टॉयलेट ट्रेनिंग

टॉयलेट ट्रेनिंग

टॉयलेट ट्रेनिंग मुलांना टॉयलेट ट्रेनिंगची गरज का आहे? स्वतः नीट व स्वच्छतेचे नियम पाळून ‘शी’, ‘सु’ करायला शिकणे हे मुलाला आयुष्यात पहिली अशी गोष्ट असते, जी त्याला स्वावलंबी झाल्याची भावना निर्माण करून आत्मविश्वास वाढवते व इतर गोष्टी स्वतः करण्यास प्रेरित करते. तसेच, ‘शी’, ‘सु’ करण्याचे प्रशिक्षण नीट झाले नाही किंवा हे करत असताना मुलाच्या मनात तणाव निर्माण झाल्यास पुढील आयुष्यात मानसिक समस्या निर्माण होता त.

सुरुवात कधी करावी?
टॉयलेट ट्रेनिंग शक्यतो मूल १८ महिने ते २४ महिन्या दरम्यान ‘शी’ करायला पॉटी सीटवर बसण्यास तयारी दाखवतात. मात्र, हे वय प्रत्येक मुलागणिक बदलू शकते आणि मुलाच्या मानसिक व शारीरिक तयारीप्रमाणे आईने वेळ ठरवावी. 
१८ महिन्यापासून पुढे मात्र या विषयी मुलाशी चर्चा करायला, त्याला याविषयी सांगायला सुरुवात करावी. 

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

मूल प्रशिक्षणासाठी तयार आहे, हे कसे ओळखावे?

  • मूल तुमची नक्कल करू लागते. 
  • खेळणी जागच्या जागी ठेवू लागते. 
  • तुमच्यामागे बाथरूममध्ये येऊ लागते. 
  • स्वावलंबनाच्या खुणा दिसतात; नाही म्हणू लागते. 
  • स्वतः कपडे काढू लागते. 
  • ‘शी’, ‘सु’ आल्याचे सांगू लागते. 

कसे करावे?

  • यासाठी शक्यतो बाजारात मिळणाऱ्या पॉटी चेअरचा वापर करावा. कारण भारतीय शौचालयाचे भांडे मोठे असते व त्यावर मुलांना बसणे शक्य नसते व उभे राहण्यास भीती वाटते. 
  • प्रशिक्षणाचे मुख्य टप्पे असतात – ‘शी’ आल्याचे सांगणे, कपडे काढणे, ‘शी’साठी पॉटी चेअरवर बसणे/उभे राहणे, हात धुणे, कपडे परत घालणे. 
  • पॉटी चेअरचा वापर सुरू करण्याअगोदर ती मुलाला दाखवा, त्याची खरेदी करताना मुलाला सोबत घेऊन जा, त्याला त्यावर बसून खेळून बघू द्या. 
  • ही तुझी खुर्ची’, ‘ ही तुझ्या ‘शी’साठी आहे, असे ‘तुझे’ हा शब्द वापरून पॉटी चेअरची ओळख करून द्या. 
  • हे करताना ही प्रक्रिया सुरू ठेवणे गरजेचे हे मुख्य ध्येय असले पाहिजे, ती पूर्ण यशस्वी करणे नाही. 
  • सुरुवातीला ‘शी’ आलेली नसताना व जेवण झाल्यावर, दूध पिल्यावर मुलाला पूर्ण कपडे घालून फक्त पॉटी चेअरवर बसायला सांगणे. हे बसणे भारतीय पद्धतीने पाय गुडघ्यात दुमडून किंवा पाश्चिमात्य पद्धतीने खुर्चीवर बसल्यासारखे, कसे ही असू शकते. 
  • यासाठी रोज एक वेळ निवडावी व त्या वेळेला बसावे. 
  • बसलेले असताना मुलाशी गप्पा माराव्या. 
  • याची एकदा सवय लागली की ‘शी’ आल्यावर याच्यावर बसायचे का, असे मूल स्वतःच विचारेल. विचारले नाही की दरवेळी ‘शी’ आल्यावर तुझ्या खुर्चीत बसू या का ‘शी’ला, असे आपणहून विचारावे. 
  • बसले म्हणजे पॉटी चेअरमध्येच ‘शी’ करावी असा काही नियम घालून देऊ नये, मुलाचा त्या वेळचा मूड पाहून निर्णय घ्यावा. 
  • डायपरमध्ये ‘शी’ होते तेव्हा ती फेकताना पॉटी चेअरमध्ये टाकावी व हे मुलाला वारंवार दाखवावे 

काही टिप्स

  • टॉयलेट ट्रेनिंग पॉटी चेअर बाथरूममध्येच ठेवली पाहिजे, असा काही नियम नाही, ती मुलाला आवडत्या ठिकाणी ठेवून वापरू द्यावी. 
  • टॉयलेट ट्रेनिंग सुरू असताना शक्यतो ‘शी’ आई किंवा घरातील व्यक्तीनेच धुवावी, मुलाला स्वतःची शी धुण्याचा आग्रह व याची घाई करू नये. यात वडिलांनीही सामील व्हावे. 
  • टॉयलेट ट्रेनिंग दरम्यान बाळाला ‘शी’ कडक होते का, याकडे लक्ष द्यावे. ज्या मुलांना कडक ‘शी’ म्हणजे बद्धकोष्ठता होते, त्यांना टॉयलेट ट्रेनिंग दरम्यान त्रास होतो. म्हणून ही समस्या असल्यास उपचार करावेत.

सदरील माहिती आपण सकाळ मध्येही वाचू शकता.

तोतरेपणा किंवा बोलण्यातील समस्या

तोतरेपणा किंवा बोलण्यातील समस्या

तोतरेपणा किंवा बोलण्यातील समस्या अनेक मुलां-मुलीमध्ये तोतरेपणा किंवा बोलतानाच्या समस्या आढळून येतात. मात्र ही व्याधी गंभीर नसल्याने त्याच्या उपचारासाठी फारसे प्रयत्न होत नाहीत. परंतु, ही समस्या बरेच दिवस रेंगाळल्यास त्याचा मानसिकतेवर परिणाम होऊन न्यूनगंड निर्माण होतो. म्हणूनच अशी समस्या असलेल्यांना उपचार व मानसिक आधाराची गरज असते. 

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

तोतरेपणा व बोलण्याच्या समस्या म्हणजे नेमके काय?
ज्या मुलांमुलीना वाक्य सुरू करण्यास उशीर लागतो, बोलताना उच्चार स्पष्ट करता येत नाहीत, वाक्य सुरू केल्यावर मध्येच अडखळते, एखादा शब्दच उच्चारता येत नाही किंवा एखादा शब्द गरज व इच्छा नसताना पुनःपुन्हा उच्चारला जातो, असे असल्यास बोलण्याची समस्या असल्याचे निदान केले जाते.

कारणे –

  • तोतरेपणा व बोलण्याच्या समस्या आनुवंशिक असू शकतात. 
  • या मागे काहीतरी ताणतणाव असल्याचेही इतिहास नटी तपासल्यास दिसून येते. 
  • काही मुलांना शाळेत परीक्षेच्या काळात किंवा ताणतणाव वाढल्यानंतरच ही समस्या जाणवते. 
  • काही वेळा फक्त मनातील न्यूनगंड किंवा स्वतःला कमी लेखल्यामुळे ही समस्या दिसून येते. यावेळी चांगल्या समुपदेशनाने मुले बरी होतात.
  • नीट तपासणी केल्यावर जीभ खाली जास्त प्रमाणात चिकटली असल्याने ही बोलण्यात तोतरेपणा दिसून येतो. 
  • क्वचितच डोक्याला मार, मेंदूतील गाठ किंवा एखाद्या औषधाचा दुष्परिणाम म्हणून तोतरेपणा दिसून येतो.

तपासण्या व निदान 
डोक्याला मार लागल्याचा इतिहास असल्यास गरज भासल्यास तोतरेपणासाठी सीटी. स्कॅन किंवा एमआरआय या तपासण्या कराव्या लागतात. रेटिंग स्केलवर तोतरेपणाची तीव्रता ठरवली जाते.

उपचार –

  • स्पीच थेरपी हा तोतरेपणा किंवा बोलण्यातील समस्यांच्या उपचारांमधील महत्त्वाचा भाग असला तरी त्याला काही प्रमाणात औषधांची जोड द्यावी लागते.
  • स्पीच थेरपीमध्ये रुग्णांना ते चुकत असलेले शब्द हळू व श्वासावर नियंत्रण ठेवून कसे म्हणायचे हे शिकवले जाते. 
  • याच्या बरोबरीने fluency shaping थेरपीसारख्या पद्धती वापरल्या जातात. 
  • बेन्झोडायझेपिन्स (Benzodiazepines), स्ट्रामोनिअम (stramonium) सारखी औषधे फायदेशीर ठरतात. 
  • याच्या बरोबरीने श्‍वास घेण्याची पद्धत खूप फायदेशीर ठरते.

श्‍वासाचा व्यायाम 
१ ते १० पर्यंत आकडेमोड करत नाकाने हळू श्‍वास आत घ्यावा, डायफ्राम जितका खाली जाईल, तितका जाऊ द्यावा. त्यानंतर १ ते १० पर्यंत मोजत तोंडाने श्‍वास बाहेर सोडवा. असे सलग दहावेळा करावे.

घरगुती उपचार  

  • तोतरेपणा किंवा बोलण्यातील समस्या ओठांच्या भोवती मध लावून जिभेच्या टोकाने ते चाटण्याचा प्रयत्न करावा. 
  • चमचाच्या मागे मध लावून ते तोंडासमोर ठेवून जिभेने त्याचा स्पर्श करावा. मुलगा ते स्पर्श करायचा प्रयत्न करताना तो चमचा दुसऱ्या व्यक्तीने मागे घ्यावा.
  • जीभ दुमडून ती मागे घेऊन टाळूला लावावी व ती थोडी खाली घेऊन ताणलेल्या स्थितीत ठेवण्याचा प्रयत्न करावा.
  • आवळा चूर्ण, वेखंड व मधाचे चाटण रोज द्यावे.

सदरील माहिती आपण सकाळ मध्येही वाचू शकता.

मुलांची अंथरुणात लघवी आणि उपचार

मुलांची अंथरुणात लघवी आणि उपचार

मुलांची अंथरुणात लघवी आणि उपचार ही समस्या चुकीच्या पालकत्वामुळे नाही, तर चुकीच्या शू-शी करण्याच्या प्रशिक्षणामुळे (टॉयलेट ट्रेनिंग) होत नाही किंवा यात मुलाचीही काही चूक नाही, या विषयी समुपदेशन गरजेचे असते.

या उपचारांत पालक , मूल आणि घरातील इतर सदस्यांचे समुपदेशन महत्त्वाचे ठरते. 

ही समस्या चुकीच्या पालकत्वामुळे नाही, तर चुकीच्या शू-शी करण्याच्या प्रशिक्षणामुळे (टॉयलेट ट्रेनिंग) होत नाही किंवा यात मुलाचीही काही चूक नाही, या विषयी समुपदेशन गरजेचे असते. मुलाला असे होतच असते आणि याचे उपचार आपण मिळून करू, हे पालकांना समजावून सांगावे लागते. घरात आजी, आजोबा व इतरांनी या विषयी जाहीर चर्चा किंवा मुलाशी चर्चा करू नये. तसेच या सवयीविषयी मुलाला कधीही रागावू व मारू नये. 

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

  1. संध्याकाळी सहानंतर चहा आणि कॉफी देऊ नये, तसेच संध्याकाळी सहानंतर पाणी पिण्याचे प्रमाण कमी करावे. सहानंतर २५० ते ३०० मिली पाणी पिणे योग्य आहे. रात्री झोपताना पाणी देणे टाळा. दिवसातील ८० % पाणी दुपारी चार वाजेपर्यंत प्यावे व ४ ते ६ वेळांत १९ % व ६ नंतर १ % पाणी पिण्याचे प्रमाण ठेवावे. दिवसा सहा वाजेपर्यंत किमान ६ वेळा लघवीला जावे. 
  2. दिवसा लघवी आल्यावर काही काळ रोखून धरता येते का, याचीही सवय लावावी. जमेल तशी लघवी थोडा वेळ ४ ते ५ मिनिटांपर्यंत रोखून धरल्यास मूत्राशयाची क्षमता वाढण्यास मदत होते. हे बळजबरीने नाही, तर आनंदाने व मुलाच्या स्वयंस्फूर्तीने करून घ्यावे. 
  3. मूल झोपण्याआधी त्याला लघवी करायला आपण सांगतोच, पण अंथरून ओले करणाऱ्या मुलांना झोपण्याआधी लघवी करून आल्यावर परत एकदा लघवी करायला सांगावे. या दोन वेळा लघवी करण्याला ‘डबल वायडिंग’ असे म्हणतात. म्हणजे, सलग दोन वेळा लघवीला जाणे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की, कधी कधी सुरवातीला जेवढी लघवी केली होती तेवढीच लघवी तो पुन्हा करतो. याचे कारण असते मुलाच्या मुत्राशयामध्ये रेसिड्यूल युरीन, म्हणजे साठलेली लघवी. दुसऱ्यांदा लघवी केल्यानंतरही ही लघवी बाहेर पडल्याने अंथरूण ओले करण्याचे प्रमाण कमी होते. 
  4. झोपण्याआधी सकारात्मक संकल्प करायला सांगणे. संकल्प हा वतर्मानकाळात असावा. मी आज अंथरून कोरडे ठेवेले आहे, असा सकारात्मक संकल्प करायला सांगणे. आज मी अंथरून ओले करणार नाही, हा नकारात्मक संकल्प ठरतो. 
  5. सहसा मुले लवकर झोपतात आणि आई-वडील त्यांच्यानंतर २ ते ४ तासांने झोपतात. आई-वडीलांनी झोपण्याआधी मुलाला झोपेतून उठवून लघवी करायला उभे करायचे. 
  6. मुलांची अंथरुणात लघवी आणि उपचार स्टार टेक्निक ही एक पद्धत संशोधनामध्ये सिद्ध झाली आहे. एक वेगळे कॅलेंडर घ्यायचे व ज्या दिवशी मुलाने अंथरून ओल केलेले नाही, त्या तारखेला एक स्टार मारायचा. महिन्याच्या शेवटी जितके दिवस मुलाने अंथरून ओल केले नाही, तितके स्टार मोजायचे आणि त्या हिशोबाने त्याला काहीतरी बक्षीस ठरून द्यायचे. तुला या महिन्यामध्ये १० स्टार मिळल्यास तुला तुझ्या आवडीची गोष्ट देऊ किंवा तुला एखाद्या पर्यटनस्थळाला घेऊन जाऊ अशा साध्या गोष्टी बक्षिस म्हणून द्याव्यात. बक्षीस देताना चॉकलेट, व्हिडिओ गेम्स अशा घातक गोष्टी देऊ नका. 
  7. सगळ्यांत महत्त्वाचे, मुलाला याबद्दल रागवू नका व या समस्येबद्दल त्याच्याशी जास्त चर्चा करू नका. तसेच, तुम्ही त्याचे कपडे बदलता, बेडशिट बदलता तेव्हा न रागावता त्याला या कृतींमध्ये सामावून घ्या. त्याची याच्यासाठी मदत घ्या. 
    वरील उपचार ६ महिने सतत केल्यास ही मुले पूर्ण बरी होतात . 

सदरील माहिती आपण सकाळ मध्येही वाचू शकता.

अंथरुणात लघवी करण्याची सवय घालवा

अंथरुणात लघवी करण्याची सवय घालवा

अंथरुणात लघवी करण्याची सवय घालवा मुल अंथरुणात लघवी करत आहे का, हे समजण्यासाठी ३ ते 4 वर्षांदरम्यान रात्री झोपताना डायपर घालण बंद करावे व या सवयीचा अंदाज घ्यावा. भारतात ५ वर्षांपुढील ७.५ ते १६.५ टक्के मुलांना ही सवय आहे. कुमारवयीन मुलांमध्ये हे प्रमाण ३ टक्के आहे, मात्र हे प्रमाण फक्त रुग्णालयात आलेल्यांचे आहे. उपचार न घेणाऱ्यांचे प्रमाण खूप जास्त आहे. मुलांमध्ये हे प्रमाण मुलींपेक्षा जास्त आहे. 

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

दखल कधी घ्यावी?
मुल सहसा ५ वर्षांपर्यंत अंथरूण ओले करते. यानंतर सलग तीन महिने, महिन्यातून एकदा अंथरूण ओले करत असल्यास त्याची दखल घेऊन उपचार करण्याइतपत ही समस्या आहे, असे समजावे. याला पाचवर्षांपर्यंत उपचारांची गरज नसते. तरीही ५ वर्षांच्या आधीही सवय असल्यास तिसऱ्या वर्षापासून जमेल तसे औषध न देता लघवी करण्याच्या सवयीची शुचिता – संहिता मुलाला समजून सांगण्यास सुरुवात करायला हवी व ही सवय ५ वर्षापर्यंत जाईल यासाठी प्रयत्नशील राहायला हवे.

सवयीचे परिणाम
या सवयीचे मानसिक परिणाम पालक व पाल्य दोघांवर होतात. पालकांची रात्री झोपमोड होऊन चीडचीड व दुसऱ्या दिवशी कामावर परिणाम होतोच. या शिवाय मुलांमध्ये लाज वाटणे, अपराधीपणाची भावना निर्माण होणे, भीती आणि नैराश्य व हतबद्धतेची भावना निर्माण होते. यामुळे त्यांच्या अभ्यासावर व इतर क्षमतांवर परिणाम होतो.संशोधन सांगते, आपल्या पूर्ण आयुष्यात मनाला त्रासदायक गोष्टींपैकी घटस्फोट, आई-वडिलांची तीव्र भांडणे यांनतर अंथरुणात लघवी करणे मोठे कारण असते.

अंथरुणात लघवी करणाऱ्या मुलांचे प्रकार 
यात दोन प्रकारे वर्गीकरण करता येते 

  • जे फक्त रात्रीच अंथरूण ओले करतात.
  • जे रात्री व दिवसाही झोपल्यास अंथरूण ओले करतात.

दुसऱ्या प्रकारात वर्गीकरण करताना 

  • फक्त अंथरूण ओले करण्याची सवय असलेले.
  • या सोबत लघवी मार्गाच्या संसर्गाची लक्षणे व लघवी लागल्यास स्वच्छतागृहात जाईपर्यंत थांबता न येणे, वारंवार लघवी होणे अशी लक्षणे असतात.
  • लहानपणापासून नेहमीच अंथरूण ओले करत होते. – प्रायमरी 
  • आधी ६ महिने अंथरूण ओले करत नव्हते, पण नंतर करू लागले. – सेकंडरी

उपचारापूर्वी
अंथरुणात लघवी करण्याची सवय घालवा एक ते तीन महिन्याची लघवीची डायरी आधी मेंटेन करावी. यात झोपण्याची आणि उठण्याची वेळ , किती दिवस दिवसा व रात्री अंथरुणात लघवी केली, दिवसभर किती पाणी प्यायले, रात्री झोपण्याअगोदर किती पाणी प्यायले, सकाळी उठल्यावर किती लघवी होते, बाळ डायपर घालत असल्यास सकाळी ओल्या डायपरचे व डायपर घालताना कोरड्या डायपरचे वजन याची नोंद ठेवावी. यावरूनच उपचाराची दिशा ठरते.

  • कारणे
  • वाढ व विकासातील अडथळे व समस्या.
  • जनुकीय कारणे – पालक लहानपणी अंथरुणात लघवी करत असतील, तर त्यांच्या मुलांमध्ये याचे प्रमाण जास्त असते.
  • मानसिक तणाव – आत्मसन्मान कमी असणे ( सेल्फ इस्टीम ), नैराश्य 
  • जन्मतः मूत्राशयाची लघवी साठवून ठेवण्याची क्षमता कमी असणे.
  • लघवी होऊ नये म्हणून शरीरात स्रवणारा संप्रेरक अँटी डाययुरॅटीक हार्मोनची कमतरता.
  • झोपेच्या समस्या  
  • अतिचंचलता
  • बद्धकोष्टता
  • टॉन्सील व अॅडीनॉईड मुळे झोपताना श्वास अडखळणे
  • जंत असणे

सदरील माहिती आपण सकाळ मध्येही वाचू शकता.

कोरोना बाधित रुग्णाचे आहार

कोरोना बाधित रुग्णाचे आहार

कोरोना बाधित रुग्णाचे आहार कोरोना संसर्ग झाल्यावर प्रतिकारशक्ती चांगली राहण्यासाठी संसर्ग काळात ही आहार चांगला ठेवणे गरजेचे असते. या विषयी फिजिशियन व आहार तज्ञ डॉ. चंद्रकांत कणसे यांनी एक आहार तक्ता सुचवला आहे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

  • या तक्त्यातील मुलभूत  नियम –
    शरीराला रोज १ ग्राम प्रतिकिलो वजना प्रमाणे प्रथिने रोज आहारात असणे गरजेचे आहे. साधारण ६० किलो हे सरासरी आहार पकडून ६० ग्राम प्रतिन रोज मिळायला हवे. वजन जास्त असल्यास त्यापेक्षा जास्त. साधारण एका अंड्यात ६ ग्राम, १०० ग्राम पनीर / मांसाहारी अन्नात २२ ग्राम प्रोटीन मिळते. याप्रमाणे विविध अन्नाचे प्रथिनांचे प्रमाण तपासून दिवसात ६० ग्राम तरी प्रथिने शरीरात जातंय का हे तपासून पहावे.
  • सर्व पालेभाज्या , फळभाज्या , धान्ये / कड धान्ये चालतील.
  • सर्व प्रक्रिया केलेले अन्न पदार्थ  , गोड , साखर, गुळ, मध, मैदा,तळलेले, साबुदाणा , भात , बिस्किटे , पोहे , बेकरीचे पदार्थ टाळावा.
  • गव्हाची चपाती टाळावी व ज्वारी / मका / नाचणीची भाकरी खावी.
  • दिवसभरचा आहार
  • सकाळी बिना साखरेचा / कमी साखरेचा चहा / कॉफी
  • नाष्ट्या साठी – आदल्या दिवशी रात्री पाण्यात भिजवलेले ४- ५ बदाम ( पचतील तसे ) / अक्रोड / शेंगदाणे / खोबरे + अंडा / पनीर भुर्जी
  • दुपारी जेवण
    भाकरी – ज्वारी / नाचणी / मका + भाजी + फळे + दही / पातळ ताक
  • संध्याकाळी – चहा / कॉफी
  • रात्री – उसळ + भाकरी / थालीपीठ / पनीर पराठा + भाजी ? मांसाहार + कोशिंबीर
  • झोपताना भूक असल्यास – १ कप दुध

पाणी – कोरोना बाधित रुग्णाचे आहार तहान लागेल तसे पाणी प्यावे , पाणी खूप कमी किंवा खूप जास्त ही पिऊ नये आपल्याला दर दोन तासाने लघवी होईल व लघवीचा रंग पिवळा नसून पांढरा राहायला हवे या प्रमाणे पाणी पिणे स्वतःच कमी जास्त करावे. पिवळी लघवी होत असल्यास पाणी वाढवावे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.

एन ९५, व्हॉल्वचा मास्कबाबत गोंधळ नको

एन ९५, व्हॉल्वचा मास्कबाबत गोंधळ नको

 एन ९५, व्हॉल्वचा मास्कबाबत गोंधळ नको नुकतच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने व्हॉल्व असलेला एन ९५ मास्क व इतर व्हॉल्व असलेल्या मास्क वर बंदी घातली व वापरू नये असे निर्देश दिले आहेत. पण या बद्दल वार्तांकन करताना व याचा अर्थ लावताना अनेकांनी एन ९५ मास्क वर बंदी किंवा एन ९५ मास्क निरुपयोगी असा लावला. पण बंदी व वापर बंद करायला हवा तो व्हॉल्व असलेल्या कुठल्या ही मास्कचा एन ९५ मास्कचा नव्हे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

एन ९५ व मास्कचे प्रकार व कुठला योग्य –

  • एन ९५, व्हॉल्वचा मास्कबाबत गोंधळ नको एन ९५ चा अर्थ आहे ९५ % श्वास कण फिल्टर करणारा मास्क. यात व्हॉल्व असलेला आणि नसलेला असे दोन मुख्य प्रकार असतात. पण व्हॉल्व असलेल्या मास्क मधून श्वास कण बाहेर पडू शकतात म्हणून व्हॉल्व नसलेला मास्क वापरायला हवा. या व्यक्तिरिक्त आकार आणि कुठल्या देशातील मास्क आहे यावरून ही एन ९५ मास्कचे काही प्रकार समजून घ्यायला हवे.
  • भारतीय बनावटीचा – मास्क वर तुम्ही नीट निरीक्षण केल्यास त्यावर छोट्या अक्षरात NIOSH असे लिहिलेले असते. अर्थात हा नॅशनल इंन्स्टीट्युट ऑफ ऑक्यूपेशनल हेल्थ अँड सेफ्टी ने प्रमाणित केलाला भारतीय बनावतीचा मास्क. व्हॉल्व नसलेला व NIOSH N95 असा लिहिलेला मास्क वापरण्यास योग्य N95 मास्क समजावा.
  • चीनी बनावटीचा – ज्या मास्क वर K N95 लिहिलेला आहे तो चीनी बनावतीचा आहे व तो चीनी व्यक्तींना समोर ठेवून बनवला गेला असल्याने भारतीयांनी वापरण्यास योग्य नाही. तसेच त्याचा दर्जा ही भारतीय मास्क एवढा चांगला नाही.
  • कोरियन मास्क – कोरिया ने कॉपरचा मास्क बनवला आहे जो धुता येण्या सारखा व धुवून रोज वापरता येईल असा एकमेव N95 मास्क आहे. पण हा मास्क फार महाग आहे ( किंमत – ५०० रुपये प्रती मास्क ) . तसेच हा मास्क अजून मुबलक प्रमाणत उपलब्ध नाही. या मास्कचा एकच दोष आहे कि त्याला नाकावर फीट होतो तिथे क्लिप दिली नसल्याने तो नाकावरून खाली सटकतो. ही सुधारणा केल्यास व परवडत असल्यास क्लिप असलेला कोरियन मास्क बाजारात आल्यावर वापरण्यास हरकत नाही.

आकारावरून एन ९५ मास्कचे प्रकार –

  • पहिल्या प्रकारात कानात अडकवण्याचा एन ९५ मास्क आहे पण हा सतत कानावर अडकवल्याने कानाच्या मागे अडकवण्याचे इलॅस्टिक काचते.
    दुसरा आकार आह ज्याला डक ( बदका सारखा ) मास्क असे नाव पडले आहे . हा मास्क लावताना काना मागे लावावा लागत नाही व इलॅस्टिक मागे डोक्याला अडकते म्हणून ते काचत नाही व जास्त वेळ ठेवण्यास त्रास होत नाही. म्हणून हा एन ९५ मास्क वापरण्यास जास्त योग्य आहे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.

लसीचे काय ?

लसीचे काय ? ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या लसीचे सकारात्मक अहवाल हाती आल्याने लसी विषयी सर्वांच्याच आशा उंचावल्या आहेत पण या यशाचे संशोधनात्मक दृष्टीने विश्लेषण करायला हवे.
आदर्श लस म्हणजे काय ?
ज्या लसीचे कमीत कमी डोस घ्यावे लागतात, शेवटच्या डोस सहा महिने तरी प्रतिकारशक्ती टिकून राहते आणि कमीत कमी दुष्परिणाम होतात.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

लस चाचणीच्या चार फेज कुठल्या असतात ?
फेज १ – २० – ८० मानवांवर चाचण्या
फेज २ – काही शे म्हणजे १००० पर्यंत लोकांपर्यंत मानवांवर चाचणी
फेज ३ –  काही हजार लोकांवर चाचण्या
फेज ४ – लस बाजारात आल्यावर येणारे रिपोर्ट

ऑक्सफर्ड लसीचे यश किती ?
सध्या लँन्सेट मध्ये प्रकाशित झालेला ऑक्सफर्ड लसीचा  अहवाल हा फेज १ व २ चे आहेत व यात दोन डोस नंतर ५६ दिवसांना प्रतिकारशक्ती चांगली निर्माण होते असे दिसून आले आहे. यात प्रतिपिंड – अँटीबॉडी सहित टी सेल ही दीर्घ काळ टिकणारी प्रतिकारशक्ती आढळून येणे सकारत्मक आहे. पण ही प्रतिकारशक्ती किती काळ टिकून राहते याचे अंतिम निष्कर्ष हाती येण्यास किमान ६ महिने तरी वाट पहावी लागणार आहे

भारतासाठी या लसीचे महत्व काय ?
लसीचे काय ? कुठल्या ही परदेशी लसीच्या यशाने हुरळून जाण्या आधी  भारतीयांनी जरा धीराने घ्यावे. कारण भारतातील कोरोनाची स्ट्रेन आणि परदेशांत लसी साठीच्या कोरोनाच्या स्ट्रेन वेगळ्या असू शकतात. हीच गोष्ट फ्लू लसीच्या बाबतीत ही घडते. तसेच आपली भारतीयांची प्रतिकारशक्ती परदेशी लसीच्या चाचण्यात परदेशी व्यक्तींवर केलेल्या प्रयोगात जसा प्रतिसाद मिळतो तसाच प्रतिसाद मिळेल हे निश्चितपणे सांगता येत नाही. म्हणून कुठल्या ही परदेशी लसीचे भारतीयांवर प्रयोग यशस्वी झाल्या शिवाय या परदेशी लसीवर पूर्ण विश्वास ठेवता येणार नाही

भारतीय लसीचे काय ?
भारतात सध्या ७ कंपन्या लसीवर काम करत आहेत. ऑगस्टच्या पहिल्या महिन्यात फेज १ मानवी चाचण्या सुरु होणार आहेत.

लस आली तरी पुढे काय ?
लस आली व सर्वांनी ती घेतली तरी काही काळ तरी सोशल डीस्टन्सिंग , मास्क व हात धुण्याचे महत्व अबाधित राहणार आहे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.

प्लाझ्मा दान कोण करू शकत ?

प्लाझ्मा दान कोण करू शकत ?

प्लाझ्मा थेरपी म्हणजे नेमके काय ? कोरोना मधून बरे झालेल्या रुग्णांच्या प्लाझ्मा  या रक्तातील भागात कोरोना विरोधात प्रतिकारशक्ती दर्शवणारे अँटीबॉडीज – प्रतिपिंडे असतात. ही प्रतिपिंडे म्हणजे कोरोना विरोधात लढण्यास शरीराने रक्तात तयार केलेले सैनिकच असतात. कोरोना बाधित रुग्णाला कोरोना तून बरे झालेल्या व्यक्तीच्या शरीरातून प्लाझ्मा  मधून हे आयते सैनिक देणे म्हणजे प्लाझ्मा  थेरपी.

सध्या प्लाझ्मा  देण्याचे नियम काय ?

  • एखाद्याने रुग्णाच्या प्रेमा पोटी इच्छा व्यक्त केल्यास ( कंपॅशनेट बेसिस )
  • संशोधन प्रकल्पाचा भाग म्हणून
  • शासकीय रुग्णालयात

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

हा प्लाझ्मा  वेगळा कसा केला जातो ?
या प्रक्रियेला अफेरेसीस असे म्हणतात. या प्रक्रियेत अफेरेसीस करण्याचे मशीन उपलब्ध असलेल्या रक्त पेढीत रक्तातून – लाल पेशी , प्लेटलेट व प्लाझ्मा  वेगळा केला जातो.

प्लाझ्मा  दान कोण करू शकते –

  • प्लाझ्मा दान कोण करू शकत ? रुग्ण व दात्याचे एबीओ व आर एच रक्त गट सारखाच असावा.
  • रुग्ण पूर्ण बरा होऊन पहिले सारखे दिसले तेव्हा असून २८ दिवस झालेले असावे.
  • रक्तातील आय जी जी म्हणजे दीर्घकाळ टिकून राहणारी प्रतिकारशक्ती दर्शवणारे  अँटीबॉडीज – प्रतिपिंडांचे प्रमाण १: १६० असायला हवे.
  • कोरोना झाला होता याचे निदान आर टी पीसीआर या तपासणी ने निचित झालेले असावे.
  • दात्याच्या  एचआयव्ही, कावीळ बी, कावीळ सी व वीडीआर एल म्हणजेच सिफिलीस या टेस्ट निगेटिव्ह असाव्या.
  • शक्यतो पुरुष व अजून गरोदर न झालेल्या व सध्या गरोदर नसलेल्या स्त्रियांनीच प्लाझ्मा  दान करावे. कारण नंतर शरीरात काही प्रतिपिंडे निर्माण होऊ शकतात जी त्रास दायक ठरू शकतात.
  • दात्याला दान करताना ताप नसावा.
  • श्वास घेण्यास त्रास नसावा व ऑक्सिजनची पातळी नॉर्मल असावी.
  • आर टी पीसीआर निगेटिव्ह असल्याचे बघून रुग्ण पूर्ण बरा झाला आहे याची खातरजमाकरून घ्यावी.

एकदा प्लाझ्मा  दान केल्यावर परत किती दिवसांनी दुसर्यांदा करता येते –
एका वेळेला २०० ते ६०० एमएल प्लाझ्मा  दान करता येते. एकदा दान केल्यावर २ महिन्यांनी दुसऱ्यांदा दान करता येते.

कोरोनातून बरे झालेले कुठे प्लाझ्मा  दान करू शकतात –
प्लाझ्मा दान कोण करू शकत ? दिल्लीच्या धर्तीवर अजून खास प्लाझ्मा  डोनेशन बँक महाराष्ट्रात सुरु झालेली नाही. तसेच याची निश्चित माहिती नाही. पण अशा इच्छुकांनी दान करण्यासाठी जिल्हावार जागा ठरवून त्याची यादी शासनाने जाहीर करावी. सध्या १७ वैद्यकीय महाविद्यालयात याचा प्रयोग सुरु आहे. पण कुठल्या भागात नेमके कुठे जाऊन दान करायचे याची माहिती अजून उपलब्ध नाही.

प्लाझ्मा  कोणाला गरजेचे आहे ?
प्लाझ्मा  लाक्षाणविरहित , सौम्य व मध्यम स्वरूपाच्या कोरोना रुग्णाला गरजेचा नाही. फक्त गंभीर रुग्णालाच प्लाझ्मा  गरजेचा आहे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.

पुढची पातळी गाठण्याआधी

पुढची पातळी गाठण्याआधी

पुढची पातळी गाठण्याआधी देशातील सर्वाधिक मृत्यू व रुग्ण (३० टक्के) हे महाराष्ट्रात असल्याने; तसेच मृत्यूदर ४.५ टक्क्यांवर गेल्याने, आता मृत्यूचा आकडा कमी करण्यासाठी वेगळा, आक्रमक कृती आराखडा आखणे गरजेचे आहे. सरकार कितीही नाकारत असले, तरी राज्यात काही ठिकाणी समूह संसर्ग सुरू झाला आहे; त्यामुळे आधीचा संसर्ग रोखण्याबरोबर मृत्यूचा आकडा कमी करण्यास प्राधान्य द्यावे लागणार आहे. मृत्यू रोखण्यासाठी रुग्णांचे निरीक्षण, निगराणी, उपचारांत रणनीती आणि किमान समान कार्यक्रमाचा अभाव दिसतो आहे.

आजवर झालेल्या मृत्यूंपैकी ७० टक्के रुग्णांमध्ये इतर कुठला तरी आजार होता. त्याने उपचारांत गुंतागुंत झाली. या दुसऱ्या आजाराला ‘को-मॉर्बिडिटी’ असे म्हणतात. सर्वप्रथम करोनबरोबर इतर आजार असलेल्यांचे श्रेणीबद्ध तक्ते बनवून, जोखमीची कमी, मध्यम व तीव्र पातळी ठरवून, वर्गवारी करावी लागेल. सध्या सगळी आरोग्ययंत्रणा करोनाच्या कामात व्यग्र असल्यास आशा सेविका व परावैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या मदतीने, किमान हॉटस्पॉटमध्ये तरी करोनाची जोखीम वाढविणाऱ्या प्रमुख आजारांची तालुकानिहाय उपचार केंद्र सुरू करावी लागतील. काही प्रमाणात उच्च रक्तदाब, मधुमेह या आजारांसाठी हे ऑनलाइन पद्धतीनेही शक्य आहे. जर या दीर्घकालीन आजारांवर नियंत्रण मिळवले, तर करोनाचा अर्धा लढा इथेच जिंकता येईल; कारण आरोग्य यंत्रणेची बरीच शक्ती या अनियंत्रित आजारांच्या रुग्णांना वाचवण्यात खर्च होते. ती काही अंशी वाचली, तर इतर सर्व रुग्णांच्या निरीक्षणावर लक्ष केंद्रित करता येईल.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

पुढची पातळी गाठण्याआधी रुग्णांच्या सर्वेक्षणावर लक्ष ठेवता न आल्याने, बरेच रुग्ण रुग्णालयात उशिरा दाखल होत आहेत व यातील बऱ्याच जणांना ‘सायलेंट हायपॉक्सिया’ किंवा ‘हॅपी हायपॉक्सिया’ असल्याचे समजते आहे. म्हणजे, या रुग्णांना इतर काही लक्षणे नसतात; मात्र त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी घातक प्रमाणात घटलेली असते. हे टाळण्यासाठी घरीच विलगीकरण, दाखल असलेले सौम्य, मध्यम रुग्ण व होम क्वारंटाइनमध्ये असलेल्या करोना रुग्णाच्या थेट संपर्कात आलेल्या व्यक्ती या सर्वांची दिवसातून दोनदा सहा मिनिटांची चालण्याची चाचणी करणे अनिवार्य हवे. त्याचे यंत्रणेच्या माध्यमातून सर्वेक्षण झाले, तर बरेच जीव वाचू शकतात. यासाठी कुठल्याही डॉक्टर किंवा आरोग्य यंत्रणेचीही गरज नाही. ऑक्सिजन पातळी खालावण्याच्या आधी, चालण्याच्या चाचणीत हे रुग्ण लक्षात आल्यास त्यांना स्टिरॉइड व इतर औषधे देऊन, करोनाचा फुफ्फुसावरील परिणाम रोखण्यात यश येते आहे; परंतु बहुतेक वेळा रुग्ण ही वेळ निघून गेल्यावर व आजार वाढलेला असतो तेव्हा येतात. मग रुग्णाला वाचवणे अवघड होते.

करोनाचे मृत्यू कमी करण्यासाठी दाखल व डिस्चार्ज देण्याच्या निर्देशांचा आढावा घेऊन, त्यात बदल करणे आवश्यक आहे. राज्यात एक मोठा संभ्रम निर्माण झाला आहे, केंद्रीय आरोग्य खाते म्हणते, की रुग्णाला दाखल करण्यासाठी व घरी पाठवण्यासाठी लक्षणे सुरू झाली तो दिवस ग्राह्य धरावा. राज्यात मात्र बऱ्याच ठिकाणी चाचणी पॉझिटिव्ह आली तो दिवस ग्राह्य धरतात. चाचणीचा स्वॅब देण्यास व अहवाल येण्यात दोन ते तीन दिवस जातात आणि इथून पुढे दिवस मोजून निर्देश पाळले जातात. करोना रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण लक्षणे सुरू झाल्यापासून आठ ते १४ दिवस आहे; पण या दाखल करण्याच्या निकषावरून गोंधळ होत असल्याने, नेमके हे लक्ष ठेवण्याचे महत्त्वाचे दिवसच रुग्ण रुग्णालयात नसतात. यासाठी राज्याची दोन भागांत विभागणी करता येईल. रुग्ण जास्त झाल्याने ताण आलेली आरोग्य यंत्रणा म्हणजे प्रमुख महानगरे व दुसरा भाग अजून रुग्णसंख्या आटोक्यात असणारा उर्वरित राज्याचा भाग. रुग्णसंख्या जास्त आहे, तिथे सुरुवातीला दिवसातून दोनदा घरी ऑनलाइन सर्वेक्षण (जे सध्या होत नाही) व गरज भासल्यास दाखल करणे आणि चौदाव्या दिवशी सुटी. रुग्ण कमी, तिथे मात्र आरोग्य यंत्रणेवर ताण नसल्याने, चाचणी पॉझिटिव्ह आल्यापासून दाखल व बरे असल्यास लक्षणांपासून दहाव्या दिवशी सुटी. या सुधारणा केल्याने सध्या अनेक ठिकाणी चांगले रुग्ण दाखल व गंभीर रुग्ण आयसीयूच्या खाटा अनुपलब्ध असल्याने जागेच्या शोधात, हे चित्र बदलेल. रुग्णालयात जागा मिळण्यासाठी, रुग्णांना रुग्णवाहिकेतून फिरावे लागणार नाही.

          पुढची पातळी गाठण्याआधीसंसर्ग असूनही चाचणी निगेटिव्ह आल्याने दाखल न करणे / उशिरा दाखल करणे, यामुळेही मृत्यूदर वाढतो. एकाच घरात दोन-तीन जणांच्या मृत्यूच्या घटनाही घडतात. चाचणी निगेटिव्ह असली व डॉक्टरांना तरीही शंका वाटत असेल, तर संसर्गित व्यक्तीचा थेट संपर्क आलेल्यास करोना असल्याचे गृहित धरून, तातडीने उपचार करायला हवेत. उपचारांबाबत सरकारचे निर्देश योग्य असले, तरी ते सर्वत्र पाळले जात नाहीत. त्यातही, काहींनी स्थानिक पातळीवर सोयीने त्यात बदलही केल्याचे दिसते. यामुळे, एका चमूद्वारे सर्व रुग्णालयात उपचारांचा प्रोटोकॉल पाळला जात आहे किंवा नाही, याची वेळोवेळी थेट रुग्णालयात भेटी देऊन व केसपेपर तपासून चाचपणी होणे गरजेचे आहे. रेमडेसिव्हिर व टोकलिझूमॅब या औषधांमध्ये जीव वाचवण्याची क्षमता आहे; पण त्यांच्या तीव्र तुटवड्यामुळे प्रचंड काळा बाजार व साठेबाजी सुरू आहे. रेमडेसिव्हिरचा स्टॉक आला, की त्यातील मोठा भाग कॉर्पोरेट रुग्णालयांकडे जातो. शासकीय रुग्णालयातील गरीब रुग्णांच्या नशिबी हे औषध येतच नाही. रेमडेसिव्हिरचे पाच हजार रुपयांचे इंजेक्शन ४५ हजार रुपयांपर्यंत विकले जाते. सरकारने या औषधांचा साठा स्वतःच्या ताब्यात घेऊन, त्यांचे गरजेप्रमाणे केंद्रीय वितरण करावे, म्हणजे अतिदक्षता विभागातील गंभीर रुग्णांना ते मिळून, मृत्यूदर कमी होण्यास मदत होईल.

प्लाझ्मा थेरपीसाठी राज्याने १६ कोटी रुपये खर्चून, ‘प्रोजेक्ट प्लाटिना’ जाहीर केला आहे व हे फक्त ५०० रुग्णांसाठी केले जाणार आहे. बऱ्याच रक्तपेढ्यांमध्ये प्लाझ्मा वेगळा करण्याची सोय आहे. त्यांच्याकडील यंत्रणा वापरून, हा मोठा अनावश्यक खर्च वाचू शकतो व पाचशेऐवजी अनेकांना याचा लाभ दिला जाऊ शकतो. दिल्लीच्या धर्तीवर, मुंबई व प्रमुख बाधित महानगरांमध्ये करोनातून बरे झालेल्यांसाठी कमी खर्चात प्लाझ्मा डोनेशन बँक स्थापन करून, याचा उपचारांत मोठ्या प्रमाणात समावेश करायला हवा. रक्तातील हिमोग्लोबिन कमी असणाऱ्यांना, बऱ्या झालेल्या करोनाबाधित व्यक्तीचे रक्त देऊन, लाल पेशी व प्लाझ्मा दोन्ही एकत्रित देण्याचा विचार व्हायला हवा. याच्याही क्लिनिकल ट्रायल सुरू व्हायला हव्या. वेगळ्या प्लझ्मा थेरपीची मग गरजच उरणार नाही.
करोना बाधितांचे आकडे दिवसेंदिवस वाढत असताना, संसर्गाची या पुढची पातळी गाठण्याआधी मृत्यूदर आटोक्यात आणण्यासाठी, आता आकाश-पाताळ एक करायला हवे आणि यात क्षणाचाही विलंब होऊ नये.

सदरील माहिती आपण  महाराष्ट्र टाईम्स मध्येही वाचू शकता

घोरताना झोपेत श्वास गुदमरणे धोक्याचे

घोरताना झोपेत श्वास गुदमरणे धोक्याचे

घोरताना झोपेत श्वास गुदमरणे धोक्याचे घोरण्यामुळे झोपेत श्वास गुदमरण्याचा त्रास असणाऱ्यांमध्ये कोरोनाचा मृत्यू दर जास्त आहे. याचे साधे कारण म्हणजे कोरोना मध्ये श्वसन यंत्रणेवर परिणाम होऊन ऑक्सिजनची पातळी कमी होते व घोरताना श्वास गुदमरण्याचा त्रास असल्यास ऑक्सिजनची पातळी कमी होण्यात अजून एका कारणाची भर पडते. त्यामुळे कोरोना नसला तरी स्लीप एपनियाचे उपचार करायला हवेच. म्हणजे कोरोनामुळे मृत्युच्या प्रमाणात काही प्रमाणत घट होईल.

प्रत्येक घोरणे म्हणजे स्लीप एपनिया नव्हे
३० ते ४० % भारतीयांना घोरण्याची सवय असते. पण घोरणाऱ्या प्रत्येकाला स्लीप एपनियाचा त्रास नसतो. पण घोरणे हे स्लीप एपनियाचे व्यवच्छेदक लक्षण आहे. म्हणून घोरण्याचा त्रास असणाऱ्या सर्वांनी आपल्याला स्लीप एपनिया आहे की नाही याची खातरजमा करून घ्यावी.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

स्लीप एपनिया ची लक्षणे काय –

  • झोपताना घोरणे
  • रात्री शांत झोप न होणे दिवसा झोप येणे.
  • श्वास गुदमरून झोप मोडणे व जाग येणे.
  • सकाळी तोंड व घसा कोरडा पडलेला असणे.
  • सकाळी उठल्यावर डोके दुखणे.
  • दिवसा कामात लक्ष न लागणे.
  • मूड बदलत राहणे , नैराश्य , चिडचिड
  • घोरताना श्वास अडकत किंवा थांबत असल्याचे इतरांना जाणवणे.

स्लीप एपनिया ची कारणे –
-लठ्ठपणा , जास्त वेळ बैठी काम , व्यायामाचा अभाव , मनोरंजनाची बैठी साधन, हालचाल कमी करणाऱ्या भौतिक सुखसोयी हे याचे मूळ कारण आहे.
– या व्यक्तीं मध्ये लठ्ठपणा सोबतच घशाच्या आतील स्नायू झोपल्यावर शिथिल होतात व त्यामुळे  जीभ , पडजीभ मागे पडते  , श्वसन मार्गाच्या वरच्या स्नायू शिथिल झाल्याने एकमेकांच्या जवळ येऊन श्वसन मार्ग रुंद होतो व श्वास गुदमरतो.
– नाकाचे हाड वाढलेले किंवा मधला पडदा वाकलेला असणे.
– लहान मुलांमध्ये टॉन्सील वाढलेले असणे.

निदान –
घोरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला झोपेत श्वास गुदमरून ऑक्सिजन कमी होते आहे का हे बघण्यासाठी झोपेचा काही उपकरणांच्या सहाय्याने अभ्यास केला जातो. याला स्लीप स्टडी असे म्हणतात.

उपचार –
-जीवनशैली बदल – वजन कमी करणे , व्यायाम करणे.
– मद्यपान , धुम्रपान सोडणे.
– थंड वातावरणात झोपू नये.
– झोपतना पाठीवर न झोपता एका अंगावर झोपणे.
– एक घरी वापरता येण्यासारखे मशीन वापरून श्वसन मार्ग झोपताना मोठा ठेवणे.
– शस्त्रक्रिया करून श्वसन मार्गातील आतील स्नायू कमी करणे.

कोरोना साठी स्लीप एपनियाचे उपचार महत्वाचे –
घोरताना झोपेत श्वास गुदमरणे धोक्याचे स्लीप एपनियाचा व्यक्ती च्या पूर्ण तब्येतीवर फरक पडतो व कोरोनाची लागण झाली तर ऑक्सिजनचे प्रमाण कमी होणारे एक मोठे कारण स्लीप एपनियाच्या उपचाराने कमी होते व मृत्यू दर कमी होतो.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.