लहान मुलांना लस देणे का गरजेचे आहे?

लहान मुलांना लस देणे का गरजेचे आहे?

अमेरिका, जपान, सिंगापूरसह इतर २० देशांनी काही महिन्यांपूर्वीच लहान मुलांसाठीच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात केली आहे. यात प्रामुख्याने १२ वर्षांपुढील कुमारवयीन मुलांचा समावेश असला तरी या देशांमध्ये २ वर्षांच्या पुढच्या मुलांचे लसीकरण लवकरच सुरू होणार आहे. फायजरसारख्या  लसींच्या इतर देशांतील लहान मुलांवरील क्लिनिकल ट्रायल्स पूर्ण झाल्या असल्या तरी  भारतात या ट्रायल्स अजूनही सुरू आहेत. भारतातील पालक लहान मुलांसाठी कोरोना लस कधी उपलब्ध होईल या प्रतीक्षेत आहेत. ही प्रतीक्षा साहजिक असली तरी सहज करता येतील व उपलब्ध आहेत त्या गोष्टी लहान मुलांसाठी करायच्या राहून गेल्या आहेत. जी लस उपलब्ध आहे ती फक्त शास्त्रीय प्रयोग पूर्ण झालेले नाहीत म्हणून लहान मुलांना देता येत नाही. अशा लसीला ‘ऑर्फन व्हॅक्सिन’ किंवा ‘अनाथ लस’ असे म्हणतात. भारतात उपलब्ध असलेल्या कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन आणि स्पुतनिक या तिन्ही लसी अशाच लहान मुलांसाठी अनाथ ठरत आहेत.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

सध्या जगभरात उपलब्ध असलेल्या कोरोना लसीच्या लहान मुलांमधील शास्त्रीय प्रयोगांचा आढावा घ्यायचा झाल्यास फायजर, मॉडर्ना व सायनोफार्म या तीन लसींचे १२ ते १८ वर्षे वयोगटात प्रयोग यशस्वी झाले असून, त्यांची लहान मुलांमधील परिणामकारकता व सुरक्षितता ही मोठ्या व्यक्तींमध्ये आहे तेवढीच असल्याचे सिद्ध झाले आहे. इस्रायलमध्ये तर फायजर लसीचे प्रयोग हे ६ महिने ते १८ वर्षे या वयोगटात सुरू आहेत. म्हणूनच २० देशांत १२ वर्षांच्या पुढे लसीकरण मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. फायजरचे लहान मुलांसाठी ६ महिने वयाच्या पुढे प्रयोग शेवटच्या टप्प्यात आहेत व लवकरच पूर्ण होणार असल्याने तीही लस सर्वच लहान मुलांसाठी वापरता येईल, असे सांगितले जाते आहे.

भारतात सध्या ३ वर्षे ते १८ वर्षे वयोगटासाठी कोव्हॅक्सिन या लसीच्या वापराच्या प्रयोगाच्या तिसऱ्या टप्प्यातील दुसरा भाग नागपूर येथे सुरू आहे. यात मुलांना दुसरा डोस देऊन एक महिना झाला आहे. या प्रयोगाचे अधिकृत निकाल अजून जाहीर झाले नसले तरी या प्रयोगात सहभागी डॉक्टरांनी सांगितलेल्या माहिती प्रमाणे अजून कुठल्याही मुलावर कुठलेही दुष्परिणाम आढळून आलेले नाहीत. तसेच पहिल्या डोसनंतर शरीरात निर्माण होणाऱ्या अँटीबॉडीजची पातळी समाधानकारक आढळून आली आहे. हा अभ्यास पूर्ण होऊन त्याचे अंतिम निष्कर्ष जाहीर होण्यास तीन ते चार महिने व ते प्रकाशित होण्यास आणखी तीन महिने लागण्याची शक्यता आहे. 
कोविशिल्डच्या लहान मुलांमधील ट्रायल्स इंग्लंडमध्ये सुरू करण्यात आल्या होत्या; पण काही कारणास्तव त्या थांबविण्यात आल्या. स्पुतनिक या लसीच्या लहान मुलांसाठीच्या ट्रायल्स अजून कुठेही सुरू झालेल्या नाहीत.
– म्हणजे सध्या फक्त कोव्हॅक्सिनकडूनच लहान मुलांच्या लसीकरणाच्या दृष्टीने अपेक्षा आहेत. पण, या लसीचे उत्पादन खूप कमी आहे व ते अजून मोठ्या व्यक्तींनाच पुरेनासे झाले आहे. 

हान मुलांमध्ये कोरोनाचा आजार खूप सौम्य आहे म्हणून लसीकरणाची घाई करण्याची गरज नाही, असा केंद्र सरकारचा होरा आहे. लहान मुलांमध्ये आजार सौम्य असला तरी १५ वर्षांपुढील मुलांमध्ये काही प्रमाणात गुंतागुंत आढळून आली आहे. तसेच इतर सर्व वयोगटातील लहान मुलांमध्ये कोरोना होऊन गेल्यावर चार ते सहा आठवड्यांनी एमआयएससी ही जीवघेणी गुंतागुंत दिसून येत आहे. मुलांमध्ये कोरोना व त्यानंतर गुंतागुंतीत मृत्युदर कमी असला तरी तो शून्य नाही. तसेच लहान मुले  लक्षणविरहित व सौम्य असल्याने घरातील इतर ज्येष्ठांसाठी संसर्गाचा सर्वांत मोठे स्रोत (सुपर स्प्रेडर) ठरतात. 

हर्ड इम्युनिटी (समूह / कळप प्रतिकारशक्ती)साठी देशातील ७० ते ८० टक्के लोकसंख्येचे लसीकरण व्हावे लागते. देशात ० ते १४ या वयोगटात ३५.३ % व १८ वर्षांपर्यंतच्या वयोगटात ४१ % लोकसंख्या आहे. या ४१ % लोकसंख्येच्या लसीकरणासाठी घाई न करता हर्ड इम्युनिटीचे उद्दिष्ट साध्य होणे अशक्य आहे. 
‘सर्व जण सुरक्षित नाहीत, तोपर्यंत कोणीच सुरक्षित नाही’ हे कोरोना लसीकरणाचे मुख्य सूत्र आहे. या ‘सर्व जण’चा महत्त्वाचा घटक असलेल्या लहान मुलांचे लसीकरण सुरू करण्याबाबतच्या हालचालींचा अत्यंत संथ वेग कोरोनाविरोधात सुरक्षेच्या दृष्टीने घातक आहे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.

‘कोरोना’चा रुग्ण कधीपर्यंत इतरांना संसर्गित करू शकतो!

‘कोरोना’चा रुग्ण कधीपर्यंत इतरांना संसर्गित करू शकतो!

‘कोरोना’चा रुग्ण कधीपर्यंत इतरांना संसर्गित करू शकतो! सध्या अनेक रुग्ण ७ दिवसांनी सौम्य लक्षणे असल्यास घरी पाठवले जात असले आणि घरी अलगीकरणात ( आयसोलेशन ) राहायला सांगितले जात असले तरी नेमके कधी पर्यंत अलगीकरणात राहायचे हे मात्र अनेकांना नीट माहित नाही. हे किती दिवस कोरोणाचा बरा झालेला रुग्ण इतरांना संसर्ग करू शकतो यावर ठरेल. याचे उत्तर प्रत्येक देशा गणिक आणि व्यक्ती गणिक बदलू शकते. पण याचे शास्त्रीय उत्तर आहे जो पर्यंत व्यक्ती ची लक्षणे पूर्ण जात नाहीत आणि जो पर्यंत टेस्ट कोरोना निगेटिव्ह येत नाही तो पर्यंत कोरोनाचा रुग्ण इतरांना संसर्गित करू शकतो.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

    ‘कोरोना’चा रुग्ण कधीपर्यंत इतरांना संसर्गित करू शकतो! सिंगापूर मधील एका अभ्यासात असे दिसून आले की बाधित झाल्यावर व पॉझीटीव असला तरी तो ११ दिवसच इतरांना संसर्गित करतो. पण या अभ्यासाच्या निष्कर्षावर अवलंबून राहता येत नाही. कारण चीन मध्ये एका अभ्यासात रुग्ण बरा झाला व निगेटिव्ह असला  तरी ३० दिवसांपर्यंत इतरांना संसर्गित करू शकतो असे दिसून आले. आपल्या देशा साठी याच्या मधला आकडा सध्या संशोधन होई पर्यंत ग्राह्य धरला जाऊ शकतो. म्हणून रुग्णालयातून  ७ दिवस झाल्यावर टेस्ट करणार नसाल तर घरी १४ दिवस असे एकूण २१ दिवस आयसोलेशन मध्ये राहिल्यास चांगले. यात चौदाव्या दिवशी जर टेस्ट केली व ती निगेटिव्ह असेल व कुठली ही लक्षणे नसतील तर १४ दिवसा नंतर आयसोलेशन संपवण्यास हरकत नाही. पण चौदाव्या दिवशी टेस्ट निगेटिव्ह असून लक्षणे गेली नसतील तर मात्र आयसोलेशन लक्षणे संपे पर्यंत चालू ठेवावे.  हे आयसोलेशन स्वतः साठी महत्वाचे आहेच पण आपल्या कुटुंबाला व संपर्कात येणाऱ्या इतरांना संसर्ग होऊ नये म्हणून ही महत्वाचे आहे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

एकदा कोरोना झाल्यावर परत संपर्क आल्यास कोरोना होऊ शकतो का?

एकदा कोरोना झाल्यावर परत संपर्क आल्यास कोरोना होऊ शकतो का?

एकदा कोरोना झाल्यावर परत संपर्क आल्यास कोरोना होऊ शकतो का? परदेशात काही कोरना रुग्णांना परत संपर्क आल्यावर कोरोनाचा संसर्ग झाला. पण हे प्रमाण खूप कमी होते. एकदा कोरोना झाल्यावर परत संपर्क आल्यास काय? याचे उत्तर संशोधक प्रयोग करून शोधत आहेत.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

बॉस्टन येथे ९ माकडांवर केलेल्या एका प्रयोगात सहभागी झालेल्या माकडांचा बरे झल्यावर ३५ दिवसांनी परत कोरोना विषाणूशी संपर्क आला. पण या नंतर या आधी एकदा संसर्ग झालेल्या या माकडांना दुसऱ्यांदा संपर्क आल्यावर काहींना अत्यंत सौम्य व काहींना कुठलीही लक्षणे दिसली नाहीत. त्यांच्या शरीरातील प्रतिकारशक्ती दर्शवणारे घटक म्हणजेच अँटीबॉडिज या मानव बरे झाल्यावर निर्माण होतात तेवढ्याच पातळीच्या होत्या. यावरून परत कोरोना झाल्यास शरीरात आधी इतकाच प्रतिकारशक्तीचा प्रतिसाद मिळू शकतो असे दिसून येते. पण या अभ्यासाच्या मर्यादा या आहेत, की हे प्राण्यांवरील संशोधन आहे. एकदा कोरोना झाल्यावर परत संपर्क आल्यास कोरोना होऊ शकतो का? तसेच ही शरीरातील प्रतिकारशक्ती किती काळ टिकून राहते हे समजण्यासाठी अजून वाट पाहावी लागेल. तसेच मानवामध्ये काय होते हे सांगण्यास याचा आधार घेतला जाऊ शकतो पण मानवात काय घडते हे साथ पुढे सरकेल तसे स्पष्ट होईल. तसेच दुसऱ्यांदा संसर्ग झाल्यास तो तीव्र नसेल असे मानले तरी एकदा कोरोना झालेल्या रुग्णाला सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, हात धुणे हे सर्व प्रतिबंधाचे नियम पाळायचेच आहेत. पण मात्र गोवर, कांजण्या या आजारांसारखे एकदा संसर्ग झाला की तो संसार्गच तुम्हाला आयुष्यभर कायमची प्रतिकारशक्ती बहाल करेल हे सांगता येणार नाही.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

जेष्ठांसाठी लसीकरण

जेष्ठांसाठी लसीकरण

जेष्ठांसाठी लसीकरण आपल्याला आजवर लहान मुलांसाठी लसीकरण माहित आहे. पण लसीकरण हे ज्येष्ठांसाठी ही असते याबद्दल कोणाला माहिती नसते. त्यातच कोरोना सारख्या साथीमध्ये या लसीकरणाला वेगळे महत्व आहे. पुढील लसी ६० वर्षा पुढील व ६० वर्षा खाली मधुमेह, किडनीचे आजार, कॅन्सरचे रुग्ण व  आधी कॅन्सरची औषधे घेतलेले ६० वर्षा खालील ज्येष्ठ आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन लसी घेऊ शकतात .

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

या लसी पुढील प्रमाणे आहेत

  • दर वर्षी फ्लू म्हणजे सर्दी, खोकल्याची लस
  • न्यूमोकोकल लस – दोन प्रकारच्या, एकदाच – एक डोस
  • टायफॉईड – एक डोस
  • कावीळ बी – आधी घेतला नसल्यास तीन डोस – पहिला, त्यानंतर १ व सहा महिन्यांनी
  • कावीळ ए – २ डोस
  • टीटॅनस व डीपथीरीया- टीडी दर १० वर्षातून एकदा

या लसी घेण्याचे फायदे –

  • जेष्ठांसाठी लसीकरण वया मुळे कमी झालेल्या प्रतिकारशक्ती मुळे हे जंतुसंसर्ग टळतील
  • हे आजार कमी झाल्यामुळे कोरोना मुळे तणावाखाली असलेल्या आरोग्य व्यवस्थे वरचा ताण कमी होईल
  • कोरोना झाला तर न्युमोकोकल लसीमुळे त्यासोबत होणार्या बॅक्टेरियल जंतूसंसर्गाची शक्यता कमी होईल
  • कुठल्या ही आजारा नंतर प्रतिकारशक्ती कमी होते व आजार नंतर काही दिवस कोरोनाच नव्हे तर इतर सर्व व्हायरल आजारांची शक्यता वाढते. लसींमुळे आजार कमी झाल्या मुळे कोरोनच नव्हे तर इतर व्हायरल आजारांची जोखीम वाढवणारे घटक कमी होतील
  • आजारी रुग्णाला तपासताना व कोरोनाचे निदान करताना लस घेतली असल्याने ‘हे आजार नाही’ हा निष्कर्ष काढणे सोपे जाईल.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

कोरोना रोखण्यासाठी मौखिक आरोग्य

कोरोना रोखण्यासाठी मौखिक आरोग्य

कोरोना रोखण्यासाठी मौखिक आरोग्य कोरोनाचा संसर्ग होण्यासाठी आपले नाक व तोंड हा मुख्य मार्ग आहे. जर आपले मौखिक आरोग्य चांगले असेल तर आपल्याला कोरोनाचा धोका कमी संभवू शकतो. त्यामुळे कोरोन साथीच्या काळात मौखिक आरोग्य चांगले ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी पुढील काही महत्वाच्या गोष्टी

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

  1. कोरोना रोखण्यासाठी मौखिक आरोग्य घरातील सर्व व्यक्तींचे टूथब्रशेस एकाच ठिकाणी ठेवले जातात परंतु कोरोनाच्या वातावरणात ब्रश प्रत्येकाचे वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात यावे. रोज टूथब्रश बॉक्स किंवा प्लास्टिक बॅग ठेवावा लहान मुलांच्या ब्रश ची विशेष काळजी घेण्यात यावी.
  2. सर्व सदस्यांसाठी एकच टूथपेस्ट वापरली जाते, त्याऐवजी शक्य झाल्यास वेगवेगळ्या स्मॉल साइज टूथपेस्ट वापराव्यात.
  3. दात कोरण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या टूथ पिक्स पेपर मध्ये गुंडाळून कचऱ्याच्या डब्यात टाकाव्यात,  बऱ्याचदा उघड्यावर टाकण्यात येतात.
  4. घरातील प्रत्येकासाठी डेंटल फ्लॉसच्या  वेगळ्या बॉक्सेस चा वापर करण्यात यावा व पेपरमध्ये गुंडाळून कचऱ्याच्या डब्यात टाकावे.
  5. घरातील एखाद्या व्यक्तीला सर्दी-खोकला झाला असल्यास त्यांनी वेगळ्या  बेसिनचा वापर करावा. 
  6. जीभ स्वच्छ करण्याचे टंग क्लीनर , इंटर डेंटल ब्रश  वापरल्यावर गरम पाण्यात बुडवून ठेवावे व नंतर  बंद कंटेनरमध्ये  ठेवावे
  7. कोरोना रोखण्यासाठी मौखिक आरोग्य दंततज्ञ डॉ. अनघा राजवाडे यांच्या वृद्धांनी काढता येणारी कवळी  रात्री झोपताना कवळी बॉक्समध्ये पाण्यात काढून ठेवताना रोज dentures cleaning tablet वापरावी ( इतर वेळी आठवड्यातून एकदा वापरली जाते ) कवळी स्वच्छ करण्यासाठीचा ब्रश  पण रोज वेगळ्या डब्यात ठेवावा. लहान मुलांनी काढलेल्या कवळीला हात लावू नये  याची काळजी घ्यावी.घरातील सर्वजण वापरत असलेल्या कॉमन बेसिन जवळ कवळी  ठेवू नये. स्वतंत्र कप्पा करावा.
  8. दंत तज्ञांकडे उगीचच जाऊ नये. जर तातडीचे उपचार गरजेचे असतील तरच जावे. फोन वर सल्ला घेऊन पुढे ढकलण्या सारखी प्रोसीजर असेल तर पुढे ढकलावी.
  9. रूट कॅनाल उपचार किव्हा इम्प्लांट टाकण्याची प्रोसिजर सुरु असेल  अश्या रुग्णांनी विशेष स्वच्छता ठेवावी, किडलेल्या दाता मध्ये अन्न अडकून राहू नये म्हणून प्रत्येक जेवणानंतर ब्रश करणे गरजेचे आहे
  10. सकाळी उठल्यावर व रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करणे अनिवार्य आहे.
  11. सुजलेल्या हिरड्या व तापमानाची संवेदना वाढली असेल तर घरा बाहेर पडून मेडिकल वरचे  महागडे mouthwash, mouth rinse  वापरण्यापेक्षा मीठ + हळद यांचे कोमट मिश्रण वापरून खळखळून गुळण्या करणे आवश्यक आहे. कोरोना  संसर्ग रोखण्यासाठी साध्या पाण्याने  दिवसातून एकदाच नव्हे तर प्रत्येक जेवणानंतर चूळ व गुळण्या करणे आवश्यक आहे.
  12.  लहान मुलांना रात्रीच्या वेळी वापरायची काढता येतील अशी आपलायन्स  दिली जातात त्यांची विषय स्वच्छतेच्या दृष्टीने काळजी घ्यायला हवी.

    सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

फोनवरून डॉक्टरांचा सल्ला घेताना…

फोनवरून डॉक्टरांचा सल्ला घेताना...

फोनवरून डॉक्टरांचा सल्ला घेताना “‘कोविड-१९’ची साथ आणि लॉकडाऊन व साथीमुळे अनेक जण डॉक्टरांचा फोनवरून सल्ला घेत आहेत. पण टेलिकन्सल्टेशन हा प्रकार अजून नवा असल्याने डॉक्टर व रुग्ण या दोहोंना त्याची शिस्त नाही. ती लावून घेण्यासाठी काही नियम समजावून घ्यायला हवेत…

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

१.फोनवरून डॉक्टरांचा सल्ला घेताना फोन किंवा आॅनलाईन कन्सल्टेशनसाठी कुठल्याही अ‍ॅपचा वापर करण्याची गरज नाही. फार्मा कंपन्या काही अ‍ॅप्स स्पॉन्सर करून डॉक्टरांना वापरण्यासाठी देत आहेत. असे अ‍ॅप्स डॉक्टरांनी मुळीच वापरू नये. कारण यामुळे आपल्या रुग्णांचा डेटा, विश्वसनीय माहिती फार्मा कंपन्यांकडे जाऊ शकते. थेट डॉक्टर व रुग्णांनी त्यांचे नंबर वापरावे व व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून कन्सलटेशन करावे.

२. कुठल्या जाहिरातीला भुलून किंवा गुगलवर डॉक्टर शोधू नये. गुगलवर डॉक्टरांची माहिती देणारे काही जस्ट डायल, प्रॅक्टोसारखे नेटवर्क डॉक्टरांकडून पैसे घेऊन कोणाचे नाव आधी दाखवायचे हे ठरवतात. म्हणून आपले नियमित डॉक्टरच टेलिकन्सल्टेशनसाठी चांगले राहतील.

३. कन्सल्टेशनची वेळ आणि ते किती अवधीचे असेल, हे आधी निश्चित करून घ्यावे. त्याला लागणारे पैसे व ते कसे भरावे, हे आधी विचारून घ्यावे. फीची देवाण-घेवाण ही थेट डॉक्टर आणि रुग्णामध्येच व्हावी. कोणत्याही थर्ड पार्टीमार्फत नको.

४. आपल्या तक्रारी, आधीचा वैद्यकीय इतिहास, नुकतेच काढलेले रिपोटर््स हे आधीच डॉक्टरांना पाठवून ठेवावे.

५. आॅनलाईन कन्सल्टेशनमध्ये डॉक्टरांशी फक्त आजार व वैद्यकीय तक्रारींबद्दल चर्चा करा. फार अनौपचारिक गप्पा मारू नका. शक्यतो एका कन्सल्टेशनमध्ये एकाच व्यक्तीबद्दल बोला.६. प्रत्यक्ष शारीरीक तपासणी शक्य नसल्याने आपल्या तक्रारी नेमकेपणाने सांगा.

७. फोनवरून डॉक्टरांचा सल्ला घेतानाकन्सल्टेशन झाल्यावर डॉक्टरांच्या सहीच्या प्रिस्क्रिप्शनची मागणी करा. त्यावर हे प्रिस्क्रिप्शन फोनद्वारे दिले गेले आहे, याची डॉक्टर नोंद करतील.८. कन्सल्टेशन संपल्यावर उपचार सुरु असताना काही शंका असल्यास प्रत्येक वेळी डॉक्टरला फोन करू नका. मेसेज करा म्हणजे सवड मिळाल्यावर डॉक्टर त्याला प्रतिसाद देतील.

९. मधुमेह, रक्तदाब, थायरॉईडसारखे दीर्घकालीन आजार असणाऱ्या रुग्णांसाठी कन्सल्टेशनचा हा मार्ग चांगला आहे. पण ‘फोनवर उपचार शक्य नाही, तब्येत जास्त वाटते आहे आणि येऊन भेटावेच लागेल,’ असे डॉक्टर सांगत असल्यास फोन कन्सल्टेशनचा हट्ट धरु नका. डॉक्टरांना भेटायला जा.

१०. फोन कन्सल्टेशन ही साथीच्या काळातील तात्पुरती सोय आहे. डॉक्टरांची प्रत्यक्ष भेट व तपासणीची जागा फोन कन्सल्टेशन कधीही घेऊ शकत नाही, हे ध्यानात ठेवावे. साथीच्या काळात उगीचच रुग्णालयाशी संबंध येऊ नये म्हणून फोन कन्सल्टेशनचा मार्ग चांगला आहे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

How To Improve Immune System

How To Improve Immune System 10 most effective immunity boosters in day to day routine A most important factor in the fight against corona or any illness is Immunity. In this chronicle, Dr. Amol Annadate talks about 10 most effective lifestyle practices that are very simple to follow and help improve individual immunity. Watch these easy to adopt practices in daily routine to be strong healthy and safe in a vulnerable environment.

How To Improve Immune System कोरोना या किसी बीमारी के खिलाफ लड़ाई में सबसे महत्वपूर्ण बात इम्युनिटी है। इस विडिओ में डॉ अमोल अन्नदाते 10 सबसे प्रभावी जीवन शैली प्रथाओं के बारे में बात करते हैं जो व्यक्तिगत रोग प्रतिकार शक्ती में सुधार करने में मदद करने के लिए बहुत सरल हैं। कमजोर वातावरण में मजबूत स्वास्थ और सुरक्षित रहने के लिए दैनिक दिनचर्या में इन प्रथाओं को अपनाने के लिए जरूर देखे

https://youtu.be/0Yy5PbAsVzc

How To Improve Immune System कोरोना किंवा कोणत्याही आजाराविरूद्धच्या लढाईतील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रतिकारशक्ती. या विडिओ मध्ये डॉ. अमोल अन्नदाते 10 सर्वात प्रभावी जीवनशैली प्रथा बद्दल बोलतात ज्या अनुसरण करणे आणि वैयक्तिक रोग प्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत करण्यासाठी अतिशय सोप्या आहेत. या असुरक्षित वातावरणामध्ये सुरक्षित राहण्यासाठी दररोजच्या या पद्धती जाणून घ्या … नक्की पहा

For regular updates from Dr. Amol Annadate like announcements, youtube videos, and articles stay tunned.

पवित्र रमजान ‘कोविड’ मुक्त ठेवण्यासाठी

पवित्र रमजान 'कोविड' मुक्त ठेवण्यासाठी

पवित्र रमजान ‘कोविड’ मुक्त ठेवण्यासाठी नुकताच रमजान चा पवित्र महिना सुरु झाल्याने रोजे ही सुरु झाले आहेत. यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या दृष्टीने रमजान मध्ये काय बदल करावे व काळजी घ्यावी याचे निर्देश दिले आहेत. देशभरातून मौलवी व डॉक्टरांनी याला मान्यता दिली आहे .

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

  • कोरोना चे निदान झालेले, निदान होऊन बरे झालेले व निश्चित निदान झालेल्या केस च्या संपर्कात  येऊन सध्या होम क्वारनटाइनचा सला दिलेल्यांनी रमजान चा रोजा ठेवू नये.
  • साठ वर्षा पेक्षा जास्त वय असलेल्यांनी तसेच ६० पेक्षा कमी वय असले तरी मधुमेह, ह्रदयरोग, कॅन्सरचा त्रास असलेल्यांनी शक्यतो रोजा टाळावा.
  • ६० वर्षा खालील काही त्रास नसणाऱ्यानी रोजा ठेवण्यास हरकत नाही.

पवित्र रमजान ‘कोविड’ मुक्त ठेवण्यासाठी पवित्र कुरानमध्ये ही आजारी व्यक्तींना रोजा करण्यातून सूट देण्यात आली आहे. या संकेतां शिवाय अजून काही गोष्टी रमजान दरम्यान  पाळण्यास हरकत नाही. मधुमेह नियंत्रित असणारे काही जण या काळात रोजा ठेवतात. अशांनी  रक्तातील साखर  ७० च्या खाली व ३०० च्या वर जाणार नाही याची काळजी घ्यावी. स्वस्थ व्यक्तींनी रोजा करत असताना खोकला, ताप, सर्दी असल्यास लगेचच रोजा बंद करून डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. या वर्षी रमजान दरम्यान प्रार्थना, नमाज घरीच कराव्या व सणा दरम्यान एकमेकांच्या घरी जाणे व एकत्रित इफ्तारचे कार्यक्रम  टाळावे.पवित्र रमजान ‘कोविड’ मुक्त ठेवण्यासाठी रमजान दरम्यान रोजा पाळता आला नाही. तरी पवित्र कुरानमध्ये कफारा ही तरतूद सांगितली आहे. कफारा म्हणजे पैसे किंवा जेवणाचे दान. कोरोना साथी साठी आवश्यक दान करून आपण रोजा न करता कफाराचे पालन करु शकता.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

वैद्यकीय धोरणशून्यता

वैद्यकीय धोरणशून्यता

वैद्यकीय धोरणशून्यता सध्या कुठल्या ही खाजगी रुग्णालयात कोरोना बाधित रुग्ण सापडला तर लगेचच रुग्णालय सील केले जाते व रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स , स्टाफला क्वारनटाइन केले जाते. यामुळे फक्त मुंबईत १७०० मोठ्या रुग्णालयांच्या खाटा आज बंद आहेत. आधीच राज्यात डॉक्टर व पॅरामेडिकल स्टाफचा तीव्र तुटवडा आहे. राज्याच्या आरोग्य खात्यात डॉक्टरांच्या १७००० जागा रिक्त आहेत.  राज्यात १०० डॉक्टर व वैद्यकीय स्टाफ ला कोरोनाची लागण झाली आहे. खाजगी नव्हे तर वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय सेवेतील अनेक डॉक्टर क्वारनटाइन मध्ये जात आहेत. धोरणशून्यते मुळे कोरोना विरुध्द या लढ्यात  सैनिकांची पहिली फळी आपण निष्क्रिय करत आहोत.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

     वैद्यकीय धोरणशून्यता हे सर्व टाळण्यासाठी धोरण व कार्यपद्धती मध्ये काही मुलभूत बदल तातडीने करण्याची गरज आहे. साथ आटोक्यात येई पर्यंत सर्वात आधी तापाचे रुग्ण आणि ताप नसलेले रुग्ण अशी रुग्ण तपासताना विभागणी आपल्याला करावी लागणार आहे. शासनाने यासाठी फिवर क्लिनिक शहरामध्ये विभागवार आणि प्रत्येक तालुक्यात एक असे सुरु करण्याची तातडीने गरज आहे. हे केले असे बोलले जाते आहे पण कुठे ही कार्यरत झालेले दिसत नाहीत. यामुळे ताप, सर्दी, खोकला म्हणजे कोरोनाची शक्यता असलेले रुग्ण या बाह्यरुग्ण विभागात जाऊ शकतात. मोठ्या खाजगी रुग्णालयांना ही रुग्णालयाच्या आवारात इतरत्र तापाचे रुग्ण वेगळे तपासण्याची व्यवस्था करावी लागणार आहे. प्रत्येक खाजगी व शासकीय रुग्णालयात जो पर्यंत प्रवेशद्वारा जवळ तापाच्या रुग्णांचे वेगळे स्क्रीनिंग करून त्यातून कोरोना संशयीतांसाठी वेगळी व्यवस्था उभारली गेली  नाही तर हॉस्पिटल हे संसर्गाचा मोठा स्त्रोत ठरू शकतात. हे करण्या ऐवजी थेट हॉस्पिटलच सील करण्याचा विवेकशून्य सोपा मार्ग आपण स्वीकारत आहोत. ताप, खोकल्याचे सर्व रुग्ण शासकीय रुग्णालयात पाठवा असे सांगितले जात असले तरी यातील बरेच रुग्ण नाकारले जात असल्याने परत खाजगी रुग्णालयातच येत आहेत. तसेच ७० टक्के आरोग्य सेवा खाजगी क्षेत्र देत असताना अचानक सर्व रुग्ण शासकीय रुग्णालयात जाणे शक्य नाही. सवयी प्रमाणे रुग्ण आधी आपल्या ठरलेल्या खाजगी डॉक्टरचाच सल्ला आधी घेतात. यातून एखादा रुग्ण कोरोना बाधित अढळला तर लगेचच अख्खे हॉस्पिटल १४ दिवस सील करण्याची गरज नाही. सोडियम हायपोक्लोराईट ने फ्युमीगेशन  करून एका दिवसात तत्काळ हे रुग्णालय सुरु केले जाऊ शकते.वैद्यकीय धोरणशून्यता या पुढे जाऊन अति नील किरणांचा प्रकाश झोत पूर्ण रुग्णालयात फिरवला तरी काही तासात निर्जंतुक होऊन रुग्णालय सेवा देण्यास तयार होऊ शकते. साथ कमी झाली तरी प्रत्येक शहरात आणि प्रत्येक रुग्णालयात  कोरोनाचे रुग्ण आढळणारच आहेत. मग या प्रत्येक रुग्णालयाला आपण कुठल्या ही धोरणा शिवाय सील करत गेलो तर इतर आजाराच्या रुग्णांनी जायचे कुठे. निर्जंतुकीकरणातून काही तासात या भागातील कोरोनाची संसर्ग करण्याची क्षमता नष्ट होईल.

                  राज्य सरकारने डॉक्टरांच्या वयक्तिक सुरेक्षेचे कवच म्हणजे पीपीई च्या अनउपलब्धतेचा प्रश्न सोडवण्यासाठी वेगळी पळवाट शोधून काढली आहे. फक्त कोरोना रुग्णांची काळजी घेत असलेल्या डॉक्टर व पॅरामेडिकल स्टाफ लाच पीपीईची गरज आहे असे राज्य सरकारचे म्हणणे आहे. पण असे असेल तर कोरोना बाधित रुग्ण सापडलेल्या रुग्णालयातील डॉक्टर, स्टाफ कोरोना पाँझीटीव येत आहेत त्याचे काय? सध्या कोरोनाचे रुग्ण इतके झपाट्याने वाढते आहे कि कुठला रुग्ण कोरोना बाधित असेल हे काहीच सांगता येत नाही. रुग्ण येतो तेव्हा तो कोरोनाचा आहे हे त्याच्या कपाळावर ( भाळी ) लिहिलेले नसते. तपासलेला रुग्ण चार पाच दिवसांनंतर कोरोना बाधित असल्याचे समजते आणि मग त्याला तपासलेले सर्व डॉक्टर, स्टाफ क्वारनटाइन केले जातात आणि हॉस्पिटल सील केले जाते. जर प्रत्येक रुग्ण तपासताना पीपीई वापरले तर ही वेळ येणार नाही कारण सुरेक्षेच्या कवचामुळे डॉक्टर, स्टाफ ला संसर्गाचा धोका राहणार नाही आणि डॉक्टर, स्टाफ ला क्वारनटाइन करण्याची गरज ही राहणार नाही. अनेक देशांमध्येच हेच धोरण राबवले जाते आहे. असे असताना आपल्याकडे ही धोरणशून्यता का? या शिवाय कोरोनाची बाधा असलेल्या ३० टक्के रुग्णांना कुठलेही लक्षण दिसून येत नाहीत. सुरक्षेशिवाय रुग्ण तपासताना या मुळे अनेक डॉक्टरांना बाधा झाल्याची उदाहरणे आहेत. या शिवाय डॉक्टरांनी सुरक्षेची साधने वापरली नाही म्हणून मला कोरोना झाला असे न्याय वैद्यक खटले दाखल करण्याची धमकी काही ठिकाणी रुग्ण डॉक्टरांना देत आहेत. हा प्रश्न फक्त डॉक्टरचा वयक्तिक संसर्गापासून सुरक्षेचा नाही तर यामुळे डॉक्टर हे संसर्गाचे  सगळ्यात मोठे स्रोत ठरू शकतात म्हणून हा प्रश्न सर्वांचा आहे. यासाठी राज्य सरकारने फक्त कोरोना कक्षातच पीपीई हे धोरण लवकरच बदलले नाही तर मोठा घात होणार आहे. यात डॉक्टरच नाही तर रुग्णालयाशी निगडीत इतर सर्व स्टाफ येतो. वैद्यकीय क्षेत्रात तीन पातळ्यांवर काम करणार्यांना किती जाडीचे व नेमके कुठले पीपीई वापरले पाहिजे याची मार्गदर्शक तत्वे उपलब्ध आहेत. राज्यात पहिला रुग्ण सापडून एक महिना व देशात दोन महिने उलटून गेले तरी आम्ही आरोग्य क्षेत्रातील पहिल्या फळीला अजून पीपीई देऊ शकलो नाही. एक वेळ खाजगी रुग्णालयांचा प्रश्न बाजूला ठेवला तरी शासकीय रुग्णालये व वैद्यकीय महाविद्यालयांचा प्रश्न जास्त गंभीर आहे. ज्या उपजिल्हा रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रावर ४० ते ५० जणांचा स्टाफ आहे तिथे १५ – २० साधे मास्क पाठवले जात आहेत. रोज जाहीर होणाऱ्या हजारो कोटींचा निधी हा तातडीने प्राधान्यक्रम ठरवून पीपीई खरेदी साठी वळवणे गरजेचे आहे. रुग्णांचे स्वॅब जिथे घेतले जात आहेत तिथे कलेक्शन चेम्बर्स तातडीने उभारणे गरजेचे आहे. परदेशात तर स्वॅब घेताना डॉक्टरचा धोका कमी करण्यासाठी नेगाटीव प्रेशर असणारे व रुग्णाचा जराही संबंध येऊ न देणारे चेम्बर्स बनवले आहेत. केरळ मध्ये सगळे सँपल्स याच पद्धतीनेच घेतले जात आहेत. प्रेशर चेम्बर नसले तरी किमान साधे रुग्ण व डॉक्टर मध्ये भिंत निर्माण करणारे चेम्बर्स सर्व स्वॅब घेणाऱ्या सेन्टर्स वर राज्यात तातडीने उभारणे गरजेचा आहे. सुरक्षिततेची काळजी घेतल्यास काम करणार्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास, हिम्मत वाढेल आणी झोकून देऊन काम करण्यास नैतिक बळ मिळेल.

             वैद्यकीय धोरणशून्यता खाजगी डॉक्टर पीपीई विकत घेण्यास तयार आहेत पण त्या उपलब्धच नाहीत. सुरुवातीला पीपीईच्या खाजगी विक्रेत्यांना पीपीई शासन सोडून कोणाला ही विकू नये असे निर्देश देण्यात आले होते जे नंतर शिथिल करण्यात आले. तसेच सरकार ने ठरवलेले पीपीईचे दर आणी खाजगी विक्रेत्यांचे दर यात तफावत असल्याने ही पीपीईच्या खरेदीस उशीर होतो आहे. आयसीएमआरने हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन आरोग्य क्षेत्रात रुग्णांशी थेट संबंध येणार्यांना देण्याचे निर्देश दिले आहेत. पण मागच्या आठवड्यात खाजगी सोडाच पण शासकीय सेवेतील वैद्यकीय कर्मचार्यांसाठी हे औषध उपलब्ध नव्हते. अशात भारताने अमेरिकेला या औषधाचा साठा पाठवल्याची बातमी आली. अशा गोष्टींमुळे स्वतःचा प्राण पणाला लावून काम करणाऱ्या वैद्यकीय क्षेत्राचे नैतिक खच्चीकरण होते. युद्ध जिंकण्यासाठी सर्वात  महत्वाचे असते सैनिकांना बळ देणे . वैद्यकीय सैनिक आज लढण्यास तयार आहेत, लढत आहेत. गरज आहे त्यांना युद्ध जिंकण्यासाठी पुरेसे हत्यार देण्याची.हॉस्पिटल्स सील करण – चुकीचे धोरण

सदरील माहिती आपण  महाराष्ट्र टाईम्स मध्येही वाचू शकता

कोरोना टाळण्यासाठी टी झोन मध्ये हात लावणे टाळा

टी झोन मध्ये हात लावणे टाळा

कोरोना टाळण्यासाठी टी झोन मध्ये हात लावणे टाळा कोरोना टाळण्यासाठी हात धुणे जितके महत्वाचे आहे तितकेच गरज नसताना चेहऱ्याला हात न लावणे महत्वाचे आहे. चेहऱ्याला, केसांना हात लावणे ही आपल्याला अजाणतेपणाने लागली सवय आहे. वागणुकीचे शास्त्र असे सांगते कि ज्या प्राण्यांपासून आपली उत्क्रांती झाली तेव्हा पासून ही सवय मानवाला चीटकलेली आहे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

कोरोना टाळण्यासाठी टी झोन मध्ये हात लावणे टाळा चेहऱ्याला हात लावणे, केसांमधून हात फिरवणे हे तणावापासून मुक्ती देणारी कृती असते. अनेकांना नखे खाणे किंवा वारंवार नाकाच्या शेंड्याला हात लावणे अशा सवयी ही लागलेल्या असतात. मुलींना केस वारंवार निट करण्याची सवय लागलेली असते. सरासरी प्रत्येक जन एका तासात १५ ते २४ वेळा चेहऱ्याला हात लावतो. पण कोरोना टाळण्यासाठी ही सवय आपल्याला मोडावी लागणार आहे. याचे कारण हात धुतले तरी हात धुतल्यावर आपला हात कोरोना बाधित जागेला लागला व तोच हात आपण चेहऱ्या वरून फिरवला तर आपल्याला कोरोनाची बाधा होऊ शकते. चेहऱ्याच्या ज्या भागांना हात लावायचा नाही त्याला टी झोन असे म्हणतात. यात दोन्ही डोळे, नाक आणि तोंड येते. हे टी झोन महत्वाचे असले तरी पूर्ण चेहऱ्यालाच हात लावणे टाळावे. तसेच केसांना ही उगीच हात लावणे टाळावे. घरात प्रत्येकाचा कंगवा ही वेगळा असावा. ही सवय मोडण्यासाठी आम्ही  डॉक्टरांनी एक शक्कल लढवली आहे.  हाताच्या कोपराला घट्ट चीगटपट्टी रोमन लेटर II म्हणजे  लिहितात तशा घट्ट चीगट पट्ट्या उभ्या आणि दोन आडव्या लावायच्या. यामुळे ठरवल तरी हात चेहऱ्या पर्यंत जाऊ शकत नाही. डॉक्टरच नाही तर पोलीस व फिल्ड वर वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांनी हे करायला हव. वारंवार चेहऱ्याला हात लावणे टाळण्यासाठी आता काही अॅप्स ही आले आहेत. तुमचा हात चेहऱ्याला जवळ गेला कि हे अॅप्स तुम्हाला एक विशिष्ट आवाजाने सिग्नल देतात.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता