मद्यपान सोडण्यासाठी चांगले निमित्त

मद्यपान सोडण्यासाठी चांगले निमित्त

मद्यपान सोडण्यासाठी चांगले निमित्त लॉकडाऊनच्या काळात मद्य उपलब्ध नसल्याने अनेकांवर सक्तीची व्यसनमुक्ती लादली गेली. यामुळे मद्य सोडल्या नंतर काही प्रमाणात या नंतरची शारीरीक व मानसिक लक्षणांचे ( वीड्रॉवल ) रुग्ण वाढले आहेत. पण या निमित्ताने आपण मद्या शिवाय राहू शकतो हा आत्मविश्वास बाळगून इथूनच व्यसनमुक्तीला सुरुवात करा. मद्य सोडण्याचे अजून एक कारण म्हणजे मद्य प्राशनामुळे शरीरात जीवन सत्वांची कमतरता निर्माण होते व त्यामुळे प्रतिकारशक्ती कमी होते. म्हणून असे अप्रत्यक्षपणे म्हणता येईल की मद्यप्राशन तुम्हाला कोरोनाच्या  संसर्गाची शक्यता वाढवू शकतो.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

मद्यपान सोडण्यासाठी चांगले निमित्त मद्यप्राशन सोडल्यावर पुढील लक्षणे जाणवू शकतात – थरथरणे , झोप न लागणे, वाईट स्वप्न पडणे, बेचैन होणे, निराश वाटणे, रोजची ठरलेली मद्यप्राशनाची  वेळ झाली कि बेचैनी वाढणे.

घरचे सदस्य यासाठी अशा व्यक्तीला मद्य देण्याचा प्रयत्न करतात. पण अशा लक्षणांवर मानसोपचारतज्ज्ञांकडून उपचार घेऊ शकता. याशिवाय घरी पुढील गोष्टी करता येतील –

  • भरपूर पाणी प्या ( दिवसाला ६ ते ८ लिटर ) यापैकी  – एक ग्लास पाण्यामध्ये चिमुटभर मीठ, १ चमचा साखर आणि अर्धे लिंबू – असे सकाळी व रात्री दोन ग्लास घ्या.
  • रोज एक तास व्यायाम करा.
  • कोणाशी तरी बोलून आपल्या भावना व्यक्त करा.
  • काय वाटते ते लिहिणे, चित्र काढणे, शांत संगीत ऐकणे अशा आनंददायक गोष्टी करा.
  • रोजच्या मद्य पिण्याच्या वेळेला काही तरी नवे वेळापत्रक बनवून ते करा व त्यावेळी फोन वरून जवळच्या मित्राची किंवा घरच्या सदस्याची मदत घ्या.

यानिमित्ताने मानसोपचार तज्ञांच्या सल्ल्याने आपण तीन महिने जरी उपचार व समुपदेशन घेतले तरी मद्यपान सुटू शकते. प्रत्येक गावामध्ये या साठी अल्कोहोलीक अॅनॉनीमस हा मोफत काम करणारा स्वयंसेवकांचा समूह कार्यरत असतो. तो शोधून तुम्ही या साठी त्यांची मोफत मदत घेऊ शकता.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

हात धुण्यामुळे त्रास होत असल्यास

हात धुण्यामुळे त्रास होत असल्यास

हात धुण्यामुळे त्रास होत असल्यास सध्या वारंवार हात धुणे व हँड सॅनीटायजर चा वापर करणे कोरोना टाळण्यासाठी आवश्यक आहे. पण वारंवार हात धुण्याने अनेकांच्या हाताला कोरडेपणा ( ड्रायनेस ) येऊ लागला आहे. याचे एक कारण असे ही आहे कि या पूर्वी आपल्याला हात धुण्याची सवय नव्हती. यासाठी हात धुतल्या नंतर लगेचच मुलायम कपड्याने पाणी पुसून घ्या व त्यानंतर लगेचच कुठले ही मॉईस्चरायजर लगेचच हाताला लावावे. ते ही नसेल तर डोक्याला लावायचे खोबऱ्याचे थोडे तेल हाताला लावले तरी चालेल. रात्री झोपताना तिळाचे तेल हाताला लावून झोपावे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

हात धुण्यामुळे त्रास होत असल्यास हँड सॅनीटायजर मध्ये अल्कोहोल असते व अनेकांना त्याची अॅलर्जी असते. काहींना त्यामुळे हात चुरचुरण्याचा त्रास होतो. असे होत असल्यास आणि नियमित हात धूत असल्यास हँड सॅनीटायजर वापरला नाही तरी चालेल. कोरोना साठी मुख्य प्रतिबंधक उपाय हा साबणाने हात धुणे हा आहे व हँड सॅनीटायजरचा वापर हा एक आधार आहे. जिथे बाहेर गेल्यावर हात धुण्याची सोय नाही तिथेच त्रास होत असणाऱ्यानी हँड सॅनीटायजरचा वापर करावा.

हात धुण्यामुळे त्रास होत असल्यास हात धुण्याविषयी एक मानसिक समस्या वाढल्याचे ही मानसोपचार तज्ञांचे निरीक्षण आहे. एखादी गोष्ट इच्छा नसताना वारंवार करण्याची नियंत्रित न करता येणारी  भावना मनात येण्याची एक मानसिक समस्या असते. यात सर्वाधिक प्रमाण हे हात धुण्याची आणि स्वच्छतेची सवय असते. सध्या भीती पोटी गरजे पेक्षा जास्त वेळा हात धुण्याची इच्छा होण्याची मानसिक समस्या काहींना भेडसावते आहे. कोरोना टाळण्यासाठी हात धुणे आणि वारंवार उगीचच हात धुणे यात फरक आहे. हा फरक स्वतःला व कुटुंबातील इतरांना ही लगेच लक्षात येईल. असे होत असल्यास मानसोपचातज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

भीती घालवण्यासाठी वापरा रेन टेक्निक

भीती घालवण्यासाठी वापरा रेन टेक्निक

भीती घालवण्यासाठी वापरा रेन टेक्निक कोरोनाची मनातील भीती कमी करण्यासाठी भावनिक व्यवस्थापन  तज्ञ डॉ. संदीप केळकर पुढील रेन टेक्निक सुचवतात.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

  • A…Accept, Approve – स्वीकारणे
  • R…Recognize – म्हणजे ओळखणे
  • I….Investigate – पडताळणी करणे
  • N..Non attachment – भावना स्वीकारून त्या पासून स्वतःला वेगळे करणे

R..recognizeभावना ओळखा

ह्या संकटामध्ये कोरोना विषयी मी कुठल्या भावना अनुभवत आहे. भीती, नैराश्य, काळजी, चिंता. आपण अनुभवत असलेल्या भावनेला ओळखून आपण नाव देऊ शकलो तर त्याचा सामना करणे खूप सोपे जाते असे दिसून आले आहे.

A..Acceptस्वीकार करा

भावनांना दडपलं तर त्या आपल्याला दुप्पट वेगाने गिळंकृत करतात आणि दुर्लक्ष केलं तर, त्या चुंबाकासारख्या तुम्हाला खेचून घेतात. म्हणून त्यांचा योग्य वेळीच स्वीकार करा. अशा भावना मनात  येणे हे स्वाभाविक आहे हे स्वीकारा. अशा प्रकारे स्वीकार केल्याने त्याची तीव्रता कमी करता येते.

I..Investigateपडताळणी करा

ही भावना मला काय सांगायचा प्रयत्न करते आहे? मला काय संदेश देत आहे? ह्याची पडताळणी करा. संदेश ओळखला तर भावनेची तीव्रता कमी होण्यास मदत होइल.

N..Non Attachment

भीती घालवण्यासाठी वापरा रेन टेक्निक म्हणजेच… या भावना म्हणजे मी नाही. ती माझ्या मनात परिस्थिती मुळे उमटणारी एक तात्कालिक भावना आहे. आधी मी अनुभवलेल्या नकारत्मक भावना कायमच्या टिकल्या नाहीत. म्हणून या ही टिकणार नाहीत. म्हणून ही भावना म्हणजे कायमचा मी नाही. एकदा अशा प्रकारे भावनेकडे निर्लेप, तटस्थ आणि वस्तुनिष्ठ पद्धतीने बघितले कि ती  भावना नियंत्रित करण्यास सोपे जाते  व  भावनांशी मैत्री करता येते. यापुढे जाऊन या चार पायर्यांमधून प्रत्येक भावनेचे विश्लेषण केले कि आपण त्यासाठी मदत घेण्यास ही तयार होतो, इतरांना त्या सहज बोलून दाखवू शकतो. कोरोना विषयी भीती, तणाव , नैराश्य अशा कुठल्या ही भावना मनात येत असतील तर कागद पेन घेऊन वरील चार पायर्यांवर त्यांचे स्वतःच विश्लेषण करा.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

मानसिक तणावावर ठेवा नियंत्रण

मानसिक तणावावर ठेवा नियंत्रण कोरोनामुळे आत्महत्या टाळण्यासाठी नातेवाईकांसाठी व रुग्णांसाठी महत्वाच्या सूचना व लक्षणे

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

कोरोना नसलेल्या व्यक्तींसाठी –

  • मानसिक तणावावर ठेवा नियंत्रण सतत कोरोना बद्दल माहिती विचारणे व कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यू विषयी चर्चा करणे.
  • आपल्याला कोरोना आहे का? याची काहीही लक्षणे नसताना  खातरजमा करण्याचा डॉक्टरांकडे वारंवार हट्ट करणे.
  • आपले काही खरे नाही / मी नसल्याने कोणाला ही फरक पडणार नाही असे वारंवार सांगणे.
  • नातेवाईकांना फोन करून खुशाली विचारून हे शेवटचे बोलणे असल्याची सूचित करणे.
  • बँकेच्या खात्यांची, महत्वाचे पासवर्ड तडकाफडकी आपल्या नातेवाईकांना देणे.
  • निराश असलेली व्यक्ती अचानक मूड बदलून आनंदी होणे ही महत्वाची वॉर्निंग साईन अनेक जणांच्या लक्षात येत नाही असे मानसोपचार तज्ञ डॉ.शैलेश ओमाटे सांगतात.

कोविड असलेल्यांसाठी –

  • समुपदेशकाकडून बरे होण्याचे प्रमाण खूप जास्त असल्याचे प्रमाण समजावून सांगणे.
  • कोविड रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णाशी फोन, इंटरकॉम, व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून सतत बोलत राहणे.
  • मृत्यूची भीती किंवा आत्महत्येचे विचार येत असल्यास तातडीने मानसोपचारतज्ञांचा सल्ला घ्यावा.

मानसिक तणावावर ठेवा नियंत्रण एक महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कि सगळ्यांनाच भीती वाटते आहे, असे समजून मानसिक तणावाकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. आत्महत्येचे विचार मनात येत असलेला रुग्ण ही मनसोपाचार शास्त्रात तातडीने उपचारांची गरज असलेला रुग्ण म्हणजे इमर्जन्सी असते. या उलट लक्षणे असताना मानसिक तणावामुळे असेल असे म्हणून तपासणी न करणे ही चुकीचे आहे. यात समतोल राखणे व कोरोना तसेच त्यामुळे मानसिक तणावावर नियंत्रण ठेवणे दोन्ही गरजेचे आहे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

व्यायामाने आणा श्वसनसंस्थेला बळकटी

व्यायामाने श्वसनसंस्थेला आणा बळकटी

व्यायामाने आणा श्वसनसंस्थेला बळकटी सध्या दमा, श्वसनाचे आजार, अॅलर्जी असे आजार असणारे जरा ही श्वास वाढला किंवा नाक चोंदल तर कोरोनाच्या भीतीने घाबरून जातात. तसेच अनेकांना भीती मुळे अस्वस्थ वाटते, झोप येत नाही. या श्वास घेण्याच्या व्यायामामुळे कोरोना टळेल असा दावा करता येणार नाही. पण या श्वास घेण्याच्या पद्धती मुळे फुफुसांना ऑक्सिजन हे नेहमी च्या श्वास घेण्याच्या पद्धती पेक्षा कित्येक पटीने जास्त मिळेल व म्हणून प्रतिकारशक्ती वाढल्याने कोरोना चा धोका नक्कीच कमी होईल. तसेच दमा, अॅलर्जी सारख्या आजारांमध्ये फुफुसांची क्षमता वाढवण्यास मदत होईल. ही पद्धत पुढील प्रमाणे आहे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

व्यायामाने आणा श्वसनसंस्थेला बळकटी या पद्धतीत श्वास आत घेताना पोट फुगले पाहिजे ( छाती नाही ) आणि श्वास बाहेर सोडताना पोट आत गेले पाहिजे. श्वास आत घेण्याचे नंतर श्वास रोखून धरण्याचे व नंतर श्वास बाहेर सोडण्याची अशी एक सायकल पूर्ण होते. याचे प्रमाण १ : ४ : २ अशी असायला हवे . म्हणजे ५ सेकंद श्वास आत घेतला तर  पुढील २० सेकंद स्वस रोखून धरायचा आणि नंतर १० सेकंद श्वास बाहेर सोडायचा . हा श्वासाचा व्यायाम रोज १० मिनिटे केल्यास त्याचा उत्तम लाभ मिळेल. यामुळे भीती, ताण तणाव ही कमी होईल.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

मानसिक तणावावर नियंत्रण ठेवा

मानसिक तणावावर नियंत्रण ठेवा

मानसिक तणावावर नियंत्रण ठेवा गेल्या दोन दिवसात कोरोनामुळे दोन आत्महत्या झाल्या. यातील एक कोरोना बाधित व्यक्तीची होती तर दुसरी कुठली ही कोरोनाची लक्षणे नसलेली व्यक्ती होती. हे विचार व पाउल काही विचार प्रक्रियेमुळे उचलले जाते.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

मानसिक तणावावर नियंत्रण ठेवा काही लक्षणे नसताना आता आपले व जगाचे काय होणार ही मनात दाटून आलेली भीती व निराशा. लक्षणे नसताना मृत्यूची भीती वाटणे व आपला कोरोनाने मृत्यू होण्यापेक्षा आपणच स्वतःला संपवण्याची निराशे पोटी इच्छा दाटून येणे. या सोबत आधी पासून असलेले नैराश्य, घरात पूर्वी कोणी आत्महत्या केली असल्यास व आधी त्या व्यक्तीनेच आत्महत्येचा अयशस्वी प्रयत्न केला असल्यास जोखीम जास्त असते. सगळ्यात आधी असे नैराश्येचे कुठले ही विचार मनात येत असल्यास मानसोपचारतज्ञांचा त्वरित सल्ला घ्या. कोरोना बाधित व्यक्तीने हे लक्षात घ्यावे की कोरोनाची बाधा व कोरोनाची  लक्षणे या वेगळ्या गोष्टी आहेत. कोरोना झाल्यावर ८५ टक्के शक्यता आहे कि तुम्हाला अगदी सौम्य व थोडी फार लक्षणे येतील. तसेच उर्वरित १५ टक्के मध्ये बहुतांश लोक बरे होत आहेत. तसेच आपली मानसिकता व प्रतिकारशक्तीचा थेट संबंध असतो. याला सायको- न्युरो – इम्युनो एक्सीस असे म्हणतात. हा कमकुवत झाला तर कोरोनाच नव्हे तर कुठल्याही आजारा विरोधात लढण्यास शरीर सक्षमता गमावून बसते. म्हणून कोरोनाची बाधा झाली तरी खचून न जाने हा उपचाराचाच भाग आहे असे समजावे. हे कळत असते पण वळत नसते अशी ती स्थिती असते. यासाठी पहिली पायरी आहे आपल्याला जे वाटते आहे ते आपल्या जवळच्या नातेवाईकाला भावना मन मोकळे पणाने बोलून दाखवणे. अशा वेळी नातेवाईकांची भूमिका महत्वाची ठरते. रुग्णाला आयसोलेट करायचे म्हणजे त्याच्याशी तुम्ही संवाद ठेवू शकता. त्याच्याशी फोन वर बोलत राहू शकता. गरज वाटल्यास लगेचच समुपदेशक किंवा मानसोपचारतज्ञांची मदत घेण्याचा निर्णय नातेवाईकांनी घ्यायला हवा.

मानसिक तणावावर नियंत्रण ठेवा काही लक्षणे नसताना आता आपले व जगाचे काय होणार ही मनात दाटून आलेली भीती व निराशा. लक्षणे नसताना मृत्यूची भीती वाटणे व आपला कोरोनाने मृत्यू होण्यापेक्षा आपणच स्वतःला संपवण्याची निराशे पोटी इच्छा दाटून येणे. या सोबत आधी पासून असलेले नैराश्य, घरात पूर्वी कोणी आत्महत्या केली असल्यास व आधी त्या व्यक्तीनेच आत्महत्येचा अयशस्वी प्रयत्न केला असल्यास जोखीम जास्त असते. सगळ्यात आधी असे नैराश्येचे कुठले ही विचार मनात येत असल्यास मानसोपचारतज्ञांचा त्वरित सल्ला घ्या. कोरोना बाधित व्यक्तीने हे लक्षात घ्यावे की कोरोनाची बाधा व कोरोनाची  लक्षणे या वेगळ्या गोष्टी आहेत. कोरोना झाल्यावर ८५ टक्के शक्यता आहे कि तुम्हाला अगदी सौम्य व थोडी फार लक्षणे येतील. तसेच उर्वरित १५ टक्के मध्ये बहुतांश लोक बरे होत आहेत. तसेच आपली मानसिकता व प्रतिकारशक्तीचा थेट संबंध असतो. याला सायको- न्युरो – इम्युनो एक्सीस असे म्हणतात. हा कमकुवत झाला तर कोरोनाच नव्हे तर कुठल्याही आजारा विरोधात लढण्यास शरीर सक्षमता गमावून बसते. म्हणून कोरोनाची बाधा झाली तरी खचून न जाने हा उपचाराचाच भाग आहे असे समजावे. हे कळत असते पण वळत नसते अशी ती स्थिती असते. यासाठी पहिली पायरी आहे आपल्याला जे वाटते आहे ते आपल्या जवळच्या नातेवाईकाला भावना मन मोकळे पणाने बोलून दाखवणे. अशा वेळी नातेवाईकांची भूमिका महत्वाची ठरते. रुग्णाला आयसोलेट करायचे म्हणजे त्याच्याशी तुम्ही संवाद ठेवू शकता. त्याच्याशी फोन वर बोलत राहू शकता. गरज वाटल्यास लगेचच समुपदेशक किंवा मानसोपचारतज्ञांची मदत घेण्याचा निर्णय नातेवाईकांनी घ्यायला हवा.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

वैद्यकीय धोरणशून्यता

वैद्यकीय धोरणशून्यता

वैद्यकीय धोरणशून्यता सध्या कुठल्या ही खाजगी रुग्णालयात कोरोना बाधित रुग्ण सापडला तर लगेचच रुग्णालय सील केले जाते व रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स , स्टाफला क्वारनटाइन केले जाते. यामुळे फक्त मुंबईत १७०० मोठ्या रुग्णालयांच्या खाटा आज बंद आहेत. आधीच राज्यात डॉक्टर व पॅरामेडिकल स्टाफचा तीव्र तुटवडा आहे. राज्याच्या आरोग्य खात्यात डॉक्टरांच्या १७००० जागा रिक्त आहेत.  राज्यात १०० डॉक्टर व वैद्यकीय स्टाफ ला कोरोनाची लागण झाली आहे. खाजगी नव्हे तर वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय सेवेतील अनेक डॉक्टर क्वारनटाइन मध्ये जात आहेत. धोरणशून्यते मुळे कोरोना विरुध्द या लढ्यात  सैनिकांची पहिली फळी आपण निष्क्रिय करत आहोत.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

     वैद्यकीय धोरणशून्यता हे सर्व टाळण्यासाठी धोरण व कार्यपद्धती मध्ये काही मुलभूत बदल तातडीने करण्याची गरज आहे. साथ आटोक्यात येई पर्यंत सर्वात आधी तापाचे रुग्ण आणि ताप नसलेले रुग्ण अशी रुग्ण तपासताना विभागणी आपल्याला करावी लागणार आहे. शासनाने यासाठी फिवर क्लिनिक शहरामध्ये विभागवार आणि प्रत्येक तालुक्यात एक असे सुरु करण्याची तातडीने गरज आहे. हे केले असे बोलले जाते आहे पण कुठे ही कार्यरत झालेले दिसत नाहीत. यामुळे ताप, सर्दी, खोकला म्हणजे कोरोनाची शक्यता असलेले रुग्ण या बाह्यरुग्ण विभागात जाऊ शकतात. मोठ्या खाजगी रुग्णालयांना ही रुग्णालयाच्या आवारात इतरत्र तापाचे रुग्ण वेगळे तपासण्याची व्यवस्था करावी लागणार आहे. प्रत्येक खाजगी व शासकीय रुग्णालयात जो पर्यंत प्रवेशद्वारा जवळ तापाच्या रुग्णांचे वेगळे स्क्रीनिंग करून त्यातून कोरोना संशयीतांसाठी वेगळी व्यवस्था उभारली गेली  नाही तर हॉस्पिटल हे संसर्गाचा मोठा स्त्रोत ठरू शकतात. हे करण्या ऐवजी थेट हॉस्पिटलच सील करण्याचा विवेकशून्य सोपा मार्ग आपण स्वीकारत आहोत. ताप, खोकल्याचे सर्व रुग्ण शासकीय रुग्णालयात पाठवा असे सांगितले जात असले तरी यातील बरेच रुग्ण नाकारले जात असल्याने परत खाजगी रुग्णालयातच येत आहेत. तसेच ७० टक्के आरोग्य सेवा खाजगी क्षेत्र देत असताना अचानक सर्व रुग्ण शासकीय रुग्णालयात जाणे शक्य नाही. सवयी प्रमाणे रुग्ण आधी आपल्या ठरलेल्या खाजगी डॉक्टरचाच सल्ला आधी घेतात. यातून एखादा रुग्ण कोरोना बाधित अढळला तर लगेचच अख्खे हॉस्पिटल १४ दिवस सील करण्याची गरज नाही. सोडियम हायपोक्लोराईट ने फ्युमीगेशन  करून एका दिवसात तत्काळ हे रुग्णालय सुरु केले जाऊ शकते.वैद्यकीय धोरणशून्यता या पुढे जाऊन अति नील किरणांचा प्रकाश झोत पूर्ण रुग्णालयात फिरवला तरी काही तासात निर्जंतुक होऊन रुग्णालय सेवा देण्यास तयार होऊ शकते. साथ कमी झाली तरी प्रत्येक शहरात आणि प्रत्येक रुग्णालयात  कोरोनाचे रुग्ण आढळणारच आहेत. मग या प्रत्येक रुग्णालयाला आपण कुठल्या ही धोरणा शिवाय सील करत गेलो तर इतर आजाराच्या रुग्णांनी जायचे कुठे. निर्जंतुकीकरणातून काही तासात या भागातील कोरोनाची संसर्ग करण्याची क्षमता नष्ट होईल.

                  राज्य सरकारने डॉक्टरांच्या वयक्तिक सुरेक्षेचे कवच म्हणजे पीपीई च्या अनउपलब्धतेचा प्रश्न सोडवण्यासाठी वेगळी पळवाट शोधून काढली आहे. फक्त कोरोना रुग्णांची काळजी घेत असलेल्या डॉक्टर व पॅरामेडिकल स्टाफ लाच पीपीईची गरज आहे असे राज्य सरकारचे म्हणणे आहे. पण असे असेल तर कोरोना बाधित रुग्ण सापडलेल्या रुग्णालयातील डॉक्टर, स्टाफ कोरोना पाँझीटीव येत आहेत त्याचे काय? सध्या कोरोनाचे रुग्ण इतके झपाट्याने वाढते आहे कि कुठला रुग्ण कोरोना बाधित असेल हे काहीच सांगता येत नाही. रुग्ण येतो तेव्हा तो कोरोनाचा आहे हे त्याच्या कपाळावर ( भाळी ) लिहिलेले नसते. तपासलेला रुग्ण चार पाच दिवसांनंतर कोरोना बाधित असल्याचे समजते आणि मग त्याला तपासलेले सर्व डॉक्टर, स्टाफ क्वारनटाइन केले जातात आणि हॉस्पिटल सील केले जाते. जर प्रत्येक रुग्ण तपासताना पीपीई वापरले तर ही वेळ येणार नाही कारण सुरेक्षेच्या कवचामुळे डॉक्टर, स्टाफ ला संसर्गाचा धोका राहणार नाही आणि डॉक्टर, स्टाफ ला क्वारनटाइन करण्याची गरज ही राहणार नाही. अनेक देशांमध्येच हेच धोरण राबवले जाते आहे. असे असताना आपल्याकडे ही धोरणशून्यता का? या शिवाय कोरोनाची बाधा असलेल्या ३० टक्के रुग्णांना कुठलेही लक्षण दिसून येत नाहीत. सुरक्षेशिवाय रुग्ण तपासताना या मुळे अनेक डॉक्टरांना बाधा झाल्याची उदाहरणे आहेत. या शिवाय डॉक्टरांनी सुरक्षेची साधने वापरली नाही म्हणून मला कोरोना झाला असे न्याय वैद्यक खटले दाखल करण्याची धमकी काही ठिकाणी रुग्ण डॉक्टरांना देत आहेत. हा प्रश्न फक्त डॉक्टरचा वयक्तिक संसर्गापासून सुरक्षेचा नाही तर यामुळे डॉक्टर हे संसर्गाचे  सगळ्यात मोठे स्रोत ठरू शकतात म्हणून हा प्रश्न सर्वांचा आहे. यासाठी राज्य सरकारने फक्त कोरोना कक्षातच पीपीई हे धोरण लवकरच बदलले नाही तर मोठा घात होणार आहे. यात डॉक्टरच नाही तर रुग्णालयाशी निगडीत इतर सर्व स्टाफ येतो. वैद्यकीय क्षेत्रात तीन पातळ्यांवर काम करणार्यांना किती जाडीचे व नेमके कुठले पीपीई वापरले पाहिजे याची मार्गदर्शक तत्वे उपलब्ध आहेत. राज्यात पहिला रुग्ण सापडून एक महिना व देशात दोन महिने उलटून गेले तरी आम्ही आरोग्य क्षेत्रातील पहिल्या फळीला अजून पीपीई देऊ शकलो नाही. एक वेळ खाजगी रुग्णालयांचा प्रश्न बाजूला ठेवला तरी शासकीय रुग्णालये व वैद्यकीय महाविद्यालयांचा प्रश्न जास्त गंभीर आहे. ज्या उपजिल्हा रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रावर ४० ते ५० जणांचा स्टाफ आहे तिथे १५ – २० साधे मास्क पाठवले जात आहेत. रोज जाहीर होणाऱ्या हजारो कोटींचा निधी हा तातडीने प्राधान्यक्रम ठरवून पीपीई खरेदी साठी वळवणे गरजेचे आहे. रुग्णांचे स्वॅब जिथे घेतले जात आहेत तिथे कलेक्शन चेम्बर्स तातडीने उभारणे गरजेचे आहे. परदेशात तर स्वॅब घेताना डॉक्टरचा धोका कमी करण्यासाठी नेगाटीव प्रेशर असणारे व रुग्णाचा जराही संबंध येऊ न देणारे चेम्बर्स बनवले आहेत. केरळ मध्ये सगळे सँपल्स याच पद्धतीनेच घेतले जात आहेत. प्रेशर चेम्बर नसले तरी किमान साधे रुग्ण व डॉक्टर मध्ये भिंत निर्माण करणारे चेम्बर्स सर्व स्वॅब घेणाऱ्या सेन्टर्स वर राज्यात तातडीने उभारणे गरजेचा आहे. सुरक्षिततेची काळजी घेतल्यास काम करणार्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास, हिम्मत वाढेल आणी झोकून देऊन काम करण्यास नैतिक बळ मिळेल.

             वैद्यकीय धोरणशून्यता खाजगी डॉक्टर पीपीई विकत घेण्यास तयार आहेत पण त्या उपलब्धच नाहीत. सुरुवातीला पीपीईच्या खाजगी विक्रेत्यांना पीपीई शासन सोडून कोणाला ही विकू नये असे निर्देश देण्यात आले होते जे नंतर शिथिल करण्यात आले. तसेच सरकार ने ठरवलेले पीपीईचे दर आणी खाजगी विक्रेत्यांचे दर यात तफावत असल्याने ही पीपीईच्या खरेदीस उशीर होतो आहे. आयसीएमआरने हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन आरोग्य क्षेत्रात रुग्णांशी थेट संबंध येणार्यांना देण्याचे निर्देश दिले आहेत. पण मागच्या आठवड्यात खाजगी सोडाच पण शासकीय सेवेतील वैद्यकीय कर्मचार्यांसाठी हे औषध उपलब्ध नव्हते. अशात भारताने अमेरिकेला या औषधाचा साठा पाठवल्याची बातमी आली. अशा गोष्टींमुळे स्वतःचा प्राण पणाला लावून काम करणाऱ्या वैद्यकीय क्षेत्राचे नैतिक खच्चीकरण होते. युद्ध जिंकण्यासाठी सर्वात  महत्वाचे असते सैनिकांना बळ देणे . वैद्यकीय सैनिक आज लढण्यास तयार आहेत, लढत आहेत. गरज आहे त्यांना युद्ध जिंकण्यासाठी पुरेसे हत्यार देण्याची.हॉस्पिटल्स सील करण – चुकीचे धोरण

सदरील माहिती आपण  महाराष्ट्र टाईम्स मध्येही वाचू शकता

हॉस्पिटल मध्ये जाताना घ्यावयाची काळजी

हॉस्पिटल मध्ये जाताना घ्यावयाची काळजी

हॉस्पिटल मध्ये जाताना घ्यावयाची काळजी कोरोनाची साथ सुरु असताना डॉक्टर कडे जावे की जाऊ नये. या विषयी स्पष्ट मार्गदर्शन नसल्याने रुग्ण गोंधळून गेले आहेत. यासाठी पुढील मार्गदर्शक तत्व लक्षात घ्यावी.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

१. साधे आजार असतील तर शक्यतो आपल्या डॉक्टरला फोन वर संपर्क करावा व आपली लक्षणे सांगावी. २. सध्या महाराष्ट्र मेडिकल काऊन्सील ने फोन वर औषधे देण्याची परवानगी दिली आहे. म्हणून जर लक्षणे साधी असली आणि डॉक्टरांना वाटले की हा आपोआप बरा होणारा आजार आहे तर ते फोन वर प्रिस्क्रिप्शन देतील. ३. जर त्रास जास्त असेल तर डॉक्टरांची वेळ घेऊन त्यांच्याकडे जावे. ४. डॉक्टर कडे जाताना कमीत कमी लोकांनी सोबत जावे. ५. जर सर्दी, खोकला किंवा श्वसन संबंधित कुठला ही त्रास असेल तर तोंडावर मास्क लावून हॉस्पिटल मध्ये जावे. ६. हॉस्पिटलच्या आत जाताना हात धुण्याची व्यवस्था असेल तर हात धुवा किंवा हँड सॅनीटायजर चा वापर करा. ७. डॉक्टरांच्या केबिन मध्ये जाताना शक्यतो आजारी व्यक्तीनेच आत जावे.

८. हॉस्पिटल मध्ये जाताना घ्यावयाची काळजी डॉक्टरशी बोलताना ही सोशल डीस्टन्सिंग म्हणजे १ मीटर पेक्षा जास्त अंतरावरून माहिती सांगावी. ९. डॉक्टर तपासणी करत असताना चेहरा डॉक्टर उभे आहेत त्याच्या दुसऱ्या बाजूला वळवून ठेवावा. १०. डॉक्टर तपासत असताना खोकला आल्यास लांब होऊन किंवा आपल्या बाजू वर खोकला करा. ११. हॉस्पिटल मध्ये कुठल्या गोष्टीला फार हात लावू नका. १२. हॉस्पिटल मधून घरी गेल्यावर परत हात धुवावे. १३. या काळात सहज भेटायला म्हणून हॉस्पिटल ला जाऊ नये. १४. दाखल असलेल्या रूग्णा सोबत ही कमी नातेवाईकांनी थांबावे. १५. गरोदर महिला यांनी निर्मित प्रसूती पूर्व तपासणी काही त्रास नसल्यास लांबणीवर टाकावी. १६. लहान मुलांचे लसीकरण सध्या काही काळ लांबणीवर टाकावे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

COVID-19 नोटा कश्या हाताळायच्या

COVID-19 नोटा कश्या हाताळायच्या

COVID-19 नोटा कश्या हाताळायच्या कोरोना नोटांमुळे पसरतो की नाही या विषयी विवाद असेल तरी जागतिक आरोग्य संघटनेने या विषयी इशारा दिला आहे. कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात येणाऱ्या वस्तू वर काही तास राहते म्हणून नोटांमधून संसर्ग होऊ शकतो. यासाठी काही सोपे मार्ग आहेत. जिथे शक्य आहे तिथे सरळ कॅशलेस व्यवहार करायचा. हे शक्य नसेल आणी नोटा हाताळाव्याच लागल्या तर त्या दुसऱ्या कडून प्लास्टिक च्या एखाद्या छोट्या बॅग मध्ये हात न लावता स्वीकारायचे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

COVID-19 नोटा कश्या हाताळायच्या किराणा व्यापारी, भाजी विक्रेते ज्यांना रोज खूप नोटा हाताळाव्या लागतात त्यांनीस सरळ ग्लोज वापरावे. इतर कमी प्रमाणात रोज ची घरगुती कॅश हाताळणाऱ्यांसाठी एक पर्याय आहे. घरी आल्यावर ग्लोज घालावे, त्यावर असेल तर थोडा हँड सॅनीटायझर घ्यावा. आणि इस्त्री ने नोटांना दोन्ही बाजूने इस्त्री करून घ्यावी. कोरोना विषाणू ५६ डिग्री सेल्सियस च्या वर जिवंत राहत नाही आणि इस्त्रीचे तापमान त्या पेक्षा जास्त असते. नंतर या नोटा घरात कोणीही हाताळल्या तरी काही प्रोब्लेम नाही.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

क्वारंटाइन न समजल्याने घात

क्वारंटाइन न समजल्याने घात कोरोना ची साथ महाराष्ट्रात प्रवेश करून आता २ महिने होऊन गेले तरी अजून साथ शास्रातील, इपिडीमीऑलोजीतील काही मुलभूत व्याख्या धोरण आखणी करणारे शासन, प्रशासन आणि सर्व सामान्य समजून घेण्यास तयार नाही हा वैद्यकीय अज्ञानाचा कळस आहे. या साठी सर्व प्रथम क्वारंटाइनचा इतिहास आणि या शब्दाचा नेमका अर्थ समजून घेऊ. चौदाव्या शतकात प्लेग ची साथ आली व जेव्हा बहुतांश प्रवास हा जहाजाने व्हायचा तेव्हा एका देशातून दुसऱ्या देशात जहाजाने येणाऱ्या प्रवाशांना ४० दिवस वेगळे व एकत्र ठेवून त्यांची राहण्या, जेवणाची सोय केली जायची. ४० ला ग्रीक मध्ये quaranta giorni म्हणतात म्हणून क्वारंटाइन. ४० दिवस का तर प्लेग सह इतर सर्व आजार बाधित व्यक्ती पासून होण्यास किमान १ व कमाल ४० दिवस लागतात म्हणून तो पर्यंत या प्रवाशांपैकी कोणाला लक्षणे आली तर उपचारार्थ पुढे त्याला वेगळे ठेवून उपचार करता यायचे व तसेच इतर देशातील आजार पसरायचे नाही. चौदाव्या शतकात आजारांचे उपचार, औषधे अजून विकसित झालेले नव्हते. म्हणून आजार आपल्या देशात येऊ न देणे हाच मुख्य उपाय होता. पुढे एखाद्या प्रांतात हा आजार झाला तर इतर प्रांता साठी व त्या पुढे गावासाठी ही क्वारंटाइन ही संकल्पना रुजली.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

१८७८ ची यलो फिवर व एकोणिसाव्या शतकातली कोलेरा ची साथ रोखण्यात गांभीर्याने राबवलेल्या क्वारंटाइनचा मोठा वाटा होता. पुढे तर अनेक देशात ही साथ सुरु असे पर्यंत क्वारंटाइनच्या सुरक्षेच्या जबाबदारी साठी पोलिसांची वेगळी तुकडीच निर्माण करण्यात आली. पण चौदाव्या शतकात जे कळले ते आज कोरोना या निश्चित उपचार नसलेल्या व जगभर थैमान घालत असलेल्या आजारा विषयी आपल्याला कळेनासे झाले आहे. इतर देशात जिथे अर्धे देशच्या देश शासकीय क्वारंटाइन मध्ये ठेवून काळजी घेण्यात आली तिथे आधी पासूनच हे आपल्याला शक्यच नाही म्हणून हात टेकले व होम क्वारंटाइन ही संकल्पना आपल्या सोयीसाठी आपण जन्माला घातली. खर तर होम क्वारंटाइन हा शब्दच एक विरोधाभासी शब्द आहे. होम क्वारंटाइन हा शब्द रागीट, शांत गृहस्थ किंवा विवाहित लिव्ह इन जोडपे या सारखा आहे. जो व्यक्ती बाधित देशातून आला आहे त्याला वेगळे ठेवण्यासाठी आपण ” जा तुझ्या घरी तू वेगळा राहा ” असा हातावर शिक्का मारून सार्वजनिक वाहतुकीतून प्रवास करत आपण परत पाठवतो या सारखा दुसरा विनोद या देशाच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या इतिहासात घडणार नाही. क्वारंटाइन न समजल्याने घात झाला आहे बरे होम क्वारंटाइन मध्ये नेमके काय करायचे आहे या विषयी नेमकी माहिती आपण संबंधित व्यक्तीला देतो आहे का ? या व्यक्तीचे घर कशाने पुसायचे हे ही ठरलेले आहे. तरच कदाचित ही होम क्वारंटाइनची संकल्पना काही प्रमाणात यशस्वी होऊ शकली असती. त्या पलीकडे ज्या लोकशाहीला एवढ्या वर्षात शिस्त लागू शकली नाही, तिथे एक स्वस्थ व्यक्ती स्वतःला एका खोलीत चौदा दिवस कोंडून घेईल ही अपेक्षा करणे भाबडेपणाचे आहे. होम क्वारंटाइन पाळला जातोय का यासाठी सिंगापूर सारखी लक्ष ठेवणारी सक्षम व्हिजिलन्स आपल्या कडे आहे का ? मुंबई सारख्या ठिकाणी काही प्रमाणात ती सुरु झाली आहे पण ती ही सदोष आणि जुजबीच आहे. हातावर शिक्का दिसल्यास पोलिसांना फोन करा एवढ्या वर विषय संपायला ही काही रात्री वाजणाऱ्या डी जे एवढी साधी गोष्ट आपल्याला वाटते आहे का? याची परिणीती अशी झाली कि विद्यापीठांचे कुलगुरू, कॉलेजेस चे अधीक्षक,आय.ए.एस अधिकारी अशा शिक्षित उच्चभ्रू लोकांनी कोण कुठला होम क्वारंटाइन म्हणून ही संकल्पना धुडकावून लावली. पुण्यात होम क्वारंटाइनचे शिक्के असलेल्यांनी मुलांचे वाढदिवस गर्दी बोलवून साजरे केले . या पुढे ग्रामीण निम्न शिख्सित लोकांकडून तरी काय अपेक्षा करता येईल ? झाले ही तसेच . सांगली, इस्लामपूर मध्ये तर परदेश व धार्मिक स्थळांवरून आलेल्या काहींनी जेवणावळी दिल्या आणि आज पुणे, मुंबई, नागपूर नंतर सांगली, इस्लामपूर च्या रूपाने कोरोनाची नवी राजधानी निर्माण होताना दिसते आहे.

खरेतर अजून ही वेळ गेलेली नाही. आज घडीला ११ हजार लोकांना होम क्वारंटाइनचे हातावर शिक्के मारून त्यांना घरी सोडून आपण एक प्रकारे कोरोना पसरवण्याचे लायसन्सच दिले आहे क्वारंटाइन न समजल्याने घात झाला आहे . साडेबारा कोटी लोकसंख्येच्या राज्याला ११ हजार लोकांना वेगळे ठेवून त्यांची १४ दिवस व्यवस्था ठेवणे एवढे अवघड आहे का ? खरे तर सव्वाशे कोटीच्या देशात परदेशातून येणाऱ्या सगळ्यांना जानेवारी , फेब्रुवरी महिन्यात शिस्तबद्ध क्वारंटाइन केले असते तर आज आपण जगा पुढे एक उदाहरण घालून दिले असते. पण अजून ही महाराष्ट्राला ही संधी आहे. प्रत्येक जिल्ह्यात १०८ शासकीय कार्यालये, जिल्हा परिषद शाळा, शासकीय विश्राम गृहे, धार्मिक तीर्थ क्षेत्रांचे भक्त निवास अशा किती तरी वास्तू सहज उपलब्ध होतील. यांच्या आहार व्यवस्थेसाठी शासनाकडे पैसे नसतील तर स्वयंसेवी संस्था पुढे येतील. लाखांच्या सभांचे उत्तम नियोजन करणारे राजकीय पक्ष सत्तेत असताना इथे त्यांचे नियोजन कौशल्य का दिसत नाही. एवढ्या मोठ्या राज्यात हे शक्य व प्रॅक्टीकल नाही अशी उत्तरे दिली जात आहेत.

क्वारंटाइन मधील व्यक्तीला कुठली ही लक्षणे नसतात. त्याचा फक्त कोरोना बाधित देशात प्रवास झालेला असतो किंवा सध्या देशातील कोरोना ग्रस्त रुग्णाशी थेट संपर्क आलेला असतो. कोरोना चा संपर्क येऊन त्याचा संसर्ग होतो पण काहीच लक्षणे दिसत नाहीत असा हा कोरोना पसरवणारा छुपा घटक या साखळीत सगळ्यात महत्वाचा असतो. कोरोना ग्रस्तांची संख्या सांखिक पद्धतीने ( exponentially ) म्हणजे एकाचे चार, सोळा, बत्तीस अशी झपाट्याने वाढवण्यासाठी कोरोना पोझीटीव नव्हे तर हा कोरोना असून ही लक्षणे नसल्याने समजून न येणारा घटक जबाबदार असतो. कारण कोरोना निश्चित निदान झालेला आयसोलेशन मध्ये असतो. एकीकडे हा घटक आपण क्वारंटाइन मोडीत काढत समाजात कोरोना पसरवण्यासाठी मोकळे सोडत आहोत तसेच जास्तीत जास्त टेस्ट करून कोरोना बाधित व्यक्तीचा शोध ही आपण घेत नाही आहोत. या पुढे जाऊन कॉन्टॅक्ट म्हणजे थेट संपर्कात आलेले आणि कॉन्टॅक्ट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे या संपर्कात आलेल्यांच्या संपर्कात आलेले अशी सगळी साखळी एक केस सापडल्यावर शोधावी लागते.

आपण मात्र अजून ही कमी टेस्टिंग मुळे कोरोना चे आपले आकडे त्या मानाने कमी आहेत या आनंदात स्वतःची पाठ थोपटून घेत आहोत. हे सर्व कॉन्टॅक्ट शोधण्याची प्रक्रिया करण्यासाठी एक यंत्रणा कार्यरत असायला हवी . ही सगळी प्रक्रिया केवळ पुढील एक महिन्यासाठी राबवायची आहे. सध्या लॉक डाऊन मुळे तशी ती सोपी ही आहे. पण ही यंत्रणेला थकवणारी असल्याने होम क्वारंटाइनची फसवी पळवाट शासनाने स्वीकारलेली दिसते आहे. एक तर शासकीय इमारती आरोग्य खात्याने अधिग्रहीत करून तातडीने होम क्वारंटाइन मोडीत काढून थेट क्वारंटाइन सुरु करावे. किंवा किमान सिंगापूर प्रमाणे होम क्वारंटाइन मध्ये प्रत्येका ला थोड्या थोड्या वेळाने मेसेज करून त्याचे जीपीएस लोकेशन ट्रॅक करणे, त्यांच्या घरी भेटी देऊन ते घरी आहेत का याची चाचपणी करणे व होम क्वारंटाइन चे नियम मोडल्यास स्पेन मध्ये ३०,००० डॉलर चा दंड आहे तसा दंड आकारणे अशा गोष्टी तरी कराव्या. क्वारंटाइन किंवा कडक नियमांचे होम क्वारंटाइन या दोन्ही पैकी काही ही न केल्यास पुढे आपल्या देशाचा एका साथीने कसा घात केला हा इतिहास भावी पिढी साठी तेवढा उरेल.

सदरील माहिती आपण सकाळ मध्येही वाचू शकता