अव्वल असल्याचा आनंद?

The joy of being at the top

-डॉ. अमोल अन्नदाते

संयुक्त राष्ट्रसंघाच्या अंदाजानुसार २०२३ मध्ये भारत चीनला मागे टाकत सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनणार आहे. आज जगाचा भार वाढवणारे पहिले दहा देश अजूनही विकसनशील आहेत. मानवी जगण्याशी निगडीत समस्यांना जन्म देणाऱ्या ४६ राष्ट्रांपैकी भारत हा एक आहे. लोकसंख्या स्थिर ठेवण्यासाठी आवश्यक असणारा आदर्श प्रजनन दर २.२ मानला जातो. काही प्रमाणात बालमृत्यू गृहीत धरल्यास एका जोडप्याने सरासरी दोन अपत्यांना जन्म देऊन आपली उणीव भरून काढणारा हा २.२ चा आकडा. गेल्या राष्ट्रीय कुटुंब सर्वेक्षणात अनेक दशकांनी हा प्रजनन दर (एक स्त्री किती मुलांना जन्म देते) हा प्रथमच घसरला व तो दोन झाला. यावरून आता आपली लोकसंख्या घसरते आहे व लोकसंख्या ही चिंतेची समस्या राहिलेली नाही असा निष्कर्ष काही जण काढत आहेत. पण या सांख्यिकी जाळ्यात न अडकता लोकसंख्येचे वास्तव समजून घेतल्यास घसरलेला प्रजनन दर केवळ एक आकडा असून समस्या संपल्याचा दाखला नाही, हे लक्षात येईल. भारताची लोकसंख्या स्थिरावणार असली तरी ती खाली जाण्यास २०६४ मध्ये आरंभ होईल व मागील काही दशकात वाढलेली लोकसंख्या कमी जागेत कमी स्तराचे आयुष्य जगेल. अपुऱ्या सोयी व संधीत कोंडलेल्या अतृप्त समूहांना ‘डेमोग्रॅफिक एनट्रॅपमेंट’ म्हणतात. तसेच प्रजनन दर कमी झाला, याचा अर्थ एका टोकाला उच्च शिक्षित व सधन वर्ग एकच मूल जन्माला घालणार व डिंक्स (डबल इन्कम, नो किड्स) जोडपी वाढणार तर दुसरीकडे तीनपेक्षा जास्त मुले जन्माला घालणाऱ्या महिलाही असणार. म्हणून वास्तवात फक्त सरासरी दोनच्या आकड्याने धोरणसुस्तता येईल व लोकसंख्या नियंत्रणाची खरी गरज असलेले दुर्लक्षित राहून गरिबांना अधिक लेकरे होऊन ती अधिक गरीब होत जातील. सामाजिक असमतोल अजून वाढत जाईल. यातून हिंसाचार, गुन्हेगारी वाढून त्याचा फटका समाजातील उच्चभ्रूंनाही बसेल. म्हणून लोकसंख्येची समस्या संपली या भ्रमात कोणी राहू नये.

भारताने १९५० साली लोकसंख्या नियंत्रण कार्यक्रम सुरू केला. तो तेव्हापासून साचेबद्धपणे सुरू आहे. आता त्याचा झोत व दिशा बदलण्याची गरज आहे. कुठल्याही प्रकारे गृहीत धरले तरी भारतातील दर चौथी व्यक्ती आज गरिबीच्या व्याख्येत मोडते. नेमक्या या व्यक्तीला गर्भ निरोधक साधनांची सगळ्यात जास्त गरज आहे. त्यांनाच पुरेशी माहिती तसेच सुरक्षित गर्भपाताची सुविधा उपलब्ध नाही. म्हणून सरसकट सर्वांना एकच उपाय करून व प्रबोधन करून लोकसंख्या व त्यातून निर्माण होणारा असमतोल संपणार नाही. आजवर प्रत्येक राज्याचे कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेचे आकडे घेऊन सचिवांच्या बैठका होतात. उद्दिष्टे दिली जातात. आता मात्र जिल्हावार, तालुकावार विशिष्ट वंचित घटकांचे समूह ठरवून त्यांच्यावर लोकसंख्या नियंत्रण व गर्भ निरोधक साधनांचे केंद्रीकरण आवश्यक आहे. ‘नाही रे’ वर्गाला चीनप्रमाणे एक किंवा दोनच मुले हवीत, असे राष्ट्रीय धोरण ठरवणे निरर्थक आहे. आजही देशात बालमृत्यूदर इतका जास्त आहे की मुले वाचण्याची शाश्वती नसताना चांगल्या आरोग्य सुविधा पुरवल्याशिवाय कुठल्या तोंडाने व नैतिक अधिकाराने कमी मुलांचे फायदे सांगणार? शिक्षण व आरोग्य सुविधा हेच सर्वांत मोठे गर्भ निरोधक साधन आहे. मुळात लोकसंख्या नियंत्रण शिक्षण, रोजगार, पोषण, गृहसुविधा, आरोग्य सेवा या पाचही विकासाच्या स्तंभांना स्पर्श करते. नेमक्या या सर्व गोष्टींना निवडणुकीत मोल नसल्याने लोकसंख्येवर थेट परिणाम करणाऱ्या या गोष्टींचे राजकीय पक्ष, नेते व धोरणकर्त्यांना वावडे आहे. उलट लोकसंख्येचा प्रश्न सोयीने धर्माशी जोडून राजकीय पक्ष प्रचार करत राहतात. ज्या राज्यांचे दरडोई उत्पन्न, शिक्षण, आरोग्य सेवा चांगले, तिथे हिंदू व मुस्लिम या दोहोंचा प्रजनन दर कमी झाला आहे तसेच कमी विकास झालेल्या राज्यांमध्ये तो दोन्ही धर्मात सारखा व जास्त आहे. धर्म व लोकसंख्येची चुकीची सांगड घातल्याने जास्तीत जास्त मुले जन्माला घालण्याची आवाहने दोन्ही बाजूंनी आजही केली जातात, हे दुर्दैवी आहे.

पहिल्या बाळाच्या आधी तसेच एक मूल झाल्यावर व दोन मुले झाल्यावर गर्भ निरोधासाठी आदर्श मार्ग काय, याची परीक्षा घेतली तर त्यात देशातील एक टक्काही नागरिक उत्तीर्ण होणार नाहीत. आणि म्हणून भारताची समस्या ही जास्त मुले जन्माला येणे, एवढीच मर्यादित नाही. सध्याच नको असलेले मूल, अपेक्षेपेक्षा लवकर जन्माला येणे हीदेखील आहे. भारतात जन्माला येणारे दर तिसरे मूल आणि दिवसाकाठी तीस हजार मुले अशी असतात, जी पालकांना हवी होती पण त्या वेळेला ती नको होती. याचाच अर्थ ही मुले जोडप्याची किंवा त्या जोडप्यातील एकाची इच्छा नसताना जन्म घेत असतात. आता हे टाळण्यासाठी काय करावे, हे ज्ञान, त्याकडे बघण्याची निकोप दृष्टी आणि त्याची चर्चा करण्याचा खुलेपणा आपण आजवर समाजात आणू शकलेलो नाही. म्हणूनच इयत्ता आठवी व नववी दरम्यान गर्भ निरोधक साधनांचा छोटा विषय व त्यावरची परीक्षा देशभरातील शाळांमध्ये असणे अत्यंत आवश्यक आहे. कारण वर्षानुवर्षे देशाचे गर्भनिरोधक साधनांचे ज्ञान कंडोमच्या पुढे कधी गेलेच नाही. प्रत्येक जोडप्याने पहिले मूल होऊ देणे, हा त्याचा अधिकार आहे; पण पाळणा लांबवणे हे त्या जोडप्याचे कर्तव्य आहे. भारतात मुलांच्या संख्येएवढीच समस्या दोन मुलांमध्ये पुरेसे अंतर नसणे, हीदेखील आहे. खरे तर, ही समस्या तीव्र म्हणावी अशी आहे. म्हणून येते वर्ष ‘नो सेकंड बेबी इयर’ म्हणजे दुसरे बाळ टाळण्याचे वर्ष म्हणून राष्ट्रीय पातळीवर पाळले गेल्यास त्याविषयी सामाजिक भान येईल आणि कदाचित भारताचा जगातील लोकसंख्येचा दुसरा क्रमांक तसाच राहून तो पहिला होणार नाही. एक बाळ असणाऱ्यांनी एवढे वर्ष तरी थांबा, अशी राष्ट्रीय घोषणा ‘आजादी का अमृत महोत्सव’ साजरा करताना आवश्यक आहे.

आम्ही पन्नास वर्षे सत्तेत राहू असे म्हणणाऱ्यांनी देशाची लोकसंख्या स्थिर होण्यास किमान पन्नास वर्षे अजून लागणार आहेत, हे समजावून घेण्याची आवश्यकता आहे. ‘आम्ही लोकसंख्येचा प्रश्नही सोडवला’ असा फसवा प्रचार कोणी करू नये. कारण तसे करणे हे सत्याला धरून होणार नाही. याउलट, भारतात लोकसंख्या नियंत्रण धोरणाची नव्याने आखणी करण्याची गरज आहे. अव्वल असण्याचा आनंद इतर क्षेत्रांमध्ये चालत असेल. लोकसंख्येत तो चालत नाही, याचे भान बाळगणे आवश्यक आहे.

  • डॉ. अमोल अन्नदाते

Reachme@amolannadate.com
www.amolannadate.com

पेट कैसे नापे?

आदर्श वेट के साथ पेट का नाप भी हमे मोटापा समज ने के लिए जरुरी है | तो इसकी आयडियल व्हॅल्यूज में आपको बताता हूँ | सुबह उठने के बाद शौचालय होकर आना है | उसके बाद रिलॅक्स खडे रहिए| मेजरिंग टेप से नाभी के नीचे एक से देढ़ इंच/दो उंगलीया नीचे से टेप लगाकर पेट का नाप लिजिए, तो इस तरह आप पेट का नाप ले सकते है |

Image Source – Free Press Journal

    इसमें आयडियल व्हॅल्यूज पुरुषों के लिए ७८ सेंटीमीटर और महिलाओंके लिए ७२ सेंटीमीटर होता है | एक हायर लिमिट है | जिसके आगे जादा जोखिमवाले झोन में जाते है | पुरुषोंके लिए ९० सेंटीमीटर और महिलाओं के लिए ८० सेंटीमीटर मे चले जाते है | पुरुष ७८ से ९० सेंटीमीटर ग्रे झोन है | महिलाओं में ७२ से ८० सेंटीमीटर ग्रे झोन है | अगर पुरुषोंका ९० सेंटीमीटर से आगे पेट का नाप जा रहा है | तो उच्च रक्तचाप, ह्रदयरोग, डायबिटीज आदी बीमारी आपके शरीर में प्रवेश कर सकती है | ये सब सेम महिलाओं के लिए भी लागू होता है |

Image Source – Magazine, Healty And Sport News

    ८० और ९० सेंटीमीटर पुरुष-स्त्री के पेट का नाप आगे जा रहा है | तो युध्द स्तर पर वजन कम करने की कोशिश करनी चाहिए | पेट का नाप पुरुष ७८ और महिला ७२ सेंटीमीटर से आगे जा रहा है | तो आपको सतर्क होना चाहिए |  

 

क्या आप नींद ना लगने से परेशान है?

आपको रात में नींद नही लग रही है | आपकी नींद खराब हो चुकी है | क्या आपको सुबह उठने के बाद फ्रेश नही लगता | मोबाइल फोन अपने जींदगी का अहम हिस्सा बन चुका है | इसलिए में कहता हूँ, चैन से सोना है | तो जाग जाओ | और मोबाइल छोडकर भाग जाओ |

Image Source – ScoopWhoop हिंदी

    मोबाइल कभी भी, कही भी, किसी के लिए भी इस्तेमाल कर सकते है | जादा तर लोक सोने से पहले मोबाइल इस्तेमाल करते है | सोने से पहले १ मिनट मोबाइल का इस्तेमाल ६ घंटे की खराब करता है | जैसे सुरज डुबने लगता है | अंधेरे की वजह से हमारे शरीर में मेलाटॉनिन हार्मोन सक्रिय होने लगता है | इसकी वजह से नींद आना शुरू होती है |

Image Source – Polisonnografia

    लेकिन सोते वक्त हमारे सामने मोबाइल आता है | तभी मोबाइल की रोशनी हमारे चेहरे पर आती है | इसका असर हमारे बॉडी क्लॉक पर पडता है | और नींद टुट जाती है | नींद की कमी के कारण डिप्रेशन, कॉन्टिपेशन, अँसिडिटी ऐसे कई बिमारीयाँ होती है | और इसकी किंमत क्या है | बस सोने से पहले १ मिनट | इस एक मिनट की किंमत तुम क्या जानो रमेश बाबू | जाग जाओ |

कोरोनायुद्धात मुलांच्या लसीकरणाला क्षेपणास्त्रांइतके महत्त्व

डॉक्टर व पहिल्या फळीतील आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी १६ जानेवारी २०२१ पासून सुरू झालेला कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम आता १२ ते १४ वर्षांच्या मुलांच्या लसीकरणापर्यंत येऊन पोहोचला आहे. सद्यस्थिती अशी आहे की, देशातील पंधरा वर्षांपुढील ८०.१ टक्के तर राज्यातील ७०.०२ टक्के जनतेचे पूर्ण लसीकरण झाल्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर आपण आहोत. त्यातच तिसरी लाट सारून कोरोनाची रुग्णसंख्या जाणवण्याइतपत कमी झालेली आहे. असे असताना १२ ते १४ वर्षांच्या मुलांचे लसीकरण कशासाठी, हा प्रश्न पालकांच्या मनात आहे.

Image Source – Jai Hind

कोरोनाच्या बाबतीत शेवटचा नसला तरी महत्त्वाच्या कळसाध्यायास सुरुवात झाली आहे. महामारीच्या काळात जेव्हा रुग्णांचे आकडे मंदावतात आणि जनतेच्या मनात लसीविषयीचे गांभीर्य कमी झालेले असते, नेमकी तीच वेळ लसीकरणाचे प्रमाण वाढवून नवीन संक्रमणे व लाटा रोखण्याची असते. हे लक्षात घेऊन १२ ते १४ वर्षांच्या मुलांच्या लसीकरणाचा हा टप्पा किती महत्त्वाचा आहे, हे फक्त पालकच नव्हे; तर जनतेने समजून घेणे गरजेचे आहे. लहान मुलांमधील कोरोना हा सौम्य स्वरूपाचा असतो व मृत्यूदरही नगण्य आहे. पण असे असले तरी ही मुले कोरोनाची वाहक होऊ शकतात. म्हणूनच लहान मुलांमधील संसर्गाचे प्रमाण कमी झाल्यास त्याचा महामारी रोखण्यासाठी महत्त्वाचा वाटा असेल. पहिली गोष्ट, लहान मुलांमध्ये मृत्यूदर नगण्य असला तरीही तो काही प्रमाणात आहे, हे समजून घेणे गरजेचे आहे. देशातील १५ वर्षांपुढील ८० टक्के लोक लसीकृत झालेले असताना कोरोना विषाणूसाठी सर्वात सोपे सावज ही १५ वर्षांखालील मुले असतील. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा की, पंधरा वर्षांखालील सौम्य स्वरूपातील संसर्गित मुले ही घरातील ज्येष्ठांसाठी संसर्गाचा सर्वात मोठा स्रोत ठरू शकतात.

Image Source – ForeignPolicyWatchdog.com

या वयोगटाचे लसीकरण त्यांच्या वैयक्तिक आरोग्यासाठीही तितकेच महत्त्वाचे आहे. कारण आधीच आपल्या देशात कुमारवयीन मुलांच्या मृत्यूसाठी जबाबदार ठरण्यास इतर संसर्गजन्य आजारांची कारणे बरीच आहेत. त्यात अल्प सहभाग असलेल्या कोरोनाच्या कारणांचा नायनाट लसीकरणाने होईल. तसेच या वर्गासाठी अल्प प्रमाणात मृत्यूदरासाठी कारणीभूत असलेल्या कोरोनाच्या विषाणूचा नायनाट या लसीकरणाने होणार आहे. तसेच भावी पिढीमध्ये कोरोना विरोधात प्रतिकारशक्तीची इमारत बांधण्यासाठी हा महत्त्वाचा पाया आहे. आरोग्य विमा आयुष्यात जितक्या लवकर घ्याल, तितका लाभ जास्त मिळतो. तसेच लसीकरणही जितक्या कमी वयासाठी सुरू होईल, तितकीच पुढील वर्षात कोरोनाविरोधातील सामूहिक प्रतिकारशक्ती उभी राहण्यास उपयुक्त ठरेल. म्हणून कमी वयात व लवकरात लवकर लसीकरण घेणारे हे कोरोनाच्या बाबतीत सर्वात भाग्यशाली ठरतील. यापलीकडेही १२ ते १४ या वयोगटासाठीच्या कोरोना लसीकरणाचे आणखी एक महत्त्व आहे. कोरोना संसर्ग सौम्य असला तरी शरीरातील विविध अवयवांवर परिणाम करणारी एक गुंतागुंत म्हणजे या वयोगटातील मुलांमध्ये कोरोना ४ ते ६ आठवड्यानंतर दिसून येतो. ही गुंतागुंत जिवावर बेतणारी आहे. राज्यात दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर शाळा सुरळीत सुरू झाल्या आहेत. ओमायक्रॉनची लाट सरून गेली असली तरी, पुढील लाटा कधी व कशा येतील, याचे भाकीत आता वर्तवणे अवघड आहे, पण सौम्य किंवा तीव्र संसर्गाची लाट येऊ नये, असे वाटत असेल तर १२ ते १४ वर्षे वयोगटाच्या मुलांच्या लसीकरणाचे प्रमाणपत्रच शाळा सुरू ठेवण्यासाठी सर्वात मोठे आयुध ठरणार आहे. या लसीकरणासाठी कोव्हॅक्सिन नाही, तर नवीन कर्बोवॅक्स ही लस वापरण्यात येणार आहे. ही लस आधी वापरण्यात आली नसल्याने त्याच्या सुरक्षिततेबद्दल पालकांच्या मनामध्ये शंका आहेत; पण ही लस अत्यंत सुरक्षित असल्याचे निश्चित दाखले वैज्ञानिकांनी दिले आहेत. तसेच कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड या लसींचा ८० टक्के जनतेचा अनुभव गाठीशी असल्याने पालकांनी या लसीमध्ये कुठलेही किंतु मनात बाळगण्याचे कारण नाही.

Image Source – Sputnik

१२ ते १४ या वयोगटाचे लसीकरण करताना, हे आतापर्यंतच्या लसीकरणापेक्षा काहीसे वेगळे असल्याचे शासकीय यंत्रणेने समजून घेणे गरजेचे आहे. जसजसे लसीकरणाचे वय खाली येत जाईल, तसतसे या मोहिमेत बालरोगतज्ज्ञांचा सहभाग वाढवणे आवश्यक आहे. १२ ते १४ वयोगटातील मुलांची राज्यात ६४ लाख ९५ हजार, तर देशात ७ कोटी ११ लाख एवढी संख्या असल्याने हे लसीकरण वेगाने व पुढची लाट येण्याआधी होणे गरजेचे आहे. पालकांनीही आपल्या पाल्यांना घेऊन लसीकरण केंद्रांवर रांगा लावणे गरजेचे आहे. लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी लसीवरचे सरकारी आरक्षण उठवून तिला खुल्या बाजारात येऊ देणे हितवाह ठरेल. लहान मुलांची लस ही कोरोनाच्या युद्धात साधी बंदूक किंवा रणगाडा नसून क्षेपणास्त्रच आहे हे सत्य पालक, शाळा तसेच शासनाच्या पचनी पडले तरच सर्व स्तरावर या मोहिमेला वेग येईल.

सदरील माहिती आपण दै. लोकमत वृत्तपत्रामध्ये देखील वाचू शकता.

  • डॉ. अमोल अन्नदाते
  • Reachme@amolannadate.com
  • www.amolannadate.com

रहना है हिट तो मत पहनो टाईट फिट

आजकल टाईट जिन्स पहने का फॅशन है | लेकिन आपको पता है | टाईट जिन्स पहने से क्या होता है | टाईट जीन्स पहने से शुक्राणू की संख्या कम होती है | कभी सोचा है, हमारे शरीर के टेस्टीस (जिसे आम भाषा में गोटीयाँ कहते है) यह शरीर के बाहर क्यू है | इसी टेस्टीस में शुक्राणू तयार होते है | यह शुक्राणू की फॅक्टरी होती है | शुक्राणू अच्छे से तयार होने के लिए इस फॅक्टरी का तापमान शरीर से कम होना जरुरी होता है | आप टाइट जीन्स पहनकर क्या कर रहे हो | तो इस फॅक्टरी में गर्मी बढ़ा रहे हो | इसलिए रहना है हिट तो मत पहनो टाइट फिट…!

Image Source – Pinterest

परदेशात जाऊन ‘डॉक्टर’ होण्याच्या वाटेतले अडथळे

Obstacles to going abroad and becoming a 'Doctor'

रशियन आक्रमणाशी झुंजणाऱ्या युद्धग्रस्त युक्रेनमध्ये हजारो भारतीय विद्यार्थी अडकून पडले आहेत व एका विद्यार्थ्याचा यात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या विद्यार्थ्यांना भारतात परत आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाकडून ‘ऑपरेशन गंगा’ राबविले जात आहे.

या विद्यार्थ्यांमध्ये बहुसंख्य वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनमध्ये गेलेले आहेत. गेल्या २ दशकांत रशिया, युक्रेनसह कझाकस्तान, किर्गिझस्तान, फिलिपाइन्स, चीन, व्हिएतनाम, जॉर्जिया, नेपाळ, बांगलादेश या देशांमध्ये भारतीय विद्यार्थी मोठ्या संख्येने वैद्यकीय शिक्षणासाठी जात आहेत. पण या शिक्षणाचा दर्जा, यातून मिळणारी पदवी, त्यानंतर भारतात प्रॅक्टिस करण्यासाठी द्यावी लागणारी परीक्षा या गोष्टींची माहिती नसलेले पालक फक्त आपल्या मुलाने डॉक्टर व्हावे या भोळ्या महत्त्वाकांक्षेपोटी मुलांना वैद्यकीय शिक्षणासाठी परदेशी पाठवत असतात. म्हणून परदेशातील वैद्यकीय शिक्षणाचे सर्व आयाम समजून घेणे गरजेचे आहे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

Image Source – Pinterest

‘एमबीबीएस’ला शासकीय महाविद्यालयात प्रवेश मिळू न शकलेला व खासगी महाविद्यालयाची फी न परवडणारा एक मोठा वर्ग नीट परीक्षेच्या निकालानंतर डॉक्टर होण्याचे मार्ग शोधत असतो. रशिया, युरोप व सोवियत संघातून विघटीत झालेल्या देशांनी अशा वर्गाला समोर ठेवून नियोजनबद्ध रीतीने वैद्यकीय विद्यापीठांचे जाळे विणले आहे. या विद्यापीठांनी भारतात नेमलेले असंख्य मध्यस्थ इच्छुक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून देण्याचे काम करतात. विद्यार्थ्यांकडून व परदेशी विद्यापीठाकडून कमिशन / कन्सल्टंसी फी घेणाऱ्यांनी असे एक स्वतंत्र व्यायसायिक दालनच उभे केले आहे. नीट मध्ये क्वालिफाय असणे सोडून परदेशातील विद्यापीठांमध्ये इतर कुठलेही निकष नसल्याने प्रवेश तसा सोपा असतो. पण, यातील बहुतांश देश थंड वातावरणाचे प्रदेश असल्याने आधी विद्यार्थ्यांना इथल्या हवामानाशी जुळवून घेण्यात काही वेळ जातो. तसेच रशिया, युक्रेन व सोवियत राष्ट्रांमध्ये रशियन भाषाही शिकावी लागते. ही सगळी दिव्ये पार केली, तरी या शिक्षणातील खरी मेख आहे. भारत आणि या देशांमधील आजारांमधील वैविध्य. प्रत्येक देशातील हवामान, आर्थिक, सामाजिक, भौगोलिक परिस्थितीप्रमाणे तिथल्या आजारांचा एक प्रकार (पॅटर्न) असतो. याबाबतीत भारत व या देशांमध्ये फरक आहे.

या देशांमधील काही मोजकी विद्यापीठे १०० वर्षं जुनी असून, तिथल्या शिक्षणाचा दर्जा चांगला असला, तरी वैद्यकीय ज्ञानासाठी लागणारे प्रात्यक्षिक (प्रॅक्टिकल) ज्ञान देण्या इतपत त्यांच्या रुग्णालयात पुरेशी रुग्णसंख्या नसते. जे असतात ते रुग्ण भारतात सर्वाधिक प्रमाणात आढळणाऱ्या आजारांचे नसतात. वैद्यकीय शिक्षणाचा आत्मा म्हणजे जास्त रुग्णांना सामावून घेणारी रुग्णालये! म्हणूनच आज जे.जे, केइएम, सायन, नायर.. येथील विद्यार्थ्यांना जगात कुठेही समावून घेण्यास रुग्णालये तयार असतात. परदेशातून वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्यांना भारतात आल्यावर चांगल्या रुग्णालयात काही वर्षं अनुभव घेतल्याशिवाय प्रॅक्टिस करणे जड जाते.

Image Source – APN News Hindi

परदेशातील वैद्यकीय शिक्षणाचा खरा व सर्वांत अवघड लढा भारतातील ‘फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एन्ट्रन्स एक्झाम’ म्हणजे भारतात वैद्यकीय परवाना मिळवण्यासाठी परदेशातील विद्यार्थ्यांना द्यावी लागणारी प्रवेश परीक्षा. या परीक्षेत पास होण्याचे प्रमाण केवळ १० ते २० % आहे. ही परीक्षा पास होऊ न शकलेले असंख्य विद्यार्थी परदेशात वैद्यकीय शिक्षण पूर्ण करूनही वैद्यकीय परवान्याच्या प्रतीक्षेत आहेत. अशा हजारो विद्यार्थ्यांनी या परीक्षेची काठिण्य पातळी कमी करून आम्हाला पास करा म्हणून दिल्लीत निदर्शने केली होती. ही परीक्षा वर्षातून दोन वेळा होते. मध्यंतरी नॅशनल मेडिकल कमिशनने ही परीक्षा चारच वेळा देता येईल, असा नियम करण्याचा मानस जाहीर केला होता. पण सरासरी विद्यार्थी ६ ते ७ वेळा परीक्षा दिल्यावरच पास होतो, हे गृहीत धरून सध्या तरी केंद्र शासनाने हा निर्णय लांबणीवर टाकला आहे.

 या देशांमध्ये एमबीबीएस नव्हे तर एमडी अशी डिग्री मिळते. पण भारतात एमबीबीएसनंतर कुठलाही विषय निवडून त्यात पदव्युत्तर शिक्षण घेतल्यावरच, त्या विषयात एमडीची डिग्री मिळते. परदेशातील वैद्यकीय शिक्षण घेतलेला विद्यार्थी जेव्हा एमडी डिग्री लावतो, तेव्हा तो भारतातील पदव्युत्तर शिक्षण घेतलेला डॉक्टर आहे असा सर्वसामान्यांना भास होतो. याविषयी कुठलेही नियमन नाही.

परदेशात जाऊन डॉक्टर होण्याच्या अट्टहासामागे वैद्यकीय क्षेत्र म्हणजे फक्त डॉक्टर हा गैरसमज आहे. एमबीबीएस सोडून इतर अनेक वैद्यकीय अभ्यासक्रम असे आहेत जे आर्थिक, सामाजिक दृष्ट्या डॉक्टर होण्याएवढाच परतावा देणारे आहेत. आश्चर्य म्हणजे, या अभ्यासक्रमाच्या जागा भारतात रिकाम्या राहतात. उदाहरणार्थ फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी! आज त्यासाठी राज्यात बोटावर मोजण्या इतपत प्राध्यापक उपलब्ध आहेत व या क्षेत्रात मनुष्यबळाची तीव्र कमतरता आहे. याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.

–    डॉ. अमोल अन्नदाते
–    reachme@amolannadate.com
–    www.amolannadate.com

लहान मुले व गरोदर स्त्रीयांना माती खाण्याची सवय

बऱ्याच लहान मुलांना माती आणि इतर गोष्टी खाण्याची सवय असते. तर आज आपण पाहूया. या सवयीची कारणं, त्याचे दुष्परिणाम, उपचार आणि याबद्दलच्या गैर समजुती.

    बऱ्याच लहान मुलांमध्ये आणि गरोदर मातांमध्ये ही माती, खडू, पाठीवरची पेन्सिल, क्ले, प्लास्टर, खेळणी इत्यादी गोष्टी चाटण्याची सवय असते. या सवयीला वैद्यकीय भाषेमध्ये ‘पायका’ असं म्हणलं जातं. सगळ्यात आधी पाहूया या सवयीची कारणं काय असू शकतात. सगळ्यात महत्त्वाचे कारण असू शकतं ते म्हणजे शरीरात लोह (आर्यन) ची कमतरता. याच्या बरोबर थोड्या फार प्रमाणात झिंक आणि कॅल्शियमची कमतरता असते. मुख्य कमतरता ही लोहाची असते. ज्यामुळे आपल्याला माती खाण्याची किंवा इतर गोष्टी खाण्याची इच्छा होते.

Image Source – Internet

    दुसरे कारणं असतं मानसिक तणाव. जेव्हा मानसिक तणाव असतो. तेव्हा शरीराला आनंदायक घटकांची म्हणजेच सिरोटोनिन या केमिकलची गरज असते. हे केमिकल माती, खडू, पेन्सिल यांच्यामध्ये असतं. म्हणून माती किंवा इतर गोष्टी खाणारी व्यक्ती मानसिक तणावाखाली असते.

          माती खाल्ल्यामुळे मातीमधले जे जंत असतात ते पोटात जातात. त्यामुळे पोटात जंतू संसर्ग होतात. डायरियाचा त्रास होऊ शकतो. बऱ्याचवेळा खडू किंवा खडे आतड्यामध्ये अडकल्यामुळे अडथळे निर्माण होऊ शकतो. काही वेळा ऑपरेशनची गरज पडू शकते. या गोष्टीमुळे जेवण कमी होतं. जेवण कमी झाल्याने इतर व्हिटामिन्स आणि घटकांची कमतरता भासू लागते. मग अजून भूक कमी होते. या सगळ्या दुष्परिणामामुळे या सवयीची तातडीने उपचार करण्याची गरज असते.

Image Source – ABP Majha – ABP News

    उपचार हे अत्यंत सोपे आहेत. तीन ते सहा महिने लोहाचं औषध घेतले पाहिजे. जर गरोदर स्त्रीया असतील, त्यांनी लोहाच्या गोळ्या घेतल्या पाहिजे आणि लहान मुले असतील तर त्यांनी लोहाचे टॉनिक घेतले पाहिजे. प्रति किलो ६ मिलीग्रॅम दररोज याप्रमाणात ते दिले जाऊ शकते. अधिक माती खाल्ल्यामुळे पोटात जंत झालेले असतात. जंताचं औषध रोज रात्री तीन दिवस घ्यायचं असतं. यागोष्टीसाठी मुलांच आणि आई-वडिलांचं समुपदेशन ही गरजेचे असतं. माती, खडू व पेन्सिल खाताना मुलांना पकडलं. तर त्याला रागावायचं नाही. त्याला प्रेमाने समजून सांगायचं.

    माती खाणं हे नॉर्मल असतं, असा या सवयीबद्दलचा मोठा गैरसमज आहे. खाण्याची माती ही बाजारात मिळते, असे काही पेशंट सांगतात. पण खाण्याची माती अशी गोष्ट अस्तित्वात नसते. ही सवय आरोग्याला अपायकारक आहे. त्याचा तातडीने उपचार करणं गरजेचे आहे. डॉक्टरांकडून सांगितले जाते की, कॅल्शियमची गरज असतं. पण खरंतर लोहाची गरज असते. माती खाण्याची सवय ही आपल्या देशात कित्येक लोकांना आहे. त्यामुळे त्वरित उपचार करा.    

बच्चों को विटामिन डी की जरुरत

कोरोना से बचने के लिए और इम्युनिटी पावर अच्छी करने के लिए बडे व्यक्तीओं को विटामिन डी कैसे लेना है| यह मैंने बताया है| अभी छोटे बच्चों को भी जन्म के पहले दिन से विटामिन डी जरुरत होती है| विटामिन डी कैसे देना है और क्यू देना है, यह आज आपको बताऊँगा| छोटे बच्चे जो माँ का दूध पिते है| उनके लिए विटामिन डी का एकही सोर्स है, सुरज की रोशनी| पर छोटे बच्चों को आधा घंटा सुरज की रोशनी में रखना बहूत मुश्कील होता है|

    माँ का दूध बाकी सब चीजों में पर्याप्त है| लेकिन माँ के दूध में भी विटामिन डी नही होता है| या कम होता है| इसीलिए छोटे बच्चों को जन्म से लेके पहले जन्मदिन तक हररोज ४०० आययू (इंटरनॅशनल युनिट) विटामिन डी देना जरुरी है| जन्म से लेके देढ़ दो महिने तक के बच्चों के लिए विटामिन डी बढ़ाने का प्राकृतिक मार्ग में आज समजाता हूँ| लखनौ में यह संशोधन हुआ है, जब हम बच्चों को नेहलाते है| तो उन्हे दस बजे के बाद खुली हवा और सुर्य का प्रकाश शरीर पर पडे तो कुछ मात्रा में विटामिन डी मिल सकता है|

Image Source – Pianeta Mamma

    छोटे बच्चों में उनकी बढती हुई आयू होती है| इसमें मांसपेशीयाँ, हड्डी की वाढ़ का समय होता है| इसमे विटामिन डी बहूत जरुरी होता है| अगर छोटे बच्चों को विटामिन डी ना मिले तो| उनकी हड्डीयों में रिकेडस् नाम की बीमारी होती है| मतलब विटामिन डी ना मिलने से बच्चों की मांसपेशीया और हड्डी कमजोर होती है| जीन बच्चों में बचपन में विटामिन डी कम होता है| उनकी जवानी और बुढापे में असर पडके उनकी हड्डीया कमजोर होती है|

    एक साल के बाद हर हफ्ते ६०००० आययू (इंटरनॅशनल युनिट) एक पॅकेट और बॉटल में ६०००० आययू होता है| तो आप इस डोस से ना डरे| हर हफ्ते में एक बार देना है ६ हफ्ते तक| इसके बाद हर तीन महिने में एक बार ६०००० आययू देना है| दवा देने से विटामीन डी जादा होगी तो यह सोचकर टेन्शन ना ले| इससे हड्डीया और मांसपेशीया मजबूत होगी| पर कोरोना की इस दौर में इम्युनिटी बढेंगी और श्वसन मार्ग की जितनी भी बीमारीयाँ होती है| इसमे विटामीन डी बच्चे की रक्षा करेगा|

Image Source – DocPlayer.it

    अस्थमा और बार-बार सर्दी-खाँसी होती है| सीटी के तरह आवाज आती है| दमे के तकलीफ में विटामिन डी बहूत जरुरी होता है| ऐसे बहुत से लाभ विटामिन डी से होते है| ८० से ९० प्रतिशत बच्चों में विटामिन डी की कमी होती है| जैसे कोरोना की महामारी है, वैसे विटामिन डी की कमी की महामारी अपने बच्चों में, जवानों में और बुढों में है| विटामिन डी की कमी की महामारी को हम सब मिटा सकते है|

कोरोना से बचा सकता है विटामिन डी

कोरोना से बचने के लिए जो भी पॉसिबल है| वो सब हम कर रहे है| लेकिन और एक चीज है जो करने से जरुर हमारा कोरोना से बचाव होगा| वो चीज है विटामिन डी का सेवन करना| मैं यह दावा नही कर रहा हूँ की, विटामिन डी लेने से आपको कोरोना होगा ही नही| लेकिन विटामिन डी लेने के बाद अगर आपको कोरोना बाधित व्यक्तीसे संपर्क आता है| तो आपकी इम्युनिटी अच्छी होने के वजह से आपको कोरोना होने के चान्सेस कम रहेंगे| अगर आपको कोरोना का संसर्ग हो भी जाता है| तो जिस इन्सान के शरीर में विटामिन डी की लेवल नॉर्मल है| उसका शरीर कोरोना से लढ़ने के लिए ज्यादा सक्षम होगा| उसपर और इसके फेपडों पर कोरोना का परिणाम कम होगा| और इसके चलते कोरोना से मृत्यू नही होगा|

Image Source – Medical Dialogues

    अगर आपके शरीर में विटामिन डी पर्याप्त मात्रा में है| तो कोरोना होने के बावजूद लक्षण ही ना आये| ऐसे हो सकता है| या बहूत ही मामुली लक्षणों के बाद कोरोना ठीक हो जाए| कोरोना को टालने के लिए या कोरोना से बचने के लिए विटामिन डी कैसे काम करता है| श्वसन मार्ग के सभी जंतू संसर्ग मामुली सर्दी खाँसी से लेके निमोनिया तक सब जंतू संसर्ग रोखने के लिए| विटामिन डी का रोल बहुत महत्त्वपूर्ण है| जिनको अस्थमा और दमा की तकलीफ है| उन्हे विटामिन डी दिया जाये| तो अस्थमा की तकलीफ कम हो जाती है| और अस्थमा के अँटक कम आते है| हमारे देश में ९० प्रतिशत लोगों में विटामिन डी की कमी है| इसका कारण यह है की, खाने के सोर्स से विटामिन डी नही मिलता है| सिर्फ सुर्य प्रकाश से ही विटामिन डी मिलता है| सुबह १० से दोपहर ४ बजे तक आधा घंटा कम से कम कपडों में धूप में खडे रहेंगे या चलेंगे| यह भी हम करते है, तभी भी विटामिन डी पर्याप्त मात्रा में नही मिलता है| क्यूँ की हमारी त्वचा युरोपिय लोगों से काली है| काली त्वचा के वजसे सुरज की रोशनी मिलने के बावजूद विटामिन डी हमारे शरीर में घुस नही जाता है| कई सालों से हमारे देश में विटामिन डी की कमी की महामारी चल रही है|

Image Source – Twitter

    इस महामारी को भगा ने के लिए विटामिन डी लेना जरुरी है| हर व्यक्ती को ६०००० आययू (इंटरनॅशनल युनिट) विटामिन डी लेना है| आपको हफ्ते में १ बार ८ हफ्तों के लिये लेना है| ८ हफ्ते होने के बाद हर महिने में ६०००० आययू विटामिन लेना है| खाना खाने के बाद विटामिन डी लेना है| खाली पेट विटामिन डी लेना नही है| विटामिन डी यह चरबी में पिघलनेवाला विटामिन है| इसलिए खाना खाने के बाद विटामिन डी लेने से पुरी आतो में शोषित हो जाता है| मांसपेशीया और हड्डी को मजबूत करने के लिए विटामिन डी जरुरी होता है| अगर आपकी गर्दन दर्द हो रही है| तो आपको विटामिन डी जरुरी है| विटामिन डी की कमी की महामारी को मिटाने के लिए सहयोग दिजिए|   

( नीचे दिये हुए युट्यूब लिंकपर जाकर व्हिडिओ देख सकते है | )

किडनी स्टोन रुग्ण के लिए ७ डाइट टीप्स

किडनी स्टोन का इलाज करने के बाद भी दुबारा किडनी स्टोन होने के चान्सेस होते है| इसमें डाइट का महत्त्वपूर्ण रोल है| तो मैं आज आपको ७ डाइट टीप्स बताऊँगा|

Image Source – e-Psikiyatri

    पहली टीप्स बहुत जादा पानी पीना| दुसरी टीप्स खाने में जादा कॅल्शियम और बहुत जादा ऑक्झलेट जिसकी वजसे स्टोन बनते है| ऐसी खाने की चीजे डाइट में नही होना चाहिये| तिसरी टीप्स एक्स्ट्रा कॅल्शियम की गोलीयाँ ना खाये| डाइट में जितना कॅल्शियम मिलता है, उतना ही पर्याप्त है| चौथी टीप्स आपके डाइट में प्रोटीन की मात्रा| आपके डाइट में प्रोटीन की मात्रा पर्याप्त होनी चाहिए| लेकिन बहुत ज्यादा प्रोटिन होना किडनी स्टोन के पेशंट के लिए खतरनाक हो सकता है| और किडनी स्टोन बनाने के लिए जिम्मेदार हो सकता है| प्रोटिन पावडर बिल्कुल ना ले|

पाचवी टीप्स आपके डाइट में कॅल्शियम योग्य मात्रा में होना चाहिए, परंतु कॅल्शियम बिल्कुल भी नही होना चाहिए, ऐसे नही है| लोगों के मन में एक गलत फैमी है की, किडनी स्टोन के पेशंटने कॅल्शियम डाइट नही लेना चाहिए| हरी सब्जी, दुध के पदार्थ इसमे कॅल्शियम होता है| और ये चीजे कम मात्रा में खानी चाहिए| छठवी टीप्स विटामीन सी की गोलीयाँ नही खानी है| विटामीन सी ज्यादा लेने पर किडनी स्टोन बनने का कारण बन सकता है| आप रोज खाना खाते है, उसमे विटामीन सी पर्याप्त होता है| नींबू, मोसंबी, संत्रे इसमे विटामीन सी होता है| ये सब खा सकते है, पर विटामीन सी की गोलीयाँ ना खाये| सातवी टीप्स आप अपने डाइट में नमक कितना ले रहे है, ये भी महत्त्वपूर्ण है| ज्यादा नमक खाना इसमे सोडियम होता है, और ये किडनी स्टोन बनाने के लिए कारण बन सकता है| तो आप एक्स्ट्रा टेबल सॉल्ट कभी भी ना ले| ये सात टिप्स का पालन करो और किडनी स्टोन से मुक्त हो जाओ|

( नीचे दिये हुए युट्यूब लिंक पर जाकर वीडियो भी देख सकते हो )