मास्क घालताना चुका टाळा

मास्क घालताना चुका टाळा

मास्क घालताना चुका टाळा सध्या सर्वांना मास्क घालण्यास सांगितले आहे. पण अनेकांना मास्क कसा घालावा हे अजून माहित नाही. मास्क घालताना व काढताना दोरीला धरूनच वापरावा. तो मास्कच्या तोंड झाकण्याच्या भागावर हात लावून वापरू नये. घालताना नाकाच्या शेंड्याच्या वर पर्यंत म्हणजे नाक सुरु होते तिथे वर पर्यंत यायला हवा. खाली हनुवटी पूर्ण झाकली जाऊन खालचा भाग पूर्ण ह्नुवटीच्या मागे जायला हवा.मास्क घालताना चुका टाळा कानाच्या मागे दोऱ्या लावताना किंवा बांधताना इतक्या घट्ट लावाव्या की चेहऱ्या वर दोन्ही बाजूला मास्क येईल तिथे फार मोकळी जागा सुटायला नको. मास्क काढत असताना परत मधल्या भागाला हात न लावता काढावा. एकदा मास्क काढल्यावर तो थोडा वेळ इतरत्र घरात ठेवला, परत वापरला – असे करू नये. घरात वापरलेला मास्क काढून ठेवल्यावर सगळ्यात मोठा धोका, लहान मुलांनी त्याला हात लावण्याचा आहे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

मास्क लावताना पुढील चुका टाळा –

  • मास्क घालताना चुका टाळा मास्क नाकाखाली म्हणजे नाकपुड्या उघड्या राहतील असे लावू नका
  • .  मास्क हनुवटीच्या वर ठेवू नका. मास्क लावल्यावर हनुवटी दिसता कामा नये
  • मास्क लावताना सैल लावल्यामुळे दोन्ही बाजूंना तो मोकळा , हवेची ये जा होऊ शकेल असा लावू नका.
  • नाकाच्या शेंड्यावर किंवा त्याच्या थोडेसे वर ठेवू नका. जितका शक्य होईल तितका शेंड्याच्या वर म्हणजे नाक सुरु होते तिथपर्यंत घ्या.
  • चष्मा नको असल्यावर जसे डोक्यावर ठेवतात तसा मास्क थोडा वेळ नको आहे म्हणून खाली ओढून मानेच्या पुढे लटकू दिला आणी नंतर परत घातला , असे करू नका .

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

ए.सी.वापरू शकतो कि नाही?

ए. सी. चालू करू शकतो की नाही

ए.सी.वापरू शकतो कि नाही? यावर बरीच चर्चा चालू आहे. एका रूम मधील ए.सी. असेल तर त्या माध्यमातून कोरोना पसरू शकतो या विषयी कुठला ही पुरावा नाही व याची शक्यता नाही. पण सेन्ट्रल ए.सी ज्यातून सगळी कडे फिरून हवा जाते , या विषयी अजून निश्चित माहिती नाही. पण सेन्ट्रल पेक्षा वयक्तिक रूम साठीचा ए.सी. चांगला . पण वापरण्या अगोदर हा ए.सी. ही स्वच्छ करून घ्यावा.  अस्वच्छ ए.सी मुळे दमा, ॲलर्जीक खोकला, ॲलर्जीक सर्दी वाढते व ताप–सर्दी–खोकला व त्यातच लीजोनेल्ला , असीनॅटोबॅक्ट हे  निमोनिया करणारा बॅक्टीरीया ए.सी मधून पसरतो.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

ए.सी.वापरू शकतो कि नाही? उन्हाळा नुकताच सुरु झाल्याने या दिवसात अचानक अनेक महिने बंद असलेले ए.सी. चालू होतात. बऱ्याचदा हे ए.सी. स्वच्छता न करता चालू केले जातात. यात अनेक दिवस अडकलेले ॲलर्जीन्स ही बाहेर पडतात. आणि दमा, ॲलर्जी बळावते. वैद्यकीय संशोधनात असे सिध्द झाले आहे कि अस्वच्छ ए.सी. मध्ये लीजनेल्ला, असीनॅटोबॅक्टर हे निमोनियाची लागण करणारे जंतू असतात .

ए.सी. ची स्वच्छता घरीच पुढील प्रमाणे करा –

ए.सी.चालू करू शकतो कि नाही? आधी ए.सी. चे स्वीच बंद असल्याची खात्री करून घ्या. ए.सी. उघडण्या अगोदर चेहरा , डोके झाकून घ्या. मास्क व गॉगलचा वापर करा .   ए.सी. उघडा. त्यातील जाळी काढून पाण्यामध्ये दोन तास भिजवा. त्यानंतर जुन्या टूथब्रशने ती स्वच्छ घासून घ्या. त्यानंतर एक दिवस उन्हात ही जाळी वाळू द्या. ए.सी चा आतील भाग हेअर ड्रायर ने गरम हवा मारून ५ ते १० मिनिटे स्वच्छ करून घ्या. या वेळी चेहरा शक्यतो दुसऱ्या बाजूला घ्या व हेअर ड्रायर फिरवताना उडणारी धूळ डोळे, नाका तोंडात जाणार नाही याची काळजी घ्या. या साठीच मास्क व गॉगलचा वापर करा.  मग ती परत बसवूनच या उन्हाळ्याचा पहिला-पहिला ए.सी चालू करा. या नंतर दर महिन्याला एकदा जाळी काढून झटकून स्वच्छ करायला विसरू नका.

सदरील माहिती आपण लोमत मध्येही वाचू शकता

सार्वजनिक फवारणी आणि निर्जंतुकीकरण कक्ष निरुपयोगी

सार्वजनिक फवारणी आणि निर्जंतुकीकरण कक्ष निरुपयोगी

सार्वजनिक फवारणी आणि निर्जंतुकीकरण कक्ष निरुपयोगी सध्या राज्यात अनेक सार्वजनिक ठिकाणी सोडीयम हायपोक्लोराईटची फवारणी तसेच अशी फवारणी सुरु असलेले चेम्बर्स बनवून त्यातून माणसांनी जायचे असे प्रकार सुरु आहेत. अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर फवारणी करून कोरोनाला अटकाव करणे अवघड तर आहेच याशिवाय त्याचे दुष्परिणाम ही आहेत. कोरोना हवेतून दूरवर पसरत नाही. तो ८ मीटर हवेत उडून नंतर खाली बसतो. म्हणून हवेत फवारणीचा उपयोग नाही. सार्वजनिक आरोग्यात उपाय योजना करताना परिणामकारकता – खर्च – दुष्परिणाम हे त्रैराशिक मांडावे लागते.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

कोरोना ची कॅरीअर व्यक्तीने नेमके कुठे हात लावले हे माहित नसताना अख्खे गाव , विभाग फवारणी करणे उपयोगाचे तर नाहीच पण याने आर्थिक निधी चा अपव्यय ही होतो आहे. फवारणी करायचीच असेल तर फक्त ज्या बिल्डींग मध्ये रुग्ण सापडला किंव एखादा छोटा भाग जिथे खूप रुग्ण सापडले असे हॉट स्पॉट मध्ये त्या मानाने याचा थोडा फार उपयोग तरी होईल.सार्वजनिक फवारणी आणि निर्जंतुकीकरण कक्ष निरुपयोगीवयक्तिक पातळीवर घर स्वच्छ करण्यासाठी ग्लव्ज, गॉगल, मास्क घालून  घरात सोडियम हायपोक्लोराईटने स्वच्छता करण्यास हरकत नाही.सार्वजनिक फवारणी आणि निर्जंतुकीकरण कक्ष निरुपयोगी तसेच ज्या रुग्णालयात रुग्ण सापडला तिथे ही फवारणी करण्यास हरकत नाही. सार्वजनिक रीत्या फवारणी केल्याने डोळे , त्वचा, नाकात चुरचुरणे , घसा खवखवणे / दुखणे , खोकला असे दुष्परिणाम होऊ शकतात .  निर्जंतुकीकरण कक्ष बनवून त्यातून माणस जात आहेत , त्याबद्दल ही असेच आहे. संसर्गाचा सगळ्यात मोठा धोका हा कोरोना बाधित व्यक्ती शी संपर्क येऊन त्याच्या खोकण्या, शिकण्यातून  आहे. तसेच त्याने हात लावला त्याच ठिकाणी हात लावण्यातून आहे. फक्त निर्जंततूकीकरण कक्षातून जाऊन हा धोका कसा टळेल. काहींनी चक्क हँड सॅनीटायझरची ही या कक्षातून पूर्ण अंगावर फवारणीची सोय केली आहे. या सर्व गोष्टींचे कक्षातून जाणाऱ्या व्यक्तीवर दुष्परिणाम आहेत. जागतिक आरोग्य संघटना व सीडीसी ने ही अशा कक्षांना मान्यता दिलेली नाही. तमिळ नाडू राज्याच्या आरोग्य विभागाने शासनाचा परिपत्रक काढून असे कक्ष बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

गुळगुळीत चेहरा कोरोना टाळण्यासाठी उपयुक्त

गुळगुळीत चेहरा कोरोना टाळण्यासाठी उपयुक्त

गुळगुळीत चेहरा कोरोना टाळण्यासाठी उपयुक्त दाढी ठेवणे हा प्रत्येकाच्या वैयक्तिक आवडी – निवडीचा प्रश्न असू शकतो. पण सीडीसी म्हणजे सध्या कोरोना विषयी अधिकृत माहितीचा स्त्रोत असलेल्या जागतिक संघटनेचे म्हणणे आहे की कोरोना टाळण्यासाठी सध्या दाढी व मिशा ची फॅशन बाजूला ठेवून गुळगुळीत चेहरा ठेवणे तुमचा व इतरांचा कोरोना पासून बचाव करेल.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

दाढी व मिशा  नसल्यामुळे एक तर एन ९५ मास्क तसेच इतर मास्क तुमच्या चेहऱ्याला फिट बसेल. मास्क लावल्यावर दाढी असलेल्या चेहऱ्यातून गुळगुळीत चेहऱ्याच्या तुलनेत २०० ते १००० पट अधिक श्वासाची गळती सिध्द झालेली आहे. ब्रिटीश मेडिकल जर्नल या नामांकित जर्नलने डॉक्टरांच्या संदर्भात या विषयाला घेऊन चर्चा केली आहे .गुळगुळीत चेहरा कोरोना टाळण्यासाठी उपयुक्त किमान डॉक्टरांनी तसेच सर्वसामान्यांनी ही  मास्क नीट बसण्यासाठी, स्वतः व इतरांच्या च्या सुरक्षिततेच्या दृष्टीने  दाढी – मिशा काढण्याचा विचार करावा असा सल्ला ब्रिटेन मध्ये देण्यात आला आहे. यात दुसरी शक्यता अशी आहे कि कोरोना बाधित किंवा लक्षणे नसलेली कोरोनाची कॅरीअर व्यक्ती शिंकली, खोकलली तसेच हसताना व बोलताना तोंडा भोवतीच्या केस कोरोना पसरवण्यास कारणीभूत ठरू शकता. कोरोना बाधित व्यक्तीचा दाढी मिशांना हात लागल्यास व तोच हात परत इतरत्र लागल्यास कोरोना चा संसर्ग इतरांना होण्याची शक्यता वाढते . हात धुण्यासोबतच वारंवार तोंडाला हात न लावणे हा कोरोना टाळण्यासाठीचा महत्वाचा उपाय आहे . दाढी मिशा असल्यास वारंवार तोंडाला व चेहऱ्याला हात लावण्याचे प्रमाण वाढते . त्यामुळे ही इतरांना संसर्ग होण्याची शक्यता वाढते. कोरोना बाधित व्यक्तीला ही दाढी मिशा असल्यास धोका वाढतो. विषाणू मिश्रीत स्त्राव दाढी – मिशांमध्ये बोलताना , खोकताना अडकत असल्याने याचे परत स्व – संक्रमण होऊन वायरल लोड वाढू शकतो व बरे होण्यास उशीर होऊ शकतो .

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

असा सोडवा भाजी मंडईचा प्रश्न

भाजी मंडईचा प्रश्न असा सोडवा

असा सोडवा भाजी मंडईचा प्रश्न सध्या सोशल डिस्टन्सिंगचा सगळ्यात धुव्वा उडतो आहे तो भाजी मंडई मध्ये उडणाऱ्या गोंधळामुळे. यासाठी केईम हॉस्पिटलचे माजी प्राध्यापक चंद्रकांत पाटणकर यांनी उत्तम कल्पना सुचवली आहे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

असा सोडवा भाजी मंडईचा प्रश्न ज्यामुळे लोकांचा भाजी खरेदीचा प्रश्नही सुटेल आणि सोशल डिस्टन्सिंगही पाळले जाईल. यासाठी खाली दिलेल्या आकृती प्रमाणे प्रत्येक शहरात खुल्या मैदानात भाजी विक्रेत्यांची  व्यवस्था करता येईल. यात आत जाण्याचे व बाहेर येण्याचे दोन विरुध्द बाजूला वेगळे मार्ग असतील. दोन विक्रेत्यांमध्ये आडवे २0  फुट व उभे १०  फुट अंतर असेल ( याने ८ मीटरचा सोशल डिसटन्सिंगचा नियम पाळला जाईल . विक्रेत्यांना आत जाताना मास्क व हातावर सॅनीटायझर टाकून सोडले जाईल . तसेच त्यांना सर्दी , खोकला , ताप नसावा. आत व बाहेर जाण्याच्या मार्गावर प्रत्येकी एक किंवा दोन सुरक्षारक्षक थांबतील . एका वेळेला तीन जणांना हातावर सॅनीटायझर टाकून आत सोडले जाईल. एकाने एका निश्चित सरळ रांगेत जाऊन  खरेदी करायची आहे.आत गेलेले तिघे दोन स्टॉल पुढे गेल्यावरच वरच पुढच्या तिघांना आत सोडले जाईल. तो पर्यंत इतरांनी बाहेर एकमेकांपासून लांब उभे राहयचे आहे. तसेच एकाच वेळेला गर्दी टाळण्यासाठी प्रत्येक विभागाला खरेदी साठी वेळ ठरवून देता येऊ शकते . ही मैदानावर उभारलेल्या मंडई चहु बाजूंनी दोरखंड किंवा तात्कालिक बांबूच्या छोटे आच्छादन करून बंद केलेले असेल. तसेच अंतर्गत तीन किंवा चार रांगा अशाच एकमेकांपासून वेगळ्या केलेल्या असतील.  एका बाजूला ३० ते ४० फुट जागेत भाजी विक्रेत्यांची वाहनांसाठी जागा ठेवता येईल.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

गर्भवती महिलांचा कोरोना पासून बचाव

गर्भवती महिलांचा कोरोना पासून बचाव गर्भवती स्रीने तपासणी साठी रुग्णालयात जावे का, हा प्रश्न अनेकांना पडतो आहे. ९ महिने पूर्ण होई पर्यंत जर बाळाच्या हालचाली नॉर्मल जाणवत असतील, रक्तस्राव होत नसेल, व इतर काही त्रास नसेल तर प्रसुतीच्या तारखे पर्यंत रुग्णालयात जाऊ नये.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

सध्या पुढील काही अढळल्यासच स्रीरोगतज्ञांकडे जावे –

१.  पोट खूप दुखत असल्यास. २. योनीमार्गातून रक्त स्त्राव/बाळाभोवतीचे पाणी बाहेर येणे. ३. बाळाच्या हालचाली कमी जाणवणे ( दिवसातून १२ वेळा किमान बाळ लात मारते, हे मोजल्यास व पोटात बाळाचे लाथ मारण्याचे प्रमाण १२ पेक्षा कमी असल्यास)  ४.  ९ महिने भरल्यावर

पुढील गोष्टींसाठी स्रीरोगतज्ञांचा फोनवर  सल्ला घ्यावा

  • उलट्या, साधा सर्दी खोकला,  पाठदुखी , बद्धकोष्ठता

सोनोग्राफी साठी कधी जावे

१. गरोदर झाल्यापासून एकदा ही सोनोग्राफी केलेली नसल्यास. २. गरोदर पणात इतर आजारांमध्ये जास्त जोखीम असल्यास व बाळाला/आई ला धोका असल्यास तीन महिन्यातून एकदा  ३.बाळाची हालचाल जाणवत नसल्यास. ४. एकोणिसाव्या आठवड्यात बाळाच्या जन्मजात व्याधी तपासण्यासाठी अॅनॉमॉली स्कॅन

 गर्भवती महिलांचा कोरोना पासून बचाव गरोदर असताना नियमित ब्लड प्रेशर मोजणे आवश्यक असते. त्यासाठी घरगुती इलेक्ट्रॉनिक मशीन द्वारे उपलब्ध असेल तर तपासावे. किव्हा डोके दुखत असेल तरच आपल्या डॉक्टर कडे रक्तदाब तपासण्यास जावे . याशिवाय कोरोना टाळण्यासाठी वारंवार हात धुणे , सोशल डीस्टन्सिंग , घरा बाहेर न जाने हे सगळे नियम गरोदर स्रीला  ही लागू आहेत.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

भाज्या, धान्य, किराणा, दुध घेताना काळजी

भाज्या धान्य किराणा दुध घेताना काळजी जर कोरोना बाधित व्यक्तीला अजून माहित नसेल कि तो कोरोना ग्रस्त आहे. आणि त्याने हाताळलेल्या वस्तू आपण हाताळल्या तर त्यामाध्यमातून कोरोना पसरू शकतो. यासाठी पुढील काळजी घ्यावी –

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

  • भाज्या धान्य किराणा दुध घेताना काळजी फळ भाज्या स्वीकारताना शक्यतो त्या हात न लावता थेट पिशवीत टाकायला सांगाव्या .
  • आणलेल्या भाज्या घरात आल्या आल्या एका भांड्यात पाण्यात ओताव्या.
  • पिशवी घरात न ठेवता घरा बाहेर किंवा छतावर उन्हात टाकावी व परत जाताना तीच पिशवी न्यावी.
  • पाले भाज्या पाण्यात ( शक्यतो कोमट ) काही वेळ पूर्ण  बुडवून ठेवाव्या व फळ भाज्या, फळे १२ तास पाण्याच्या मोठ्या भांड्यात ठेवाव्या.
  • पाण्यातून बाहेर काढल्यावर सर्व भाज्या व फळांवर हेअर ड्रायर च्या गरम वाऱ्या खालून जाऊ द्यावे (वेळ – या गरम वाऱ्याच्या चार पाच झुळुका प्रत्येक फळ भाजी वरून जाईल असे पाहावे )
  • या काळात सध्या कच्या भाज्या मुळीच खावू नये. शिजवूनच खाव्या. फळे खाण्या आधी परत धुवून घ्यावे .
  • दुध – पिशवीतून घेत असाल तर घरात आणल्यावर पिशवी बाहेरून धुवून घ्यावी.
  • जर गवळ्या कडून घेत असाल तर स्वच्छ भांड घरा बाहेर ठेवाव आणि गवळ्या ला भांड्याला न शिवता दुध भांड्यात टाकायला सांगाव.
  • घेतलेले दुध घरात आणल्या आणल्या उकळून घ्यावे.
  • गवळ्यांनी सर्दी खोकला असल्यास दुध द्यायला जाऊ नये , इतर स्वस्थ व्यक्तीची व्यवस्था करावी. गवळ्यांनी शक्य झाल्यास मास्क वापरावा व दोन घरांच्या मध्ये हँड सॅनीटाझर वापरावा . तो गवळ्याला परवडत नसेल तर दुध घेण्याऱ्या घरांनी दुध घेतल्यावर गवळ्याच्या हातावर आपल्या घरातील हँड सॅनीटायझर टाकावा.
  • भाज्या धान्य किराणा दुध घेताना काळजी किरणा माल आणताना भाजी घेतानाचे सगळे नियम व  पिशवी बाहेर किंवा छतावर ठेवण्याचा नियम पाळावा तसेच किराणा सामान एक दिवस न वापरता तसेच राहू द्यावे. २४ तासाने वापरायला काढावे.
  • कुठले ही बाहेरचे सामान आणल्यावर घरात आल्या आल्या हात धुवायला विसरू नये.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

मधुमेह, रक्तदाब रुग्णांना कोरोना विषयी काळजी

मधुमेह रक्तदाब रुग्णांना कोरोना विषयी काळजी मधुमेह असलेल्या रुग्णांची प्रतिकारशक्ती कमी असते . त्यामुळे मधुमेह असलेल्यांना कोरोना चा धोका किंवा कोरोना झाल्यास गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. अशा रुग्णांनी सर्वप्रथम आपली साखर नियंत्रणात आहे का या साठी नियमित साखर तपासली पाहिजे. सध्या रक्त तपासण्यासाठी लॅब मध्ये जाऊ नये. घरीच ग्लुकोमीटरने तपासणी करावी. जर इन्सुलिन घेत असाल तर आठवड्यातून २ वेळा आणि गोळ्या चालू असल्यास व साखर नियंत्रणात असल्यास पंधरा दिवसातून एकदा तपासणी करावी. त्यासाठी साखरेची तपासणी कधी करू नये.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

मधुमेह, रक्तदाब रुग्णांना कोरोना विषयी काळजी. सकाळी उपाशी पोटी व जेवल्यावर दोन  तासाने तपासणी करावी . उपाशी पोटी साखर – ९० ते १३० व जेवणा नंतरची १४० – १७० या रेंज मध्ये असावी याची काळजी घ्यावी . तसेच मागील तीन महिन्यांची साखरेची पटली दाखवणारे एचबी ए १ सी हे तीन महिन्यातून एकदा केले नसेल तर करावे. ते ७ च्या आसपास असावी. सध्या घरात असल्याने व्यायाम कमी झाल्याने मधुमेही रुग्णांची साखर वाढण्याची शक्यता आहे. यासाठी काही लोक सकाळी बाहेर जाऊन  चालण्याची  सवय टाळेबंदी मध्ये तशीच चालू ठेवली आहे .

कृपया अशा मधुमेही रुग्णांनी फिरायला बाहेर जाऊ नये. त्यासाठी घरातच किंवा छतावर जाऊन चालण्याची सवय सोडू नये. तसेच नियमित औषधांचा डोस नियमित घ्यावा . रुग्णांनी आठवड्यातून एकदा ५०० mg विटामिन सी पुढील २ महिने घेण्यास हरकत नाही तसेच शक्य असल्यास विटामिन डी ६०,०००० IU आठवड्यातून एकदा ८ आठवडे घेण्यास हरकत नाही. घरतील समान आणण्यास घरातील मधुमेही रुग्ण सोडून इतरांनीच  बाहेर  जावे

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

COVID-19 कोरोना भीतीचा मानसिक आजार

कोरोना भीतीचा मानसिक आजार सध्या अनेकांना मला कोरोना होईल का? किंवा कोरोना ने माझा मृत्यू तर होणार नाही ना? या भीतीने ग्रासले आहे. काही प्रमाणात या भावना मनात येणे नॉर्मल आहे. म्हणून थोड्या फार प्रमाणात असे विचार मनात असल्यास मुळीच काळजी करण्याचे कारण नाही. पण हे विचार वारंवार येणे व आपल्या दैनंदिन आयुष्यावर याचा परिणाम होणे मात्र आपण ओळखायला हवे . आपल्याला पुढील लक्षणे आहेत का हे तपासून पाहा –

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

  • जास्त वेळा / सतत  कोरोना विषयी मनात विचार येणे व मृत्यूची भीती वाटणे.
  • यामुळे चिडचिड होणे किंवा एकदम शांत होणे किंवा नेहमी पेक्षा कमी बोलणे.
  • जेवण व झोप कमी होणे.
  • आपल्या प्रियजनांची , कुटुंबाचे काय होईल ही सतत काळजी सतावने.
  • बातम्या किंवा टी.व्ही. मधून कोरोना विषयी जास्त माहिती मिळवण्याचा सतत प्रयत्न करणे.
  • कोणीही भेटले किंवा फोन आला तरी फक्त कोरोनाची व त्या भीती विषयी चर्चा करणे.

यावर उपाय काय

  •  कोरोना भीतीचा मानसिक आजार यासाठी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे कि मला खूप काळजी करून भयभीत व्हायचे किंवा मी मुळीच काळजी करणार नाही , जे व्हायचे होऊ दे – या दोन्हीचा मध्यबिंदू काढून विचार करणे गरजेचे आहे.
  • यासाठी हो , प्रत्येकाला कोरोना होण्याची शक्यता आहे याचा स्वीकार करणे व यासाठी माझ्या हातात काय आहे हे स्वतःला विचारणे.
  • हातात असलेल्या हा आजार टाळण्यासाठीचे उपाय जाणून त्याचे पालन करणे.
  • जर झोपेवर व जेवणावर जास्त परिणाम होत असेल तर मानसोपचारतज्ञांचा सल्ला घ्यावा.
  • कोरोना विषयी सध्या काय सुरु आहे याची दिवसातून एखाद दोन वेळा माहिती घ्यावी पण दिवसभर सतत त्याच बातम्या बघत बसू नये .

भावनिक हाताळणीच्या पलीकडे..

भावनिक हाताळणीच्या पलीकडे सध्या शक्य असलेला असा एक मार्ग आहे- संसर्ग होऊनही लक्षणे न आलेल्या व सौम्य लक्षणे येऊन प्रतिकारशक्ती आलेल्यांची संख्या काढणे. सार्वत्रिक, जागतिक साथीच्या या काळात नेतृत्वाने आपल्याला भावनिक आधारर नक्कीच दिला; पण सार्वत्रिक भीती टाळण्यासाठी अनेक शक्यता पडताळून पाहता आल्या असत्या. त्यांची चर्चा करणारे टिपण..

सध्या करोनाच्या उपाययोजनेसाठी साथसोवळे (सोशल डिस्टन्सिंग), टाळेबंदी (लॉकडाऊन), विभक्तीकरण (आयसोलेशन), विलगीकरण (क्वारंटाइन), पंतप्रधान वा मुख्यमंत्र्यांची भावनिक आवाहने, कुणालाही मोबाइल संभाषणापूर्वी ऐकू येणारा ध्वनिमुद्रित संदेश आणि सर्वसामान्यांना नेत्यांनी केलेले फोन अशा गोष्टींभोवती देशात नियोजन फिरते आहे. पण यात साथरोगशास्त्राच्या (एपिडेमॉलॉजीच्या) मूलभूत संकल्पना समजून न घेतल्याने प्रत्येक पातळीवर नियोजनाचा मोठा गोंधळ उडालेला दिसतो आहे. काय करायला हवे होते, काय करता येते आहे आणि प्राप्त परिस्थितीत काय करता येईल या गोष्टी उच्च-सर्वोच्च पदांवरील धोरणकर्त्यांपासून देशातील सर्वसामान्यांपर्यंत प्रत्येकाने समजून घेतल्या, तर करोना या जटिल बनून राहिलेल्या शब्दाभोवतीचा गुंता सुटसुटीत होईल.


डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख
वाचा

करोनाच्या साखळीमध्ये चार महत्त्वाचे घटक आहेत. पहिला ‘अ’ – जो परदेशातून थेट संसर्गित होऊन भारतात आला. दुसरा ‘ब’ – ज्याचा ‘अ’शी थेट संपर्क आला, तिसरा ‘क’ – ज्याचा ‘अ’ आणि ‘ब’शी संपर्क आला, पण त्याला ते माहिती नाही; तर चौथा ‘ड’ (जो आज बहुसंख्य आहे) – ज्याचा अद्यापपर्यंत वरीलपैकी कोणाशीही संपर्क आलेला नाही, पण करोना होऊन मृत्यू होईल का, या भीतीच्या सावटाखाली ते आहेत.

सध्या सगळ्या उपाययोजना या ‘परदेशात काय झाले, तसे आपल्याकडे होईल का’ या भीतीभोवती आणि इतरांनी केलेल्या उपाययोजनांचे अनुकरण यावर आधारलेल्या आहेत. त्याही तळागाळापर्यंत नीट पोहोचलेल्या नसल्याने आरोग्य खात्यात गोंधळ उडालेला नसेल तरच नवल.

मुळात करोनाच्या उपाययोजनांच्या सुरुवातीला उडालेल्या गोंधळामुळे हजारो भारतीय परदेशांतून १५ मार्चपर्यंत (राज्यातील लॉकडाऊनच्याही आधी) आले, त्यांना विलगीकरणाच्या पुरेशा सूचना देण्यात आल्या नाहीत. यापैकी काही ‘अ’ असू शकतात, त्यांच्या दिल्ली/ मुंबई-पुणे या ‘ग्राऊंड झिरो’वरून इतर भागात झालेल्या प्रवासामुळे आता जवळपास पंधरवडय़ानंतर या साखळीतील ‘क’ नेमके कोण आहेत व किती ‘ड’चा इतरांशी संपर्क येऊन तेही ‘क’ झाले आहेत हे कोणालाही कळायला मार्ग नाही. या साखळीतील ‘अ’ला परदेशातून आल्यावर विलगीकरण केले असते तर पहिल्या पायरीवर आजार रोखणे सहज शक्य झाले असते. पण अमेरिका व अन्य प्रगत देशांतून आलेल्यांच्या तपासण्याच सौम्य ठेवण्यात आल्या आणि पळवाट शोधण्यात आली सोयीचे ‘घरीच विलगीकरण’. केंद्र व राज्य सरकार याविषयी गाफील राहिल्याने ‘क’ – ज्यांचा करोनाबाधितांशी संपर्क आला आहे, पण त्यांना माहीत नाही- अशांची संख्या खूप आहे. हा झाला एक मुद्दा.

भावनिक हाताळणीच्या पलीकडे दुसरा मुद्दा ‘सामूहिक प्रतिकारशक्ती’चा. खरे तर साथ सुरू झाल्यापासून इतक्या लोकांचे परदेश, देश, राज्यांतर्गत स्थलांतर झाले आहे, की त्यामुळे टाळेबंदी, साथसोवळे यानंतर पुढे काय, या प्रश्नाचे उत्तर शोधण्याची वेळ आली आहे. हे शोधण्यासाठी सामूहिक प्रतिकारशक्ती म्हणजे काय ते समजून घेणे गरजेचे आहे. करोनाचा संसर्ग झाला तरी ३० टक्के लोकांना काहीच लक्षणे न येता संसर्ग झाल्याच्या चौथ्या दिवशी त्यांना प्रतिकारशक्ती येते व लक्षणे नसूनही हा वर्ग इतरांना १४ दिवस संसर्ग करत राहतो. ५५ टक्के लोकांमध्ये साधी लक्षणे येतात व दहाव्या दिवशी त्यांना प्रतिकारशक्ती येते. हे लोकदेखील २० दिवसांच्या कालावधीत, इतरांना संसर्ग करत राहतात. चौथ्या वा दहाव्या दिवशी प्रतिकारशक्ती आलेले हे दोन भाग्यवान ठरलेले घटक इतरांना जेव्हा संसर्गित करतात तेव्हा त्यांची प्रतिकारशक्तीसुद्धा ते यासोबत वाटत असतात. अशी प्रतिकारशक्तीयुक्त करोना होऊन गेलेल्या लोकांची संख्या किती आहे हे आज कोणालाही माहीत नाही आणि हे सहज शक्य आहे की, यापैकी तुम्ही असू शकता. हे अतक्र्य वाटेल, पण आपल्याकडील कमी चाचणी (टेस्टिंग) क्षमतेमुळे एक हजार रुग्ण हा आकडा कदाचित ‘हिमनगाचे टोक’ असू शकतो. १३८ कोटी लोकसंख्येत फक्त ५८६ चाचण्या रोज करून बाधितांचा व मृतांचा खरा आकडा कळणे शक्यच नाही. हा खरा आकडा हवा असल्यास देशभर चाचणी करण्याची क्षमता युद्धपातळीवर वाढवावी लागणार आहे. भारतीय वैद्यकशास्त्र संशोधन परिषदेने (‘आयसीएमआर’ने) १७ मार्च रोजीच, श्वसनाच्या खालच्या मार्गाचा तीव्र स्वरूपाचा संसर्ग असल्याची तक्रार करणाऱ्या प्रत्येकाच्या चाचणीचे निर्देश दिलेले आहेत. मात्र अशा प्रत्येकाची तपासणी शासकीय/ खासगी रुग्णालयात होते कुठे आहे? कारण रोज अनेक कारणांनी येणाऱ्या या रुग्णांची तपासणी करायची ठरवले तरीही, देशाची सध्याची (२९ मार्चपर्यंत) सरासरी चाचणी क्षमता आहे ५८६ चाचण्या दररोज. या दराने व कमी किटच्या संख्येमुळे ते शक्यच नाही. यामुळे उर्वरित १५ टक्के- ज्यांना तीव्र स्वरूपाचा त्रास होऊन मृत्यूचा खरा धोका आहे- त्या सर्वाच्या पूर्ण चाचण्या होतातच असे नाही. मग यातून मार्ग कसा काढायचा?

भावनिक हाताळणीच्या पलीकडे सध्या शक्य असलेला असा एक मार्ग आहे- संसर्ग होऊनही लक्षणे न आलेल्या व सौम्य लक्षणे येऊन प्रतिकारशक्ती आलेल्यांची संख्या काढणे. हा प्रयोग केवळ संशयित वा बाधित नव्हे, तर देशातील १३८ कोटी लोकसंख्येसाठी करावा लागेल, कारण यापैकी अनेक जण ‘नकळत बरे झालेले’देखील असतील. अशा अभ्यासासाठी चाचण्या आणि सांख्यिकीतील ‘ठिकठिकाणी ३० जणांचे नमुना सर्वेक्षण’ पद्धत या दोहोंवर आधारित प्रारूप वापरावे लागेल. ‘३० क्लस्टर सॅम्पिलग’ अर्थात निवडक ३०-३० जणांच्या गटाची तपासणी करून अगदी आठवडय़ाभरात हा अभ्यास पूर्ण होईल. यासाठी देशातील अगदी निवडक व अत्यंत कमी लोकांचे रक्ताचे नमुने घेऊन त्यांच्या शरीरातील करोनाविरोधी अँटिबॉडीज म्हणजे प्रतिकारशक्ती दर्शवणाऱ्या पेशी दोन वेळा मोजायच्या. प्रतिकारशक्ती आलेली ही संख्या मोठी निघाली तर ‘लॉकडाऊन’पासून आपली निर्णायक सुटका होईल आणि गरिबांच्या पोटापाण्याचे, स्थलांतराचे प्रश्नही निकाली निघतील. सारेच देश आज आतुरतेने करोना लसीची वाट पाहतो आहे. पण ही लस चीन वा अमेरिकेतून आलीच, तरी सध्या असलेला करोना पुढे ‘प्रगत’ होणार असल्याने वर्षभरानंतर उपयोगाची नसणारच. याउलट, देशात नैसर्गिक प्रतिकारशक्ती आलेल्यांचे थेट पुरावे हातात असल्यास लसीवरील काही हजार कोटींचा खर्च व जनसामान्यांची तगमग मिटवता येईल, असे समाजवैद्यकशास्त्र विषयातील तज्ज्ञ (माजी प्राध्यापक) डॉ. अशोक काळे यांचेही मत दिसून येते.

भावनिक हाताळणीच्या पलीकडे साथींचा अभ्यास अगदी १४ व्या शतकापासून केला तरी तो हेच सांगतो की, साथ सुरुवातीच्या काळात काही बळी घेऊन स्थिर होते. म्हणजे त्या आजाराचे रुग्ण सुरूच राहतात, पण ती स्थिर व सौम्य होते व मृत्यूचे प्रमाण कमी होते. याचे कारण लोकसंख्येत ‘सामूहिक प्रतिकारशक्ती’ निर्माण होते. प्रश्न हा आहे की, ही प्रतिकारशक्ती किती बळी घेऊन निर्माण होणार आहे. यासाठीच, साथीचे पहिले चार महिने महत्त्वाचे असतात. करोनाबद्दल बोलायचे, तर परत ‘अ’ आणि ‘ब’ या दोन घटकांकडे येऊ. ‘अ’ची निश्चित माहिती आहे व ही संख्या १५ लाख इतकी आहे. यापैकी बहुतेकांना ‘होम क्वारंटाइन’चे शिक्के मारून आपण सोडून दिले. यापैकी बरेच जण आठ ते १० दिवसांपूर्वी भारतात आले आहेत. तसेच हे ज्यांच्या संपर्कात आले किंवा अजूनही येत आहेत अशांच्या संपर्कात आलेले सारे जण शोधले तर (कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केले तर), या दोन घटकांतील ज्यांना ताप येतो त्यांना विभक्तीकरण व इतर सर्वाना विलगीकरण (घरी नव्हे) अद्यापही शक्य आहे. परंतु हे आपण करीत नाही, कारण यापैकी लक्षणे आलेले रुग्ण हे शेवटच्या स्टेजला चाचणीसाठी येतात व उपचार सुरू करून प्रवासाचा इतिहास कळल्यावर ‘टेस्ट’ होते व ती ‘पॉझिटिव्ह’ आल्यानंतर अख्खा डॉक्टरांचा चमूच ‘घरी विलगीकरणा’साठी पाठवला जातो. किमान हे १५ लाख प्रवासी व त्यांच्यावर लक्ष ठेवणारी यंत्रणा, त्यांना पहिले लक्षण आले की ‘टेस्ट’ करून लगेच विलगीकरणाचे ‘विभक्तीकरणा’मध्ये रूपांतर यासाठी अत्यंत वेगाने हलणारी व प्रत्येक मिनिटाला जागरूक असणारी यंत्रणा अपेक्षित आहे, पण ती कुठेही नजरेस पडत नाही.

अखेरचा मुद्दा एवढाच की, पहिल्या रुग्णाचे निदान होऊन दोन महिने होत आले तरी डॉक्टरांकडे अजून ही वैयक्तिक सुरक्षेचे कवच (पीपीई किट) उपलब्ध नाहीत. हजारो कोटींचा निधी जाहीर होतो आहे, पण या गोष्टी अनुपलब्धच. या स्थितीत, डॉक्टर व रुग्णालय हे संसर्ग करणारी मोठी केंद्रे ठरू शकतात.

वरील लिखाणात व्यक्त केलेल्या किंवा गृहीत धरलेल्या शक्यता, सुचविलेले मार्ग कुणाला भीतीदायक वाटू शकतात; परंतु भावनिक न होता वैद्यकीयदृष्टय़ा परिस्थितीची हाताळणी करावी, हा त्यामागील हेतू आहे. भावनिक आधार देशाला गरजेचा असला तरी त्यापलीकडे अशी विज्ञानाची कास धरून बरेच काही करण्याचे अजून राहिले आहे.

सदरील माहिती आपण लोकसत्ता मध्येही वाचू शकता