असा सोडवा भाजी मंडईचा प्रश्न

असा सोडवा भाजी मंडईचा प्रश्न सध्या सोशल डिस्टन्सिंगचा सगळ्यात धुव्वा उडतो आहे तो भाजी मंडई मध्ये उडणाऱ्या गोंधळामुळे. यासाठी केईम हॉस्पिटलचे माजी प्राध्यापक चंद्रकांत पाटणकर यांनी उत्तम कल्पना सुचवली आहे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

असा सोडवा भाजी मंडईचा प्रश्न ज्यामुळे लोकांचा भाजी खरेदीचा प्रश्नही सुटेल आणि सोशल डिस्टन्सिंगही पाळले जाईल. यासाठी खाली दिलेल्या आकृती प्रमाणे प्रत्येक शहरात खुल्या मैदानात भाजी विक्रेत्यांची  व्यवस्था करता येईल. यात आत जाण्याचे व बाहेर येण्याचे दोन विरुध्द बाजूला वेगळे मार्ग असतील. दोन विक्रेत्यांमध्ये आडवे २0  फुट व उभे १०  फुट अंतर असेल ( याने ८ मीटरचा सोशल डिसटन्सिंगचा नियम पाळला जाईल . विक्रेत्यांना आत जाताना मास्क व हातावर सॅनीटायझर टाकून सोडले जाईल . तसेच त्यांना सर्दी , खोकला , ताप नसावा. आत व बाहेर जाण्याच्या मार्गावर प्रत्येकी एक किंवा दोन सुरक्षारक्षक थांबतील . एका वेळेला तीन जणांना हातावर सॅनीटायझर टाकून आत सोडले जाईल. एकाने एका निश्चित सरळ रांगेत जाऊन  खरेदी करायची आहे.आत गेलेले तिघे दोन स्टॉल पुढे गेल्यावरच वरच पुढच्या तिघांना आत सोडले जाईल. तो पर्यंत इतरांनी बाहेर एकमेकांपासून लांब उभे राहयचे आहे. तसेच एकाच वेळेला गर्दी टाळण्यासाठी प्रत्येक विभागाला खरेदी साठी वेळ ठरवून देता येऊ शकते . ही मैदानावर उभारलेल्या मंडई चहु बाजूंनी दोरखंड किंवा तात्कालिक बांबूच्या छोटे आच्छादन करून बंद केलेले असेल. तसेच अंतर्गत तीन किंवा चार रांगा अशाच एकमेकांपासून वेगळ्या केलेल्या असतील.  एका बाजूला ३० ते ४० फुट जागेत भाजी विक्रेत्यांची वाहनांसाठी जागा ठेवता येईल.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *