नियमित लसीकरणाचे काय करायचे

नियमित लसीकरणाचे काय

नियमित लसीकरणाचे काय करायचे सध्या लहान मुलांचे नियमित लसीकरण घ्यावे की नाही असा प्रश्न अनेक पालकांना पडला आहे. नियमित लसीकरण घेण्यास मुळीच हरकत नाही. फक्त रेड झोन व त्यातच मुंबई व पुण्यामध्ये ते ३ मे पर्यंत पुढे ढकलावे. लसीकरण घेण्यास अशा वेळी थोडा उशीर झाला तरी चालेल. लसीकरणाची तारिख ढळली म्हणून फार काळजी करू नये.यासाठी पुढील गोष्टी समजून घ्या व पाळा.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

 १. अनेक बालरोगतज्ञांनी लसीकरणाची व इतर आजार असलेल्या लहान मुलांना तपासण्याच्या वेळा वेगळ्या ठरवलेल्या आहेत. तापाचे व नॉर्मल बाळांचा एकमेकांशी संपर्क येऊ नये म्हणून हे केले आहे. त्यामुळे शक्यतो बालरोगतज्ञांना फोन करून व वेळ घेऊनच जावे.

२.जाताना मुलगा दोन वर्षांपेक्षा मोठा असल्यास सोबत एकाच पालकाने जावे. त्यापेक्षा लहान असल्यास आई – वडील दोघांना जावे लागेल. दोघे गेले तरी रुग्णालयाच्या आत एकाच पालकाने जावे.

३. लसीकरणाच्या वेळी बाळाला सर्दी खोकला नाही याची काळजी घ्यावी. तसेच कुठल्या ही पालकाला ताप, सर्दी, खोकल्या पैकी काहीही असल्यास त्याने सोबत येऊ नये.

रुग्णालयात, डॉक्टर समोर सोशल डीस्टन्सिंग पाळा

४. लसीकरणासाठी आजी आजोबांनी सोबत येऊ नये

५.लसीकरणासाठी रुग्णालयात आत जाताना व बाहेर आल्यावर हँड सॅनीटायजर चा वापर करावा. हॉस्पिटलच्या आत गेल्यावर कुठे ही हात लावू नका.

५.डॉक्टरच्या केबिनमध्ये खुर्चीवर बसू नका. लस घेताना डॉक्टर तपासतात त्या बेड वर घरून आणलेला एक कपडा टाका. त्यावर तुम्ही बसा व मुलाला मांडीवर घ्या म्हणजे बाळाचा कुठे ही संपर्क येणार नाही. घरी गेल्यावर हा कपडा गरम पाण्यात टाकून धुवून घ्या.

६.मुलांना रुग्णालयाच्या वेटिंग मध्ये इकडे तिकडे फिरून खेळायची सवय असते. हे टाळा व मुलाला वेटिंग मध्ये हात पकडून स्वतः जवळच ठेवा.

७. नियमित लसीकरणाचे काय करायचे २ वर्षा पेक्षा मोठ्या मुलांना केबिनमध्ये  डॉक्टरांचा स्टेथोस्कोपशी खेळणे, ते तोंडात टाकणे , डॉक्टरांच्या टेबल वरील वस्तू उचलून खेळणे अशी सवय असते. त्यामुळे डॉक्टरांच्या केबिनमध्ये मुलांचा हात सोडू नका व त्यांना कुठे ही हात लावण्यापासून रोखा. शक्य असेल तेव्हा बाळाला केबिनमध्ये कड्यावरून खाली उतरवूच नका.

८..लसीकरणा नंतर थोडा ताप येणे नॉर्मल असते. म्हणून पुढच्या दिवशी ताप आल्यावर काही झाले का? म्हणून घाबरून जाऊ नका. कारण हा लसी मुळे येणारा नॉर्मल ताप आहे.

9. लसीकरणाचे पैसे नोटा हाताळून देण्यापेक्षा डिजिटल पद्धतीने द्या

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

मद्यपान सोडण्यासाठी चांगले निमित्त

मद्यपान सोडण्यासाठी चांगले निमित्त

मद्यपान सोडण्यासाठी चांगले निमित्त लॉकडाऊनच्या काळात मद्य उपलब्ध नसल्याने अनेकांवर सक्तीची व्यसनमुक्ती लादली गेली. यामुळे मद्य सोडल्या नंतर काही प्रमाणात या नंतरची शारीरीक व मानसिक लक्षणांचे ( वीड्रॉवल ) रुग्ण वाढले आहेत. पण या निमित्ताने आपण मद्या शिवाय राहू शकतो हा आत्मविश्वास बाळगून इथूनच व्यसनमुक्तीला सुरुवात करा. मद्य सोडण्याचे अजून एक कारण म्हणजे मद्य प्राशनामुळे शरीरात जीवन सत्वांची कमतरता निर्माण होते व त्यामुळे प्रतिकारशक्ती कमी होते. म्हणून असे अप्रत्यक्षपणे म्हणता येईल की मद्यप्राशन तुम्हाला कोरोनाच्या  संसर्गाची शक्यता वाढवू शकतो.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

मद्यपान सोडण्यासाठी चांगले निमित्त मद्यप्राशन सोडल्यावर पुढील लक्षणे जाणवू शकतात – थरथरणे , झोप न लागणे, वाईट स्वप्न पडणे, बेचैन होणे, निराश वाटणे, रोजची ठरलेली मद्यप्राशनाची  वेळ झाली कि बेचैनी वाढणे.

घरचे सदस्य यासाठी अशा व्यक्तीला मद्य देण्याचा प्रयत्न करतात. पण अशा लक्षणांवर मानसोपचारतज्ज्ञांकडून उपचार घेऊ शकता. याशिवाय घरी पुढील गोष्टी करता येतील –

  • भरपूर पाणी प्या ( दिवसाला ६ ते ८ लिटर ) यापैकी  – एक ग्लास पाण्यामध्ये चिमुटभर मीठ, १ चमचा साखर आणि अर्धे लिंबू – असे सकाळी व रात्री दोन ग्लास घ्या.
  • रोज एक तास व्यायाम करा.
  • कोणाशी तरी बोलून आपल्या भावना व्यक्त करा.
  • काय वाटते ते लिहिणे, चित्र काढणे, शांत संगीत ऐकणे अशा आनंददायक गोष्टी करा.
  • रोजच्या मद्य पिण्याच्या वेळेला काही तरी नवे वेळापत्रक बनवून ते करा व त्यावेळी फोन वरून जवळच्या मित्राची किंवा घरच्या सदस्याची मदत घ्या.

यानिमित्ताने मानसोपचार तज्ञांच्या सल्ल्याने आपण तीन महिने जरी उपचार व समुपदेशन घेतले तरी मद्यपान सुटू शकते. प्रत्येक गावामध्ये या साठी अल्कोहोलीक अॅनॉनीमस हा मोफत काम करणारा स्वयंसेवकांचा समूह कार्यरत असतो. तो शोधून तुम्ही या साठी त्यांची मोफत मदत घेऊ शकता.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

हात धुण्यामुळे त्रास होत असल्यास

हात धुण्यामुळे त्रास होत असल्यास

हात धुण्यामुळे त्रास होत असल्यास सध्या वारंवार हात धुणे व हँड सॅनीटायजर चा वापर करणे कोरोना टाळण्यासाठी आवश्यक आहे. पण वारंवार हात धुण्याने अनेकांच्या हाताला कोरडेपणा ( ड्रायनेस ) येऊ लागला आहे. याचे एक कारण असे ही आहे कि या पूर्वी आपल्याला हात धुण्याची सवय नव्हती. यासाठी हात धुतल्या नंतर लगेचच मुलायम कपड्याने पाणी पुसून घ्या व त्यानंतर लगेचच कुठले ही मॉईस्चरायजर लगेचच हाताला लावावे. ते ही नसेल तर डोक्याला लावायचे खोबऱ्याचे थोडे तेल हाताला लावले तरी चालेल. रात्री झोपताना तिळाचे तेल हाताला लावून झोपावे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

हात धुण्यामुळे त्रास होत असल्यास हँड सॅनीटायजर मध्ये अल्कोहोल असते व अनेकांना त्याची अॅलर्जी असते. काहींना त्यामुळे हात चुरचुरण्याचा त्रास होतो. असे होत असल्यास आणि नियमित हात धूत असल्यास हँड सॅनीटायजर वापरला नाही तरी चालेल. कोरोना साठी मुख्य प्रतिबंधक उपाय हा साबणाने हात धुणे हा आहे व हँड सॅनीटायजरचा वापर हा एक आधार आहे. जिथे बाहेर गेल्यावर हात धुण्याची सोय नाही तिथेच त्रास होत असणाऱ्यानी हँड सॅनीटायजरचा वापर करावा.

हात धुण्यामुळे त्रास होत असल्यास हात धुण्याविषयी एक मानसिक समस्या वाढल्याचे ही मानसोपचार तज्ञांचे निरीक्षण आहे. एखादी गोष्ट इच्छा नसताना वारंवार करण्याची नियंत्रित न करता येणारी  भावना मनात येण्याची एक मानसिक समस्या असते. यात सर्वाधिक प्रमाण हे हात धुण्याची आणि स्वच्छतेची सवय असते. सध्या भीती पोटी गरजे पेक्षा जास्त वेळा हात धुण्याची इच्छा होण्याची मानसिक समस्या काहींना भेडसावते आहे. कोरोना टाळण्यासाठी हात धुणे आणि वारंवार उगीचच हात धुणे यात फरक आहे. हा फरक स्वतःला व कुटुंबातील इतरांना ही लगेच लक्षात येईल. असे होत असल्यास मानसोपचातज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

भीती घालवण्यासाठी वापरा रेन टेक्निक

भीती घालवण्यासाठी वापरा रेन टेक्निक

भीती घालवण्यासाठी वापरा रेन टेक्निक कोरोनाची मनातील भीती कमी करण्यासाठी भावनिक व्यवस्थापन  तज्ञ डॉ. संदीप केळकर पुढील रेन टेक्निक सुचवतात.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

  • A…Accept, Approve – स्वीकारणे
  • R…Recognize – म्हणजे ओळखणे
  • I….Investigate – पडताळणी करणे
  • N..Non attachment – भावना स्वीकारून त्या पासून स्वतःला वेगळे करणे

R..recognizeभावना ओळखा

ह्या संकटामध्ये कोरोना विषयी मी कुठल्या भावना अनुभवत आहे. भीती, नैराश्य, काळजी, चिंता. आपण अनुभवत असलेल्या भावनेला ओळखून आपण नाव देऊ शकलो तर त्याचा सामना करणे खूप सोपे जाते असे दिसून आले आहे.

A..Acceptस्वीकार करा

भावनांना दडपलं तर त्या आपल्याला दुप्पट वेगाने गिळंकृत करतात आणि दुर्लक्ष केलं तर, त्या चुंबाकासारख्या तुम्हाला खेचून घेतात. म्हणून त्यांचा योग्य वेळीच स्वीकार करा. अशा भावना मनात  येणे हे स्वाभाविक आहे हे स्वीकारा. अशा प्रकारे स्वीकार केल्याने त्याची तीव्रता कमी करता येते.

I..Investigateपडताळणी करा

ही भावना मला काय सांगायचा प्रयत्न करते आहे? मला काय संदेश देत आहे? ह्याची पडताळणी करा. संदेश ओळखला तर भावनेची तीव्रता कमी होण्यास मदत होइल.

N..Non Attachment

भीती घालवण्यासाठी वापरा रेन टेक्निक म्हणजेच… या भावना म्हणजे मी नाही. ती माझ्या मनात परिस्थिती मुळे उमटणारी एक तात्कालिक भावना आहे. आधी मी अनुभवलेल्या नकारत्मक भावना कायमच्या टिकल्या नाहीत. म्हणून या ही टिकणार नाहीत. म्हणून ही भावना म्हणजे कायमचा मी नाही. एकदा अशा प्रकारे भावनेकडे निर्लेप, तटस्थ आणि वस्तुनिष्ठ पद्धतीने बघितले कि ती  भावना नियंत्रित करण्यास सोपे जाते  व  भावनांशी मैत्री करता येते. यापुढे जाऊन या चार पायर्यांमधून प्रत्येक भावनेचे विश्लेषण केले कि आपण त्यासाठी मदत घेण्यास ही तयार होतो, इतरांना त्या सहज बोलून दाखवू शकतो. कोरोना विषयी भीती, तणाव , नैराश्य अशा कुठल्या ही भावना मनात येत असतील तर कागद पेन घेऊन वरील चार पायर्यांवर त्यांचे स्वतःच विश्लेषण करा.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

मानसिक तणावावर ठेवा नियंत्रण

मानसिक तणावावर ठेवा नियंत्रण कोरोनामुळे आत्महत्या टाळण्यासाठी नातेवाईकांसाठी व रुग्णांसाठी महत्वाच्या सूचना व लक्षणे

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

कोरोना नसलेल्या व्यक्तींसाठी –

  • मानसिक तणावावर ठेवा नियंत्रण सतत कोरोना बद्दल माहिती विचारणे व कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यू विषयी चर्चा करणे.
  • आपल्याला कोरोना आहे का? याची काहीही लक्षणे नसताना  खातरजमा करण्याचा डॉक्टरांकडे वारंवार हट्ट करणे.
  • आपले काही खरे नाही / मी नसल्याने कोणाला ही फरक पडणार नाही असे वारंवार सांगणे.
  • नातेवाईकांना फोन करून खुशाली विचारून हे शेवटचे बोलणे असल्याची सूचित करणे.
  • बँकेच्या खात्यांची, महत्वाचे पासवर्ड तडकाफडकी आपल्या नातेवाईकांना देणे.
  • निराश असलेली व्यक्ती अचानक मूड बदलून आनंदी होणे ही महत्वाची वॉर्निंग साईन अनेक जणांच्या लक्षात येत नाही असे मानसोपचार तज्ञ डॉ.शैलेश ओमाटे सांगतात.

कोविड असलेल्यांसाठी –

  • समुपदेशकाकडून बरे होण्याचे प्रमाण खूप जास्त असल्याचे प्रमाण समजावून सांगणे.
  • कोविड रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णाशी फोन, इंटरकॉम, व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून सतत बोलत राहणे.
  • मृत्यूची भीती किंवा आत्महत्येचे विचार येत असल्यास तातडीने मानसोपचारतज्ञांचा सल्ला घ्यावा.

मानसिक तणावावर ठेवा नियंत्रण एक महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कि सगळ्यांनाच भीती वाटते आहे, असे समजून मानसिक तणावाकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. आत्महत्येचे विचार मनात येत असलेला रुग्ण ही मनसोपाचार शास्त्रात तातडीने उपचारांची गरज असलेला रुग्ण म्हणजे इमर्जन्सी असते. या उलट लक्षणे असताना मानसिक तणावामुळे असेल असे म्हणून तपासणी न करणे ही चुकीचे आहे. यात समतोल राखणे व कोरोना तसेच त्यामुळे मानसिक तणावावर नियंत्रण ठेवणे दोन्ही गरजेचे आहे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

व्यायामाने आणा श्वसनसंस्थेला बळकटी

व्यायामाने श्वसनसंस्थेला आणा बळकटी

व्यायामाने आणा श्वसनसंस्थेला बळकटी सध्या दमा, श्वसनाचे आजार, अॅलर्जी असे आजार असणारे जरा ही श्वास वाढला किंवा नाक चोंदल तर कोरोनाच्या भीतीने घाबरून जातात. तसेच अनेकांना भीती मुळे अस्वस्थ वाटते, झोप येत नाही. या श्वास घेण्याच्या व्यायामामुळे कोरोना टळेल असा दावा करता येणार नाही. पण या श्वास घेण्याच्या पद्धती मुळे फुफुसांना ऑक्सिजन हे नेहमी च्या श्वास घेण्याच्या पद्धती पेक्षा कित्येक पटीने जास्त मिळेल व म्हणून प्रतिकारशक्ती वाढल्याने कोरोना चा धोका नक्कीच कमी होईल. तसेच दमा, अॅलर्जी सारख्या आजारांमध्ये फुफुसांची क्षमता वाढवण्यास मदत होईल. ही पद्धत पुढील प्रमाणे आहे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

व्यायामाने आणा श्वसनसंस्थेला बळकटी या पद्धतीत श्वास आत घेताना पोट फुगले पाहिजे ( छाती नाही ) आणि श्वास बाहेर सोडताना पोट आत गेले पाहिजे. श्वास आत घेण्याचे नंतर श्वास रोखून धरण्याचे व नंतर श्वास बाहेर सोडण्याची अशी एक सायकल पूर्ण होते. याचे प्रमाण १ : ४ : २ अशी असायला हवे . म्हणजे ५ सेकंद श्वास आत घेतला तर  पुढील २० सेकंद स्वस रोखून धरायचा आणि नंतर १० सेकंद श्वास बाहेर सोडायचा . हा श्वासाचा व्यायाम रोज १० मिनिटे केल्यास त्याचा उत्तम लाभ मिळेल. यामुळे भीती, ताण तणाव ही कमी होईल.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

मानसिक तणावावर नियंत्रण ठेवा

मानसिक तणावावर नियंत्रण ठेवा

मानसिक तणावावर नियंत्रण ठेवा गेल्या दोन दिवसात कोरोनामुळे दोन आत्महत्या झाल्या. यातील एक कोरोना बाधित व्यक्तीची होती तर दुसरी कुठली ही कोरोनाची लक्षणे नसलेली व्यक्ती होती. हे विचार व पाउल काही विचार प्रक्रियेमुळे उचलले जाते.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

मानसिक तणावावर नियंत्रण ठेवा काही लक्षणे नसताना आता आपले व जगाचे काय होणार ही मनात दाटून आलेली भीती व निराशा. लक्षणे नसताना मृत्यूची भीती वाटणे व आपला कोरोनाने मृत्यू होण्यापेक्षा आपणच स्वतःला संपवण्याची निराशे पोटी इच्छा दाटून येणे. या सोबत आधी पासून असलेले नैराश्य, घरात पूर्वी कोणी आत्महत्या केली असल्यास व आधी त्या व्यक्तीनेच आत्महत्येचा अयशस्वी प्रयत्न केला असल्यास जोखीम जास्त असते. सगळ्यात आधी असे नैराश्येचे कुठले ही विचार मनात येत असल्यास मानसोपचारतज्ञांचा त्वरित सल्ला घ्या. कोरोना बाधित व्यक्तीने हे लक्षात घ्यावे की कोरोनाची बाधा व कोरोनाची  लक्षणे या वेगळ्या गोष्टी आहेत. कोरोना झाल्यावर ८५ टक्के शक्यता आहे कि तुम्हाला अगदी सौम्य व थोडी फार लक्षणे येतील. तसेच उर्वरित १५ टक्के मध्ये बहुतांश लोक बरे होत आहेत. तसेच आपली मानसिकता व प्रतिकारशक्तीचा थेट संबंध असतो. याला सायको- न्युरो – इम्युनो एक्सीस असे म्हणतात. हा कमकुवत झाला तर कोरोनाच नव्हे तर कुठल्याही आजारा विरोधात लढण्यास शरीर सक्षमता गमावून बसते. म्हणून कोरोनाची बाधा झाली तरी खचून न जाने हा उपचाराचाच भाग आहे असे समजावे. हे कळत असते पण वळत नसते अशी ती स्थिती असते. यासाठी पहिली पायरी आहे आपल्याला जे वाटते आहे ते आपल्या जवळच्या नातेवाईकाला भावना मन मोकळे पणाने बोलून दाखवणे. अशा वेळी नातेवाईकांची भूमिका महत्वाची ठरते. रुग्णाला आयसोलेट करायचे म्हणजे त्याच्याशी तुम्ही संवाद ठेवू शकता. त्याच्याशी फोन वर बोलत राहू शकता. गरज वाटल्यास लगेचच समुपदेशक किंवा मानसोपचारतज्ञांची मदत घेण्याचा निर्णय नातेवाईकांनी घ्यायला हवा.

मानसिक तणावावर नियंत्रण ठेवा काही लक्षणे नसताना आता आपले व जगाचे काय होणार ही मनात दाटून आलेली भीती व निराशा. लक्षणे नसताना मृत्यूची भीती वाटणे व आपला कोरोनाने मृत्यू होण्यापेक्षा आपणच स्वतःला संपवण्याची निराशे पोटी इच्छा दाटून येणे. या सोबत आधी पासून असलेले नैराश्य, घरात पूर्वी कोणी आत्महत्या केली असल्यास व आधी त्या व्यक्तीनेच आत्महत्येचा अयशस्वी प्रयत्न केला असल्यास जोखीम जास्त असते. सगळ्यात आधी असे नैराश्येचे कुठले ही विचार मनात येत असल्यास मानसोपचारतज्ञांचा त्वरित सल्ला घ्या. कोरोना बाधित व्यक्तीने हे लक्षात घ्यावे की कोरोनाची बाधा व कोरोनाची  लक्षणे या वेगळ्या गोष्टी आहेत. कोरोना झाल्यावर ८५ टक्के शक्यता आहे कि तुम्हाला अगदी सौम्य व थोडी फार लक्षणे येतील. तसेच उर्वरित १५ टक्के मध्ये बहुतांश लोक बरे होत आहेत. तसेच आपली मानसिकता व प्रतिकारशक्तीचा थेट संबंध असतो. याला सायको- न्युरो – इम्युनो एक्सीस असे म्हणतात. हा कमकुवत झाला तर कोरोनाच नव्हे तर कुठल्याही आजारा विरोधात लढण्यास शरीर सक्षमता गमावून बसते. म्हणून कोरोनाची बाधा झाली तरी खचून न जाने हा उपचाराचाच भाग आहे असे समजावे. हे कळत असते पण वळत नसते अशी ती स्थिती असते. यासाठी पहिली पायरी आहे आपल्याला जे वाटते आहे ते आपल्या जवळच्या नातेवाईकाला भावना मन मोकळे पणाने बोलून दाखवणे. अशा वेळी नातेवाईकांची भूमिका महत्वाची ठरते. रुग्णाला आयसोलेट करायचे म्हणजे त्याच्याशी तुम्ही संवाद ठेवू शकता. त्याच्याशी फोन वर बोलत राहू शकता. गरज वाटल्यास लगेचच समुपदेशक किंवा मानसोपचारतज्ञांची मदत घेण्याचा निर्णय नातेवाईकांनी घ्यायला हवा.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

वैद्यकीय धोरणशून्यता

वैद्यकीय धोरणशून्यता

वैद्यकीय धोरणशून्यता सध्या कुठल्या ही खाजगी रुग्णालयात कोरोना बाधित रुग्ण सापडला तर लगेचच रुग्णालय सील केले जाते व रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स , स्टाफला क्वारनटाइन केले जाते. यामुळे फक्त मुंबईत १७०० मोठ्या रुग्णालयांच्या खाटा आज बंद आहेत. आधीच राज्यात डॉक्टर व पॅरामेडिकल स्टाफचा तीव्र तुटवडा आहे. राज्याच्या आरोग्य खात्यात डॉक्टरांच्या १७००० जागा रिक्त आहेत.  राज्यात १०० डॉक्टर व वैद्यकीय स्टाफ ला कोरोनाची लागण झाली आहे. खाजगी नव्हे तर वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय सेवेतील अनेक डॉक्टर क्वारनटाइन मध्ये जात आहेत. धोरणशून्यते मुळे कोरोना विरुध्द या लढ्यात  सैनिकांची पहिली फळी आपण निष्क्रिय करत आहोत.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

     वैद्यकीय धोरणशून्यता हे सर्व टाळण्यासाठी धोरण व कार्यपद्धती मध्ये काही मुलभूत बदल तातडीने करण्याची गरज आहे. साथ आटोक्यात येई पर्यंत सर्वात आधी तापाचे रुग्ण आणि ताप नसलेले रुग्ण अशी रुग्ण तपासताना विभागणी आपल्याला करावी लागणार आहे. शासनाने यासाठी फिवर क्लिनिक शहरामध्ये विभागवार आणि प्रत्येक तालुक्यात एक असे सुरु करण्याची तातडीने गरज आहे. हे केले असे बोलले जाते आहे पण कुठे ही कार्यरत झालेले दिसत नाहीत. यामुळे ताप, सर्दी, खोकला म्हणजे कोरोनाची शक्यता असलेले रुग्ण या बाह्यरुग्ण विभागात जाऊ शकतात. मोठ्या खाजगी रुग्णालयांना ही रुग्णालयाच्या आवारात इतरत्र तापाचे रुग्ण वेगळे तपासण्याची व्यवस्था करावी लागणार आहे. प्रत्येक खाजगी व शासकीय रुग्णालयात जो पर्यंत प्रवेशद्वारा जवळ तापाच्या रुग्णांचे वेगळे स्क्रीनिंग करून त्यातून कोरोना संशयीतांसाठी वेगळी व्यवस्था उभारली गेली  नाही तर हॉस्पिटल हे संसर्गाचा मोठा स्त्रोत ठरू शकतात. हे करण्या ऐवजी थेट हॉस्पिटलच सील करण्याचा विवेकशून्य सोपा मार्ग आपण स्वीकारत आहोत. ताप, खोकल्याचे सर्व रुग्ण शासकीय रुग्णालयात पाठवा असे सांगितले जात असले तरी यातील बरेच रुग्ण नाकारले जात असल्याने परत खाजगी रुग्णालयातच येत आहेत. तसेच ७० टक्के आरोग्य सेवा खाजगी क्षेत्र देत असताना अचानक सर्व रुग्ण शासकीय रुग्णालयात जाणे शक्य नाही. सवयी प्रमाणे रुग्ण आधी आपल्या ठरलेल्या खाजगी डॉक्टरचाच सल्ला आधी घेतात. यातून एखादा रुग्ण कोरोना बाधित अढळला तर लगेचच अख्खे हॉस्पिटल १४ दिवस सील करण्याची गरज नाही. सोडियम हायपोक्लोराईट ने फ्युमीगेशन  करून एका दिवसात तत्काळ हे रुग्णालय सुरु केले जाऊ शकते.वैद्यकीय धोरणशून्यता या पुढे जाऊन अति नील किरणांचा प्रकाश झोत पूर्ण रुग्णालयात फिरवला तरी काही तासात निर्जंतुक होऊन रुग्णालय सेवा देण्यास तयार होऊ शकते. साथ कमी झाली तरी प्रत्येक शहरात आणि प्रत्येक रुग्णालयात  कोरोनाचे रुग्ण आढळणारच आहेत. मग या प्रत्येक रुग्णालयाला आपण कुठल्या ही धोरणा शिवाय सील करत गेलो तर इतर आजाराच्या रुग्णांनी जायचे कुठे. निर्जंतुकीकरणातून काही तासात या भागातील कोरोनाची संसर्ग करण्याची क्षमता नष्ट होईल.

                  राज्य सरकारने डॉक्टरांच्या वयक्तिक सुरेक्षेचे कवच म्हणजे पीपीई च्या अनउपलब्धतेचा प्रश्न सोडवण्यासाठी वेगळी पळवाट शोधून काढली आहे. फक्त कोरोना रुग्णांची काळजी घेत असलेल्या डॉक्टर व पॅरामेडिकल स्टाफ लाच पीपीईची गरज आहे असे राज्य सरकारचे म्हणणे आहे. पण असे असेल तर कोरोना बाधित रुग्ण सापडलेल्या रुग्णालयातील डॉक्टर, स्टाफ कोरोना पाँझीटीव येत आहेत त्याचे काय? सध्या कोरोनाचे रुग्ण इतके झपाट्याने वाढते आहे कि कुठला रुग्ण कोरोना बाधित असेल हे काहीच सांगता येत नाही. रुग्ण येतो तेव्हा तो कोरोनाचा आहे हे त्याच्या कपाळावर ( भाळी ) लिहिलेले नसते. तपासलेला रुग्ण चार पाच दिवसांनंतर कोरोना बाधित असल्याचे समजते आणि मग त्याला तपासलेले सर्व डॉक्टर, स्टाफ क्वारनटाइन केले जातात आणि हॉस्पिटल सील केले जाते. जर प्रत्येक रुग्ण तपासताना पीपीई वापरले तर ही वेळ येणार नाही कारण सुरेक्षेच्या कवचामुळे डॉक्टर, स्टाफ ला संसर्गाचा धोका राहणार नाही आणि डॉक्टर, स्टाफ ला क्वारनटाइन करण्याची गरज ही राहणार नाही. अनेक देशांमध्येच हेच धोरण राबवले जाते आहे. असे असताना आपल्याकडे ही धोरणशून्यता का? या शिवाय कोरोनाची बाधा असलेल्या ३० टक्के रुग्णांना कुठलेही लक्षण दिसून येत नाहीत. सुरक्षेशिवाय रुग्ण तपासताना या मुळे अनेक डॉक्टरांना बाधा झाल्याची उदाहरणे आहेत. या शिवाय डॉक्टरांनी सुरक्षेची साधने वापरली नाही म्हणून मला कोरोना झाला असे न्याय वैद्यक खटले दाखल करण्याची धमकी काही ठिकाणी रुग्ण डॉक्टरांना देत आहेत. हा प्रश्न फक्त डॉक्टरचा वयक्तिक संसर्गापासून सुरक्षेचा नाही तर यामुळे डॉक्टर हे संसर्गाचे  सगळ्यात मोठे स्रोत ठरू शकतात म्हणून हा प्रश्न सर्वांचा आहे. यासाठी राज्य सरकारने फक्त कोरोना कक्षातच पीपीई हे धोरण लवकरच बदलले नाही तर मोठा घात होणार आहे. यात डॉक्टरच नाही तर रुग्णालयाशी निगडीत इतर सर्व स्टाफ येतो. वैद्यकीय क्षेत्रात तीन पातळ्यांवर काम करणार्यांना किती जाडीचे व नेमके कुठले पीपीई वापरले पाहिजे याची मार्गदर्शक तत्वे उपलब्ध आहेत. राज्यात पहिला रुग्ण सापडून एक महिना व देशात दोन महिने उलटून गेले तरी आम्ही आरोग्य क्षेत्रातील पहिल्या फळीला अजून पीपीई देऊ शकलो नाही. एक वेळ खाजगी रुग्णालयांचा प्रश्न बाजूला ठेवला तरी शासकीय रुग्णालये व वैद्यकीय महाविद्यालयांचा प्रश्न जास्त गंभीर आहे. ज्या उपजिल्हा रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रावर ४० ते ५० जणांचा स्टाफ आहे तिथे १५ – २० साधे मास्क पाठवले जात आहेत. रोज जाहीर होणाऱ्या हजारो कोटींचा निधी हा तातडीने प्राधान्यक्रम ठरवून पीपीई खरेदी साठी वळवणे गरजेचे आहे. रुग्णांचे स्वॅब जिथे घेतले जात आहेत तिथे कलेक्शन चेम्बर्स तातडीने उभारणे गरजेचे आहे. परदेशात तर स्वॅब घेताना डॉक्टरचा धोका कमी करण्यासाठी नेगाटीव प्रेशर असणारे व रुग्णाचा जराही संबंध येऊ न देणारे चेम्बर्स बनवले आहेत. केरळ मध्ये सगळे सँपल्स याच पद्धतीनेच घेतले जात आहेत. प्रेशर चेम्बर नसले तरी किमान साधे रुग्ण व डॉक्टर मध्ये भिंत निर्माण करणारे चेम्बर्स सर्व स्वॅब घेणाऱ्या सेन्टर्स वर राज्यात तातडीने उभारणे गरजेचा आहे. सुरक्षिततेची काळजी घेतल्यास काम करणार्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास, हिम्मत वाढेल आणी झोकून देऊन काम करण्यास नैतिक बळ मिळेल.

             वैद्यकीय धोरणशून्यता खाजगी डॉक्टर पीपीई विकत घेण्यास तयार आहेत पण त्या उपलब्धच नाहीत. सुरुवातीला पीपीईच्या खाजगी विक्रेत्यांना पीपीई शासन सोडून कोणाला ही विकू नये असे निर्देश देण्यात आले होते जे नंतर शिथिल करण्यात आले. तसेच सरकार ने ठरवलेले पीपीईचे दर आणी खाजगी विक्रेत्यांचे दर यात तफावत असल्याने ही पीपीईच्या खरेदीस उशीर होतो आहे. आयसीएमआरने हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन आरोग्य क्षेत्रात रुग्णांशी थेट संबंध येणार्यांना देण्याचे निर्देश दिले आहेत. पण मागच्या आठवड्यात खाजगी सोडाच पण शासकीय सेवेतील वैद्यकीय कर्मचार्यांसाठी हे औषध उपलब्ध नव्हते. अशात भारताने अमेरिकेला या औषधाचा साठा पाठवल्याची बातमी आली. अशा गोष्टींमुळे स्वतःचा प्राण पणाला लावून काम करणाऱ्या वैद्यकीय क्षेत्राचे नैतिक खच्चीकरण होते. युद्ध जिंकण्यासाठी सर्वात  महत्वाचे असते सैनिकांना बळ देणे . वैद्यकीय सैनिक आज लढण्यास तयार आहेत, लढत आहेत. गरज आहे त्यांना युद्ध जिंकण्यासाठी पुरेसे हत्यार देण्याची.हॉस्पिटल्स सील करण – चुकीचे धोरण

सदरील माहिती आपण  महाराष्ट्र टाईम्स मध्येही वाचू शकता

कोरोना टाळण्यासाठी टी झोन मध्ये हात लावणे टाळा

टी झोन मध्ये हात लावणे टाळा

कोरोना टाळण्यासाठी टी झोन मध्ये हात लावणे टाळा कोरोना टाळण्यासाठी हात धुणे जितके महत्वाचे आहे तितकेच गरज नसताना चेहऱ्याला हात न लावणे महत्वाचे आहे. चेहऱ्याला, केसांना हात लावणे ही आपल्याला अजाणतेपणाने लागली सवय आहे. वागणुकीचे शास्त्र असे सांगते कि ज्या प्राण्यांपासून आपली उत्क्रांती झाली तेव्हा पासून ही सवय मानवाला चीटकलेली आहे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

कोरोना टाळण्यासाठी टी झोन मध्ये हात लावणे टाळा चेहऱ्याला हात लावणे, केसांमधून हात फिरवणे हे तणावापासून मुक्ती देणारी कृती असते. अनेकांना नखे खाणे किंवा वारंवार नाकाच्या शेंड्याला हात लावणे अशा सवयी ही लागलेल्या असतात. मुलींना केस वारंवार निट करण्याची सवय लागलेली असते. सरासरी प्रत्येक जन एका तासात १५ ते २४ वेळा चेहऱ्याला हात लावतो. पण कोरोना टाळण्यासाठी ही सवय आपल्याला मोडावी लागणार आहे. याचे कारण हात धुतले तरी हात धुतल्यावर आपला हात कोरोना बाधित जागेला लागला व तोच हात आपण चेहऱ्या वरून फिरवला तर आपल्याला कोरोनाची बाधा होऊ शकते. चेहऱ्याच्या ज्या भागांना हात लावायचा नाही त्याला टी झोन असे म्हणतात. यात दोन्ही डोळे, नाक आणि तोंड येते. हे टी झोन महत्वाचे असले तरी पूर्ण चेहऱ्यालाच हात लावणे टाळावे. तसेच केसांना ही उगीच हात लावणे टाळावे. घरात प्रत्येकाचा कंगवा ही वेगळा असावा. ही सवय मोडण्यासाठी आम्ही  डॉक्टरांनी एक शक्कल लढवली आहे.  हाताच्या कोपराला घट्ट चीगटपट्टी रोमन लेटर II म्हणजे  लिहितात तशा घट्ट चीगट पट्ट्या उभ्या आणि दोन आडव्या लावायच्या. यामुळे ठरवल तरी हात चेहऱ्या पर्यंत जाऊ शकत नाही. डॉक्टरच नाही तर पोलीस व फिल्ड वर वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांनी हे करायला हव. वारंवार चेहऱ्याला हात लावणे टाळण्यासाठी आता काही अॅप्स ही आले आहेत. तुमचा हात चेहऱ्याला जवळ गेला कि हे अॅप्स तुम्हाला एक विशिष्ट आवाजाने सिग्नल देतात.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

कोरोना विषयी सर्वसाधारण गैरसमज

Corona-about-common-misconception

कोरोना विषयी सर्वसाधारण गैरसमज कोरोना माशांमुळे पसरतो – मध्यंतरी अमिताभ बच्चन यांनी विष्टेतून व माशांमुळे कोरोना पसरतो असे विधान केले होते. विष्टेत कोरोना आढळू शकतो पण तो या द्वारे पसरू शकतो हे अजून सिध्द झालेले नाही. तसेच माशांमुळे कोरोना पसरतो याला अजून शास्त्रीय आधार नाही. माशी इतरत्र कुठे कोरोना बाधित जागेवर बसेल व ती आपल्या त्वचेवर बसून त्यातून कोरोना होईल हे शक्य नाही. म्हणून कोरोना हा माशांमुळे पसरत नाही. इतर आजारांसाठी माशी वाहक ठरू शकते . म्हणून मात्र स्वच्छता ठेवणे व माशांचा रादुर्भाव रोखणे फायदेशीर असते.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

कोरोना डासांमुळे पसरतो – कोरोना शरीरात जाण्याचा मुख्य स्त्रोत हा कोरोना बाधित व्यक्ती कडून व काना तोंडातून श्वसन मार्गात जाण्याचाच आहे. डेंग्यू , मलेरिया प्रमाणे तो डासांच्या माध्यमातून पसरत नाही.टाळ्या वाजवल्याने हातावरचा कोरोना नाहीसा होतो – हात वाजवल्यावर १ ते १० khz इतकी कमी फ्रिक्वेन्सी निर्माण होते. विषाणू , बॅक्टेरीओया नष्ट करण्यासाठी ३० khz च्या पुढे फ्रिक्वेन्सी आवश्यक असते . म्हणून टाळ्या वाजवल्याने हातावरचा कोरोना नष्ट होणे शक्य नाही.घरगुती उपायांनी कोरोना पासून संरक्षण मिळेल – कुठले ही घरगुती औषध , नाकात तेल टाकणे , गरम पाणी पिणे याने कोरोना टाळणे शक्य नाही.

उपवास केल्याने कोरोना होणार नाही – उपवास केल्याने उलट शरीराची प्रतिकारशक्ती कमी होईल. म्हणून या काळात कोणीही उपवास करू नये. चांगला आहार घ्यावा.

कोरोना विषयी सर्वसाधारण गैरसमज भारतातील उष्ण हवामाना मुळे आपल्याला कोरोना होणार नाही. – ५६ डिग्री च्या पुढे पाणी उकळल्याने  कोरोना नष्ट होतो पण बाहेरचे तापमान जास्त आहे किंवा उष्ण हवामान आहे म्हणून कोरोना नष्ट होईल असे नाही. भारतीयांची प्रतिकारशक्ती चांगली असल्याने भारतीयांना कोरोना होणार नाही – परदेशात राहणाऱ्या भारतीयांना ही कोरोना ची बाधा झाली आहे. भारतीय वेगळे आहेत व त्यांना कोरोना होणार नाही किंवा कमी प्रमाणात होईल असे मानण्यास सध्या काही शास्त्रीय अडह्र नाही .

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता