कोरोनाच्या साथीचे पुढे काय? What Next?

कोरोनाच्या साथीचे पुढे काय ?

कोरोनाच्या साथीचे पुढे काय ? नवी साथ येते तेव्हा समाजामध्ये त्या नवीन विषाणू विरोधात प्रतिकारशक्ती अजून तयार झालेली नसते. त्यामुळे नव्या साथीमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये जास्त लोकांना संसर्ग होण्याची शक्यता असते.

तसेच तीन महिन्यांमध्ये काही प्रमाणामध्ये ही साथ जीवघेणी ठरू शकते. पण तरीही याचा मृत्युदर हा सध्या इतर देशांमध्ये तीन टक्केपेक्षा जास्त नाही. एक ते दोन महिन्यांमध्ये या व्हायरसच्या विरोधात समाजामध्ये एक सामुहिक प्रतिकारशक्ती निर्माण होऊ लागते. याला वैद्यकीय भाषेत ‘हर्ड इम्युनिटी’ असे म्हणतात. तसेच कुठलाही व्हायरस जसा आहे त्या रूपात फार काळ राहत नाही. व्हायरस हा बहुरुप्या सारखा असतो. त्याचे रूप तो सतत बदलत असतो. याला वैद्यकीय भाषेत अँटीजनीक ड्रीफ्ट आणि शिफ्ट असे म्हटले जाते. तो संक्रमित झाला की त्याची संसर्ग करण्याची क्षमता व त्याच्यामुळे मृत्यू होण्याची तीव्रता कमी होते म्हणून तीन महिने हा व्हायरस संक्रमित होई पर्यंत हा टाळण्यासाठीचे नियम पाळणे गरजेचे आहे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

कोरोनाच्या साथीचे पुढे काय ? एका ठिकाणी जास्त लोकांनी गर्दी न करणे, सार्वजनिक कार्यक्रम टाळणे, काम नसताना प्रवास न करणे मौजमजेसाठी किंवा कार्यक्रम किंवा राजकीय कार्यक्रम टाळणे हे व्हायरस मध्ये बदल होईपर्यंत पुढे एक ते दोन महिन्यात गरजेचे आहेत.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.

कोरोना व्हायरस चे पँण्डेमिक म्हणजे नेमके काय?

कोरोना व्हायरस चे पँण्डेमिक

कोरोना व्हायरस चे पँण्डेमिक म्हणजे नेमके काय?

कोरोना हा व्हायरस असून ज्याप्रमाणे सर्दी खोकला हा त्रास व्हायरसमुळे होतो तसाच कोरोना मुळे ताप, श्वास घेण्यास त्रास होणे असा श्वसन यंत्रणेचा त्रास होतो. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाचे पँन्डेमीक जाहीर केले आहे. पँण्डेमिक म्हणजे नेमके काय तर जो आजार आंतरराष्ट्रीय सीमा पार करून इतर अनेक देशात कमी वेळात पसरतो त्याला पँण्डेमिक असे म्हटले जाते.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

कुठल्याही आजाराचे पँण्डेमिक जाहीर करण्यासाठी तीन मुख्य गोष्टी जबाबदार असतात. जो विषाणू नवा असतो, एकापेक्षा जास्त देशात कमी वेळात पसरतो , आणि एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला याचा संसर्ग होतो तेव्हा पँण्डेमिक जाहीर केले जाते. कोरोना व्हायरस चे पँण्डेमिक जाहीर झाले याचा अर्थ एवढाच की हा आता जगभरात सर्व देशांमध्ये पसरण्याची दाट शक्यता आहे. पँन्डेमीक म्हणजे या आजारामुळे खूप जास्त मृत्यू होणार आहेत असे नाही. पण मात्र प्रतिबंध न केल्यास थोड्या कालावधीमध्ये लोकांना या आजाराचा संसर्ग होण्याची शक्यता आहे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.

जागतिक आरोग्य संघटनेने एखाद्या आजाराचे पँण्डेमिक जाहीर करण्याचा हेतू हा इतर देशांना सतर्क करणे व ही साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येक देशांमध्ये शासन व सर्वसामान्य लोकांच्या पातळीवर सतर्कता वाढवणे हा असतो

एमबीबीएसचा अभ्यासक्रम : मुदत योग्य की अयोग्य?

एमबीबीएसचा अभ्यासक्रम

एमबीबीएसचा अभ्यासक्रम प्रवेशापासून दहा वर्षात पूर्ण करण्याचा नवा नियम येत्या वर्षापासून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने लागू केला आहे आहे. हा अभ्यासक्रम मुळात साडेचार वर्षांचा असतो पण क्वचीतच प्रत्येक बॅचला नापास होत अभ्यासक्रम पूर्ण करणारे काही विद्यार्थी असतात. त्यातही  एमबीबीएसचा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांसाठी १० वर्षे लागणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूपच कमी आहे. ही विद्यार्थी संख्या कमी असली तरी या निर्णयाचा विद्यापीठ व अभ्यासक्रम पूर्ण करण्यास वेळ घेणारे विद्यार्थी असा दोन्ही बाजूंनी विचार होणे गरजेचे आहे.

वैद्यकीय क्षेत्रात अशी उदाहरणे आहेत जिथे विद्यार्थ्याला त्याच्या बौद्धिक पातळीमुळे नव्हे तर इतर कौटुंबिक, मानसिक, सामाजिक समस्यांमुळे अभ्यासक्रम पूर्ण करता आला नाही. अशा मुलांसाठी क्रोनिक हा शब्द वैद्यकीय महाविद्यालयात वापरला जातो. खरेतर आधी पेक्षा सध्याच्या वैद्यकीय अभ्यासक्रमाची कठीण्य पातळी ही खूप कमी आहे. म्हणून नापास होण्यासाठी बऱ्याचदा तुम्हाला नापासच व्हायचे आहे हे तुम्हाला ठरवावेच लागते. पण तरीही विद्यार्थी अनेक वर्षे नापास होत असेल तर नक्कीच त्या मागे बौद्धिक पातळी किव्हा अभ्यासक्रम न कळण्यापलीकडे काही सामाजिक, आर्थिक, मानसिक कारणे असू शकतात. वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश मिळाला म्हणजे त्या विद्यार्थ्याचा स्तर बरा असतो. त्यातच अभिमत विद्यापीठांपेक्षा आरोग्य विद्यापीठाशी संलग्न शासकीय व खाजगी विद्यापीठात परीक्षा अधिक पारदर्शक असते. म्हणून या कॉलेजेस मध्ये विद्यार्थी रखडण्याचे प्रमाण जास्त असते. वैद्यकीय महाविद्यालयातील प्रत्येक क्रोनिक रखडलेल्या विद्यार्थ्याची अशी एक स्वतःची कहाणी असते. काही विद्यार्थी मानसिक समस्येमुळे व्यसनाधीन झालेले असतात. काहींना मानसिक समस्या असल्या तरी त्या ओळखल्या जाऊन त्यावर उपचारच होत नाहीत. हे सगळे मोठ मोठे मानसोपचार विभाग मिरवत असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयांच्या नाका खाली घडत असते हे विशेष. एमबीबीएस परीक्षा आधी पेक्षा झाली सोपी असली तरी वैद्यकीय अभ्यासक्रम अवाढव्य असतो. त्याचा पहिल्या वर्षी तरी प्रचंड ताण असतो. आपल्याकडे दर वर्षी प्रवेशावर होणाऱ्या केसेस आणि प्रवेशाच्या लांबत जाणाऱ्या प्रक्रीये  मुळे मुळात १ ऑगस्टला सुरु होणारे वर्ग सुरु होण्यास ऑक्टोबर उजाडते. त्यातच आधी ९ महिन्याचा असलेला पहिल्या वर्षाचा अभ्यासक्रम आता १४ महिन्याचा करण्यात आला आहे म्हणून दिलासा आहे. पण तरी या बदलेल्या वातावरणाशी जुळवून न घेऊ शकणारे पहिल्या वर्षी नापास झाले की प्रवाहाबाहेर फेकले जातात. वैद्यकीय महाविद्यालयात ही टाॅपर्स , डिस्टिनक्षण , नापास आणी क्रोनिक असा एक बौद्धिक वर्णभेद असतो. म्हणून वारंवार नापास होणार्यांना कालमर्यादेच्या नियमाचा बडगा उगारायचा कि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करायचा हे ठरवावे लागेल.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

अनेक वर्ष रखडलेल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत यंत्रणेची ही मोठी ससेहोलपट होत असते. नुकतेच बदललेल्या  अभ्यासक्रमामुळे जुन्या व नव्या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी अशी अध्यापनासाठी व परीक्षेसाठी वेगळी यंत्रणा राबवावी लागते. अनेक वर्षे नापास झालेल्यांची विद्यार्थी संख्या कमी असली तरी त्यांच्या साठी वेगळा पेपर काढणे  आणी घेणे अशा प्रकारे यंत्रणा व्यस्त होते. शासनाचा प्रत्येक विद्यार्थ्याच्या शिक्षणावर ५.५ लाख रुपये खर्च होत असतो. असे असताना विद्यार्थ्यांची किमान काही काळात डिग्री पूर्ण करण्याची बांधिलकी असावी असा विचार विद्यापीठाच्या दृष्टीने असू शकतो.

हा नियम राबवताना अशा वारंवार नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अकॅडॅमीक व सामाजिक पुनर्वसनासाठी काही यंत्रणा नाही. हे विद्यार्थी का नापास होत आहेत याची कारणे शोधण्यासाठी एखादा संशोधात्मक अभ्यास आपण अजून केला आहे का? अनेक वर्षे घेऊन अभ्यासक्रम पूर्ण करणारे विद्यार्थी नंतर उत्तम प्रॅक्टीस करतात. तसेच असे काही विद्यार्थी प्रसिद्ध व निष्णात डॉक्टर म्हणून ही नावारूपाला आल्याची उदाहरणे आहेत. ही संधी या विद्यार्थ्यां कडून आपण हिरावून घ्यायची का या प्रश्नाचे उत्तर शोधणे गरजेचे आहे. एकदा बीजे वैद्यकीय महाविद्यालयाचे काही विद्यार्थी पुण्यातील एका हॉटेल ला जेवायला गेले. तिथला वेटर हा वारंवार त्या विद्यार्थ्यांच्या गप्पा जवळ येऊन ऐकण्याचा प्रयत्न करत होता. हे विद्यार्थ्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्याला जवळ बोलावून याचे कारण विचारले. त्यावर त्याने सांगितले कि अनेक वर्षांपूर्वी तो बीजेचाच एमबीबीएसचा विद्यार्थी होता. पण एमबीबीएसचा अभ्यासक्रम पूर्ण करू शकला नाही. पुढच्या दिवशी सर्व विद्यार्थी त्याला होस्टेल वर घेऊन गेले. सगळ्यांनी त्याला मदत करत पहिल्या वर्षाच्या परीक्षेला बसवले आणी त्याने पुढे अभ्यासक्रम पूर्ण केला . हा विद्यार्थी आज महाराष्ट्रातच शासकीय सेवेत मेडिकल ऑफिसर म्हणून चांगली सेवा देतो आहे आणि चांगले आयुष्य जगतो आहे. कालमर्यादे मुळे वेळ हुकलेले पण पुन्हा संधी मिळाल्यास त्यातून बाहेर येणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ शकतो. आपले कायदे मंडळ ही एका ही निर्दोषा ला शिक्षा होऊ नये म्हणून हजारो गुन्हेगारांना सोडण्याची जोखीम घेते . मग बुद्धिवंतांसाठीच्या अभ्यासक्रमात कुठल्या तरी कारणाने कमी पडलेल्या एकाला आपण वेळेचे कारण दाखवत संधी नाकारायची का ?

एमबीबीएसचा अभ्यासक्रम

 या प्रश्नावर बीजे चे माझी प्राध्यापक डॉ.पद्माकर पंडित व डॉ. दाक्षायणी पंडित यांनी रखडलेले विद्यार्थी हे एक मिशन समजून अनेक वर्षे काम केले. अशा विद्यार्थ्यांना शोधून त्यांचे समुपदेशन , त्यांचा अभ्यास वर्ग घेणे, अगदी स्वतःच्या घरी त्यांची राहण्याची , जेवण्याची सोय , त्यांना आर्थिक मदती पर्यंत प्रयत्न करून या जोडप्याने असे अनेक व्यवस्थेच्या कडीतून निसटणार्यांचे पुनर्वसन केले. विशेष म्हणजे डॉ. पंडित दाम्पत्याने घडवलेले हे अनेक क्रोनिक आज समाजात उत्तम वैद्यकीय सेवा देत आहेत. यातील काहींनी तर ५ – १० वर्षे प्रवेशाला उलटून गेल्यावर ही परत येऊन एमबीबीएस अभ्यासक्रम पूर्ण केला. अशा या विद्यार्थ्यांचा भार वाहताना व्यवस्थेचची  ससेहोलपट आणि या विद्यार्थ्यांचे पुनर्वसन यातून काही मधला मार्ग काढता येतो का हे पाहायला हवे.

Hand Foot Mouth Disease in Maharashtra

Hand Foot Mouth Disease

Hand foot mouth disease epidemic in Maharashtra – Unnoticed and Overlooked.

It’s a great irony that the disease, causing havoc in rural Maharashtra is largely unnoticed by the health authorities. Also, the disease running as an epidemic in children Marathwada, Vidarbha should be largely reported by media for the prevention of this disease. Hand Foot Mouth Disease, not a routine illness, in pediatrician’s OPD started coming up since the last 2 years has peaked last 6months with a gradually increasing number of cases every day. The disease is a viral self-limiting infection caused by coxsackie and enterovirus. Usually, the disease has a high incidence in winter but epidemiology seems to be changing and now we pediatricians have seen it all year round.

Hand Foot Mouth Disease
Symptoms

Symptoms of Hand Foot Mouth Disease

  • Starts with fever and sore throat
  • Painful blisters/ulcers appear in the throat, on palms and sole
  • Ulcers in mouth and throat become painful and difficulty in swallowing hence food intake decreases causing debility
  • Itching of the lesions
  • Irritability
  • Loss of appetite

The spread of Hand Foot Mouth Disease

Spread to healthy kids through touch and skin to skin contact as saliva contains the virus.

Age

Usually affects children less than 5 years

Investigations

Usually, no investigations required as the disease can be diagnosed clinically. With the information given even parents can diagnose it although expert consultation is mandatory.

Treatment of the Disease

Treatment is usually symptomatic with medicines for fever (antipyretic – paracetamol ), pain ( analgesic – ibuprofen ), a lot of fluids, multivitamin syrup, soft diet. Occasionally local antibiotic cream for blisters. Intravenous antibiotics are required only when lesions get a secondary bacterial infection.

What can the parents do to prevent their child from getting hand foot mouth disease?

  • Wash your own and child’s hands very often especially when he is returning home from outdoors and school
  • Maintaining good nutrition

Read more Amol Annadate articles

What can the parents of infected children do?

  • Consult a pediatrician as soon as they notice ulcers and fever
  • Not send the child to school during and after the illness till the rash/blisters fade off or minimum seven days after onset of rash
  • Give soft diet and lot of fluids
  • Wash hands after handling the child
  • Limit contact with siblings and other children
  • The virus remains on the surface for 8 to 10 days hence cleaning of home and surfaces with water and antiseptic is required. Also, schools may consider such cleaning of classrooms and benches when many cases appear from the same class.

What’s different in this Epidemic?

Every epidemic of disease comes with a difference in the usual symptoms of the disease. Hand foot mouth disease in this epidemic is unusually coming with blisters on buttocks and also presenting between 5 to 10 years. Even with this basic information being valuable to alleviate the fear of hand foot mouth disease among parents and for prevention of the disease, the Public health authorities have largely turned a deaf ear to the disease and Health education about it.

करोना व्हायरस: घाबरण्याचे कारण नाही!

करोना व्हायरस

चीन मध्ये करोना व्हायरस च्या साथीचे थैमान सुरु असल्याने आता ही साथ जगात पसरणार का? या साथीला जागतिक साथ म्हणजे पँन्डेमीकचे स्वरूप येणार का? भारताला याचा धोका किती? भारताची आरोग्य यंत्रणा करोना व्हायरस चे संकट रोखण्यासाठी आणी ते आल्यास त्याचा सामना करण्यासाठी सज्ज आहे का? असे अनेक प्रश्न करोना व्हायरस च्या निमित्ताने पडत आहेत.

        सध्या जागतिक आरोग्य संघटनेने करोना व्हायरस ला जागतिक साथ म्हणून घोषित केलेले नाही. पण भारत हा मुळातच संसर्गजन्य रोगांची जागतिक राजधानी असल्याने व भारत – चीन या दोन देशांमध्ये दळणवळणाचे प्रमाण जास्त असल्याने ही साथ भारतात दाखल होऊ न देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न आवश्यक आहेत. यासाठी नागरी वाहतूक, विदेश आणी आरोग्य मंत्रालयाला समन्वयाने ही साथ रोखण्यासाठी कार्यक्रम आखणे गरजेचे आहे. चीन मधून भारतात येणार्या प्रत्येक नागरिकाची अंतरराष्ट्रीय विमानतळावर तापमान व सर्दी, खोकला व श्वसनाचा त्रास असल्याची चौकशी करणे आवश्यक आहे. ताप व ही लक्षणे अढळलयास त्यांना तातडीने आयसोलेशन म्हणजेच उपचारासाठी स्वतंत्र कक्षात बरे होई पर्यंत ठेवणे आवश्यक असते. हवाई वाहतूक सोडून चीन व नेपाळ सीमेवरील लष्करात ही सैनिकांमध्ये ही लक्षणे दिसून आल्यास तातडीने निदान आवश्यक आहे. गेल्या महीन्यात चीन ला भेट दिलेल्या नागरिकांना कुठलाही त्रास जाणवल्यास त्या नागरिकांची ही तातडीने तपासणी होणे गरजेचे आहे. नवी साथ दाखल होते तेव्हा सगळ्यात महत्वाचे असते देशातील पहील्या काही केसेस ओळखणे आणी त्यांना वेगळे ठेऊन त्यांचे उपचार करणे. पण आपल्या देशात अजून तत्पर निदानाची यंत्रणा सज्ज नाही. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी, पुणे सोडून आपल्याकडे अशा नव्या व्हायरसेस व साथीचे निदान करणारी यंत्रणा अपुरी आहे.  साथ अजून दाखल झालेली नाही पण ती झालीच तर या पहील्या केसेस च्या निदानाची तयारी असायला हवी. झिका व्हायरस भारतात दाखल झाला तेव्हा २००७ साली ही माहीती शासकीय आरोग्य यंत्रणेने दडवून ठेवली. घबराट निर्माण होऊ नये हा हेतू असला तरी इतर यंत्रणेच्या सतर्कतेवर याचे दुष्परिणाम होतात.

करोना व्हायरस

  या साठीची तुलना २००३ च्या  सार्सशी केली जाते आहे पण हा त्या इतका घातक नक्कीच नाही.  सर्वसामन्यांनी लगेचच करोना व्हायरस ला घाबरण्याची गरज नाही. पण चीनला प्रवास झाला असल्यास व श्वसनाची कुठलीही तक्रार असल्यास तपासणी करून घ्यायला हवी. तसेच चीन ला प्रवास ही टाळायला हवा. ताप , खोकला आणी श्वास घेण्यास त्रास ही करोना ची प्रमुख लक्षणे आहेत. न्युमोनिया व किडनी फेल्यर हे कोम्लीकेशन्स होऊ शकतात. पण साधा सर्दी खोकला झाला तरी करोना असेल म्हणून घाबरून जाण्याची मुळीच गरज नाही. हा आजार टाळण्यासाठी मानवा कडून मानवाला होणाऱ्या श्वसन मार्गाच्या आजराला जी काळजी घ्यावी लागते तीच घ्यायची आहे. यात प्रामुख्याने बाहेरून आल्यावर व जेवण्याआधी कुठला साबण व पाण्याने हात धुणे , शिंक आल्यावर किव्हा खोकताना तोंड , नाक, झाकणे , सर्दी , खोकला असलेल्यांनी इतरां पासून लांब राहणे आणी प्राण्यांशी संपर्क टाळणे हेच आहे. पण यात प्राण्यांशी संपर्क सोडून इतर गोष्टी कुठलीही साथ नसली तरी करायच्याच आहेत. साथ ही चीन मधून इतर देशात पसरत असताना  शक्यतो मांसाहारी , त्यातच न शिजवलेले मांसाहारी अन्न व समुद्रातील मांसाहारी अन्न म्हणजे मासे , प्रॉन्स खाणे टाळलेले बरे.  तसेच आरोग्य विभागाची या साथीवर उपाय योजना  म्हणजे केवळ या साध्या प्रतिबंधक उपायांच्या भव्य जाहीराती व होर्डींग, असे असू नये.  त्या ऐवजी केसेसचे निदान, त्यांचे आयसोलेशन व उपचार याची यंत्रणा सज्ज ठेवण्यावर भर द्यावा. हा आजार व्हायरल असल्याने तो अपोआप बरा होणारा आहे.  त्यावर इतर व्हायरल आजारांसारखे निश्चित असे काही उपचार नाहीत. करोना व्हायरस वर उपचारच नाहीत असे भीतीदायक वृत्त ही येत आहेत. पण याचा अर्थ हा अपोआप बरा होणारा आहे. सध्या चीन मध्ये मृत्यूचे प्रमाण तीन टक्के आहे पण भारतात हे किती असेल हे सध्या सांगता येणे कठीण आहे.  पण अशा कुठल्याही व्हायरल आजारात काही काळा नंतर मानवा मध्ये हर्ड इम्युनिटी म्हणजे समुहाची प्रतिकार शक्ती निर्माण होते. व साथ हळूहळू ओसरू लागते. म्हणून उद्या ही साथ आलीच व करोना व्हायरस ची लागण झालीच तर आपला मृत्यू निश्चित आहे अशा भीतीत मुळीच राहू नये. आपली प्रतिकारशक्ती हेच अशा साथी मध्ये सगळ्यात मोठे हत्यार असते. व त्यासाठी संतुलित आहार, व्यायाम व चांगली जीवनशैली हेच उत्तर आहे. करोना व्हायरस साठी स्वाइन फ्लू प्रमाणे कुठली ही गोळी किव्हा लस उपलब्ध नाही. तसेच फ्लू ची लस घेऊन करोना व्हायरस पासून संरक्षण मिळू शकते असा अपप्रचार ही सुरु झाला पण यात काही तथ्य नाही.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

 अशा साथीत मास्कच्या वापराचा खूप अतिरेक होतो. मास्कचा वापर हा स्वत:च्या संरक्षणासाठी नव्हे तर आपल्याकडून इतरांना जंतूसंसर्ग होऊ नये म्हणून केला जातो. करोना व्हायरस चा निश्चित किंवा संशयित रुग्णांसाठीच मास्कचा वापर योग्य आहे. स्वस्थ व्यक्तींनी मास्क वापरून काहीच उपयोग नाही, कारण जर जंतूसंसर्ग होणार असेल तर तो मास्कच्या बाजूला खुल्या जागेतूनही होऊ शकतो. करोना व्हायरस सारख्या साथी म्हणजे घाबरलेल्या सर्वसामन्यांच्या फसवणुकीसाठी अनेकांना एक संधी असते. अमुक साबण वापरा, अमुक औषध घेऊन करोना ची शक्यता टाळा, समाज माध्यमांवरील घरगुती उपायांचे वायरल होणारे सल्ले या पासून सगळ्यांनी दूर राहायला हवे.

आरोग्य यंत्रणेची सज्जता आणी सर्वसामान्यांनी न घाबरता, माहीती घेऊन सतर्क राहणे व आजाराचे मास हीस्टेरियात रुपांतर न होऊ देणे एवढेच या वेळी करोना व्हायरस विषयी गरजेचे आहे.  

हिरकणी ‘अमृता सुदामे’ नावाची!

हिरकणी

ही हिरकणी आपल्या बाळांपर्यंत पोहोचण्या आधीच वाहून गेली !

सध्या राज्यात किचन ओटा किंवा बेसिन धूत असताना, बारीक कीटक ड्रेनेज मध्ये वाहून जातात त्याप्रमाणे माणसे वाहून जात आहेत. नुकत्याच पुण्यात आलेल्या पुरात, धायरी पुलावरून घरी जात असलेली ‘अमृता सुदामे’ ही वाहून गेली. एक मैत्रिणीकडून तिचा सगळा वैयक्तिक तपशील कळाला तेव्हा ‘या व्यवस्थेत बदल घडवण्यासाठी आपण काय करतोय?’ या हतबलतेने अमृताच्या चीतेत आपण जिवंत जळतोय अशा वेदना झाल्या!

एका डायग्नोस्टिक सेंटरवर रीसेप्शनीस्ट म्हणून काम करणारी ‘अमृता’ ही तरुणी रात्रभर घरी पोचत नाही. आणि रात्री पासून बेपत्ता असलेल्या अमृताचा शोध शेवटी ससूनच्या शवागारात संपतो! त्या शोधासोबतच उन्मळून पडतो, एका अख्ख्या कुटुंबाचा आधारवड!! आपल्यासाठी ‘पुरात एका तरुणीचा मृत्यू’ एवढ्या बातमीवर विषय संपतो. ती कोणा मंत्र्याची–सत्ताधाऱ्यांची किंवा हाय-प्रोफाइल समाजातील कुणाचे मुल बाळ नातलग नसल्याने, तिच्या मृत्यूची मोठी बातमी होत नाही आणि ती कोण होती यावर रकाने लिहून येत नाहीत. कोण होती ही ‘अमृता’ ??

इयत्ता आठवी आणि शिशू वर्गातील दोन मुलींचं एकल पालकत्व निभावत काबाड कष्ट करत जीवनसंघर्ष चालू ठेवणारी एक माता… २ वर्षापूर्वी वडिलांचा मृत्यू झाल्यावर कँन्सरग्रस्त आईची जबाबदारी पेलणारी एक लेक. परिस्थितीसमोर हात न टेकता उलट तिच्याशी दोन हात करून आलेला दिवस समर्थपणे झेलणारी एक रणंगिनी…! जाऊ नको, रात्री इथेच थांब असे सांगूनही, “मी गेले नाही तर माझ्या मुलींकडे या भयाण रात्री कोण पाहणार ” असे म्हणत, पाण्यातच दुचाकीने घरी निघालेली ‘आधुनिक हिरकणी’! कामावरून धो धो पावसात बाहेर निघेलेली आणि पापांनी दुथडी भरून वाहणाऱ्या नाल्यांच्या प्रवाहात लेकरांसाठी घरी निघालेल्या अमृताचे हेच वाक्य शेवटचे वाक्य ठरले!

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

अशी ही परिस्थितीशी झुंज देणारी अमृता त्या रात्री व्यवस्थेशी संघर्ष करू शकली नाही आणि शेवटी या व्यवस्थेने तिचा जीव घेऊनच तिचा संघर्ष संपवला.

Its High Time We Talk

‘एका महिलेचा पुरात वाहून मृत्यू’ या बातमी मागे उघडे पडलेले एक कुटुंब आणि एवढी करूण कहाणी असू शकते याची जाणीव ही न ठेवता वर्तमानपत्रांची पाने आपण उलटत असतो, सोशल मिडिया खाली खाली स्क्रोल करत जातो.

हिची संघर्षगाथा ऐकून आमच्या मित्राने आजच्या युगाची हिरकणी गेली अशी प्रतिक्रिया नोंदवली. शिवाजी महाराजांच्या काळात आपल्या बाळासाठी गड चढून गेलेल्या हिरकणीची कथा आपल्याला माहित आहे. ‘माझी मुले घरी एकटी आहेत मला घरी जावेच लागेल’ या ओढीने घरी निघालेली ही हिरकणी मात्र आपल्या बछड्यांपर्यंत पोहोचूच शकली नाही! आज शिवरायांच्या नावाने यात्रा, राजकारण करणाऱ्यांना या घटनेची लाज वाटली पाहिजे. अनेक वर्षे शिवछत्रपतींचे दाखले देणाऱ्यापर्यंत कदाचित अमृताची ही गोष्ट पोहोचणार ही नाही, कारण सध्या प्रचार सुरु आहे ना! कोण जिंकणार, कोण हरणार , कुठल्या मतदार संघात मराठा किती, दलित, माळी, धनगर, मुस्लीम मतदान किती …? त्यावरून कुठल्या जातीचा उमेदवार द्यायचा याच्यातून सत्ताधरी, विरोधकांना वेळ कुठे आहे. काही वर्षांपूर्वी पुण्यातील एका इंजिनिअर मित्राने सांगितले कि, पुण्यात ड्रेनेजसाठी जे खड्डे आणी त्यावर जाळी दिसते त्यात अनेक ठिकाणे फक्त खड्डे आणी त्यावर जाळी आहे .खाली त्यांना जोडणारी पाईपलाईन अस्तित्वातच नाही. आपण नागरिक म्हणून हे खड्डे कधी उघडून बघितले आहेत का ? पुण्यात अनेक नाले बुजवून त्यावर इमारती उभ्या राहिल्या आहेत. यात घरे विकत घेणाऱ्याला ही आपण अशा अनेकांचे जीव धोक्यात घालून उभे राहिलेल्या इमारतीत राहणार आहोत हे माहित नसते. स्थापत्य अभियंते , बांधकाम व्यवसायिक, राज्यकर्ते यांच्या संगनमताने अशा विकासाचे आपण सगळे भागीदार आहोत. पण तो विकास ‘अमृता’ सारख्यांच्या थडग्यांवर उभा आहे … फरक इतकाच आहे … हे थडगे आज अमृताचे आहे … उद्या तुमच्या आमच्या पैकी कोणाचे असेल सांगता येत नाही … कारण संधाकाळ पर्यंत कुठलीही सूचना नसताना भर शहरात अचानक घुसलेले पाणी वाहून नेताना कोणात ही भेद करत नाही ….!

डॉ. अमोल अन्नदाते | reachme@amolannadate.com

डॉ. केतन खुर्जेकर असे जायला नको होते!

डॉ. केतन खुर्जेकर

काल रात्री ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ वर डॉ. केतन खुर्जेकर, पुण्यातील व महाराष्ट्रातील प्रसिद्ध स्पाईन सर्जन यांचं अपघातामध्ये दुखद निधन झालं. त्यांच्या जाण्याच्या काही तासात त्यांचा वाढदिवस उजाडणार होता. खरतर अशा घटनेवर व्यक्त होतांना अश्रू तर आटतातच आणि शब्दही पांगळे होतात. डॉ. केतन हे पुण्याच्या प्रसिद्ध संचेती हॉस्पिटल च्या अस्थीरोग विभागाचे प्रमुख होते व मणक्यांच्या शस्रक्रियेत पारंगत होते. त्या पलीकडे ते कोणाचे तरी पुत्र, पती, वडील होते. मानेच्या व पाठीच्या मणक्यांच्या जन्मजात व्याधी (deformities) सरळ करण्यात त्यांचा विशेष हातखंड होता. ही शस्रक्रिया करत असतांना एखाद्या हार्मोनियम वर संगीतकाराची बोटे सहज रेंगाळावी आणि त्यातून साक्षात दैवी गांधार रूप सहज बाहेर पडाव तसच ऑपरेशन थियटर मध्ये डॉ. केतन यांची बोटे मणक्यांवर फिरायची आणि जादू केल्याप्रमाणे ऑपरेशन थियटर मधून वेगळ्याच मणक्याचा रुग्ण बाहेर यायचा. आशा अनेक रुग्णांना डॉ. केतन यांनी शब्दशः ताठ मानेने आणि ताठ कण्याने जगण्याचे वरदान दिले. साक्षात देवानेच दिलेल्या मणक्याच्या व्याधीही डॉ. केतन अविरत दोन हात करत राहिले. पण त्यांचा मृत्यु अशा प्रकारे होऊ शकतो यावर विश्वासच बसत नाही आणि ‘नियतीचा न्याय’ या शब्दांवरून विश्वास उडून जातो. मुंबईत होणाऱ्या मणक्यांच्या शस्रक्रीयेच्या Conference वरून परतत असतांना डॉ. केतन यांचा वैयक्तिक ड्रायवर नसल्याने त्यांनी OLA कॅब घेतली. आपल्या दोन साथीदारांसह OLA कॅब ने प्रवास करण पसंद केलं. रस्त्यात गाडीचं टायर पंक्चर झाल्याने ड्रायवर ने गाडी रस्त्याच्या कडेला घेतली. नेहमी प्रमाणे मदतीला धावून जाणारे डॉ. केतनही driver च्या मदतीला गाडीतून खाली उतरले. मागून येणाऱ्या भरधाव luxury बस ने या दोघांना काळाने स्वतःच्या पोटात ओढून घेतले!! आता हे सगळ ऐकल्यावर स्वतःच्या गाडीने प्रवास करा, स्वतःचा ड्रायवर वापरा, एक्स्प्रेस वे वर मध्ये थांबू नका, थांबले तरी गाडीतून खाली उतरू नका, एक्स्प्रेस वे वर रात्री प्रवास करू नका या सूचनांना तसा काहीच अर्थ वाटत नाही. कारण डॉ. केतन ज्याप्रमाणे मणक्यांचे भवितव्य बदलून टाकायचे तस काळाने केलेल हे ऑपरेशन बदलणे आपल्या कोणाच्याच हातात नाही.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

डॉ. केतन यांच्या जाण्यामुळे त्याच्या कुटुंबाचे क्षणार्धात सगळेच हरपून गेले पण त्यासोबत या राज्याचे आणि देशाचे न भरून येणारे नुकसान झाले. खरतर एक निष्णात डॉक्टर काळाच्या पडद्या आड जातो तेव्हा केवढ मोठी पोकळी निर्माण होते, हे रोज अनेक रुग्ण बरे करणाऱ्या डॉक्टरलाच आणी गंभीर आजारातुन बऱ्या झालेल्या रुग्णालाच समजू शकते. एखादा व्यक्ती डॉक्टर म्हणून नियती जेव्हा जन्माला घालते, तेव्हा त्याच्या खांद्यावर खूप मोठी जबाबदारी देऊन पाठवत असते. जे असाधारण कौशल्य डॉ. केतन यांच्या हाती होते. त्यावरून डॉ. केतन यांच्या वरही अजून खूप काही करण्याच अनेकांच आयुष्य बदलून टाकण्याची किमया साधण्याची जबाबदारी होती. वयाच्या, यशाच्या, पैश्याच्या एका टप्प्यानंतर डॉक्टर हा या पलीकडे जाऊन फक्त काम करण्यासाठी, त्याच्या कौशल्यासाठी जगत असतो. ते कौशल्यच त्याच्या जगण्याचे साध्य आणि साधन असते. डॉ केतनच्या जाण्याने एक दैवी साध्य आणि साधनच संपले. गेलेल्या डॉक्टरला तोफांची सलामी किंवा कुठलाही शासकीय इतमामाचा प्रोटोकॉल नसतो. पण डॉ. केतन खुर्जेकर तुम्ही बरे केलेले हजारो मणके आज तुमच्यासाठी अश्रू ढाळत आहेत, सलामी देत आहेत, मानवंदना देत आहेत …!

– डॉ. अमोल अन्नदाते
– reachme@amolannadate.com

इसरो प्रमुख के. सिवान सारखे मला रडता येणार नाही!

इसरो प्रमुख के. सिवान

काल चांद्रयान-२, चंद्रापासून २.१ किलोमीटर लांब असताना संपर्क तुटला. त्यानंतर इसरो प्रमुख के. सिवान हे पंतप्रधान मोदी च्या खांद्यावर डोके ठेवून ढसढसा रडतानाची क्लिप अनेकांनी पहिली. देशाच्या दोन सर्वोच्च पदावरील लोकांनी जाहीरपणे असे भावनाविवश व्हावे का? अशा अनेकांच्या उलट-सुलट प्रतिक्रिया आल्या. पण या क्षणाची सहवेदना मी डॉक्टर म्हणून, त्यातच बालरोगतज्ञ म्हणून, समजू शकतो! त्या सोबत empathise करू शकतो! असे क्षण आम्ही, त्यातच अत्यवस्थ रुग्णांच्या उपचारातील डॉक्टर, रोजच अनुभवत असतो.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

बऱ्याच गोष्टी माणूस म्हणून आपल्या हाता बाहेर असतात याची जाणीव उपचार करताना सतत येत असते. दोन आठवड्याखाली ‘Duchenne Muscular Dystrophy‘ हा कधीच बरा न होणारा आजार आणि मुलाला सोळाव्या वर्षापर्यंत रोज मृत्यू पहावा लागेल हे पालकांना समजून सांगताना, मी हा क्षण अनुभवला! त्यानंतर दोन दिवसांनी ८ वर्षांचा, ह्र्दय रोग असलेला एक मुलगा ऑपरेशन करण्यापलीकडे आहे, हे माझ्या हार्ट सर्जन मित्राने मला फोनवर सांगितले तेव्हा ही मी हे अनुभवले! अजून पालकांना मी हे सांगायचे राहिले आहे!! परवा दर महिन्याला रक्त घ्यावा लागणारा व आयुष्य भर असे रक्त घेण्याची गरज असलेला, ४ वर्षांचा मुलगा intra Cath लावताना मला विचारत होता – ” डॉक्टर अस दर महिन्याला कधी पर्यंत तुम्ही मला टोचत राहणार!” अशा वेळेला आईच्या, बापाच्या डोळ्यातून टचकन पाणी येतं! आम्हा डॉक्टरांना मात्र मनात भरून येत असतानाही, सिवान मोदींच्या खांद्यावर डोके ठेवून रडले तसे, रुग्णाच्या वडिलांच्या खांद्यावर डोके ठेवून रडण्याची मुभा नसते! रोजच मरण बघून मन घट्ट होत जातं, पण कशाच काहीच वाटत नाही एवढ ही घट्ट नसतं! कर्तव्यासाठी ते घट्ट कराव लागतं. एकदा उपचारांसाठी आलेला एक स्मशान जोगी मला म्हणाला, “डॉक्टर, आपले दोघांचे आयुष्य सारखेच आहे, न रडता रोज मृत्यू बघत रहायचे!” रुग्ण, आई-वडील, नातेवाईक बऱ्याचदा रागवतात, प्रसंगी आज-काल मारतात ही, पण रडत बसू नको, उचल ते गांडीव परत, असं सांगायला कोणी कृष्ण नसतो. तेव्हा आपल्या सदसद्विवेकबुद्धीलाच कृष्ण बनवावं लागतं.

इसरो प्रमुख के. सिवान, तुम्ही रडून मोकळे झालात, ते बर केलत. या घटनेच भांडवल करून आम्हा डॉक्टरांच अपयश स्वीकारा हो, अशी आर्त विनवणी मी करणार नाही. पण प्रत्येक व्यवसायात यशाचा ‘Law of Averages’ काम करत असतो. म्हणजे तुम्ही दहा वेळा प्रयत्न केला तर दहाच्या दहा वेळेला यश येणे अशक्य असते. सचिन तेंडूलकर, विराट कोहली प्रत्येक मॅच मध्ये शतक ठोकू शकत नाही. बऱ्याचदा त्यांच्यावरही शून्यावर बाद होण्याची वेळ येते. हाच नियम चांद्रयान मोहिमेला ही काल लागू पडला. वैद्यकीय क्षेत्राला, उपचारांनाही हा नियम लागू असतो, पण इथे प्रश्न जगण्या मरण्याचा असल्याने तो आपलं मन स्वीकारत नाही. पण तो आम्हा डॉक्टरांना माणूस म्हणून स्वीकारावा लागतो. कधी अगदी हातातून बाहेर गेलेली केस परत हातात येते…जवळपास मृत्यू झालेला असतांना CPR ने ह्र्दय परत सुरु होते, अशा अनअपेक्षित यशाने अपरिहार्यपणे येणारे इतर अपयशाची भरपाई झाली असे मानत आम्ही डॉक्टर पुढे जात राहतो! फक्त डॉक्टर च नाही इतर प्रत्येक व्यवसायिकाचे अपयश मनापासून स्वीकारा! चेहरा पाडून मध्यरात्री – बाळ आता जिवंत नाही – ही गोष्ट सांगताना एखादा नातेवाईक म्हणतो – “ठीक हैं साब, जाने दिजीये, आप ने बहोत कोशिश कि, हम आप के शुक्रगुजार है!” तेव्हा तो मला काल रडण्यासाठी खांदा देणाऱ्या मोदी सारखा वाटतो, फरक इतकाच, सिवान सारखे मला रडता येणार नाही!

Population Control – High Time to Act Now!

Population Control In India

Prime Minister Narendra Modi, in his usual style,  appealed to the nation about Population control from Red Fort in his Independence day speech that “Family planning is itself a patriotism” After Sanjay Gandhi’s compulsory sterilization program which gulped the power of Congress, the same fear loomed over successive governments, and they never dared to touch the population policy. This electoral fear of implementing population control strategy has resulted in a population growth that can make India most populous country on the Globe. It is less likely that the masses will respond to a patriotic plea of The Prime Minister, and Contraception will be accepted like demonetization or become a mass movement like Swach Bharat or Yoga Day. Apart from linking Contraception to patriotism in speeches on popular forums, much more needs to be done on war footing level.

Every family and in the long run country needs to decide on concrete population strategy considering which stage our country falls. Presently India is in late expanding phase of the population which results from decreased death rate but birth rate falling at a slower pace. This stage where the birth rate is more than the death rate is such that a better population control strategy can result in an ideal stationary phase of population. At the same time, a neglected population policy can push the country in an Early expanding stage worsening the situation. Our population strategy never crossed the line of advertisements of Mala D and slogans like ‘Hum do hamare do’. In the course of time even these campaigns also gradually faded. An ordinary citizen is miles away from Economic or Foreign policy, and population policy cannot be another addition to be implemented in isolation. Population policy is something that begins and ends in bedrooms. It makes the arena extremely sensitive and intricate. The complexity of the issue demands a definite answer to the question of whether we are planning to control the population through public awareness or law and regulations. This debate is similar to the Tilak – Agarkar school of thinking, arguing on freedom first or social reform first. Some grass-root observations of doctors need to be considered to give a verdict on the debate,

Population Control In India
Its High Time to Act Now

Today very few married couples are aware of the best and most efficient mode of contraception after a single child and after having two children. In a country with the vast majority of illiterates and oppressed, even if some weak soul desires to get information about this, there is no reliable and easily accessible source of information. A family cant decides on its family size because it has never heard of the country’s policy on the best family size and never been convinced about this. R. D Karve was probably the last social reformer who dared to talk openly about contraception. After the 15 august statement of Prime Minister Modi about family planning, it would be a great social move if he talks about the contraceptive methods in the next few episodes of Man Ki Bat. Most of the masses know very less about the best contraceptive methods and their knowledge is limited to condoms and vasectomy popularly called nasbandi. In the eighties when private players jumped into condom sale, they very well marketed it as a medium of sexual pleasure when no such connection exists. Condom with a maximum failure rate of 14 % grabbed a significant position in the minds of people, and this shadowed other valuable modes of contraception. Copper T, Oral contraceptives, and injectable depo preparations are some of those who lost relevance in comparison to condoms. Although all these modes seem to be female-centric, this keeps the decision of contraception in the hands of female, and this is very important in a male-dominated society with violated reproductive rights of women.

READ More Articles by Dr. Amol Annadate

Today, if we have to formulate a successful population policy, two couple should be targeted. The first is the one with one Child and later is with two children but who haven’t yet resolved to limit the family. The illiterate and the oppressed neither return to the hospital for contraception nor do they have access to a health facility for termination of an unplanned pregnancy. Even though they are not determined to have a child after the first one they get trapped in a positive feedback cycle of Conception – Poverty – Child malnutrition – maternal illness. The best way to break this cycle is the immediate insertion of copper T in the delivery room as soon as the child is born. Counselling of The couple on antenatal visits for this contraception will strengthen the practice. Since it’s an arduous task to get this mother back to the hospital, this is the best mode and most effective way to limit family. The contraception will offer protection against pregnancy for the next five years. But this way has received less attention at the level of policymakers and authorities. Population policy is never pondered so deeply and micro-planning of such efforts done. The couple with two children are in a different position.

Terminal sterilization methods tubectomy and vasectomy are best at this point. We don’t have moral right to convince them for terminal sterilization since cant assure this couple healthy under-five children. Hence Copper T or subcutaneous injectable contraceptives which are relatively painless. But all these modes have not yet geared up. For terminal sterilization, vasectomy for males is a far better and cheaper alternative as regards to public health. The jargon Nasbandi conveys a negative impact, and rural males associate this with sexual weakness.

Contrary to popular belief, this can be beneficial on the sexual front as fear of conception is an essential cause of performance anxiety. This surgery needs an urgent name change operation. BJP should recruit some of its branding experts working on famous slogans to suggest a better name for this surgery. Prime Minister should declare this name in a national address as was done on the eve of demonetization.

Population Control Its High Time We Talk Now

We can debate whether the nation needs to have legislation for population control. China has suffered a social set back due to the one-child policy. Mimicking the same would be throwing the baby out with the bathwater.  But at least a two-child policy and refusal of government schemes, subsidies for couples with three children or a positive reinforcement with additional benefits for those who comply with the policy. Social and educational upliftments are vital prongs of the multipronged approach of population control. But they will happen at their own pace. Apart from these gradual social changes, revamp and thoughtful additions to the population control policy are need of the time.

लोकसंख्या नियंत्रण कराच! धोरण महत्वाचे!

लोकसंख्या नियंत्रण for Loksatta Article

लोकसंख्या नियंत्रण – धोरणाशिवाय आव्हाने, जागृती निरुपयोगी

  १५ ऑगस्टच्या भाषणात पंतप्रधान मोदींनी ‘कुटुंबनियोजन ही देखील देशभक्ती’ असे लाल किल्ल्यावरून भावनिक आव्हान देत त्यांच्या नेहमीच्या शैलीत संततिनियमनाला देशभक्तीशी जोडत भावनिक आव्हान केले . संजय गांधींच्या अनिवार्य नसबंदी मोहीमेनंतर येणाऱ्या प्रत्येक सरकारसाठी लोकसंख्या नियंत्रण कार्यक्रम हा शांत पडून राहीलेल्या आणि डीवचल्यास गिळंकृत करून टाकणाऱ्या अजगरासारखा राहीला आणी म्हणून लोकसंख्येचा हा अजगरही फोफावतच गेला . पण अनेक वर्षांच्या प्रजनन वर्तणूकीवरून स्वच्छता अभियान , नोटबंदी , कलम ३७० किंवा योगदिनासारखे पंतप्रधानांच्या आव्हानाला ओ देत हा देश आता संततिनियमन ही लगेचच देशभक्ती म्हणून स्वीकारेल , हे मानणे भाबडेपणाचे ठरेल. यासाठी लोकसंख्या हा विषय आता अतिप्राधान्याचा आहे आणी  युद्धपातळीवर  आता यावर काही तरी करायलाच हवे , हा विचार भाषणातील भावनिक आव्हानांच्या पलीकडे करणे गरजेचे आहे.

अशाच आरोग्य धोरणावरील डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

                यासाठी सर्वप्रथम आपण लोकसंख्येच्या कुठल्या टप्प्यात आहोत हे ओळखून आपल्या देशाचे आणी पर्यायाने प्रत्येक कुटुंबाचे लोकसंख्येविषयीचे धोरण काय असले पाहीजे हे आधी एकदाचे निश्चित करायला हवे. सध्या आपला देश हा late expanding म्हणजे घटत जाणारा मृत्यू दर पण  त्याप्रमाणात धीम्या गतीने कमी होणारा जन्मदर आणी म्हणून  हळूहळू पण वाढतच जाणर्या लोकसंख्येच्या पातळीवर आहे. ही अशी स्थिती आहे, जिथे धोरण पातळीवर लोकसंख्या नियंत्रण दुर्लक्षित राहीले तर ती एका झटक्यात झपाट्याने व नियंत्रणाबाहेर वाढीच्या पातळीवर जाऊ शकते . पण नीट धोरण आखणी केल्यास स्थिर म्हणजे एकसमान जन्मदर व मृत्यूदर या पातळीवर जाऊन स्थिर होऊ शकते जे आता आपले ध्येय असले पाहीजे . एकदा कालबद्ध ध्येय ठरवले की मग धोरण ठरवणे सोपे जाते. आपल्या लोकसंख्या धोरणाचा प्रवास हा ‘हम दो हमारे दो’ या जाहीरातींच्या पुढे कधी गेलेच नाही. पुढे ते ही लुप्त झाले . जसे आर्थिक धोरणा किंवा परराष्ट्र धोरणापासून देशाचा सर्वसामान्य माणूस पूर्णपणे अनभिज्ञ राहीला तसे लोकसंख्या नियंत्रण धोरणाचे करता येणार नाही. कारण तो विषयच प्रत्येकाच्या शयनगृहात ज्याने त्याने राबवायचा आहे. इथूनच सगळ्या समस्यांना आणी या विषयाच्या क्लिष्टतेला सुरुवात होते. सर्वप्रथम केवळ जनजागृतीने आपल्याला हा विषय मार्गी लावायचा आहे कि कायद्याचा , नियमांचा आधार घेऊन आपल्याला ही बेसुमार ( खरे तर सुमार ) वाढ रोखायची आहे हे ठरवावे लागेल. हा वाद टिळक – आगरकरांच्या आधी स्वातंत्र्य कि आधी सुधारणा – या वादासारखा आहे. हा वाद निकाली काढण्यासाठी आम्ही डॉक्टर म्हणून अनुभवत असलेले काही तळागाळातील अनुभव लक्षात घेणे गरजेचे आहे.

             आज देशात लग्न होऊ घातलेल्या व झालेल्या  एकाही जोडप्याला लग्न झाल्यावर लगेच , एक अपत्य झाल्यावर व दोन अपत्ये झाल्यावर कुठले संततिनियमन सर्वोत्तम व सगळ्यात प्रभावी आहे हे नीट सांगता येणार नाही. बहुसंख्य निरक्षरांच्या व दारिद्र्य रेषेखालील एखाद्याला ही माहीती घेण्याची इच्छा झाली तरी असा काही निश्चित माहीतीचा स्त्रोत उपलब्ध नाही. कुटुंब हे धोरण ठरवू शकत नाही याचे कारण परत हेच की देशालाच धोरण नाही. यावर खुलेपणाने बोललेला पहीला आणी शेवटचा मालुसरा म्हणजे र. धों. कर्वे खरे तर १५ ऑगस्टच्या घोषणे पाठोपाठ मोदींनी पुढील काही ‘मन कि बात’ चे भाग संततिनियमनाच्या सविस्तर माहीतीवरच खर्ची घालावे. आज ही कंडोम व नलिका रोधण, नसबंदी एवढ्या मर्यादित स्वरुपात सर्वसामान्यांचे ज्ञान व त्या पेक्षा मर्यादित सर्व संततिनियमनाच्या साधनांचा प्रसार व उपयोग होतो. त्यातच खाजगी कंपन्या कंडोम विक्रीत उतरल्यावर अलेक पदमसे यांनी प्रथम आपले पणन कौशल्य वापरून,  कंडोमचा संबंध हा लैंगिक सुखाशी जोडला . मुळात तसे काही नसताना आज रीब्ड, डॉटेड, फ्लेवर्ड अशा फसव्या जाहीरातींच्या माध्यमातून लैंगिक सुखाशी कंडोम चा फसवा जोड अगदी तळागळापर्यंत रुजवला गेला. संततिनियमनात जास्त व सर्वाधिक १४ टक्के फेल्युअर रेट (अपयशाचे प्रमाण) असलेला कंडोम गरजेपेक्षा जास्त रुजत गेली आणी दुसर्या महत्वाच्या व निरनिराळ्या टप्प्यांवर महत्वाची साधने ही जनमानसात अधिकच विसरली गेली आणी कंडोमच्या छायेत हरवून गेली. ही हरवलेली महत्वाची साधने म्हणजे कॉपर टी, गर्भनिरोधक गोळ्या, इनजेकटेबल गर्भनिरोधक ही साधने स्त्रीकेंद्रित वाटत असली तरी संतती नियमनाच्या निर्णयाच्या चाव्या या स्त्रीच्या हातात जास्त असणे हे कोणाला सहज लक्षात न येणारे महत्वाचे पाऊल आहे

लोकसंख्या नियंत्रण
लोकसंख्या हा विषय आता अतिप्राधान्याचा आहे

            या साधनांचे महत्व व लोकसंख्या नियंत्रण धोरण निश्चिती करताना काही तळागाळातील निरीक्षणे कोणीच लक्षात घेत नाही. ती अशी कि आज लोकसंख्या नियंत्रित करायची असेल तर दोन जोडपे हे टार्गेट असले पाहीजे . पहिली एक अपत्ये असलेली व दुसरी दोन अपत्ये असलेली पण अजून कुटुंब थांबवण्याचा निश्चित निर्णय न झालेली. जो अशिक्षित व वंचित बहुसंख्य घटक लोकसंख्या वाढीस सर्वाधिक जबाबदार आहे तो पहीले मुल झाले कि रुग्णालयात परततच नाही. त्यातील अनेकांना लगेच दुसरे अपत्य हवे असते असे ही नाही पण संतती नियमनाचे अज्ञान आणी गर्भपातासाठी रुग्णालयाची सोपी, स्वस्त परवडणारी उपलब्धता नसते. म्हणून हा वर्ग गर्भधारणा – गरिबी–कुपोषण –पहील्या बाळाचे, आईचे अनारोग्य या फेर्यात अडकतच जातो. यांच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे प्रसूती आधीच समुपदेशन करून पहीले बाळ बाहेर आले की लगेच योनीचे तोंड बंद होण्याआधी प्रसूती गृहातच कॉपर टी बसवणे. या आईला मन वळवून परत रुग्णालयात आणणे हा शिवधनुष्य असल्याने कॉपर टी साठी ही वेळ व साधन लोकसंख्या नियंत्रणास सर्वोतम व जोडप्याला पुढील ५ ते १० वर्षे संततिनियमनाची हमी देणारे असेल. पण शासन दरबारी अजून हे सर्वोत्तम पर्याय कुणाच्याही लेखी नाही किंवा इतका खोलवर, तीव्रतेने यावर विचारच होत नाही. दोन अपत्ये झाल्यावर मात्र स्थिती वेगळी आहे. नलिकारोधन, नसबंदीसाठी आवश्यक असले तरी त्याचा आग्रह धरण्याचा आपल्याला नैतिक अधिकार नाही कारण ५ वर्षाखालील बालकांच्या मृत्यूचा दर पाहता या जोडप्याची दोन्ही मुले जगतीलच अशी हमी आपण देऊ शकत नाही. म्हणून परत कॉपर टी, गोळ्या किंवा दर दोन महीन्यांनी न दुखणारे, त्वचेत सहज देता येतील असे इंजेकटेबल गर्भनिरोधक द्यायला हवे. पण याचा देश पातळीवर वापर करण्यासंदर्भात अजून राजकीय उदासीनता प्रचंड आहे. खरे तर पुरुषांच्या नसबंदीचा पर्याय हा दुसर्या अपत्यानंतर सर्वोत्तम ठरू शकतो. पण नसबंदी हे नावच या सर्वोत्तम पर्यायाला काळिमा फासणारे आहे. यामुळे लैंगिक शक्तिपात होतो असा भास या नावातून होतो. या उलट गर्भधारणेची भीती जाऊन या शस्त्रक्रिया नंतर लैगिक सुख वाढीस लागते हे सर्वसामान्यांना पटवून द्यावे लागेल. भाजपने त्यांच्या निवडणूक घोषणेवर काम करणारे ब्रँडींग तज्ञ कामाला लावून या शस्त्रक्रियेचे नाव तातडीने बदलून , नोटबंदीच्या थाटात या नव्या नावाची घोषणा मोदींनी राष्ट्राला संबोधून करावी.

सदरील लेख हा लोकसत्ताच्या २१ ऑगष्ट २०१९ च्या अंकात प्रसिद्ध झालेला आहे. हा लेख लोकसत्ता वर वाचा.

लोकसंख्या कायदा किंवा किमान काही नियम असावे का, तो कसा असावा यावर विचार करण्याची वेळ आली आहे. चीन मध्ये ‘एकच अपत्य’ धोरणामुळे अनेक सामाजिक समस्या जन्मास आल्या . अगदीच हा अतिरेक गरजेचा नसला तरी दोन अपत्यांनंतर थांबलात तरच शासकीय सोयींचे , योजनांचा हक्क व हव तर वाढीव योजनांचे बक्षीस. त्या पुढे मात्र तिसर्या अपत्यानंतर योजनांचे लाभार्थी होता येणार नाही – अशा धोरणात्मक क्लुप्त्या लोकसंख्या नियंत्रण करण्यासाठी आखाव्या लागतील. शिक्षण, आर्थिक स्तर उंचावणे हे संथ गतीने सुरु असलेले पर्याय आहेतच. पण या गती वर अवलंबून राहणे सध्या परवडणारे नाही. लोकसंख्येचे गणित बदलायचे असेल तर अशी धोरणांची नवी त्रेराशिके झपाट्याने मांडावी लागणार आहेत.