकतो. अनेक जणांना मोठे झाल्यावरही त्यातच महिलांना गरोदर असतना माती, खडू खाण्याची इच्छा होते. लहान मुलांमध्ये मतिमंदत्व, स्वमग्नता (ऑटिझम) तसेच इतर मानसिक आजारात याचे प्रमाण जास्त आढळून येते. 

कारणे 
– माती, खडू खाण्याचा आजार सहसा शरीरात लोहाची कमतरता माती व इतर गोष्टी खाण्याची इच्छा होण्यामागचे मुख्य कारण असते. त्यासोबत झिंक व काही प्रमाणात कॅल्शियमची कमतरता असते, पण कॅल्शियमपेक्षाही लोह हाच यात महत्त्वाचा घटक आहे. 
– मानसिक तणावामुळे ही मुले माती खातात. पालकांचे मुलांकडे दुर्लक्ष होत असेल, तर मुले लक्ष वेधून घेण्यासाठी माती खातात. दुष्परिणाम माती खाल्ल्यामुळे जंताचा त्रास तर होतोच, शिवाय जेवण कमी जाते व शरीरात इतर जीवनसत्वांची कमतरता निर्माण होते. तसेच खडे किंवा खात असलेल्या इतर गोष्टी पोटात अडकून आतड्यांमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो.   यासाठी ऑपरेशनही करण्याची गरज पडू शकते. 
– माती व इतर गोष्टी खाणाऱ्या मुलांमध्ये जुलाब व कुपोषणाचे प्रमाण जास्त असते. 

उपचार 
– यासाठी तीन महिने सहा मिलीग्रॅम प्रती किलोग्रॅम याप्रमाणे रोज रात्री झोपताना लोहाचे औषध द्यावे लागते. तीन महिन्यांनंतर गरज असल्यास १ मिलीग्रॅम प्रती किलोग्रॅम या कमी डोसमध्ये ते सुरू ठेवावे लागते. 
– यासोबत तीन दिवस रात्री झोपतना जंताची गोळी – अल्बेनदेझोल किंवा डोसाप्रमाणे पातळ औषध स्वरुपात द्यावी लागते. लोह दिल्यावर काही दिवसांनी माती खाणे कमी झाले तर जंताची गोळी तीन महिन्यांनी एकदा परत द्यावी लागते. 
– माती खाणाऱ्या मुलांना अधिक मानसिक आधार द्यावा. त्यांना माती खाताना बघितले तर लगेच रागावू नये. याविषयी त्यांना भीती दाखवून, मारून ही सवय जात नाही. 
– उपचार सुरु केल्यावर मुलाला माती खाण्याची संधी मिळणार नाही, याबद्दल दक्षता घ्यावी. 
– माती , खडू, पेन्सिल खाताना दिसला तर त्याला याबद्दल प्रेमाने सांगून, या गोष्टी त्याच्याकडून घ्याव्यात व त्याच्या आवडत्या खेळणी, वस्तू द्याव्यात. 

सदरील माहिती आपण सकाळ मध्येही वाचू शकता

आरोग्य सेतू अॅप कसे वापरावे?

आरोग्य सेतू अॅप कसे वापरावे?

आरोग्य सेतू अॅप कसे वापरावे आरोग्य सेतू हे कोरोना केसचा संपर्कात आलेल्यांची माहिती मिळवण्यासाठी बनवलेले भारत सरकारचे अधिकृत अॅप आहे. हे अॅप आता हवाई प्रवासा दरम्यान व काही शासकीय कार्यालयांमध्ये सक्तीचे करण्यात आले आहे. हे अॅप पुढील प्रमाणे वापरता येईल

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

  • अॅप डाउनलोड करण्यासाठी ते गुगल किंवा अॅपलच्या प्ले स्टोर मधून डाउनलोड करावे.
  • लगेचच अॅप तुम्हाला तुमच्या पसंतीची भाषा विचारेल. मराठीत सह अॅप ११ भारतीय भाषेत उपलब्ध आहे.
  • रजिस्टर असे म्हंटल्यावर आपले लोकेशन म्हणजे आपण कुठे असणारा आहोत याला एक्सेस करण्याची अॅप ला परवानगी द्या.
  • पुढे मोबाईल नंबर अॅप मध्ये भरावा लागतो. या नंतर एक ओटीपी नंबरचा संदेश मोबाईलवर  येईल जो भरला कि अॅप सुरु होईल.
  • एकदा अॅप सुरु झाले कि तुम्हाला ब्लूटूथ सतत चालू ठेवायचे आहे तसेच लोकेशन शेअरिंग च्या फोन मधील सेटिंग ला  ‘ ऑलवेज ‘ असे ठेवायचे आहे.
  •  आरोग्य सेतू अॅप कसे वापरावे सर्व प्राथमिक माहिती भरल्यावर अॅप तुम्हाला गेल्या ३० दिवसातील परदेश प्रवासाला बद्दल विचारते.
  • यानंतर तुम्हाला सध्या ची लक्षणे असल्याची पडताळणी काही प्रश्न विचारून अॅप करते  तसेच तुम्ही स्वयंसेवक म्हणून कोरोनाच्या साथीत काम करण्यास तयार आहात का हे ही विचारते. तयार असल्यास परत २० सेकंदात तुमची स्व चाचणी साठी काही आरोग्य बाबत प्रश्न विचारते.
  • जर लक्षणांना वरून तुम्हाला कोरोना असल्याची शंका असल्यास तसे सांगितले जाते व टेस्ट करण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो.
  • यानंतर जर तुमचा कोरोनाच्या रूग्णाशी संपर्क येत असेल तर तुम्हाला अॅलर्ट केले जाते किंवा तुमचा नुकताच संपर्कात आलेला कोरोना बाधित झाला असेल तर तुम्हाला त्या विषयी अॅलर्ट केले जाते. यानंतर विलगीकरण कसे करायचे याच्या सूचना दिल्या जातात.
  • यासोबतच देश भरातील कोरोना साठीच्या हेल्पलाईन नंबर्सची माहिती या अॅप वर दिलेली आहे. तसेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या कोरोना विषयीचे सर्व ट्वीट ही अॅप वर दिसतात.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

‘कोरोना’चा रुग्ण कधीपर्यंत इतरांना संसर्गित करू शकतो!

‘कोरोना’चा रुग्ण कधीपर्यंत इतरांना संसर्गित करू शकतो!

‘कोरोना’चा रुग्ण कधीपर्यंत इतरांना संसर्गित करू शकतो! सध्या अनेक रुग्ण ७ दिवसांनी सौम्य लक्षणे असल्यास घरी पाठवले जात असले आणि घरी अलगीकरणात ( आयसोलेशन ) राहायला सांगितले जात असले तरी नेमके कधी पर्यंत अलगीकरणात राहायचे हे मात्र अनेकांना नीट माहित नाही. हे किती दिवस कोरोणाचा बरा झालेला रुग्ण इतरांना संसर्ग करू शकतो यावर ठरेल. याचे उत्तर प्रत्येक देशा गणिक आणि व्यक्ती गणिक बदलू शकते. पण याचे शास्त्रीय उत्तर आहे जो पर्यंत व्यक्ती ची लक्षणे पूर्ण जात नाहीत आणि जो पर्यंत टेस्ट कोरोना निगेटिव्ह येत नाही तो पर्यंत कोरोनाचा रुग्ण इतरांना संसर्गित करू शकतो.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

    ‘कोरोना’चा रुग्ण कधीपर्यंत इतरांना संसर्गित करू शकतो! सिंगापूर मधील एका अभ्यासात असे दिसून आले की बाधित झाल्यावर व पॉझीटीव असला तरी तो ११ दिवसच इतरांना संसर्गित करतो. पण या अभ्यासाच्या निष्कर्षावर अवलंबून राहता येत नाही. कारण चीन मध्ये एका अभ्यासात रुग्ण बरा झाला व निगेटिव्ह असला  तरी ३० दिवसांपर्यंत इतरांना संसर्गित करू शकतो असे दिसून आले. आपल्या देशा साठी याच्या मधला आकडा सध्या संशोधन होई पर्यंत ग्राह्य धरला जाऊ शकतो. म्हणून रुग्णालयातून  ७ दिवस झाल्यावर टेस्ट करणार नसाल तर घरी १४ दिवस असे एकूण २१ दिवस आयसोलेशन मध्ये राहिल्यास चांगले. यात चौदाव्या दिवशी जर टेस्ट केली व ती निगेटिव्ह असेल व कुठली ही लक्षणे नसतील तर १४ दिवसा नंतर आयसोलेशन संपवण्यास हरकत नाही. पण चौदाव्या दिवशी टेस्ट निगेटिव्ह असून लक्षणे गेली नसतील तर मात्र आयसोलेशन लक्षणे संपे पर्यंत चालू ठेवावे.  हे आयसोलेशन स्वतः साठी महत्वाचे आहेच पण आपल्या कुटुंबाला व संपर्कात येणाऱ्या इतरांना संसर्ग होऊ नये म्हणून ही महत्वाचे आहे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

फ्लूची लस घेण्यास हरकत नाही

फ्लूची लस घेण्यास हरकत नाही

फ्लूची लस घेण्यास हरकत नाही पावसाळा सुरू झाल्यावर ताप आणि खोकला आल्यास हा नियमित ऋतूमानाप्रमाणे येणारा सर्दी खोकला की कोरोना हे निदान करणे अवघड जाईल. त्यामुळे सर्वांनी, त्यातच लहान मुलांनी आणि ज्यांना परवडत असेल त्यांनी फ्लू म्हणजे सर्दी खोकल्याची लस घेतलेली चांगली.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

फ्लूची लस घेण्यास हरकत नाही या लसीचा एकच डोस घ्यावा लागतो. लस घेताना एक गोष्टीकडे लक्ष ठेवावे.फ्लूची लस उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव अशी दोन प्रकारांमध्ये उपलब्ध असते. भारतासाठी उत्तर ध्रुवासाठीची लस वापरावी, असे निर्देश आहेत. हे एनएच म्हणजे नॉर्दन हेमीस्फीअर असे लसीच्या पाकिटावर लिहिलेले असते. हे तपासून किंवा डॉक्टरला विचारून लस द्यावी. चुकीने बऱ्याच ठिकाणी एसएच म्हणजे दक्षिण ध्रुवाची लस वापरली जाते.पण भारतीय नागरिकांसाठी या लसीचा उपयोग नाही. ही लस घेण्याचे दोन फायदे आहेत. नियमित होणारा सर्दी-खोकला टळेल. कुठल्या ही व्हायरल आजारानंतर प्रतिकारशक्ती कमी होते व अशावेळी कोरोनाची लागण होण्याची शक्यता जास्त असते. हा एक जोखीम वाढवणारा घटक कमी होईल.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

आधी आरोग्यमंदिरे उभारा

आधी आरोग्य मंदिरे उभारा

आधी आरोग्यमंदिरे उभारा सध्या उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्या विषयी सर्वत्र चर्चा सुरु आहे. कुठल्या पक्षाचा राजकीय अजेंडा काय असावा हा त्या पक्षाचा प्रश्न आहे. पण सध्या शिवसेनेकडे असलेले आरोग्य खाते , गेल्या काही वर्षात दुर्लक्षित असलेले महाराष्ट्राचे आरोग्य क्षेत्र हे सगळे पाहता शिवसेनेकडे इतर सर्व खाती बाजूला ठेवली तरी केवळ या एका खात्यामध्ये काम करण्यासाठी सर्वाधिक वाव आहे असे शिवसेनेला आणी पक्षश्रेष्ठींनी का वाटू नये याचे आश्चर्य वाटते. धार्मिक , भावनिक, मराठी अस्मिता इत्यादी मुद्द्यांच्या तुलनेत आरोग्याच्या प्रश्नांवर कधीच राजकारण होत नाही आणी राजकीय पटलावर कधीच आरोग्याचे प्रश्न प्राधान्याचे ठरत नाहीत. याचा दोष याची मागणी न करणाऱ्या जनतेमध्ये आहे कि पक्षाची धोरण – दिशा ठरवणार्या ‘ हाय कमांड’ मध्ये कि यावर सतत आवाज उठवणारी माध्यमे , आरोग्य अभ्यासक वा अॅक्टीविस्ट कमी पडतात याचे निदान करायला हवे. महाराष्ट्रातील आरोग्य क्षेत्राच्या फाटलेल्या आभाळाच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत राम मंदिराचा लढा देण्यास निघालेल्या उद्धव ठाकरे यांना आवर्जून सांगेवेसे वाटते कि अयोध्येत राम मंदिर उभारा किव्हा नका उभारू पण त्या आधी काही प्राथमिक आरोग्य केंद्रांना , उप जिल्हा रुग्णालयांना , शासकीय रुग्णालयांना जरूर भेटी द्या . देव महत्वाचा आहेच पण हाल अपेष्टा सहन करणारा रुग्णही तितकाच महत्वाचा आहे.
महाराष्ट्रात १८१६ प्राथमिक आरोग्य केंद्रे , ४०० हून अधिक ग्रामीण रुग्णालये , ७६ उपजिल्हा रुग्णालये व २३ सिविल हॉस्पिटल्स अशी अवाढव्य पायाभूत सुविधा आहे. एवढे मोठे यंत्रणेचे जाळे हे गृह विभाग सोडले तर इतर कुठल्याही विभागाकडे नाही. पण या सुविधा गैर व्यवस्थापन , अत्यंत दुर्लक्षित मानव संसाधन व्यवस्थापन , डॉक्टर, नर्स अश्या बौद्धिक संपदेचा तुटवडा आणी आरोग्य क्षेत्राचा चेहरा मोहरा बदलायचाच आहे या इच्छाशक्ती अभावी केवळ निरुपयोगी इमारती मध्ये रुपांतरीत झाल्या आहेत. याचे सगळ्यात म्हत्वाचे कारण म्हणजे धोरण लकवा आणी कुठलेही निश्चित वेळेचे बंधन असलेले ध्येय नसणे . कुठल्या दिशेने कसे जायचे आहे याचे काही धोरण ध्येय नसल्याने तात्कालिक दिखाऊ योजनांचे साजरिकरण एवढेच काय ते आरोग्य विभागात होते आहे. आज आरोग्य क्षेत्रात जी काही पाऊले उचलली जात आहेत ती केवळ एखाद्या मोठ्या घटनेला आणी माध्यमात गवगवा झालेल्या समस्येला तात्पुरत्या मलमपट्टया व त्याही ही दिखाऊ अंगविलेपन स्वरुपाच्या प्रतिक्रिया आहेत . उदाहरणार्थ नाशिक ला अधिक बालमृत्यू झाले कि त्या रूग्णालया पूर्ती खरेदी किव्हा पदे भरणे . राज्यातील प्राधान्याने लक्ष देण्याच्या पहिल्या दहा समस्या कुठल्या . त्यातही उपचारार्थ आणी प्रतिबंधनात्मक असे वर्गीकरण केलेली प्राधान्य कुठली. याचे सविस्तर रूट कॉज अॅनॅलीसीस करून दूरागामी प्रभाव टाकू शकतील अशा उपाययोजना व त्यांची तळा गळा पर्यंत अमलबजावणी अशी विचार प्रणाली एकाही आरोग्य समस्ये बद्दल दिसून येत नाही.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

