घरच्या घरीच बनवा सॅनिटायझर स्प्रे

घरच्या घरीच बनवा सॅनिटायझर स्प्रे

घरच्या घरीच बनवा सॅनिटायझर स्प्रे सध्या सॅनिटायझरशी निगडित अनेक उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत. यात सॅनिटायझर स्प्रे, सॅनिटायझर पेन हे दोन प्रकार आहेत. आपण बाहेर गेल्यावर लाइटचे बटन, दरवाजे, लिफ्टचे बटन बंद करण्यासाठी प्लॅस्टिकचे आकडेही मिळत आहेत. या आकड्यांनी बटन चालू-बंद करताना ते परत आपण खिशात ठेवणार. त्यामुळे ज्या जागेवर आकडा वापरणार त्याचा संसर्ग शरीरात येणारच म्हणून अशा आकड्यांचा उपयोग नाही. यासाठी घरच्या घरी स्वस्तात सॅनिटायझर स्प्रे बनवता येईल.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

१. घरच्या घरीच बनवा सॅनिटायझर स्प्रे ३० एमएलची छोटी पुढे निमुळती आणि छिद्र पडण्याची सोय असलेली प्लॅस्टिक बाटली घ्या. ती होमिओपॅथी औषधांच्या दुकानावर सहज मिळते. डॉक्टर या बाटल्यांचा वापर पातळ औषध किंवा मदर टिंक्चरसाठी करतात.
२. ही बाटली अत्यंत स्वस्त असून
५० पैसे ते १ रुपयाला मिळते.
३. बाटलीच्या समोर छिद्रासाठी जागा असते, तिथे टाचणीने छिद्र करावे.
४. या बाटलीमध्ये सॅनिटायझर भरावे.
५. लाइटचे किंवा लिफ्टचे बटन बंद-चालू करताना या बाटलीचे झाकण उघडून बाटलीच्या टोकाने बटन दाबा.
६. बटन दाबाल तेव्हा बाटली पण हलकेच दाबली आणि थोडे सॅनिटायझर त्यातून बाहेर येतो.
७. असे करण्याचे तीन फायदे होतील. तुमचा त्या गोष्टीशी संपर्क येणार नाही व इतर व्यक्तीकडून ती जागा संसर्गित झाली असेल तर सॅनिटायझरनेच तुम्ही ती बंद-चालू केल्याने बाटलीचे टोकही संसर्गित होणार नाही. तिसरा फायदा असा की ती जागा सॅनिटाइझर झाल्याने निर्जंतुक झाली म्हणून तुमच्यानंतर स्पर्श करणाऱ्या व्यक्तीलाही त्याचा धोका नाही.
८. ही बाटली खिशात सहज मावते.
९. कारचे उघडण्याचे हँडल, सार्वजनिक किंवा आॅफिसच्या स्वच्छतागृहाचे दरवाजा उघडण्याचे हँडल अशा कुठल्याही ठिकाणी ही बाटली सहज वापरता येईल.
१०. बाटली शक्यतो खिशातच ठेवावी. आॅफिसमध्ये गेल्यावर टेबलवर किंवा इतरत्र ठेवू नये.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.

व्हॉल्व असलेला मास्क वापरू नका

व्हॉल्व असलेला मास्क वापरू नका

व्हॉल्व असलेला मास्क वापरू नका सध्या अनेक जण बाहेरच्या बाजूने व्हॉल्व असलेले मास्क वापरत आहेत. बऱ्याच जणांना हाच सर्वोत्तम मास्क असल्याचा ही गैरसमज झाला आहे. या मास्कचे नीट निरीक्षण केल्यावर एक गोष्ट लक्षात येईल कि श्वास आत घेताना हा व्हॉल्व बंद होतो व श्वास बाहेर सोडताना व्हॉल्व आपोआप उघडतो. त्यामुळे या मास्कच्या व्हॉल्व मधून कोरोना तसेच इतर विषाणू सहज बाहेर जाऊ शकतात. या मास्क मुळे मास्क घालणाऱ्या व्यक्तीला कदाचित संसर्ग मिळेल पण समोरच्या बाधित व्यक्तीला ही व्हॉल्व असलेल्या मास्कचा धोका माहित नसेल व तो हा मास्क वापरत असेल तर अशा कोरोना संसर्गित व्यक्ती पासून इतरांचे संरक्षण होणार नाही. मास्क वापरण्याचा हेतू फक्त स्वतःचेच संसर्ग नाही तर माझ मास्क तुला आणि तुझा मास्क मला संसर्ग देईल असे हे प्रतिबंधाच्या सहजीवनाचे तत्त्व आहे त्यामुळे हे मास्क कोणीही वापरू नये. तसेच शासनाने ही या मास्क वर बंदी घालावी. इतर कुठला ही नाकाच्या वरच्या टोका पासून हनुवटी च्या खाल पर्यंत व दोन्ही बाजूने तोंड व नाक पूर्ण झाकणारा व्हॉल्व नसलेला मास्कचा वापर करण्यास हरकत नाही.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

व्हॉल्व नसलेला मास्क वापरल्यास श्वास घेण्यास काही त्रास होईल का ?

व्हॉल्व असलेला मास्क वापरू नका मुळात व्हॉल्व असलेले मास्क हे जिथे जागा पूर्ण बंद आहे व हवेचा दाब कमी आहे अशा जागेत काम करणाऱ्यांसाठी बनवले गेले होते. खाणी मध्ये व खोदकामात , बोगद्यात काम करणाऱ्या कर्मचार्यांचा श्वास गुदमरू नये व त्यांच्या शरीरात C02 हा प्राणवायू साठून त्यांचा जीव गुदमरू नये  यासाठी ही मास्क मध्ये व्हॉल्वची योजना. कारण अशा खोलवर व पूर्ण बंद असलेल्या जागेत ऑक्सिजनचे प्रमाण कमी असते. बाहेर मोकळ्या वातावरणात किंवा ऑफिस मध्ये वातावरण पूर्ण बंद नसते व ऋण तापमानात ऑक्सिजनची पातळी पुरेशी असते. म्हणून तिथे व्हॉल्व नसलेले मास्क वापरले तरी श्वास घेण्यास त्रास होण्याची / जीव गुदमरण्याची भीती नाही. पण मात्र व्हॉल्व मधून कोरोना संसर्ग इतरांना होण्याची शक्यता आहे. म्हणून मास्क श्वास घेण्यास त्रास होण्याची भीती बाजूला ठेवून व्हॉल्व नसलेले मास्कच वापरावे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.

एकदा कोरोनातून बरे झाले, तरी पुढे काळजी घ्यावीच का ?

एकदा कोरोनातून बरे झाले, तरी पुढे काळजी घ्यावीच का

एकदा  कोरोनातून बरे झाले, तरी पुढे काळजी घ्यावीच का ?सध्या कोरोना संसर्गातून अनेक जण बरे होत आहेत. यापैकी अनेकांचा गैरसमज आहे की मला कोरोना होऊन गेला आहे , आता मला काही काळजी घेण्याचे कारण नाही. पण तुम्ही कोरोना मधून बरे झालेले असाल तरी तुम्हाला सोशल डीस्टन्सिंग, मास्क, हात धुणे, सॅनीटायजरचा वापर तसेच कोरोना होण्या अगोदर घेत होतो तशीच सर्व काळजी घेणे चालू ठेवावे लागणार आहे . याची कारण पुढील प्रमाणे आहेत –

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

  • जरी तुम्ही कोरोना संसर्गातून बरे झाले तरी तुम्हाला परत कोरोणाचा जो संसर्ग होऊ शकतो, त्यातून तुम्हाला फारसा धोका नाही कारण काही प्रमाणात तुमच्या शरीरात आधीच्या संसर्गामुळे प्रतिकारशक्ती निर्माण झाली आहे. पण असे असले तरी तुम्ही त्या संसर्गाचे वाहक ठरून इतरांना आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुमच्या कुटुंबाला संसर्गित करू शकता.
  • जरी तुमच्या शरीरात प्रतिकारशक्ती निर्माण झाली असली  तरी तुम्हाला परत काहीही लक्षणे येणारच नाहीत असे नाही. तुम्हाला गंभीर स्वरूपाचा जीवघेणा कोरोना परत होणार नसला तरी तो सौम्य किंवा मध्यम स्वरूपाचा नक्कीच आसू शकतो. म्हणजे आठवडा भर ताप, सर्दी, खोकला, थकवा असे होऊ शकते. जरी जीवाला धोका नसला तरी याने कामाचे तास बुडतील, परत १४ दिवस अलगीकरण असा अनावश्यक त्रास होईल. जर काळजी घेणे सुरु ठेवले तर हा त्रास टळू शकेल.
  • एकदा  कोरोनातून बरे झाले, तरी पुढे काळजी घ्यावीच का ? जरी एकदा कोरोना होऊन गेला तरी तो नेमक्या कुठल्या स्ट्रेन मुळे झाला हे माहित नसते. सध्या कोविड १९ च्या एक्स आणि वाय अशा दोन स्ट्रेन देशात आहेत. या राज्यांतर्गत वेगळ्या आहेत कि अगदी राज्यातच जिल्ह्य अंतर्गत आहेत कि अगदी एकाच तालुक्यात ही दोन स्ट्रेनचा संसर्ग सुरु आहे हे अजून नीटसे माहित नाही. पण देश व राज्य अंतर्गत प्रवास सुरु झाल्याने त्या इकडून तिकडे वाहून गेल्याच असणार. जर आधी एका स्ट्रेन चा कोरोना होऊन गेला तर दुसऱ्या स्ट्रेनचा नंतर होऊ शकतो . या नवीन स्ट्रेनचा संसर्ग फ्रेश / नवा  असल्याने त्याचा नक्कीच जीवाला धोका असू शकतो. म्हणजे एका स्ट्रेनने झालेला संसर्ग हा त्या स्ट्रेन साठीच पुढच्या वेळी प्रतिकारशक्ती देईल, दुसऱ्या स्ट्रेन साठी नाही.
  •       या सर्व कारणांमुळे कोरोना संसर्गातून बरे झालेल्यांनी काळजी घेणे सुरु ठेवावे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.

सौम्य, मध्यम व तीव्र कोरोना

सौम्य, मध्यम व तीव्र कोरोना

सौम्य, मध्यम व तीव्र कोरोना कोरोनाचा संसर्ग झाल्यावर बहुतांश जणांमध्ये तो सौम्य / मध्यम स्वरूपाचा असेल म्हंटले जाते. सौम्य, मध्यम व तीव्र कोरोना पण आपल्याला झालेला कोरोना हा नेमका सौम्य / मध्यम स्वरूपाचा आहे आणि ही पातळी ओलांडल्यावर त्याला कधी सिरीयस मानायचे हे सर्वांना माहित असायला हवे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

  सौम्य मध्यम तीव्र ( सिरीयस )
ऑक्सिजनची पातळी ९४ पेक्षा जास्त ९० ते ९४ ९० पेक्षा कमी
श्वासाची गती २४ पेक्षा कमी २४ ते ३० ३० पेक्षा जास्त
निमोनिया नाही असतो जास्त असतो
सि.टी. स्कॅन नॉर्मल / २५ टक्के पेक्षा कमी २५ – ७५ टक्के ७५ – १०० टक्के
ऑक्सिजनची गरज नाही लागू शकते –  ऑक्सिजन टार्गेट ९२-९६ टक्के लागते ऑक्सिजन टार्गेट ९० टक्के पेक्षा जास्त
ब्लड प्रेशर हृदयाचे ठोके मोजण्याची गरज दररोज एकदा दररोज  दर ६ तासांनी दररोज  दर ४ तासांनी
श्वासाची गती आणि ऑक्सिजन दररोज दर ६ तासांनी दररोज दर २ तासांनी सतत
सुट्टी कधी लक्षणांपासून १० दिवसांनी + ३ दिवस ताप नसावा व श्वास घेण्यास त्रास नसावा. लक्षणांपासून १० दिवसांनी + ३ दिवस ताप नसावा व श्वास घेण्यास त्रास नसावा. पूर्ण बरे झाल्यावर

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.

संसर्ग, साथींवर पावसाळ्याचा काय परिणाम होतो?

संसर्ग, साथींवर पावसाळ्याचा काय परिणाम होतो

संसर्ग, साथींवर पावसाळ्याचा काय परिणाम होतो? “उन्हाळ्यात वाढलेल्या तापमानामुळे कोरोना संसर्ग कमी होईल, असे बोलले जात होते; पण तसे काही झाले नाही व साथ उन्हाळ्यात वाढलीच. आता अनेकांच्या मनात प्रश्न आहे की,पावसाळ्याचा कोरोनावर काही परिणाम होतो का? कुठल्याही विषाणूच्या प्रसारावर सहसा तीन गोष्टींचा परिणाम असतो. हवामानातील बदल, मानवाचे वर्तन तसेच आणि विषाणूमध्ये होणारे जनुकीय बदल व संक्रमण.आयआयटी मुंबईमधील एका प्रयोगात दिसून आले की, पावसाळ्यातील दमट हवामान कोरोनासाठी पोषक असून संसर्ग वाढवणारे ठरू शकते.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

संसर्ग, साथींवर पावसाळ्याचा काय परिणाम होतो? हे ठामपणे सांगण्यास व सिद्ध करण्यास हा एक अभ्यास पुरेसा नाही. यासाठी एक ते दोन वर्षे कोरोना विषाणू संक्रमित होतो का व त्यांनतर प्रत्येक ऋतूमध्ये त्याचे वर्तन कसे असेल या अभ्यासानंतरच हे ठामपणे सांगता येईल. पण सर्दी-खोकला, आरएसव्ही हे सर्व विषाणू पावसाळ्यात जास्त प्रमाणात पसरतात. हे गृहीत धरून पावसाळ्यात जास्त सतर्क राहण्याची गरज नक्कीच आहे. पावसाळ्यामध्ये मानव वर्तणुकीवर असे काही परिणाम होतात, ज्यामुळे संसर्गसाखळी तोडण्यास मदतही होऊ शकते. ते म्हणजे इतर ऋतूंपेक्षा पावसाळ्यात लोक जास्त घरात राहतात. बाहेर पडत नाहीत. यामुळे गर्दीचे प्रमाणही कमी होते. त्यामुळे इतरांशी कमी संपर्क येऊन संसर्गाचे प्रमाण कमी होण्याचा फायदा होऊ शकतो.पावसाळ्यातील एक गोष्ट मात्र कोरोनाची गुंतागुंत वाढवते. पावसाळ्यात हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया, लेप्टोस्पायरोसिस हे आजारही वाढतात. त्यामुळे तापाचे रुग्ण पावसाळ्यात जास्त असतात. या इतर आजारांच्या वाढलेल्या प्रमाणामुळे तापाचा रुग्ण कोरोनाचा की इतर आजारांचा, हे निदान करताना गोंधळ उडतो. म्हणून या काळात आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवून, छतावर किंवा घराभोवती पाणी तुंबू न देता डासांना अटकाव करायला हवा. म्हणजे इतर आजार कमी होतील. यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताणही कमी होईल.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.

बाधित तरीही चाचणी निगेटिव्ह

बाधित तरीही चाचणी निगेटिव्ह

बाधित तरीही चाचणी निगेटिव्ह दिल्लीत एका निवासी डॉक्टर चा मृत्यू झाला व त्याची सर्व लक्षणे कोरोना सारखी होती. दोन वेळा केलेली कोरोनाची टेस्ट निगेटिव्ह आली. त्यामुळे कोरोना असलेल्या रुग्णाची टेस्ट निगेटिव्ह येऊ शकते व टेस्ट सोबत लक्षणे व डॉक्टरांचा अनुभव निदान व उपचार करताना ग्राह्य धरणे महत्वाचे ठरते. यातून बोध घेण्या सारख्या व सावध होण्या सारख्या काही गोष्टी आहेत.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

कोरोना असून ही टेस्ट निगेटिव्ह का येऊ शकते ?
आरटी पीसीआर टेस्ट ही निदाना साठी सर्वात चांगली असली तरी पुढील तीन करणाने कोरोना संसर्ग असून ही ती निगेटिव्ह येऊ शकते –

  • फक्त नाकातून किंवा घशातून घेतली असेल तर. फक्त नाकातून स्वॅब घेतल्यास  ३७ %  आणि फक्त घशातून स्वॅब घेतल्यास ६८ % रुग्ण  कोरोना संसर्गित असून हि  निगेटिव्ह येऊ शकतात. घसा व नाक दोन्हीतून स्वॅब घेतला असेल तर पाँझीटीव्ह येण्याची शक्यता वाढते.
  • स्वॅब घेताना डोळ्यातून पाणी येईल इतका तो  घासून घ्यावा लागतो. वरवर स्वॅब घेतल्यास पुरेशा पेशी स्वॅबला लागत नाहीत.
  • संसर्गाच्या पहिल्या तीन ते चार दिवसात टेस्ट निगेटिव्ह येऊ शकते.
  • कोविड – 19 सोडून इतर फुफ्फुसावर परिणाम करणारे कोरोना किंवा इतर विषाणू संसर्ग असू शकतो.

वरील घटक नसले आदर्श पद्धतीने जरी तपासणी व लक्षणे सुरु होऊन ८ दिवस झाले असले  तरी तपासणी कोरोना संसर्ग ओळखू न शकण्याच प्रमाण 20 % आहे

मग यावर उपाय काय –
बाधित तरीही चाचणी निगेटिव्ह जर लक्षणे कोरोनाची वाट असतील म्हणजे ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास व कोरोना संसर्गित व्यक्तीशी खात्रीशीर रित्या संपर्क आला असेल तर

  • टेस्ट परत एकदा करावी.
  • दुसऱ्या टेस्टचा अहवाल येई पर्यंत स्वतः आयसोलेशन मध्ये राहावे.
  • दुसरी टेस्ट ही निगेटिव्ह असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्या प्रमाणे वागावे व ते म्हणत असतील तर कोरोना चे उपचार करून पुढील १४ दिवस स्वतःच्या लक्षणांवर लक्ष ठेवावे व आयसोलेशन सुरु ठेवावे.
  • लक्षणे सुरु होऊन सात दिवस झाले असतील तर रॅपीड अँटीबॉडी टेस्ट करावी.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.

चाचण्यांचे विश्लेषण

चाचण्यांचे विश्लेषण

चाचण्यांचे विश्लेषण पीसीआर,   आयजीएम  व   आयजीजी  यांचे एकत्रित विश्लेषण कसे करावे हे पुढे सांगितले आहे.   यात    +  म्हणजे टेस्ट  पॉजिटीव्ह व – म्हणजे टेस्ट निगेटिव्ह समजावे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

  1.  चाचण्यांचे विश्लेषण पीसीआर  +,  आयजीएम  – ,    आयजीजी –    संसर्गाची सुरुवातीची स्टेज पण संसर्ग होऊन ७ दिवस होऊन गेले आहे.
  2.  पीसीआर  +,  आयजीएम  + ,    आयजीजी –   रुग्णावर जास्त लक्ष  ठेवण्याची गरज आहे कारण संसर्ग होऊन ७ दिवस झाले आहेत व  आठव्या दिवसापासून बाराव्या दिवसापर्यंत गुंतागुंतीची शक्यता जास्त आहे.              
  3. पीसीआर टेस्ट केली नाही,  आयजीएम  + ,    आयजीजी –   संसर्गाची सुरुवातीची स्टेज पण आरटी पीसीआर करून निदान निश्चित करणे गरजेचे आहे.
  4. पीसीआर  +,  आयजीएम  + , आयजीजी +   संसर्गाची अॅक्टीव स्टेज. 
  5. पीसीआर टेस्ट केली नाही. आयजीएम  + ,    आयजीजी +   संसर्गाची अॅक्टीव स्टेज, पण आरटी पीसीआर करून निदान निश्चित करणे गरजेचे आहे. 
  6. पीसीआर  – ,  आयजीएम  + ,    आयजीजी –   संसर्गाची सुरुवातीची स्टेज पण आरटी पीसीआर ३० टक्के केसेस मध्ये रुग्ण कोरोना संसर्गित असून ही निगेटिव्ह येऊ शकते. टेस्ट  फॉल्स निगेटिव्ह म्हणजे रुग्ण कोरोना पॉजिटीव्ह तरीही आरटी पीसीआर टेस्ट निगेटिव्ह असे असू शकते. अशा वेळी आरटी पीसीआर परत एकदा करायला हवी. 
  7. पीसीआर  -,  आयजीएम  – ,    आयजीजी +   जुना संसर्ग झाला आहे , रुग्ण आता बरा झाला आहे. तसेच रिपोर्ट पॉजिटीव्ह येऊन १४ दिवस झाले असतील तर रुग्णाकडून इतरांना संसर्ग होण्याचा धोका नाही.
  8. पीसीआर  – ,  आयजीएम  + ,    आयजीजी +  रुग्ण रिकवरी फेज मध्ये आहे. पण  लक्षणे  सुरु असतील तर इतरांना संसर्गित करू शकतो.
  9. पीसीआर  -,  आयजीएम  – ,    आयजीजी –    संसर्गित झालेला नाही किंवा संसर्गाच्या अगदी सुरुवातीच्या पहिल्या ४ दिवसात रुग्ण आहे .

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.

मालेगाव बदलते आहे

मालेगाव बदलते आहे

मालेगाव बदलते आहे मालेगावच्या परिस्थिती वर ‘मिशन मालेगाव’ सुचवणारा लेख सकाळ मध्ये लिहिला. यानंतर काहींनी धमक्या दिल्या, काहींनी ट्रोल केले तर वाचकांनी सत्य स्थिति सांगितल्या बद्दल कौतुक केले आणि हिम्मत वाढवली. पण एका व्यक्तिच्या वाचनात हा लेख आला आणि तो क्षण देशाचे वुहान ठरत असलेले कोरोना केंद्र – मालेगावचे  भवितव्य बदलणारा ठरला. ती व्यक्ति म्हणजे मालेगाव महापालिकेचे आयुक्त दीपक कासार. २८ एप्रिलला दीपक कासार यांनी मालेगाव महापालिका  आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतली आणि  ३१ मे ला सकाळ मधील आमचा लेख प्रकाशित झाला . या लेखाकडे कासार यांनी टीकेच्या नजरेतून नव्हे तर संधी म्हणून पहिले. “ डॉक्टर तुम्ही आम्हाला मालेगावचा आरसा दाखवला, मी शपथ घेतो की ही परिस्थिति बदलवून दाखवेल, तुम्ही माझ्या सोबत आहात का?” असा मला दीपक कासार यांचा फोन आला. माझ्या गाठीशी असलेला माझ्या गावातील कोरोना प्रतिबंधाच्या ‘वैजापुर मॉडेल’च्या अनुभवा वरून काही उपाययोजना दीपक कासार यांना सांगितल्या व  अणि इतर तज्ञांशी  त्यांचा संपर्क करून दिला.  वैद्यकीय ज्ञान आणि  दीपक कासारांचे प्रशासकीय कौशल्याने कासार यांनी मालेगावचा कोरोना  आटोक्यात आणण्याच्या संकल्पपूर्तीला सुरुवात किली.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

घरोघरी जाऊन आढावा

                          मालेगाव मध्ये लोक तपासणी साठी बाहेर पडत नाहीत, मृत्यूचा आकडा आणि  बाधित जास्त आहेत या लेखातील माहितीच्या अनुषंगाने दीपक कासार यांनी घरोघरी आपल्या प्रशासनातील वेगळी व्यवस्था कामाला लावली आणि  एक धक्कादायक गोष्ट त्यांच्या लक्षात आली. मुस्लीम समाजात मृत्यू  झालेल्यांच्या विधवेला फिदानी या धार्मिक नियमा अंतर्गत ४ महिने आणि आकरा दिवस घरातून बाहेर पडण्याची परवानगी नसते. कोरोनाने मृत्यू झालेल्याच्या थेट संपर्कात आलेल्या या महिलांना त्यामुळे लक्षणे आली तरी घरातून बाहेर पडण्याची या प्रथेमुळे  सोय नव्हती. म्हणून यांच्या साठी कर्मचारी घरोघरी जाऊन तपासणी करतील व त्यांना गरज वाटल्यास उपचार ही घरीच करण्यात येतील हा विश्वास दीपक कासार यांनी अशा मुस्लीम कुटुंबीयांना दिले.  अनेक जण सायलेंट हायपोक्सिया म्हणजे लक्षात येत नसलेले ऑक्सिजणचे प्रमाण कमी होणे याने दगावत आहेत हा मुद्दा मी माझ्या लेखात मांडला होता. यावर चर्चा करून दीपक कासार यांनी घरी असलेल्या कोरोना बाधितांना रोज पल्स ऑक्स तपासणी व अशा प्रत्येकाच्या थेट घरातच ऑक्सिजण सिलेंडर ही उपलब्ध करून दिले.

प्रतिसाद मिळू लागला

मुस्लीम वस्तीत त्यातच महिलांच्या तपासणी साठी मुस्लीम समाजातीलच  आशा सेविकांना जबाबदारी दिली.  यामुळे घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या स्क्रीनिंगला आधी मिळत नसलेला प्रतिसाद मिळू लागला. आम्ही लेखात इतर आजार बरे करा तरच कोरोनाचे मृत्यू टळतील या सूचनेला अनुसरून कोरोना सहित इतर जोखीम वाढवणाऱ्या आजारांचे स्क्रीनिंग ही कासार यांनी केले.

    मालेगाव मध्ये डॉक्टरांची कमतरता होती. २८३ डॉक्टरांना मालेगाव साठी आदेश निघाले होते. त्यापैकी फक्त ६ डॉक्टर रुजू झाले. मालेगाव मधील स्थानिक डॉक्टरांची नियुक्ती करायची झाल्यास जाहिरात देण्यास लॉकडाऊन मुळे काही मार्ग नव्हता. मग कासार यांनी मजीदींच्या भोंग्यावरून डॉक्टर व आरोग्य कर्मचारी नियुक्तीसाठी जाहिरात द्यायला सुरुवात केली. त्यातून एमबीबीएस सोबतच  आयुर्वेद, होमिओपॅथी व त्यातच मुस्लीम समाजातील युनानी डॉक्टर रुजू होण्यास तयार झाले. डॉक्टरांसह इतर काम करणाऱ्यां बरोबर रोज उत्तम प्रतीची राहण्याची सोय, हवे तसे आणि  हवे ते जेवण आणि  वागणुकीत मान सन्मान, त्यांनी सांगितलेली सूचना लगेच मान्य करणे यामुळे या पहिल्या फळीतील कोरोना योद्ध्यांचा आत्मविश्वास वाढला. इतर अनेक ठिकाणी प्रशासन विरुद्ध डॉक्टर वादाची ठिणगी कासार यांनी मालेगाव मध्ये पडू दिली नाही.

रुग्णांना सकस आहार

 कोविड केअर सेंटर गावा बाहेर असल्याने आम्हाला मुस्लीम समाजाला भीती वाटते आणि  स्त्रियांना अशा ठिकाणी तर आम्ही मुळीच पाठवू शकत नाही असे मत काहींनी  बोलून दाखवले. लगेचच सरकारी लाल फितीचा कारभार बाजूला ठेवून कासार यांनी जागा बदलून गावाच्या मध्य वस्तीतील कॉलेजेस ताब्यात घेतली व तिथे अलगीकरण ( आयसोलेशन ) सोय निर्माण केली. तोच तो रोजचा पोहे , उपमा नाश्ता बंद करून या रुग्णासाठी उच्च प्रथिने युक्त नाश्ता व दिवसाला प्रथिने १ ग्राम प्रतिकिलो गरज पूर्ण होईल असा सकस आहार या रुग्णांना उपलब्ध करून दिला. या साठी रोज सकाळी या रुग्णांचे डान्सिंग योगा वर्ग घेण्याची जबाबदारी डॉ. उज्वल कापडणीस यांनी स्वीकारली. दीपक कासार स्वतः या डान्सिंग योगा वर्गात सामील व्हायचे.

संशय दूर केला

 मालेगाव बदलते आहे डॉ.सचिन जोशी या पवित्र कोरोनाचे अभ्यासक असलेल्या शिक्षणतज्ञांनी समाजाला कुराणाचे दाखले देऊन प्रतिबंधाचे उपाय समजावून सांगितला.  मुस्लीम समाजाचा विश्वास जिंकणे गरजेचे आहे हे आम्ही लेखात नमूद केले होते. त्यासाठी दीपक कासार रोज मौलवींसोबत दुआ मागण्याच्या कार्यक्रमात सामील होऊ लागले. ‘कोरोना ही आमच्या विरोधात साजीश आहे, लॉकडाऊन असताना कोरोना मालेगावात येतोच कसा’ असे गैरसमज कासार यांनी प्रेमाने व समजावून सांगून खोडून काढले. या सगळ्या कामाच्या व्यापात दीपक कासार स्वतः ही कोरोना बाधित झाले. पण सुट्टी न घेता त्यांनी वर्च्यूअल ऑफिस चालू ठेवले. सातव्या दिवशी टेस्ट निगेटिव आल्यावर स्वतःलाच कोरोना मुक्तीचे रोल मॉडेल बनवण्याचे त्यांनी ठरवले. प्रत्येक मोहोल्ल्यात जाऊन त्यांनी मी कोरोना मुक्त झालो, तुम्ही ही पुढे या, प्रशासनाला साथ द्या आणि  कोरोना मुक्त व्हा असे छोट्या बैठकांमध्ये सांगायला सुरुवात केली.

खाजगी डॉक्टरांचे सहकार्य

        मालेगाव बदलते आहे प्रशासनाच्या समंजस दृष्टीकोणामुळे मालेगाव मधील खाजगी डॉक्टरांनीही उत्तम सहकार्य केले.  या दरम्यान रुग्ण वाहिकांचा तीव्र तुटवडा होता. शांतीलाल मुथा यांनी भारतीय जैन संघटने तर्फे  ११ रुग्णवाहिका दिल्या. पण रुग्णवाहिकेच्या सर्व चालकांनी नोकरी सोडून दिली होती. त्यासाठी चालकच भेटेना. मग कासार यांनी उर्दू मध्ये चालक पदासाठी जाहिराती दिल्या आणि  म्हणेल तितका पगार या तत्वावर तातडीने बेरोजगार तरुण चालकांना सेवेत रुजू करून घेतले. कोरोना मृताची संख्या सुरुवातीला खूप होती. म्हणून या मृतदेहांचे पॅकिंग / त्यांना वाहून नेणे यासाठी माणसेच मिळत नसत. त्यासाठी हे काम करणाऱ्यांना पूर्ण  वैयक्तिक सुरक्षेचे कवच, वाढीव मानधन, समुपदेशन करून हा प्रश्न ही सोडवला. या सर्व प्रयत्नांचा परिणाम म्हजे रोज रस्त्याने लागणारी अंत्ययात्रांची आणि  मृतदेहांची रांग कमी होताना दिसू लागली.  

८६० रुग्णसंख्या  ८२ वर

बघित रुग्णसंख्येचा  दुपटीचा काळ ४ दिवसावरून ९४ दिवस झाला . रोजचे ४ मृत्यू हे १ किंवा शून्य वर आले .  बरे होण्याचे प्रमाण ८२ % झाले व ८६० रुग्ण संख्या ८२ वर आली.  लढा अजून पूर्ण संपलेला नसला तरी अंतिम विजय मात्र नजरेच्या टप्प्यात आला आहे. 

सदरील माहिती आपण सकाळ मध्येही वाचू शकता.

कोरोनासाठी तपासण्या करताना

कोरोनासाठी तपासण्या करताना...

कोरोनासाठी तपासण्या करताना कोरोनासाठी सध्या ४ प्रकारच्या तपासण्या अस्तित्वात आहे

आर टी – पीसी आर

कोरोनासाठी तपासण्या करताना सध्या आयसीएमार ने निश्चित निदाना साठी सांगितलेली टेस्ट म्हणजे आर टी – पीसी आर . ही टेस्ट कोरोना विषाणूच्या जनुकीय साहित्याला ओळखून नाक व घशातून घेतलेल्या स्वॅब मध्ये कोरोना सापडतोय का हे सांगते. या साठी स्वॅब फक्त नाकातून घेतल्यास अहवाल पाँजिटीव्ह येण्याची शक्यता ६३ % असते व घशातून घेतल्यास ३२ % असते. म्हणजे उर्वरित रुग्ण पाँजिटीव्ह असले तरी त्यांचा अहवाल निगेटिव येऊ शकतो. म्हणून स्वॅब हा नाक व तोंडातून दोन्ही ठिकाणाहून घेतला गेला पाहिजे म्हणजे पाँजिटीव्ह येण्याची शक्यता वाढते. तो घेत असताना डोळ्यातून पाणी यायला हवे इतका त्रास व्हायला हवा. म्हणजे रिपोर्ट नीट यावा असे वाटत असेल तर स्वॅब घेताना सहकार्य करा व स्वॅब घेणाऱ्याला माझी काळजी न करता तुमच्या पद्धतीने स्वॅब घ्या ही मोकळीक द्या.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

रॅपीड अँटीजीन टेस्ट 

ही नवी तपासणी असून कोरोना ची प्रथिने ओळखून यात विषाणू  निदान केले जाते. आरटी – पीसीआर प्रमाणेच ही टेस्ट ही नाक व घशातील स्वॅब मध्येच केली जाते. या टेस्ट चा फायदा असा आहे कि याचा अहवाल १५  मिनिटात येऊ शकतो. फक्त या टेस्ट ची समस्या अशी आहे कि ती कोरोनाचे निदान करण्याचे प्रमाण  आरटी – पीसीआर पेक्षा कमी आहे. म्हणजे जर या टेस्ट मध्ये रुग्ण पाँजिटीव्ह आला तर नक्कीच तो पाँजिटीव्ह ग्राह्य धरला जाऊ शकतो. पण निगेटिव आला तर एकदा आरटी – पीसीआर करून तो निगेटिवच आहे हे निश्चित करावे लागते.

ट्रुनॅट टेस्ट

अशा प्रकरची तपासणी आधी टी.बी व एच.आय.व्ही साठी वापरली जायची. या तपासणीत ही आरटी – पीसीआर प्रमाणे जनुकीय साहित्य ओळखण्याचे काम केले जाते. फरक इतकाच आहे कि हे काम मशीन द्वारे केले जाते व  मशीन खूप छोटे असते म्हणू ते कुठे ही वाहून नेता येते. तसेच निदानाचा अहवाल अर्ध्या तासात मिळू शकतो.

रॅपीड अँटीबॉडी टेस्ट

कोरोनासाठी तपासण्या करताना या तपासणी मध्ये प्रतिकारशक्ती दर्शवणारे अँटीबॉडी हे घटक मोजले जातात. पण या शरीरात ७ दिवसांनंतर निर्माण होतात. म्हणून या टेस्ट चे निदान करण्यामध्ये काहीही महत्व नाही. या अँटीबॉडी दोन प्रकारच्या असतात आयजी एम सात दिवसांनंतर पाँजिटीव्ह येते व आयजी जी १० ते १४ दिवसांनंतर तयार होते व पुढे अनेक दिवस शरीरात राहते. थोडक्यात आय जी एम पाँजिटीव्ह आल्यास नुकताच संसर्ग झाला आहे व आय जी जी पाँजिटीव्ह आल्यास आधी कधी तरी संसर्ग होऊन गेला आहे एवढेच कळते. ही चाचणी निदाना साठी नसून एखाद्या गावात , भागात , शहरात किती लोक आता संसर्गित झाले आहेत हे स्क्रीनिंग करून पुढील उपाय योजना ठरवण्यासाठी असते. ही चाचणी रक्तातून करता येते.

 इलायजा टेस्ट

 या टेस्ट मध्ये ही रॅपीड अँटीबॉडी टेस्ट सारखे अँटीबॉडीच तपासता येतात. सध्या भारतात फक्त आय जी जी मध्ये आधी होऊन गेलेल्या कोरोना चा संसर्ग तपासण्यासाठीच कीट उपलब्ध आहेत. म्हणून किती लोकसंख्या संसर्गित झाली आहे एवढेच ही तपासणी सांगते.

चाचणी आर. टी. पी. सी.आर रँपिड अँन्टीजीन ट्रुनॅट रँपिड  अँन्टीबॉडी इलायाजा
वापर निदान निदान निदान लोकसंख्येत संसर्गाचे प्रमाण तपासणे लोकसंख्येत संसर्गाचे प्रमाण तपासणे
किती वेळ लागतो २४ ते ४८ तास १५ मिनिटे १ तास ३० मिनिटे १ तास
कशी केली जाते घसा व नाकातील स्वब घसा व नाकातील स्वब घसा व नाकातील स्वब रक्त रक्त
किंमत रु. २८००/- रु. ४५०/- रु.१००० – १५००/- रु.६००/- निश्चित नाही

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.

खोकल्याचे उपचार

खोकल्याचे उपचार

खोकल्याचे उपचार ताप, सर्दी खोकल्यानंतर बाळाचे वजन कमी होऊ शकते व शरीरात विटामिन ‘ए,’ ‘डी’ची कमतरता भासू शकते. त्यासाठी बाळ बरे झाल्यावर त्याला एक वेळा अधिक जेवण व विटामिन ‘ए’, ‘डी’ देणे गरजेचे असते.
सर्दी खोकल्याच्या उपचारासाठी अनेकदा अनावश्यक औषधे वापरली जातात. सर्दी खोकल्याचे उपचार कारणे पाहून करावे लागतात. 

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

व्हायरल ताप, सर्दी खोकला – 
बहुतांश खोकल्याचे रुग्ण हे साध्या सर्दी खोकल्यामुळेच असतात. त्यासाठी 

  • नाकात नॉर्मल सलाईनचे ड्रॉप्स व साधी खोकल्याची औषधे, सोबत ताप असल्यास तो नियंत्रणात आणण्यासाठी पॅरॅसिटॅमॉल वापरले तरी पुरेशी असतात. 
  • थोड्या मोठ्या मुलांनी घसा धरल्यास मिठाच्या पाण्याच्या गुळण्या कराव्यात.
  • खोकल्यासाठी मध व कोमट पाणी एकत्र किंवा वेगळे घेतले जाऊ शकते. 
  • ताप, सर्दी खोकल्यासाठी अँटिबायोटिक्स देण्याची गरज नसते.
  • अशा मुलांना ते खातील तितके अन्न द्यावे, बळजबरी करू नये, मात्र पाणी भरपूर पाजावे.
  • ताप, सर्दी, खोकला असणाऱ्या मुलांना पाण्याची वाफ दिली जाऊ शकते. (रुग्णालयात जाऊन मशीनमधून वाफ देण्याची गरज नसते.) 
  • ताप, सर्दी खोकला आपोआप बरा होणारा व जीवाला धोका नसणारा आजार आहे. तो एक आठवडा चालतोच, म्हणून सतत ताप, सर्दी, खोकला बरा होत नाही म्हणून डॉक्टर बदलत राहू नये. असे केल्याने औषधाचे ब्रँड बदलत राहतील व तणावामध्ये डॉक्टर अँटिबायोटिक्स सुरू करतील. 
  • सर्दी खोकल्याची औषधे लक्षणे पूर्ण नाहीशी करण्यासाठी नव्हे, ती कमी करण्यासाठी असतात.
  • नॉर्मल सलाईन सोडून इतर औषधे असलेल्या नाकांच्या ड्रॉप्समुळे नाक तात्पुरते कोरडे पडते. मात्र, रिबाउंड कंजेशन, म्हणजे परत नाक भरून येण्याची शक्यता असते. 
  • खोकला दाबणारी औषधे (कोडीन, फोलकोडीन, डेक्सट्रोमीथारफान) मुलांना डॉक्टरांच्या परवानगी शिवाय देऊ नयेत. 
  • खोकल्याच्या अनेक औषधात एकाच वेळी, खोकला दाबणारी, खोकला पातळ करणारी आणि खोकला बाहेर काढणारी अशी परस्परविरोधी अॅक्शन असणारे घटक असतात. म्हणून डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय खोकल्याची औषधे देऊ नये. 
  • ताप, सर्दी खोकल्यानंतर बाळाचे वजन कमी होऊ शकते व शरीरात विटामिन ‘ए,’ ‘डी’ची कमतरता भासू शकते. त्यासाठी बाळ बरे झाल्यावर त्याला एक वेळा अधिक जेवण व विटामिन ‘ए’, ‘डी’ देणे गरजेचे असते. 

अॅलर्जीमुळे सर्दी, खोकला – 
खोकल्याचे उपचार यासाठी अँटिअॅलर्जिक, म्हणजे शरीरात अॅलर्जी कमी करणारी औषधे दीर्घकाळासाठी घ्यावी लागतात. यासाठी अॅलर्जी टेस्ट करून काही उपयोग होत नाही. त्यापेक्षा काय खाल्ल्याने सर्दी, खोकला होतो हे आईने निरीक्षण करून ठरवलेले योग्य. बाहेर, धुळीत जाताना मास्कचा वापर केल्यास अलर्जीचा त्रास कमी होतो. 

दमा – 
दम्यासाठी नियमित घ्यायच्या काळजी व्यतिरिक्त दम्याचा अॅटॅक आल्यावर तातडीने घ्यायचे औषध आणि अॅटॅक नसताना घ्यायचे औषध, असे दोन पंप मिळतात. हे पंप त्या-त्या वेळी वापरून दम्याचा खोकला नियंत्रणात येतो. याशिवाय दमा नियंत्रणात आणण्यासाठी दीर्घकालीन घेण्याची काही औषधे असतात. 

सदरील माहिती आपण सकाळ मध्येही वाचू शकता.