सोशल डीस्टन्सिंग म्हणजे नेमके काय?

सोशल डीस्टन्सिंग म्हणजे नेमके काय

सोशल डीस्टन्सिंग म्हणजे नेमके काय? सध्या आपण कोरोनाच्या स्टेज २ मध्ये म्हणजे जिथे एका व्यक्ती कडून दुसऱ्या व्यक्तीला संसर्ग होतो अशा स्टेज मध्ये आहोत. या घडीला आपल्याला स्टेज ३ मध्ये जायचे नसेल तर सोशल डीस्टन्सिंग म्हणजे काय हे समजून ती पार पाडणे समाज म्हणून आपली सगळ्यांची जबाबदारी आहे.

सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे गरज नसताना घराबाहेर न जाणे आणि उगीचच प्रवास न करणे. जर कामावर जायचे असेल तर ठीक आहे पण मौज म्हणून बागेत, हॉटेल मध्ये जायचे नाही. बाहेर जायचे असल्यास अगदीच गरजेचे आहे आणि तेव्हा ही एखाद्याच व्यक्तीने बाहेर जाणे. शक्यतो २० पेक्षा जास्त लोक एका खोलीत एकत्र येणार नाहीत याची काळजी घेणे. मोठे समारंभ, कार्यक्रम हे टाळावे व शक्यतो आयोजन केले असल्यास रद्द करावे. येत्या दोन आठवड्यात पाहुणे म्हणून कोणाकडे जाऊ नका आणि कोणी पाहुणे उगीचच येणार असतील तर त्यांना प्रेमाने नकार देत सध्या सोशल डीस्टन्सिंगचे महत्व समजावून सांगा.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

बाहेर जाण्याची गरज पडल्यास इतरांपासून १ मीटर पेक्षा जास्त अंतर राखा. घरात वावरताना ही शक्यतो एकमेकांपासून १ मीटर पेक्षा जास्त अंतर ठेवा. हात मिळवण्याऐवजी नमस्कार करावा. लिफ्ट मध्ये किंवा इतरत्र एकमेकांकडे तोंड करून उभे राहण्यापेक्षा एकमेकांकडे पाठ करून उभे राहावे. या काळात आपण काय करू शकता तर सकाळी मोकळ्या हवेत चालण्याचा व्यायाम करण्यासाठी जाऊ शकता. किंवा घराच्या छतावर फिरायला जाऊ शकता.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता


COVID -19 प्रतिकारशक्ती कशी वाढवावी

COVID-19 प्रतिकारशक्ती कशी वाढवावी

COVID -19 प्रतिकारशक्ती कशी वाढवावी? कारण कोरोना व्हायरस शी लढताना आपले सगळ्यात मोठे हत्यार असणार आहे आपली प्रतिकारशक्ती. त्यातच ६० वर्षावरील ज्येष्ठ आणि मधुमेह असणाऱ्यांनी प्रतिकारशक्ती वाढवण्याची विशेष काळजी घ्यायला हवी. COVID -19 प्रतिकारशक्ती कशी वाढवावी? यासाठी काही टिप्स

१. आपली झोप ही प्रतिकारशक्ती साठी महत्वाची असते. म्हणून रोज ७ ते ८ तास शांत झोप खूप महत्वाची आहे.
२. आहारामध्ये विटामिन सी युक्त सिट्रस फळे म्हणजे लिंबू , मोसंबी, संत्रे, आवळा, टमाटे यांचा समावेश करा.
३. प्रथिने युक्त आहार प्रतिकारशक्ती साठी गरजेचा असतो. त्यामुळे नाष्ट्या मध्ये मोड आलेले कडधान्य, जेवणात डाळी, सोयाबीन, नाचणीची भाकरी याचा समावेश करावा.
४. सूर्यप्रकाशातून मिळणारे ‘ड’ जीवनसत्व प्रतिकारशक्ती वाढवते. घरात राहयचे असले तरी सकाळी घराच्या छतावर थोडा वेळ ध्यान केल्यास ‘ड’ जीवन सत्व मिळेल व ताणतणाव कमी होईल .

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

५. रोजच्या आहारात एखाद फळ आणि भाज्या असायला हव्या.
६. आपल्या आतड्यातील बॅक्टेरिया खूप महत्वाचे असतात. यासाठी आहारात दही, ताकाचा समावेश करा. पण दही, ताक रात्रीच्या जेवणात नको.
७. चहा मध्ये अद्रक आणि जेवणात अधून मधून लसुनाचा वापर करा.
८. जास्त ताण घेतल्याने प्रतिकारशक्ती वर त्याचा दुष्परिणाम होतो. त्यामुळे भीतीच्या छायेत राहू नका.
९. व्यायाम, योग, प्राणायाम किंवा चालण्याचा व्यायाम रोज अर्धा तास तरी करा.
१०. शरीरातील पाण्याची पातळी प्रतिकारशक्तीसाठी महत्वाची आहे त्यामुळे रोज तहान लागल्यावर आणि किमान ६ ते ८ ग्लास पाणी प्यायला हव.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

मुलांना कोरोना झाला तर काय?

मुलांना कोरोना झाला तर

सध्या कोरोनाची जागतिक साथ सुरु असताना सर्व पालकांच्या मनात आपल्या मुलांना कोरोना झाला तर काय? तो मुलांमध्ये टाळायचा कसा? आणि मुलांना कोरोना झाला तर काय हे प्रश्न मनात येणे साहजिक आहे. कोरोनाच्या बाबतीत एक दिलासादायक गोष्ट अशी आहे की लहान मुलांना याचा धोखा कमी आहे. लहान मुलांना कोरोनाग्रस्त रुग्णाशी संपर्क आल्यास संसर्ग होऊ शकतो. पण लहान मुलांमध्ये याची लक्षणे ही सौम्य स्वरुपाची आहेत.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

ताप, कोरडा खोकला, काही प्रमाणात सर्दी एवढीच फ्लू सारखी लक्षणे कोरोना व्हायरस COVID-19 मध्येही लहान मुलांमध्ये दिसू शकतात. याची तीव्रता मोठ्या व्यक्तीं एवढी नाही. अगदी तुरळक स्वरूपाचा श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. तसेच सर्व वयोगटा मध्ये लहान मुलांमध्ये हा मृत्युदर कमी म्हणजे ०.२ टक्के इतकाच आहे. तो ही कुपोषित, ह्र्दय रोग, जन्मजात फुफुसाचा आजार अशा लहान मुलांमध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. लहान मुलांमध्ये कोरोना व्हायरस टाळण्यासाठी काय करता येईल? जर घरात किव्हा आजूबाजूला कोरोना व्हायरस चा रुग्ण असेल तर मुलांना कोरोना व्हायरस च्या रूग्णापासून लांब ठेवावे. ३१ मार्च पर्यंत सर्व शाळा बंद असे पर्यंत शाळेत पाठवू नये. त्यानंतर शाळा सुरु झाल्यावर मुलाला खोकला व ताप असल्यास आठवडा भर शाळेत पाठवू नये. कोरोना टाळण्याचा सर्वोत्तम उपाय हा हात धुणे आहे. त्यासाठी साबण व पाण्याचा वापर करावा. लहान मुलांसाठी अल्कोहोल युक्त हँन्ड सॅनीटायझर वापरू नये. मुलांना हात धुण्याची योग्य पद्धत शिकवावी.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

कोरोना प्रतिबंध आणि शासन

कोरोना प्रतिबंध आणि शासन

कोरोना प्रतिबंध आणि शासन कोरोना संदर्भात स्वच्छतेच्या मुलभूत नियमांचा आता पुरेसा प्रचार झाला आहे. शासन आता जितक्या आक्रमकपणे आणि विचारपूर्वक साथ नियंत्रणाचे, प्रतिबंधाचे काम करील तेवढे नुकसान कमी होईल. ‘घाबरू नका’ असे सांगताना शासनाकडून ठोस कृती होणे गरजेचे आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.

देशभरातील व राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने आता पुढील काही काळ न घाबरता सतर्क मात्र राहावे लागणार आहे. कोरोना टाळण्यासाठी स्वच्छतेच्या मुलभूत नियमांचा आता पुरेसा प्रचार झाला आहे, पण या उपायांच्या प्रचारापलीकडे आता शासनालाही महत्वाची भूमिका बजावावी लागणार आहे. आता पर्यंत परदेशातील ज्या देशांनी कोरोनाचा सामना केला त्यात सिंगापूर आणि दक्षिण कोरिया या दोन्ही देशातील कोरोनाच्या उपायांचे प्रारूप हे सध्या आदर्श व अभ्यासण्याजोगे आहे. खरेतर आपण ही तयारी चीन मधून इतर देशांत साथ पसरली तेव्हाच करायला हवी होती. कोरिया आणि सिंगापूर या देशांनी पहिला रूग्ण निश्चित होण्याअगोदरच प्रत्येक शहरात स्क्रीनिंग व निदान करण्यासाठी मुबलक प्रमाणात डायग्नोस्टीक किट्स उपलब्ध करून दिल्या. एवढेच नव्हे तर ट्रॅवल थ्रू म्हणजे गाड्या थांबतात तिथेही तुम्हाला तातडीने करोनाची चाचणी करण्याची सोय होती.

कोरोना प्रतिबंध आणि शासन- आपली सार्वजनिक आरोग्य व्यवस्था आधीच गाळात असताना एवढी मोठी अपेक्षा केली जाऊ शकत नाही. पण सध्या असलेली कोरोना तपासणी केंद्रे आणि आयसोलेशन वॉर्ड्स कमी पडण्याची दाट शक्यता आहे. सध्या मुंबई शहरासाठी कस्तुरबा रूग्णालयातील ५८ खाटा व इतर ३० खाटाही खूपच कमी आहेत. राज्यात ३९ ठिकाणी असलेले आयसोलेशन कक्ष ही अपुरे आहे व संख्या वाढवण्याची गरज आहे, कारण कोरोना बाधितांची संख्या अचानक वाढू शकते. आयसोलेशन वॉर्ड नेमका कसा असला पाहिजे याचा शास्त्रशुद्ध अभ्यासही गरजेचा आहे. अगदीच प्रत्येक वॉर्ड वातानुकुलीत असण्याच्या आदर्श व्यवस्थेची अपेक्षा आधीच मोडकळीला आलेल्या आणि अनेक आजारांचा ताण असलेल्या आरोग्य व्यवस्थेकडून करता येणार नाही. पण किमान दोन बेड मधील १ मीटरचे अंतर , दोन बेड मध्ये पार्टीशन नाही तर किमान स्क्रीनने त्यांचे विलगीकरण, प्रत्येक रुग्णाला तपासताना डॉक्टर व पॅरामेडिकल स्टाफसाठी वेगळे प्रतिबंधक साहित्य, रुग्णाचा केसपेपर वॉर्डच्या बाहेर ठेवणे या प्राथमिक मार्गदर्शक तत्वांचा अवलंब होणे आवश्यक आहे. तसेच या आयसोलेशन वॉर्ड मध्ये कार्यरत असणाऱ्यांचे या विषयी प्रशिक्षणही गरजेचे आहे. ज्यांचे निदान निश्चित झाले आहे त्यांच्यासाठी आयसोलेशन व ज्यांचा अशा रुग्णांशी संपर्क आलाय पण अजून काही त्रास नाही व निदानही निश्चित नाही अशांसाठी विलगीकरणाचाही (क्वारनटाइन) गांभीर्याने विचार करावा लागणार आहे. आयसोलेशन व क्वारानटाइन या दोन्हीसाठी एकच वॉर्डच नव्हे तर एकच रुग्णालय वापरणेही घातक ठरू शकते. ‘होम क्वारनटाइन’ म्हणजे संपर्क असलेल्यांनी घरीच थांबा हे सांगितले जात असले तरी यावर कोणाचेही नियंत्रण नाही. म्हणून साथ पसरण्याआधीच विलगीकरणासाठी वेगळी समांतर यंत्रणा निर्माण करता येते का याचा विचार होणे गरजेचे आहे. आयसोलेशन किती दिवसांसाठी आवश्यक आहे यावरही तज्ज्ञांचे मत घेऊन शासनाने निर्णय घ्यायला हवा. परदेशातील अभ्यासानुसार कोरोनाचे रुग्ण श्वासाद्वारे ३० दिवसांपर्यंत आणी सरासरी २० दिवसांपर्यंत विषाणू सोडत होते. सध्या आयसोलेशन १४ दिवसांचे आहे ते २० दिवसांचे तरी करायला हवे. हे सगळे आता साथीच्या सुरुवातीच्या पातळीवरच गरजेचे व शक्यही आहे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

कोरोना प्रतिबंध आणि शासन -किती रूग्ण सापडेस्तोवर नेमक्या कुठल्या उपाय योजनांना प्राधान्य व भर द्यायचा या विषयी शासन सध्या गोंधळून गेलेले दिसते आहे. दक्षिण कोरियाने ‘स्क्रीन, टेस्ट, ट्रीट आणि आयसोलेट’ या चार गोष्टींवर एक महिना पूर्ण भर दिला व देशातील आधीच सज्ज असलेल्या आरोग्य यंत्रणेने एका दिवसात २५,००० तपासण्या आणि किमान ६ व कमाल २४ तासात टेस्टचा रिपोर्ट हा नियम पाळला. आज महाराष्ट्रात केवळ तीन ठिकाणीच तपासणीची सोय आहे, उद्या ग्रामीण भागात ही साथ पसरली तर तेथील डॉक्टरांनी या रुग्णाला आयसोलेशनसाठी नेमके कुठे पाठवायचे याची निट माहिती कोणालाही नाही. तालुका पातळीवर जिथे उपजिल्हा रुग्णालय आहे तिथे आयसोलेशन वॉर्ड व किमान प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी रक्त तपासणी करून निदान निश्चित करण्याची सोय करण्याची हीच वेळ आहे. साथ पसरली तर सगळ्यात मोठी समस्या ही असेल की सर्दी , खोकला , ताप असलेल्या प्रत्येक रुग्णाला मला कोरोना झालाय का हे तपासून पाहण्याचा आग्रह होणार आहे. यासाठी सर्वसामान्यांनी ही गोष्ट समजून घ्यावी की सर्दी खोकला म्हणजे प्रत्येकवेळी कोरोना असेल असे नव्हे. कोरोना मध्ये सर्दी हे मुख्य लक्षण नसून कोरडा खोकला , ताप आणि श्वास घेण्यास त्रास ही मुख्य लक्षणे आहेत. ज्यांचा कोरोनाबाधित रुग्णाशी थेट संपर्क आला आहे आणि ज्यांनी कोरोनाची साथ असलेल्या देशात १ जानेवारी नंतर प्रवास केला आहे त्यांनाच चाचणीची गरज आहे. कोणाची चाचणी करायची हे ठरवण्यासाठी तालुकानिहाय लक्षणांचे स्क्रीनिंग केंद्र उभारणे गरजेचे ठरू शकते. सध्या कोरोना रुग्ण सापडलेल्या भागात आम्ही बळजबरीने लोकांना आयसोलेट किमवा क्वारनटाइन करू असे विधान आरोग्य मंत्री किंवा अन्य कुठल्याही मंत्र्यांनी करणे लोकांमध्ये अजून घबराट पसरवणारे ठरेल. चीनमध्ये अशा बळजबरीमुळे भयभीत होऊन लोक पुढे आले नाहीत व त्याचा साथीचे नियंत्रण करण्यावर अनिष्ट परिणाम झाला. त्यापेक्षा, ‘त्रास होत असल्यास व कोरोनाग्रस्तांशी संपर्क आला असल्यास तुम्ही बिनदिक्कत पुढे या, आम्ही तुमची काळजी घेऊ’ हे वारंवार सौम्यपणे शासनाने सांगावे. नागरिकांनीही आयसोलेशनला मुळीच घाबरू नये, कारण शासन हे आपल्या व इतरांच्या भल्यासाठीच करते आहे. या आजारावर उपचार नाही अशी सरसकट विधाने केली जात आहेत. हा आजार व्हायरल असल्याने तो इतर व्हायरल आजारांसारखा आपोआप वेळेत बरा होणारा आहे. ज्या केसेस गंभीर होतील त्यांच्या उपचारांसाठीची मार्गदर्शक तत्वे आहेत व त्यासाठी काही औषधे यशस्वीरित्या वापरली गेली आहेत. औषध नाही असा टाहो फोडण्यापेक्षा, बाधा झालेल्यांच्या रक्ताचे नमुने घेऊन, इनविट्रो क्लिनिकल ट्रायल ( रुग्णांवर नव्हे! ) का सुरु करत नाहीत? सध्या मास्कचाही मोठ्या प्रमाणात वापर होतो आहे, परंतु अशा स्थितीत मास्क हा धो धो पावसातील छोट्या छत्रीसारखा कुचकामी आहे. मास्क हा निरोगी व्यक्तीला इतरांनाकडून संसर्ग होऊ नये या साठी नसून आजारी व्यक्तीकडून तो इतरांना होऊ नये यासाठी असतो. मास्कची जागा खरे तर ‘हात धुण्याने’ घ्यायला हवी. त्यासाठी सार्वजनिक ठिकाणी पाणी व लिक्विड साबण उपलब्ध करणे व लोकांना हात धुण्याची पद्धत शिकवण्याची गरज आहे.

या साथीची निष्पत्ती नेमकी काय असेल हा प्रश्न सर्वांनाच सतावत आहे. सुरुवातीच्या काळात बऱ्याच लोकांना संसर्ग होऊन आणि कदाचित थोडी हानी होऊन कोरोना विरोधात हळूहळू सामुहिक प्रतिकारशक्ती विकसित होईल. शासन जितक्या आक्रमकपणे आणि विचारपूर्वक साथ नियंत्रणाचे, प्रतिबंधाचे काम करील तेवढे नुकसान कमी होईल. त्यामुळे, ‘घाबरू नका’ असे सांगताना सोबत शासनाकडून ठोस कृती होणेही गरजेचे आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.

सदरील माहिती आपण महाराष्ट्र टाइम्स मध्येही वाचू शकता.


सर्दी-खोकला-ताप म्हणजे कोरोना नाही

सर्दी खोकला ताप म्हणजे कोरोना नाही

सर्दी-खोकला-ताप म्हणजे कोरोना नाही

सर्दी खोकला किंवा इतर कुठल्याही कारणाने ताप आला तर कोरोनामुळे आहे का अशी भीती आपल्याला प्रत्येकाला वाटणे सहाजिक आहे. पण कोरोनाची मुख्य लक्षणे समजून घेतल्यास लक्षात येईल की साधा सर्दी-खोकला म्हणजे कोरोना नाही.

प्रत्येक सर्दी-खोकला-ताप म्हणजे कोरोना नाही

कोरोना व्हायरस (COVID-19) ची मुख्य लक्षणे –

कोरडा खोकला, तीव्र स्वरुपाचा ताप त्यानंतर दोन किंवा तीन दिवसांनी श्वास घेण्यास त्रास . यासोबत 1 जानेवारी नंतर कोरोनाग्रस्त देशांमध्ये प्रवास किंवा सध्या भारतातील कोरोनाचे निदान निश्चित झालेल्या रुग्णांची संबंध हा रिस्क फॅक्टर महत्त्वाचा आहे. ताप आणि खोकला  इतर कारणांनी असू शकतो. पण कोरोनाग्रस्तांशी संबंध आल्यास व ही लक्षणे असल्यास मात्र आपण सरकारी यंत्रणेशी तपासणी साठी संपर्क साधायला हवा. अंगदुखी ही कोरोनामध्ये कमी प्रमाणात सर्दी खोकला, फ्लू मध्ये जास्त प्रमाणात असतात तसेच शिंका येणे, नाक गळणे, जुलाब हे कोरोनामध्ये नसते पण  सर्दी खोकला व फ्लू मध्ये असते.

सर्दी-खोकला-ताप म्हणजे कोरोना नाही
कोरोना व इतर आजारांमधील फरक

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

कोरोना व्हायरसची सविस्तर लक्षणे – कोरोनाची तीव्र ताप, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास हा आपल्याला माहित आहे. पण हा त्रास तीव्र किंवा गंभीर कोरोनाच्या रुग्णालाच होतो. ८५ टक्के लोकांना कोरोना संसर्ग झाला तरी एक तर साधा ताप आणि थोडा खोकला असा सौम्य स्वरुपाची लक्षण दिसतील. त्यातही काहींना असे ही होऊ शकते की काहीच लक्षणे आली नाहीत. म्हणून साधा खोकला, ताप, सर्दी असली तरी आपल्याला इतरांपासून लांब रहायचे आहे हे समजून घ्यावे.

COVID -19 प्रतिकारशक्ती कशी वाढवावी? कारण कोरोना व्हायरस शी लढताना आपले सगळ्यात मोठे हत्यार असणार आहे आपली प्रतिकारशक्ती. त्यातच ६० वर्षावरील ज्येष्ठ आणि मधुमेह असणाऱ्यांनी प्रतिकारशक्ती वाढवण्याची विशेष काळजी घ्यायला हवी. COVID -19 प्रतिकारशक्ती कशी वाढवावी? यासाठी काही टिप्स.

कोरोना प्रतिबंध आणि शासन कोरोना संदर्भात स्वच्छतेच्या मुलभूत नियमांचा आता पुरेसा प्रचार झाला आहे. शासन आता जितक्या आक्रमकपणे आणि विचारपूर्वक साथ नियंत्रणाचे, प्रतिबंधाचे काम करील तेवढे नुकसान कमी होईल. ‘घाबरू नका’ असे सांगताना शासनाकडून ठोस कृती होणे गरजेचे आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.

https://www.youtube.com/playlist?list=PL9bO6h-fFoNgMdrfWBGtXtP0uLD3KC5yl
Dr. Amol Annadate’s Videos on Prevention and Cure of CORONAVIRUS Disease COVID-19

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.

कोरोना व्हायरसमुळे मृत्यूची भीती किती?

कोरोना व्हायरसमुळे मृत्यू

कोरोना व्हायरसमुळे मृत्यूची भीती किती?

आज प्रत्येक जण एकाच प्रश्नाने धास्तावला आहे की मला कोरोना व्हायरस चा आजार COVID-19 झाला तर माझा मृत्यू होईल का? कोणीही कोरोना मुळे मृत्यूला मुळीच घाबरू नये. चीनमध्ये साथ सुरू झाल्यावर पहिल्या दोन महिन्यांमध्ये मृत्यूदर तीन टक्के होता.

सध्या भारतात दोन रुग्णांचा मृत्यू झाला असला तरी कोरोनाची साथ सुरू होऊन जागतिक साथ बोल जुने झाले आहेत. या तीन महिन्यांमध्ये हा व्हायरस काही प्रमाणात संक्रमित झाला आहे. म्हणून भारतातही मृत्यूदर तीन टक्के असेल असे नाही. उन्हाळा सुरू होत असल्यामुळे कोरोनासाठी तो पोषक नसल्याने कोरोना व्हायरसची तीव्रता कमी असू शकते व मृत्युदर ही कमी असू शकतो.

दक्षिण कोरिया सारख्या देशांमध्ये सुद्धा ०.७ टक्के इतकाच होता. लहान मुलांमध्ये कोरोनामुळे मृत्यू दर अत्यंत कमी आहे तर 10 ते 40 वर्षांपर्यंत फक्त ०.२ टक्के इतकाच आहे. एवढा मृत्यूदर तर आपल्या भोवती असणाऱ्या अनेक आजारांचा आहे. त्यामुळे घाबरण्याची मुळीच गरज नाही. मृत्यूचा जास्त धोका हा साठ वर्षाच्या पुढील वृद्धांना मृत्युची भीती नाही व ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे. त्यांनीही आपली प्रतिकारशक्ती चांगली ठेवण्यासाठी योग्य काळजी घेतल्यास मृत्युची भीती नाही.

डायबिटीस व हृदयरोग असणाऱ्यांना मृत्युची थोडीफार भीती आहे पण डायबेटिस रुग्णांनी साखर नियंत्रण ठेवल्यास व हृदयरोगाच्या रुग्णांनी त्यांच्या औषधांनी घेऊन नियमित तपासणी केली असता त्यांनीही घाबरण्याची गरज नाही. कोरोना व्हायरसमुळे मृत्यूची भीती फार कमी आहे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

कोरोनाच्या साथीचे पुढे काय? What Next?

कोरोनाच्या साथीचे पुढे काय ?

कोरोनाच्या साथीचे पुढे काय ? नवी साथ येते तेव्हा समाजामध्ये त्या नवीन विषाणू विरोधात प्रतिकारशक्ती अजून तयार झालेली नसते. त्यामुळे नव्या साथीमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये जास्त लोकांना संसर्ग होण्याची शक्यता असते.

तसेच तीन महिन्यांमध्ये काही प्रमाणामध्ये ही साथ जीवघेणी ठरू शकते. पण तरीही याचा मृत्युदर हा सध्या इतर देशांमध्ये तीन टक्केपेक्षा जास्त नाही. एक ते दोन महिन्यांमध्ये या व्हायरसच्या विरोधात समाजामध्ये एक सामुहिक प्रतिकारशक्ती निर्माण होऊ लागते. याला वैद्यकीय भाषेत ‘हर्ड इम्युनिटी’ असे म्हणतात. तसेच कुठलाही व्हायरस जसा आहे त्या रूपात फार काळ राहत नाही. व्हायरस हा बहुरुप्या सारखा असतो. त्याचे रूप तो सतत बदलत असतो. याला वैद्यकीय भाषेत अँटीजनीक ड्रीफ्ट आणि शिफ्ट असे म्हटले जाते. तो संक्रमित झाला की त्याची संसर्ग करण्याची क्षमता व त्याच्यामुळे मृत्यू होण्याची तीव्रता कमी होते म्हणून तीन महिने हा व्हायरस संक्रमित होई पर्यंत हा टाळण्यासाठीचे नियम पाळणे गरजेचे आहे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

कोरोनाच्या साथीचे पुढे काय ? एका ठिकाणी जास्त लोकांनी गर्दी न करणे, सार्वजनिक कार्यक्रम टाळणे, काम नसताना प्रवास न करणे मौजमजेसाठी किंवा कार्यक्रम किंवा राजकीय कार्यक्रम टाळणे हे व्हायरस मध्ये बदल होईपर्यंत पुढे एक ते दोन महिन्यात गरजेचे आहेत.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.

कोरोना व्हायरस चे पँण्डेमिक म्हणजे नेमके काय?

कोरोना व्हायरस चे पँण्डेमिक

कोरोना व्हायरस चे पँण्डेमिक म्हणजे नेमके काय?

कोरोना हा व्हायरस असून ज्याप्रमाणे सर्दी खोकला हा त्रास व्हायरसमुळे होतो तसाच कोरोना मुळे ताप, श्वास घेण्यास त्रास होणे असा श्वसन यंत्रणेचा त्रास होतो. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाचे पँन्डेमीक जाहीर केले आहे. पँण्डेमिक म्हणजे नेमके काय तर जो आजार आंतरराष्ट्रीय सीमा पार करून इतर अनेक देशात कमी वेळात पसरतो त्याला पँण्डेमिक असे म्हटले जाते.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

कुठल्याही आजाराचे पँण्डेमिक जाहीर करण्यासाठी तीन मुख्य गोष्टी जबाबदार असतात. जो विषाणू नवा असतो, एकापेक्षा जास्त देशात कमी वेळात पसरतो , आणि एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला याचा संसर्ग होतो तेव्हा पँण्डेमिक जाहीर केले जाते. कोरोना व्हायरस चे पँण्डेमिक जाहीर झाले याचा अर्थ एवढाच की हा आता जगभरात सर्व देशांमध्ये पसरण्याची दाट शक्यता आहे. पँन्डेमीक म्हणजे या आजारामुळे खूप जास्त मृत्यू होणार आहेत असे नाही. पण मात्र प्रतिबंध न केल्यास थोड्या कालावधीमध्ये लोकांना या आजाराचा संसर्ग होण्याची शक्यता आहे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.

जागतिक आरोग्य संघटनेने एखाद्या आजाराचे पँण्डेमिक जाहीर करण्याचा हेतू हा इतर देशांना सतर्क करणे व ही साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येक देशांमध्ये शासन व सर्वसामान्य लोकांच्या पातळीवर सतर्कता वाढवणे हा असतो

एमबीबीएसचा अभ्यासक्रम : मुदत योग्य की अयोग्य?

एमबीबीएसचा अभ्यासक्रम

एमबीबीएसचा अभ्यासक्रम प्रवेशापासून दहा वर्षात पूर्ण करण्याचा नवा नियम येत्या वर्षापासून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने लागू केला आहे आहे. हा अभ्यासक्रम मुळात साडेचार वर्षांचा असतो पण क्वचीतच प्रत्येक बॅचला नापास होत अभ्यासक्रम पूर्ण करणारे काही विद्यार्थी असतात. त्यातही  एमबीबीएसचा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांसाठी १० वर्षे लागणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूपच कमी आहे. ही विद्यार्थी संख्या कमी असली तरी या निर्णयाचा विद्यापीठ व अभ्यासक्रम पूर्ण करण्यास वेळ घेणारे विद्यार्थी असा दोन्ही बाजूंनी विचार होणे गरजेचे आहे.

वैद्यकीय क्षेत्रात अशी उदाहरणे आहेत जिथे विद्यार्थ्याला त्याच्या बौद्धिक पातळीमुळे नव्हे तर इतर कौटुंबिक, मानसिक, सामाजिक समस्यांमुळे अभ्यासक्रम पूर्ण करता आला नाही. अशा मुलांसाठी क्रोनिक हा शब्द वैद्यकीय महाविद्यालयात वापरला जातो. खरेतर आधी पेक्षा सध्याच्या वैद्यकीय अभ्यासक्रमाची कठीण्य पातळी ही खूप कमी आहे. म्हणून नापास होण्यासाठी बऱ्याचदा तुम्हाला नापासच व्हायचे आहे हे तुम्हाला ठरवावेच लागते. पण तरीही विद्यार्थी अनेक वर्षे नापास होत असेल तर नक्कीच त्या मागे बौद्धिक पातळी किव्हा अभ्यासक्रम न कळण्यापलीकडे काही सामाजिक, आर्थिक, मानसिक कारणे असू शकतात. वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश मिळाला म्हणजे त्या विद्यार्थ्याचा स्तर बरा असतो. त्यातच अभिमत विद्यापीठांपेक्षा आरोग्य विद्यापीठाशी संलग्न शासकीय व खाजगी विद्यापीठात परीक्षा अधिक पारदर्शक असते. म्हणून या कॉलेजेस मध्ये विद्यार्थी रखडण्याचे प्रमाण जास्त असते. वैद्यकीय महाविद्यालयातील प्रत्येक क्रोनिक रखडलेल्या विद्यार्थ्याची अशी एक स्वतःची कहाणी असते. काही विद्यार्थी मानसिक समस्येमुळे व्यसनाधीन झालेले असतात. काहींना मानसिक समस्या असल्या तरी त्या ओळखल्या जाऊन त्यावर उपचारच होत नाहीत. हे सगळे मोठ मोठे मानसोपचार विभाग मिरवत असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयांच्या नाका खाली घडत असते हे विशेष. एमबीबीएस परीक्षा आधी पेक्षा झाली सोपी असली तरी वैद्यकीय अभ्यासक्रम अवाढव्य असतो. त्याचा पहिल्या वर्षी तरी प्रचंड ताण असतो. आपल्याकडे दर वर्षी प्रवेशावर होणाऱ्या केसेस आणि प्रवेशाच्या लांबत जाणाऱ्या प्रक्रीये  मुळे मुळात १ ऑगस्टला सुरु होणारे वर्ग सुरु होण्यास ऑक्टोबर उजाडते. त्यातच आधी ९ महिन्याचा असलेला पहिल्या वर्षाचा अभ्यासक्रम आता १४ महिन्याचा करण्यात आला आहे म्हणून दिलासा आहे. पण तरी या बदलेल्या वातावरणाशी जुळवून न घेऊ शकणारे पहिल्या वर्षी नापास झाले की प्रवाहाबाहेर फेकले जातात. वैद्यकीय महाविद्यालयात ही टाॅपर्स , डिस्टिनक्षण , नापास आणी क्रोनिक असा एक बौद्धिक वर्णभेद असतो. म्हणून वारंवार नापास होणार्यांना कालमर्यादेच्या नियमाचा बडगा उगारायचा कि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करायचा हे ठरवावे लागेल.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

अनेक वर्ष रखडलेल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत यंत्रणेची ही मोठी ससेहोलपट होत असते. नुकतेच बदललेल्या  अभ्यासक्रमामुळे जुन्या व नव्या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी अशी अध्यापनासाठी व परीक्षेसाठी वेगळी यंत्रणा राबवावी लागते. अनेक वर्षे नापास झालेल्यांची विद्यार्थी संख्या कमी असली तरी त्यांच्या साठी वेगळा पेपर काढणे  आणी घेणे अशा प्रकारे यंत्रणा व्यस्त होते. शासनाचा प्रत्येक विद्यार्थ्याच्या शिक्षणावर ५.५ लाख रुपये खर्च होत असतो. असे असताना विद्यार्थ्यांची किमान काही काळात डिग्री पूर्ण करण्याची बांधिलकी असावी असा विचार विद्यापीठाच्या दृष्टीने असू शकतो.

हा नियम राबवताना अशा वारंवार नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अकॅडॅमीक व सामाजिक पुनर्वसनासाठी काही यंत्रणा नाही. हे विद्यार्थी का नापास होत आहेत याची कारणे शोधण्यासाठी एखादा संशोधात्मक अभ्यास आपण अजून केला आहे का? अनेक वर्षे घेऊन अभ्यासक्रम पूर्ण करणारे विद्यार्थी नंतर उत्तम प्रॅक्टीस करतात. तसेच असे काही विद्यार्थी प्रसिद्ध व निष्णात डॉक्टर म्हणून ही नावारूपाला आल्याची उदाहरणे आहेत. ही संधी या विद्यार्थ्यां कडून आपण हिरावून घ्यायची का या प्रश्नाचे उत्तर शोधणे गरजेचे आहे. एकदा बीजे वैद्यकीय महाविद्यालयाचे काही विद्यार्थी पुण्यातील एका हॉटेल ला जेवायला गेले. तिथला वेटर हा वारंवार त्या विद्यार्थ्यांच्या गप्पा जवळ येऊन ऐकण्याचा प्रयत्न करत होता. हे विद्यार्थ्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्याला जवळ बोलावून याचे कारण विचारले. त्यावर त्याने सांगितले कि अनेक वर्षांपूर्वी तो बीजेचाच एमबीबीएसचा विद्यार्थी होता. पण एमबीबीएसचा अभ्यासक्रम पूर्ण करू शकला नाही. पुढच्या दिवशी सर्व विद्यार्थी त्याला होस्टेल वर घेऊन गेले. सगळ्यांनी त्याला मदत करत पहिल्या वर्षाच्या परीक्षेला बसवले आणी त्याने पुढे अभ्यासक्रम पूर्ण केला . हा विद्यार्थी आज महाराष्ट्रातच शासकीय सेवेत मेडिकल ऑफिसर म्हणून चांगली सेवा देतो आहे आणि चांगले आयुष्य जगतो आहे. कालमर्यादे मुळे वेळ हुकलेले पण पुन्हा संधी मिळाल्यास त्यातून बाहेर येणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ शकतो. आपले कायदे मंडळ ही एका ही निर्दोषा ला शिक्षा होऊ नये म्हणून हजारो गुन्हेगारांना सोडण्याची जोखीम घेते . मग बुद्धिवंतांसाठीच्या अभ्यासक्रमात कुठल्या तरी कारणाने कमी पडलेल्या एकाला आपण वेळेचे कारण दाखवत संधी नाकारायची का ?

एमबीबीएसचा अभ्यासक्रम

 या प्रश्नावर बीजे चे माझी प्राध्यापक डॉ.पद्माकर पंडित व डॉ. दाक्षायणी पंडित यांनी रखडलेले विद्यार्थी हे एक मिशन समजून अनेक वर्षे काम केले. अशा विद्यार्थ्यांना शोधून त्यांचे समुपदेशन , त्यांचा अभ्यास वर्ग घेणे, अगदी स्वतःच्या घरी त्यांची राहण्याची , जेवण्याची सोय , त्यांना आर्थिक मदती पर्यंत प्रयत्न करून या जोडप्याने असे अनेक व्यवस्थेच्या कडीतून निसटणार्यांचे पुनर्वसन केले. विशेष म्हणजे डॉ. पंडित दाम्पत्याने घडवलेले हे अनेक क्रोनिक आज समाजात उत्तम वैद्यकीय सेवा देत आहेत. यातील काहींनी तर ५ – १० वर्षे प्रवेशाला उलटून गेल्यावर ही परत येऊन एमबीबीएस अभ्यासक्रम पूर्ण केला. अशा या विद्यार्थ्यांचा भार वाहताना व्यवस्थेचची  ससेहोलपट आणि या विद्यार्थ्यांचे पुनर्वसन यातून काही मधला मार्ग काढता येतो का हे पाहायला हवे.

Hand Foot Mouth Disease in Maharashtra

Hand Foot Mouth Disease

Hand foot mouth disease epidemic in Maharashtra – Unnoticed and Overlooked.

It’s a great irony that the disease, causing havoc in rural Maharashtra is largely unnoticed by the health authorities. Also, the disease running as an epidemic in children Marathwada, Vidarbha should be largely reported by media for the prevention of this disease. Hand Foot Mouth Disease, not a routine illness, in pediatrician’s OPD started coming up since the last 2 years has peaked last 6months with a gradually increasing number of cases every day. The disease is a viral self-limiting infection caused by coxsackie and enterovirus. Usually, the disease has a high incidence in winter but epidemiology seems to be changing and now we pediatricians have seen it all year round.

Hand Foot Mouth Disease
Symptoms

Symptoms of Hand Foot Mouth Disease

  • Starts with fever and sore throat
  • Painful blisters/ulcers appear in the throat, on palms and sole
  • Ulcers in mouth and throat become painful and difficulty in swallowing hence food intake decreases causing debility
  • Itching of the lesions
  • Irritability
  • Loss of appetite

The spread of Hand Foot Mouth Disease

Spread to healthy kids through touch and skin to skin contact as saliva contains the virus.

Age

Usually affects children less than 5 years

Investigations

Usually, no investigations required as the disease can be diagnosed clinically. With the information given even parents can diagnose it although expert consultation is mandatory.

Treatment of the Disease

Treatment is usually symptomatic with medicines for fever (antipyretic – paracetamol ), pain ( analgesic – ibuprofen ), a lot of fluids, multivitamin syrup, soft diet. Occasionally local antibiotic cream for blisters. Intravenous antibiotics are required only when lesions get a secondary bacterial infection.

What can the parents do to prevent their child from getting hand foot mouth disease?

  • Wash your own and child’s hands very often especially when he is returning home from outdoors and school
  • Maintaining good nutrition

Read more Amol Annadate articles

What can the parents of infected children do?

  • Consult a pediatrician as soon as they notice ulcers and fever
  • Not send the child to school during and after the illness till the rash/blisters fade off or minimum seven days after onset of rash
  • Give soft diet and lot of fluids
  • Wash hands after handling the child
  • Limit contact with siblings and other children
  • The virus remains on the surface for 8 to 10 days hence cleaning of home and surfaces with water and antiseptic is required. Also, schools may consider such cleaning of classrooms and benches when many cases appear from the same class.

What’s different in this Epidemic?

Every epidemic of disease comes with a difference in the usual symptoms of the disease. Hand foot mouth disease in this epidemic is unusually coming with blisters on buttocks and also presenting between 5 to 10 years. Even with this basic information being valuable to alleviate the fear of hand foot mouth disease among parents and for prevention of the disease, the Public health authorities have largely turned a deaf ear to the disease and Health education about it.