नियमित बीसीजी सोडून घाई नको

नियमित बीसीजी सोडून घाई नको

नियमित बीसीजी सोडून घाई नको ज्या देशांमध्ये सार्वत्रिक बी.सी.जी लसीकरण अनेक वर्षांपासून केले गेले त्या देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव इतर देशांच्या मानाने कमी प्रमाणात झाला असे एक निरीक्षण आहे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

नियमित बीसीजी सोडून घाई नको बीसीजी शरीरातील इनेट इम्युनिटी म्हणजे प्रतिकारशक्ती बळकट करते व कोरोना टाळण्यास व झाला तरी शरीराला त्या विरुद्ध लढण्यास सक्षम बनवते  असा एक कयास आहे. त्यातूनच आरोग्य क्षेत्रात काम करणारे व कोरोनाचा थेट संपर्क आलेल्यांना बीसीजी लस द्यावी का असा एक विचार जगभरात पुढे आला. पण लॅन्सेट या वैद्यकीय मासिकात ३० एप्रिल रोजी कोरोना टाळण्यासाठी आरोग्य कर्मचारी व इतरांना बीसीजी देण्याविषयी सतर्कतेचा इशारा दिला. तसेच या बद्दल अजून पुरेसा संशोधनात्मक पुरावा नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे. हे जाणून घेणे महत्वाचे यासाठी आहे कि माध्यमांमध्ये बीसीजी मुळे कोरोना टाळण्यास मदत होऊ शकण्याची शक्यता वर्तवणाऱ्या बातमी आल्या असल्याने अनेक जन आम्ही ही लस परत घ्यावी का ? असे प्रश्न डॉक्टरांना विचारत आहेत. याचे उत्तर ‘नाही’ असेच आहे. नियमित बीसीजी सोडून घाई नको लहान मुलांना ही जन्माच्या वेळी लस दिलेलीच असते. त्यांना ही लस परत ज्ञाची गरज नाही. कोरोना टाळण्यासाठी जर बीसीजीने  काही फायदा व्हायचा असेलच तर तो जन्माच्या वेळी आपण सगळ्यांनी घेतलेल्या बीसीजीनेच होईल.  १९७८ पासून देशात सार्वत्रिक बीसीजी लसीकरण सुरु झाले. म्हणून त्या आधी जन्म झालेल्यांनी बीसीजी घेण्याची घाई करू नये. मात्र सध्या जन्मानंतर लहान मुलांना नियमित बीसीजी लसीकरण मात्र सुरु ठेवावे. सिद्ध झालेले नसताना उगीचच बीसीजी घेतल्याने त्याचा उपयोग होणार नाहीच व तुटवडा निर्माण होऊन नियमित लसीकरणासाठी बीसीजी उपलब्ध होणार नाही.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

कुठले हँड सॅनिटायझर सर्वोत्तम

कुठले हँड सॅनिटायझर सर्वोत्तम

कुठले हँड सॅनिटायझर सर्वोत्तम सध्या अनेक कंपन्यांचे हँड सॅनीटायझर उपलब्ध आहेत. तसेच जाहिरातीतून ९९.९ % हातावरील विषाणू व जीवाणू नष्ट करत असल्याचे दावे हे केले जात आहेत. पण इतक्या अचूकतेने असे दावे करणे चुकीचे आहे व कुठले ही सॅनिटायझर ९९ % विषाणू, जीवाणू नष्ट करेल हे खात्रीशीर रित्या सांगता येणार नाही. यासाठी साबणाने हात धुणे याला पर्याय नाही व हँड सॅनिटायझर ही केवळ एक लग्झरीआहे. सांगण्याचे तात्पर्य साबणाने हात धुण्याची जागा हँड सॅनिटायझर र घेऊ शकत नाही. पण पाण्याची उपलब्धता व बाहेर गेल्यावर हात धुण्याची सोय नसल्यास हँड सॅनिटायझर चांगला पर्याय ठरतो. बाजारात उपलब्ध असलेल्या पैकी चांगला हँड सॅनिटायझर कुठला हे आपल्याला ओळखता आले पाहिजे .

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

       कुठले हँड सॅनिटायझर सर्वोत्तम अल्कोहोल हा हँड सॅनिटायझरचा मुख्य घटक असतो. पण कुठले व किती टक्के अल्कोहोल वापरेल आहे त्यावरून हँड सॅनिटायझरची उपयुक्तता सिध्द होते. साधारण तीन ते चार प्रकारचे व टक्केवारी मध्ये अल्कोहोल वापरेल जाते. प्रोपेनेलॉल, डी नेचर्ड अल्कोहोल, इथिल अल्कोहोल, आयसो प्रोपील अल्कोहोल हे ते चार प्रकारचे अल्कोहोल असतात. त्यांची परीणामकारकता वरील नावे लिहिली आहेत  क्रमाने जास्त ते कमी अशी असते. यात ७५ % प्रोपेनेलॉल असलेले सर्वाधिक परिणामकारक असते. हे कोरोना साठीच नव्हे तर इतर सर्व विषाणू – जीवाणूला हा क्रम लागू पडतो. ज्या हँड सॅनिटायझर मध्ये प्रोपेनेलॉल सोबत मेसेट्रोनियम इथिल सल्फेट असते त्याची परिणाम कारकता सर्वाधिक वेळ म्हणजे ३ ते ५ तास टिकून राहते. सर्वात परिणामकारक हँड सॅनिटायझर वापरला तरी त्याचा परिणाम ४ ते ६ तासच राहतो. सध्या उपलब्ध असलेल्या जेल आणि पातळ हँड सॅनिटायझर पैकी पातळ हँड सॅनिटायझर जास्त परिणामकारक असतो कारण तो हातांच्या सूक्ष्म भेगां पर्यंत पोहोचू शकतो. जेलच्या स्वरूपातला मात्र त्वचेच्या खोलवर पोहोचू शकत नाही व वरच्या भागावरच थर बनून राहतो. अनेकांना जास्त हँड सॅनिटायझरच्या वापरामुळे जास्त झोप येणे / गुंगल्या सारखे वाटणे हा त्रास होतो आहे. त्यातच डॉक्टरांना सध्या हँड सॅनिटायझर जास्त प्रमाणात वापरावे लागते. त्यासाठी हातावर हँड सॅनिटायझरचा घेताना एका बाजूला म्हणजे सॅनिटायझर समोर चेहरा येणार नाही असे बघाव.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

हात ऐवजी कोपराचा आणि करंगळीचा वापर करा

हात ऐवजी कोपराचा आणि करंगळीचा वापर करा

हात ऐवजी कोपराचा आणि करंगळीचा वापर करा मऊ लागले म्हणून कोपराने खणणे किंवा कोपरा पासून नमस्कार करणे म्हणी आपण नेहमी ऐकत आलो आहोत. पण कोरोनामुळे मात्र आता आपल्याला कोपराचा वापर अनिवार्य झाला आहे. जिथे जिथे शक्य आहे तिथे कोपराचा वापर करणे सुरु करावे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

हात ऐवजी कोपराचा आणि करंगळीचा वापर करा हात हे कोरोना आपल्या शरीरात प्रवेश करण्याचे मुख्य वाहन आहे. कोरोना फक्त कोरोना ग्रस्त व्यक्तीच्या संपर्कानेच येतो असे नाही. अनेक वस्तूंवर कोरोना तीन दिवसांपर्यंत राहतो. पुढील तीन दिवसात कोरोना ग्रस्त माणसाच्या संपर्कात आलेल्या वस्तूने ही हा पसरू शकतो. पण याला आपला हात लागला नाही तर धोका नाही. म्हणून दार उघडणे, लाईट चालू / बंद करणे, लिफ्ट चे बटन दाबणे, नळ चालू करण्यासाठी त्यातच शौचालयाचा नळ चालू / बंद करण्यासाठी , खुर्ची सरकवणे, टेबला वरील एखादी गोष्ट सरकवणे, फ्रीज उघडणे / बंद करणे  यासाठी  कोपराचा वापर केला जाऊ शकतो. याशिवाय दिवसभर निरीक्षण करून जिथे जथे कोपराचा वापर करणे शक्य आहे तिथे करणे सुरु करावे. घरी आल्यावर किंवा दिवसातून तीन चार वेळा वाइप्स वर हँड सॅनीटायझर टाकून, त्याने कोपरा स्वच्छ करून घ्यावा. कोपरा प्रमाणेच करंगळी आणि त्यातच जो हात आपण सहसा वापरत नाही त्या करंगळीचा वापर करायला शिकव. आपल्या नॉन – डॉमिनंट ( जो जास्त वापरात येत नाही असा ) हाताची करंगळी आणी चेहऱ्याचा सगळ्यात कमी संपर्क येतो. त्यामुळे दार दांड्याला पूर्ण हात लावून ओढ्ण्यापेक्षा जास्त वापरत नसलेल्या  करंगळीने ओढा. तसेच फोन ची बटनेची बटने दाबण्यासाठी  किंवा कोपराने चालू बंद करणे शक्य नाही अशी उंची वरची बटने या करंगळी ने दाबा. याने कुठे हात लागला तरी त्याचा चेहऱ्याशी संपर्क येणार नाही. वापरात नसलेल्या हाताची करंगळी वापरल्याने अजून एक फायदा होईल. याने तुमचा वापरात असलेल्या हाताच्या बाजूचा मेंदू सक्रिय होईल व याचे मानसिक पातळीवर फायदे असतात.  अर्थात कुठून ही आल्यावर आणि हात लागल्यावर हात मात्र पूर्ण धुवावे. हात ऐवजी कोपराचा आणि करंगळीचा वापर करा आपल्या नॉन – डॉमिनंट ( जो जास्त वापरात येत नाही असा ) हाताची करंगळी आणी चेहऱ्याचा सगळ्यात कमी संपर्क येतो. त्यामुळे दार दांड्याला पूर्ण हात लावून ओढ्ण्यापेक्षा जास्त वापरत नसलेल्या  करंगळीने ओढा. तसेच फोन ची बटनेची बटने दाबण्यासाठी  किंवा कोपराने चालू बंद करणे शक्य नाही अशी उंची वरची बटने या करंगळी ने दाबा. याने कुठे हात लागला तरी त्याचा चेहऱ्याशी संपर्क येणार नाही. वापरात नसलेल्या हाताची करंगळी वापरल्याने अजून एक फायदा होईल. याने तुमचा वापरात असलेल्या हाताच्या बाजूचा मेंदू सक्रिय होईल व याचे मानसिक पातळीवर फायदे असतात.  अर्थात कुठून ही आल्यावर आणि हात लागल्यावर हात मात्र पूर्ण धुवावे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

कोरोनामध्ये मुलांचे भावनिक व्यवस्थापन

कोरोनामध्ये मुलांचे भावनिक व्यवस्थापन

कोरोनामध्ये मुलांचे भावनिक व्यवस्थापन कोरोना संकट काळात लहान मुलांच्या मानसिकतेसंबंधी पुढील काळजी घ्यावी –

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

  • कोरोनामध्ये मुलांचे भावनिक व्यवस्थापन या काळात आपली ही चिडचिड, मुलांना रागवणे स्वाभाविक आहे कारण मुले घरात फार काळ घरात राहिली कि बरेच उपदव्याप करतात . अशा वेळी त्यांना घरात बिनधास्त खेळू द्यावे. फक्त त्यांच्या सुरक्षिततेला धोका नसेल अशी काळजी घ्यावी व तेव्हाच रागवावे.
  • चुकून. मुलांना जास्त रागवण्यात आल्यास त्यांना लगेच जवळ घ्यावे व त्यांना तुम्ही का रागावले हे सांगून तीच गोष्ट परत शांतेत समजून सांगावी.
  • मुलांना सकारात्मक गोष्टी सांगाव्या व गोष्टींमध्ये कोरोनाचे संदर्भ टाळावे. रात्री झोपताना मुलांना झोप येत नसल्यास कोरोनाच्या नावाने घाबरवू नये.
  • मुलांना गोष्टी सांगायला लावून, चित्र काढायला लावून त्यांच्या मनात लपून राहिलेल्या भावना बाहेर येऊ द्या .
  •  मुलांच्या सगळ्या जबाबदाऱ्या एकाच पालकावर टाकण्याऐवजी त्या दोघांमध्ये वाटून घ्या.
  • मुलाला भीती वाटत  असल्यास त्यांना जवळ घ्या व त्यांची भीती कमी करा.
  •  जर आपल्या सोसायटीत कोरोनाचा एक ही रुग्ण नसल्यास व कोणाच्या ही घरात सर्दी खोकल्याचा त्रास नसल्यास काही घरातील मुलांनी एकत्र येऊन खेळण्यास हरकत नाही.
  • या काळात मुलांना घरातील कामे, भांडी घासणे, सामान आणून देणे यात सहभागी करून घ्याव.

कोरोनामध्ये मुलांचे भावनिक व्यवस्थापन या निमित्ताने आपण कुटुंब म्हणून जवळ आलो आहोत व मुलांच्या संपर्कात आलो आहोत तर विविध वयात मुलांच्या भावनिक गरजा काय असतात ते ही जाणून घेणे गरजेचे आहे

  • 0 – ५ वर्ष
  • मिठी मारणे व जवळ घेणे.
  • हसणे व त्यांच्या सोबत खेळणे.
  • प्रेम आणि काळजी
  • डोळ्यात बघणे व त्यांच्या लक्ष देणे कडे  
  • ६ – ९ वर्ष
  • त्यांच्याशी बोलणे व त्यांचे म्हणणे लक्ष देऊन ऐकणे
  • त्यांच्या खेळत सहभागी होऊन आपण मजा घेतोय हे दाखवणे
  • त्यांच्या प्रश्नांना उत्तरे
  • त्यांच्या खेळत किंवा उपक्रमात सक्रीय सहभाग
  • १० – १२ वर्ष
  • आधार व मार्गदर्शन
  • प्रेरणा व त्यांच्या मतांना होकार
  • नियमांसाठी कारणे सांगावी लागतात
  • जबाबदारी देणे  आणी त्यांची मते न रागावता स्वीकारणे
  • १३ – १८ वर्ष
  • चर्चा व शांतेत वाद विवाद
  • दिशा देणे व
  • कडक नियम न सांगता सर्वमान्य मार्गदर्शक तत्व सांगणे
  • मान देणे व मत मांडण्याचे स्वातंत्र्य देणे  

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

कोरोनामध्ये मुलांचे भावनिक व्यवस्थापन

कोरोनामध्ये मुलांचे भावनिक व्यवस्थापन

कोरोनामध्ये मुलांचे भावनिक व्यवस्थापन कोरोनामुळे जसे आपले सर्वांचे आयुष्य बदलले आहे तसेच लहान मुलांचे ही आयुष्य बदलले आहे. शाळा बंद आहेत आणि खेळायला बाहेर, बागेत ही जाता येत नाही म्हणून मुलांची चिडचिड होते. एका मर्यादे पलीकडे त्यांना नियंत्रित करणे अवघड होऊन जाते. मुलांच्या खेळण्यात कोरोनाचा उल्लेख येऊ लागला आहे. मुल कोरोनाचे चित्र काढत आहेत. यामुळे लहान मुलांचे भावनिक व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. यासाठी पुढील गोष्टी करूया –

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

  • कोरोनामध्ये मुलांचे भावनिक व्यवस्थापन मुलांच्या या विषयी भावना ओळखणे किंवा त्या त्यांना बोलून दाखवण्यास प्रेरित करणे. ते बोलत असल्यास त्यांना न रोखणे
  • या भावना भीती, मृत्यूची भीती, मजा, उस्तूकता, चिडचिड , नैराश्य अशा संमिश्र आहेत
  • यासाठी जर मुलांनी माहिती विचारली तर कोरोना विषयी स्पष्ट व खरी माहिती सांगणे व आजार टाळण्याच्या उपायांची माहिती देणे
  • मुलांनी कोरोना विषयी विचारलेले प्रश्न टाळू नका किंवा “तुम्ही लहान आहात आणी यात पडू नका” असे त्यांना म्हणून त्यांचे प्रश्न  धुडकावून लावू नका
  • मुलांना सांगितलेली माहिती फार जास्त किंवा कमी नसावी. संतुलित असावी व आशादायी असावी
  • कोरोनाचा मृत्यू दर खूप जास्त आहे अशा गोष्टी मुलांना न सांगता, कोरोना पासून बचाव करणे अत्यावश्यक आहे कारण सर्वांसाठी ती चांगली नाही अशा सकारत्मक पद्धतीने माहिती सांगावी 
  • घरात परत परत या विषयी चर्चा करू नका
  • मुलांसोबत कोरोना संबंधित बातम्या फार वेळ बघू नका
  • सगळ्या कुटुंबाने सोबत करायच्या अशा काही गोष्टी आणि त्यांच्या वेळा ठरवा उदाहरणार्थ बुद्धीबळ , कॅरम, व्यायाम, घरात बॉल खेळणे
  • या काळात मुलांना स्क्रीन व मोबाईलच्या व्यसना पासून लांब ठेवा
  • कोरोनामध्ये मुलांचे भावनिक व्यवस्थापन तुम्ही स्वतः जर निराश, चिंताग्रस्त,  चीडचीडे असाल तर मुलांवर त्याचा परिणाम होईल. म्हणून मुलांचे भावनिक अस्थर्य टाळण्यासाठी तुमचे भावनिक व्यवस्थापन ही महत्वाचे आहे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

संसर्गाची नवी लक्षणे

संसर्गाची नवी लक्षणे

संसर्गाची नवी लक्षणे नुकतेच सीडीसी ने कोरोनाच्या लक्षणांमध्ये भर घातली आहे –

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

  • थंडी वाजून येणे
  • थंडी वाजून आल्याने वारंवार थर थर होणे
  • स्नायू दुखणे
  • डोके दुखणे
  • घशात खवखवणे
  • तोंडाची चव नाहीशी होणे
  • वास घेण्याची क्षमता कमी किंवा नाहीशी होणे

संसर्गाची नवी लक्षणे याशिवाय तातडीने रुग्णालयात जाऊन डॉक्टरांकडून इमर्जन्सी उपचार सुरु करण्याचे काही निकष ही सीडीसी ने संगीतले आहेत

  • श्वास घेण्यास त्रास होणे
  • छातीत सतत काही वेळ दुखणे / छातीवर दाब येणे
  • झोपेतून उठवून ही न उठणे किंवा नेहमी एवढे उठवले कि व्यक्ती लगेच उठून बसते पण आज तसे करत नाही आहे. झोपेतून उठवायला जास्त हलवावे,ओरडावे लागते आहे. भान न राहणे ,चक्कर येणे
  • चेहरा किंवा ओठ निळे पडणे

सीडीसिने सांगितलेली ही लक्षणे सोडून भारतातील डॉक्टरांना इतर ही काही लक्षणे आढळून येत आहेत –

  • ज्येष्ठ व्यक्ती सतत दिवस भर झोपेत राहणे
  • भूक पूर्ण नाहीशी होणे
  • अनियंत्रित जुलाब
  • तरुण व्यक्ती निस्तेज दिसणे
  • दोन दिवसात झपाट्याने  तब्येत खालावणे
  • सर्दी, खोकला झाल्यावर सहसा व्यक्ती कसा असतो , किती थकलेला असतो व कसा बरा होतो हा पॅटर्न घरातील व्यक्तींना माहित असतो. या वेळेला ताप , खोकला , सर्दी हि नेहमी सारखी वाटत नाही. नेहमी कुठल्या ही आजारा पेक्षा या वेळी जरा वेगळे आणी जास्त वाटते आहे . सुस्तपणा जास्त आहे. हे निरीक्षण नातेवाइकांच्या लक्षात येते. असे असल्यास लगेचच डॉक्टरांना दाखवावे व सविस्तर सगळा वैद्यकीय इतिहास सांगावा
  • काहींना , ताप , खोकला व श्वास  घेण्यास त्रासासोबत अंगावर चट्टे ( रॅश ) ही येते आहे. हे गोवर किंवा कांजण्या सारखे अंगावर किंवा काहींना हात व पायांच्या बोटांवर ठिपक्यांसारखी रॅश येते आहे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

लॉकडाऊन दरम्यान व नंतर झोपेच्या समस्या

लॉकडाऊन दरम्यान व नंतर झोपेच्या समस्या

लॉकडाऊन दरम्यान व नंतर झोपेच्या समस्या सध्या लॉकडाऊन सुरु असल्याने व अनेक जन घरून काम करत असल्याने रोजचा दिनक्रम व वेळापत्रक कोलमडून गेले आहे. त्यात सर्वात मोठा फटका हा झोपेला बसला आहे. पुढील गोष्टींमुळे सध्या  झोपेवर परिणाम झाला आहे –

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

  • शारीरिक हालचालींमध्ये कमतरता
  • घरी असल्याने कामाच्या गतीवर परिणाम
  • स्क्रीन टाईम मध्ये वाढ
  • घरचे खाणे असल्याने जास्त जेवण
  • कोरोनाची भीती व सतत कोरोनाच्या बातम्या ऐकणे
  • आर्थिक अनिश्चिततेची काळजी
  • घरी असल्याने दुपारच्या झोपेत वाढ

लॉकडाऊन दरम्यान व नंतर झोपेच्या समस्या आपले शरीर व झोप एका जैविक घड्याळावर चालत असते ज्याला सरकॅडीयन रिदम असे म्हणतात. अनेकांना उशिरा झोपून उशिरा उठण्याची सवय लागत चालली आहे. सध्या ही जैविक घड्याळच विचलित झाल्याने लॉकडाऊन संपल्यावर झोपेची समस्या जास्त प्रमाणात भेडसावू शकते. तसे होऊ नये म्हणून या संदर्भात आता पासूनच काळजी घेणे आवश्यक आहे.

  • घरी असलो तरी आपले उठण्याचे व झोपण्याचे वेळापत्रक निश्चित असले पाहिजे
  • शक्यतो लवकर कामावर जाणाऱ्यांनी सकाळी त्याच वेळेत उठण्याची सवय सोडू नये. ती सवय मोडली असेल तर प्रयत्नपूर्वक आधीच्या वेळा पाळण्यास सुरुवात करावी
  • रोज किमान तीस मिनिटांचा घाम निघेल असा शारीरिक व्यायाम घरात करणे गरजेचे आहे. यात दोरीवरच्या उड्या, छतावर जॉगिंग करणे, नाचणे, पुश अप्स , सूर्यनमस्कार असा कुठला ही व्यायाम घरात करावा
  • झोपताना १० ते १५ मिनिटे खोलवर श्वास घेणे किंवा श्वास घेताना पोट बाहेर येईल व सोडताना आत जाईल या पद्धतीने अॅबडॉमीनल ब्रीदिंगचा व्यायाम करावा
  • ६ नंतर शक्यतो चहा – कॉफी टाळावी
  • घरी असलात तरी रात्री ८ पर्यंत रात्रीचे जेवण करावे
  • झोपण्याआधी २ तास फोन, टीव्ही, संगणक, लॅपटॉपचा वापर थांबवून स्क्रीन संपर्क बंद करावा
  • झोपताना तळपायांना तिळाचे किंवा एरंडाचे तेल लावून झोपावे

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

How To Improve Immune System

How To Improve Immune System 10 most effective immunity boosters in day to day routine A most important factor in the fight against corona or any illness is Immunity. In this chronicle, Dr. Amol Annadate talks about 10 most effective lifestyle practices that are very simple to follow and help improve individual immunity. Watch these easy to adopt practices in daily routine to be strong healthy and safe in a vulnerable environment.

How To Improve Immune System कोरोना या किसी बीमारी के खिलाफ लड़ाई में सबसे महत्वपूर्ण बात इम्युनिटी है। इस विडिओ में डॉ अमोल अन्नदाते 10 सबसे प्रभावी जीवन शैली प्रथाओं के बारे में बात करते हैं जो व्यक्तिगत रोग प्रतिकार शक्ती में सुधार करने में मदद करने के लिए बहुत सरल हैं। कमजोर वातावरण में मजबूत स्वास्थ और सुरक्षित रहने के लिए दैनिक दिनचर्या में इन प्रथाओं को अपनाने के लिए जरूर देखे

https://youtu.be/0Yy5PbAsVzc

How To Improve Immune System कोरोना किंवा कोणत्याही आजाराविरूद्धच्या लढाईतील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रतिकारशक्ती. या विडिओ मध्ये डॉ. अमोल अन्नदाते 10 सर्वात प्रभावी जीवनशैली प्रथा बद्दल बोलतात ज्या अनुसरण करणे आणि वैयक्तिक रोग प्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत करण्यासाठी अतिशय सोप्या आहेत. या असुरक्षित वातावरणामध्ये सुरक्षित राहण्यासाठी दररोजच्या या पद्धती जाणून घ्या … नक्की पहा

For regular updates from Dr. Amol Annadate like announcements, youtube videos, and articles stay tunned.

गैरसमजाच्या ‘नशे’ वर अर्थदृष्टीची मात्रा

गैरसमजाच्या 'नशे' वर अर्थदृष्टीची मात्रा

गैरसमजाच्या ‘नशे’ वर अर्थदृष्टीची मात्रा कोरोनामुळे देशालाच नव्हे तर जगाला अर्थ शास्त्रज्ञांना अर्थ शास्त्राचे विश्लेषण आरोग्याच्या दृष्टीकोनातून करावे लागते आहे. नुकतेच राज ठाकरेंनी राज्याला आर्थिक गती देण्यासाठी मद्य विक्री सुरु करा अशी मागणी केली आहे. या मागणी कडे फक्त आता कोरोना संकटाच्या दृष्टीकोनातून नव्हे तर पुढे आरोग्य अर्थशास्त्राच्या मापात तोलून बघायाल हवे. मद्य विक्रीच्या महसुलाची चर्चा आज वर या दृष्टीकोनातून कधी झालीच नाही. सक्तीची दारू बंदी या पुढे मद्य व्यवसायाबद्दल चर्चा कधी पुढे जातच नाही. अनायासे कोरोनामुळे समाजाचे प्रत्येक अंग आपण आरोग्याच्या दृष्टीकोनातून पाहण्याच्या सवयीप्रत आलोच आहेत. म्हणून या निमित्ताने मद्य महसूला कडे निकोप आरोग्य अर्थ दृष्टी समाजाला देणे गरजेचे आहे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

                       गैरसमजाच्या ‘नशे’ वर अर्थदृष्टीची मात्रा महाराष्ट्र राज्याला मद्यातून महसूल सोडला तर इतर कुठला ही मोठा उत्पन्नाचा स्त्रोत नाही.  गेल्या वर्ष भरात हा महसूल १३ हजार कोटी आहे आणि सहसा १६ – १८  हजार कोटीं पर्यंत ही जातो. याला महत्व यासाठी आहे की मद्य विक्री हा राज्याच्या अखत्यारीत असतो व राज्य सरकारचे यावर नियंत्रण असते. केंद्र या महसुलात हस्तक्षेप करत नाही. व्यसन व अपायकारक गोष्टींवर जो उत्पादन खर्चाच्या सव्वापट अधिक कर लावला जातो त्याला ‘सीन टॅक्स’ म्हणजे पाप करण्यावर लादलेला कर असे म्हंटले जाते. लोकशाहीत पाप करण्यापासून रोखण्याला घटनात्मक मर्यादा आहेत तर किमान त्यावर ज्यादा कर लादून त्यातून लोक कल्याणकारी योजना राबवून पाप भिरुंचे आयुष्य सुसह्य करता येईल अशा विचाराने मद्य, तंबाखू, बिडी – सिगारेट व्यवसायला प्रोत्साहन देण्यात आले. अर्थात इतरांचे आयुष्य या महसूला मधून सुसह्य होते का ? हा विषय अलाहिदा. एवढ्या वर्षात व्यसन पूरक पदार्थ सोडून इतर सकारत्मक उत्पादकता, उद्योग, कारखाने असे महसुलाचे पर्याय उभे न राहिल्याने राज्याला महसूला साठी मद्य, तंबाखूच्या स्त्रोता वर अवलंबून राहण्याचे एक प्रकरे व्यसन लागेल. यामुळे याची मोजावी लागणारी सामाजिक आणि आरोग्य समस्यांच्या रूपाने आर्थिक किंमत हे आर्थिक त्रेराशिकच कोणी मांडलेले नाही. अर्थात याचा अर्थ सक्तीची दारू बंदी किंवा मद्य पिण्याविषयी नैतिकतेचे निकष या पलीकडे व्यसनमुक्तीसाठी ठरवून व नियोजन बद्ध प्रयत्न या विचारा चा अर्थ शास्त्राच्या दृष्टीने आपण किती विचार करतो या प्रश्नांचे उत्तर शोधण्यास हे चांगले निमित्त आहे.

       गैरसमजाच्या ‘नशे’ वर अर्थदृष्टीची मात्रा वैद्यकीय शास्त्रात  कुठल्या ही आजार व सवयीची आर्थिक किंमत मोजण्याची एक पद्धत आहे. कोरोनामुळे तर आजारांमुळे आर्थिक नुकसानीची व्याख्याच बदलून टाकली आहे. तशीच इतर आजार व सवयीमुळे होणाऱ्या तात्पुरत्या शारीरिक नुकसाना पलीकडे त्यामुळे होणारे disability associated life years म्हणजे त्यामुळे सर्व स्तरावर येणाऱ्या अधूपणा पायी खर्ची पडणारी आयुष्याची वर्षे व loss of man hours म्हणजे माणसाचे कार्यक्षमतेचे बुडणारे तास असे दोन निकष आजारामुळे होणर्या अर्थ हानीला लावले जातात. प्रत्येक आजार व सवयी साठी हे निकष लावून होणारे आर्थिक नुकसान याची गणना केली जाते. त्यावर उपाय योजनेचे प्राधान्य ठरवले जाते. मद्य व्यवसायाची आर्थिक समज मात्र १६ हजार ते १८ हजार कोटी या एकाच आकड्या भोवती व महसूलाचा  महत्वाचा स्त्रोत या निकषा पलीकडे गेलीच नाही. एक मद्यपी त्याच्याशी संबंधित १६ जणांचे आयुष्य बेचिराख करतो. ग्रामीण भागात कुटुंबावर भार बनून राहिलेला घरतील मद्यपी कर्ता असण्याची अपेक्षा असलेला पुरुष प्रत्येक घरात सापडेल. थेट मद्यपानामुळे होणाऱ्या आजारांची संख्या ६१ आहे आणि इतर २०० आजारांमध्ये मद्यपान हे भर घालणारा महत्वाचा घट आहे. देशात ३१ % लोक नियमित मद्यपान करतात. अधून मधून मद्यपान करणाऱ्यांची संख्या अजून जास्त आहे. आर्थिक गणित मांडायचे  झाल्यास एक जरी व्यक्ती मद्यपान करत असली तरी त्या घरातील ४५ टक्के हे मद्य व मद्य संबंधित समस्यांवर खर्च होते. आकडेवारी चा अभ्यास करून मद्यातून येणारे उत्पन्न व मद्यामुळे होणारे नुकसान हे गणित मांडण्यासाठी राज्यात आकडेवारी जमवण्याची तसदी ही आजवर आपण घेतलेली नाही. या उलट मद्यपान करणाऱ्या तरुण व कुमारवयीन मुलांची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक असल्याने आपले राज्य मात्र या विषयात संशोधनासाठी अंतर राष्ट्रीय संस्थांना मात्र आकर्षित करते. मद्यपानामुळे होणारे मानसिक आजार , आत्महत्या याची तर काही मोजदादच नाही. देशात दर वर्षी १ लाख रस्त्यावर होणाऱ्या अपघातातील मृत्यू मध्ये चालकाने मद्यपान केलेले असते. आजारांच्या पलीकडे बहुतांश बलात्कार,  निर्भया सारख्या अमानुष  खून व बलात्कार , घरगुती मारहाणीच्या समस्या, इतर गुन्हे हे मद्याच्या अमला खाली केल्या जातात. आजारावर होणारा खर्च व कामाचे बुडणारे तास सोडून या सर्व समाजिक असंतुलनाची किंमत आपण मद्यामुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानात पकडायची कि नाही हे ठरवावे लागेल.

                  गैरसमजाच्या ‘नशे’ वर अर्थदृष्टीची मात्रा प्रत्येक युद्धात शत्रू धारातीर्थी पडल्यावर किंवा जखमी अवस्थेत असल्यास त्याला मृत्यू शय्येवर शेवटचे पाणी पाजण्याची एक युध्द नैतिकता अनंत काळा पासून युद्ध शास्त्रात अस्तित्वात आहे. राज्याला भरमसाठ महसूल देणाऱ्या बहुतांश मद्यपींना मात्र मृत्युच्या वेळी उपचार , पाणी देण्यास कोणीही नसते. केसरी या अक्षय कुमार अभिनित चित्रपटात शेवट पर्यंत शत्रूला पाणी पाजणारा सहकारी उत्तम चित्रित केला आहे. तरीही शेवटी शत्रू पक्षातील सरदार त्याची क्रूर हत्या करतो. महसुलाचे कारण पुढे करून मद्य विक्रीचे समर्थन करणारे शासन कित्येक वर्ष या क्रूर सरदाराच्या भूमिकेत मद्यपींची कत्तल करतेच आहे. किंबहुना त्या पाणी पाजणाऱ्या छोट्या सैनिका सारखे आपण व्यसनमुक्ती साठी काही शास्त्रीय प्रयत्न तरी करत आहोत का ? सक्तीची मद्य बंदी नकोच पण किमान या १६ हजार कोटींपैकी थोडा तुकडा तरी आपण व्यसनमुक्तीसाठी खर्ची घालणार आहोत का ? मुळात व्यसनमुक्ती वैद्यक मानस शास्त्रातील अशी अंधारी खोली आहे जिथे कोणाला ही प्रवेश करण्यात रस नाही. मद्यपान हा नैराश्य, मधुमेह , ह्र्दय रोग असा एक शारीरिक  – मानसिक आजार आहे आणि त्याला उपचारांची गरज आहे हे सत्य समजून घेण्याची कोणाची ही तयारी नाही. अल्कॉहॉलिक अॅनॉनिमस सारख्या संघटना यासाठी वर्षानूवर्षे झटत आहेत. आज शासकीय सोडाच पण खाजगीत ही एखाद्या मद्यपीला मद्य सोडण्याची इच्छा असेल तरी उपचार , सुविधा सहज उपलब्ध नाहीत. त्यावर निधीची तरतूद सोडाच पण चर्चा ही नाही. धर्मा सारखेच  बहुतांश जनता मद्याच्या अमला खाली राहणे हे राजकीय पक्ष , मद्य उद्योग व्यावसायिक, विक्रेते या सर्वांच्याच सोयीचे आहे. याचे समर्थन करताना महसुलाचे कारण आहेच. पापाचा कर वसूल केल्यावर हा कर पचवताना  व्यसनमुक्तीच्या प्रयत्नांच्या रूपाने प्रायश्चीताचा विचार मनात आला तरी आर्थिक गणिते बदलण्यास सुरुवात होईल.

सदरील माहिती आपण सकाळ मध्येही वाचू शकता

वास घेण्याची क्षमताही होते कमी

वास घेण्याची क्षमताही होते कमी

वास घेण्याची क्षमताही होते कमी कोरोनामध्ये ताप, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास, सर्दी ही लक्षणे सोडून अजून एक महत्वाचे लक्षण सगळ्यांनी समजून घेतले पाहिजे ते म्हणजे अचानक वास घेण्याची क्षमता कमी होणे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

वास घेण्याची क्षमताही होते कमी कुठल्या ही व्हायरल संसर्गामध्ये चव आणि घ्राणशक्ती या दोन्ही विशेष इंद्रिय क्षमता ( स्पेशल सेन्सेस ) वर थोडा परिणाम होत असतो. पण तो न जाणवण्या इतपत असतो. कोरोनाच्या संसार्गात मात्र तो प्रकर्षाने जाणवतो आहे. ही घ्राणशक्ती चांगल्या आणि वाईट अशा दोन्हीं वासांसाठी कमी होते.   यात सर्व प्रथम जेवण करताना त्याचा सुवास न जाणवणे, अंघोळ करताना साबणाचा किंवा टालकम पावडर चा वास न जाणवणे असे हे लक्षण आपल्या ध्यानी येते. यात वास येणे पूर्ण बंद होणे किंवा वास येणे कमी होणे अशा दोन्ही गोष्टी होऊ शकतात. काही रुग्णांमध्ये हे कोरोनाचे पहिले लक्षण असू शकते. पण या सोबत ताप, खोकला ही लक्षणे असतातच. परदेशात मात्र काही रुग्ण हे इतर कुठले ही लक्षण सोडून फक्त घ्राणशक्ती कमी होणे एवढे एकच लक्षण असलेले कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. भारतात यावर अजून माहिती येण्यास वेळ लागेल. तसेच वास घेण्याची क्षमता कोरोना बरा झाला की पुरवत होते. हे लक्षण महत्वाचे यासाठी वाटते कि सर्दी , खोकला, तापाच्या कोरोना सोडून इतर व्हायरल आजार व फ्लू मध्ये हे जास्त प्रमाणात जाणवत नाहीत. म्हणून ताप , सर्दी, खोकला  या पैकी कुठल्या ही लक्षणा सोबत वासाची क्षमता कमी झाली असल्यास आपल्या डॉक्टरचा सल्ला घ्यावा. वास घेण्याची क्षमताही होते कमी नाकामध्ये पॉलीप म्हणजे लटकणारे गुच्छ असणे, अलर्जी मुळे असणारी दीर्घकालीन सर्दी, नाकातील हाड वाढलेले असणे, नाकाच्या मधला पट वाकडा असणे या आजारांमध्ये ही घ्राणशक्ती कमी होते. पण यात कुठल्या ही आजारामध्ये ताप नसतो.  

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता