असा सोडवा भाजी मंडईचा प्रश्न

भाजी मंडईचा प्रश्न असा सोडवा

असा सोडवा भाजी मंडईचा प्रश्न सध्या सोशल डिस्टन्सिंगचा सगळ्यात धुव्वा उडतो आहे तो भाजी मंडई मध्ये उडणाऱ्या गोंधळामुळे. यासाठी केईम हॉस्पिटलचे माजी प्राध्यापक चंद्रकांत पाटणकर यांनी उत्तम कल्पना सुचवली आहे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

असा सोडवा भाजी मंडईचा प्रश्न ज्यामुळे लोकांचा भाजी खरेदीचा प्रश्नही सुटेल आणि सोशल डिस्टन्सिंगही पाळले जाईल. यासाठी खाली दिलेल्या आकृती प्रमाणे प्रत्येक शहरात खुल्या मैदानात भाजी विक्रेत्यांची  व्यवस्था करता येईल. यात आत जाण्याचे व बाहेर येण्याचे दोन विरुध्द बाजूला वेगळे मार्ग असतील. दोन विक्रेत्यांमध्ये आडवे २0  फुट व उभे १०  फुट अंतर असेल ( याने ८ मीटरचा सोशल डिसटन्सिंगचा नियम पाळला जाईल . विक्रेत्यांना आत जाताना मास्क व हातावर सॅनीटायझर टाकून सोडले जाईल . तसेच त्यांना सर्दी , खोकला , ताप नसावा. आत व बाहेर जाण्याच्या मार्गावर प्रत्येकी एक किंवा दोन सुरक्षारक्षक थांबतील . एका वेळेला तीन जणांना हातावर सॅनीटायझर टाकून आत सोडले जाईल. एकाने एका निश्चित सरळ रांगेत जाऊन  खरेदी करायची आहे.आत गेलेले तिघे दोन स्टॉल पुढे गेल्यावरच वरच पुढच्या तिघांना आत सोडले जाईल. तो पर्यंत इतरांनी बाहेर एकमेकांपासून लांब उभे राहयचे आहे. तसेच एकाच वेळेला गर्दी टाळण्यासाठी प्रत्येक विभागाला खरेदी साठी वेळ ठरवून देता येऊ शकते . ही मैदानावर उभारलेल्या मंडई चहु बाजूंनी दोरखंड किंवा तात्कालिक बांबूच्या छोटे आच्छादन करून बंद केलेले असेल. तसेच अंतर्गत तीन किंवा चार रांगा अशाच एकमेकांपासून वेगळ्या केलेल्या असतील.  एका बाजूला ३० ते ४० फुट जागेत भाजी विक्रेत्यांची वाहनांसाठी जागा ठेवता येईल.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

गर्भवती महिलांचा कोरोना पासून बचाव

गर्भवती महिलांचा कोरोना पासून बचाव गर्भवती स्रीने तपासणी साठी रुग्णालयात जावे का, हा प्रश्न अनेकांना पडतो आहे. ९ महिने पूर्ण होई पर्यंत जर बाळाच्या हालचाली नॉर्मल जाणवत असतील, रक्तस्राव होत नसेल, व इतर काही त्रास नसेल तर प्रसुतीच्या तारखे पर्यंत रुग्णालयात जाऊ नये.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

सध्या पुढील काही अढळल्यासच स्रीरोगतज्ञांकडे जावे –

१.  पोट खूप दुखत असल्यास. २. योनीमार्गातून रक्त स्त्राव/बाळाभोवतीचे पाणी बाहेर येणे. ३. बाळाच्या हालचाली कमी जाणवणे ( दिवसातून १२ वेळा किमान बाळ लात मारते, हे मोजल्यास व पोटात बाळाचे लाथ मारण्याचे प्रमाण १२ पेक्षा कमी असल्यास)  ४.  ९ महिने भरल्यावर

पुढील गोष्टींसाठी स्रीरोगतज्ञांचा फोनवर  सल्ला घ्यावा

  • उलट्या, साधा सर्दी खोकला,  पाठदुखी , बद्धकोष्ठता

सोनोग्राफी साठी कधी जावे

१. गरोदर झाल्यापासून एकदा ही सोनोग्राफी केलेली नसल्यास. २. गरोदर पणात इतर आजारांमध्ये जास्त जोखीम असल्यास व बाळाला/आई ला धोका असल्यास तीन महिन्यातून एकदा  ३.बाळाची हालचाल जाणवत नसल्यास. ४. एकोणिसाव्या आठवड्यात बाळाच्या जन्मजात व्याधी तपासण्यासाठी अॅनॉमॉली स्कॅन

 गर्भवती महिलांचा कोरोना पासून बचाव गरोदर असताना नियमित ब्लड प्रेशर मोजणे आवश्यक असते. त्यासाठी घरगुती इलेक्ट्रॉनिक मशीन द्वारे उपलब्ध असेल तर तपासावे. किव्हा डोके दुखत असेल तरच आपल्या डॉक्टर कडे रक्तदाब तपासण्यास जावे . याशिवाय कोरोना टाळण्यासाठी वारंवार हात धुणे , सोशल डीस्टन्सिंग , घरा बाहेर न जाने हे सगळे नियम गरोदर स्रीला  ही लागू आहेत.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

भाज्या, धान्य, किराणा, दुध घेताना काळजी

भाज्या धान्य किराणा दुध घेताना काळजी जर कोरोना बाधित व्यक्तीला अजून माहित नसेल कि तो कोरोना ग्रस्त आहे. आणि त्याने हाताळलेल्या वस्तू आपण हाताळल्या तर त्यामाध्यमातून कोरोना पसरू शकतो. यासाठी पुढील काळजी घ्यावी –

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

  • भाज्या धान्य किराणा दुध घेताना काळजी फळ भाज्या स्वीकारताना शक्यतो त्या हात न लावता थेट पिशवीत टाकायला सांगाव्या .
  • आणलेल्या भाज्या घरात आल्या आल्या एका भांड्यात पाण्यात ओताव्या.
  • पिशवी घरात न ठेवता घरा बाहेर किंवा छतावर उन्हात टाकावी व परत जाताना तीच पिशवी न्यावी.
  • पाले भाज्या पाण्यात ( शक्यतो कोमट ) काही वेळ पूर्ण  बुडवून ठेवाव्या व फळ भाज्या, फळे १२ तास पाण्याच्या मोठ्या भांड्यात ठेवाव्या.
  • पाण्यातून बाहेर काढल्यावर सर्व भाज्या व फळांवर हेअर ड्रायर च्या गरम वाऱ्या खालून जाऊ द्यावे (वेळ – या गरम वाऱ्याच्या चार पाच झुळुका प्रत्येक फळ भाजी वरून जाईल असे पाहावे )
  • या काळात सध्या कच्या भाज्या मुळीच खावू नये. शिजवूनच खाव्या. फळे खाण्या आधी परत धुवून घ्यावे .
  • दुध – पिशवीतून घेत असाल तर घरात आणल्यावर पिशवी बाहेरून धुवून घ्यावी.
  • जर गवळ्या कडून घेत असाल तर स्वच्छ भांड घरा बाहेर ठेवाव आणि गवळ्या ला भांड्याला न शिवता दुध भांड्यात टाकायला सांगाव.
  • घेतलेले दुध घरात आणल्या आणल्या उकळून घ्यावे.
  • गवळ्यांनी सर्दी खोकला असल्यास दुध द्यायला जाऊ नये , इतर स्वस्थ व्यक्तीची व्यवस्था करावी. गवळ्यांनी शक्य झाल्यास मास्क वापरावा व दोन घरांच्या मध्ये हँड सॅनीटाझर वापरावा . तो गवळ्याला परवडत नसेल तर दुध घेण्याऱ्या घरांनी दुध घेतल्यावर गवळ्याच्या हातावर आपल्या घरातील हँड सॅनीटायझर टाकावा.
  • भाज्या धान्य किराणा दुध घेताना काळजी किरणा माल आणताना भाजी घेतानाचे सगळे नियम व  पिशवी बाहेर किंवा छतावर ठेवण्याचा नियम पाळावा तसेच किराणा सामान एक दिवस न वापरता तसेच राहू द्यावे. २४ तासाने वापरायला काढावे.
  • कुठले ही बाहेरचे सामान आणल्यावर घरात आल्या आल्या हात धुवायला विसरू नये.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

मधुमेह, रक्तदाब रुग्णांना कोरोना विषयी काळजी

मधुमेह रक्तदाब रुग्णांना कोरोना विषयी काळजी मधुमेह असलेल्या रुग्णांची प्रतिकारशक्ती कमी असते . त्यामुळे मधुमेह असलेल्यांना कोरोना चा धोका किंवा कोरोना झाल्यास गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. अशा रुग्णांनी सर्वप्रथम आपली साखर नियंत्रणात आहे का या साठी नियमित साखर तपासली पाहिजे. सध्या रक्त तपासण्यासाठी लॅब मध्ये जाऊ नये. घरीच ग्लुकोमीटरने तपासणी करावी. जर इन्सुलिन घेत असाल तर आठवड्यातून २ वेळा आणि गोळ्या चालू असल्यास व साखर नियंत्रणात असल्यास पंधरा दिवसातून एकदा तपासणी करावी. त्यासाठी साखरेची तपासणी कधी करू नये.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

मधुमेह, रक्तदाब रुग्णांना कोरोना विषयी काळजी. सकाळी उपाशी पोटी व जेवल्यावर दोन  तासाने तपासणी करावी . उपाशी पोटी साखर – ९० ते १३० व जेवणा नंतरची १४० – १७० या रेंज मध्ये असावी याची काळजी घ्यावी . तसेच मागील तीन महिन्यांची साखरेची पटली दाखवणारे एचबी ए १ सी हे तीन महिन्यातून एकदा केले नसेल तर करावे. ते ७ च्या आसपास असावी. सध्या घरात असल्याने व्यायाम कमी झाल्याने मधुमेही रुग्णांची साखर वाढण्याची शक्यता आहे. यासाठी काही लोक सकाळी बाहेर जाऊन  चालण्याची  सवय टाळेबंदी मध्ये तशीच चालू ठेवली आहे .

कृपया अशा मधुमेही रुग्णांनी फिरायला बाहेर जाऊ नये. त्यासाठी घरातच किंवा छतावर जाऊन चालण्याची सवय सोडू नये. तसेच नियमित औषधांचा डोस नियमित घ्यावा . रुग्णांनी आठवड्यातून एकदा ५०० mg विटामिन सी पुढील २ महिने घेण्यास हरकत नाही तसेच शक्य असल्यास विटामिन डी ६०,०००० IU आठवड्यातून एकदा ८ आठवडे घेण्यास हरकत नाही. घरतील समान आणण्यास घरातील मधुमेही रुग्ण सोडून इतरांनीच  बाहेर  जावे

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

मुलांना कोरोना झाला तर काय?

मुलांना कोरोना झाला तर

सध्या कोरोनाची जागतिक साथ सुरु असताना सर्व पालकांच्या मनात आपल्या मुलांना कोरोना झाला तर काय? तो मुलांमध्ये टाळायचा कसा? आणि मुलांना कोरोना झाला तर काय हे प्रश्न मनात येणे साहजिक आहे. कोरोनाच्या बाबतीत एक दिलासादायक गोष्ट अशी आहे की लहान मुलांना याचा धोखा कमी आहे. लहान मुलांना कोरोनाग्रस्त रुग्णाशी संपर्क आल्यास संसर्ग होऊ शकतो. पण लहान मुलांमध्ये याची लक्षणे ही सौम्य स्वरुपाची आहेत.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

ताप, कोरडा खोकला, काही प्रमाणात सर्दी एवढीच फ्लू सारखी लक्षणे कोरोना व्हायरस COVID-19 मध्येही लहान मुलांमध्ये दिसू शकतात. याची तीव्रता मोठ्या व्यक्तीं एवढी नाही. अगदी तुरळक स्वरूपाचा श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. तसेच सर्व वयोगटा मध्ये लहान मुलांमध्ये हा मृत्युदर कमी म्हणजे ०.२ टक्के इतकाच आहे. तो ही कुपोषित, ह्र्दय रोग, जन्मजात फुफुसाचा आजार अशा लहान मुलांमध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. लहान मुलांमध्ये कोरोना व्हायरस टाळण्यासाठी काय करता येईल? जर घरात किव्हा आजूबाजूला कोरोना व्हायरस चा रुग्ण असेल तर मुलांना कोरोना व्हायरस च्या रूग्णापासून लांब ठेवावे. ३१ मार्च पर्यंत सर्व शाळा बंद असे पर्यंत शाळेत पाठवू नये. त्यानंतर शाळा सुरु झाल्यावर मुलाला खोकला व ताप असल्यास आठवडा भर शाळेत पाठवू नये. कोरोना टाळण्याचा सर्वोत्तम उपाय हा हात धुणे आहे. त्यासाठी साबण व पाण्याचा वापर करावा. लहान मुलांसाठी अल्कोहोल युक्त हँन्ड सॅनीटायझर वापरू नये. मुलांना हात धुण्याची योग्य पद्धत शिकवावी.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

कोरोना प्रतिबंध आणि शासन

कोरोना प्रतिबंध आणि शासन

कोरोना प्रतिबंध आणि शासन कोरोना संदर्भात स्वच्छतेच्या मुलभूत नियमांचा आता पुरेसा प्रचार झाला आहे. शासन आता जितक्या आक्रमकपणे आणि विचारपूर्वक साथ नियंत्रणाचे, प्रतिबंधाचे काम करील तेवढे नुकसान कमी होईल. ‘घाबरू नका’ असे सांगताना शासनाकडून ठोस कृती होणे गरजेचे आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.

देशभरातील व राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने आता पुढील काही काळ न घाबरता सतर्क मात्र राहावे लागणार आहे. कोरोना टाळण्यासाठी स्वच्छतेच्या मुलभूत नियमांचा आता पुरेसा प्रचार झाला आहे, पण या उपायांच्या प्रचारापलीकडे आता शासनालाही महत्वाची भूमिका बजावावी लागणार आहे. आता पर्यंत परदेशातील ज्या देशांनी कोरोनाचा सामना केला त्यात सिंगापूर आणि दक्षिण कोरिया या दोन्ही देशातील कोरोनाच्या उपायांचे प्रारूप हे सध्या आदर्श व अभ्यासण्याजोगे आहे. खरेतर आपण ही तयारी चीन मधून इतर देशांत साथ पसरली तेव्हाच करायला हवी होती. कोरिया आणि सिंगापूर या देशांनी पहिला रूग्ण निश्चित होण्याअगोदरच प्रत्येक शहरात स्क्रीनिंग व निदान करण्यासाठी मुबलक प्रमाणात डायग्नोस्टीक किट्स उपलब्ध करून दिल्या. एवढेच नव्हे तर ट्रॅवल थ्रू म्हणजे गाड्या थांबतात तिथेही तुम्हाला तातडीने करोनाची चाचणी करण्याची सोय होती.

कोरोना प्रतिबंध आणि शासन- आपली सार्वजनिक आरोग्य व्यवस्था आधीच गाळात असताना एवढी मोठी अपेक्षा केली जाऊ शकत नाही. पण सध्या असलेली कोरोना तपासणी केंद्रे आणि आयसोलेशन वॉर्ड्स कमी पडण्याची दाट शक्यता आहे. सध्या मुंबई शहरासाठी कस्तुरबा रूग्णालयातील ५८ खाटा व इतर ३० खाटाही खूपच कमी आहेत. राज्यात ३९ ठिकाणी असलेले आयसोलेशन कक्ष ही अपुरे आहे व संख्या वाढवण्याची गरज आहे, कारण कोरोना बाधितांची संख्या अचानक वाढू शकते. आयसोलेशन वॉर्ड नेमका कसा असला पाहिजे याचा शास्त्रशुद्ध अभ्यासही गरजेचा आहे. अगदीच प्रत्येक वॉर्ड वातानुकुलीत असण्याच्या आदर्श व्यवस्थेची अपेक्षा आधीच मोडकळीला आलेल्या आणि अनेक आजारांचा ताण असलेल्या आरोग्य व्यवस्थेकडून करता येणार नाही. पण किमान दोन बेड मधील १ मीटरचे अंतर , दोन बेड मध्ये पार्टीशन नाही तर किमान स्क्रीनने त्यांचे विलगीकरण, प्रत्येक रुग्णाला तपासताना डॉक्टर व पॅरामेडिकल स्टाफसाठी वेगळे प्रतिबंधक साहित्य, रुग्णाचा केसपेपर वॉर्डच्या बाहेर ठेवणे या प्राथमिक मार्गदर्शक तत्वांचा अवलंब होणे आवश्यक आहे. तसेच या आयसोलेशन वॉर्ड मध्ये कार्यरत असणाऱ्यांचे या विषयी प्रशिक्षणही गरजेचे आहे. ज्यांचे निदान निश्चित झाले आहे त्यांच्यासाठी आयसोलेशन व ज्यांचा अशा रुग्णांशी संपर्क आलाय पण अजून काही त्रास नाही व निदानही निश्चित नाही अशांसाठी विलगीकरणाचाही (क्वारनटाइन) गांभीर्याने विचार करावा लागणार आहे. आयसोलेशन व क्वारानटाइन या दोन्हीसाठी एकच वॉर्डच नव्हे तर एकच रुग्णालय वापरणेही घातक ठरू शकते. ‘होम क्वारनटाइन’ म्हणजे संपर्क असलेल्यांनी घरीच थांबा हे सांगितले जात असले तरी यावर कोणाचेही नियंत्रण नाही. म्हणून साथ पसरण्याआधीच विलगीकरणासाठी वेगळी समांतर यंत्रणा निर्माण करता येते का याचा विचार होणे गरजेचे आहे. आयसोलेशन किती दिवसांसाठी आवश्यक आहे यावरही तज्ज्ञांचे मत घेऊन शासनाने निर्णय घ्यायला हवा. परदेशातील अभ्यासानुसार कोरोनाचे रुग्ण श्वासाद्वारे ३० दिवसांपर्यंत आणी सरासरी २० दिवसांपर्यंत विषाणू सोडत होते. सध्या आयसोलेशन १४ दिवसांचे आहे ते २० दिवसांचे तरी करायला हवे. हे सगळे आता साथीच्या सुरुवातीच्या पातळीवरच गरजेचे व शक्यही आहे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

कोरोना प्रतिबंध आणि शासन -किती रूग्ण सापडेस्तोवर नेमक्या कुठल्या उपाय योजनांना प्राधान्य व भर द्यायचा या विषयी शासन सध्या गोंधळून गेलेले दिसते आहे. दक्षिण कोरियाने ‘स्क्रीन, टेस्ट, ट्रीट आणि आयसोलेट’ या चार गोष्टींवर एक महिना पूर्ण भर दिला व देशातील आधीच सज्ज असलेल्या आरोग्य यंत्रणेने एका दिवसात २५,००० तपासण्या आणि किमान ६ व कमाल २४ तासात टेस्टचा रिपोर्ट हा नियम पाळला. आज महाराष्ट्रात केवळ तीन ठिकाणीच तपासणीची सोय आहे, उद्या ग्रामीण भागात ही साथ पसरली तर तेथील डॉक्टरांनी या रुग्णाला आयसोलेशनसाठी नेमके कुठे पाठवायचे याची निट माहिती कोणालाही नाही. तालुका पातळीवर जिथे उपजिल्हा रुग्णालय आहे तिथे आयसोलेशन वॉर्ड व किमान प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी रक्त तपासणी करून निदान निश्चित करण्याची सोय करण्याची हीच वेळ आहे. साथ पसरली तर सगळ्यात मोठी समस्या ही असेल की सर्दी , खोकला , ताप असलेल्या प्रत्येक रुग्णाला मला कोरोना झालाय का हे तपासून पाहण्याचा आग्रह होणार आहे. यासाठी सर्वसामान्यांनी ही गोष्ट समजून घ्यावी की सर्दी खोकला म्हणजे प्रत्येकवेळी कोरोना असेल असे नव्हे. कोरोना मध्ये सर्दी हे मुख्य लक्षण नसून कोरडा खोकला , ताप आणि श्वास घेण्यास त्रास ही मुख्य लक्षणे आहेत. ज्यांचा कोरोनाबाधित रुग्णाशी थेट संपर्क आला आहे आणि ज्यांनी कोरोनाची साथ असलेल्या देशात १ जानेवारी नंतर प्रवास केला आहे त्यांनाच चाचणीची गरज आहे. कोणाची चाचणी करायची हे ठरवण्यासाठी तालुकानिहाय लक्षणांचे स्क्रीनिंग केंद्र उभारणे गरजेचे ठरू शकते. सध्या कोरोना रुग्ण सापडलेल्या भागात आम्ही बळजबरीने लोकांना आयसोलेट किमवा क्वारनटाइन करू असे विधान आरोग्य मंत्री किंवा अन्य कुठल्याही मंत्र्यांनी करणे लोकांमध्ये अजून घबराट पसरवणारे ठरेल. चीनमध्ये अशा बळजबरीमुळे भयभीत होऊन लोक पुढे आले नाहीत व त्याचा साथीचे नियंत्रण करण्यावर अनिष्ट परिणाम झाला. त्यापेक्षा, ‘त्रास होत असल्यास व कोरोनाग्रस्तांशी संपर्क आला असल्यास तुम्ही बिनदिक्कत पुढे या, आम्ही तुमची काळजी घेऊ’ हे वारंवार सौम्यपणे शासनाने सांगावे. नागरिकांनीही आयसोलेशनला मुळीच घाबरू नये, कारण शासन हे आपल्या व इतरांच्या भल्यासाठीच करते आहे. या आजारावर उपचार नाही अशी सरसकट विधाने केली जात आहेत. हा आजार व्हायरल असल्याने तो इतर व्हायरल आजारांसारखा आपोआप वेळेत बरा होणारा आहे. ज्या केसेस गंभीर होतील त्यांच्या उपचारांसाठीची मार्गदर्शक तत्वे आहेत व त्यासाठी काही औषधे यशस्वीरित्या वापरली गेली आहेत. औषध नाही असा टाहो फोडण्यापेक्षा, बाधा झालेल्यांच्या रक्ताचे नमुने घेऊन, इनविट्रो क्लिनिकल ट्रायल ( रुग्णांवर नव्हे! ) का सुरु करत नाहीत? सध्या मास्कचाही मोठ्या प्रमाणात वापर होतो आहे, परंतु अशा स्थितीत मास्क हा धो धो पावसातील छोट्या छत्रीसारखा कुचकामी आहे. मास्क हा निरोगी व्यक्तीला इतरांनाकडून संसर्ग होऊ नये या साठी नसून आजारी व्यक्तीकडून तो इतरांना होऊ नये यासाठी असतो. मास्कची जागा खरे तर ‘हात धुण्याने’ घ्यायला हवी. त्यासाठी सार्वजनिक ठिकाणी पाणी व लिक्विड साबण उपलब्ध करणे व लोकांना हात धुण्याची पद्धत शिकवण्याची गरज आहे.

या साथीची निष्पत्ती नेमकी काय असेल हा प्रश्न सर्वांनाच सतावत आहे. सुरुवातीच्या काळात बऱ्याच लोकांना संसर्ग होऊन आणि कदाचित थोडी हानी होऊन कोरोना विरोधात हळूहळू सामुहिक प्रतिकारशक्ती विकसित होईल. शासन जितक्या आक्रमकपणे आणि विचारपूर्वक साथ नियंत्रणाचे, प्रतिबंधाचे काम करील तेवढे नुकसान कमी होईल. त्यामुळे, ‘घाबरू नका’ असे सांगताना सोबत शासनाकडून ठोस कृती होणेही गरजेचे आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.

सदरील माहिती आपण महाराष्ट्र टाइम्स मध्येही वाचू शकता.


सर्दी-खोकला-ताप म्हणजे कोरोना नाही

सर्दी खोकला ताप म्हणजे कोरोना नाही

सर्दी-खोकला-ताप म्हणजे कोरोना नाही

सर्दी खोकला किंवा इतर कुठल्याही कारणाने ताप आला तर कोरोनामुळे आहे का अशी भीती आपल्याला प्रत्येकाला वाटणे सहाजिक आहे. पण कोरोनाची मुख्य लक्षणे समजून घेतल्यास लक्षात येईल की साधा सर्दी-खोकला म्हणजे कोरोना नाही.

प्रत्येक सर्दी-खोकला-ताप म्हणजे कोरोना नाही

कोरोना व्हायरस (COVID-19) ची मुख्य लक्षणे –

कोरडा खोकला, तीव्र स्वरुपाचा ताप त्यानंतर दोन किंवा तीन दिवसांनी श्वास घेण्यास त्रास . यासोबत 1 जानेवारी नंतर कोरोनाग्रस्त देशांमध्ये प्रवास किंवा सध्या भारतातील कोरोनाचे निदान निश्चित झालेल्या रुग्णांची संबंध हा रिस्क फॅक्टर महत्त्वाचा आहे. ताप आणि खोकला  इतर कारणांनी असू शकतो. पण कोरोनाग्रस्तांशी संबंध आल्यास व ही लक्षणे असल्यास मात्र आपण सरकारी यंत्रणेशी तपासणी साठी संपर्क साधायला हवा. अंगदुखी ही कोरोनामध्ये कमी प्रमाणात सर्दी खोकला, फ्लू मध्ये जास्त प्रमाणात असतात तसेच शिंका येणे, नाक गळणे, जुलाब हे कोरोनामध्ये नसते पण  सर्दी खोकला व फ्लू मध्ये असते.

सर्दी-खोकला-ताप म्हणजे कोरोना नाही
कोरोना व इतर आजारांमधील फरक

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

कोरोना व्हायरसची सविस्तर लक्षणे – कोरोनाची तीव्र ताप, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास हा आपल्याला माहित आहे. पण हा त्रास तीव्र किंवा गंभीर कोरोनाच्या रुग्णालाच होतो. ८५ टक्के लोकांना कोरोना संसर्ग झाला तरी एक तर साधा ताप आणि थोडा खोकला असा सौम्य स्वरुपाची लक्षण दिसतील. त्यातही काहींना असे ही होऊ शकते की काहीच लक्षणे आली नाहीत. म्हणून साधा खोकला, ताप, सर्दी असली तरी आपल्याला इतरांपासून लांब रहायचे आहे हे समजून घ्यावे.

COVID -19 प्रतिकारशक्ती कशी वाढवावी? कारण कोरोना व्हायरस शी लढताना आपले सगळ्यात मोठे हत्यार असणार आहे आपली प्रतिकारशक्ती. त्यातच ६० वर्षावरील ज्येष्ठ आणि मधुमेह असणाऱ्यांनी प्रतिकारशक्ती वाढवण्याची विशेष काळजी घ्यायला हवी. COVID -19 प्रतिकारशक्ती कशी वाढवावी? यासाठी काही टिप्स.

कोरोना प्रतिबंध आणि शासन कोरोना संदर्भात स्वच्छतेच्या मुलभूत नियमांचा आता पुरेसा प्रचार झाला आहे. शासन आता जितक्या आक्रमकपणे आणि विचारपूर्वक साथ नियंत्रणाचे, प्रतिबंधाचे काम करील तेवढे नुकसान कमी होईल. ‘घाबरू नका’ असे सांगताना शासनाकडून ठोस कृती होणे गरजेचे आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.

https://www.youtube.com/playlist?list=PL9bO6h-fFoNgMdrfWBGtXtP0uLD3KC5yl
Dr. Amol Annadate’s Videos on Prevention and Cure of CORONAVIRUS Disease COVID-19

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.