कोरोना होण्याची जोखीम कशी तपासावी?

कोरोना होण्याची जोखीम कशी तपासावी?

कोरोना होण्याची जोखीम कशी तपासावी? कोरोनाची जोखीम वाढवणारे काही आजार / इतर घटक आहेत. पण हे नेमके तपासून जोखीम किती आहे हे ओळखण्यासाठी खालील तक्त्याचा उपयोग करता येईल –

जोखीम  वाढवणारे घटक मार्क
वय ५० – ५९ वर्षे
वय ६० च्या पुढे
पुरुष
गरोदर असल्यास
ह्रदयाचा आजार – उच्च रक्तदाब / ह्रदयाचे ठोके अनियमित असणे – एट्रीयल फिब्रीलेशन / हार्ट फेल्यर /आधी ह्र्दय विकाराचा झटका आलेला असणे / अर्धांगवायू / तात्कालिक मेंदूला रक्त प्रवाह कमी झाल्याचा पूर्व इतिहास ( ट्रांन्झीयंट इशेमिक अॅटॅक)
मधुमेह टाईप १ व २
दीर्घकालीन फुफ्फुसाचे आजार ( दमा / सीओपीडी / इंटरस्टीशियल लंग डिसीज )
दीर्घकालीन किडनीचे आजार / डायालिसीस चालू असणे  ( कुठलीही स्टेज )
सिकल सेल / थॅलॅसीमिया / इतर तत्सम रक्ताचे आजार
लठ्ठपणा – बॉडी मास इंडेक्स ३० पेक्षा जास्त / पोटाचा घेर पुरुष – ९० सेमी , स्त्रिया – ८८ सेमी पेक्षा जास्त असणे.
कॅन्सर
एकूण मार्क  
  • 0- ३   –         जोखीम आहे पण कमी
  • ४ – ६    –         जास्त जोखीम
  • ७  पेक्षा जास्त – खूप जास्त जोखीम

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

टीप –

  • कोरोना होण्याची जोखीम कशी तपासावी? वरील तक्ता देशातील ६ महिन्याच्या साथीच्या अभ्यासावरून काढला आहे व पुढे यात बदल होऊ शकतील.
  • जे यात बसत नाहीत त्यांना जोखीम नाहीच असे समजण्याचा कारण नाही व त्यांनी ही प्रतिबंधक उपाय वापरायचे आहेतच.
  • जोखीम आहे हे घाबरण्यासाठी नाही तर अधिक काळजी घेण्यासाठी व सावध होण्यासाठी आहे.
  • जोखीम असली तरी कमी करता येण्यासारखे व नियंत्रित करता येण्यासारखे आजार नियंत्रित केले तर जोखीम कमी होते.
  • गरोदर असणे जोखीम वाढवणारे असले तरी या काळात गर्भधारणेस हरकत नाही.
  • वरील जोखीम वाढवणारे घटक नाही म्हणजे कोरोना होणारच नाही असे नाही.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

झटके आणि औषधोपचार

झटके आणि औषधोपचार

झटके आणि औषधोपचार झटक्यांचे निदान झाल्यावर त्यावर त्याचा प्रकार बघून योग्य औषध सुरू करावे लागते. गोळ्या सुरू झाल्यावर पालकाला एक डायरी करावी लागते. सुरुवातीला उपचार ठरलेल्या डोसपासून सुरू करूनही झटके येत असल्यास डोस वाढवावा लागतो किंवा एकापेक्षा जास्त झटक्यांचे औषध सुरू करावे लागते. बालरोगतज्ज्ञ किंवा लहान मुलांचे झटक्याचे तज्ज्ञाच्या (पिडीयाट्रीक न्यूरॉलोजीस्टच्या) सल्ल्याने उपचार पूर्ण केल्यास झटके पूर्ण बरे होतात.

उपचार किती काळ घ्यावे लागतात
सहसा उपचार २ वर्ष झटके बंद होईपर्यंत घ्यावे लागतात. काही झटक्यांच्या प्रकारामध्ये २ वर्षांपेक्षा जास्त काळ औषधे देण्याची गरज पडू शकते. औषधे अचानक बंद करता येत नाही. हळूहळू बंद करावी लागतात. 

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

उपचार न घेण्याची मुख्य कारणे

  • अनेकदा उपचार सुरू केल्यावर झटके बंद होतात. ते बंद झाल्याने पुढे उपचारांची गरज नाही असे पालकांना वाटते व उपचार थांबविले जातात. काही काळानंतर परत झटके येतात. म्हणून आपल्या डॉक्टरांच्या परवानगी शिवाय झटक्यांची औषधे बंद करू नये. 
  • काही पालक औषधांचे दुष्परिणाम होतील या भीतीने औषधे बंद करतात. 

औषधांच्या दुष्परिणामांचे काय?
आता झटक्याची नवी औषधे आहेत त्यांचे दुष्परिणाम खूपच तुरळक आहेत. काही  दुष्परिणाम जाणवले, तर औषध बदलून देता येते. म्हणून साइट इफेक्टपेक्षा इफेक्ट महत्त्वाचा मानून दुष्परिणामांना घाबरू नये. दुष्परिणामांपेक्षा झटके आल्यास ते जास्त घातक ठरू शकतात. 

मुलांनी काय काळजी घ्यावी

  • झटके येत असलेल्या मुलांनी पाणी, उंची, आग यांपासून सावध राहावे. कारण अशा गोष्टींच्या जवळ असताना झटके आल्यास ते घातक ठरू शकते. 
  • अशा मुलांनी सहसा पोहणे टाळावे, नॉर्मल मैदानी खेळ ते खेळू शकतात. 
  • झटके येत असल्याची माहिती शाळेत द्यावी. शाळेत झटके आल्यास काय करायचे व कुठल्या क्रमांकावर फोन करायचा ही माहिती दिलेली असावी.
  • अशा मुलांनी रात्री उशिरा जास्त वेळ टीव्ही, फोन बघणे किंवा जास्त वेळ व्हिडिओ गेम खेळणे टाळावे. 

झटक्यांसाठी शस्त्रक्रिया
झटके आणि औषधोपचार झटक्यांसाठी शस्त्रक्रियेचा पर्याय असला तरी प्रत्येकाला शस्त्रक्रियाची गरज नसते. काही विशिष्ट प्रकारचे झटके आणि त्यातच मेंदूच्या विशिष्ट भागातून झटक्यांच्या लहरी येत असल्यासच करता येते. कुठल्याही झटक्यांना शस्त्रक्रिया करता येत नाही व यात विशेष प्रशिक्षण घेतलेले न्यूरोसर्जन अनेक गोष्टी बघून शस्त्रक्रियेला लायक रुग्ण निवडतात. बहुतांश झटके औषधोपचाराने बरे होतात.

गैरसमज – झटके आल्यावर कानात चांदी, लोखंडाची बाळी घालणे हे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर दिसते. हा गैरसमज असून औषधोपचाराशिवाय कोणत्याही इतर उपायांनी झटके कमी होत नाहीत.

सदरील माहिती आपण सकाळ मध्येही वाचू शकता

डेक्झामिथॅझोन म्हणजे जादूची छडी नव्हे

डेक्झामिथॅझोन म्हणजे जादूची छडी नव्हे

डेक्झामिथॅझोन म्हणजे जादूची छडी नव्हे डेक्झामिथॅझोन हे औषध ‘कोविड-१९’ या महामारीवर रामबाण औषध ठरते आहे, अशा मथळ्याची बातमी एका परदेशी इंग्रजी वृत्तसमूहाने प्रकाशित केली. ती सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली. पण यातून असा अर्थ कोणीही काढू नये की कोरोना झाला की, लगेच डेक्झा हे औषध द्यायचे… तसेच हे औषध दिले की लगेचच आजार बरा होणार. हे औषध मग प्रतिबंधासाठीही वापरता येईल, असाही अनेकांचा गैरसमज होण्याच्ची शक्यता आहे.डेक्झामिथॅझोन हे औषध आधीपासूनच कोरोना संसर्गावरील उपचारात वापरले जाते. जे रुग्ण गंभीर होतात, ज्यांना ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटरची गरज पडते अशांनाच दिले जाते. काही रुग्णांमध्ये प्रतिकारशक्तीचा व कुठल्याही विषाणू संसर्ग झाल्यास शरीरात आवश्यक प्रमाणात निर्माण होणारे सायटोकाइन हा घटक जास्त प्रमाणात निर्माण होतो व या घटकाचे वादळ येते, ज्याला सायटोकाइन स्टॉर्म असे म्हणतात.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

डेक्झामिथॅझोन म्हणजे जादूची छडी नव्हे यासाठी डेक्झामिथॅझोन किंवा काही वेळा मिथाइल प्रीडनीसेलोन हे स्टेरॉइड वापरले जातात. पण लक्षणविरहीत व सौम्य तसेच मध्यम स्वरूपाचे लक्षण असलेल्या रुग्णांना याची गरज नसते.फक्त डेक्झामिथॅझोनक नव्हे इतर अनेक गोष्टी या ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांसाठी वापरल्या जातात… ज्या जीव वाचवण्यास उपयोगी ठरू शकतात. म्हणून डेक्झामिथॅझोन हे उपयोगी पडत असले तरी ते रामबाण उपाय आहे, असे मानणे चुकीचे ठरेल. वैद्यकीय प्रॅक्टिसमध्ये डेक्झामिथॅझोन इतर स्टेरॉइड हे बºयाचदा स्वैरपणे व गरज नसताना वापरले जाते. पण ते एक दुधारी शस्त्र आहे. गरज असेल तेव्हा वापरले तर जीव वाचवणारे ठरू शकते व गरज नसताना वापरल्यास गुंतागुंत वाढवणारे ठरू शकते. या आजाराच्या बाबतीत हे खरे असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय व ठरलेल्या मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणेच वापरले गेले पाहिजे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

संसर्गानंतरच्या उलट्या-जुलाब

संसर्गानंतरच्या उलट्या-जुलाब

संसर्गानंतरच्या उलट्या-जुलाब ‘कोरोना’चे बरेच रुग्ण हे जुलाब व उलट्या हे पहिले लक्षण घेऊनही येत आहेत; पण हे उलट्या-जुलाब कसे असतात हे आपल्याला माहीत असले पाहिजे. साधारणत: उलट्या या जेवल्यावर किंवा पोटात काहीतरी अन्न असताना होतात. पण कोरोनामध्ये मात्र पोटात अन्न नसतानाही उलट्या होऊ शकतात. तसेच, सकाळी उठल्या वर ही लगेच उलट्या होऊ शकतात. जुलाब हे दोन प्रकारचे असतात. पहिला ज्याचा उगम छोट्या आतड्यांमध्ये अन्न न पचल्याने होतो. हे छोट्या आतड्यांच्या कार्यातील बिघाडामुळे होणारे जुलाब पाण्यासारखे, कुठल्याही प्रयत्नाशिवाय अपोआप होणारे व रक्त किंवा शेम नसलेले असतात. जे जुलाब पाण्यासारखे नसतात, घट्ट असतात, जुलाब होताना दुखते आणि शेम पडते, असे जुलाब मोठ्या आतड्याची कार्यक्षमता घटल्यामुळे होतात. शक्यतो कोरोनासारख्या व्हायरसचा परिणाम छोट्या आतड्यांवर होतो व बॅक्टेरियाचा परिणाम हा मोठ्या आतड्यांवर होतो. म्हणून कोरोनामुळे पाण्यासारखे पातळ, वेदना न होता, शेम नसलेले जुलाब होतात. हे जुलाब पातळ असले तर कोलेरासारखे एकाच वेळी जास्त प्रमाणात होत नसून त्या मानाने कमी प्रमाणात असतात. दिवसातून ४ ते ५ वेळा होतात आणि ५ ते ७ दिवस चालतात. यासोबत ताप, पोटदुखी, डोकेदुखी ही लक्षणेही असतात. बऱ्याचदा श्वासाशी निगडित लक्षणे जुलाब असलेल्या रुग्णांमध्ये उशिरा येतात. जुलाब कोरोना सोडून इतर कारणांमुळेही असू शकतात व कोरोना रुग्णाचा संपर्क जुलाब कोरोनामुळे आहेत का, याची शहानिशा करण्यास महत्त्वाचे ठरते.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

जुलाब असल्यास

  • आपल्या डॉक्टरांशी संपर्क करावा.
  • संसर्गानंतरच्या उलट्या-जुलाब शौचालय भरपूर पाण्याचा वापर करून स्वच्छ ठेवावे.
  • दिवसातून एकदा शौचालयात ब्लिचिंग सोल्यूशन किंवा सोडियम हायपोक्लोराइटयुक्त पाणी टाकावे.
    शौचालयाच्या नळावर व दाराचे हँडल दिवसातून काहीवेळा सॅनिटायजर स्प्रे मारून पुसून घ्यावे.
  • कमोड वापरत असल्यास शौचालयाचे झाकण फ्लश केल्यावर बंद करावे.
  • एक लिटर पाणी, सहा चमचा साखर, अर्धा चमचा मीठ टाकून हे पाणी तहान लागेल तसे वारंवार प्यावे व दिवसातून दोन ते तीन वेळा नारळाचे पाणी प्यावे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

स्त्रियांनो, खरेदी आटोपती घ्या

स्त्रियांनो, खरेदी आटोपती घ्या

स्त्रियांनो, खरेदी आटोपती घ्या लॉकडाऊन सैल झाल्या पासून अनेक दुकान उघडली आहेत. किराणा , कपडे , दागिने अशा अनेक ठिकाणी स्त्रिया निवांत खरेदी करत असताना दिसायला लागले आहेत. पण आपल्याला हे विसरून चालणार नाही कि कोरोनाची साथ पूर्ण संपलेली नाही  पुढील किमान सहा महिने आपल्याला सतर्क राहावे लागणार आहे. आणि प्रतिबंधक उपायांचा एक महत्वाचा भाग असणार आहे, गर्दीच्या ठिकाणावरून लवकरात लवकर काम संपवून काढता पाय घेणे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

    स्त्रियांनो, खरेदी आटोपती घ्या घरातील महत्वाच्या गोष्टींच्या खरेदीची जबाबदारी गृहिणींवर असते. या आवश्यक वस्तू खरेदी करताना तसेच कपड्यांसारख्या इतर गोष्टी खरेदी करतांना पुरुषांपेक्षा स्त्रियांना जास्त वेळ लावतात. स्त्रिया हे मुद्दाम करत नसतात तर याला काही मानसशास्त्रीय कारण असतात. स्त्रियांचा टेम्पोरलं व परायटल लोब हा मेंदूचा भाग पुरुषांपेक्षा जास्त संवेदनशील असतो. त्यामुळे रंग, हाताला लागणारे संवेदना, वास, एखाद्या वस्तूतील विविधता हे स्त्रियांना लवकर कळते व त्याविषयी त्या जास्त जागरूक असतात. तसेच कुठल्या ही वस्तूच्या खोलात जाऊन ति गोष्ट पाहणे हा स्त्रियांच्या मेंदूचा गुणधर्म असतो. म्हणून कुठली ही खरेदी करताना त्या जास्त चौकस असतात. तसेच त्यांना त्यातले वैविध्य अपेक्षित नसल्याने त्यांना खरेदी करतांना निर्णय घेण्यास वेळ लागतो. पण ही गोष्ट कोरोनाच्या या साथीच्या काळात तापदायक ठरू शकते. याचे कारण कोरोनाची लागण तुमच्या संपर्का पेक्षा ही  किती वेळ संपर्क येतो यावर अवलंबून असते. म्हणूनच आहे. यासाठी पुढील स्त्रियांना या सवयीला काही काळ तरी मुरड घालायला हवी. व ही सवय लावून घेतल्यास शक्य गोष्टी पाळाव्या

  • खरेदी ला जातानाचा आपल्याला दुकानाच्या आत जाताना बाहेर येण्याचा वेळ निश्चित करून घ्यावा. हा वेळ अर्ध्या तासापेक्षा कमी असावा.
  • कुठल्या ही ठिकाणी ४५ मिनिटा पेक्षा जास्त वेळ घालवल्यास जोखीम वाढते.
  • काय खरेदी करायचे आहे हे यादी करून आधीच ठरवून ठेवावे.
  • कपड्यांना सारख्या गोष्टी बघण्यासाठी फोन वर मागवून घ्याव्या.
  • जेव्हा शक्य होईल तेव्हा फोन वर / ई कॉमर्स च्या माध्यमातून खरेदी करावी.
  • दुकानांनी त्यांच्या संकेतस्थळावर थ्रीडी गॅलरी तयार करून वस्तू / कपडे सर्व बाजूंनी बघता येतील अशी सोय करावी म्हणजे ग्राहक घरी बघून काय खरेदी करायचे आहे हा निर्णय दुकानात येण्या आधीच नक्की करू शकतील.
  • छोट्या गावांमध्ये ही फोन नंबर देऊन स्थानिक पातळीवर वस्तू घरपोच देण्याची सोय करावी.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

घटवा वजन, संसर्ग हटवा

घटवा वजन, संसर्ग हटवा

घटवा वजन, संसर्ग हटवा कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यावर जास्त भीती व जास्त मृत्युदर हा इतर जीवनशैलीचे आजार असलेल्यांना आहे. यात प्रामुख्याने मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयाच्या वाहिन्या रुंद असण्याचा आजार (इशेमिक हार्ट डिसीज), कॅन्सर, किडनीचे आजार जे मधुमेहामुळेच जास्त प्रमाणात होतात. कोरोना संसर्ग झाला तर तो गंभीर व जीवघेणा होण्याची शक्यता ज्या या मुख्य पाच आजारांमध्ये आहे, त्या सर्वांच्या मुळाशी लठ्ठपणा हा प्रमुख आजार आहे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

घटवा वजन, संसर्ग हटवा आजार नसलेल्या व लठ्ठपणा असलेल्या व्यक्तींमध्येही कोरोना झाल्यावर मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. आज आपण प्रतिकारशक्ती कशी वाढवायची आणि त्यासाठीची औषधे शोधत आहोत. पण याचा सगळ्यात चांगला मार्ग हा आपले वजन नियंत्रणात ठेवणे हा आहे. मुळात कोरोनाच नव्हे तर इतर अनेक आजारांसाठी लठ्ठपणा हे एक कल्पवृक्षच असते.आपल्या शरीरात लठ्ठपणा सुरू झाला आहे हे कसे ओळखायचे याचे प्रत्येकाला सहज मोजता येईल, असे एक माप बुलडाणा येथील लठ्ठपणा तज्ज्ञ (ओबेसिटी कन्सल्टंट) डॉ. विनायक हिंगणे सांगतात. डॉ हिंगणे यांच्या मते नाभीच्या खाली १ इंच म्हणजे २.५ सेंटिमीटर खाली पोटाचा घेर पुरुषांसाठी ९० सेंटीमीटर व स्त्रियांसाठी ८० सेंटिमीटर लठ्ठपणा आणि डॉक्टरांचा सल्ला घेण्याची गरज दर्शवते.खरे तर हे प्रमाण पुरुषांसाठी ७८ व स्त्रियांसाठी ७२ च्या पुढे गेले की जागरूक व्हायला हवे आणि जीवनशैली तपासून पाहायला हवी. पण आधीचीपुरुष : ९० व स्त्री : ८० ही मर्यादा मात्र जीवनशैलीत मोठे बदल करणे तातडीने आवश्यक ठरेल. कोरोनापासून बचावासाठी वजन नियंत्रणात असणे आवश्यक आहे. हे खरी असले तरी घाबरून जाऊन एक महिन्यात अघोरी पद्धतीने वजन घटवणेही चुकीचे ठरेल. त्यासाठी टप्प्याने प्रयत्न करून जीवनशैलीत बदल आवश्यक असतो. यात प्रामुख्याने आहार, व्यायाम, बैठी जीवनशैली सोडून हालचाल करणे, योग्य प्रमाणात झोप आणि ताणतणावाचे व्यवस्थापन असे अशा अनेक गोष्टी असतात.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

मानसिक आरोग्याची स्वयंचाचणी

मानसिक आरोग्याची स्वयंचाचणी

मानसिक आरोग्याची स्वयंचाचणी गेल्या काही महिन्यांपासून कोरोनामुळे सर्वच व्यावसायिक क्षेत्र अनिश्चिततेचा सामना करत आहेत . त्यामुळे नैराश्येचे प्रमाण वाढले आहे. म्हणूनच प्रत्येकाला स्वतःची मानसिक चाचणी करून नैराश्याचे निदान करता यायला हवे  व गरज वाटल्यास मानसोपचारतज्ज्ञ – यासाठी पुढील प्रश्नावली वापरता येईल –

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

                                                            प्रश्न             कधीही नाही बरेच दिवस महिन्यातून अर्धे दिवस जवळपास प्रत्येक दिवस
कुठल्याही कामात / गोष्टीत फार रस न वाटणे किंवा आनंद न मिळणे.         २
  निराश वाटणे / उदास वाटणे.     
झोप लागण्यास वेळ लागणे / सतत झोपमोड होणे / खूप जास्त झोप येणे / सतत झोपावे वाटणे.
 थकलेले वाटणे / शरीरात उर्जा नसल्या सारखे वाटणे.
भूक नाहीशी होणे/ खूप खाणे.
स्वतः बद्दल कृतक भावना मनात येणे / वाईट वाटणे / स्वतः अपयशी असल्या सारखे वाटणे / कुटुंबाला आपल्यामुळे नुकसान / हिरमोड झाला असे वाटणे.
कामावर लक्ष केंद्रित न होणे / पेपर वाचणे / टीव्ही बघण्यासारख्या गोष्टी करताना ही लक्ष न लागणे.
 इतके हळू बोलणे की इतरांना नीट ऐकू येत नाही किंवा खूप मोठ्याने बोलणे व सतत इकडून तिकडे चकरा मारणे / नेहमीपेक्षा जास्त अस्वस्थ असणे.
आपण नसलेलो / मेलेलोच बरे असे विचार मनात येणे / स्वतःला इजा करणे / स्वतःला इजा करण्याची इच्छा होणे.

                                                                                                                                        +              +

Total Score Depression Severity
१-४ अगदी सुरुवातीचे थोडे नैराश्य – minimal depression
५-९ सौम्य नैराश्य – mild minimal depression
१०-१४ मध्यम नैराश्य – moderate depression
१५-१९  मध्यम स्वरूपाचे तीव्र नैराश्य – moderately severe depression
२०-२७ तीव्र नैराश्य – severe depression

वरील सुरुवातीचे नैराश्य असले तरी मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

संसर्गासाठी संपर्काची वेळ महत्वाची

संसर्गासाठी संपर्काची वेळ महत्वाची

संसर्गासाठी संपर्काची वेळ महत्वाची संसर्ग होण्यासाठी कोरोनाबाधित व्यक्ती सोबत फक्त संपर्कच नव्हे तर संपर्काची  वेळ आणि व्यक्ती पासून अंतर  हे  संसर्गाची शक्यता ठरवणारी महत्वाची घटक आहेत. या विषयी महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाचे भूतपूर्व प्रती कुलगुरू व  मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे जनऔषधवैद्यक शास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. शेखर राजदेरकर सांगतात की जर कोरोना रुग्णाशी मास्क न घालता तुमचा  अर्धा तास बोलण्यासारख्या  स्वरुपात जवळचा संपर्क आला तर संसर्ग होईल पण ही संपर्काची  वेळ २५ मिनिटे झाली तर संसर्गाची  शक्यता ९० % इतकी कमी होईल. जर  हीच संपर्काची वेळ १५ मिनिटे इतकी कमी झाली तर मात्र संसर्ग झाला तरी तो लक्षणविरहीत  किंवा अत्यंत सौम्य लक्षणे असलेला असेल. जर संपर्काचा हाच कालावधी गृहीत धरून यात नाक व तोंड पूर्ण झाकणारा मास्क, ६ फुटा पेक्षा जास्त शारीरिक अंतर आणि संपर्कानंतर हात धुणे या प्रतिबंधक उपायांची भर पडली तर संसर्गाची शक्यता खूपच कमी होते. म्हणजेच कोरोना संसर्गित रुग्णाचा १५ मिनिटांपेक्षा कमी संपर्क आणि हे प्रतिबंधक उपाय कोरोना टाळण्यासाठी प्रभावी अस्त्र ठरू शकते . कमी संपर्काच्या वेळेने झालेल्या संसर्गातून रुग्ण गंभीर होण्याची शक्यता कमी असेल. 

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

वेळे सोबतच पुढील काही गोष्टी संसर्गाची शक्यता ठरवतील –

  • बंद जागेत / खुल्या हागेत
  • छोट्या जागा / मोठी जागा
  • कमी  जागेत जास्त लोक /  कमी लोक

वरील गोष्टी गृहीत धरल्यास पुढील गोष्टींमध्ये संसर्गाची शक्यता जास्त कि कमी हे सांगता येईल.

जागा संसर्गाची शक्यता
कोरोनबाधित व्यक्तीशी मास्क वापरून व ६ फुट पेक्षा जास्त अंतर राखून समोरा समोर बोलल्यास  –संपर्क  वेळ ५ मिनिटा पेक्षा कमी असल्यास खूप कमी  
चालताना / जॉगिंग / सायकलिंग करतना  दोघांनीही मास्क घातला असल्यास नाही
हवेशीर व मोकळ्या जागेत संपर्क आल्यास व ६ फुट अंतर राखल्यास कमी
किराणा दुकान व इतर दुकाने शक्यता
छोट्या जागेत जास्त लोक जास्त
सार्वजनिक शौचालय / बाथरूम जास्त
कमाच्या बंदिस्त जागा / शाळा  जास्त
लग्न समारंभ / इतर अनेक लोक जमतील असे सार्जनिक समारंभ जास्त
धार्मिक स्थळे जास्त
सिनेमा गृहे / नाट्य गृहे / शॉपिंग मॉल जास्त

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

कोरोना संसर्ग असल्यास पालथे झोपावे

कोरोना संसर्ग असल्यास पालथे झोपावे

कोरोना संसर्ग असल्यास पालथे झोपावे “ज्या कोरोनाबाधितांना रुग्णालयात दाखल केले जाते त्यांच्यासाठी पालथे झोपणे हा उपचाराचा एक भाग आहे. पण जे लक्षणविरहीत कोरोना संसर्गित आहेत व ज्यांना सर्दी, खोकला, ताप अशी सौम्य लक्षणे आहेत व रुग्णालयात दाखल झालेले नसून घरीच उपचार घेत आहेत अशांनी ही पालथे म्हणजेच पोटावर झोपावे. पालथे झोपल्याने कोरोना झाल्यावर शरीरात ऑक्सिजन कमी पडण्याची शक्यता कमी होते व ऑक्सिजन कमी पडत असेल तर ते भरून निघते व व्हेंटिलेटरची गरज काही प्रमाणात कमी होऊ शकते. अर्थात पालथे झोपून ही शरीरात ऑक्सिजनची पातळी मेंटेन राहत नसेल तर व्हेन्टीलेटरचा वापर करावा लागतो. लक्षणविरहीत व सौम्य लक्षणे असलेल्यांना घरी ठेवले जाते व फारसे उपचार नसतात. अशांसाठी पालथे झोपण्याचे विशेष महत्त्व आहे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

पालथे झोपल्याने नेमके काय होते?
कोरोना संसर्ग असल्यास पालथे झोपावे पालथे झोपल्याने फुफ्फुसाचा मागच्या बाजूचा व झोपल्यावर वरच्या म्हणजे पाठच्या बाजूला येणारा भाग खुला होता व फुफ्फुसाच्या इतर भाग अधिक खुला होतो व याला ही ऑक्सिजन मिळू लागते. उभ्याने किंवा पाठीवर झोपून हा खालच्या व मागच्या बाजूला जाणारा फुप्फुसाचा भाग फारसा उपयोगात येत नाही. म्हणून पालथे झोपल्याने फुप्फुसाच्या जास्तीत जास्त भाग काम करू लागतो व ऑक्सिजनचे प्रमाण वाढते.अजून एका कारणाने पालथे झोपल्याने ऑक्सिजनचे प्रमाण वाढते. २०% लोकांना घोरण्याचा आणि झोपेत श्वसन मार्गाच्या वरच्या भागात अडथळा निर्माण झाल्याने शरीराला ऑक्सिजनची कमतरता भासण्याचा आजार असतो. याला ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनियाचा त्रास असतो. हे लठ्ठपणा व मधुमेह असणाऱ्यांमध्ये जास्त आढळते. नेमके हेच कोरोना होण्याची जोखीम जास्त असणारे आजार आहेत. पालथे झोपल्याने पडजीभ व जीभ झोपेत मागे न पडून झोपेत ऑक्सिजन कमी पडण्याचा हा आजार ही कमी होतो आणि शरीराची ऑक्सिजनची पातळी वाढते. पालथे झोपताना एक काळजी घ्यावी. खरे आदर्श पालथे झोपणे म्हणजे कपाळ हे बिछान्याला लागलेले असे आहे ज्या साठी आपण नियमित वापरतो ते बिछाने वापरून असे झोपणे शक्य नाही. म्हणून आपल्याला मान एका बाजूला करून झोपावे लागेल. अशा वेळी सवय नसल्याने मानेला कळ लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे एक दिवस आड मान एक एका बाजूला करून झोवे. झोपण्या आधी व उठल्यावर ब्रम्ह मुद्रा म्हणजे मान दोन्ही बाजूला व वर खाली हलवण्याचा व्यायाम ५ ते १०० वेळा करावा .कोरोना नसलेल्यांनी ही सध्या साथ सुरू असल्याने पालथे झोपावे का?ज्यांना कोरोना नाही अशांनी पालथे झोपण्याची गरज नाही. कारण आपल्याला नियमित असे झोपण्याची सवय नसते

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

झटके मेंदूतील शॉर्टसर्किट

झटके मेंदूतील शॉर्टसर्किट

झटके मेंदूतील शॉर्टसर्किट झटक्यांना आकडी, फिट, फेफरे अशा अनेक नावांनी संबोधले जाते. वैद्यकीय भाषेत याला इपिलेप्सी म्हणतात. झटके येत असण्याच्या प्रक्रियेला सीजर किंवा कन्वर्जनअसे म्हणतात.

1) झटके म्हणजे काय?
झटके म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे, तर मेंदूमध्ये होणारे शॉर्टसर्किट. हे शॉर्टसर्किट कसे होते आणि का होते हे जाणून घेण्यासाठी मेंदू कसा काम करतो हे समजून घ्यायला हवे. 
2) झटके का येतात?
शॉर्टसर्किटसाठी तीन घटक महत्त्वाचे असतात, तसेच झटके येण्यासाठी तीन घटक शोधावे लागतात. हे तीन घटक म्हणजे बिघाड झालेले बटन, वायर किंवा लूज कनेक्शन. म्हणजे मेंदूतून सिग्नल तयार होतात त्या भागात बिघाड होतो किंवा सिग्नल वाहून नेणाऱ्या नसा खराब असू शकतात किंवा हे मेंदूतील सूक्ष्म पेशींच्या पातळीवरील शॉर्टसर्किट असू शकते, जे तपासण्यांमध्ये लक्षात येत नाही.
3) झटके आनुवंशिक असतात का?
झटके शक्यतो आनुवंशिक नसतात व एखाद्या मुलाला झटके येत असल्यास पुढे त्याच्या पाल्यांनाही झटके येतीलच असे नाही. 

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

नॉर्मल मेंदू कसा काम करतो? 
मेंदू हा शरीराचा रिमोट कंट्रोल असतो. टीव्ही रिमोट कंट्रोलने चालतो, तसे शरीर मेंदूच्या रिमोट कंट्रोलने चालते. रिमोट कंट्रोलप्रमाणेच मेंदूमध्ये बटन व वायर्स असतात. मेंदूचा डावा व उजवा असे दोन भाग असतात. मेंदूचा उजवा भाग डाव्या भागावर व डावा भाग उजव्या भागावर नियंत्रण ठेवतो. आपल्याला डावा हात हलवायचा असल्यास मेंदूच्या उजव्या भागात हाताचे बटन असते, तिथे एक सिग्नल तयार होतो. हात उचलण्याची मनात आलेली इच्छा किंवा विचार हा सिग्नल मेंदूत तयार करते. हा सिग्नल शरीरातील वायरने म्हणजे नसांनी (नर्व्ह) हातापर्यंत येतो आणि हात हलतो. आपल्या नकळत, इच्छेशिवाय आपला हात, पाय किंवा शरीराचा कुठलाही भाग हलत असेल, याचा अर्थ आपल्या नकळत मेंदूमध्ये त्या जागी सिग्नल तयार झाला, म्हणजे तिथे शॉर्टसर्किट झाले आणि हात, पाय किंवा शरीराचा भाग हलायला लागला. यालाच झटके असे म्हणतात.

 बिघाड शोधण्यासाठीच्या तपासण्या
हृदयाच्या लहरी तपासण्यासाठी ईसीजी केला जातो, तसेच मेंदूतून निघणाऱ्या लहरी तपासण्यासाठी ईईजी केला जातो. झटके किंवा इपिलेप्सीच्या निदानासाठी ईईजी म्हणजे मेंदूतून निघणारे सिग्नल जास्त प्रमाणात निघत आहेत का, हे पाहण्यासाठी केले जाते. दरवेळी इपिलेप्सीचे निदान करताना ईईजीमध्ये बिघाड दिसून येईलच असे नाही. तसेच, एमआरआय करून मेंदूमध्ये झटके निर्माण करणारे इतर कुठले कारण आहे का, हे पाहण्यासाठी एमआरआय केला जातो. काही कारण निघाल्यास त्या त्या कारणाचे उपचार करावे लागतात. ‘ईईजी’प्रमाणेच एमआरआय नॉर्मल आला, तरी कुठल्याही करणाशिवाय येणारे झटके, असे निदान करून उपचार केले जातात. 

सदरील माहिती आपण सकाळ मध्येही वाचू शकता