गैरसमजाच्या ‘नशे’ वर अर्थदृष्टीची मात्रा

गैरसमजाच्या 'नशे' वर अर्थदृष्टीची मात्रा

गैरसमजाच्या ‘नशे’ वर अर्थदृष्टीची मात्रा कोरोनामुळे देशालाच नव्हे तर जगाला अर्थ शास्त्रज्ञांना अर्थ शास्त्राचे विश्लेषण आरोग्याच्या दृष्टीकोनातून करावे लागते आहे. नुकतेच राज ठाकरेंनी राज्याला आर्थिक गती देण्यासाठी मद्य विक्री सुरु करा अशी मागणी केली आहे. या मागणी कडे फक्त आता कोरोना संकटाच्या दृष्टीकोनातून नव्हे तर पुढे आरोग्य अर्थशास्त्राच्या मापात तोलून बघायाल हवे. मद्य विक्रीच्या महसुलाची चर्चा आज वर या दृष्टीकोनातून कधी झालीच नाही. सक्तीची दारू बंदी या पुढे मद्य व्यवसायाबद्दल चर्चा कधी पुढे जातच नाही. अनायासे कोरोनामुळे समाजाचे प्रत्येक अंग आपण आरोग्याच्या दृष्टीकोनातून पाहण्याच्या सवयीप्रत आलोच आहेत. म्हणून या निमित्ताने मद्य महसूला कडे निकोप आरोग्य अर्थ दृष्टी समाजाला देणे गरजेचे आहे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

                       गैरसमजाच्या ‘नशे’ वर अर्थदृष्टीची मात्रा महाराष्ट्र राज्याला मद्यातून महसूल सोडला तर इतर कुठला ही मोठा उत्पन्नाचा स्त्रोत नाही.  गेल्या वर्ष भरात हा महसूल १३ हजार कोटी आहे आणि सहसा १६ – १८  हजार कोटीं पर्यंत ही जातो. याला महत्व यासाठी आहे की मद्य विक्री हा राज्याच्या अखत्यारीत असतो व राज्य सरकारचे यावर नियंत्रण असते. केंद्र या महसुलात हस्तक्षेप करत नाही. व्यसन व अपायकारक गोष्टींवर जो उत्पादन खर्चाच्या सव्वापट अधिक कर लावला जातो त्याला ‘सीन टॅक्स’ म्हणजे पाप करण्यावर लादलेला कर असे म्हंटले जाते. लोकशाहीत पाप करण्यापासून रोखण्याला घटनात्मक मर्यादा आहेत तर किमान त्यावर ज्यादा कर लादून त्यातून लोक कल्याणकारी योजना राबवून पाप भिरुंचे आयुष्य सुसह्य करता येईल अशा विचाराने मद्य, तंबाखू, बिडी – सिगारेट व्यवसायला प्रोत्साहन देण्यात आले. अर्थात इतरांचे आयुष्य या महसूला मधून सुसह्य होते का ? हा विषय अलाहिदा. एवढ्या वर्षात व्यसन पूरक पदार्थ सोडून इतर सकारत्मक उत्पादकता, उद्योग, कारखाने असे महसुलाचे पर्याय उभे न राहिल्याने राज्याला महसूला साठी मद्य, तंबाखूच्या स्त्रोता वर अवलंबून राहण्याचे एक प्रकरे व्यसन लागेल. यामुळे याची मोजावी लागणारी सामाजिक आणि आरोग्य समस्यांच्या रूपाने आर्थिक किंमत हे आर्थिक त्रेराशिकच कोणी मांडलेले नाही. अर्थात याचा अर्थ सक्तीची दारू बंदी किंवा मद्य पिण्याविषयी नैतिकतेचे निकष या पलीकडे व्यसनमुक्तीसाठी ठरवून व नियोजन बद्ध प्रयत्न या विचारा चा अर्थ शास्त्राच्या दृष्टीने आपण किती विचार करतो या प्रश्नांचे उत्तर शोधण्यास हे चांगले निमित्त आहे.

       गैरसमजाच्या ‘नशे’ वर अर्थदृष्टीची मात्रा वैद्यकीय शास्त्रात  कुठल्या ही आजार व सवयीची आर्थिक किंमत मोजण्याची एक पद्धत आहे. कोरोनामुळे तर आजारांमुळे आर्थिक नुकसानीची व्याख्याच बदलून टाकली आहे. तशीच इतर आजार व सवयीमुळे होणाऱ्या तात्पुरत्या शारीरिक नुकसाना पलीकडे त्यामुळे होणारे disability associated life years म्हणजे त्यामुळे सर्व स्तरावर येणाऱ्या अधूपणा पायी खर्ची पडणारी आयुष्याची वर्षे व loss of man hours म्हणजे माणसाचे कार्यक्षमतेचे बुडणारे तास असे दोन निकष आजारामुळे होणर्या अर्थ हानीला लावले जातात. प्रत्येक आजार व सवयी साठी हे निकष लावून होणारे आर्थिक नुकसान याची गणना केली जाते. त्यावर उपाय योजनेचे प्राधान्य ठरवले जाते. मद्य व्यवसायाची आर्थिक समज मात्र १६ हजार ते १८ हजार कोटी या एकाच आकड्या भोवती व महसूलाचा  महत्वाचा स्त्रोत या निकषा पलीकडे गेलीच नाही. एक मद्यपी त्याच्याशी संबंधित १६ जणांचे आयुष्य बेचिराख करतो. ग्रामीण भागात कुटुंबावर भार बनून राहिलेला घरतील मद्यपी कर्ता असण्याची अपेक्षा असलेला पुरुष प्रत्येक घरात सापडेल. थेट मद्यपानामुळे होणाऱ्या आजारांची संख्या ६१ आहे आणि इतर २०० आजारांमध्ये मद्यपान हे भर घालणारा महत्वाचा घट आहे. देशात ३१ % लोक नियमित मद्यपान करतात. अधून मधून मद्यपान करणाऱ्यांची संख्या अजून जास्त आहे. आर्थिक गणित मांडायचे  झाल्यास एक जरी व्यक्ती मद्यपान करत असली तरी त्या घरातील ४५ टक्के हे मद्य व मद्य संबंधित समस्यांवर खर्च होते. आकडेवारी चा अभ्यास करून मद्यातून येणारे उत्पन्न व मद्यामुळे होणारे नुकसान हे गणित मांडण्यासाठी राज्यात आकडेवारी जमवण्याची तसदी ही आजवर आपण घेतलेली नाही. या उलट मद्यपान करणाऱ्या तरुण व कुमारवयीन मुलांची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक असल्याने आपले राज्य मात्र या विषयात संशोधनासाठी अंतर राष्ट्रीय संस्थांना मात्र आकर्षित करते. मद्यपानामुळे होणारे मानसिक आजार , आत्महत्या याची तर काही मोजदादच नाही. देशात दर वर्षी १ लाख रस्त्यावर होणाऱ्या अपघातातील मृत्यू मध्ये चालकाने मद्यपान केलेले असते. आजारांच्या पलीकडे बहुतांश बलात्कार,  निर्भया सारख्या अमानुष  खून व बलात्कार , घरगुती मारहाणीच्या समस्या, इतर गुन्हे हे मद्याच्या अमला खाली केल्या जातात. आजारावर होणारा खर्च व कामाचे बुडणारे तास सोडून या सर्व समाजिक असंतुलनाची किंमत आपण मद्यामुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानात पकडायची कि नाही हे ठरवावे लागेल.

                  गैरसमजाच्या ‘नशे’ वर अर्थदृष्टीची मात्रा प्रत्येक युद्धात शत्रू धारातीर्थी पडल्यावर किंवा जखमी अवस्थेत असल्यास त्याला मृत्यू शय्येवर शेवटचे पाणी पाजण्याची एक युध्द नैतिकता अनंत काळा पासून युद्ध शास्त्रात अस्तित्वात आहे. राज्याला भरमसाठ महसूल देणाऱ्या बहुतांश मद्यपींना मात्र मृत्युच्या वेळी उपचार , पाणी देण्यास कोणीही नसते. केसरी या अक्षय कुमार अभिनित चित्रपटात शेवट पर्यंत शत्रूला पाणी पाजणारा सहकारी उत्तम चित्रित केला आहे. तरीही शेवटी शत्रू पक्षातील सरदार त्याची क्रूर हत्या करतो. महसुलाचे कारण पुढे करून मद्य विक्रीचे समर्थन करणारे शासन कित्येक वर्ष या क्रूर सरदाराच्या भूमिकेत मद्यपींची कत्तल करतेच आहे. किंबहुना त्या पाणी पाजणाऱ्या छोट्या सैनिका सारखे आपण व्यसनमुक्ती साठी काही शास्त्रीय प्रयत्न तरी करत आहोत का ? सक्तीची मद्य बंदी नकोच पण किमान या १६ हजार कोटींपैकी थोडा तुकडा तरी आपण व्यसनमुक्तीसाठी खर्ची घालणार आहोत का ? मुळात व्यसनमुक्ती वैद्यक मानस शास्त्रातील अशी अंधारी खोली आहे जिथे कोणाला ही प्रवेश करण्यात रस नाही. मद्यपान हा नैराश्य, मधुमेह , ह्र्दय रोग असा एक शारीरिक  – मानसिक आजार आहे आणि त्याला उपचारांची गरज आहे हे सत्य समजून घेण्याची कोणाची ही तयारी नाही. अल्कॉहॉलिक अॅनॉनिमस सारख्या संघटना यासाठी वर्षानूवर्षे झटत आहेत. आज शासकीय सोडाच पण खाजगीत ही एखाद्या मद्यपीला मद्य सोडण्याची इच्छा असेल तरी उपचार , सुविधा सहज उपलब्ध नाहीत. त्यावर निधीची तरतूद सोडाच पण चर्चा ही नाही. धर्मा सारखेच  बहुतांश जनता मद्याच्या अमला खाली राहणे हे राजकीय पक्ष , मद्य उद्योग व्यावसायिक, विक्रेते या सर्वांच्याच सोयीचे आहे. याचे समर्थन करताना महसुलाचे कारण आहेच. पापाचा कर वसूल केल्यावर हा कर पचवताना  व्यसनमुक्तीच्या प्रयत्नांच्या रूपाने प्रायश्चीताचा विचार मनात आला तरी आर्थिक गणिते बदलण्यास सुरुवात होईल.

सदरील माहिती आपण सकाळ मध्येही वाचू शकता

पवित्र रमजान ‘कोविड’ मुक्त ठेवण्यासाठी

पवित्र रमजान 'कोविड' मुक्त ठेवण्यासाठी

पवित्र रमजान ‘कोविड’ मुक्त ठेवण्यासाठी नुकताच रमजान चा पवित्र महिना सुरु झाल्याने रोजे ही सुरु झाले आहेत. यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या दृष्टीने रमजान मध्ये काय बदल करावे व काळजी घ्यावी याचे निर्देश दिले आहेत. देशभरातून मौलवी व डॉक्टरांनी याला मान्यता दिली आहे .

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

  • कोरोना चे निदान झालेले, निदान होऊन बरे झालेले व निश्चित निदान झालेल्या केस च्या संपर्कात  येऊन सध्या होम क्वारनटाइनचा सला दिलेल्यांनी रमजान चा रोजा ठेवू नये.
  • साठ वर्षा पेक्षा जास्त वय असलेल्यांनी तसेच ६० पेक्षा कमी वय असले तरी मधुमेह, ह्रदयरोग, कॅन्सरचा त्रास असलेल्यांनी शक्यतो रोजा टाळावा.
  • ६० वर्षा खालील काही त्रास नसणाऱ्यानी रोजा ठेवण्यास हरकत नाही.

पवित्र रमजान ‘कोविड’ मुक्त ठेवण्यासाठी पवित्र कुरानमध्ये ही आजारी व्यक्तींना रोजा करण्यातून सूट देण्यात आली आहे. या संकेतां शिवाय अजून काही गोष्टी रमजान दरम्यान  पाळण्यास हरकत नाही. मधुमेह नियंत्रित असणारे काही जण या काळात रोजा ठेवतात. अशांनी  रक्तातील साखर  ७० च्या खाली व ३०० च्या वर जाणार नाही याची काळजी घ्यावी. स्वस्थ व्यक्तींनी रोजा करत असताना खोकला, ताप, सर्दी असल्यास लगेचच रोजा बंद करून डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. या वर्षी रमजान दरम्यान प्रार्थना, नमाज घरीच कराव्या व सणा दरम्यान एकमेकांच्या घरी जाणे व एकत्रित इफ्तारचे कार्यक्रम  टाळावे.पवित्र रमजान ‘कोविड’ मुक्त ठेवण्यासाठी रमजान दरम्यान रोजा पाळता आला नाही. तरी पवित्र कुरानमध्ये कफारा ही तरतूद सांगितली आहे. कफारा म्हणजे पैसे किंवा जेवणाचे दान. कोरोना साथी साठी आवश्यक दान करून आपण रोजा न करता कफाराचे पालन करु शकता.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

वास घेण्याची क्षमताही होते कमी

वास घेण्याची क्षमताही होते कमी

वास घेण्याची क्षमताही होते कमी कोरोनामध्ये ताप, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास, सर्दी ही लक्षणे सोडून अजून एक महत्वाचे लक्षण सगळ्यांनी समजून घेतले पाहिजे ते म्हणजे अचानक वास घेण्याची क्षमता कमी होणे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

वास घेण्याची क्षमताही होते कमी कुठल्या ही व्हायरल संसर्गामध्ये चव आणि घ्राणशक्ती या दोन्ही विशेष इंद्रिय क्षमता ( स्पेशल सेन्सेस ) वर थोडा परिणाम होत असतो. पण तो न जाणवण्या इतपत असतो. कोरोनाच्या संसार्गात मात्र तो प्रकर्षाने जाणवतो आहे. ही घ्राणशक्ती चांगल्या आणि वाईट अशा दोन्हीं वासांसाठी कमी होते.   यात सर्व प्रथम जेवण करताना त्याचा सुवास न जाणवणे, अंघोळ करताना साबणाचा किंवा टालकम पावडर चा वास न जाणवणे असे हे लक्षण आपल्या ध्यानी येते. यात वास येणे पूर्ण बंद होणे किंवा वास येणे कमी होणे अशा दोन्ही गोष्टी होऊ शकतात. काही रुग्णांमध्ये हे कोरोनाचे पहिले लक्षण असू शकते. पण या सोबत ताप, खोकला ही लक्षणे असतातच. परदेशात मात्र काही रुग्ण हे इतर कुठले ही लक्षण सोडून फक्त घ्राणशक्ती कमी होणे एवढे एकच लक्षण असलेले कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. भारतात यावर अजून माहिती येण्यास वेळ लागेल. तसेच वास घेण्याची क्षमता कोरोना बरा झाला की पुरवत होते. हे लक्षण महत्वाचे यासाठी वाटते कि सर्दी , खोकला, तापाच्या कोरोना सोडून इतर व्हायरल आजार व फ्लू मध्ये हे जास्त प्रमाणात जाणवत नाहीत. म्हणून ताप , सर्दी, खोकला  या पैकी कुठल्या ही लक्षणा सोबत वासाची क्षमता कमी झाली असल्यास आपल्या डॉक्टरचा सल्ला घ्यावा. वास घेण्याची क्षमताही होते कमी नाकामध्ये पॉलीप म्हणजे लटकणारे गुच्छ असणे, अलर्जी मुळे असणारी दीर्घकालीन सर्दी, नाकातील हाड वाढलेले असणे, नाकाच्या मधला पट वाकडा असणे या आजारांमध्ये ही घ्राणशक्ती कमी होते. पण यात कुठल्या ही आजारामध्ये ताप नसतो.  

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

ऑनलाईन खाद्यपदार्थ मागवताना

ऑनलाईन खाद्यपदार्थ मागवताना

ऑनलाईन खाद्यपदार्थ मागवताना काही ठिकाणी ऑनलाईन खाण्याचे पदार्थ विक्री करणारे अॅप्स सुरु झाले आहेत. काही काळा नंतर इतरत्र ते सुरु होतील. शक्य असल्यास पुढील काही महिने बाहेरून व ऑनलाईन खाद्य पदार्थ मागवणे टाळावे. जेवणातून कोरोनाचा संसर्ग होत नाही. पण वस्तूच्या माध्यमातून होऊ शकतो. म्हणून  असे ऑनलाईन मागवलेल्या खाद्य पदार्थ स्वीकारताना कोरोना पासून बचाव करण्यासाठी पुढील काळजी घ्यावी –

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

  • डिलिवरी देणाऱ्या व्यक्ती कडून थेट खाद्य पदार्थाचे पॅकेज स्वीकारण्यापेक्षा त्याला ते बाहेरच ठेवून जायला सांगावे.
  • पैसे देताना शक्यतो डिजिटल पेमेंट ला प्राधान्य द्यावे.
  • शक्य असेल तर पॅकेज घरात आणूच नये. प्लास्टिक चे साधे ग्लव्ज घालावे.
  • त्यावर थोडे सॅनीटायजर ओतावे.
  • ऑनलाईन खाद्यपदार्थ मागवताना एका वाइप किंवा कपड्यावर टाकून सॅनीटायजरने पॅकेज बाहेरून स्वच्छ करून घ्यावा. हे करत असताना आतील अन्नाचा सॅनीटायजरशी संपर्क येणार नाही हयाची काळजी घ्यावी.
  • गवळ्या कडून दुध घेतो तसे दारातच खाद्यपदार्थ घरच्या भांड्यात / ताटात काढून घ्यावे.
  • ऑनलाईन खाद्यपदार्थ मागवताना पॅकेज व नंतर ग्लव्ज घरा बाहेरच डस्टबिन मध्ये वेगळ्या प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून टाकावे. यामुळे नंतर हे स्वच्छ करणाऱ्याला ही याचा धोका राहणार नाही. तसेच ते आपण सॅनीटायजरने स्वच्छ ही केले आहे.
  • सगळे झाल्यावर हात साबण व पाण्यान धुवून घ्यावे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

उपवास नकोच

उपवास नकोच

 उपवास नकोच कोरोना मुळे अनेक धार्मिक चाली रीतींना छेद देऊन विज्ञानवादी आणि आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त काय याला प्राधान्य देण्याची वेळ आली आहे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

त्यातली सध्या आपण सोडून द्यावी अशी गोष्ट म्हणजे उपवास. उपवास आणि मानवी शरीरावर होणारे परिणाम यावर बरेच संशोधन झाले आहे. त्यात एका विशिष्ट पद्धतीने व काही गोष्टी खाऊन केलेल्या जास्त दिवस उपवासाचे फायदे ही दिसून आले आहेत. पण त्यासाठी आदर्श वातावरण व रोज ठरलेल्या गोष्टी खाल्ल्या गेल्या पाहिजे. सध्याच्या साथ सुरु असताना तसेच अस्थिर वातावरणात उपवास करणे हे तुमच्या प्रतिकारशक्ती वर नकारत्मक परिणाम करू शकते. म्हणून रोज नियमित व उच्च प्रथिने युक्त आहार घेणे सध्या खूप महत्वाचे आहे. उपवास नकोच घरातील वृध्द व्यक्तींना, मधुमेह असलेल्यांना कोरोनाचा धोका जास्त असतो. नेमक्या घरातील अशा वृद्धांनी विविध वार व देवांचा उपवास वर्षानुवर्षे धरलेला असतो. त्यामुळे या लोकांना कोरोनाचा धोका जास्त प्रमाणात असू शकतो. म्हणून किमान साथ सुरु असे पर्यंत अशा लोकांना काही काळ उपवास न करता नियमित आहार घ्यावा. आजारी असलेल्या व्यक्तींनी जितकी इच्छा होईल तितके खावे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

एमबीबीएसचा अभ्यासक्रम : मुदत योग्य की अयोग्य?

एमबीबीएसचा अभ्यासक्रम

एमबीबीएसचा अभ्यासक्रम प्रवेशापासून दहा वर्षात पूर्ण करण्याचा नवा नियम येत्या वर्षापासून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने लागू केला आहे आहे. हा अभ्यासक्रम मुळात साडेचार वर्षांचा असतो पण क्वचीतच प्रत्येक बॅचला नापास होत अभ्यासक्रम पूर्ण करणारे काही विद्यार्थी असतात. त्यातही  एमबीबीएसचा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांसाठी १० वर्षे लागणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूपच कमी आहे. ही विद्यार्थी संख्या कमी असली तरी या निर्णयाचा विद्यापीठ व अभ्यासक्रम पूर्ण करण्यास वेळ घेणारे विद्यार्थी असा दोन्ही बाजूंनी विचार होणे गरजेचे आहे.

वैद्यकीय क्षेत्रात अशी उदाहरणे आहेत जिथे विद्यार्थ्याला त्याच्या बौद्धिक पातळीमुळे नव्हे तर इतर कौटुंबिक, मानसिक, सामाजिक समस्यांमुळे अभ्यासक्रम पूर्ण करता आला नाही. अशा मुलांसाठी क्रोनिक हा शब्द वैद्यकीय महाविद्यालयात वापरला जातो. खरेतर आधी पेक्षा सध्याच्या वैद्यकीय अभ्यासक्रमाची कठीण्य पातळी ही खूप कमी आहे. म्हणून नापास होण्यासाठी बऱ्याचदा तुम्हाला नापासच व्हायचे आहे हे तुम्हाला ठरवावेच लागते. पण तरीही विद्यार्थी अनेक वर्षे नापास होत असेल तर नक्कीच त्या मागे बौद्धिक पातळी किव्हा अभ्यासक्रम न कळण्यापलीकडे काही सामाजिक, आर्थिक, मानसिक कारणे असू शकतात. वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश मिळाला म्हणजे त्या विद्यार्थ्याचा स्तर बरा असतो. त्यातच अभिमत विद्यापीठांपेक्षा आरोग्य विद्यापीठाशी संलग्न शासकीय व खाजगी विद्यापीठात परीक्षा अधिक पारदर्शक असते. म्हणून या कॉलेजेस मध्ये विद्यार्थी रखडण्याचे प्रमाण जास्त असते. वैद्यकीय महाविद्यालयातील प्रत्येक क्रोनिक रखडलेल्या विद्यार्थ्याची अशी एक स्वतःची कहाणी असते. काही विद्यार्थी मानसिक समस्येमुळे व्यसनाधीन झालेले असतात. काहींना मानसिक समस्या असल्या तरी त्या ओळखल्या जाऊन त्यावर उपचारच होत नाहीत. हे सगळे मोठ मोठे मानसोपचार विभाग मिरवत असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयांच्या नाका खाली घडत असते हे विशेष. एमबीबीएस परीक्षा आधी पेक्षा झाली सोपी असली तरी वैद्यकीय अभ्यासक्रम अवाढव्य असतो. त्याचा पहिल्या वर्षी तरी प्रचंड ताण असतो. आपल्याकडे दर वर्षी प्रवेशावर होणाऱ्या केसेस आणि प्रवेशाच्या लांबत जाणाऱ्या प्रक्रीये  मुळे मुळात १ ऑगस्टला सुरु होणारे वर्ग सुरु होण्यास ऑक्टोबर उजाडते. त्यातच आधी ९ महिन्याचा असलेला पहिल्या वर्षाचा अभ्यासक्रम आता १४ महिन्याचा करण्यात आला आहे म्हणून दिलासा आहे. पण तरी या बदलेल्या वातावरणाशी जुळवून न घेऊ शकणारे पहिल्या वर्षी नापास झाले की प्रवाहाबाहेर फेकले जातात. वैद्यकीय महाविद्यालयात ही टाॅपर्स , डिस्टिनक्षण , नापास आणी क्रोनिक असा एक बौद्धिक वर्णभेद असतो. म्हणून वारंवार नापास होणार्यांना कालमर्यादेच्या नियमाचा बडगा उगारायचा कि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करायचा हे ठरवावे लागेल.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

अनेक वर्ष रखडलेल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत यंत्रणेची ही मोठी ससेहोलपट होत असते. नुकतेच बदललेल्या  अभ्यासक्रमामुळे जुन्या व नव्या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी अशी अध्यापनासाठी व परीक्षेसाठी वेगळी यंत्रणा राबवावी लागते. अनेक वर्षे नापास झालेल्यांची विद्यार्थी संख्या कमी असली तरी त्यांच्या साठी वेगळा पेपर काढणे  आणी घेणे अशा प्रकारे यंत्रणा व्यस्त होते. शासनाचा प्रत्येक विद्यार्थ्याच्या शिक्षणावर ५.५ लाख रुपये खर्च होत असतो. असे असताना विद्यार्थ्यांची किमान काही काळात डिग्री पूर्ण करण्याची बांधिलकी असावी असा विचार विद्यापीठाच्या दृष्टीने असू शकतो.

हा नियम राबवताना अशा वारंवार नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अकॅडॅमीक व सामाजिक पुनर्वसनासाठी काही यंत्रणा नाही. हे विद्यार्थी का नापास होत आहेत याची कारणे शोधण्यासाठी एखादा संशोधात्मक अभ्यास आपण अजून केला आहे का? अनेक वर्षे घेऊन अभ्यासक्रम पूर्ण करणारे विद्यार्थी नंतर उत्तम प्रॅक्टीस करतात. तसेच असे काही विद्यार्थी प्रसिद्ध व निष्णात डॉक्टर म्हणून ही नावारूपाला आल्याची उदाहरणे आहेत. ही संधी या विद्यार्थ्यां कडून आपण हिरावून घ्यायची का या प्रश्नाचे उत्तर शोधणे गरजेचे आहे. एकदा बीजे वैद्यकीय महाविद्यालयाचे काही विद्यार्थी पुण्यातील एका हॉटेल ला जेवायला गेले. तिथला वेटर हा वारंवार त्या विद्यार्थ्यांच्या गप्पा जवळ येऊन ऐकण्याचा प्रयत्न करत होता. हे विद्यार्थ्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्याला जवळ बोलावून याचे कारण विचारले. त्यावर त्याने सांगितले कि अनेक वर्षांपूर्वी तो बीजेचाच एमबीबीएसचा विद्यार्थी होता. पण एमबीबीएसचा अभ्यासक्रम पूर्ण करू शकला नाही. पुढच्या दिवशी सर्व विद्यार्थी त्याला होस्टेल वर घेऊन गेले. सगळ्यांनी त्याला मदत करत पहिल्या वर्षाच्या परीक्षेला बसवले आणी त्याने पुढे अभ्यासक्रम पूर्ण केला . हा विद्यार्थी आज महाराष्ट्रातच शासकीय सेवेत मेडिकल ऑफिसर म्हणून चांगली सेवा देतो आहे आणि चांगले आयुष्य जगतो आहे. कालमर्यादे मुळे वेळ हुकलेले पण पुन्हा संधी मिळाल्यास त्यातून बाहेर येणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ शकतो. आपले कायदे मंडळ ही एका ही निर्दोषा ला शिक्षा होऊ नये म्हणून हजारो गुन्हेगारांना सोडण्याची जोखीम घेते . मग बुद्धिवंतांसाठीच्या अभ्यासक्रमात कुठल्या तरी कारणाने कमी पडलेल्या एकाला आपण वेळेचे कारण दाखवत संधी नाकारायची का ?

एमबीबीएसचा अभ्यासक्रम

 या प्रश्नावर बीजे चे माझी प्राध्यापक डॉ.पद्माकर पंडित व डॉ. दाक्षायणी पंडित यांनी रखडलेले विद्यार्थी हे एक मिशन समजून अनेक वर्षे काम केले. अशा विद्यार्थ्यांना शोधून त्यांचे समुपदेशन , त्यांचा अभ्यास वर्ग घेणे, अगदी स्वतःच्या घरी त्यांची राहण्याची , जेवण्याची सोय , त्यांना आर्थिक मदती पर्यंत प्रयत्न करून या जोडप्याने असे अनेक व्यवस्थेच्या कडीतून निसटणार्यांचे पुनर्वसन केले. विशेष म्हणजे डॉ. पंडित दाम्पत्याने घडवलेले हे अनेक क्रोनिक आज समाजात उत्तम वैद्यकीय सेवा देत आहेत. यातील काहींनी तर ५ – १० वर्षे प्रवेशाला उलटून गेल्यावर ही परत येऊन एमबीबीएस अभ्यासक्रम पूर्ण केला. अशा या विद्यार्थ्यांचा भार वाहताना व्यवस्थेचची  ससेहोलपट आणि या विद्यार्थ्यांचे पुनर्वसन यातून काही मधला मार्ग काढता येतो का हे पाहायला हवे.

Hand Foot Mouth Disease in Maharashtra

Hand Foot Mouth Disease

Hand foot mouth disease epidemic in Maharashtra – Unnoticed and Overlooked.

It’s a great irony that the disease, causing havoc in rural Maharashtra is largely unnoticed by the health authorities. Also, the disease running as an epidemic in children Marathwada, Vidarbha should be largely reported by media for the prevention of this disease. Hand Foot Mouth Disease, not a routine illness, in pediatrician’s OPD started coming up since the last 2 years has peaked last 6months with a gradually increasing number of cases every day. The disease is a viral self-limiting infection caused by coxsackie and enterovirus. Usually, the disease has a high incidence in winter but epidemiology seems to be changing and now we pediatricians have seen it all year round.

Hand Foot Mouth Disease
Symptoms

Symptoms of Hand Foot Mouth Disease

  • Starts with fever and sore throat
  • Painful blisters/ulcers appear in the throat, on palms and sole
  • Ulcers in mouth and throat become painful and difficulty in swallowing hence food intake decreases causing debility
  • Itching of the lesions
  • Irritability
  • Loss of appetite

The spread of Hand Foot Mouth Disease

Spread to healthy kids through touch and skin to skin contact as saliva contains the virus.

Age

Usually affects children less than 5 years

Investigations

Usually, no investigations required as the disease can be diagnosed clinically. With the information given even parents can diagnose it although expert consultation is mandatory.

Treatment of the Disease

Treatment is usually symptomatic with medicines for fever (antipyretic – paracetamol ), pain ( analgesic – ibuprofen ), a lot of fluids, multivitamin syrup, soft diet. Occasionally local antibiotic cream for blisters. Intravenous antibiotics are required only when lesions get a secondary bacterial infection.

What can the parents do to prevent their child from getting hand foot mouth disease?

  • Wash your own and child’s hands very often especially when he is returning home from outdoors and school
  • Maintaining good nutrition

Read more Amol Annadate articles

What can the parents of infected children do?

  • Consult a pediatrician as soon as they notice ulcers and fever
  • Not send the child to school during and after the illness till the rash/blisters fade off or minimum seven days after onset of rash
  • Give soft diet and lot of fluids
  • Wash hands after handling the child
  • Limit contact with siblings and other children
  • The virus remains on the surface for 8 to 10 days hence cleaning of home and surfaces with water and antiseptic is required. Also, schools may consider such cleaning of classrooms and benches when many cases appear from the same class.

What’s different in this Epidemic?

Every epidemic of disease comes with a difference in the usual symptoms of the disease. Hand foot mouth disease in this epidemic is unusually coming with blisters on buttocks and also presenting between 5 to 10 years. Even with this basic information being valuable to alleviate the fear of hand foot mouth disease among parents and for prevention of the disease, the Public health authorities have largely turned a deaf ear to the disease and Health education about it.

हिरकणी ‘अमृता सुदामे’ नावाची!

हिरकणी

ही हिरकणी आपल्या बाळांपर्यंत पोहोचण्या आधीच वाहून गेली !

सध्या राज्यात किचन ओटा किंवा बेसिन धूत असताना, बारीक कीटक ड्रेनेज मध्ये वाहून जातात त्याप्रमाणे माणसे वाहून जात आहेत. नुकत्याच पुण्यात आलेल्या पुरात, धायरी पुलावरून घरी जात असलेली ‘अमृता सुदामे’ ही वाहून गेली. एक मैत्रिणीकडून तिचा सगळा वैयक्तिक तपशील कळाला तेव्हा ‘या व्यवस्थेत बदल घडवण्यासाठी आपण काय करतोय?’ या हतबलतेने अमृताच्या चीतेत आपण जिवंत जळतोय अशा वेदना झाल्या!

एका डायग्नोस्टिक सेंटरवर रीसेप्शनीस्ट म्हणून काम करणारी ‘अमृता’ ही तरुणी रात्रभर घरी पोचत नाही. आणि रात्री पासून बेपत्ता असलेल्या अमृताचा शोध शेवटी ससूनच्या शवागारात संपतो! त्या शोधासोबतच उन्मळून पडतो, एका अख्ख्या कुटुंबाचा आधारवड!! आपल्यासाठी ‘पुरात एका तरुणीचा मृत्यू’ एवढ्या बातमीवर विषय संपतो. ती कोणा मंत्र्याची–सत्ताधाऱ्यांची किंवा हाय-प्रोफाइल समाजातील कुणाचे मुल बाळ नातलग नसल्याने, तिच्या मृत्यूची मोठी बातमी होत नाही आणि ती कोण होती यावर रकाने लिहून येत नाहीत. कोण होती ही ‘अमृता’ ??

इयत्ता आठवी आणि शिशू वर्गातील दोन मुलींचं एकल पालकत्व निभावत काबाड कष्ट करत जीवनसंघर्ष चालू ठेवणारी एक माता… २ वर्षापूर्वी वडिलांचा मृत्यू झाल्यावर कँन्सरग्रस्त आईची जबाबदारी पेलणारी एक लेक. परिस्थितीसमोर हात न टेकता उलट तिच्याशी दोन हात करून आलेला दिवस समर्थपणे झेलणारी एक रणंगिनी…! जाऊ नको, रात्री इथेच थांब असे सांगूनही, “मी गेले नाही तर माझ्या मुलींकडे या भयाण रात्री कोण पाहणार ” असे म्हणत, पाण्यातच दुचाकीने घरी निघालेली ‘आधुनिक हिरकणी’! कामावरून धो धो पावसात बाहेर निघेलेली आणि पापांनी दुथडी भरून वाहणाऱ्या नाल्यांच्या प्रवाहात लेकरांसाठी घरी निघालेल्या अमृताचे हेच वाक्य शेवटचे वाक्य ठरले!

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

अशी ही परिस्थितीशी झुंज देणारी अमृता त्या रात्री व्यवस्थेशी संघर्ष करू शकली नाही आणि शेवटी या व्यवस्थेने तिचा जीव घेऊनच तिचा संघर्ष संपवला.

Its High Time We Talk

‘एका महिलेचा पुरात वाहून मृत्यू’ या बातमी मागे उघडे पडलेले एक कुटुंब आणि एवढी करूण कहाणी असू शकते याची जाणीव ही न ठेवता वर्तमानपत्रांची पाने आपण उलटत असतो, सोशल मिडिया खाली खाली स्क्रोल करत जातो.

हिची संघर्षगाथा ऐकून आमच्या मित्राने आजच्या युगाची हिरकणी गेली अशी प्रतिक्रिया नोंदवली. शिवाजी महाराजांच्या काळात आपल्या बाळासाठी गड चढून गेलेल्या हिरकणीची कथा आपल्याला माहित आहे. ‘माझी मुले घरी एकटी आहेत मला घरी जावेच लागेल’ या ओढीने घरी निघालेली ही हिरकणी मात्र आपल्या बछड्यांपर्यंत पोहोचूच शकली नाही! आज शिवरायांच्या नावाने यात्रा, राजकारण करणाऱ्यांना या घटनेची लाज वाटली पाहिजे. अनेक वर्षे शिवछत्रपतींचे दाखले देणाऱ्यापर्यंत कदाचित अमृताची ही गोष्ट पोहोचणार ही नाही, कारण सध्या प्रचार सुरु आहे ना! कोण जिंकणार, कोण हरणार , कुठल्या मतदार संघात मराठा किती, दलित, माळी, धनगर, मुस्लीम मतदान किती …? त्यावरून कुठल्या जातीचा उमेदवार द्यायचा याच्यातून सत्ताधरी, विरोधकांना वेळ कुठे आहे. काही वर्षांपूर्वी पुण्यातील एका इंजिनिअर मित्राने सांगितले कि, पुण्यात ड्रेनेजसाठी जे खड्डे आणी त्यावर जाळी दिसते त्यात अनेक ठिकाणे फक्त खड्डे आणी त्यावर जाळी आहे .खाली त्यांना जोडणारी पाईपलाईन अस्तित्वातच नाही. आपण नागरिक म्हणून हे खड्डे कधी उघडून बघितले आहेत का ? पुण्यात अनेक नाले बुजवून त्यावर इमारती उभ्या राहिल्या आहेत. यात घरे विकत घेणाऱ्याला ही आपण अशा अनेकांचे जीव धोक्यात घालून उभे राहिलेल्या इमारतीत राहणार आहोत हे माहित नसते. स्थापत्य अभियंते , बांधकाम व्यवसायिक, राज्यकर्ते यांच्या संगनमताने अशा विकासाचे आपण सगळे भागीदार आहोत. पण तो विकास ‘अमृता’ सारख्यांच्या थडग्यांवर उभा आहे … फरक इतकाच आहे … हे थडगे आज अमृताचे आहे … उद्या तुमच्या आमच्या पैकी कोणाचे असेल सांगता येत नाही … कारण संधाकाळ पर्यंत कुठलीही सूचना नसताना भर शहरात अचानक घुसलेले पाणी वाहून नेताना कोणात ही भेद करत नाही ….!

डॉ. अमोल अन्नदाते | reachme@amolannadate.com

डॉ. केतन खुर्जेकर असे जायला नको होते!

डॉ. केतन खुर्जेकर

काल रात्री ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ वर डॉ. केतन खुर्जेकर, पुण्यातील व महाराष्ट्रातील प्रसिद्ध स्पाईन सर्जन यांचं अपघातामध्ये दुखद निधन झालं. त्यांच्या जाण्याच्या काही तासात त्यांचा वाढदिवस उजाडणार होता. खरतर अशा घटनेवर व्यक्त होतांना अश्रू तर आटतातच आणि शब्दही पांगळे होतात. डॉ. केतन हे पुण्याच्या प्रसिद्ध संचेती हॉस्पिटल च्या अस्थीरोग विभागाचे प्रमुख होते व मणक्यांच्या शस्रक्रियेत पारंगत होते. त्या पलीकडे ते कोणाचे तरी पुत्र, पती, वडील होते. मानेच्या व पाठीच्या मणक्यांच्या जन्मजात व्याधी (deformities) सरळ करण्यात त्यांचा विशेष हातखंड होता. ही शस्रक्रिया करत असतांना एखाद्या हार्मोनियम वर संगीतकाराची बोटे सहज रेंगाळावी आणि त्यातून साक्षात दैवी गांधार रूप सहज बाहेर पडाव तसच ऑपरेशन थियटर मध्ये डॉ. केतन यांची बोटे मणक्यांवर फिरायची आणि जादू केल्याप्रमाणे ऑपरेशन थियटर मधून वेगळ्याच मणक्याचा रुग्ण बाहेर यायचा. आशा अनेक रुग्णांना डॉ. केतन यांनी शब्दशः ताठ मानेने आणि ताठ कण्याने जगण्याचे वरदान दिले. साक्षात देवानेच दिलेल्या मणक्याच्या व्याधीही डॉ. केतन अविरत दोन हात करत राहिले. पण त्यांचा मृत्यु अशा प्रकारे होऊ शकतो यावर विश्वासच बसत नाही आणि ‘नियतीचा न्याय’ या शब्दांवरून विश्वास उडून जातो. मुंबईत होणाऱ्या मणक्यांच्या शस्रक्रीयेच्या Conference वरून परतत असतांना डॉ. केतन यांचा वैयक्तिक ड्रायवर नसल्याने त्यांनी OLA कॅब घेतली. आपल्या दोन साथीदारांसह OLA कॅब ने प्रवास करण पसंद केलं. रस्त्यात गाडीचं टायर पंक्चर झाल्याने ड्रायवर ने गाडी रस्त्याच्या कडेला घेतली. नेहमी प्रमाणे मदतीला धावून जाणारे डॉ. केतनही driver च्या मदतीला गाडीतून खाली उतरले. मागून येणाऱ्या भरधाव luxury बस ने या दोघांना काळाने स्वतःच्या पोटात ओढून घेतले!! आता हे सगळ ऐकल्यावर स्वतःच्या गाडीने प्रवास करा, स्वतःचा ड्रायवर वापरा, एक्स्प्रेस वे वर मध्ये थांबू नका, थांबले तरी गाडीतून खाली उतरू नका, एक्स्प्रेस वे वर रात्री प्रवास करू नका या सूचनांना तसा काहीच अर्थ वाटत नाही. कारण डॉ. केतन ज्याप्रमाणे मणक्यांचे भवितव्य बदलून टाकायचे तस काळाने केलेल हे ऑपरेशन बदलणे आपल्या कोणाच्याच हातात नाही.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

डॉ. केतन यांच्या जाण्यामुळे त्याच्या कुटुंबाचे क्षणार्धात सगळेच हरपून गेले पण त्यासोबत या राज्याचे आणि देशाचे न भरून येणारे नुकसान झाले. खरतर एक निष्णात डॉक्टर काळाच्या पडद्या आड जातो तेव्हा केवढ मोठी पोकळी निर्माण होते, हे रोज अनेक रुग्ण बरे करणाऱ्या डॉक्टरलाच आणी गंभीर आजारातुन बऱ्या झालेल्या रुग्णालाच समजू शकते. एखादा व्यक्ती डॉक्टर म्हणून नियती जेव्हा जन्माला घालते, तेव्हा त्याच्या खांद्यावर खूप मोठी जबाबदारी देऊन पाठवत असते. जे असाधारण कौशल्य डॉ. केतन यांच्या हाती होते. त्यावरून डॉ. केतन यांच्या वरही अजून खूप काही करण्याच अनेकांच आयुष्य बदलून टाकण्याची किमया साधण्याची जबाबदारी होती. वयाच्या, यशाच्या, पैश्याच्या एका टप्प्यानंतर डॉक्टर हा या पलीकडे जाऊन फक्त काम करण्यासाठी, त्याच्या कौशल्यासाठी जगत असतो. ते कौशल्यच त्याच्या जगण्याचे साध्य आणि साधन असते. डॉ केतनच्या जाण्याने एक दैवी साध्य आणि साधनच संपले. गेलेल्या डॉक्टरला तोफांची सलामी किंवा कुठलाही शासकीय इतमामाचा प्रोटोकॉल नसतो. पण डॉ. केतन खुर्जेकर तुम्ही बरे केलेले हजारो मणके आज तुमच्यासाठी अश्रू ढाळत आहेत, सलामी देत आहेत, मानवंदना देत आहेत …!

– डॉ. अमोल अन्नदाते
– reachme@amolannadate.com

इसरो प्रमुख के. सिवान सारखे मला रडता येणार नाही!

इसरो प्रमुख के. सिवान

काल चांद्रयान-२, चंद्रापासून २.१ किलोमीटर लांब असताना संपर्क तुटला. त्यानंतर इसरो प्रमुख के. सिवान हे पंतप्रधान मोदी च्या खांद्यावर डोके ठेवून ढसढसा रडतानाची क्लिप अनेकांनी पहिली. देशाच्या दोन सर्वोच्च पदावरील लोकांनी जाहीरपणे असे भावनाविवश व्हावे का? अशा अनेकांच्या उलट-सुलट प्रतिक्रिया आल्या. पण या क्षणाची सहवेदना मी डॉक्टर म्हणून, त्यातच बालरोगतज्ञ म्हणून, समजू शकतो! त्या सोबत empathise करू शकतो! असे क्षण आम्ही, त्यातच अत्यवस्थ रुग्णांच्या उपचारातील डॉक्टर, रोजच अनुभवत असतो.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

बऱ्याच गोष्टी माणूस म्हणून आपल्या हाता बाहेर असतात याची जाणीव उपचार करताना सतत येत असते. दोन आठवड्याखाली ‘Duchenne Muscular Dystrophy‘ हा कधीच बरा न होणारा आजार आणि मुलाला सोळाव्या वर्षापर्यंत रोज मृत्यू पहावा लागेल हे पालकांना समजून सांगताना, मी हा क्षण अनुभवला! त्यानंतर दोन दिवसांनी ८ वर्षांचा, ह्र्दय रोग असलेला एक मुलगा ऑपरेशन करण्यापलीकडे आहे, हे माझ्या हार्ट सर्जन मित्राने मला फोनवर सांगितले तेव्हा ही मी हे अनुभवले! अजून पालकांना मी हे सांगायचे राहिले आहे!! परवा दर महिन्याला रक्त घ्यावा लागणारा व आयुष्य भर असे रक्त घेण्याची गरज असलेला, ४ वर्षांचा मुलगा intra Cath लावताना मला विचारत होता – ” डॉक्टर अस दर महिन्याला कधी पर्यंत तुम्ही मला टोचत राहणार!” अशा वेळेला आईच्या, बापाच्या डोळ्यातून टचकन पाणी येतं! आम्हा डॉक्टरांना मात्र मनात भरून येत असतानाही, सिवान मोदींच्या खांद्यावर डोके ठेवून रडले तसे, रुग्णाच्या वडिलांच्या खांद्यावर डोके ठेवून रडण्याची मुभा नसते! रोजच मरण बघून मन घट्ट होत जातं, पण कशाच काहीच वाटत नाही एवढ ही घट्ट नसतं! कर्तव्यासाठी ते घट्ट कराव लागतं. एकदा उपचारांसाठी आलेला एक स्मशान जोगी मला म्हणाला, “डॉक्टर, आपले दोघांचे आयुष्य सारखेच आहे, न रडता रोज मृत्यू बघत रहायचे!” रुग्ण, आई-वडील, नातेवाईक बऱ्याचदा रागवतात, प्रसंगी आज-काल मारतात ही, पण रडत बसू नको, उचल ते गांडीव परत, असं सांगायला कोणी कृष्ण नसतो. तेव्हा आपल्या सदसद्विवेकबुद्धीलाच कृष्ण बनवावं लागतं.

इसरो प्रमुख के. सिवान, तुम्ही रडून मोकळे झालात, ते बर केलत. या घटनेच भांडवल करून आम्हा डॉक्टरांच अपयश स्वीकारा हो, अशी आर्त विनवणी मी करणार नाही. पण प्रत्येक व्यवसायात यशाचा ‘Law of Averages’ काम करत असतो. म्हणजे तुम्ही दहा वेळा प्रयत्न केला तर दहाच्या दहा वेळेला यश येणे अशक्य असते. सचिन तेंडूलकर, विराट कोहली प्रत्येक मॅच मध्ये शतक ठोकू शकत नाही. बऱ्याचदा त्यांच्यावरही शून्यावर बाद होण्याची वेळ येते. हाच नियम चांद्रयान मोहिमेला ही काल लागू पडला. वैद्यकीय क्षेत्राला, उपचारांनाही हा नियम लागू असतो, पण इथे प्रश्न जगण्या मरण्याचा असल्याने तो आपलं मन स्वीकारत नाही. पण तो आम्हा डॉक्टरांना माणूस म्हणून स्वीकारावा लागतो. कधी अगदी हातातून बाहेर गेलेली केस परत हातात येते…जवळपास मृत्यू झालेला असतांना CPR ने ह्र्दय परत सुरु होते, अशा अनअपेक्षित यशाने अपरिहार्यपणे येणारे इतर अपयशाची भरपाई झाली असे मानत आम्ही डॉक्टर पुढे जात राहतो! फक्त डॉक्टर च नाही इतर प्रत्येक व्यवसायिकाचे अपयश मनापासून स्वीकारा! चेहरा पाडून मध्यरात्री – बाळ आता जिवंत नाही – ही गोष्ट सांगताना एखादा नातेवाईक म्हणतो – “ठीक हैं साब, जाने दिजीये, आप ने बहोत कोशिश कि, हम आप के शुक्रगुजार है!” तेव्हा तो मला काल रडण्यासाठी खांदा देणाऱ्या मोदी सारखा वाटतो, फरक इतकाच, सिवान सारखे मला रडता येणार नाही!