आधी आरोग्यमंदिरे उभारा आज आरोग्य विभागातील डॉक्टरांसह १५,२९४ पदे रिक्त आहेत . ही पदे भरली गेली तरी त्यातून फार काही निष्पन्न होईल असे वाटत नाही. याचे कारण त्यांच्यावर वचक ठेवणारी सगळी यंत्रणा दिशाहीन व काही प्रमाणात भ्रष्ट आहे. आज शासकीय आरोग्य व्यवस्थेत बौद्धिक संपदेचा तुटवडा आहे हे मान्य पण दुसरीकडे खाजगी क्षेत्रात मात्र डॉक्टरांचे प्रमाण वाढत चालले आहे. चांगले डॉक्टर , परिचारिका शासकीय सेवेकडे का आकर्षित होत नाहीत याचे कारणही आपण शोधू शकलो नाही. ग्रामीण भागात डॉक्टर यायला तयार नाही, एवढ्या निष्कर्षावर आम्ही हातावर हात ठेऊन बसू शकत नाही. आज अरब देश , ऑस्ट्रलिया , न्यूझीलँड येथील अति दुर्गम भागातील आरोग्य सेवा ही भारतीय डॉक्टर उत्तम रित्या चालवत आहेत . विशेष म्हणजे यात महाराष्ट्रातील बहुसंख्य डॉक्टर आहेत . व्यक्ती स्वातंत्र्याचा अभाव असून ही मंडळी इथे काम करत आहेत पण स्वतःच्या राज्यात त्यांना काम करण्याची इच्छा होत नाही. याचे कारण आहे सेवेचा योग्य आर्थिक आणी त्याहून महत्वाचा मानसिक मोबदला न मिळणे . कामाचे वातावरण , निश्चित असलेले कामाचे तास , आपल्या वर काम करत असलेली नियोजन व सुसूत्रता असलेली भ्रष्टाचार विरहीत यंत्रणा या सगळ्या गोष्टी डॉक्टर, परिचारिकांना दुसरीकडे आकर्षित करतात . परदेश सोडाच पण ग्रामीण भागात चालत असलेली खाजगी रुग्णालयांना किव्हा समुद्रावर खाजगी तेल रिफायनरीज लाही डॉक्टर मिळतात पण शासकीय सेवेत मिळत नाहीत . याचे मूळ कारण शासकीय आरोग्य यंत्रणेत मोठा क्रायसिस ऑफ ओनरशिप म्हणजे मालकी हक्काचा पेच आहे. आज शासकीय आरोग्य यंत्रणेत स्वच्छता कर्मचाऱ्यांपासून वर पर्यंत काम करणारी यंत्रणा कोणाला ही उत्तरदायी नाही. त्यांच्या कामाचे कुठलेही ऑडीट नाही. डॉक्टरने ठरवले तरी तो शासकीय यंत्रणेत रुग्णांवर नीट उपचार करू शकत नाही. कारण मोठ्या तर सोडाच साध्या तापाच्या औषधांचा शासकीय रुग्णालयांमध्ये तुटवडा आहे. एका गंभीर रुग्णावर उपचार करता येतील अशी सामग्रीची व्यवस्था नाही. निधीचा तुटवडा आहे हे मान्य पण जो आहे त्या निधीचा विनियोग कसा व्हावा याचा ही साधा विचार नाही. खरेतर निधी तुटवडा तिढा ही सुटू शकतो. एकतर अपव्यय होणारा खर्च वाचवून आणी वैद्यकीय मेडिकल व पॅरामेडीकल शिक्षणातून . इतर अनेक मार्गातून शासकीय आरोग्य व्यवस्था स्वतःचा निधी उभारू शकते . शिवाय कॉर्पोरेट सामाजिक दायित्वाचा निधी आहेच.

महात्मा फुले जन आरोग्य योजना हे शासकीय आरोग्य यंत्रणेचा त्यातच चांगला आणी यशस्वी भाग असला तरी ती विमा योजना आहे. फक्त गंभीर आजारांचे उपचार करणारी विमा योजना ही यशस्वी असली तरी पुरेशी नाही.इतर नवीन योजना उपलब्ध निधीचा कुठला ही पुढचा मागचा दूरागामी विचार न करता आखल्या जात आहेत. उदाहरणार्थ बाईक अम्ब्युलन्स सेवा फक्त मुंबईच्या काही भागा पुरत्या सुरु केल्या . त्यातही फक्त १० बाईक अम्ब्युलन्स या मुंबईच्या १.५ कोटी लोकसंख्येला कशा पुरणार. त्या गल्ली बोळात जाऊन प्राथमिक उपचारा पुरत्या ठीक आहेत. असेच हवाई अॅम्ब्युलन्स चा शासनाचा मानस आहे. निधीचा तुटवडा असताना प्राथमिक आरोग्य सुधारायचे सोडून हेलीकॅपटर , त्या साठी लागणारे इंधन , स्टाफ ही यंत्रणा शासने कडे आहे का. बरे या एअर अॅम्ब्युलन्स मधून जमिनीवर रुग्ण न्यायचे कुठे. तशी रुग्णालये आपल्या कडे आहेत का ? सायकल अॅम्ब्युलन्स हा तर यातील कळस आहे. पूर्ण मोडकळीला आलेल्या आरोग्य सेवेला शेवटच्या घटकेला अशा सायकल अॅम्ब्युलन्स तारू शकणार नाहीत व इतर प्राधान्य सोडून त्यावरील खर्च तिजोरीत खडखडाट असताना परवडणारा नाही. टेली कन्सल्टेशनचा गाजावाजा करत लावलेले मोठे युनिट्स आज शासकीय रुग्णालयांमध्ये तसेच पडून आहेत.
आधी आरोग्य मंदिरे उभारा आज परदेशातील यशस्वी शासकीय आरोग्य सेवांचा अभ्यास केल्यास लक्षात येईल की तिथे प्रतीबांधावर मोठ्या प्रमाणात खर्च व तळागाळात काम होते. त्याचे मोजता येतील असे आरोग्यावर होणारे परिणाम दिसून येतात व ते टार्गेट आधीच ठरवले जातात. लसीकरण तक्त्या सारख्या साध्या गोष्टींचे पाच वर्षांपूर्वी आलेल्या बदलांचे शासकीय यंत्रणेला सोयरसुतक नसते. गेल्या दशकात वाढत्या लोकसंख्ये बरोबर आजार , त्यांच्यासाठीचे उपचार, त्यावर होणारे संशोधन हे वेगाने वाढले आहे. खाजगी डॉक्टरला स्पर्धेत टिकून राहण्यासाठी या बाबत सतत जागरूक रहावे लागते . पण या उन्नतीकरणाशी शासकीय आरोग्य यंत्रणेला काही देणेघेणे नसते. शासकीय रुग्णालयाचे प्रिस्क्रिप्शन कधी काळी लिहिले असेल असे असते . राज्यामध्ये हँन्ड फुट माउथ डिसीज , रीकेटशीयल फिवर या साथी सुरु आहेत. पण हे शब्द ही शासकीय आरोग्य यंत्रणेच्या गावी नाहीत.
वाय. एस राजशेखर रेड्डी या आंध्रप्रदेशच्या दिवंगत मुख्यमंत्र्यांनी केवळ चांगल्या आरोग्य सुविधा देऊन अनेक वर्षे लोकांच्या मनावर राज्य केले . त्यांचा अपघाती मृत्यू झाल्यावर दुखावेगात आत्महत्या केलेले अकरा जन हे त्यांच्या आरोग्य योजनांचे लाभार्थी होते. महाराष्ट्रातील आरोग्य क्षेत्रात काम करायला एवढा वाव आहे कि इथला आरोग्य मंत्री नोबेल चा मानकरी ठरू शकतो .आरोग्यात क्रांती घडवून आणणाऱ्याला लोक स्वतःहून भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांना डोक्यावर घेतील . जो आरोग्य देईल त्याचेच सरकार अशी लोकांनी तरी भूमिका घ्यावी. बाळासाहेबांची लोकांच्या मनावर राज्य करण्याची आपली वेगळी तऱ्हा आणी शैली होती व तो काळ ही वेगळा होता .इतर कुठल्या मंदिरांपेक्षा मोडकळीला आलेली आरोग्य मंदिरे बांधून उद्धव ठाकरे यांनानव्या युगाचे महाराष्ट्राचे ह्र्दयसम्राट होता येईल.

सदरील माहिती आपण लोकसत्ता मध्येही वाचू शकता

विमान प्रवासात घ्या काळजी

विमान प्रवासात घ्या काळजी

विमान प्रवासात घ्या काळजी आंतरदेशीय हवाई वाहूक टप्प्यात सुरु होत असल्याने आता हवाई प्रवास करणाऱ्या सगळ्यांना काही नियम समजावून घ्यावे लागणार आहेत. विमानात बसल्यावर ६ फुट हा सोशल डीस्टन्सिंगचा नियम पाळणे शक्य नसले तरी इतर अनेक गोष्टी आहेत, ज्यामुळे संसर्ग टाळला जाऊ शकतो.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

  • लक्षणे असलेल्या किंवा ताप असलेल्यांना विमान प्रवासाची परवानगी दिली जाणार नाही. म्हणून असे असल्यास माहिती लपवून प्रवास करण्यापेक्षा हवाई प्रवास टाळा.
  • विमानतळाच्या आत जाण्या आधी आरोग्य सेतू अॅप डाउनलोड करून घ्या कारण हे अनिवार्य आहे.
  • तापमान जास्त आढळल्यास किंवा लक्षणे आढळल्यास इंस्टीट्युशनल किंवा घरी विलगीकरणाचा सल्ला दिल्यास वाद घालू नका. दिलेल्या सल्ल्याचे पालन करा.
  • वेब चेक इन करा म्हणजे विमानतळावर संपर्क कमी येईल.
  • काही विमान कंपन्या त्यांच्या अॅप मधूनच बोर्डिंग पास व त्याचा क़्युआर कोड देतात. हे शक्य झाल्यास सेक्युरिटी चेक व पुढे ही इतरांशी संपर्क कमी येईल.
  • कमीत कमी सामानासह प्रवास करा.
  • सेक्युरिटी चेकच्या वेळी ट्रे चा वापर करण्या पेक्षा सर्व सामान स्वतःच्या बॅगेत टाका
  • सेक्युरिटी चेक झाल्यावर क्यूआर कोड असलेला पास असल्यास स्वतःच्या हाताने स्कॅन करा
  • विमानतळाच्या आत गेल्या पासूनपूर्ण प्रक्रिया झाल्यावर विमानात बसण्या आधी साबणाने स्वच्छ हात धुउन घ्या.
  • विमान प्रवासात घ्या काळजी विमानतळाच्या आत गेल्या पासून हात मागे एकमेकात बांधून किवा कुठे ही हात लावायचा नाही हे लक्षात राहील अशा प्रकारे घडी घालून फिरा
  • विमानतळावर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर इकडे तिकडे खरेदी करत फिरू नका.
  • विमानाला वेळ असल्यास बसताना एकमेकांपासून लांब बसा. जागा भरपूर असल्याने हे शक्य आहे.
  • सीट घेताना शक्यतो खिडकी जवळची जागा घ्या. या जागेवर बसणाऱ्यांचा इतरांशी आणि दोन रांगेतून जाणाऱ्यांशी कमी संबंध येतो. ही सीट मिळाली नाही तरी काळजी करू नका.
  • विमानात बसण्या आधी विमानतळावरच शौचालयाचा उपयोग करून घ्या. कमी वेळेचा प्रवास असल्यास विमानातील शौचालयाचा उपयोग करू नका
  • हात दोन सीट मधल्या आर्म रेस्ट वर ठेवू नका. हात दोन्ही मांड्यांवर समोर ठेवा.
  • विमान प्रवासा दरम्यान पाण्यासाठी किंवा उगीचच केबिन कृला बोलवू नका. प्रवासा दरम्यान १०० एमएल पाणी सोबत ठेवण्यास परवानगी असते. म्हणून संपर्क टाळण्यासाठी स्वतःचे १०० एमएल पाणी सोबत ठेवा.
  • सोबत हँड सॅनीटायजर ठेवावा पण तो ३५० एमएल पेक्षा जास्त नसावा. प्रवास करतांना हँड सॅनीटायजर व मास्क अनिवार्य आहे.
  • उतरताना एकमेकांच्या मागे उभे राहून उतरू नये. दोन प्रवाशांमध्ये ६ फुट अंतर ठेवत उतरावे. शक्य असल्यास बसून राहावे व सगळे उतरल्यावर उतरावे.
  • प्रवासा दरम्यान नाक व तोंडाला हात लावणे टाळावे.
  • हवाई प्रवासात ग्लोव्हज अनिवार्य केले आहेत. पण या साठी महागडे सर्जिकल ग्लोव्हजची गरज नाही. विमान प्रवासात घ्या काळजी साधे प्लास्टिक डिस्पोजेबल ग्लोव्हज चालतील. हे स्वस्त असतात. बाहेर निघतांना हे विमानतळाच्या कचरा पेटीत काढून टाकले जाऊ शकतात. ग्लोव्हज काढल्यावर हात धुवावे.
  • हवाई प्रवासा दरम्यान शिंक आल्यास एका प्लास्टिकच्या पिशवीत शिंकावे. ही पिशवी खिशात ठेवावी व नंतर डीस्पोज करावी. विमान कंपन्यांनी सीट समोर स्नीज बॅग्जची सोय करावी. त्या कशा वापरायच्या याचे प्रशिक्षण सुरुवातीला केईन कृ माहिती सांगतात त्यात करावे .
  • घरी गेल्यावर सामान सोडियम हायपोक्लोराईट मध्ये बुडवलेल्या कपड्याने धुवून घ्यावे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

ग्लोव्हज वापरण्याची गरज नाही

ग्लोव्हज वापरण्याची गरज नाही

ग्लोव्हज  वापरण्याची गरज नाही सध्या अनेक सर्वसामान्य लोक, राजकीय नेते, पत्रकार, पोलीस   ग्लोव्हज  वापरताना दिसत आहेत. पण डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, रुग्णालयात काम करणारा प्रशासकीय कर्मचारी व रूग्णालया बाहेर स्वच्छता कर्मचारी सोडल्यास इतर कोणीही हातमोजे म्हणजे ग्लोव्हज  वापरण्याची गरज नाही. जर ग्लोव्हज  वापरले तर वारंवार हात धुणे शक्य नाही व ते धुतले जाणार नाहीत. व न धुतलेल्या ग्लोव्हज  घातलेल्या हातांनी नाक, तोंड व डोळ्यांना हात लावण्याची शक्यता खूप जास्त आहे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

आपण किती ही प्रयत्न केला तरी मास्क नीट बसवण्यासाठी, मास्क खाली करण्यासाठी मास्कला किंवा तोंडाला हात लागतोच. अशा वेळी ग्लोव्हज  घालून हात लागल्यास संसर्गाची शक्यता जास्त आहे. याउलट ग्लोव्हज  न घालता वारंवार हात धुणे, बाहेर कुठे ही गेले कि आधी हात धुणे व बाहेरून घरात आले की लगेचच हात धुणे व नाका तोंडाला हात न लावने हा कोरोनाच्या प्रतिबंधाचा सर्वोत्तम आहे. ग्लोव्हज  घातल्याने मात्र हा मार्ग अवलंबिला जाण्याची शक्यता कमी आहे. बाहेर असताना इकडे तिकडे, पायऱ्या चढताना कुठेही हात न लावणे हे ही तितकेच महत्वाचे आहे. ग्लोव्हज  घातल्यावर , मी ग्लोव्हज  घातल्याने कुठे ही हात लावू शकतो ही भावना मनात बळावते व ग्लोव्हज  घातलेले हात इतरत्र लागून तेच हात नाक व तोंडाला लागतात. ग्लोव्हज  योग्य प्रकारे नेमके कसे घालावे आणि काढावे  ही पद्धत किचकट असते आणि डॉक्टर अनेक वर्ष त्याला सरावलेले असल्याने त्यांना ते सहज जमते. सर्व सामान्य चुकीच्या पद्धतीने हे करण्याची शक्यता जास्त आहे .सर्वांनी ग्लोव्हज  वापरण्याची दुसरी समस्या म्हणजे वापरलेल्या ग्लोव्हज  हा जैविक कचरा असतो आणि त्यांची विल्हेवाट ही रुग्णालय जैविक कचऱ्या प्रमाणे  करावी लागते जी घरी करणे अवघड आहे.  

    ग्लोव्हज  वापरण्याची गरज नाही डॉक्टरांनी व आरोग्य कर्मचाऱ्यांनी, स्वच्छता कर्मचाऱ्यांनी ग्लोव्हज  का वापरायचे कारण कोरोना बाधित व्यक्तींशी व त्या सोबत त्यांच्या संपर्कात आलेल्या वस्तू , सरफेसशी जास्त वेळ व सर्वाधिक संपर्क या वर्गाचा आहे. त्यांना दर १० – १५ मिनिटांनी व्यस्तते मुळे व सतत संपर्काचा स्त्रोत कायम असल्याने शक्य नाही. म्हणून ते ग्लोव्हज चा वापर करू शकतात. ग्लोव्हज  वापरून ही डॉक्टर , पॅरामेडिकल स्टाफ ने दोन रुग्ण तपासण्यामध्ये वैद्यकीय क्षेत्रात वापरले जाणारे सॅनीटायजर वापरायला हवे. तसेच हॉस्पिटल मधून जाताना  रंगाच्या रुग्णालयातील जैविक कचरा जमा करण्याच्या बॅग / डब्यात टाकून जायचे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

तापात येणारे झटके

तापात येणारे झटके

तापात येणारे झटके वयाच्या सहाव्या महिन्यापासून पाच वर्षांपर्यंतच्या मुला-मुलींमध्ये १००.४ डिग्री फॅरनहाईटच्या पुढे ताप आल्यास मेंदूशी निगडित इतर जंतुसंसर्ग नसताना येणारे झटके, म्हणजे तापात येणारे झटके. जवळपास २ ते ५ % मुलामुलींना ६ वर्षांपर्यंत एकदा तरी तपात झटका येतो

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

तापातील झटक्यांचे प्रकार
साधे म्हणजे सिंपल आणि गुंतागुंतीचे म्हणजे कॉम्प्लेक्स असे दोन प्रकार असतात.
तापातील साधे झटके म्हणजे १५ मिनिटांपेक्षा कमी काळ चालणारे, पूर्ण शरीराला २४ तासांत एकदाच येणारे असतात.
गुंतागुंतीचे झटके १५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ चालतात. ते शरीराच्या एका भागावर २४ तासांत वारंवार येतात.

हे प्रकार जाणून घेणे महत्वाचे का?
तापातील झटके हे साधे आहेत की गुंतागुंतीचे, यावर गुंतागुंतीचे प्रमाण व आयुष्यात पुढे सहाव्या वर्षानंतर झटक्यांचा त्रास म्हणजे अपस्मार (इपिलेप्सी) होईल का, हे ठरते. साध्या तापातल्या झटक्यांमध्ये पुढे इपिलेप्सीचा त्रास होण्याचे प्रमाण १% तर कॉम्प्लेक्समध्ये ६% असते. तसेच, साधे झटके ५ वर्षांपर्यंत आले तरी, त्याचा पुढील आयुष्यावर काही परिणाम होत नाही.

झटके परत येण्याची शक्यता किती ?
पहिल्यांदा झटके आल्यावर ३०% मुलांमध्ये आणि दुसऱ्यांदा आल्यावर ५०% मुलांमध्ये तापात परत झटके येण्याची शक्यता असते.

पुन्हा झटके येण्याची शक्यता वाढविणाऱ्या गोष्टी
वय एक वर्षापेक्षा कमी असणे.
झटके आले तेव्हा ताप १००.४ ते १०२.२ अंश असणे.
घरात झटक्यांचा वैद्यकीय इतिहास असणे.
कुठल्याही पालकाला लहानपणी तापात झटक्यांचा त्रास असणे.
मुलांमध्ये मुलींपेक्षा परत झटके येण्याचे प्रमाण जास्त.

६ वर्षानंतर उपचार घ्यावे लागण्याची शक्यता किती?
२ ते ७ % मुलांना ५ वर्षांनंतर नियमित झटक्यामुळे उपचार लागतात.
इपिलेप्सीचा त्रास होऊ शकतो. पण अभ्यास करण्याची क्षमता, वर्तणुक नॉर्मल राहते.
तापातील झटक्यांचा पुढील आयुष्यावर विशेष परिणाम होत नाही.

उपचार काय?
झटके आल्यावर बाळाला एका बाजूला, कुशीवर झोपवावे.
तोंडासमोर कांदा, चप्पल हुंगायला देणे, तोंडात चमचा टाकणे, हातबोटांचा वापर आदी गोष्टी पूर्णपणे टाळाव्यात.
फक्त जीभ दातांमध्ये येत असल्यास ती बोटाने दातातून बाजूला करावी.
डोके झटक्यामुळे हलत असल्यास इजा होऊ नये म्हणून डोक्याभोवती उशी ठेवावी.
त्वरित बालरोगतज्ज्ञांकडे न्यावे.
बालरोगतज्ज्ञ तापाची व त्वरित झटके थांबवणारी औषधे सलाईनद्वारे देऊन पुढील उपचार करतील.

प्रतिबंध कसा करावा? तापात येणारे झटके अशा मुलांना परत झटके येऊ शकतात. म्हणून आधी तापात झटके आलेल्या मुलांना ताप आल्यावर लगेच तापाचे औषध देऊन डॉक्टरांकडे जाण्याआधीच उपचार सुरू करावेत. यासाठी ‘पॅरॅसीटॅमॉल’ हे औषध १५ मिलीग्राम प्रती किलो या डोसप्रमाणे मुलाला द्यावे किंवा आपले तापाचे औषध मुलांना ताप आल्यास किती द्यावे, हे आपल्या डॉक्टरांना विचारून लिहून ठेवावे. त्याप्रमाणे द्यावे.

ताप आल्यावर यासोबतच पूर्ण अंग पुढून व मागून ओल्या कपड्याने पुसून घ्यावे. (डोक्यावर ओल्या कपड्याच्या पट्ट्या ठेवू नयेत. त्यामुळे ताप कमी होत नाही.)
यानंतर प्रत्येक वेळी ताप आल्यावर बालरोगतज्ज्ञांच्या सल्ल्याने ‘क्लोबाझाम’ हे औषध तीन दिवस द्यावे.

सदरील माहिती आपण सकाळ मध्येही वाचू शकता

एकदा कोरोना झाल्यावर परत संपर्क आल्यास कोरोना होऊ शकतो का?

एकदा कोरोना झाल्यावर परत संपर्क आल्यास कोरोना होऊ शकतो का?

एकदा कोरोना झाल्यावर परत संपर्क आल्यास कोरोना होऊ शकतो का? परदेशात काही कोरना रुग्णांना परत संपर्क आल्यावर कोरोनाचा संसर्ग झाला. पण हे प्रमाण खूप कमी होते. एकदा कोरोना झाल्यावर परत संपर्क आल्यास काय? याचे उत्तर संशोधक प्रयोग करून शोधत आहेत.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

बॉस्टन येथे ९ माकडांवर केलेल्या एका प्रयोगात सहभागी झालेल्या माकडांचा बरे झल्यावर ३५ दिवसांनी परत कोरोना विषाणूशी संपर्क आला. पण या नंतर या आधी एकदा संसर्ग झालेल्या या माकडांना दुसऱ्यांदा संपर्क आल्यावर काहींना अत्यंत सौम्य व काहींना कुठलीही लक्षणे दिसली नाहीत. त्यांच्या शरीरातील प्रतिकारशक्ती दर्शवणारे घटक म्हणजेच अँटीबॉडिज या मानव बरे झाल्यावर निर्माण होतात तेवढ्याच पातळीच्या होत्या. यावरून परत कोरोना झाल्यास शरीरात आधी इतकाच प्रतिकारशक्तीचा प्रतिसाद मिळू शकतो असे दिसून येते. पण या अभ्यासाच्या मर्यादा या आहेत, की हे प्राण्यांवरील संशोधन आहे. एकदा कोरोना झाल्यावर परत संपर्क आल्यास कोरोना होऊ शकतो का? तसेच ही शरीरातील प्रतिकारशक्ती किती काळ टिकून राहते हे समजण्यासाठी अजून वाट पाहावी लागेल. तसेच मानवामध्ये काय होते हे सांगण्यास याचा आधार घेतला जाऊ शकतो पण मानवात काय घडते हे साथ पुढे सरकेल तसे स्पष्ट होईल. तसेच दुसऱ्यांदा संसर्ग झाल्यास तो तीव्र नसेल असे मानले तरी एकदा कोरोना झालेल्या रुग्णाला सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, हात धुणे हे सर्व प्रतिबंधाचे नियम पाळायचेच आहेत. पण मात्र गोवर, कांजण्या या आजारांसारखे एकदा संसर्ग झाला की तो संसार्गच तुम्हाला आयुष्यभर कायमची प्रतिकारशक्ती बहाल करेल हे सांगता येणार नाही.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

क्रिकेट बॉल, नोटा व पान उलटताना थुंकीचा वापर नको

क्रिकेट बॉल, नोटा व पान उलटताना थुंकीचा वापर नको

” क्रिकेट बॉल, नोटा व पान उलटताना थुंकीचा वापर नको अनेक वर्षांच्या सवयीप्रमाणे अनेक कारणांसाठी थुंकीचा वापर करण्याची आपल्याला सवय लागली आहे. पण कोरोनानंतर आता ही सवय बदलावी लागणार आहे. याचे कारण थुंकीतून कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो आणि ज्या गोष्टीसाठी थुंकी वापरली ती कोरोना पसरवण्यासाठी वाहक ठरू शकते. पुढील गोष्टी करताना थुंकीचा वापर थांबवा.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

  • क्रिकेट बॉल, नोटा व पान उलटताना थुंकीचा वापर नको क्रिकेट खेळताना सुरुवातीच्या ओव्हर्स संपल्यावर चेंडू प्रभावी पणे रिवर्स स्विंग व्हावा म्हणून खेळाडू चेंडू चमकवण्यासाठी घाम किंवा थुंकीचा वापर करतात. यामुळे कोरोनाचा प्रसार होऊ शकतो म्हणून आयसीसीने चेंडू चमकवण्यासाठी थुंकी किंवा घामाचा वापर करण्यावर बंदी घातली आहे. या ऐवजी ओव्हर संपल्यावर अम्पायर समोर चेंडू चमकवन्यासाठी कृत्रिम पदार्थ उपलब्ध करून देण्याची तयारी आयसीसीने केली आहे. त्यामुळे खेळाडूंनी असा  थुंकी व घामाचा वापर चेंडू चमकावण्यासाठी बंद करावे. अंतरराष्ट्रीयच नव्हे तर स्थानिक व गल्लीत मुले खेळत असलेल्या क्रिकेट मध्येही हा नियम पाळला जावा. अंतरराष्ट्रीयच क्रिकेट मध्ये मोठ्या खेळाडूंनी हे करणे थांबवले की इतर ठिकाणी हे अपोआप थांबेल. कारण बऱ्याचदा छोट्या प्रमाणावर खेळताना असे नक्कल म्हणून केले जाते.
  • बँके मध्ये किंवा घरात नोटा मोजताना थुंकीचा वापर करू नका.
  • पाकिटे, पोस्ट स्टॅम्प, कोर्टातील फी स्टॅम्प चिटकवण्यासाठी थुंकीचा वापर नको. दिल्ली हायकोर्टाने कोर्टात थुंकीचा वापर न करण्या विषयी आदेश काढला आहे.
  • यासाठी बँकेत, कोर्टात, मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत, वाचनालये उघडल्यावर तिथे ही प्रत्येक टेबल समोर स्पंजचे तुकडे ओले करून ठेवायला हवे. हे स्पंज ओले करण्यासाठी पाण्याऐवजी  हँड सॅनीटायजर चा वापर करता येईल.  

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता