COVID-19 नोटा कश्या हाताळायच्या

COVID-19 नोटा कश्या हाताळायच्या

COVID-19 नोटा कश्या हाताळायच्या कोरोना नोटांमुळे पसरतो की नाही या विषयी विवाद असेल तरी जागतिक आरोग्य संघटनेने या विषयी इशारा दिला आहे. कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात येणाऱ्या वस्तू वर काही तास राहते म्हणून नोटांमधून संसर्ग होऊ शकतो. यासाठी काही सोपे मार्ग आहेत. जिथे शक्य आहे तिथे सरळ कॅशलेस व्यवहार करायचा. हे शक्य नसेल आणी नोटा हाताळाव्याच लागल्या तर त्या दुसऱ्या कडून प्लास्टिक च्या एखाद्या छोट्या बॅग मध्ये हात न लावता स्वीकारायचे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

COVID-19 नोटा कश्या हाताळायच्या किराणा व्यापारी, भाजी विक्रेते ज्यांना रोज खूप नोटा हाताळाव्या लागतात त्यांनीस सरळ ग्लोज वापरावे. इतर कमी प्रमाणात रोज ची घरगुती कॅश हाताळणाऱ्यांसाठी एक पर्याय आहे. घरी आल्यावर ग्लोज घालावे, त्यावर असेल तर थोडा हँड सॅनीटायझर घ्यावा. आणि इस्त्री ने नोटांना दोन्ही बाजूने इस्त्री करून घ्यावी. कोरोना विषाणू ५६ डिग्री सेल्सियस च्या वर जिवंत राहत नाही आणि इस्त्रीचे तापमान त्या पेक्षा जास्त असते. नंतर या नोटा घरात कोणीही हाताळल्या तरी काही प्रोब्लेम नाही.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

क्वारंटाइन न समजल्याने घात

क्वारंटाइन न समजल्याने घात कोरोना ची साथ महाराष्ट्रात प्रवेश करून आता २ महिने होऊन गेले तरी अजून साथ शास्रातील, इपिडीमीऑलोजीतील काही मुलभूत व्याख्या धोरण आखणी करणारे शासन, प्रशासन आणि सर्व सामान्य समजून घेण्यास तयार नाही हा वैद्यकीय अज्ञानाचा कळस आहे. या साठी सर्व प्रथम क्वारंटाइनचा इतिहास आणि या शब्दाचा नेमका अर्थ समजून घेऊ. चौदाव्या शतकात प्लेग ची साथ आली व जेव्हा बहुतांश प्रवास हा जहाजाने व्हायचा तेव्हा एका देशातून दुसऱ्या देशात जहाजाने येणाऱ्या प्रवाशांना ४० दिवस वेगळे व एकत्र ठेवून त्यांची राहण्या, जेवणाची सोय केली जायची. ४० ला ग्रीक मध्ये quaranta giorni म्हणतात म्हणून क्वारंटाइन. ४० दिवस का तर प्लेग सह इतर सर्व आजार बाधित व्यक्ती पासून होण्यास किमान १ व कमाल ४० दिवस लागतात म्हणून तो पर्यंत या प्रवाशांपैकी कोणाला लक्षणे आली तर उपचारार्थ पुढे त्याला वेगळे ठेवून उपचार करता यायचे व तसेच इतर देशातील आजार पसरायचे नाही. चौदाव्या शतकात आजारांचे उपचार, औषधे अजून विकसित झालेले नव्हते. म्हणून आजार आपल्या देशात येऊ न देणे हाच मुख्य उपाय होता. पुढे एखाद्या प्रांतात हा आजार झाला तर इतर प्रांता साठी व त्या पुढे गावासाठी ही क्वारंटाइन ही संकल्पना रुजली.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

१८७८ ची यलो फिवर व एकोणिसाव्या शतकातली कोलेरा ची साथ रोखण्यात गांभीर्याने राबवलेल्या क्वारंटाइनचा मोठा वाटा होता. पुढे तर अनेक देशात ही साथ सुरु असे पर्यंत क्वारंटाइनच्या सुरक्षेच्या जबाबदारी साठी पोलिसांची वेगळी तुकडीच निर्माण करण्यात आली. पण चौदाव्या शतकात जे कळले ते आज कोरोना या निश्चित उपचार नसलेल्या व जगभर थैमान घालत असलेल्या आजारा विषयी आपल्याला कळेनासे झाले आहे. इतर देशात जिथे अर्धे देशच्या देश शासकीय क्वारंटाइन मध्ये ठेवून काळजी घेण्यात आली तिथे आधी पासूनच हे आपल्याला शक्यच नाही म्हणून हात टेकले व होम क्वारंटाइन ही संकल्पना आपल्या सोयीसाठी आपण जन्माला घातली. खर तर होम क्वारंटाइन हा शब्दच एक विरोधाभासी शब्द आहे. होम क्वारंटाइन हा शब्द रागीट, शांत गृहस्थ किंवा विवाहित लिव्ह इन जोडपे या सारखा आहे. जो व्यक्ती बाधित देशातून आला आहे त्याला वेगळे ठेवण्यासाठी आपण ” जा तुझ्या घरी तू वेगळा राहा ” असा हातावर शिक्का मारून सार्वजनिक वाहतुकीतून प्रवास करत आपण परत पाठवतो या सारखा दुसरा विनोद या देशाच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या इतिहासात घडणार नाही. क्वारंटाइन न समजल्याने घात झाला आहे बरे होम क्वारंटाइन मध्ये नेमके काय करायचे आहे या विषयी नेमकी माहिती आपण संबंधित व्यक्तीला देतो आहे का ? या व्यक्तीचे घर कशाने पुसायचे हे ही ठरलेले आहे. तरच कदाचित ही होम क्वारंटाइनची संकल्पना काही प्रमाणात यशस्वी होऊ शकली असती. त्या पलीकडे ज्या लोकशाहीला एवढ्या वर्षात शिस्त लागू शकली नाही, तिथे एक स्वस्थ व्यक्ती स्वतःला एका खोलीत चौदा दिवस कोंडून घेईल ही अपेक्षा करणे भाबडेपणाचे आहे. होम क्वारंटाइन पाळला जातोय का यासाठी सिंगापूर सारखी लक्ष ठेवणारी सक्षम व्हिजिलन्स आपल्या कडे आहे का ? मुंबई सारख्या ठिकाणी काही प्रमाणात ती सुरु झाली आहे पण ती ही सदोष आणि जुजबीच आहे. हातावर शिक्का दिसल्यास पोलिसांना फोन करा एवढ्या वर विषय संपायला ही काही रात्री वाजणाऱ्या डी जे एवढी साधी गोष्ट आपल्याला वाटते आहे का? याची परिणीती अशी झाली कि विद्यापीठांचे कुलगुरू, कॉलेजेस चे अधीक्षक,आय.ए.एस अधिकारी अशा शिक्षित उच्चभ्रू लोकांनी कोण कुठला होम क्वारंटाइन म्हणून ही संकल्पना धुडकावून लावली. पुण्यात होम क्वारंटाइनचे शिक्के असलेल्यांनी मुलांचे वाढदिवस गर्दी बोलवून साजरे केले . या पुढे ग्रामीण निम्न शिख्सित लोकांकडून तरी काय अपेक्षा करता येईल ? झाले ही तसेच . सांगली, इस्लामपूर मध्ये तर परदेश व धार्मिक स्थळांवरून आलेल्या काहींनी जेवणावळी दिल्या आणि आज पुणे, मुंबई, नागपूर नंतर सांगली, इस्लामपूर च्या रूपाने कोरोनाची नवी राजधानी निर्माण होताना दिसते आहे.

खरेतर अजून ही वेळ गेलेली नाही. आज घडीला ११ हजार लोकांना होम क्वारंटाइनचे हातावर शिक्के मारून त्यांना घरी सोडून आपण एक प्रकारे कोरोना पसरवण्याचे लायसन्सच दिले आहे क्वारंटाइन न समजल्याने घात झाला आहे . साडेबारा कोटी लोकसंख्येच्या राज्याला ११ हजार लोकांना वेगळे ठेवून त्यांची १४ दिवस व्यवस्था ठेवणे एवढे अवघड आहे का ? खरे तर सव्वाशे कोटीच्या देशात परदेशातून येणाऱ्या सगळ्यांना जानेवारी , फेब्रुवरी महिन्यात शिस्तबद्ध क्वारंटाइन केले असते तर आज आपण जगा पुढे एक उदाहरण घालून दिले असते. पण अजून ही महाराष्ट्राला ही संधी आहे. प्रत्येक जिल्ह्यात १०८ शासकीय कार्यालये, जिल्हा परिषद शाळा, शासकीय विश्राम गृहे, धार्मिक तीर्थ क्षेत्रांचे भक्त निवास अशा किती तरी वास्तू सहज उपलब्ध होतील. यांच्या आहार व्यवस्थेसाठी शासनाकडे पैसे नसतील तर स्वयंसेवी संस्था पुढे येतील. लाखांच्या सभांचे उत्तम नियोजन करणारे राजकीय पक्ष सत्तेत असताना इथे त्यांचे नियोजन कौशल्य का दिसत नाही. एवढ्या मोठ्या राज्यात हे शक्य व प्रॅक्टीकल नाही अशी उत्तरे दिली जात आहेत.

क्वारंटाइन मधील व्यक्तीला कुठली ही लक्षणे नसतात. त्याचा फक्त कोरोना बाधित देशात प्रवास झालेला असतो किंवा सध्या देशातील कोरोना ग्रस्त रुग्णाशी थेट संपर्क आलेला असतो. कोरोना चा संपर्क येऊन त्याचा संसर्ग होतो पण काहीच लक्षणे दिसत नाहीत असा हा कोरोना पसरवणारा छुपा घटक या साखळीत सगळ्यात महत्वाचा असतो. कोरोना ग्रस्तांची संख्या सांखिक पद्धतीने ( exponentially ) म्हणजे एकाचे चार, सोळा, बत्तीस अशी झपाट्याने वाढवण्यासाठी कोरोना पोझीटीव नव्हे तर हा कोरोना असून ही लक्षणे नसल्याने समजून न येणारा घटक जबाबदार असतो. कारण कोरोना निश्चित निदान झालेला आयसोलेशन मध्ये असतो. एकीकडे हा घटक आपण क्वारंटाइन मोडीत काढत समाजात कोरोना पसरवण्यासाठी मोकळे सोडत आहोत तसेच जास्तीत जास्त टेस्ट करून कोरोना बाधित व्यक्तीचा शोध ही आपण घेत नाही आहोत. या पुढे जाऊन कॉन्टॅक्ट म्हणजे थेट संपर्कात आलेले आणि कॉन्टॅक्ट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे या संपर्कात आलेल्यांच्या संपर्कात आलेले अशी सगळी साखळी एक केस सापडल्यावर शोधावी लागते.

आपण मात्र अजून ही कमी टेस्टिंग मुळे कोरोना चे आपले आकडे त्या मानाने कमी आहेत या आनंदात स्वतःची पाठ थोपटून घेत आहोत. हे सर्व कॉन्टॅक्ट शोधण्याची प्रक्रिया करण्यासाठी एक यंत्रणा कार्यरत असायला हवी . ही सगळी प्रक्रिया केवळ पुढील एक महिन्यासाठी राबवायची आहे. सध्या लॉक डाऊन मुळे तशी ती सोपी ही आहे. पण ही यंत्रणेला थकवणारी असल्याने होम क्वारंटाइनची फसवी पळवाट शासनाने स्वीकारलेली दिसते आहे. एक तर शासकीय इमारती आरोग्य खात्याने अधिग्रहीत करून तातडीने होम क्वारंटाइन मोडीत काढून थेट क्वारंटाइन सुरु करावे. किंवा किमान सिंगापूर प्रमाणे होम क्वारंटाइन मध्ये प्रत्येका ला थोड्या थोड्या वेळाने मेसेज करून त्याचे जीपीएस लोकेशन ट्रॅक करणे, त्यांच्या घरी भेटी देऊन ते घरी आहेत का याची चाचपणी करणे व होम क्वारंटाइन चे नियम मोडल्यास स्पेन मध्ये ३०,००० डॉलर चा दंड आहे तसा दंड आकारणे अशा गोष्टी तरी कराव्या. क्वारंटाइन किंवा कडक नियमांचे होम क्वारंटाइन या दोन्ही पैकी काही ही न केल्यास पुढे आपल्या देशाचा एका साथीने कसा घात केला हा इतिहास भावी पिढी साठी तेवढा उरेल.

सदरील माहिती आपण सकाळ मध्येही वाचू शकता

COVID- 19 घर कसे स्वच्छ करावे

COVID -19 घर कसे स्वच्छ करावे ज्यांना क्वारंटाइन चा सल्ला देण्यात आला आहे व सांगितलेला नसला तरी कोरोना चा कॅरीअर असलेली व्यक्ती घरात येऊन गेली किंवा असे सामान घरात आले असेल तर कोरोना चा धोका टाळण्यासाठी घर कसे स्वच्छ करावे हे समजून घेणे गरजेचे आहे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

COVID -19 घर कसे स्वच्छ करावे यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने प्रमाणित केलेली गोष्ट म्हणजे १% सोडियम हायपोक्लोराईट आपण स्वच्छतेसाठी वापरायला हवे. आपल्याला घरगुती ब्लिचिंग सोल्युशन कुठे ही सहज उपलब्ध होऊ शकते. ५% सोडियम हायपोक्लोराईट असते. त्यामुळे हे ब्लिचिंग सोल्युशन १:९ यासोबत स्वच्छ पाण्यासोबत मिसळावे. म्हणजे १ लिटर ब्लिचिंग सोल्युशन घेतले तर ९ लिटर पाणी घ्यावे. हातात साधे प्लास्टिकचे ग्लोज घालावे. स्वच्छ कपडा या पाण्यात बुडवून त्याने घर व इतर समान पुसून घ्यावे. इतर कोणी येत नसेल तर एक दोन तीन दिवसातून एकदा केले तरी चालेल. घर या पाण्याने स्वच्छ करत असताना डोळ्यांना गॉगल किवा चष्मा घालावा कारण या पाण्याने डोळे व त्वचेला त्रास होऊ शकतो. शक्यतो ब्लिचिंग सोल्युशन व पाण्याचे मिश्रण बनवताना ते प्लास्टिक च्या भांड्यात बनवावे .


सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

कोरोना व्हायरसची सविस्तर लक्षणे

कोरोना व्हायरस ची सविस्तर लक्षणे

कोरोना व्हायरसची सविस्तर लक्षणे – कोरोनाची तीव्र ताप, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास हा आपल्याला माहित आहे. पण हा त्रास तीव्र किंवा गंभीर कोरोनाच्या रुग्णालाच होतो. ८५ टक्के लोकांना कोरोना संसर्ग झाला तरी एक तर साधा ताप आणि थोडा खोकला असा सौम्य स्वरुपाची लक्षण दिसतील. त्यातही काहींना असे ही होऊ शकते की काहीच लक्षणे आली नाहीत. म्हणून साधा खोकला, ताप, सर्दी असली तरी आपल्याला इतरांपासून लांब रहायचे आहे हे समजून घ्यावे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

पुढील लक्षणे कोरोना व्हायरसची सविस्तर लक्षणे आहेत . पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी – थोडे थकल्या सारखे वाटेल तिसऱ्या दिवशी – ताप, थोडा खोकला आणि घशात खाजवल्या सारखे वाटणे किंवा खवखवणे. चौथ्या दिवशी – डोकेदुखी पाचव्या दिवशी – पोटाशी निगडीत लक्षणे , पोट दुखी , क्वचित जुलाब , खोकला थोडा वाढेल, ताप तेवढाच राहील किंवा वाढेल. सहाव्या, सातव्या दिवशी – अंगदुखी , थकवा वाढेल, डोकेदुखी कमी होईल, पोटाच्या तक्रारी राहतील, भूक कमी होईल. आठव्या , नवव्या दिवशी – सगळी लक्षणे ताप , अंगदुखी कमी होईल , खोकला मात्र तसाच राहील किंवा वाढू ही शकतो पण आठव्या किंवा नवव्या दिवशी मात्र जर त्रास वाढला किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल तर मात्र इथे उपचारांची किंवा लक्ष ठेवण्याची. तसेच तपासणी करण्याची ही गरज वरील लक्षणांसोबत त्यातच सातव्या दिवशी नंतर किंवा या लक्षणांमध्ये कुठे ही ताप वाढत गेला किंवा खोकला व श्वास घेण्यास त्रास होत असेल तरच आहे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

कलम 144 संसर्ग रोखण्यासाठी काळजी

कलम १४४ संसर्ग रोखण्यासाठी काळजी

कलम 144 संसर्ग रोखण्यासाठी काळजी –

१. जीवनावश्यक वस्तू आणायला बाहेर जाण्यापेक्षा ते १० घरांनी एक यादी करून एकाच प्रतिनिधी ने त्या वस्तू आणाव्या. २. बाहेर जाणाऱ्या व्यक्तीला ताप, सर्दी, खोकला नसावा. ३. बाहेर जाणाऱ्या व्यक्तीने सामान आणायला गेल्यावर १ मीटर पेक्षा जास्त अंतरावरून बोलावे व व्यवहार करावा. ४. नोटा, नाणी, पैसे हे अशा वेळी संसर्गाची महत्वाची वाहन असतात . म्हणून दुकानात पैसे देऊन झाल्यावर लगेचच हात धुवून घ्यावे. ५. परत घरात येताना घरा बाहेरच हात, पाय धुवूनच घरात यावे.

https://www.youtube.com/watch?v=YHBY4FWQTrw
Effective Hand Washing Techniques by Dr. Amol Annadate

६. बाहेर जाल तेव्हा शक्यतो इकडे तिकडे हात अनावश्यक हात लावणे टाळावे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

७. या काळात कुठल्याही औषधाचा साठा करू नये कारण औषधे उपलब्ध राहणार आहेत. ८. बाहेरून आल्यावर आपला मोबाईल स्पिरीट / हँड व कापसाचा वापर करून स्वच्छ करावा. ९. बाहेर जाण्यासाठीचे कपडे शक्यतो वेगळे ठेवावे आणी बाहेर जाऊन आले कि आल्या आल्या पाण्यात थोडा वेळ भिजवून ठेवावे. १०. फक्त जीवनावश्यक सेवा देणाऱ्यांनी व इतर जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठीच बाहेर पडावे, इतर कुठल्या ही कारणाने बाहेर पडू नये. ११. जीवनावश्यक सेवेतील ताप, खोकला असणाऱ्यांनी बाहेर पडू नये. १२. कलम 144 संसर्ग रोखण्यासाठी काळजी आपल्या सोसायटीत किंवा शेजारी कोणी एकटे वृध्द व्यक्ती राहात असतील व त्यांच्या कडे येणारे स्वयंपाकी व इतर सेवा देणारे येणार नसतील तर त्यांची काळजी घ्या व त्यांना तब्येतीचा त्रास असल्यास मदत करा.

Watch Amol Annadate Interviews on CoronaVirus Prevention and Care

https://www.youtube.com/playlist?list=PL9bO6h-fFoNgMdrfWBGtXtP0uLD3KC5yl
Amol Annadate’s videos on CORONAVIRUS Disease in India COVID-19

हात धुण्याचे नियम

हात धुण्याचे नियम

हात धुण्याचे नियम सध्या हात धुणे हे कोरोना टाळण्यासाठी सगळ्यात महत्वाचे आहे. वारंवार हात धुवावे म्हणजे नेमके किती वेळा धुवावे व कसे धुवावे हे समजून घेतले पाहिजे. हात धुण्यासाठी साबण आणि पाणी पुरेसे आहे. त्यासाठी हँड सॅनीटायझर किंवा अल्कोहोल बेस्ड सॅनीटायझरची मुळीच गरज नाही.

त्यातच लिक्विड सोप असल्यास बरे पण नसल्यास साधा साबण ही पुरे. याउलट असे काही विषाणू आहेत जे साबण आणि पाण्याने प्रभावी पणे हातावर निष्प्रभ होतात पण सॅनीटायझरने होत नाहीत. हात कसे धुवावे यासाठी आदर्श ७ स्टेप्स आहेत. त्या नेमक्या काय आहेत हे खाली क्युआर कोड स्कॅन करून व्हिडीओ मध्ये बघता येतील. या सगळ्या स्टेप्स पूर्ण करायला किमान १ मिनिट लागायला हवा. हात धुताना प्रत्येक वेळेला ते एकमेकांवर घासले जाणे महत्वाचे असते. शक्य असल्यास हात धुवून झाल्यावर नळ त्याच धुतलेल्या हाताने नव्हे तर कोपराने बंद करावा. हात धुतल्यावर तो स्वच्छ नॅपकीन ला पुसावा. घरात प्रत्येकाचा शक्यतो वेगळा छोटा नॅपकीन ठेवावा. रोज तो गरम पाण्यात ठेवून, पिळून वळवायला ठेवावा.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

हात धुण्याचे नियम समजून घेणे महत्वाचे आहे हात बाहेर जाऊन आले तेव्हा, घरात एखादी नवीन व्यक्ती येऊन गेली असल्यास, जेवणा आधी व शौचानंतर धुवायचे आहेत. अगदी घरात असताना दर अर्ध्या एक तासाला हात धुण्याचीही गरज नाही. तसेच हात धुवून झाल्यावर जिथे शक्य आहे तिथे हाता ऐवजी कोपराचा वापर करावा, उदाहरणार्थ दरवाजा ढकलणे, लाईट चालू , बंद करणे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

मास्क हँकरचीप यांचा गोंधळ

मास्क हँकरचीप यांचा गोंधळ

मास्क हँकरचीप यांचा गोंधळ अजून तरी मास्क हा ज्यांना काही त्रास नाही त्यांना वापरण्याची गरज नाही. मास्कचा वापर हा सर्वसाधारणपणे नॉर्मल व्यक्तीला काही होऊ नये म्हणून नाही तर आजारी व्यक्ती कडून इतरांना संसर्ग होऊ नये म्हणून आहे. मास्क फक्त खालील लोकांनीच वापरायचा आहे


– जे कोरोना पाॅजिटिव्ह आहेत. – जे अशा निदान निश्चित झालेल्यांच्या संपर्कात आले आहेत व ज्यांना होम क्वारंटाइन चा सल्ला दिला आहे.- ज्यांना सर्दी खोकला आहे. – अशा रुग्णांचे उपचार करणारे व त्यांच्या संपर्कात असणारे डॉक्टर व पॅरामेडिकल स्टाफ अशा मास्कची गरज असणाऱ्यांना घालताना त्याच्या बाजूला दोरीने धरून घालावा व काढताना मध्ये हात न लावता काढावा. घातलेला मास्क काढल्यावर इतरत्र कुठे ही टाकू नये व मुलांनी त्याला हात लावू नये याची काळजी घ्यावी. मास्क दर ६ ते ८ तासांनी बदलला पाहिजे. त्यानंतर मास्क ब्लिचिंग सोल्युशन मध्ये थोडा वेळ ठेवून थोड्या वेळाने जाळावा किंवा पुरावा.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा


सध्या मास्क हँकरचीप यांचा गोंधळ सुरु आहे बाजारात उपलब्ध असलेले कॉटन चे मास्क, साधे मास्क व तोंडाला लावलेला हातरुमाल हा काहीही उपयोगाचा नाही. जो मास्क तीन पदरांचा म्हणजे तीन लेयर्स चा असतो तोच उपयोगाचा असतो. सध्या रस्त्यावर एक पदरी मास्क विकले जाऊन खूप लोकांची फसवणूक होते आहे. हे मास्क विकत घेऊ नये. बरेच जन कपड्याचे मास्क वापरून ते रोज धुऊन वापरत आहेत. हे चुकीचे आहे व उपयोगाचे नाही. – अनेक जन एन ९५ मास्क मिळवण्यासाठी ही धडपडत आहेत. पण हा फक्त डॉक्टर व पॅरामेडिकल स्टाफ साठीच गरजेचा आहे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

होम क्वारंटाइन म्हणजे काय

होम क्वारंटाइन म्हणजे नेमके काय

होम क्वारंटाइन म्हणजे नेमके काय? कोरोना व्हायरस च्या साथीमध्ये सध्या अनेकांना होम क्वारंटाइन सांगून ही ते दिलेल्या सूचनांचे पालन करत नाहीत. ज्यांना हा सल्ला दिला आहे त्यांनी होम क्वारंटाइन म्हणजे नेमके काय हे समजून घेण्यासाठी पुढील गोष्टी करायच्या आहेत.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

– शक्यतो वेगळी शौचालयाची सोय असलेल्या आणि वाऱ्याचे चांगले सर्क्युलेशन असलेल्या रूममध्ये राहणे व कुटुंबातील इतर सदस्यांना न भेटणे. – इतर सदस्यांना त्याच खोलीत राहणे आवश्यक असल्यास त्यांच्या पासून १ मीटर पेक्षा जास्त अंतर ठेवणे व त्यांना स्पर्श न करणे. – होम क्वारंटाइन मध्ये असेलेल्या व्यक्तीचे जेवणाचे भांडे, कपडे वेगळे ठेवणे व वेगळे धुणे. – ६० वर्षा पेक्षा जास्त वय, कुठल्याही वयाची मधुमेह, डायबेटीस चे रुग्ण, लहान मुले, गरोदर माता यांच्याशी या व्यक्तीचा थेट संपर्क यायला नकोच. – घराचा उंबरठा हा १४ दिवस ओलांडायचा नाही. – कुठे ही हात लागल्यास लिक्विड सोप / साबण व पाण्याने हात धुवावे. – पूर्णवेळ मास्क वापरावा व तो दर ६ तासाने बदलावा. जुना मास्क ५ % ब्लिचिंग सोल्युशन मध्ये टाकून नंतर जाळावा किंवा जमिनीखाली पुरावा. मास्क जळताना काळजी घ्यावी. – ताप, खोकला अशी कुठलीही लक्षणे दिसल्यास सरकारी यंत्रणेशी संपर्क करावा. – होम क्वारंटाइन मध्ये असलेल्या व्यक्तीला जेवण देणे किंवा इतर गोष्टी देण्याची जबाबदारी एकाच व्यक्तीने पार पाडावी. – या व्यक्तीला जेवण किंवा इतर गोष्टी देणाऱ्या व्यक्तीने मास्क, ग्लोज घालावे. – या घरात शक्यतो एकाही बाहेरच्या व्यक्तीला येऊ देऊ नये.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

कोरोना व्हायरस विरोधात चाबूक हातात घेण्याची वेळ

कोरोना विरोधात चाबूक हातात घेण्याची वेळ

कोरोना व्हायरस विरोधात चाबूक हातात घेण्याची वेळ आता आलीये.

मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोना साथीच्या नियोजनाविषयी व उपाययोजनांविषयी डॉ. अमोल अन्नदाते यांचे दै. लोकमत मधील खुले मा. मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांच्यापर्यंत पोहचण्यासाठी कृपया ते पत्र जास्तीत जास्त शेअर करा.

प्रती,
माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि
आरोग्यमंत्री राजेश टोपे,

कोरोना विरोधात चाबूक हातात घेण्याची वेळ ती हीच!

राज्यातील कोरोना व्हायरस बाधितांची व मृतांची संख्या वाढत असताना आता २६/११ च्या हल्ल्या प्रमाणे ही स्थिती आहे. त्यासाठी आपण दोघे प्रयत्नशील आहातच. पण तरीही कोरोनाला सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील आम्ही अनेक वर्षे शिकत, वैद्यकीय अभ्यासक्रमात वाचत आलेल्या गोष्टी ग्रास रूटला तशा राबवलेल्या दिसत नाहीत. त्यामुळे या गोष्टी आपल्या पर्यंत पोहोचवून त्यावर एका दिवसाचा ही विलंब न होता अमलबजावणी झाली तरच आपण येत्या दोन आठवड्यात या साथीच्या तिसऱ्या स्टेजला रोखू शकतो. नंतर जर ग्रामीण भागात ही साथ पसरली तर मोठा अनर्थ होऊ शकतो. तसेच या वेळी आंतरराष्ट्रीय पातळीवर कोरोना व्हायरस विरोधात लढण्यासाठी चीन, कोरिया, सिंगापूर मॉडेल चा अभ्यास करून यातील प्रत्येकाच्या चांगल्या उपायांची गोळाबेरीज महाराष्ट्रात होताना दिसत नाही.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

सध्या केस ट्रेसिंग, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, आयसोलेशन व क्वारंटाइन या चार शब्दांभोवती सगळी यंत्रणा प्रत्येक मिनिटा गणिक हलली पाहिजे. पण असे कुठे ही होताना दिसत नाही. आयसोलेशन कक्षांची संख्या अजून ही खूप कमी आहे. तालुका पातळीवरून रुग्ण सापडल्यास तो नेमका कसा व कोणी जिल्ह्याच्या ठिकाणी घेऊन जायचा याचे कुठले ही नियोजन अजून दिसत नाही. कुठल्या ही वयक्तिक सुरक्षेच्या साधना शिवाय रुग्ण नेणाऱ्या ड्रायव्हरलाच लागण झाल्याची उदाहरण समोर आहे. संशयित रुग्णाला प्रवास करत नेणेही मोठे जोखमीचे ठरणार आहे. म्हणून प्रत्येक तालुक्याला एक आयसोलेशन कक्ष तातडीने उभा करावा लागणार आहे. आयसोलेश साठी १०० खाटा तयार आहेत या गोष्टींना काही अर्थ नाही. फक्त आयसोलेशन कक्ष असे कुठल्या ही कक्षाला पाटी लावून तो तयार होणार नाही. हा कक्ष कसा असला पाहिजे व यातील ७ महत्वाची मार्गदर्शक तत्वे कुठली याचा अभ्यास होऊन त्या होत आहेत की नाही याचे व्हिडीओ प्रुफ मुख्य सचिव, मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री यांनी रोज तपासले तरच यंत्रणा हलेल. ग्रामीण भागात रुग्ण स्वतः उपजिल्हा रुग्णालयात कोरोना पॉजिटिव्ह व रुग्णाशी संपर्क आल्याचे सांगून ही त्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्याची चिठ्ठी देऊन पाठवले जात आहे. अजूनही परदेशी प्रवाशांचे वर्गीकरण व स्क्रिनिंग बाबत गोंधळ सुरूच आहे. अशाने परदेशातून येणाऱ्या इंडेक्स केसेस कशा रोखल्या जाणार. तसेच यांच्या बॅग्स चे निर्जंतुकीकरणही अजूनही विमानतळावर होत नाही. औरंगाबाद ला एका रशियन प्राध्यापिका कोरोना पॉजिटिव्ह असल्याचे समजून ही तिने दिवसभर परीक्षा घेतलेल्या विद्यार्थ्यांना काही तास एकत्र ठेवून, त्यातील तीन चार जणांचे स्वॅब घेऊन या विद्यार्थ्यांना सोडून देण्यात आले. अशी अनेक अनागोंदीचे प्रकार रोज घडत आहेत.मुळात होम क्वारंटाइन हा शब्द आपला सर्वांचा मोठा घात करणार आहे हे समजून घेतले पाहिजे. हातावर शिक्के मारून लोक स्वतःच्या घरी स्वयंप्रेरणेने एका खोलीत १४ दिवस राहतील हे अशक्य आहे. म्हणून आताच्या घडीला क्वारंटाइन साठी मुंबईत ओसाड व रिकामी असलेली सर्व कामगार हॉस्पिटल, सर्व शासकीय गेस्ट हाउस, ग्रामीण भागातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, गरज असल्यास खाजगी दवाखाने व अगदी या पुढे जाऊन मुंबईतील ७२००० रिकामे फ्लॅट, या पलीकडे जाऊन इतर भागातील हॉटेल्स अशी एक क्वारंटाइन साठी मोठी व्यवस्था आपण निर्माण केली व अति सूक्ष्म नियोजन करून प्रत्येक केसच्या संपर्कात आलेल्यांना १४ दिवस क्वारंटाइन केले तरच या घडीला केसेस व मृतांची संख्या कमी होईल. हे आपल्याला फार काळ नाही तर फक्त पुढील दोनच आठवडे करायचे आहे. मुख्यमंत्री येतात तेव्हा रात्रीतून रस्ते आणी हेलीपॅड तयार होतात मग या सुविधा यंत्रणेने मनावर घेतले तर या कुठल्या ही विलंबा शिवाय का उभ्या राहू शकत नाहीत. यात कुठे ही चीनने १० दिवसात ४५०० खाटांचे रुग्णालय बांधले तसे करायचे नाही तर शासनाच्याच तयार वास्तूंमध्ये नियोजन करून त्या कार्यरत करायच्या आहेत.

पण आदरणीय मुख्यमंत्री साहेब, कोरोना व्हायरस विरोधात चाबूक हातात घेण्याची वेळ आली आहे , केरळ या राज्याने प्रत्येक पॉजिटिव्ह रुग्णाच्या दर तासाच्या प्रवासाचे मॅपींग केले व सर्व संपर्कात आलेल्यांची पूर्ण माहिती मिळवली. हीच तत्परता आपल्याकडे आणावी लागणार आहे. होम क्वारंटाइन सध्या तरी अपयशी होताना दिसत असले तरी ते करयचे असल्यास फक्त हातावर शिक्के मारून त्यांना घरी सोडून हे साध्य होणार नाही. त्यांना यंत्रणेने घरी सोडून त्यांच्यावर जीपीएस द्वारे निगराणी ठेवण्यासाठी गृह विभागाची यंत्रणा कामाला लावावी लागेल. यासाठी सिंगापूर मॉडेलचा अभ्यास करून त्याची पूर्ण नक्कल केली तरी यश येईल. २८ फेब्रुवारी रोजी लॅन्सॅटने लक्षणांनंतर जितक्या लवकर आयसोलेश व तातडीने संपर्कात आलेल्यांचे क्वारंटाइन तितके प्रभावी साथ नियंत्रण हे इतर देशांच्या अनुभवा वरून सांगितले आहे. दक्षिण कोरियाने जास्तीत संशयितांच्या तपासण्या व युध्द पातळीवर आदर्श व्यवस्थेत आयसोलेशन, क्वारंटाइनकवर ( होम क्वारंटाइन नाही ) हे प्रारूप राबवले व साथ नियंत्रित करून मृत्यू दर ०.२ टक्के इतका कमी ठेवला.

आताच्या घडीला ही साथ पसरण्याचे A,B,C,D चेन समजली तर सगळ्या उपाय योजनांचे नियोजन सोपे जाईल पण हे आपण दोघां पर्यंत कदाचित पोचतच नाही आहे. म्हणून प्राधान्य कशाला द्यावे या विषयी सर्व यंत्रणेचा गोंधळ उडालेला आहे. आपण जाहीर केलेले कोरोना साथीचे ४५ कोटी अजून पोहोचलेलेच नाही. त्याचा खर्च कसा करायचा याचे कुठले ही सूक्ष्म नियोजन जिल्हा पातळीवर झालेले नाही. उपजिल्हा रुग्णालयांना दीड दोन लाखांपर्यंत हवी ती खरेदी करा असे संदेश केवळ पोहोचले आहेत . यात त्याच त्या सर्वसामन्यांच्या सूचनांचे बोर्ड लावण्यात हा निधी वाया जाण्याची दाट शक्यता आहे. केस ट्रेसिंग व कॉन्टॅक्ट ट्रेसिंग कसे करायचे याचे प्रशिक्षण अजून नाही, आशा सेविका, हेल्थ वर्कर्सला आपली काय भूमिका असेल या बाबत काहीही माहिती नाही. सरकारी रुग्णालयात डॉक्टरांना रुग्ण तपासताना वापरायचे पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट पोहोचण्याची अजून लक्षणे दिसत नाहीत.

लोकसंख्येच्या प्रमाणात व सर्वाधिक केसेस असून ही आपल्या राज्याची टेस्टिंग क्षमता खूप कमी आहे. तसेच टेस्टिंग साठी परदेश प्रवास व कोविड पॉजिटिव्ह शी संपर्क एवढा मर्यादित निकष ठेऊन आता चालणार नाही व तो विस्तारीत करावा लागणार आहे. टेस्टिंग सेन्टर्स वाढवणे हे केंद्राच्या अखत्यारीत असले तरी सर्वाधिक केसेस असल्याचे कारण सांगत केंद्राला टेस्टिंग सेन्टर्स साठी सतत तगादा करून एका आठवडा थांबणे ही या घडीला संकटात भर घालणारे ठरणार आहे. पॉजिटिव्ह रुग्ण व गंभीर रुग्णांसाठी उद्या वेन्टीलेटर्स चा ही मोठा तुटवडा जाणवणार आहे. तसेच सध्या दाखल असलेल्या पॉजिटिव्ह रुग्णांवर इतर देशात नेमके काय उपचार केले जात आहेत ही माहिती घेऊन त्या प्रमाणे उपचारात कुठलेही अपग्रेडेशन दिसत नाही. क्लोरोक्वीन, जिंक, हाय डोस विटामिन सी सारखे उपचार परदेशात यशस्वी होताना दिसत आहेत व आपल्या पेक्षा मोठ्या संकटात असून ही ते उत्तम पुरावे व उपचाराच्या आधारा साठी डेटा जगाला देताना दिसत आहेत. आपल्या यंत्रणेला मात्र याचे कुठले ही सोयरसुतक नाही.

पॉजिटिव्ह शी संपर्क एवढा मर्यादित निकष ठेऊन आता चालणार नाही व तो विस्तारीत करावा लागणार आहे. टेस्टिंग सेन्टर्स वाढवणे हे केंद्राच्या अखत्यारीत असले तरी सर्वाधिक केसेस असल्याचे कारण सांगत केंद्राला टेस्टिंग सेन्टर्स साठी सतत तगादा करून एका आठवडा थांबणे ही या घडीला संकटात भर घालणारे ठरणार आहे. पॉजिटिव्ह रुग्ण व गंभीर रुग्णांसाठी उद्या वेन्टीलेटर्स चा ही मोठा तुटवडा जाणवणार आहे. तसेच सध्या दाखल असलेल्या पॉजिटिव्ह रुग्णांवर इतर देशात नेमके काय उपचार केले जात आहेत ही माहिती घेऊन त्या प्रमाणे उपचारात कुठलेही अपग्रेडेशन दिसत नाही. क्लोरोक्वीन, जिंक, हाय डोस विटामिन सी सारखे उपचार परदेशात यशस्वी होताना दिसत आहेत व आपल्या पेक्षा मोठ्या संकटात असून ही ते उत्तम पुरावे व उपचाराच्या आधारा साठी डेटा जगाला देताना दिसत आहेत. आपल्या यंत्रणेला मात्र याचे कुठले ही सोयरसुतक नाही.

निवडणुकीच्या प्रचारात जसे घरो घरी जाऊन प्रचार होतो त्या पद्धतीने केसेस शोधणे व सरकार स्थापने साठी गतीने हालचाली होतात तशाच आयसोलेशन व क्वारंटाइन ची सोय उभारणे या क्षणाला गरजेचे आहे. आपण प्रयत्न करतच आहात व छत्रपती शिवाजींचे मावळे म्हणत आपण सगळ्यांचे मनोबल ही वाढवले. पण आदरणीय मुख्यमंत्री, शिवाजी महाराजांप्रमाणे आता मावळ्यांना वाचवण्यासाठी आपणच तलवार उपसून कोरोना व्हायरस विरोधात, या युद्धात उतरून सूक्ष्म नियोजन करण्याची ही वेळ आहे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

सोशल डीस्टन्सिंग म्हणजे नेमके काय?

सोशल डीस्टन्सिंग म्हणजे नेमके काय

सोशल डीस्टन्सिंग म्हणजे नेमके काय? सध्या आपण कोरोनाच्या स्टेज २ मध्ये म्हणजे जिथे एका व्यक्ती कडून दुसऱ्या व्यक्तीला संसर्ग होतो अशा स्टेज मध्ये आहोत. या घडीला आपल्याला स्टेज ३ मध्ये जायचे नसेल तर सोशल डीस्टन्सिंग म्हणजे काय हे समजून ती पार पाडणे समाज म्हणून आपली सगळ्यांची जबाबदारी आहे.

सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे गरज नसताना घराबाहेर न जाणे आणि उगीचच प्रवास न करणे. जर कामावर जायचे असेल तर ठीक आहे पण मौज म्हणून बागेत, हॉटेल मध्ये जायचे नाही. बाहेर जायचे असल्यास अगदीच गरजेचे आहे आणि तेव्हा ही एखाद्याच व्यक्तीने बाहेर जाणे. शक्यतो २० पेक्षा जास्त लोक एका खोलीत एकत्र येणार नाहीत याची काळजी घेणे. मोठे समारंभ, कार्यक्रम हे टाळावे व शक्यतो आयोजन केले असल्यास रद्द करावे. येत्या दोन आठवड्यात पाहुणे म्हणून कोणाकडे जाऊ नका आणि कोणी पाहुणे उगीचच येणार असतील तर त्यांना प्रेमाने नकार देत सध्या सोशल डीस्टन्सिंगचे महत्व समजावून सांगा.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

बाहेर जाण्याची गरज पडल्यास इतरांपासून १ मीटर पेक्षा जास्त अंतर राखा. घरात वावरताना ही शक्यतो एकमेकांपासून १ मीटर पेक्षा जास्त अंतर ठेवा. हात मिळवण्याऐवजी नमस्कार करावा. लिफ्ट मध्ये किंवा इतरत्र एकमेकांकडे तोंड करून उभे राहण्यापेक्षा एकमेकांकडे पाठ करून उभे राहावे. या काळात आपण काय करू शकता तर सकाळी मोकळ्या हवेत चालण्याचा व्यायाम करण्यासाठी जाऊ शकता. किंवा घराच्या छतावर फिरायला जाऊ शकता.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता