ए.सी.वापरू शकतो कि नाही?

ए. सी. चालू करू शकतो की नाही

ए.सी.वापरू शकतो कि नाही? यावर बरीच चर्चा चालू आहे. एका रूम मधील ए.सी. असेल तर त्या माध्यमातून कोरोना पसरू शकतो या विषयी कुठला ही पुरावा नाही व याची शक्यता नाही. पण सेन्ट्रल ए.सी ज्यातून सगळी कडे फिरून हवा जाते , या विषयी अजून निश्चित माहिती नाही. पण सेन्ट्रल पेक्षा वयक्तिक रूम साठीचा ए.सी. चांगला . पण वापरण्या अगोदर हा ए.सी. ही स्वच्छ करून घ्यावा.  अस्वच्छ ए.सी मुळे दमा, ॲलर्जीक खोकला, ॲलर्जीक सर्दी वाढते व ताप–सर्दी–खोकला व त्यातच लीजोनेल्ला , असीनॅटोबॅक्ट हे  निमोनिया करणारा बॅक्टीरीया ए.सी मधून पसरतो.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

ए.सी.वापरू शकतो कि नाही? उन्हाळा नुकताच सुरु झाल्याने या दिवसात अचानक अनेक महिने बंद असलेले ए.सी. चालू होतात. बऱ्याचदा हे ए.सी. स्वच्छता न करता चालू केले जातात. यात अनेक दिवस अडकलेले ॲलर्जीन्स ही बाहेर पडतात. आणि दमा, ॲलर्जी बळावते. वैद्यकीय संशोधनात असे सिध्द झाले आहे कि अस्वच्छ ए.सी. मध्ये लीजनेल्ला, असीनॅटोबॅक्टर हे निमोनियाची लागण करणारे जंतू असतात .

ए.सी. ची स्वच्छता घरीच पुढील प्रमाणे करा –

ए.सी.चालू करू शकतो कि नाही? आधी ए.सी. चे स्वीच बंद असल्याची खात्री करून घ्या. ए.सी. उघडण्या अगोदर चेहरा , डोके झाकून घ्या. मास्क व गॉगलचा वापर करा .   ए.सी. उघडा. त्यातील जाळी काढून पाण्यामध्ये दोन तास भिजवा. त्यानंतर जुन्या टूथब्रशने ती स्वच्छ घासून घ्या. त्यानंतर एक दिवस उन्हात ही जाळी वाळू द्या. ए.सी चा आतील भाग हेअर ड्रायर ने गरम हवा मारून ५ ते १० मिनिटे स्वच्छ करून घ्या. या वेळी चेहरा शक्यतो दुसऱ्या बाजूला घ्या व हेअर ड्रायर फिरवताना उडणारी धूळ डोळे, नाका तोंडात जाणार नाही याची काळजी घ्या. या साठीच मास्क व गॉगलचा वापर करा.  मग ती परत बसवूनच या उन्हाळ्याचा पहिला-पहिला ए.सी चालू करा. या नंतर दर महिन्याला एकदा जाळी काढून झटकून स्वच्छ करायला विसरू नका.

सदरील माहिती आपण लोमत मध्येही वाचू शकता

गुळगुळीत चेहरा कोरोना टाळण्यासाठी उपयुक्त

गुळगुळीत चेहरा कोरोना टाळण्यासाठी उपयुक्त

गुळगुळीत चेहरा कोरोना टाळण्यासाठी उपयुक्त दाढी ठेवणे हा प्रत्येकाच्या वैयक्तिक आवडी – निवडीचा प्रश्न असू शकतो. पण सीडीसी म्हणजे सध्या कोरोना विषयी अधिकृत माहितीचा स्त्रोत असलेल्या जागतिक संघटनेचे म्हणणे आहे की कोरोना टाळण्यासाठी सध्या दाढी व मिशा ची फॅशन बाजूला ठेवून गुळगुळीत चेहरा ठेवणे तुमचा व इतरांचा कोरोना पासून बचाव करेल.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

दाढी व मिशा  नसल्यामुळे एक तर एन ९५ मास्क तसेच इतर मास्क तुमच्या चेहऱ्याला फिट बसेल. मास्क लावल्यावर दाढी असलेल्या चेहऱ्यातून गुळगुळीत चेहऱ्याच्या तुलनेत २०० ते १००० पट अधिक श्वासाची गळती सिध्द झालेली आहे. ब्रिटीश मेडिकल जर्नल या नामांकित जर्नलने डॉक्टरांच्या संदर्भात या विषयाला घेऊन चर्चा केली आहे .गुळगुळीत चेहरा कोरोना टाळण्यासाठी उपयुक्त किमान डॉक्टरांनी तसेच सर्वसामान्यांनी ही  मास्क नीट बसण्यासाठी, स्वतः व इतरांच्या च्या सुरक्षिततेच्या दृष्टीने  दाढी – मिशा काढण्याचा विचार करावा असा सल्ला ब्रिटेन मध्ये देण्यात आला आहे. यात दुसरी शक्यता अशी आहे कि कोरोना बाधित किंवा लक्षणे नसलेली कोरोनाची कॅरीअर व्यक्ती शिंकली, खोकलली तसेच हसताना व बोलताना तोंडा भोवतीच्या केस कोरोना पसरवण्यास कारणीभूत ठरू शकता. कोरोना बाधित व्यक्तीचा दाढी मिशांना हात लागल्यास व तोच हात परत इतरत्र लागल्यास कोरोना चा संसर्ग इतरांना होण्याची शक्यता वाढते . हात धुण्यासोबतच वारंवार तोंडाला हात न लावणे हा कोरोना टाळण्यासाठीचा महत्वाचा उपाय आहे . दाढी मिशा असल्यास वारंवार तोंडाला व चेहऱ्याला हात लावण्याचे प्रमाण वाढते . त्यामुळे ही इतरांना संसर्ग होण्याची शक्यता वाढते. कोरोना बाधित व्यक्तीला ही दाढी मिशा असल्यास धोका वाढतो. विषाणू मिश्रीत स्त्राव दाढी – मिशांमध्ये बोलताना , खोकताना अडकत असल्याने याचे परत स्व – संक्रमण होऊन वायरल लोड वाढू शकतो व बरे होण्यास उशीर होऊ शकतो .

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

असा सोडवा भाजी मंडईचा प्रश्न

भाजी मंडईचा प्रश्न असा सोडवा

असा सोडवा भाजी मंडईचा प्रश्न सध्या सोशल डिस्टन्सिंगचा सगळ्यात धुव्वा उडतो आहे तो भाजी मंडई मध्ये उडणाऱ्या गोंधळामुळे. यासाठी केईम हॉस्पिटलचे माजी प्राध्यापक चंद्रकांत पाटणकर यांनी उत्तम कल्पना सुचवली आहे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

असा सोडवा भाजी मंडईचा प्रश्न ज्यामुळे लोकांचा भाजी खरेदीचा प्रश्नही सुटेल आणि सोशल डिस्टन्सिंगही पाळले जाईल. यासाठी खाली दिलेल्या आकृती प्रमाणे प्रत्येक शहरात खुल्या मैदानात भाजी विक्रेत्यांची  व्यवस्था करता येईल. यात आत जाण्याचे व बाहेर येण्याचे दोन विरुध्द बाजूला वेगळे मार्ग असतील. दोन विक्रेत्यांमध्ये आडवे २0  फुट व उभे १०  फुट अंतर असेल ( याने ८ मीटरचा सोशल डिसटन्सिंगचा नियम पाळला जाईल . विक्रेत्यांना आत जाताना मास्क व हातावर सॅनीटायझर टाकून सोडले जाईल . तसेच त्यांना सर्दी , खोकला , ताप नसावा. आत व बाहेर जाण्याच्या मार्गावर प्रत्येकी एक किंवा दोन सुरक्षारक्षक थांबतील . एका वेळेला तीन जणांना हातावर सॅनीटायझर टाकून आत सोडले जाईल. एकाने एका निश्चित सरळ रांगेत जाऊन  खरेदी करायची आहे.आत गेलेले तिघे दोन स्टॉल पुढे गेल्यावरच वरच पुढच्या तिघांना आत सोडले जाईल. तो पर्यंत इतरांनी बाहेर एकमेकांपासून लांब उभे राहयचे आहे. तसेच एकाच वेळेला गर्दी टाळण्यासाठी प्रत्येक विभागाला खरेदी साठी वेळ ठरवून देता येऊ शकते . ही मैदानावर उभारलेल्या मंडई चहु बाजूंनी दोरखंड किंवा तात्कालिक बांबूच्या छोटे आच्छादन करून बंद केलेले असेल. तसेच अंतर्गत तीन किंवा चार रांगा अशाच एकमेकांपासून वेगळ्या केलेल्या असतील.  एका बाजूला ३० ते ४० फुट जागेत भाजी विक्रेत्यांची वाहनांसाठी जागा ठेवता येईल.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

गर्भवती महिलांचा कोरोना पासून बचाव

गर्भवती महिलांचा कोरोना पासून बचाव गर्भवती स्रीने तपासणी साठी रुग्णालयात जावे का, हा प्रश्न अनेकांना पडतो आहे. ९ महिने पूर्ण होई पर्यंत जर बाळाच्या हालचाली नॉर्मल जाणवत असतील, रक्तस्राव होत नसेल, व इतर काही त्रास नसेल तर प्रसुतीच्या तारखे पर्यंत रुग्णालयात जाऊ नये.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

सध्या पुढील काही अढळल्यासच स्रीरोगतज्ञांकडे जावे –

१.  पोट खूप दुखत असल्यास. २. योनीमार्गातून रक्त स्त्राव/बाळाभोवतीचे पाणी बाहेर येणे. ३. बाळाच्या हालचाली कमी जाणवणे ( दिवसातून १२ वेळा किमान बाळ लात मारते, हे मोजल्यास व पोटात बाळाचे लाथ मारण्याचे प्रमाण १२ पेक्षा कमी असल्यास)  ४.  ९ महिने भरल्यावर

पुढील गोष्टींसाठी स्रीरोगतज्ञांचा फोनवर  सल्ला घ्यावा

  • उलट्या, साधा सर्दी खोकला,  पाठदुखी , बद्धकोष्ठता

सोनोग्राफी साठी कधी जावे

१. गरोदर झाल्यापासून एकदा ही सोनोग्राफी केलेली नसल्यास. २. गरोदर पणात इतर आजारांमध्ये जास्त जोखीम असल्यास व बाळाला/आई ला धोका असल्यास तीन महिन्यातून एकदा  ३.बाळाची हालचाल जाणवत नसल्यास. ४. एकोणिसाव्या आठवड्यात बाळाच्या जन्मजात व्याधी तपासण्यासाठी अॅनॉमॉली स्कॅन

 गर्भवती महिलांचा कोरोना पासून बचाव गरोदर असताना नियमित ब्लड प्रेशर मोजणे आवश्यक असते. त्यासाठी घरगुती इलेक्ट्रॉनिक मशीन द्वारे उपलब्ध असेल तर तपासावे. किव्हा डोके दुखत असेल तरच आपल्या डॉक्टर कडे रक्तदाब तपासण्यास जावे . याशिवाय कोरोना टाळण्यासाठी वारंवार हात धुणे , सोशल डीस्टन्सिंग , घरा बाहेर न जाने हे सगळे नियम गरोदर स्रीला  ही लागू आहेत.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

भाज्या, धान्य, किराणा, दुध घेताना काळजी

भाज्या धान्य किराणा दुध घेताना काळजी जर कोरोना बाधित व्यक्तीला अजून माहित नसेल कि तो कोरोना ग्रस्त आहे. आणि त्याने हाताळलेल्या वस्तू आपण हाताळल्या तर त्यामाध्यमातून कोरोना पसरू शकतो. यासाठी पुढील काळजी घ्यावी –

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

  • भाज्या धान्य किराणा दुध घेताना काळजी फळ भाज्या स्वीकारताना शक्यतो त्या हात न लावता थेट पिशवीत टाकायला सांगाव्या .
  • आणलेल्या भाज्या घरात आल्या आल्या एका भांड्यात पाण्यात ओताव्या.
  • पिशवी घरात न ठेवता घरा बाहेर किंवा छतावर उन्हात टाकावी व परत जाताना तीच पिशवी न्यावी.
  • पाले भाज्या पाण्यात ( शक्यतो कोमट ) काही वेळ पूर्ण  बुडवून ठेवाव्या व फळ भाज्या, फळे १२ तास पाण्याच्या मोठ्या भांड्यात ठेवाव्या.
  • पाण्यातून बाहेर काढल्यावर सर्व भाज्या व फळांवर हेअर ड्रायर च्या गरम वाऱ्या खालून जाऊ द्यावे (वेळ – या गरम वाऱ्याच्या चार पाच झुळुका प्रत्येक फळ भाजी वरून जाईल असे पाहावे )
  • या काळात सध्या कच्या भाज्या मुळीच खावू नये. शिजवूनच खाव्या. फळे खाण्या आधी परत धुवून घ्यावे .
  • दुध – पिशवीतून घेत असाल तर घरात आणल्यावर पिशवी बाहेरून धुवून घ्यावी.
  • जर गवळ्या कडून घेत असाल तर स्वच्छ भांड घरा बाहेर ठेवाव आणि गवळ्या ला भांड्याला न शिवता दुध भांड्यात टाकायला सांगाव.
  • घेतलेले दुध घरात आणल्या आणल्या उकळून घ्यावे.
  • गवळ्यांनी सर्दी खोकला असल्यास दुध द्यायला जाऊ नये , इतर स्वस्थ व्यक्तीची व्यवस्था करावी. गवळ्यांनी शक्य झाल्यास मास्क वापरावा व दोन घरांच्या मध्ये हँड सॅनीटाझर वापरावा . तो गवळ्याला परवडत नसेल तर दुध घेण्याऱ्या घरांनी दुध घेतल्यावर गवळ्याच्या हातावर आपल्या घरातील हँड सॅनीटायझर टाकावा.
  • भाज्या धान्य किराणा दुध घेताना काळजी किरणा माल आणताना भाजी घेतानाचे सगळे नियम व  पिशवी बाहेर किंवा छतावर ठेवण्याचा नियम पाळावा तसेच किराणा सामान एक दिवस न वापरता तसेच राहू द्यावे. २४ तासाने वापरायला काढावे.
  • कुठले ही बाहेरचे सामान आणल्यावर घरात आल्या आल्या हात धुवायला विसरू नये.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

मधुमेह, रक्तदाब रुग्णांना कोरोना विषयी काळजी

मधुमेह रक्तदाब रुग्णांना कोरोना विषयी काळजी मधुमेह असलेल्या रुग्णांची प्रतिकारशक्ती कमी असते . त्यामुळे मधुमेह असलेल्यांना कोरोना चा धोका किंवा कोरोना झाल्यास गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. अशा रुग्णांनी सर्वप्रथम आपली साखर नियंत्रणात आहे का या साठी नियमित साखर तपासली पाहिजे. सध्या रक्त तपासण्यासाठी लॅब मध्ये जाऊ नये. घरीच ग्लुकोमीटरने तपासणी करावी. जर इन्सुलिन घेत असाल तर आठवड्यातून २ वेळा आणि गोळ्या चालू असल्यास व साखर नियंत्रणात असल्यास पंधरा दिवसातून एकदा तपासणी करावी. त्यासाठी साखरेची तपासणी कधी करू नये.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

मधुमेह, रक्तदाब रुग्णांना कोरोना विषयी काळजी. सकाळी उपाशी पोटी व जेवल्यावर दोन  तासाने तपासणी करावी . उपाशी पोटी साखर – ९० ते १३० व जेवणा नंतरची १४० – १७० या रेंज मध्ये असावी याची काळजी घ्यावी . तसेच मागील तीन महिन्यांची साखरेची पटली दाखवणारे एचबी ए १ सी हे तीन महिन्यातून एकदा केले नसेल तर करावे. ते ७ च्या आसपास असावी. सध्या घरात असल्याने व्यायाम कमी झाल्याने मधुमेही रुग्णांची साखर वाढण्याची शक्यता आहे. यासाठी काही लोक सकाळी बाहेर जाऊन  चालण्याची  सवय टाळेबंदी मध्ये तशीच चालू ठेवली आहे .

कृपया अशा मधुमेही रुग्णांनी फिरायला बाहेर जाऊ नये. त्यासाठी घरातच किंवा छतावर जाऊन चालण्याची सवय सोडू नये. तसेच नियमित औषधांचा डोस नियमित घ्यावा . रुग्णांनी आठवड्यातून एकदा ५०० mg विटामिन सी पुढील २ महिने घेण्यास हरकत नाही तसेच शक्य असल्यास विटामिन डी ६०,०००० IU आठवड्यातून एकदा ८ आठवडे घेण्यास हरकत नाही. घरतील समान आणण्यास घरातील मधुमेही रुग्ण सोडून इतरांनीच  बाहेर  जावे

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

कोरोना व्हायरसची सविस्तर लक्षणे

कोरोना व्हायरस ची सविस्तर लक्षणे

कोरोना व्हायरसची सविस्तर लक्षणे – कोरोनाची तीव्र ताप, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास हा आपल्याला माहित आहे. पण हा त्रास तीव्र किंवा गंभीर कोरोनाच्या रुग्णालाच होतो. ८५ टक्के लोकांना कोरोना संसर्ग झाला तरी एक तर साधा ताप आणि थोडा खोकला असा सौम्य स्वरुपाची लक्षण दिसतील. त्यातही काहींना असे ही होऊ शकते की काहीच लक्षणे आली नाहीत. म्हणून साधा खोकला, ताप, सर्दी असली तरी आपल्याला इतरांपासून लांब रहायचे आहे हे समजून घ्यावे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

पुढील लक्षणे कोरोना व्हायरसची सविस्तर लक्षणे आहेत . पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी – थोडे थकल्या सारखे वाटेल तिसऱ्या दिवशी – ताप, थोडा खोकला आणि घशात खाजवल्या सारखे वाटणे किंवा खवखवणे. चौथ्या दिवशी – डोकेदुखी पाचव्या दिवशी – पोटाशी निगडीत लक्षणे , पोट दुखी , क्वचित जुलाब , खोकला थोडा वाढेल, ताप तेवढाच राहील किंवा वाढेल. सहाव्या, सातव्या दिवशी – अंगदुखी , थकवा वाढेल, डोकेदुखी कमी होईल, पोटाच्या तक्रारी राहतील, भूक कमी होईल. आठव्या , नवव्या दिवशी – सगळी लक्षणे ताप , अंगदुखी कमी होईल , खोकला मात्र तसाच राहील किंवा वाढू ही शकतो पण आठव्या किंवा नवव्या दिवशी मात्र जर त्रास वाढला किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल तर मात्र इथे उपचारांची किंवा लक्ष ठेवण्याची. तसेच तपासणी करण्याची ही गरज वरील लक्षणांसोबत त्यातच सातव्या दिवशी नंतर किंवा या लक्षणांमध्ये कुठे ही ताप वाढत गेला किंवा खोकला व श्वास घेण्यास त्रास होत असेल तरच आहे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

होम क्वारंटाइन म्हणजे काय

होम क्वारंटाइन म्हणजे नेमके काय

होम क्वारंटाइन म्हणजे नेमके काय? कोरोना व्हायरस च्या साथीमध्ये सध्या अनेकांना होम क्वारंटाइन सांगून ही ते दिलेल्या सूचनांचे पालन करत नाहीत. ज्यांना हा सल्ला दिला आहे त्यांनी होम क्वारंटाइन म्हणजे नेमके काय हे समजून घेण्यासाठी पुढील गोष्टी करायच्या आहेत.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

– शक्यतो वेगळी शौचालयाची सोय असलेल्या आणि वाऱ्याचे चांगले सर्क्युलेशन असलेल्या रूममध्ये राहणे व कुटुंबातील इतर सदस्यांना न भेटणे. – इतर सदस्यांना त्याच खोलीत राहणे आवश्यक असल्यास त्यांच्या पासून १ मीटर पेक्षा जास्त अंतर ठेवणे व त्यांना स्पर्श न करणे. – होम क्वारंटाइन मध्ये असेलेल्या व्यक्तीचे जेवणाचे भांडे, कपडे वेगळे ठेवणे व वेगळे धुणे. – ६० वर्षा पेक्षा जास्त वय, कुठल्याही वयाची मधुमेह, डायबेटीस चे रुग्ण, लहान मुले, गरोदर माता यांच्याशी या व्यक्तीचा थेट संपर्क यायला नकोच. – घराचा उंबरठा हा १४ दिवस ओलांडायचा नाही. – कुठे ही हात लागल्यास लिक्विड सोप / साबण व पाण्याने हात धुवावे. – पूर्णवेळ मास्क वापरावा व तो दर ६ तासाने बदलावा. जुना मास्क ५ % ब्लिचिंग सोल्युशन मध्ये टाकून नंतर जाळावा किंवा जमिनीखाली पुरावा. मास्क जळताना काळजी घ्यावी. – ताप, खोकला अशी कुठलीही लक्षणे दिसल्यास सरकारी यंत्रणेशी संपर्क करावा. – होम क्वारंटाइन मध्ये असलेल्या व्यक्तीला जेवण देणे किंवा इतर गोष्टी देण्याची जबाबदारी एकाच व्यक्तीने पार पाडावी. – या व्यक्तीला जेवण किंवा इतर गोष्टी देणाऱ्या व्यक्तीने मास्क, ग्लोज घालावे. – या घरात शक्यतो एकाही बाहेरच्या व्यक्तीला येऊ देऊ नये.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

कोरोना व्हायरस विरोधात चाबूक हातात घेण्याची वेळ

कोरोना विरोधात चाबूक हातात घेण्याची वेळ

कोरोना व्हायरस विरोधात चाबूक हातात घेण्याची वेळ आता आलीये.

मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोना साथीच्या नियोजनाविषयी व उपाययोजनांविषयी डॉ. अमोल अन्नदाते यांचे दै. लोकमत मधील खुले मा. मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांच्यापर्यंत पोहचण्यासाठी कृपया ते पत्र जास्तीत जास्त शेअर करा.

प्रती,
माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि
आरोग्यमंत्री राजेश टोपे,

कोरोना विरोधात चाबूक हातात घेण्याची वेळ ती हीच!

राज्यातील कोरोना व्हायरस बाधितांची व मृतांची संख्या वाढत असताना आता २६/११ च्या हल्ल्या प्रमाणे ही स्थिती आहे. त्यासाठी आपण दोघे प्रयत्नशील आहातच. पण तरीही कोरोनाला सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील आम्ही अनेक वर्षे शिकत, वैद्यकीय अभ्यासक्रमात वाचत आलेल्या गोष्टी ग्रास रूटला तशा राबवलेल्या दिसत नाहीत. त्यामुळे या गोष्टी आपल्या पर्यंत पोहोचवून त्यावर एका दिवसाचा ही विलंब न होता अमलबजावणी झाली तरच आपण येत्या दोन आठवड्यात या साथीच्या तिसऱ्या स्टेजला रोखू शकतो. नंतर जर ग्रामीण भागात ही साथ पसरली तर मोठा अनर्थ होऊ शकतो. तसेच या वेळी आंतरराष्ट्रीय पातळीवर कोरोना व्हायरस विरोधात लढण्यासाठी चीन, कोरिया, सिंगापूर मॉडेल चा अभ्यास करून यातील प्रत्येकाच्या चांगल्या उपायांची गोळाबेरीज महाराष्ट्रात होताना दिसत नाही.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

सध्या केस ट्रेसिंग, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, आयसोलेशन व क्वारंटाइन या चार शब्दांभोवती सगळी यंत्रणा प्रत्येक मिनिटा गणिक हलली पाहिजे. पण असे कुठे ही होताना दिसत नाही. आयसोलेशन कक्षांची संख्या अजून ही खूप कमी आहे. तालुका पातळीवरून रुग्ण सापडल्यास तो नेमका कसा व कोणी जिल्ह्याच्या ठिकाणी घेऊन जायचा याचे कुठले ही नियोजन अजून दिसत नाही. कुठल्या ही वयक्तिक सुरक्षेच्या साधना शिवाय रुग्ण नेणाऱ्या ड्रायव्हरलाच लागण झाल्याची उदाहरण समोर आहे. संशयित रुग्णाला प्रवास करत नेणेही मोठे जोखमीचे ठरणार आहे. म्हणून प्रत्येक तालुक्याला एक आयसोलेशन कक्ष तातडीने उभा करावा लागणार आहे. आयसोलेश साठी १०० खाटा तयार आहेत या गोष्टींना काही अर्थ नाही. फक्त आयसोलेशन कक्ष असे कुठल्या ही कक्षाला पाटी लावून तो तयार होणार नाही. हा कक्ष कसा असला पाहिजे व यातील ७ महत्वाची मार्गदर्शक तत्वे कुठली याचा अभ्यास होऊन त्या होत आहेत की नाही याचे व्हिडीओ प्रुफ मुख्य सचिव, मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री यांनी रोज तपासले तरच यंत्रणा हलेल. ग्रामीण भागात रुग्ण स्वतः उपजिल्हा रुग्णालयात कोरोना पॉजिटिव्ह व रुग्णाशी संपर्क आल्याचे सांगून ही त्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्याची चिठ्ठी देऊन पाठवले जात आहे. अजूनही परदेशी प्रवाशांचे वर्गीकरण व स्क्रिनिंग बाबत गोंधळ सुरूच आहे. अशाने परदेशातून येणाऱ्या इंडेक्स केसेस कशा रोखल्या जाणार. तसेच यांच्या बॅग्स चे निर्जंतुकीकरणही अजूनही विमानतळावर होत नाही. औरंगाबाद ला एका रशियन प्राध्यापिका कोरोना पॉजिटिव्ह असल्याचे समजून ही तिने दिवसभर परीक्षा घेतलेल्या विद्यार्थ्यांना काही तास एकत्र ठेवून, त्यातील तीन चार जणांचे स्वॅब घेऊन या विद्यार्थ्यांना सोडून देण्यात आले. अशी अनेक अनागोंदीचे प्रकार रोज घडत आहेत.मुळात होम क्वारंटाइन हा शब्द आपला सर्वांचा मोठा घात करणार आहे हे समजून घेतले पाहिजे. हातावर शिक्के मारून लोक स्वतःच्या घरी स्वयंप्रेरणेने एका खोलीत १४ दिवस राहतील हे अशक्य आहे. म्हणून आताच्या घडीला क्वारंटाइन साठी मुंबईत ओसाड व रिकामी असलेली सर्व कामगार हॉस्पिटल, सर्व शासकीय गेस्ट हाउस, ग्रामीण भागातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, गरज असल्यास खाजगी दवाखाने व अगदी या पुढे जाऊन मुंबईतील ७२००० रिकामे फ्लॅट, या पलीकडे जाऊन इतर भागातील हॉटेल्स अशी एक क्वारंटाइन साठी मोठी व्यवस्था आपण निर्माण केली व अति सूक्ष्म नियोजन करून प्रत्येक केसच्या संपर्कात आलेल्यांना १४ दिवस क्वारंटाइन केले तरच या घडीला केसेस व मृतांची संख्या कमी होईल. हे आपल्याला फार काळ नाही तर फक्त पुढील दोनच आठवडे करायचे आहे. मुख्यमंत्री येतात तेव्हा रात्रीतून रस्ते आणी हेलीपॅड तयार होतात मग या सुविधा यंत्रणेने मनावर घेतले तर या कुठल्या ही विलंबा शिवाय का उभ्या राहू शकत नाहीत. यात कुठे ही चीनने १० दिवसात ४५०० खाटांचे रुग्णालय बांधले तसे करायचे नाही तर शासनाच्याच तयार वास्तूंमध्ये नियोजन करून त्या कार्यरत करायच्या आहेत.

पण आदरणीय मुख्यमंत्री साहेब, कोरोना व्हायरस विरोधात चाबूक हातात घेण्याची वेळ आली आहे , केरळ या राज्याने प्रत्येक पॉजिटिव्ह रुग्णाच्या दर तासाच्या प्रवासाचे मॅपींग केले व सर्व संपर्कात आलेल्यांची पूर्ण माहिती मिळवली. हीच तत्परता आपल्याकडे आणावी लागणार आहे. होम क्वारंटाइन सध्या तरी अपयशी होताना दिसत असले तरी ते करयचे असल्यास फक्त हातावर शिक्के मारून त्यांना घरी सोडून हे साध्य होणार नाही. त्यांना यंत्रणेने घरी सोडून त्यांच्यावर जीपीएस द्वारे निगराणी ठेवण्यासाठी गृह विभागाची यंत्रणा कामाला लावावी लागेल. यासाठी सिंगापूर मॉडेलचा अभ्यास करून त्याची पूर्ण नक्कल केली तरी यश येईल. २८ फेब्रुवारी रोजी लॅन्सॅटने लक्षणांनंतर जितक्या लवकर आयसोलेश व तातडीने संपर्कात आलेल्यांचे क्वारंटाइन तितके प्रभावी साथ नियंत्रण हे इतर देशांच्या अनुभवा वरून सांगितले आहे. दक्षिण कोरियाने जास्तीत संशयितांच्या तपासण्या व युध्द पातळीवर आदर्श व्यवस्थेत आयसोलेशन, क्वारंटाइनकवर ( होम क्वारंटाइन नाही ) हे प्रारूप राबवले व साथ नियंत्रित करून मृत्यू दर ०.२ टक्के इतका कमी ठेवला.

आताच्या घडीला ही साथ पसरण्याचे A,B,C,D चेन समजली तर सगळ्या उपाय योजनांचे नियोजन सोपे जाईल पण हे आपण दोघां पर्यंत कदाचित पोचतच नाही आहे. म्हणून प्राधान्य कशाला द्यावे या विषयी सर्व यंत्रणेचा गोंधळ उडालेला आहे. आपण जाहीर केलेले कोरोना साथीचे ४५ कोटी अजून पोहोचलेलेच नाही. त्याचा खर्च कसा करायचा याचे कुठले ही सूक्ष्म नियोजन जिल्हा पातळीवर झालेले नाही. उपजिल्हा रुग्णालयांना दीड दोन लाखांपर्यंत हवी ती खरेदी करा असे संदेश केवळ पोहोचले आहेत . यात त्याच त्या सर्वसामन्यांच्या सूचनांचे बोर्ड लावण्यात हा निधी वाया जाण्याची दाट शक्यता आहे. केस ट्रेसिंग व कॉन्टॅक्ट ट्रेसिंग कसे करायचे याचे प्रशिक्षण अजून नाही, आशा सेविका, हेल्थ वर्कर्सला आपली काय भूमिका असेल या बाबत काहीही माहिती नाही. सरकारी रुग्णालयात डॉक्टरांना रुग्ण तपासताना वापरायचे पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट पोहोचण्याची अजून लक्षणे दिसत नाहीत.

लोकसंख्येच्या प्रमाणात व सर्वाधिक केसेस असून ही आपल्या राज्याची टेस्टिंग क्षमता खूप कमी आहे. तसेच टेस्टिंग साठी परदेश प्रवास व कोविड पॉजिटिव्ह शी संपर्क एवढा मर्यादित निकष ठेऊन आता चालणार नाही व तो विस्तारीत करावा लागणार आहे. टेस्टिंग सेन्टर्स वाढवणे हे केंद्राच्या अखत्यारीत असले तरी सर्वाधिक केसेस असल्याचे कारण सांगत केंद्राला टेस्टिंग सेन्टर्स साठी सतत तगादा करून एका आठवडा थांबणे ही या घडीला संकटात भर घालणारे ठरणार आहे. पॉजिटिव्ह रुग्ण व गंभीर रुग्णांसाठी उद्या वेन्टीलेटर्स चा ही मोठा तुटवडा जाणवणार आहे. तसेच सध्या दाखल असलेल्या पॉजिटिव्ह रुग्णांवर इतर देशात नेमके काय उपचार केले जात आहेत ही माहिती घेऊन त्या प्रमाणे उपचारात कुठलेही अपग्रेडेशन दिसत नाही. क्लोरोक्वीन, जिंक, हाय डोस विटामिन सी सारखे उपचार परदेशात यशस्वी होताना दिसत आहेत व आपल्या पेक्षा मोठ्या संकटात असून ही ते उत्तम पुरावे व उपचाराच्या आधारा साठी डेटा जगाला देताना दिसत आहेत. आपल्या यंत्रणेला मात्र याचे कुठले ही सोयरसुतक नाही.

पॉजिटिव्ह शी संपर्क एवढा मर्यादित निकष ठेऊन आता चालणार नाही व तो विस्तारीत करावा लागणार आहे. टेस्टिंग सेन्टर्स वाढवणे हे केंद्राच्या अखत्यारीत असले तरी सर्वाधिक केसेस असल्याचे कारण सांगत केंद्राला टेस्टिंग सेन्टर्स साठी सतत तगादा करून एका आठवडा थांबणे ही या घडीला संकटात भर घालणारे ठरणार आहे. पॉजिटिव्ह रुग्ण व गंभीर रुग्णांसाठी उद्या वेन्टीलेटर्स चा ही मोठा तुटवडा जाणवणार आहे. तसेच सध्या दाखल असलेल्या पॉजिटिव्ह रुग्णांवर इतर देशात नेमके काय उपचार केले जात आहेत ही माहिती घेऊन त्या प्रमाणे उपचारात कुठलेही अपग्रेडेशन दिसत नाही. क्लोरोक्वीन, जिंक, हाय डोस विटामिन सी सारखे उपचार परदेशात यशस्वी होताना दिसत आहेत व आपल्या पेक्षा मोठ्या संकटात असून ही ते उत्तम पुरावे व उपचाराच्या आधारा साठी डेटा जगाला देताना दिसत आहेत. आपल्या यंत्रणेला मात्र याचे कुठले ही सोयरसुतक नाही.

निवडणुकीच्या प्रचारात जसे घरो घरी जाऊन प्रचार होतो त्या पद्धतीने केसेस शोधणे व सरकार स्थापने साठी गतीने हालचाली होतात तशाच आयसोलेशन व क्वारंटाइन ची सोय उभारणे या क्षणाला गरजेचे आहे. आपण प्रयत्न करतच आहात व छत्रपती शिवाजींचे मावळे म्हणत आपण सगळ्यांचे मनोबल ही वाढवले. पण आदरणीय मुख्यमंत्री, शिवाजी महाराजांप्रमाणे आता मावळ्यांना वाचवण्यासाठी आपणच तलवार उपसून कोरोना व्हायरस विरोधात, या युद्धात उतरून सूक्ष्म नियोजन करण्याची ही वेळ आहे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

COVID -19 प्रतिकारशक्ती कशी वाढवावी

COVID-19 प्रतिकारशक्ती कशी वाढवावी

COVID -19 प्रतिकारशक्ती कशी वाढवावी? कारण कोरोना व्हायरस शी लढताना आपले सगळ्यात मोठे हत्यार असणार आहे आपली प्रतिकारशक्ती. त्यातच ६० वर्षावरील ज्येष्ठ आणि मधुमेह असणाऱ्यांनी प्रतिकारशक्ती वाढवण्याची विशेष काळजी घ्यायला हवी. COVID -19 प्रतिकारशक्ती कशी वाढवावी? यासाठी काही टिप्स

१. आपली झोप ही प्रतिकारशक्ती साठी महत्वाची असते. म्हणून रोज ७ ते ८ तास शांत झोप खूप महत्वाची आहे.
२. आहारामध्ये विटामिन सी युक्त सिट्रस फळे म्हणजे लिंबू , मोसंबी, संत्रे, आवळा, टमाटे यांचा समावेश करा.
३. प्रथिने युक्त आहार प्रतिकारशक्ती साठी गरजेचा असतो. त्यामुळे नाष्ट्या मध्ये मोड आलेले कडधान्य, जेवणात डाळी, सोयाबीन, नाचणीची भाकरी याचा समावेश करावा.
४. सूर्यप्रकाशातून मिळणारे ‘ड’ जीवनसत्व प्रतिकारशक्ती वाढवते. घरात राहयचे असले तरी सकाळी घराच्या छतावर थोडा वेळ ध्यान केल्यास ‘ड’ जीवन सत्व मिळेल व ताणतणाव कमी होईल .

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

५. रोजच्या आहारात एखाद फळ आणि भाज्या असायला हव्या.
६. आपल्या आतड्यातील बॅक्टेरिया खूप महत्वाचे असतात. यासाठी आहारात दही, ताकाचा समावेश करा. पण दही, ताक रात्रीच्या जेवणात नको.
७. चहा मध्ये अद्रक आणि जेवणात अधून मधून लसुनाचा वापर करा.
८. जास्त ताण घेतल्याने प्रतिकारशक्ती वर त्याचा दुष्परिणाम होतो. त्यामुळे भीतीच्या छायेत राहू नका.
९. व्यायाम, योग, प्राणायाम किंवा चालण्याचा व्यायाम रोज अर्धा तास तरी करा.
१०. शरीरातील पाण्याची पातळी प्रतिकारशक्तीसाठी महत्वाची आहे त्यामुळे रोज तहान लागल्यावर आणि किमान ६ ते ८ ग्लास पाणी प्यायला हव.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता