बालकांमध्ये कावासाकी आजारासारखी लक्षणे

बालकांमध्ये कावासाकी आजारासारखी लक्षणे

बालकांमध्ये कावासाकी आजारासारखी लक्षणे भारतात लहान मुलांमध्ये कोरोना अगदी सौम्य स्वरूपाचा असून घातक नसला तरी काही ठिकाणी कावासाकी या आजारासारखी लक्षणे कोरोना संसर्गाच्या ३ ते ४ आठवड्यांनंतर दिसून आली आहेत.

कावासाकी डीसिज् काय आहे?
कावासाकी हा ५ वर्षाखालील मुलांना होणारा व रक्तवाहिन्या, हृदयावर परिणाम करणारा आजार आहे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

कोरोनामध्ये नेमके काय होते ?
कोरोनामध्ये कावासाकी डीसिज होत नाही पण त्या आजारासारखी लक्षणे येतात आणि या आजाराप्रमाणे काही काळासाठी हृदयाभोवती सूज येऊन उपचारांची गरज पडू शकते. याचे प्रमाण खूप कमी म्हणजे १ लाखात १ असले तरी हे लवकरात लवकर ओळखता आले आणि त्वरित उपचार सुरु करता आले तर त्याचा फायदा होतो व गुंतागुंत टळते. म्हणून हे सर्र्वाना माहित असणे आवश्यक आहे.

कोरोनामध्ये कावासाकी सदृश्य आजार नेमका कधी होतो ?
हा आजार कोरोना संसर्ग सुरु असताना नव्हे तर कोरोना संपून गेल्यावर तीन ते ४ आठवड्यांनंतर होतो.

कोरोनानंतरच्या कावासाकी सदृश्य आजाराची लक्षणे काय ?
बालकांमध्ये कावासाकी आजारासारखी लक्षणे ताप, अंगावर लालसर चट्टे, चिडचिड करणे, अस्वस्थ वाटणे ही कोरोना नंतरच्या कावासाकी सदृश्य आजाराची मुख्य लक्षणे आहेत. मुलाला कोरोना संसर्ग झाल्यावर ३ ते ४ आठवड्यांनंतर ही लक्षणे आली तर त्वरित आपल्या बालरोगतज्ञांचा सल्ला घ्यावा. कोरोना संसर्ग नसेल व घरातील कोरोना संसर्गित व्यक्तीशी संपर्क आला व ही लक्षणे आली तरी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. घाबरून जाऊ नये. हा आजार कावासाकी नसून कावासाकीसारखा आहे, म्हणून मुलांवर कोरोना संसर्गानंतर लक्ष ठेवावे. याचे प्रमाण खूप कमी आहे व झाले तरी यावरउपचार करता येतात म्हणून मुळीच घाबरून जाऊ नये

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.

कोरोना नियमित आढळणाऱ्या लक्षणांपेक्षा वेगळी लक्षणे

कोरोना नियमित आढळणाऱ्या लक्षणांपेक्षा वेगळी लक्षणे

कोरोना नियमित आढळणाऱ्या लक्षणांपेक्षा वेगळी लक्षणे आपल्याला सर्दी , खोकला, ताप, श्वास घेण्यास त्रास , वास व चवीची क्षमता कमी होणे , जुलाब उलट्या  व श्वास घेण्यास त्रास होणे ही लाख्ने माहित आहेतच पण अशी काही वेगळी लक्षणे आहेत जे कोरोना मध्ये दिसून येत आहेत .

यात सर्वात आश्चर्य आहे तापा शिवाय कोरोना. काही डॉक्टर ज्यांना कोरोना संसर्ग झाला त्यांना ताप आलाच  नाही व इतर लक्षणे दिसून आली.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

  • फक्त तीव्र स्वरुपाची डोके दुखी.
  • तीव्र पाठदुखी व शरीरातील स्नायू दुखणे, त्यातच पायाचे खालंच्या बाजूचे म्हणजे काफ मसल्स दुखणे.
  • फक्त थकवा येणे.
  • डोळे येणे.
  • सर्दी खोकला असलेला माणूस दर वेळी सर्दी खोकला झाल्यावर असतो तसा न राहता खूप जास्त थकल्या सारखा वाटणे व सुस्त वाटणे.
  • ज्येष्ठ व्यक्तीं मध्ये झोप जास्त येणे किंवा सकाळी लवकर झोपेतून न उठणे. दिवसा ही झोपल्यावर खूप वेळा उठवावे लागणे.
  • सांधे दुखी.
  • दोन दिवसात तब्येत झपाट्याने बिघडणे व लघवी कमी होणे.
  • थकवा येऊन चेहरा निस्तेज वाटणे.

कोरोना नियमित आढळणाऱ्या लक्षणांपेक्षा वेगळी लक्षणे ही सर्व लक्षणे सुरुवात असून बऱ्याचदा ताप, खोकला, सर्दी ही या नंतर सुरु होते. म्हणून अशा कुठली ही वेगळी लक्षणे असल्यास लगेच घाबरून जाऊ नये पण स्वतःला इतरांना पासून वेगळे ठेवावे व आयसोलेशन करावे. तपासणी अहवाल कदाचित निगेटिव्ह येईल पण तो पर्यंत स्वतः वर लक्ष ठेवावे व विलगीकरणात राहावे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.

कमी बोला, हळू बोला, कोरोना टाळा!

कमी बोला, हळू बोला, कोरोना टाळा!

कमी बोला, हळू बोला, कोरोना टाळा!

कमी बोला, हळू बोला, कोरोना टाळा! तुम्ही एक मीटरपेक्षा जास्त अंतरावर आहात आणि बंद खोलीत कोणी मोठ्याने बोलले तर तुम्हाला कोरोनाबाधित व्यक्तीकडून संसर्ग होऊ शकतो.

आपण खोकणे, शिंकणे या बाबतीत काळजी घेतो पण अजून एक गोष्ट आहे जी कोरोनाचा संसर्ग वाढवण्यास कारणीभूत ठरू शकते. ती म्हणजे बोलणे. अनेकांना मोठ्याने बोलण्याची सवय असते. त्यातच फोनवर बोलताना ग्रामीण भागात अजूनही असा समज आहे कि मोठ्याने बोलल्याशिवाय मोबाईलवर आवाज नीट जात नाही. म्हणून सार्वजनिक ठिकाणी मोबाईलवर अनेक जण मोठ्याने बोलत असतात. तसेच मोबाईलवर बोलताना किंवा समोरासमोर बोलताना समोरच्याला नीट कळावे म्हणूनही अनेकजण नेमका त्याच वेळी मास्क खाली करतात.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

संशोधन काय सांगते
कमी बोला, हळू बोला, कोरोना टाळा! तुम्ही एक मीटरपेक्षा जास्त अंतरावर आहात आणि बंद खोलीत कोणी मोठ्याने बोलले तर तुम्हाला कोरोनाबाधित व्यक्तीकडून संसर्ग होऊ शकतो. मोठ्याने बोलल्याने १००० मायक्रो ड्रॉपलेट हवेत सोडले जातात व मास्क नसेल आणि खोली बंद असेल तेव्हा ते एकमीटरपेक्षा जास्त अंतरावर पसरतात. तसेच विषाणू १४ मिनिटे म्हणजे हळू बोलण्याच्या तुलनेत जास्त वेळ हवेत राहतात. जर हळू आवाजात बोलले आणि मास्क लावलेला असला तर ही शक्यता खूप कमी होते.

बोलताना पुढील काळजी घ्या

  • समोरच्याला ऐकू जाईल एवढ्याच आवाजात हळू बोला.
  • फोनवर व समोरासमोर बोलताना मास्क खाली करू नका.
  • उलट मास्कने नीट नाक, तोंड झाकले आहे का हे तपासा व मग बोला.
  • कमी बोला, सार्वजनिक ठिकाणी अनावश्यक बोलू नका. कार्यालयात, सार्वजनिक ठिकाणी ज्या गप्पा मारायच्या होत्या त्या घरी येऊन फोन वर किंवा व्हिडीओ कॉलवर मारा.
  • बोलताना एक मीटर पेक्षा लांब उभे राहा व चेहरा समोरासमोर येणार नाही असे उभे राहून किंवा बसून बोला.
  • कार्यालयात बैठक घ्यायची असल्यास दार, खिडक्या उघड्या ठेवा.
  • कोरोनाबाधित होम आयसोलेशनमध्ये असलेल्या व्यक्तीने समोरासमोर घरातील व्यक्तीशी बोलूच नये. काय हवे, नको ते बंद दाराआडून सांगावे कोरोनाबाधित व्यक्तीशी बोलायचेच असल्यास दोघांनी मास्क वापरून एकमेकांना ९० डिग्री मध्ये उभे राहून बोलावे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.

घरात फॅन्सी उत्पादने आणू नका !

घरात फॅन्सी उत्पादने आणू नका !

घरात फॅन्सी उत्पादने आणू नका ! कोरोनाच्या साथीनंतर अनेक कोरोना उत्पादनांची साथही बाजारात आली आहे. यातली बरीचशी उत्पादने अनावश्यक आहेत, विज्ञानवादी नाहीत. अशा उत्पादनांपासून सावध राहावे. दारे उघडण्यासाठी प्लॅस्टिक व इतर साहित्याचे आकडे : असे भासवले जाते की, दार उघडणे बंद करण्यासाठी आपला हात लागणार नाही. पण आकडा आपण परत खिशात ठेवणार म्हणजे त्या जागेच्या संपर्कातून आकडा संसर्गित झाला तर तो परत आपल्याच खिशात येऊन आपल्याला संसर्गित करणार आहे. मग या आकड्याचा उपयोग काय?

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

  • हेपा फिल्टर्स : घरातील कोरोना विषाणू फिल्टरद्वारे बाहेर काढण्याचा दावा केला जातो. बरेच हेपा फिल्टर फक्त बॅक्टेरिया फिल्टर करतात, विषाणू नाही. जे काही प्रमाणात विषाणू फिल्टर करतात त्यांची गरज फक्त मोठ्या शस्त्रक्रिया केल्या जातात अशा आॅपरेशन थिएटरमध्ये आहे.
  • वस्तू सॅनिटाइझ करण्यासाठी चेंबर्स : असे काही चेंबर्स निर्माण केले गेले आहेत, ज्यात अतिनील किरणे सोडली जातात व तुम्ही वस्तू आणली किंवा नोटा वापरण्याआधी यात काही वेळ ठेवायच्या व नंतर वापरायच्या, म्हणजे त्या निर्जंतुक होतील. हे निर्जंतुकीकरण अजून पूर्ण सिद्ध व्हायचे आहे. दुसरे असे की, अशा किती गोष्टी तुम्ही निर्जंतुक करणार आहात? त्या निर्जंतुककरण्याआधी कधी तरी, कुठे तरी तुमचा अशा वस्तूंशी संपर्क येणार आहे.
  • सॅनिटायझेशन चेंबर : कार्यालय, सोसायटी, घराबाहेर, बसच्या दारावर असे सॅनिटायझेशन चेंबर बसवले जात आहेत. पण अंगावर कुठल्याही सॅनिटायझेशनची फवारणी ही उपयोगाची तर नाहीच, शिवाय ती घातक ठरू शकते.
  • घरात फॅन्सी उत्पादने आणू नका ! टेम्परेचर सेन्सर मॉनिटर : तापमान तपासणी ही स्क्रीनिंगची ढोबळ पद्धत आहे. महागडे तापमानाचे स्क्रीनिंग बसवून काही साध्य होणार नाही. संसर्ग झाल्यावर तीन-चार दिवसांनी लक्षणे सुरू होतात. त्यानंतरही ताप २४ तास असेलच असे नाही. म्हणून अशा मशीन बसवू नये.
  • कोरोना क्लिनिंग सर्व्हिस : खास कोरोनासाठी येऊन घर स्वच्छ केले जाण्याच्या जाहिरीतींना भुलू नका. पाण्यात सोडियम हायपोक्लोराइड टाकले व साधे ग्लोव्हज घातले तरी हे सहज करता येते.
  • एसी क्लिनिंग : हेही एसीची जाळी गरम पाण्यातून काढून एक दिवस उन्हात ठेवून सहज शक्य आहे. साबणाने हात धुणे, शारीरिक अंतर, सॅनिटायझर, मास्क, चष्मा किंवा जोखीम जास्त असलेले काम असल्यास फेस शिल्ड पुरेसे आहे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.

सर्दी-खोकल्यापेक्षाही घातक आजार

सर्दी-खोकल्यापेक्षाही घातक आजार

सर्दी-खोकल्यापेक्षाही घातक आजार कुठल्या ही नव्या आजाराची साथ येते तेव्हा साथीच्या सुरुवातीच्या काळात जास्त मृत्यू होण्याची शक्यता असते. त्यासाठी सतर्कता व हा आजार टाळण्यासाठीचे प्रतिबंधक उपाय महत्त्वाचे असतात. कोरोना हा साध्या सर्दी-खोकल्यासारखा आजार असल्याचा घातक प्रचार समाज माध्यमांवर सुरू आहे. कोरोना हा माध्यमे, वैद्यकीय क्षेत्र, फार्मा कंपन्यांनी तयार केलेला बागुलबुवा आहे, त्याची फारशी दखल घेण्याची गरज नाही, असे सांगणारे एक गीत समाज माध्यमांवर सक्रिय आहे. हे सगळे गैरसमज आहेत. कोरोना हा सर्दी, खोकल्यासारखा नव्हे तर त्या पेक्षा नक्कीच जास्त घातक व दखलपात्र आहे. यासाठी काही गोष्टी समजून घ्या.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

१. सर्दी-खोकल्यापेक्षाही घातक आजार सर्दी, खोकला हा आधी अस्त्विात असलेल्या कोरोनामुळे ही होतो पण कोविड-१९ या नव्या विषाणूचा जागतिक व देशातील मृत्यूदर सर्दी, खोकल्यापेक्षा जास्त आहे.
२. कोविड-१९ हा नवीन विषाणू असल्याने अजून त्याच्या विरोधात सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण झालेली नाही व ती कशी असेल, अशी प्रतिकारशक्ती निर्माण होईल की नाही हे अजून माहित नाही. पण नियमित सर्दी खोकल्याचे तसे नाही.
३. कोविड-१९ ची इतरांना संसर्ग करण्याची क्षमता ही साध्या सर्दी, खोकल्यापेक्षा खूप जास्त आहे. म्हणून एका कोरोनाबाधितांकडून मोठ्या संख्येने लोक संसर्गित होतात.
४. सध्या सर्दी खोकल्याचा फुप्फुस, हृदय व किडनीवर विशेष परिणाम होऊन प्राणघातक स्थिती निर्माण होत नाही. पण कोविड-१९ मध्ये मात्र हे होऊ शकते.
५. ज्यांना इतर काही दीर्घकालीन आजार आहे, त्यांना साध्या सर्दी खोकल्यामुळे जीवाला धोका संभवत नाही पण अशांना कोरोनामुळे मात्र धोका संभवतो. अशा दीर्घकालीन आजार असणाऱ्यांची संख्या देशात प्रचंड आहे व त्यांच्या जीवाला धोका असल्याने कोविड-१९ नक्कीच दखलपात्र आहे.
कुठल्या ही नव्या आजाराची साथ येते तेव्हा साथीच्या सुरुवातीच्या काळात जास्त मृत्यू होण्याची शक्यता असते. त्यासाठी सतर्कता व हा आजार टाळण्यासाठीचे प्रतिबंधक उपाय महत्त्वाचे असतात. म्हणूनच असे संदेश किंवा कोरोना हा काहीही नसून बागुलबुवा, षडयंत्र असल्याच्या पोस्ट समाजमाध्यमांवर फॉरवर्ड करू नये व आरोग्य मंत्रालय, जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलेली सर्व काळजी घ्यावी.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.

फक्त ३ मिनिटे चाला; अन् चाचणी करा

फक्त ३ मिनिटे चाला; अन् चाचणी करा

फक्त ३ मिनिटे चाला अन् चाचणी करा या स्टेजमध्ये रुग्ण व डॉक्टरच्या हे लक्षात आले तर लवकर उपचार सुरु करून रुग्णाचा जीव वाचू शकतो. यासाठी ‘सायलेंट हायपोक्सिया’ची प्रक्रिया शरीरात सुरु झाली आहे, हे तपासण्याचा एक मार्ग म्हणजे ३ मिनिट वॉक टेस्ट.


फक्त ३ मिनिटे चाला अन् चाचणी करा कोरोनाचा संसर्ग झाल्यावर ‘सायलेंट हायपॉक्सिया’ म्हणजेच कुठल्याही लक्षणांशिवाय शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होणे, हे एक घातक लक्षण आहे. बरेचदा कोरोना संसर्गित झालेल्या व्यक्तीने पल्सऑक्सिमीटरने ऑक्सिजनची पातळी तपासली तर त्यावर सुरुवातीला हे लक्षात येत नाही. म्हणजे शरीरातील ऑक्सिजन अजून कमी झालेले नसते, पण फुप्फुसांवर कोरोनाचा परिणाम सुरु झालेला असतो. म्हणजेच ऑक्सिजनची पातळी कमी होण्यासाठी आजार वाढण्याची प्रक्रिया वेगाने सुरु झालेली असते. या स्टेजमध्ये रुग्ण व डॉक्टरच्या हे लक्षात आले तर लवकर उपचार सुरु करून रुग्णाचा जीव वाचू शकतो. यासाठी ‘सायलेंट हायपोक्सिया’ची प्रक्रिया शरीरात सुरु झाली आहे, हे तपासण्याचा एक मार्ग म्हणजे ३ मिनिट वॉक टेस्ट.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

३ मिनिट वॉक टेस्ट कशी करावी?

  • चालण्याअगोदर १० ते १५ मिनिटे शांत बसून राहावे व पल्स आॅक्सिमीटरने शरीरातील आॅक्सिजनची पातळी आधी तपासावी. त्यानंतर टायमर लावून नॉर्मल वेगाने ३ मिनिटे चालावे. त्यानंतर परत आॅक्सिजनची पातळी मोजावी. चालण्याआधी व चालण्यानंतर आॅक्सिजनच्या पातळीमध्ये ३ ते ४ चा फरक असला किंवा ते ९४ च्या खाली असेल तर आपल्या डॉक्टरांशी संपर्क करावा. असे असेल तर पुढील २४ तासांत आॅक्सिजनची पातळी अजून खाली जाण्याची शक्यता लक्षात घेऊन ही धोक्याची घंटा समजावी.
  • ३ मिनिट वॉक टेस्ट कोणी करावी?
  • कोरोना संसर्ग झालेले
  • लक्षणविरहीत रुग्ण
  • सौम्य तसेच मध्यम स्वरूपाची लक्षणे असलेले
  • होम आयसोलेशनमध्ये असलेले
  • कोरोना चाचणीसाठी स्वॅब दिला आहे पण अजून अहवाल आलेला नाही.

कोणी करण्याची गरज नाही ?                                          

  • संपर्कात आलेले व क्वारंटाइनमध्ये असलेल्यांनी तसेच इतर कोणाचा संपर्क नसलेल्या सर्व सामन्यांनी नियमित ही टेस्ट करू नये.
  • ही टेस्ट पॉझिटिव्ह आली तरी लगेच घाबरून जाऊ नये, कारण लवकर निदान झाल्याने पुढे बरेच उपचार करता येतात.
  • ३ मिनिट वॉक टेस्ट पॉझिटिव्ह पण कोरोनामुळे आॅक्सिजन घटल्याने नव्हे; तर इतर काही कारणे आहेत-
  • शरीरात हिमोग्लोबिन कमी असणे (अ‍ॅनिमिया), फुप्फुस आधीपासून आकसलेले असणे (फायब्रोसिस ), तीव्र स्वरूपाचा हृदयरोग.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.

लहान मुलांमधील खोकला

लहान मुलांमधील खोकला

लहान मुलांमधील खोकला बालरोगतज्ज्ञांच्या बाह्यरुग्ण विभागात ६० टक्के रुग्ण खोकल्याचे असतात. खोकला आईसाठी खूप काळजीत टाकणारे लक्षण. त्यातच काही वेळा खोकला बरेच आठवडे जात नाही. त्यामुळे आम्ही बालरोगतज्ज्ञ खोकल्याचे निदान करताना आमची विचार प्रक्रिया काय असते, हे आईने समजून घेतल्यास आईची काळजी कमी होते. त्यासाठी घरी खोकल्याबद्दल बाळाचे नीट निरीक्षण करून आईने डॉक्टरांना त्याचा वैद्यकीय इतिहास समजून सांगावा. म्हणजे योग्य निदान होऊन योग्य उपचार मिळतात. 

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

– खोकला अचानक सुरू झाला की हळूहळू? 
– खोकला नुकताच सुरू झाला की जुना आहे? 
– ओला आहे की कोरडा? 
– ताप आहे की नाही? 
– सर्दी आहे की नाही? 
– सोबत इतर लक्षणे काय आहेत? 
– दिवसाच्या कोणत्या वेळेला खोकला येतो? 
– खोकला वारंवार येतो का? 

या प्रश्‍नांची उत्तरे मिळाल्यावर अगदी गणिती पद्धतीने खोकल्याचे निदान करता येते. 

– कोरडा खोकला + सर्दी – ताप (म्हणजे तापाशिवाय फक्त सर्दी आणि खोकला) = सहसा अॅलर्जी. 
– कोरडा खोकला + सर्दी + ताप = विषाणूजन्य व्हायरल सर्दी खोकला. 
– कोरडा खोकला + इतर भागाची लक्षणे, उदाहरणार्थ जुलाब = शरीरात विषाणू संसर्ग – व्हायरल इन्फेक्शन. 
– व्हायरल सर्दी व ताप गेला, पण खोकला जात नाही, श्‍वास घेतला की खोकला येतो – व्हायरल सर्दी
खोकल्यामुळे श्‍वसनाचा वरचा भाग संवेदनशील झाल्यामुळे येणारा खोकला. हा बऱ्याचदा तीन ते चार आठवडेही चालतो व आपोआप कमी होतो. 
– हा खोकला ओला झाला तर – कदाचित बॅक्टेरियल इन्फेक्शन झाले आहे. 
खोकल्यासोबत जास्त प्रमाणात ताप, श्‍वास घेण्यास त्रास, बाळ जेवण करत नाही व अस्वस्थ वाटते – न्यूमोनिया. 

खोकल्याच्या वेळेवरून कारणे – 

-झोपल्यावर अर्ध्या ते एक तासाने खोकला येऊन बाळ उठते, खोकला आल्यामुळे नीट झोप लागत नाही व दुपारी झोपले तेव्हाही असे होते – नाकातील सर्दी खाली घशात पडत असल्याने खोकला – याला पोस्ट नेझल ड्रीप असे म्हणतात. 
– मध्यरात्री दोननंतर, पहाटे चारच्या सुमारास व संध्याकाळी खोकला येणे – बाल दमा/अॅलर्जीमुळे. 

कसा सुरू झाला यावरून कारणे – 
– बाळ आधी नॉर्मल होते व एकदम ठसका लागून खोकला सुरू झाला – घशातून फुफ्फुसात कुठली तरी गोष्ट जाणे. (फॉरेन बॉडी) 
– हळूहळू सुरू होणे – विषाणूजन्य व्हायरल सर्दी खोकला, न्यूमोनिया. 
– ३-४ आठवडे लांबलेला खोकला – डांग्या खोकला/व्हायरल सर्दी खोकल्यानंतर श्‍वसन मार्गाची संवेदना वाढल्यामुळे येणारा खोकला. 

लहान मुलांमधील खोकला यापलीकडे अजून एक कारण असते जे निदान करण्यास अजून खोलात जाऊन इतिहास घ्यावा लागतो, तो म्हणजे कुठल्याही आजार/संसर्गामुळे नसलेला मानसिक कारणामुळे येणारा खोकला – 
यात मूल डॉक्टरांच्या केबिनमध्ये/रिसेप्शनमध्येच जास्त खोकते, खोकला वरवरचा जाणवतो/इतर वेळी खेळताना/टीव्ही बघताना खोकला येत नाही. पालकांनी बघितले व खोकल्याविषयी विचारले तरच खोकला येतो व बाळाला कुठला तरी तणाव असतो. या खोकल्याला फक्त समुपदेशनाची गरज असते. 

सदरील माहिती आपण सकाळ मध्येही वाचू शकता.

फाविपिरावीर औषध : म्हणजे म्हैस अजून पाण्यातच

फाविपिरावीर औषध : म्हणजे म्हैस अजून पाण्यातच

फाविपिरावीर औषध : म्हणजे म्हैस अजून पाण्यातच “नुकतेच भारतात फाविपिरावीर या औषधाची विक्री करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. विशेष म्हणजे हे औषध तोंडावाटे घेण्याचे आहे व सौम्य व मध्यम स्वरूपाची लक्षणे असलेल्यांनी घेण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. पण या औषधाविषयी सर्व सामान्यांनी व डॉक्टरांनी अत्यंत सतर्कतेने पाऊले टाकावी व या विषयीच्या सर्व गोष्टी नीट समजून घ्याव्या –

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

  • सध्या हे औषध फक्त पुढील मध्यम व सौम्य कोरोना रुग्णांसाठीच वापरले जाते आहे :
  • लठ्ठपणा ,
  • वय ६० वर्षांच्या पुढे
  • मधुमेह / उच्च रक्तदाब /फुप्फुसाचे आजार
  • प्रतिकारशक्ती कमी असलेल्या स्थिती
  •  न्यूमोनिया
  • सिरीयस व्हेंटिलेटरवरील रुग्ण व आॅक्सिजनची पातळी ९३ खाली असलेल्यांना हे औषध दिले जात नाही.
  •  हे औषध घेतले की आपल्या शरीरातील कोरोना नाहीसा होणार व कोरोनाचा धोका १०० % नाहीसा होणार असे मुळीच समजू नये. म्हणजे जसे मलेरियासाठी क्लोरोक्विन किंवा टायफॉइसाठी सेफट्रायएक्झोन आहे तसे कोरोनासाठी हे औषध नाही.
  •  या औषधाला मान्यता देताना मर्यादित रुग्णांवरील प्रयोगाचा आधार घेऊन मान्यता दिली असली तरी ही मान्यता महामारीच्या दृष्टिकोनातून देण्यात आली आहे. भारतात केवळ १५० रुग्णांवर प्रयोग करण्यात आला आहे.
  •  या औषधाची मान्यता प्रक्रिया जलद मान्यता प्रक्रियेअंतर्गत करण्यात आली आहे. म्हणजेच आजाराच्या महामारीचे स्वरूप , तीव्रता आणि इतर चांगल्या उपचाराचा अभाव लक्षात घेऊन तातडीची मान्यता दिलेली आहे.
  • ही औषध लक्षणविरहीत रुग्णांनी मुळीच घेऊ नये.
  •  जरी हे औषध सौम्य व मध्यम स्वरूपाच्या रुग्णांसाठी सांगितले गेले असले तरी प्रयोग करताना प्रयोगामध्ये परदेशातील रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना वर व मर्यादित रुग्णसंख्येवर प्रयोग झाले आहे.
  •  फाविपिरावीर औषध : म्हणजे म्हैस अजून पाण्यातच मान्यता घेताना एवढेच एकच औषध द्या असे सांगितले असले तरी प्रयोग करताना मात्र या सोबत इंटरफेरोन अल्फा हे महागडे औषध वाफेच्या स्वरूपात रुग्णाला देण्यात आले आहे.
  •  संपर्कात आलेल्यांसाठी हे औषध मुळीच वापरले जाऊ नये. त्यासाठी याला मान्यता ही दिलेले नाही.
  •  कोरोना संसर्गित होम आयसोलेशनमध्ये असलेल्यांनी स्वत:हून हे औषध घेऊ नये. त्यांना हे औषध द्यायचे कि नाही याचा निर्णय उपचार करणाऱ्या डॉक्टरवर व आरोग्य खात्यावर सोडावा. डॉक्टर योग्य निर्णय घेतील.
  •  हे औषध किडनीचे आजार, यकृताचे आजार, गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांमध्ये वापरता येते.
  •  हे औषध टीबीचे औषध पायरॅझिनॅमाइड व दम्यासाठी नियमित घेतले जाणारे औषध झ्र थिओफायलीन सोबत घेतल्यास दुष्परिणाम होऊ शकतात.
  •  गरोदर राहण्याच्या बेतात असलेल्या स्त्रिया व जोडप्यांनी उपचार सुरु असताना व त्यानंतर ७ दिवस संतती नियमनाची साधने वापरावी. कारण उपचार सुरु असताना किंवा किंवा त्या ७ दिवस गर्भधारणा झाल्यास जन्माला येणाºया बाळामध्ये जन्मजात व्याधी होऊ शकतात.
  •  गाऊट या सांधेदुखीचा आजार, पूर्व इतिहास व रक्तात युरीक अ‍ॅसिडचे प्रमाण जास्त असलेल्यांमध्ये हे औषध सांभाळून दिले जावे. कारण या औषधामुळे अशा रुग्णांमध्ये युरीक अ‍ॅसिडची पतळी वाढू शकते.
  • हे औषध घेण्याआधी एका कन्सेंट फॉर्मवर म्हणजेच परवानगी पत्रावर रुग्णाला सही करावी लागते. हा फॉर्म शक्यतो मराठीत मागून त्यावर वाचून सही करावी.
  • लहान मुलांसाठी हे औषध वापरण्याचे निर्देश नाहीत. तसेच लहान मुलांमधील बहुतांश केसेस या लक्षणविरहीत किंवा सौम्य असल्याने लहान मुलांमध्ये कुठल्याही औषधाची गरज नाही.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.

‘कोरोना’साठी वेगळा आरोग्य विमा घ्यावा का?

‘कोरोना’साठी वेगळा आरोग्य विमा घ्यावा का?

‘कोरोना’साठी वेगळा आरोग्य विमा घ्यावा का? कोरोना’साठी जर आपल्याला खासगी रुग्णालयात उपचार घ्यायचे असतील व शासनाने जरी या उपचाराच्या खर्चावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला असला, तरी खासगी रुग्णालयातील काही रुग्णांचा खर्च ५ लाखांपर्यंत ही गेला आहे. याचे कारणही तसेच आहे. जर कोरोनाचा रुग्ण अत्यवस्थ झाला व त्याला महागड्या औषधांची गरज पडली, तर हा खर्च शासनाने ठरवलेल्या दरात समाविष्ट नाही व रुग्णालयाला वेगळे पैसे आकारावे लागतातच. शिवाय, जर व्हेंटिलेटरची गरज पडली तर खर्च वाढतोच. म्हणून यासाठी काही विमा कंपन्यांनी वेगळा कोरोनासाठी विमा सुरू केला आहे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

‘कोरोना’साठी वेगळा आरोग्य विमा घ्यावा का? हा विमा घेताना पुढील गोष्टी लक्षात घ्याव्या.जर आपला आधी काढलेला आरोग्य विमा असेल व याचे प्रीमियम आपण नियमित भरत असाल, तर वेगळ्या कोरोना आरोग्य विम्याची गरज नाही.आरोग्य विमा असल्यास तो प्रत्येक व्यक्तीला किमान ५ लाखांची सुरक्षा देणारा असावा किंवा नसल्यास तो वाढवून घ्यावा. जर आरोग्य विमा नसेल तर वेगळा कोरोना विमा घ्यावा. कोरोना झाल्यास किंवा घरात इतर कोरोनाची जोखीम वाढवणारे आजार असलेली व्यक्ती असल्यास त्यासाठी उपचाराचे आर्थिक नियोजन करून ठेवावे. काही खर्च कमी करून कधीही वापरता येतील, अशी पैशांची तजवीज असावी. कोरोना विमा वार्षिक रुपये १५० पासून ते ५००० पर्यंत उपलब्ध आहे. व यात २५,००० पासून ते ५ लाखांपर्यंत विमा सुरक्षा आहे. यात काही सरसकट पूर्ण ठरवलेली विम्याची रक्कम देण्यात येते, काही विम्यामध्ये भरती होण्याची गरज व खर्चाप्रमाणे देण्यात येते. काही विमा हा तुम्ही काही विशिष्ट दुसऱ्या व तिसºया पातळीची शहरे किंवा ग्रामीण भागात राहात असाल त्यांच्या साठीच आहेत व काही विम्यामध्ये अतिदक्षता विभागात दाखल झाल्यास किंवा व्हेंटिलेटरच गरज पडल्यास विम्याची रक्कम मिळत नाही. म्हणून विमा घेताना या गोष्टींचा खुलासा करून घ्यावा.प्रत्येक विम्याला लागू होण्यास विमा काढल्यापासून १४-१६ दिवसांचा अवधी आहे.बºयाच विम्यामध्ये संपर्क आल्यावर क्वारंटाइन व्हावे लागले तर आजारी पडल्यावर मिळणार त्याच्या ५०% रक्कम दिली जाते. शक्यतो क्वारंटाइनमध्ये ही विमा सुरक्षा देणाºया पॉलिसीची निवड करावी.शक्यतो ज्या विमा कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशो म्हणजे म्हणजे क्लेम अंतर्गत पैसे देण्याचे प्रमाण जास्त आहे त्या कंपनीचा विमा घ्यावा. ही सर्व विमा कंपन्यांची माहिती कफऊअक उपलब्ध करून देते.प्रत्येक विम्याचा काळ फक्त१ वर्ष असतो याची नोंद घ्यावी.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.

कुठल्याही कंपनीचे आयुर्वेदिक औषध अजून कोरोनावर रामबाण व अंतिम उपचार नाही

कुठल्याही कंपनीचे आयुर्वेदिक औषध अजून कोरोनावर रामबाण व अंतिम उपचार नाही

कोरोना उपचारात व लक्षणविरहित कोरोनारुग्णांसाठी कसा उपयोग करू शकते, याविषयी आयुष मंत्रालय कार्य करते आहे. तसेच, महाराष्ट्रातील वैद्यांचा टास्क फोर्स यावर काम करतो आहे.

कुठल्याही कंपनीचे आयुर्वेदिक औषध अजून कोरोनावर रामबाण व अंतिम उपचार नाही, एका प्रसिद्ध आयुर्वेद कंपनीने मोठी जाहिरात करून बाजारात आणलेले कोरोनावरील औषध अजून कोरोना साठीचे अंतिम औषध किंवा रामबाण उपाय म्हणून मान्यता मिळालेले नाही. आयुष मंत्रालय व आयसीएमआरने या औषधाची जाहिरात थांबवावी, असे निर्देशही या कंपनीला दिले आहेत.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

कुठल्याही कंपनीचे आयुर्वेदिक औषध अजून कोरोनावर रामबाण व अंतिम उपचार नाही आयुर्वेदाचा कोरोना उपचारात व लक्षणविरहित कोरोनारुग्णांसाठी कसा उपयोग करू शकते, याविषयी आयुष मंत्रालय कार्य करते आहे. तसेच, महाराष्ट्रातील वैद्यांचा टास्क फोर्स यावर काम करतो आहे.संबंधित कंपनीने आणलेल्या औषधांचे ट्रायल घेतले आहे, असा दावा त्यांच्याकडून केला गेला आहे. पण, एखादे क्लिनिकल ट्रायल यशस्वी आहे व संबंधित औषध आता वापरले जाऊ शकते, यासाठी काही निकष असतात. यात किती लोकांवर ते केले आहे (सॅम्पल साईज), त्या अभ्यासाचा प्रकार कसा होता (स्टडी डिझाईन), त्या क्लिनिकल ट्रायलचे विश्लेषण करण्यासाठी हाती आलेल्या निकालाचे कसे विश्लेषण केले आहे. (स्टॅटीस्टीकल मेथड), त्याचे नंतर टीकात्मक विश्लेषण (क्रिटीकल अ‍ॅनॅलिसीस) झाले का व याचे स्टॅस्टीटीक्स म्हणजे संशोधनातील आकडेवारीचे विश्लेषण करणाऱ्यां कडून चाचपणी व इतर तज्ज्ञांकडून मते मागवणे (पीर रिव्हीव्यू) या कुठल्याही पद्धतीने या औषधाचे क्लिनिकल ट्रायल केलेले दिसत नाही. या कंपनीचे आयुर्वेदिक औषधच काय, पण इतर कुठले ही अ‍ॅलोपॅथीचे औषध ही अजून या निकषात बसून कोरोनासाठी शंभर टक्के उपचार म्हणून मान्यता पावलेले नाही. नुकतेच जे औषध एका कंपनीने बाजारात आणले आहे त्याचा प्रचार समाज माध्यमांवर व वैयक्तिक पातळीवर सुरु झाला आहे. पण, अशा औषधापासून सर्वांनी सावध राहायला हवे. आयुर्वेद नक्कीच पुरातन चिकित्सा पद्धती आहे व आयुष मंत्रालय यावर वेळोवेळी निर्देश देते आहे. ही मार्गदर्शक तत्त्वे आयुष मंत्रालय, भारत सरकारच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.म्हणून ही मार्गदर्शक तत्त्वे सोडूनइतर कुठले ही कंपनीचे कोरोनासाठी उपाय म्हणून बाजारात आणलेले औषध घेऊ नये. तसेच आयुष मंत्रालयाचे बहुतांश निर्देश हे प्रतिबंधासाठी आहेत. हे घेत असताना अ‍ॅलोपॅथीचे उपचार सोडू नये.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता