युद्ध मानसिकतेत ‘जोश’ बरोबर होश पण हवा !

War Psycology

गेला महिना आपला देश एका वेगळ्याच राष्ट्रीय मानसिकतेतून जात होता. पुलवामा हल्ल्यानंतर ते विंग कमांडर अभिनंदनची अटक व सुटका पर्यंत देशातील नागरिक अनेक मानसिक आंदोलने अनुभवत आहेत. यात पाकिस्तान बद्दल राग, द्वेष, बदल्याची तीव्र भावना. आपल्या देशा बद्दल किंवा कुटुंबांबद्दल हल्ले, युद्ध सदृश परिस्थितीतून भीती, चिंता, काळजी, मृतांबद्दल दु:ख अशा अनेक भावनांचा समावेश आहे. बालाकोट वरील भारतीय वायुदलाच्या हल्ल्यानंतर ‘हाऊज द जोश’ सारखे वाक्य समाज माध्यमांवर सतत गाजत होते. शत्रूला हरवल्याच्या तीव्र आनंदा पासून ते देशभक्तीचे साजरीकरण अशा सकारात्मक व पुढे काय या अनिश्चितता, भीती अशा नकारात्मक भावनांचे हेलकावे लंबकाच्या आंदोलनाप्रमाणे दोन विरुद्ध भावनेवर देश आंदोलणे घेत होता .

युद्ध
युद्ध सदृश परिस्थितीतून भीती, चिंता, काळजी, मृतांबद्दल दु:ख अशा अनेक भावनांचा समावेश आहे.

या सगळ्या भावना उत्स्प्फुर्त असल्या तरी आज समाज माध्यमांमुळे अधिक प्रमाणात व्यक्त व झपाट्याने पसरणाऱ्या आहेत. पण या सर्व भावनांचा आपल्या तब्येतीशी आपल्या प्रत्येकाच्या मानसिक परिस्थितीशी सहज न जाणवणारा पण निश्चित कुठे तरी, कुठल्या तरी स्वरुपात बाहेर येणारा मानसिक परिणाम आहे. या सर्व भावना देशभक्तीशी जोडून आपण त्याचे समर्थन करत असलो तरी शरीरात उठणाऱ्या प्रत्येक भावनिक तरंगांना शरीर व त्याची फीसीयॉलॉजी काही तरी प्रतिसाद देतच असते. मानसशास्त्राच्या भाषेत याला ‘मास हिस्टेरिया’ किंवा ‘मास मेनिया’ म्हणत असले तरी राष्ट्रीय सुरक्षिततेच्या मुद्द्यांवर असे अनिश्चिततेचा भावनावेग तीव्र होतो तेव्हा तेव्हा देशाच्या नागरिकाला त्याची मानसिक आजारांच्या, असंतुलनाच्या रुपात किंमत मोजावी लागली आहे. अंतरराष्ट्रीय पातळीवर अशा घडामोडी झाल्या तेव्हा त्याचा मानसिकतेवर होणारा नजीकचा व दुरागामी परिणामांचा अभ्यास झाला आहे. जसे आधी युद्ध जमिनीवर लढली जायची, पुढे ती फक्त सैन्यांमध्ये लढली जाऊ लागली, नंतर सायबर हल्ले, विषाणू–जीवाणूंच्या रूपाने बायो टेररीझम अशी स्वरूपे बदलत गेली. पण त्याचा एक भाग हा असा मानसिक युद्ध ही असू शकतो हे यावेळी सामाजिक माध्यमांवरच्या व जनते मधील भावनिक स्फोटाच्या रूपाने पुढे आला आहे.

डॉ अमोल अन्नदातेंचे इतर लेख वाचण्यासाठी

अमेरिकेत ९/११ घडले तेव्हा त्या नंतर तीव्र नैराश्य, असुरीक्षितते मुळे लोकसंख्येचा स्फोट अशा रुपात पुढे आला. भारताचा स्वातंत्र्य लढा हा त्या वेळी मानसशास्त्रात कुठले ही मोठे संशोधन झालेले नसताना स्वातंत्र्य लढ्यात कुठल्या ही नकारात्मक भावनांचा भार पिढी पुढे घेऊन जाणार नाही, अशा स्वरुपात नियोजनबद्ध रित्या संपवला. ब्रिटेनचेच राज्य असलेले ऑस्ट्रेलिया सारखे देश ही स्वतंत्र झाले पण त्यांच्या पारतंत्र्यातील भावनांमुळे आजही त्यांच्या तिसर्या पिढीत नैराश्याच्या तीव्र भावना व हा आजार आहे. जणू यामुळे त्यांच्यात जनुकीय बदलच झाले. म्हणूनच त्या देशात आजही ड्रग अॅडीक्शनचे प्रमाण खूप जास्त आहे. सध्या आपल्या देशात ही व त्यातच गेल्या महिना भरात अशा भावनिक लाटा येत आहेत. आपल्याला प्रत्येकाला आपल्या देशाबद्दल प्रेम आहे व तो व्यक्त करण्याचा अधिकार आहे. इतरांसारखा तो मला ही आहे. पण कुठल्याही भावनावेगाला योग्य रूप मिळाले नाही तर त्याचे दमन न होता ती उर्जा कुठल्यान कुठल्या स्वरुपात बाहेर पडणार. उदाहरणार्थ शत्रूला हरवल्याच्या तीव्र आनंद व हा आनंद परत परत अनुभवण्याची मानसिकता, व्यक्त करण्याचे प्रकार या मुळे उन्माद होतो व रस्त्यावरील भांडणांचे, रागाचे, रस्त्यावर छोट्या मोठ्या कारणांवरून खुनांचे प्रकार वाढतात. सतत बदल्याच्या भावने पोटी नैराश्य येऊ शकते. राग, चिंता, बदल्याची भावना या सर्व गोष्टींचा आज ह्र्दयरोग, उच्च रक्तदाब, मधूमेह अशा आजारांशी संबंध सिध्द झाला आहे. अगदी पाठदुखी सारख्या आजारांचा भावनिक संबंध सिध्द झाला आहे.

मग याचा अर्थ मी देशभक्ती व्यक्तच करायची नाही का? असे मुळीच नाही. पण अशा तीव्र भावना व्यक्त करताना किंवा अनुभवताना गरज असते रॅशनल थिंकिंग किंवा तारतम्य व विवेकी वैचारिक प्रक्रियेची. म्हणजेच शत्रू राष्ट्र किंवा देशा बद्दल माझ्या या भावना कितीही तीव्र असल्या तरी त्याच्या वर निर्णय घेणारी, त्याचे सतत विवेचन करणारी या गोष्टीला वाहिलेली स्वतंत्र यंत्रणा माझ्या देशात आहे व ती सक्षम आहे . त्यावर मी स्वतः कुठला ही निर्णय घेऊ शकत नाही. या उलट आपल्या नकारत्मक भावनांच्या प्रदर्शनामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका वगैरे खूपच पुढच्या गोष्टी आहेत. आधी आपल्या मानसिकतेला धोका व इतर राष्ट्राचा आपल्याला नकारात्मक भावनांच्या खाईत लोटण्याचा हेतू साध्य होऊ शकतो हे समजून घ्यावे. म्हणून या भावना जरूर असाव्या पण भावनावेगात वाहवत न जाणे हा आपल्या राष्ट्राच्या, राष्ट्रीय सुरक्षेच्या कर्तव्याचा भाग समजावा. म्हणूनच ‘हाऊज द जोश’ ला उत्तर “हाय बट ईन माय हॅन्ड्स सर” हे उत्तर जास्त समर्पक ठरेल.

सदरील लेख २ मार्च, २०१९ रोजी लोकमत च्या मुंबई आवृत्तीत प्रकाशित झाला आहे. लोकमत वृत्तपत्रात हा लेख वाचण्यासाठी क्लिक करा.

Dr. Amol Annadte | amolaannadate@gmail.com

सक्तीने नको, मना पासून गोड बोला

Lokmat Article Amol Annadate


Dr. Amol Annadate Articles in Lokmat on Sankranti

वैद्यकीय क्षेत्रात गोड बोलण्याला खूप महत्व आहे. बर्याचदा रुग्ण, त्यांचे नातेवाईक वैतागलेले असतात. असे म्हणतात कि डॉक्टरच्या बोलण्याने अर्धा आजार बरा होतो. पण त्याच वेळी डॉक्टर ही नातेवाईकांमध्ये त्याला समजून घेणारा गोड बोलणारा कोणीतरी शोधत असतो. पण काहीही झाले तरी गोड आणी गुड बोलण्याने आपले आरोग्य चांगले राहते.

तिळगुळ घेऊन गोड बोलण्याचा कोणी आग्रह केला कि एखादा रोख ठोक व्यक्ती विचारतो मी तुझ्याशी कधी कडू बोललो ? .कुठून बुद्धी सुचली आणी  याला गोड बोलण्याचा आग्रह केला अशी परिस्थिती होते. पण समोरचा आपला बिचारा निरागसपणे आठवून बघत असेल कि खरच मी याच्याशी कधी कडू बोललो. पण आपल्याला ही शक्यता लक्षात येत नाही. गुड आणि गोड न बोलण्याचे बर्याच वेळा हेच कारण असते कि इतरां बद्दल आपल्या मनात बरेच भ्रम असतात. आज काही तरी कारण असताना किव्हा ज्याला आपण प्रोफेशनल असा हल्ली गोंडस शब्द वापरतो, अशा कारणांनी आपल्याला सक्तीने गोड बोलावेच लागते . मी पहिल्यांदा विमान प्रवास केला तेव्हा हवाई सुंदरी कडे सहज बघितले तरी ती उगीचच हसायची , काही मागीतले कि खूपच हसून गोड बोलायची. शेवटी न राहवून मी तिला विचारले कि आपली ओळख आहे का ? ती नाही म्हंटली. मग तिला विचारले तू एवढे गोड का बोलते आहेस माझ्याशी. ती उत्तरली सर त्याचेच आम्हाला पैसे मिळतात . ते माझे कामच आहे. असे सगळ्यांनाच गोड बोलण्याचे शासकीय अनुदान मिळाले असते तर किती बरे झाले असते ना?  पण काही कारण नसताना , एखाद्या कडे कुठलाही स्वार्थ नसताना गोड बोलण्यात खरे आव्हान असते. आज मात्र गोड बोलण्याची परिस्थिती काय आहे याची गम्मत कवी अशोक नायगावकर त्यांच्या कार्यक्रमात सांगत असतात . नायगावकर सांगतात तिळगुळ देताना म्हणे एका ठिकाणी मारामारी झाली … गोड बोलायला कोणाला शिकवता ? अशी आजची गोड बोलण्याविषयी परिस्थिती आहे.

                       वैद्यकीय क्षेत्रात गोड बोलण्याला खूप महत्व आहे. बर्याचदा रुग्ण, त्यांचे नातेवाईक वैतागलेले असतात. असे म्हणतात कि डॉक्टरच्या बोलण्याने अर्धा आजार बरा होतो. पण त्याच वेळी डॉक्टर ही नातेवाईकांमध्ये त्याला समजून घेणारा गोड बोलणारा कोणीतरी शोधत असतो. मला प्रॅक्टिस सुरु करताना एका ज्येष्ठ डॉक्टरने सांगितले – तुला काही आले नाही तरी चालेल पण तुला गोड बोलता आले पाहिजे . पण एकाच महिन्यात एका रुग्णाने सांगितले सर तुम्ही नवीन प्रॅक्टिस सुरु केली आहे – माझा अनुभव सांगतो, गोड बोलणारा डॉक्टर म्हणजे फसवणारा. मला नेमके काय करावे ते कळेना . पण काहीही झाले तरी गोड आणी गुड बोलण्याने आपले आरोग्य चांगले राहते. एवढा एक स्वार्थी हेतू ही गोड बोलण्यास पुरेसा आहे. पण चला तब्येतीचे जाऊ द्या गोड बोलण्याने आपल्याला बरे वाटते. गोड बोलण्या साठी एवढे कारण ही पुरेसे नाही का ?

This was one of the Dr. Amol Annadate Articles published in Lokmat. For more articles you can browse the Articles Tab.

amolaannadate@gmail.com

www.amolannadate.com